Posts

Showing posts from June, 2026

किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष पुरस्कार २०२६’; ११ वर्षांच्या सामाजिक कार्याची पावती

Image
बीड प्रतिनिधी : (दि.०१) शिर्डी येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. शुभारंभ लॉन्स, निघोज-कोपरगाव हायवे, शिर्डी येथे झालेल्या या कार्यक्रमात सौ. रेखा राऊत व सौ. अश्विनी गडकर यांच्या हस्ते किस्किंदा पांचाळ यांना फेटा, ट्रॉफी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ११ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या किस्किंदा पांचाळ यांनी समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून गोरगरिबांसाठी एक महिना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ७५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत, कोणताही सामाजिक किंवा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर त्य...

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन

Image
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणी आ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन पाटोदा :- (दि.३० ) आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या, इमारतविरहित तसेच नव्याने वर्गखोल्यांची आवश्यकता असलेल्या शाळांसाठी १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात आष्टी तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ८७ लाख, पाटोदा तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ३७ लाख आणि शिरूर तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ९० लाख अशा एकूण १४ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७६ शाळा असून, मोडकळीस आलेल्या ११ शाळांमधील ३१ वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच विद्यार्थी संख्या वाढलेल्या ३ शाळांमध्ये अतिरिक्त ३ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ४ कोटी ८ लाख रुपये तसेच १८ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपय...

परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणासह किमान वेतनाप्रमाणे पगार थेट बँक खात्यामध्ये कधी मिळणार - भाई गौतम आगळे सर

Image
परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणासह किमान वेतनाप्रमाणे पगार थेट बँक खात्यामध्ये कधी मिळणार - भाई गौतम आगळे सर परळी२९( प्रतिनिधी ) परळी वैजनाथ नगर परिषदे मधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार थेट बँक खात्यात देण्यात यावा तसेच त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार २९ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता नगरपरिषद परळी वैजनाथ कार्यालयासमोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली आहे अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.       या बाबत सविस्तर वृत्त असे की घनकचरा व्यवस्थापनातील सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी तसेच विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत असून त्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे असल्याची  बाब शासन व प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली. कंत्राटी कामगारांना सध्याचे किमान वेतन ०१/०१/२०२६ ते ३०/०६/२०२६ या कालावधी करिता जाहीर कर...

अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा; शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी — निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा; शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी — निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने  बीड : (दि. २९) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना हात आखडता घेणारे जिल्हा प्रशासन मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदी वरिष्...

पंतांनी महाराष्ट्र नासवला जाती जातीत भांडणे लावून माणसात माणूस ठेवला नाही-डॉ जितीन वंजारे

Image
पंतांनी महाराष्ट्र नासवला जाती जातीत भांडणे लावून माणसात माणूस ठेवला नाही-डॉ जितीन वंजारे        महाराष्ट्र मध्ये गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जेव्हापासून पंत एका विशिष्ट पदावर बसलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. सुरुवातीला हिंदू मुस्लिम त्यानंतर मराठा दलित, वंजारी-मराठा आणि आता महार-मांग म्हणजे तस्तम सर्वच जातीमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक एकात्मता भंग करण्याचे काम या ठिकाणी होत आहे.काही जातीवादी धर्मवादी संघटना यामध्ये तेल टाकत आहेत.नवतरुणांची माथे भडकवत आहेत.शेतकऱ्याची कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवून येथील तरुणांनी शासनाला जबाब विचारायला हवा, तात्कालीन सरकार आल्यापासून 90 वेळेस पेपर फुटी झालेली आहे आपल्या पाल्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न मिटत नाहीयेत, आपल्या पालकांचे शेतकऱ्यांचे शेतीच्या समस्या सुटत नाहीत, नदीजोड प्रकल्प, पाणी आडवा पाणी जिरवा, तळे तलाव मोठे प्रकल्प,शेतकऱ्याला कर्जमाफी, पीक कर्ज, विमा,अनुदान, दुष्काळ उपाय योजना,महागाई, विकास, भ्रष्टाचार,राम मंदिर 200 करोड चोरी, अत्याचार अन्...

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज : - एक युगप्रवर्तक

Image
सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज : - एक युगप्रवर्तक   भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी, लोकाभिमुख धोरणे आणि क्रांतिकारी निर्णयांच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. म्हणूनच त्यांना "सामाजिक न्यायाचे प्रणेते" आणि "लोककल्याणकारी राजा" म्हणून गौरविले जाते. जन्म आणि बालपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. कोल्हापूर संस्थानच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव शाहू छत्रपती ठेवण्यात आले. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, संवेदनशीलता आणि समाजाविषयी आस्था दिसून येत होती. त्यांनी राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान त्यांना भारतीय समाजातील विषमता, जातीय ...

पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवा - बिरसा फायटर्सची मागणी

Image
नंदुरबार प्रतिनिधी :- महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत.                     निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असून इतर सरळसेवा परीक्षांप्रमाणे ही वयोमर्यादा ३३ वर्षे किंवा ३८ वर्षे करण्यात यावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत.त्या आंदोलनाला आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. कोरोना काळातील नुकसान आणि भरती प्रक्रियेतील विलंबाचा हवाला देत ही मागणी जोर धरत आहे.सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीवयोमर्यादा किमान वयोमर्यादाः १८ वर्षे व कमाल वयोमर...

लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती

Image
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती ! दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता २० लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.२६ ) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. याचा मोठा फटका वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती यासह परिसरातील ग्रामस्थ, दुग्ध उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक, बाजारहाट करणारे नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना बसत होता. रस्ता व पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना प्रशासनाकडून केवळ पाहणी व आश्वासनांवर वेळ जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० सप्टेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत "आता तरी अजितदादा प...

सहा महिन्यांपासून पगार थकीत; नरेगा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Image
बीड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. नियमितपणे गावागावात योजना राबविणारे, कामांची पाहणी करणारे व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मचारी आज स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत. वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, वीजबिल आणि दैनंदिन गरजा भागविताना कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कर्ज काढून संसार चालवावा लागत असून काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनरेगा ही ग्रामीण भागातील रोजगाराची महत्त्वाची योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेतात. मात्र त्यांनाच वेळेवर वेतन मिळत नसल्याने शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनरेगा योजनेअंतर्गत कामगारांच्या मजुरीबाबत तरतुदी असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न कायम असल्याची खंत व्यक्त होत आहे. नरेगा कर्मचारी संघटनांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्या...

बीड जिल्ह्यातील खासगी शाळा व ट्युशन क्लासेसच्या मनमानी फी आकारणीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:- रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

Image
बीड, दि. २५ जून २०२६ :बीड जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच खासगी ट्युशन क्लासेसकडून विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी प्रवेश शुल्क व फी आकारणीवर नियंत्रण आणून शासनमान्य नियमावली लागू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सविस्तर निवेदन देण्यात आले. इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात जिल्ह्यातील अनेक शाळा व ट्युशन क्लासेसकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व कष्टकरी कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनामध्ये खासगी शाळा व कोचिंग संस्थांची अनिवार्य नोंदणी, शासनमान्य फी संरचना लागू करणे, फीची कमाल मर्यादा निश्चित करणे, सर्व शुल्कांची पारदर्शक माहिती पालकांना देणे, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणे तसेच म...

शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणामुळे विद्यार्थी अनेक शालेय सुविधान पासुन वंचित-लोकजनशक्ती पार्टी

Image
बीड :अंबाजोगाई . महाराष्ट्र शासनाने शाळा मान्यता देताना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक असताना अंबाजोगाई तालुक्यात अनेक शाळांमध्ये विविध नियमांची नियमावली दिलेली असताना त्या नियमांचे उल्लंघन करून अनेक मातब्बर व्यक्ती शाळा चालवत आहेत अनेक शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून त्यांच्या या सर्व असुविधांचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक शाळेच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे मच्छर उत्पन्न होऊन विद्यार्थी तथा विद्यार्थिनींना डेंगू मलेरिया यासारखे गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता न करता येत नाही तसेच आंबेजोगाई तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात यावी तसेच प्रामुख्याने गोदावरी बाई कुंकूलोळ कन्या शाळा परळी रोड अंबाजोगाई या शाळेची सखोल तपासणी करून सदर शाळेकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे संबंधित शाळेमध्ये वर्गखोल्या ह्या अत्यंत अस्वच्छ असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसणे मुश्किल झाले आहे सदर शाळेतील वर्गखोल्या मध्ये पंखे नाहीत त्यामुळे विद्यार्थिनींना गर्मीमध्ये तासन तास बसावे लागत आहे सदर श...

एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर

Image
बीड | प्रतिनिधी अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड लोकसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वीर यांनी म्हटले आहे की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून, घटनात्मक आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे. बीड जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, गेवराई, धारूर, पाटोदा, आष्टी तसेच इतर तालुक्यांतील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकर विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अनुसूचित जातींचे घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी...

