Posts

Showing posts from July, 2026

खालापूरी परिसरात हरणांचा धुमाकूळ, वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावे-डॉ जितीन वंजारे

Image
  बीड प्रतिनिधी :-औंदाच्या वर्षी पावसाळा पुढे ढकलल्या कारणाने पीक पेरणी उशिरा झालेली आहे त्यातच काही शेतकऱ्यांच्या कडे थोडेफार पाण्याची उपलब्धता असल्याकारणाने वेळेवर कापसाचे उत्पन्न घेतले गेले आहे परंतु हरणाच्या कळपांनी राणच्या रान खाऊन टाकले आहेत. ठिबक सिंचनावर तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे अतोनात नुकसान हरणाचे कळप करत आहेत खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या परिसरामध्ये राहुल मुंडे यांनी सांगितले की माझ्या शेतातील सर्व पीक हरणांनी खाल्ले आहे. वनविभाग गाढ झोपेत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात मा तहसीलदार साहेब आणि वनविभाग कार्यालयाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचे आव्हाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.

हक्काने हमालाकडून काम करुनघेणारे शासन मजूरी देण्यासाठी उदासीनराजकुमार घायाळ यांचे उपोषण सुरु

Image
बीड ( प्रतिनिधी   ) बीड जिल्ह्यातील 23 शासकिय धान्य गोदामा काम करणार्‍या हमालांना सहा महिन्यापासून मजूरी मिळाली नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. यासाठी 11 जुन ते 23 जून कामबंद आंदोलन केले तथापी मंत्रालयीन स्तरावर उदासीनता लक्षात घेवून कामबंद आंदोलन स्थगित करुन शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायतने संघटनचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या बेमूदत उपोषणाचा निर्णय घेतला तसे पत्र राज्याच्या पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव व जिल्हाधिकारी, बीड यांना देवून बीड सह राज्यात हमालीसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही तो तात्काळ द्यावा यासाठी आज दिनांक 1 जूलै 2026 पासून राजकुमार घायाळ यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरु केले राज्यात जेथे जेथे कंत्राटदारा शिवाय काम करुन घेतले जाते तेथे निधी उपलब्ध करुन दिलेला नाही त्यामूळे गेले 3 ते 6 महिन्यापासून हमालांना काम करुन मजूरी न मिळाल्याने हमालांची अवस्था दयनिय झालेली आहे. या बाबतच्या निवेदनातील पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.केलेल्या कामाची मजूरी तात्काळ मिळावी,औरंगाबाद हायकोर्टाने  तीन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमा...