Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाटोद्यात बसथांब्यावर निवाराशेडचा अभाव; शाळकरी मुली व प्रवाशांना उन्हात पहावी लागते बसची वाट

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरातील पारगाव रोडवरील आण्णाभाऊ साठे चौक येथे बसथांब्यावर निवाराशेड नसल्यामुळे शाळकरी मुली, विद्यार्थी, महिला व प्रवाशांना कडक उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना देखील या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाटोदा शहरातील पारगाव रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, शेतकरी, कामगार तसेच शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी प्रवास करतात. विशेषतः सकाळी व दुपारच्या वेळेस आण्णाभाऊ साठे चौक येथे बसची वाट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. मात्र या ठिकाणी बसण्यासाठी बाके, सावलीसाठी निवाराशेड किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शाळकरी मुली व इतर प्रवाशांना कडक उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शाळकरी मुली, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा विशेष त्रास सहन ...

पोलीस वेलनेस व थेरपी सेंटरची पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते उद्घाटन

Image
बीड (प्रतिनिधी ) जुने एस.पी. ऑफीस समोरील संगम हॉल, बीड येथे पोलीस वेलनेस व थेरपी सेंटर तसेच योग अभ्यास, झुंबा अॅरोमिक्स व करा ओके सिंगींग एकाच छताखाली संगम हॉल बीड येथे पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेलनेस सेंटर, थेरपी, योग अभ्यास व करा ओके सिंगींग सर्व पोलीस कर्मचारी यांनी लाभघ्यावा. तसेच जेष्ठ नागरीकांनी सुध्दा याचा लाभ घ्यावा असे पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक बी. बी. गात साहेब, पी.एस.आय. राजकुमार प्रकाश, अॅड अविनाश गडगे, हेड कॉन्स्टेबल नितीन वडमारे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती मनिषा वाव्हळ, महिला पोलीस अॅड कॉन्स्टेबल माया साबळे, निवृत्त पोलीस अधिकारी सय्यद अलीम, श्री. मॅथू जोसेफ, बसस्टँड इनचॉर्ज श्री. किरण बनसोडे, भास्कर वडमारे, विनोद सवई, जनार्धन वडमारे आदी पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. या पोलीस वेलनेस व थेरपी सेंटर तसेच योग अभ्यास, झुंबा अॅरोमिक्स व करा ओके सिंगींग या सर्व सुविधा सर्वसामान्यासाठी अल्पदरात उपलब्ध असून त्याची सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान पो...

देवाभाऊ बोलून मोकळे झाले! ३६० खाटांच्या रुग्णालयासाठी ३०४ कोटींची घोषणा; पण २१ कोटींची माता-बालसंगोपन इमारत साडे ३ वर्षांपासून धुळखात – डॉ. गणेश ढवळे

Image
बीड (दि.०७ ): राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या ३६० खाटांच्या विस्तारीकरणासाठी ३०४ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुमारे २१ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली माता व बालसंगोपन इमारत गेल्या साडे तीन वर्षांपासून फर्निचर, अग्निरोधक यंत्रणा, लिफ्ट आदींसाठी आवश्यक निधी न मिळाल्याने धुळखात पडून असून अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दिली. या इमारतीसाठी केवळ १० कोटी रुपयांच्या निधीअभावी काम रखडलेले असतानाही शासनस्तरावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. ढवळे यांनी सहकाऱ्यांसमवेत गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी निवेदने देत तसेच विविध आंदोलनांद्वारे तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी इमारतीची पाहणी करून जिल्हा नियोजनमधून ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्या निधीतून काही ...

जागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान

Image
बीड | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 7 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त होईल, अशा महिलांचा साडी-चोळी देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील गरजवंत महिलांचाही साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या सल्लागार संगीताताई धसे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन रोहिणीताई गणेश माने यांच्या पुढाकाराने होत असून, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुलोचना माने, शुभांगी माने यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित राहणार आहेत. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि महिलांना सन्मान मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

बार्शी नाका परिसरात धुरवडीच्या दिवशी रक्तरंजित राडा; अमोल कांबळे या रिक्षाचालकावर सहाजणांचा जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Image
बीड | प्रतिनिधी धुरवडीच्या दिवशी बीड शहरातील बार्शी नाका परिसरात मंगळवारी सायंकाळी भीषण मारहाणीची घटना घडून परिसरात खळबळ उडाली. इमामपूर रोडवरील प्रकाश आंबेडकर नगर येथे पाच ते सहा जणांच्या टोळीने रिक्षाचालक अमोल कांबळे यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडांनी जीवघेणा हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमोल कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. अचानक झालेल्या हल्ल्यात अमोल कांबळे यांच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. लोखंडी रॉड व लाकडांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीचे गंभीर व्रण दिसून आले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय रु...

शेवगाव शहरातील गेवराई रोड च्या ‘राजयोग’ हॉटेलवर पोलिसांचा छापा ३ बांगलादेशी मुलींची सुटका, देहव्यापार रॅकेट उघड

शेवगाव शहरातील गेवराई रोड च्या ‘राजयोग’ हॉटेलवर पोलिसांचा छापा ३ बांगलादेशी मुलींची सुटका, देहव्यापार रॅकेट उघड [ अविनाश देशमुख शेवगाव ] 9960051755 9270542511 दिनांक 06 मार्च 2026 वार शुक्रवार शेवगाव ~ प्रतिनिधी या बाबत सविस्तर वृत्त असे की  अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील राजयोग हॉटेल/लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठे देहव्यापार रॅकेट उघडकीस आले असून तीन बांगलादेशी मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांना गुप्त माहिती मिळाली होती की शेवगाव-गेवराई रोडवरील राजयोग हॉटेलमध्ये परदेशी आणि परप्रांतीय मुलींना ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात आहे. त्यानुसार ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर अचानक छापा टाकला. या कारवाईत बांगलादेशातून एजंटमार्फत आणलेल्या तीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून लॉजमध्ये ठेवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदासाठी प्राधान्य द्यावे – इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांची मागणी

Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदासाठी प्राधान्य द्यावे – इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांची मागणी.  वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा बीड प्रतिनिधी : जिल्ह्यात तसेच राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक व सामाजिक संकट कोसळत आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबांना आधार देण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना पोलिस पाटील पदाच्या भरतीमध्ये विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अशी जोरदार मागणी इंटकचे बीड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रामधन जमाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रामधन जमाले यांनी म्हटले आहे की, आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट ओढवते. विशेषतः त्यांच्या कुटुंबातील वारसांना अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगावे ला...