आरक्षण वाचवण्यासाठी 26 जून रोजी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहा; उपवर्गीकरणास विरोध करा – ॲड. तेजस वडमारे

Image
बीड | प्रतिनिधी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या बीड ते मुंबई लॉंग मार्चचा समारोप शुक्रवार, 26 जून 2026 रोजी दादर येथील चैत्यभूमीवर होणार असून, या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. तेजस वडमारे यांनी केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या समारोप कार्यक्रमात राज्यभरातील आंबेडकरी समाजबांधव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात हा लाँग मार्च काढण्यात आला असून, हा लढा कोणत्याही जातीविरोधात नसून संविधानाच्या तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे ॲड. वडमारे यांनी स्पष्ट केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जातींना एकत्रित घटक म्हणून संविधानात स्थान दिले आहे. या प्रवर्गाचे अ, ब, क, ड अशा उपवर्गांमध्ये विभाजन करणे हे संविधानाच्या मूलभूत भावनेच्या विरोधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आरक्षणाचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधान...

परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर

परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत जाहीर ​कौठळीतांडा 'ना.मा.प्र. महिला', तर वसंतनगर 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी राखीव ​परळी वैजनाथ :बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मुंबई ग्रामपंचायत नियम १९६४ अन्वये परळी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. माननीय तहसीलदार श्री. विनोद रणवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ​ १२ वर्षांच्या मुलाच्या हस्ते काढण्यात आली चिठ्ठी ​आरक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. परळी येथील १२ वर्षीय लहान मुलगा चि. वैजनाथ किशोर नाईकवाडे याच्या हस्ते आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी काढण्यात आली. ​या चिठ्ठीनुसार खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित झाले आहे: ​ कौठळीतांडा ग्रामपंचायत: नागरिक मागास प्रवर्ग - ना.मा.प्र. (महिला) ​वसंतनगर ग्रामपंचायत: सर्वसाधारण (महिला) ​या सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाप्रसंगी वसंतनगर आणि कौठळीतांडा या दोन्ही गावांचे आजी-माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी ...

हिवरा बु. येथे 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' साजरे

Image
हिवरा बु. येथे 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' साजरे  एकल महिलांना मशरूम शेती व शासकीय योजनांचे मार्गदर्शन ​बीड (प्रतिनिधी ):येथे २३ जून रोजी 'जागतिक एकल महिला दिन' आणि 'महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था, हिवरा बु. आणि ग्रामपंचायत हिवरा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित तज्ज्ञांनी एकल महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि कायदेशीर हक्कांबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामसेवकांनी उपस्थित महिलांना शासकीय योजना, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीच्या १० टक्के निधीबाबत सविस्तर माहिती दिली. ​अंबाजोगाई येथील मशरूम शेती समन्वयक सुनंदा लोखंडे यांनी एकल महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने मशरूम शेतीविषयी सखोल मार्गदर्शन केले. मशरूम शेतीचे उत्पन्न, लागणारे भागभांडवल आणि गुंतवणूक याबद्दल सांगतानाच, कंपनी मशरूमची खरेदी कशी करते आणि यासाठी २० वर्षांचा करार कसा केला...

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची सार्वजनिक जयंती बीड शहरात प्रथमच            बीड (प्रतिनिधी ) आरक्षणाचे जनक सत्यशोधकिय थोर समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर स्थापन करण्यात आली असून यावर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152 वी जयंती (से.नि. सीईओ) माननीय पी. व्ही. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जून 2026 शुक्रवार रोजी विविध उपक्रमाने साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ठीक : 8.30 वाजता मान्यवरांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला तसेच सुशोभित रथातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून समता सैनिकांच्या मानवंदनेने विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. सदरील रॅलीमध्ये आयु.महालिंग निकाळजे जिल्हाध्यक्ष (भारतीय बौद्ध महासभा बीड (पश्चिम), मा.बी.बी. जाधव (सनदी लेखापाल), मा. संदीप उपरे (अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद) प्रा. प्रदीप रोडे (अध्यक्ष नालंदा फाउंडेशन बीड...

अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करा-बीड शहर बचाव मंच

Image
अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करा-बीड शहर बचाव मंच अतिक्रमण हटाव मोहिमेला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा बीड प्रतिनिधी : बीड शहरातील सर्वच भागांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिक्रमणे व निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे सर्वच नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत. वाहतुकीच्या कोंडीला खऱ्या अर्थाने रस्त्यावर अतिक्रमणे करून स्वतःचे उद्योग व्यवसाय चालविणारे लोक जेवढे कारणीभूत आहेत तेवढेच तळमजल्यावर वाहन पार्किंगची सोय दाखवून बांधकाम परवाने मिळवून, प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची कुठलीही वाहन पार्किंगची सोय न करता अवैध पद्धतीने संकुले बांधून त्यासमोर निर्माण केलेली अवैध वाहन पार्किंग आणि वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी व्यापारी संकुले हेच तेवढेच कारणीभूत व जबाबदार आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतुकीची कोंडी ही शाळकरी मुले,मुली, विद्यार्थी, महिला-भगिनी, जेष्ठ नागरिक व आपण सर्वचजण यांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद व पोलीस वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने संयुक्त पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. परंतु अतिक्रमण मो...

