Posts

Showing posts from April, 2026

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

Image
गेवराई ( प्रतिनिधी ) दि. 30 एप्रिल -           गेवराई तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता गेवराई क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यावेळी रुग्णाचे तापमान १०५.६°F दर्शविणार्‍या उच्च श्रेणीतील तापासह त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक अवस्थेत होती. रुग्णाच्या मेंदूला ताप गेल्यामुळे त्यांची शुद्धी पूर्णतः विस्कळीत झाली होती व त्यांना स्टेटस एपिलेप्टिकस (सातत्याने येणाऱ्या फिट्स/सीझर) चा त्रास होत होता. या गंभीर अवस्थेमुळे भद्री भोसले यांचे घरचे व नातेवाईक पूर्णपणे घाबरले होते. त्यावेळी डॉ. दिपक फाटक यांनी नातेवाईकांना प्रकृती व उपचारपद्धत समजावून सांगितले व सर्वांना धीर दिला.           यानंतर डॉ. दिपक फाटक यांनी रुग्णावर तात्काळ उपचार सुरू केले व NCCT ब्रेन (CT Scan) करून मेंदूची तपासणी केली. अशिक्षित असलेल्या नातेवाईकांना तपासणीचा अर...

मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रदिनी लिंबागणेश येथे निदर्शने

Image
  लिंबागणेश (दि.०१ ) : एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि.१ मे महाराष्ट्रदिनी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा अभ्यासक्रमातून हटविणे म्हणजे मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच राजस्थानातील विजयाची ऐतिहासिक वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे असून कोणत्याही दबावाखाली इतिहासात बदल करू नये, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी निवेदन स्वीकारले. या संदर्भात जिल्...

न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले

Image
न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले परळी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन बागवाले यांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): परळी वैजनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत जोरदार भूमिका मांडली. सभेदरम्यान नगरसेवक नितीन बागवाले यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र समाचार घेतला. अलीकडील आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अंबेवेस येथील सरस्वती नदीवरील पुलाच्या कामातील बोगसपणा सभागृहात उघडकीस आणत, संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात अभियं...

वृक्षारोपणातून जिजाबाई जगतकर यांच्या अस्थी विसर्जनास अनोखी श्रद्धांजलीजगतकर कुटुंबीयांचा आदर्श पायंडा

Image
परळी प्रतिनिधी – स्मृतीशेष मातोश्री जिजाबाई शंकरराव जगतकर यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम आज, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी परळी येथे श्रद्धापूर्वक संपन्न झाला. राजमाता जिजाऊ मुलींच्या वस्तीगृहाच्या वॉर्डन तसेच दलित मित्र पुरस्कारप्राप्त स्व. शंकरराव राजाराम जगतकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे वृद्धापकाळाने ९८ व्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले होते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जगतकर कुटुंबीयांनी एक आदर्श उपक्रम राबवत वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन केले. सकाळी ‘रक्षा सावडणे’ या विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर चांदापूर येथील संत चोखामेळा सोसायटीतील शेतजमिनीत, स्व. शंकरराव जगतकर यांच्या समाधीजवळ वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन करण्यात आले. दुपारच्या सत्रात पुण्यानुमोदन व जलदान विधी तसेच धम्मदेशना कार्यक्रम विधीचार्य आनंद तूपसमुद्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला अँड. अनंतराव जगतकर,अरुण जगतकर, अशोक जगतकर, राजाभाऊ जगतकर, बहिणाबाई कांबळे तसेच सुना, नातवंडे, आप्तेष्ट, नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्...

रोहितळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; 'सर्वधर्मसमभावा'चे दर्शन

Image
​गेवराई प्रतिनिधी : तालुक्यातील रोहितळ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावात पाहायला मिळालेला. जयंतीनिमित्त भीमगीत संगीत रजनी आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ​ गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ​ उत्सवादरम्यान गावातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे सामाजिक सलोख्याचे आणि एकतेचे दर्शन घडले. ​गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रोहितळमधील हा जयंती सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम

Image
मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम   अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेली बैठक सकारात्मक आणि परिणामकारक चर्चेसह यशस्वीरीत्या संपन्न झाली.   यावेळी शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात व बीड येथील अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित मुलीचे वसतिगृह व जागा उपलब्ध करून कामाला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले मा.आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, शेख मुजीबभाई,फारुख पटेल, भागवत तावरे यांच्या सतत पाठपुरावा चालु आहे.. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी ...

गढी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगाना ग्राम निधी अतर्गत 5% टक्के प्रमाणे निधी वाटप

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज दिनांक 28 / 4 /2026 रोजी सकाळी 11 = 00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी येथे गढी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी पठण आय व्ही .व गढी ग्रामपंचायतचे क्लार्क नारायण जाधव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गढी येथील अपंगाना 5% टक्के प्रमाणे ग्राम निधीचे वाटप करण्यात आले . या निधी वाटप कार्यक्रमास गढी गावातील नोदणीकृत अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पठाण आय व्ही यांनी सर्व आलेल्या अपंग बांधवाना गढी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतुन 5% टक्के निधी अपंग बांधवाना वाटप करत आहोत असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व अपंगांना निधीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थितीत अपंग बांधव सखाराम पोहिकर . विक्रम कांबळे . राहुल कांबळे . अमर कांबळे . आशाबाई सोळुके .बबलू शेख . ताहेरा भाभी . आयशा शेख . इतर अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत हो...

अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा; कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

Image
अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा;  कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश (दि.२९) : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, तडे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या आणि ८७८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गावर मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान विशेषतः रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दुचाकी वाहनांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न करता संबंधित कंत्राटदार एचसीपीएल कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा तात्पुरता केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची दुरुस्ती असल्याने समस्या कायमच राहार आहे. दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीकडील कामही रखडलेल्या अवस्थेत आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि रस्त्याल...

पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून? केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र

Image
बीड प्रतिनिधी – केज पोलीस स्टेशन आधीच राज्यभर चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील तरुण आशिष धिवार यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या कथित मारहाणीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हा मृत्यू नसून थेट खून असल्याचा आरोप होत आहे. रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी कठोर भूमिका घेत, “केज पोलिसांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी जोरदार मागणी केली आहे. “हा साधा मृत्यू नाही, तर पोलीस अत्याचाराचा परिणाम आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मयत आशिष धिवार यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आधी गुन्हा दाखल करा, मगच अंत्यसंस्कार,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याशिवाय, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी पोस्टमार्टम इन-कॅमेरा पद्धतीने, बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांकडून करण्याची मागणी हीही पुढे करण्यात आली आहे. या घटन...

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..   10 जणांविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद.   केज, दि. 27 : तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे....  जीवाचीवाडी येथील दैवशाला उमेश सारुक या घरी आसताना त्यांचे पती व जाऊ हे त्यांच्या घराच्या मागील शेतात पाईप लाईन जोडीत होते , यावेळी शहादेव सारुक, महादेव सारुक, व ज्ञानेश्वर सारुक यां तिघांनी घरी येऊन दैवशाला उमेश सारुक त्यांच्याशी गैरवर्तन करून वाईट हेतूने त्यांच्या हाताला धरून त्यांना घरात ओढून नेत असताना त्यांनी आरडा,ओरडा केल्यामुळे त्यांचा नवरा व जाऊ धावत आले असता तिघेही पळून गेले. दरम्यान थोड्याच वेळात आरोपीतानी संगनमत करून लाथा बुक्क्याने, व काठीने केलेल्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून शहादेव तुकाराम सारुक,महा...

शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Image
शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:-  डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२७ ): छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तथ्यहीन व ऐतिहासिक आधार नसलेली विधाने करून अवमानना करणाऱ्या बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहुजन महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळवीरांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप करत, सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संबंधित वक्तव्य झाले असल्याने, “ही अवमानना सरकार प्रायोजित आहे का?” असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले. नागपूर येथे “भारतदुर्गा” मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रम...

शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार! 'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर

Image
शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार!    'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर  ​ आष्टी(प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  शिरूर कासार तालुक्यातील (जिल्हा बीड ') महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मग्रारोहयो) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील सावळागोंधळ आणि विहिरींच्या मर्यादित लक्षांकावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला. गरजू शेतकऱ्याला विहीर आणि गोठा मिळालाच पाहिजे, टार्गेटचे रडगाणे बंद करा, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे आणि उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रशासनाला निवेदनात दिला .  ​ मुख्य मागणी काय आहे-- ​शिरूर कासार पंचायत समितीने प्रत्येक ग्रामपंचायतला केवळ २० विहिरींचे तुटपुंजे टार्गेट देण्यात आल्याने यावर संताप व्यक्त करत शिवसेनेने गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निवेदन दिले .निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे--    ​थेट लाभ: शेततळे, गाय गोठा, शेळीपालन आणि जलसिंचन विहिरींचे अनुदा...

शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस

Image
शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस बीड प्रतिनिधी : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…” या संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा विचार प्रत्यक्षात उतरवत रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मा. पुरुषोत्तम (गोटू) वीर यांचा वाढदिवस यंदा अत्यंत वेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. बीड-गेवराई महामार्गावरील त्यांच्या शेतात वृक्षारोपण करून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यासह शहरातून विविध पक्षांचे नेते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने डीजे, फटाके आणि दिखाऊ खर्च टाळत मित्रपरिवाराने साधेपणाला प्राधान्य देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश दिला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम विशेष ठरला. “एक व्यक्ती, एक वृक्ष” या संकल्पनेतून अनेकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांनी...

रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती

Image
रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित गेवराई प्रतिनिधी – मौजे रामपुरी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. दिनांक २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन हे सकाळी १० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जयंती उत्सवाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे, किशोर कांडेकर, सचिन उजगरे आदी मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. मौजे रामपुरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकास शरणांगत, उपाध्यक्ष प्रविण शरणांगत तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक कचरू शरणांगत, विक्रम शरणांगत, धम्मपाल शरणांगत यांनी ही माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक संपन्न.

Image
बीड (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक दिनांक २५ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, अंबेजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख अँड. संगिता चव्हाण यांनी संबोधित केले.              येणाऱ्या काळात कोणत्याही निवडणूक होणार नसल्याने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती मा.ना.डॉ. निलम ताई गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव श्री संजय जी मोरे साहेब, आणि शिवसेना नेत्या सौ. मीनाताई कांबळी यांच्या सुचनेने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख मा.ना.श्री प्रकाशजी अबीटकर साहेब, बीड जिल्हा संपर्क मंत्री मा.ना.भरातसेठ गोगावले साहेब, शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव श्री. अशोकजी पटवर्धन साहेब, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज जी शिंदे साहेब, उपनेत्या संगिता ठोंबरे, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्नी...

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाणी संकट; बोअर आटले, रुग्ण त्रस्त प्रशासनाने तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णालयातील बोअरवेल पूर्णपणे आटल्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन कामकाज यावर गंभीर परिणाम झाला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर धावपळ करावी लागत आहे. अनेकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असून आर्थिक भारही वाढत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.भर उन्हाळ्यात अशा प्रकारे रुग्णालयात पाणीटंचाई निर्माण होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ पाण्याची टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बीड शहर स्वच्छतेत आधुनिकतेची मोठी झेप : घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित, स्वच्छता सभापती शेख निजाम

Image
बीड | प्रतिनिधी बीड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, स्वच्छता विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील सर्व घंटागाड्या व स्वच्छता संबंधित वाहनांवर अत्याधुनिक GPS प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हा उपक्रम मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार, आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक,शेख मुजीबभाई, सभापती बाळासाहेब गुंजाळ,संजय उडाण,जकी सौदागर,गटनेता फारूक पटेल यांच्या सहकार्याने तसेच स्वच्छता सभापती शेख निजाम व मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, पारंपरिक पद्धतींमध्ये अनेक मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर GPS प्रणालीचा अवलंब करून स्वच्छता व्यवस्थापनात सुसूत्रता, शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक घंटागाडी व स्वच्छता वाहनाची हालचाल, त्यांचे वेळापत...

शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

Image
शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन; बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचाही निषेध : डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.२५) : शहीद काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तसेच पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. याचवेळी बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित तथ्यहीन वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तक न वाचताच आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल...

बीड शहरासाठी शववाहिका दुरुस्त करून लवकरच सेवेत-शेख निजाम

Image
बीड, प्रतिनिधी — बीड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बीड नगरपालिका प्रशासन व स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्या सूचनेवरून शहरातील बंद पडलेली शववाहिका दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ती नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात आपत्कालीन परिस्थितीत किंवा दुःखद प्रसंगी शववाहिकेची अत्यंत गरज भासते. मात्र, मागील काही काळापासून तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा खंडित झाली होती. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, ज्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शववाहिका त्वरित दुरुस्त करून सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नगरपालिका प्रशासनानेही या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तसेच, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार आमदार विजय सिंह पंडित, यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळू...

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड

Image
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड  मयंक शैलेश चौधरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी जागतिक मास्टर अबॅकस सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून झाली" बीड (प्रतिनिधी ) जागतिक स्तरावरच्या लाईव्ह मॅथ ओलंपियाडमध्ये सर्व स्पर्धेमध्ये मयंक चौधरीने सर्वोत्कृष्ट मानांकन, सर्वोत्कृष्ट स्पर्धक, सर्वोत्कृष्ट विजेता असे अनेक पदक आणि ट्रॉफी मेडल मिळवलेले आहेत. शालेय स्तरावरील सर्वांगिन विकास करण्याच्या मार्गाने गणित विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे त्यासाठी अबॅकस आणि वैदिक मॅथ गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील मॅथ आणि अबॅकस ट्रेनिंग केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. जागतिक स्तरावरच्या 19 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या लाईव्ह मॅथ ग्रँड मास्टर ओलंपियाड मध्ये मयंक शैलेश चौधरी याने सर्वोत्कृष्ट मॅथ ओलंपियाड म्हणून पदक मिळवलेले आहे. लाइव्ह मॅथ ओलंपियाड असोसिएशन दुबई आणि इंडिया आणि इंटरनॅशनल स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप तसेच अबॅकस ऑनलाई...

पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था;प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुर्दशेमुळे रुग्णांना खाव्या लागतात खस्ता - नगरसेवक संतोष जाधव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता पूर्णतः खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो  नगरसेवक संतोष जाधव तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांसाठी हा रस्ता सध्या धोकादायक ठरत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वारांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणेही कठीण होत असल्याची स्थिती आहे. रुग्णालया समोरील रस्ता इतक्या वाईट अवस्थेत असणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे,” असे नगरसेवक संतोष जाधव यांनी सांगितले.या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नगरसेवक संतोष जाधव यांच्या वतीने देण्यात आला आहे.

पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे

Image
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकांना जीवे मारण्याची धमकी बीड प्रतिनिधी - दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची, घरात घुसून मारण्याची आणि “पानसरेंना भेटायला वर जा” अशी थेट धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असून, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की, गायकवाड यांनी रात्री उशिरा फोन करून पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला. “शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अनादरकारक आहे,” असे म्हणत त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिव्या दिल्या आणि “तुझी जीभ कापेन, घरात घुसून मारेन, तूही पानसरेंना भेटशील” अशा धमक्या दिल्या. संभाषण सुमारे ९ मिनिटे चालले. गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप आपलीच असल...

" वाचाल तर वाचाल" तर्फे जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न

Image
129 पुस्तकाचे दोन संच वाचनाकरिता वितरित.  बीड (प्रतिनिधी ) सोशल मीडिया व इंटरनेटच्या मायावी जाळ्यात अडकून विद्यार्थी वाचनापासून; खेळाच्या मैदानापासून दूर राहत आहेत. लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाने 2016 पासून बीड शहरात व परिसरात 44 मोफत वाचनालये सुरू करून 3200 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे.आज दिनांक 23/ 4/ 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मौजे वरवटी तालुका जिल्हा बीड येथील 44 व्या केंद्रात 2 ऱ्या फेरीतील 41 पुस्तकांचा संच वाचण्याकरिता ॲड राजेश शिंदे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.एम. भोले सर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. संचातील पुस्तके वितरणाची जबाबदारी ॲड राजेश शिंदे यांनी तर प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या मोफत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 88 पुस्तकांचा संच वर्गशिक्षिका विशाखा वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. सदरील पुस्तकांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुउद्देशीय विकास प्रकल्प

. गेल्या एक शतकापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात कोणत्या आणि किती समस्यांना तोंड द्यावे लागेल याची माहिती आणि पूर्ण ज्ञान होते. त्यामुळेच त्यांना भारताचा द्रष्टा नेता, अंतर्यामी व्यक्तिमत्त्व, किंवा भविष्याचे वेध घेणारे शिल्पकार म्हणले तर वावगं ठरणार नाही. आज संपूर्ण देशात पाण्याचा प्रश्न टोकाचा आणि दुर्भिक्षेतेचा झाला आहे. काही विचारवंतांनी भाकीत केल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध जर झाले तर ते पाण्यासाठीच होईल. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी केलेले कार्य सुचविलेले धोरण जल,कर, विद्युत, शेती उत्पादन व उद्योगासंबंधीचे विचार आजही भारताच्या यशस्वीतेसाठी उद्बोधक ठरत आहेत. भारताची सामाजिक आर्थिक बैठक निर्धारित करण्यामध्ये 1920 ते 1950 हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो या काळात सामाजिक आणि आर्थिक साधन म्हणून नियोजन तंत्राचा स्वीकार झाला. या नियोजन विकासाची सुरुवात जल व ऊर्जा या विकास युद्धोत्तर पुनर्रचनेच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात झाली. हा काळ साधारण 1942-46 चा होता त्यावेळी गव्हर्नरच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांच्याकडे ऊर्जा, जलसिंचन आणि ...

आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Image
आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी कोल्हापूर स्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यास परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली. बीड (दि 23 ): बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरस्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरुन आई,बहिण,आणि पत्नीचा उल्लेख करुन,अतिशय अश्लील- अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांची चौकशी करुन अटक करावी आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी; अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना बीड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनामध्ये तीव्र निषेध नोंदवून म्हटले आहे की, " शिवाजी कोण होता" हे पुस्तक 38 वर्षांपुर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहीले आहे.मराठी सहीत अन्य भाषांमधील लाखों प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत.मात्र,या पुस्तकाचे शिर्षक शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करीत असल्याचे म्हणत पुस्तकाचे वितरण,विक्री करीत असले...

विहामांडवा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार उघडकीस सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गंभीर आरोप

विहामांडवा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार उघडकीस सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गंभीर आरोप विहामांडवा मुतारीच्या गेटसाठी एक लाख सहा हजार खर्च; विविध कामांत अनियमिततेचे आरोप विहामांडवा (प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील विहामांडवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करणारे अनेक प्रकार समोर येत आहेत. सार्वजनिक मुतारीच्या गेटसाठी तब्बल एक लाख 6 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. साध्या गेटसाठी इतका मोठा खर्च करण्यात आल्यामुळे निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत आहे. याचबरोबर, गावात मागील काही वर्षांपासून नळाद्वारे येणारे पाणी निकृष्ट दर्जाचे असून त्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही गावाची परिस्थिती चिंताजनक आहे. कचरा संकलनासाठी नियमित घंटा गाडी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कचरा विविध ठिकाणी टाकावा लागत आहे. त्यामुळे गावात अस्वच्छता वाढत असून पर्यावरण आणि स...

चौसाळा येथे भीम जंयती निमित्त नेञ तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Image
(बीड प्रतिनिधी ) विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैधकिय अधिकारी डॉ. अंकुश मंचुके साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रुग्णसेवक डॉ. मंगेश मंचुके साहेब,रुग्ण सेवक शैलाताई नाईकवाडे,सामाजिक कार्यकर्ते भारत सुरवसे, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, विठ्ठल झोडगे पाटील,सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक(बाबा)कुचेकर,उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे यांच्यासह अनेक गरजु रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले

Image
परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले दिनांक 10 एप्रिल 26 थकीत वेतन व अनुषंगिक लाभ मिळावेत याकरिता झुंजार कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सुरू केले होते* अखेर चौथ्या दिवशी परळी शहराच्या कर्तव्यदक्क्ष नगराध्यक्षा मा.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी लिखित पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आपण संवाद साधून तुमच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने मंजूर करू आणि तुमचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने मी कामगार नेते भाई गौतम आगळे सर हे आमच्या सतत संपर्कात असल्याने तुम्हाला या पूढे आंदोलनाचे हत्यार उपसन्याची गरज पडणार नाही असे मी नगरपरिषद अध्यक्षा म्हणून आपणास शब्द देते. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चा, पि.एफ. कोड नंबर (यु.एन.ए. ) एक महिन्यात देण्यात येईल असेही लेखी पत्रात नमूद केले आहे.        त्या अनुषंगाने दिनांक १५ एप्रिल २०२६ चे संतप्त कामगार टोकाची भूमिका घेणार होते. जिल्हा सह ...

जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन; ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

Image
बीड (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सायंकाळी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाले होते. जिल्हा कामगार कार्यालयातील कथित एजंटशाही, भ्रष्टाचार आणि बोगस लाभार्थी प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी कामगार आक्रमक झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आंदोलनकर्त्यांना कळविण्यात आले की, संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने शासन दरबारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आवश्यक ती चौकशी व कारवाई लवकरच करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने काही कालावधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी स...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण विरोधात लिंबागणेश येथे निदर्शने; ११ मे बीड मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Image
बीड (दि.२१ ) : केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रस्ताव पुढे आल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी समाज आक्रमक झाला असून लिंबागणेश येथे निदर्शने करण्यात आली. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. सरकारकडून अनुसूचित जातीतील ५९ जातींचे अ, ब, क, ड अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत असून, या निर्णयामुळे समाजात फुट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल, विविध घटकांमध्ये संघर्ष व अविश्वास वाढेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फडणवीस सरकारने नेमलेल्या न्या. अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक न करता हरकती व सूचना मागवण्यात आल्यामुळे आंबेडकरी समाजात नाराजी असल्याचे निदर्शनास आले. समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा, तसेच उपवर्गीकरणाचा आधार व पद्धत स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड,...

धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी

Image
धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी  धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात दुसऱ्यांदा मानाचा तुरा      कु.आर्या काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन-शुभेच्छांचा वर्षाव   आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            नुकत्याच मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या .या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . त्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या प्रवीण काळे या विद्यार्थिनीने बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर, राज्यस्तरातून द्वितीय क्रमांक पटकावून मानकरी ठरली .   तर प्रांजल गोरक्षनाथ आडागळे तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, असलबा असलम सय्यद तालुकास्तरावर चौथा क्रमांक, रुद्र केशव उदावंत केंद्रात प्रथम क्रमांक, गीतांजली संदेश श...

पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

Image
पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.२०) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभो...

बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा

Image
बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा मुख्याधिकाऱ्यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न;नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे  बीड प्रतिनिधी   बीड नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक ११, बालेपीर भागात झालेल्या खडीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे. या प्रकरणात तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक ११ मधील पाच गल्ल्यांमध्ये खडीकरणाचे काम दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता एकही खडी टाकण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी शैलेश फळसे यांनी कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. तक्रार करूनही संबंधित गुत्तेदार आणि अभियंता यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणात दोषी अभियंत्याला तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाकडून योग्...

जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Image
बीड (प्रतिनिधी ) – जि.प.के. प्राथमिक शाळा वांगी येथील मुख्याध्यापक सुभाष वीर सर यांची कन्या कुमारी साक्षी सुभाष वीर हिने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे पालीसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणापासूनच अभ्यासू, जिद्दी आणि ध्येयवेडी असलेल्या साक्षीने शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवणे हेच एक मोठे आव्हान असताना, त्या पुढील कठोर आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे तिच्या चिकाटीचे द्योतक आहे. दिवस-रात्र परिश्रम, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर तिने हे यश मिळवले. साक्षीच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचे, विशेषतः वडील श्री. सुभाष वीर सर यांचे मार्गदर्शन आणि आईचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. शिक्षक कुटुंबातील संस्कार आणि शिक्षणाविषयीची ओढ यामुळे तिला लहानपणापासूनच शिक्षणाची योग्य दिशा मिळाली. वैद्यकीय पदवी प्राप्त ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर! जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर तरीही तलावातून अवैध पाणी उपसा सुरूच; पाणीटंचाईचे संकट गडद

Image
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर! जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर तरीही तलावातून अवैध पाणी उपसा सुरूच; पाणीटंचाईचे संकट गडद :- डॉ.गणेश ढवळे  बीड (दि.१९ ) :- पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपश्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडू नये यासाठी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधून होणारा नियमबाह्य पाणी उपसा तत्काळ थांबवण्याचे आदेश महसूल व पाटबंधारे विभागाला दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भायाळा तलावावर अवलंबून असलेल्या भायाळा, वाघिरा, मेंगडेवाडी, लिंबागणेश, पोखरी (घाट), पिंपरनई, बेलगाव (सोमनाथवाडी) आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. शेतातील विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि विंधन विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. “कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मग्न” — डॉ. गणेश ढवळे अवैध पाणी उ...

चौसाळ्यात शिवजयंती व भीमजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
​बीड (प्रतिनिधी ):कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाचे औचित्य साधून चौसाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​याप्रसंगी संदेश (शेठ) खिंवसरा, भाऊसाहेब जाधव, पत्रकार विकास नाईकवाडे, डॉ. प्रशांत जोगदंड आणि पत्रकार अजमेर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक कुचेकर, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे, वैभव सोनवणे, प्रकाश पवार, बापू घोडके आणि शेखर सोनवणे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ​यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरादरम्यान असंख्य रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली.

नेकनूर येथे इंटक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगारांना संघटित होण्याचे आवाहन: श्री रामधन जमाले

Image
  नेकनूर (ता. जि. बीड) प्रतिनिधी :राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शेतमजूर, बांधकाम मजूर, ऊसतोड मजूर तसेच संघटित व असंघटित कामगारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.       यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष श्री. रामधन जमाले यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना संघटित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे असून, इंटकच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदस्य नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन अधिकाधिक कामगारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.       इंटकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्हाध्यक्ष श्री रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर इंटक बीड तालुका उपाध्यक्ष शेख सद्दाम सकलेन यां...