Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे यंत्रणा लागली कामाला

Image
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे यंत्रणा लागली कामाला बीड (प्रतिनिधी ) दि.४ : शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर रोडवरील बालेपीर मस्जिद परिसरात गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाची दखल घेत भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. अखेर रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बालेपीर मस्जिद परिसरात रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ.क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर रखडलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याबद्दल डॉ. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभ...

कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक संपन्न-भाई गौतम आगळे सर

Image
मुंबई ( प्रतिनिधी ) विस्तारित मंत्रालय कक्ष 319 कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली तर स्वाभिमानी महानिर्मिती कृती समितीचे संयोजक तथा मार्गदर्शक कॉम्रेड नचिकेत मोरे उपाध्यक्ष तथा रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या उपस्थितीत नुकतीच संयुक्त बैठक संपन्न झाली, अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.     बैठकीमध्ये स्वाभिमानी महानिर्मिती कृती समिती यांनी घेतलेले कामगार हिताचे विषय:- राज्यातील कंत्राटी कामगारांना 1983 पासून मागिल ४३ वर्षे ५ टक्के दराने तूटपुंजा घर भाडे भत्ता दिला जातो, याबाबत तत्कालीन कामगार मंत्र्याशी चर्चा झाली त्यांनी आश्वासन दिले होते की घर भाडे भत्ता वाढवला जाईल आज राज्यातील किमान वेतनाचे दर हे सर्वसाधारणपणे दहा ते बारा हजार इतके आहेत या रकमेवर पाच टक्के दराने आजच्या महागाईच्या काळात कंत्राटी कामगारांना रुपये ६०० ते ७०० पर्यंत घर भाडे मिळत आहे, पण ते वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. २९/०९/२०२५ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये 40% घर भाडेची तरतूद करता येईल असे आश्वासन दिले होते, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस...

आयुष्मान भारत महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावरून वाद; ओमप्रकाश शेटे यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप

Image
 बीड प्रतिनिधी - आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदावर ओमप्रकाश शेटे यांच्या नियुक्तीची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, या नियुक्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शुभम शिंदे आणि राजेंद्र नवले यांनी शेटे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करत मूळ कागदपत्रांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.    ओमप्रकाश शेटे यांची यापूर्वी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या कक्ष प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीसोबत शासनाच्या धोरणानुसार मानधन व इतर सोयी-सुविधांचाही उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11.31 वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार संबंधित फाईलवर टिपणी काढण्यात आली. या टिपणीत आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक अत्राम यांनी ओमप्रकाश शेटे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. याच दिवशी दुपारी 3.24 वाजता ही फाईल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयात सादर ...

पाडळी येथील अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबाला आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांची भेट

Image
बीड, दि. ४ जून — शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील गायरान परिसरात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील बरडे कुटुंबावर काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात शंकर बरडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अन्यायग्रस्त कुटुंबाची आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बरडे यांच्या समन्वयातून ही भेट आयोजित करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला तसेच आवश्यक मदत साहित्यही प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना अशोक येडे यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पाडळी येथील अनेक आदिवासी कुटुंबे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होत असतील तर हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश...

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल; बोगस पाणंद रस्ता प्रकरणी चौकशी समिती स्थापन

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील कथित बोगस पाणंद रस्ता कामांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पंचायत समिती पाटोदाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर व तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिनांक 29 मे 2026 रोजी पंचायत समितीकडे निवेदन देऊन तालुक्यातील पाणंद रस्ता कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.या मागणीची दखल घेत पंचायत समिती पाटोदाने दिनांक 3 जून 2026 रोजी पत्राद्वारे चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली आहे.गट विकास अधिकारी यू. एम. सानप यांनी दिलेल्या पत्रानुसार, चौकशी समितीमार्फत संबंधित प्रकरणाची तपासणी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 4 जून 2026 रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पाटोदा यांच्या आंदोलनाची प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याने तालुक्यातील पाणंद रस्ता कामांबाबतचे वास्त...

प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव

Image
प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव - मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत तिची सुरक्षिततेची चिंता आहेच शिक्षण हुंडा समाजातील देवाण-घेवाण प्रथा या वाढल्या आहेत याला जबाबदार आपणच आहोत त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाच्या डोळे झाक भूमीमुळे स्त्रीभ्रूणहत्येचे कत्तलखाने वाढले आहे आज कित्येक मुलांना बायका मिळत नाही समाजाने याकडे डोळे झाक करून चालणार नाही आणि यामुळेही पुन्हा महिला अत्याचाराच प्रमाण वाढल आहे.            लग्न समारंभ धोंडे जेवण दिवाळी अनेक उत्सव सण समारंभ अशा आहेत जिथे नाही त्या प्रथा घुसडल्या जातात या उत्सवांचे प्रथमच महत्व कमी होऊन फक्त दिखावा पनाचा बाजार मांडला आहे सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल करतात आणि आपणच आपल्या मुलींचे या मुलींच्या आई बापाचे गुन्हेगार होत चाल...

लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ

Image
लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (प्रतिनिधी ): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक परिसरात उभा असलेला जवळपास अडीचशे वर्षांचा महाकाय वटवृक्ष दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अखेर कोसळला. चार-पाच पिढ्यांच्या सुखदुःखाचा मुक साक्षीदार असलेला हा वृक्ष उन्मळून पडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी २९ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या आगीत वटवृक्षाच्या खोडाचा मोठा भाग जळून गेला होता. तरीही हा वृक्ष तग धरून उभा होता. मात्र अलीकडील वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे त्याची मुळे कमकुवत होऊन अखेर हा ऐतिहासिक वृक्ष जमीनदोस्त झाला. लिंबागणेशच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडी घडल्या. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींशी हा वृक्ष घट्ट जोडलेला होता. अनेक पिढ्यांनी त्याच्या छायेत विसावा घेतला, गप्पांचे फड रंगले आणि विविध कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याचा मान या वृक्षाला लाभला होता. निस...