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चेतना तिडके यांचा सामाजिक संस्थांकडून सन्मान

Image
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी चेतना तिडके यांचा सामाजिक संस्थांकडून सन्मान बीड प्रतिनिधी : - अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई तथा प्रभारी पोलिस अधीक्षक बीड चेतना तिडके यांच्या कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व लोकाभिमुख प्रशासकीय कार्याचा गौरव म्हणून लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य, मातृभूमी प्रतिष्ठान, बीड आणि महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, महिला सुरक्षिततेबाबत संवेदनशील भूमिका तसेच नागरिकांशी समन्वय साधत प्रभावी प्रशासन उभारण्यासाठी चेतना तिडके यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सन्मान सोहळ्यास मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे, ज्येष्ठ नागरिक सुधीर देशमुख, किशोर कुलकर्णी, शाम मार्कंडे, शेख पाशा, नितीन जायभाये या...

जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी बोकडे बाळू अण्णासाहेब याची मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड

Image
जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी बोकडे बाळू अण्णासाहेब याची मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड      सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव    आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :   आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी सन २०१२ च्या बॅचमधील बोकडे बाळू अण्णासाहेब याची सन् २०२६ मध्ये मुंबई पोलीस सेवेमध्ये नुकतीच निवड झाली . सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून बोकडे बाळू अण्णासाहेब याची जनता वस्तीगृह संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल(अण्णा ) , संस्थेचे अध्यक्ष श्री.सय्यद अब्दुल भाई , कॉलेजचे प्राचार्य सय्यद ए.डी. सर, उपप्राचार्य श्री तिपोळे सर, जनता उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

"अशोक भवार यांच्या काव्य मुदिता या संग्रहातील कविता परिवर्तनाच्या, बदलाच्या आणि धम्माच्या आहेत." - प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचे प्रतिपादन

Image
"अशोक भवार यांच्या काव्य मुदिता या संग्रहातील कविता परिवर्तनाच्या, बदलाच्या आणि धम्माच्या आहेत." - प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचे प्रतिपादन ( मुंबई, प्रतिनिधी ) पांचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने आयोजित सार्थक साहित्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे होते. यावेळी सार्थक साहित्य प्रकाशनाच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, पांचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि बौद्ध विकास मंडळ पवईचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आणि मानवतावादी निमंत्रित कवी संमेलन ज्येष्ठ कवी बबन सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी याप्रसंगी बोलताना, "कविता बाहेर येते त्यावेळी ती कविता स...

शिक्षक कवी गवाजी बळीद यांच्या दिनविशेष काव्यधारा काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Image
 शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कवी गवाजी बळीद यांचा बहुउपयोगी काव्यग्रंथ "दिनविशेष काव्यधारा "नुकताच महाराष्ट्र राज्य एकता फौंडेशनचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक मा अनंतजी कराड यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मा कल्याणरावजी नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतांना आदर्श मूल्ये जोपासणारी समाजनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांवर ऊठसूठ टिका करणाऱ्या बेताल प्रवृत्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा काव्यग्रंथ म्हणजे कवी गवाजी बळीद लिखित "दिनविशेष काव्यधारा " हा काव्यग्रंथ स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याची शिकवण देणारा असून लेखन पसरून घसरून विसरुन न करता लेखन सामाजिक सांस्कृतिक भान जपून आवरावे लागते असे मत जेष्ठ साहित्यिक अनंतजी कराड यांनी व्यक्त केले . याप्रसंगी प्रसिद्ध कवी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव बाळासाहेब कोठुळे यांनी दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ मौलिक व दुर्मिळ निर्मिती असल्याचे नमूद केले. निसर्गाची राष्ट्राची एकात्मत...

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे

Image
​ ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे ​ शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा बुडू देणार नाही..शेवटच्या पैशासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार!" शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर   ​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :             आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोरील वातावरण ठेवीदारांच्या आक्रोशानं आणि शिवसैनिकांच्या गर्जनेनं चांगलंच तापलं! ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये फसलेल्या तमाम निष्पाप ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उग्र निदर्शनं करण्यात आली.   ​या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख आदरणीय सोपान (काका ) मोरे, उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर आणि पीडित ठेवीदारांनी केले. ​ मुख्य मागण्या सह थेट दिला इशारा अधिवेशनात आवाज उठवणार--- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'ज्ञानराधा'चा विषय तारांकित झाला पाहिजे! ​ पैसा परत मिळालाच पाहिजे--फसलेल्या...

पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Image
पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील साठेनगर परिसरात विषारी हातभट्टी दारू पिल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, नगरसेवक नितीन रोडे, रतन आदोडे,भैय्यासाहेब आदोडे, बालाजी मस्के,नवनाथ मस्के, नागनाथ मस्के, दीपक लोंढे, ऋषिकेश क्षीरसागर, आनंद कांबळे, दर्शन लोंढे, बाळू मस्के, संजय कुमार शिंदे, बाबुराव मस्के, सोमनाथ मस्के व सर्व महिलाकेली आहे. पुण्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळीतही अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, साठेनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम हातभट्टी दारूची विक्री सुरू असून याब...

बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा

Image
बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.२२ : बीड नगरपरिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सोमवारी (दि.२२) निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, नगर विकास विभागाच्या दि. २४ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार बीड नगरपरिषदेला १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या उभारणीसाठी प्राधान्याने करण्यात यावा. डॉ. क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत वीजबिल भरून अतिरिक्त वीजभार मंजूर करून घेण्याची मागणी केली. यामुळे शहराला पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्या...

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे

Image
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या २३ जून 'आंतरराष्ट्रीय विधवा दिना' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे. शासन स्तरावर एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी विविध सकारात्मक पावले उचलली जात असून, राज्याचे महिला व बालविकास विभाग एकल महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी आयोजित होणारा 'एकल महिला दिवस' हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, एकल महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यांच्या न्याय्य मागण्य...

धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन

Image
धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन :- डॉ. गणेश ढवळे  बीड :- (दि.२२ ) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था असून अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेल्या या शाळांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२ सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात इमारत नसलेल्या ५८ शाळा, मोडकळीस आलेल्या १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या तसेच विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ७० शाळांमध्ये ९८ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा इमारतींसाठी ५७ कोटी रुपये तसेच २९० वर्गखोल्य...

अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड

Image
अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड बौद्धांसह 58 जाती समूहाने एकत्र येण्याची गरज बीड (प्रतिनिधी ) 22 जुन  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने शोषण केलेल्या जाती समूहांना, सामाजिक आर्थिक धार्मिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या आघाडीवर येण्यासाठीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आर्थिक मागास प्रवर्ग या तीन प्रवर्गांची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्मिती सभेत, अस्पृश्य-शूद्रातीशूद्र समाजास न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवाची परकाष्टा केली. बाबासाहेब आपल्या भाषणात वेळोवेळी सांगायचे की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठीही तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनुसूचित जाती हा प्रवर्ग निर्माण केला. हा प्रवर्ग मानवी संवेदना नसणाऱ्या जातींचा एक समूह आहे. हा समूह प्रगतीपथावर असून, या जातीतील तिसऱ्या पिढीने मोक्याच्य...

मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Image
मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास घर फोडून ३ तोळे सोने व खतासाठी ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास लिंबागणेश:- (दि.२२ ) बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली. संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले...

लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते

Image
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते  बीड, दि. 21 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिरात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष पूजा-अर्चना करून गणपती बाप्पाच्या चरणी साकडे घालण्यात आले. याच पवित्र प्रसंगी असंघटित मजूर, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मा. राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होऊन संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट व्हावेत, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, असंघटित मजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामा...

पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे

Image
पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२१) बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्य...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश; राज्य सरकारची सकारात्मक भूमिका : - सौ आशाताई बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक गाव व शहरातील एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमात निमंत्रित करावे आणि त्यांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव व्ही. आर. ठाकूर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांवर सव...

प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान– आ. सुरेश धस

Image
प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान – आ. सुरेश धस आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – महापौर ज्योती गाडे आष्टी | प्रतिनिधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अहिल्यानगर येथे मेघनंद हॉटेल मध्ये दि २० जून रोजी आयोजित ‘महाराष्ट्र आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी भाषणात बोलत होते. पुढे बोलताना आ धस यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात वेळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, प्रत्येकाने आपल्या कार्यात वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. “आज कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही,” असेही त्यांनी नमूद केले.तर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने ...