Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन

Image
परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन पिट लाईन, नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसह विविध मागण्यांचा पाठपुरावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले परळी वैजनाथ रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असूनही अपेक्षित पायाभूत सुविधा आणि रेल्वे सेवांपासून हा परिसर वंचित असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विविध विकासकामांसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतरण, स्थानकावर पिट लाईन मंजूर करणे, तसेच ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पर्यटक माहिती केंद्र उभारणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच म...

सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन

Image
सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन  बीड : अंबाजोगाई  कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या वतीने तालुक्यात अनेक विकास कामे केली जातात या विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध इंजिनियर चे नियुक्ती केली जाते परंतु संबंधित इंजिनियर गुत्तेदारांची संगणमत करून होणारे विविध कामे निष्कृष्ट दर्जाचे करत आहेत शहरातील अनेक भागात कोट्यावधी रुपयांचे फूटपाथ मंजूर झाले असताना आंबेजोगाई शहरात एकही ठिकाणी फूटपाथ केलेला दिसत नाही विविधअशा अनेक नाल्या या रस्त्यापेक्षा अर्धा ते एक फुटाणे उंच झालेल्या आहेत याचा प्रत्यय आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसात शहराने पाहिला रस्त्याच्या कडेला केलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी न गेल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले . विविध ठिकाणी असे चित्र पाहावयास मिळत आहे आंबेजोगाई शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे कोट्यावधी रुपयांचा फंड वापरून सुद्धा संबंधित क्रीडा संकुल...

‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन

Image
‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन (मुंबई, प्रतिनिधी ) पंचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे राहणार आहेत. कार्यक्रमास सार्थक साहित्य प्रकाशनच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, साहित्यिक भदू जगदेव, पंचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.      पुस्तक प्रकाशनानंतर मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून बबन सरोदे, गजानन गावंडे, राजरत्न राजगुरू, किरण सोनवणे, नवनाथ रणखांबे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, भदू जगदेव, प्रतीक कांब...

परळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जूनला

परळी तालुक्यातील 'या' दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ जूनला ​बीड (परळी ):परळी तालुक्यातील मुदत संपणाऱ्या आणि नव्याने गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, आगामी २४ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता परळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. ​मुंबई ग्रामपंचायत नियम १९६४ नुसार, तालुक्यातील वसंतनगर आणि कौठळीतांडा या २ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे वेगवेगळ्या आणि समांतर प्रवर्गासाठीचे आरक्षण यावेळी सोडत पद्धतीने निश्चित केले जाईल. ​या महत्त्वपूर्ण आरक्षण सोडत कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नेकनूर अप्पर तहसील कार्यालयात लिंबागणेश मंडळाचा समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध; हरकत नोंदविण्याचा निर्धार

Image
लिंबागणेश:-( दि.१८ ) : बीड तालुक्यातील नेकनूर येथे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयात लिंबागणेश महसूल मंडळाचा समावेश करण्याच्या हालचालींना लिंबागणेश परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. लिंबागणेश महसूल मंडळाचा सध्याचा कार्यक्षेत्रातील दर्जा कायम ठेवावा व त्याचा नेकनूर अप्पर तहसील कार्यालयात समावेश करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना पाठविण्यात आले. या संदर्भात गुरुवारी (दि. १८) लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, माजी सरपंच कल्याण वाणी, बाळकृष्ण थोरात,बाळासाहेब मोरे पाटील,सुरेश निर्मळ, अँड.गणेश वाणी, रमेश गायकवाड,दादा गायकवाड, सर्पमित्र अशोक जाधव,गणपत तागड, संतोष भोसले, नामदेव वाणी, शिवाजी पवार, रामदास मुळे, सय्यद अकबर, भगवान मोरे,बबन गिरे, श्रीकांत कानिटकर,सुंदरराव जाधव, संजय घोलप, विठ्ठल कदम, संजय सुकाळे, रामदास वाणी, मोहनराव कोटुळे, विनायक वाणी, सुधाकर बागल...

पीएमश्री शाळेलाच कुलुप ! शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा ! आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील शाळेसंदर्भात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार

Image
पीएमश्री शाळेलाच कुलुप ! शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा ! आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील शाळेसंदर्भात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार : डॉ. गणेश ढवळे बीड:- (दि.१७) : आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील पीएमश्री दर्जा प्राप्त जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांची तपासणी करण्यात यावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. डॉ. ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारची "पीएमश्री योजना" ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशभरातील शाळांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल लायब्ररी, आधुनिक क्रीडा सुविधा, सुरक्षित पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्...

‘स्वयंदीप’ : स्वप्रकाशातून समाजप्रकाशाकडे जाणारा काव्यप्रवास

Image
‘स्वयंदीप’ : स्वप्रकाशातून समाजप्रकाशाकडे जाणारा काव्यप्रवास (पुस्तक परीक्षण : नवनाथ आनंदा रणखांबे )      मराठी कवितेच्या विशाल नभांगणात काही काव्यसंग्रह उल्केसारखे क्षणभर चमकून विरून जातात, तर काही ध्रुवताऱ्यासारखे दिशादर्शक ठरतात. कवी निंबाजी बळीराम वाघ यांचा ‘स्वयंदीप’ हा काव्यसंग्रह दुसऱ्या प्रकारात मोडणारा आहे. या संग्रहात ७९ कविता आहेत. हा संग्रह एका संवेदनशील मनाने जगलेल्या आयुष्याचा, अनुभवल्या वेदनांचा, जपलेल्या मूल्यांचा आणि समाजाशी असलेल्या बांधिलकीचा शब्दरूप दस्तऐवज आहे. ‘स्वयंदीप’ हे शीर्षकच या काव्यसंग्रहाचा गाभा उलगडून दाखवते. दीप जसा स्वतः जळून परिसर उजळवतो, तसाच कवीचा शब्दही स्वतःच्या अनुभवांच्या तेलावर तेवत राहून समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत प्रकाश पेरण्याचा प्रयत्न करतो. या संग्रहातील कविता स्वशोधाचा प्रवास करतात; पण तो स्वकेंद्रित नसून समष्टीकडे जाणारा आहे. म्हणूनच या कवितांमध्ये स्वतःचा शोध घेताना माणसाचा, समाजाचा आणि काळाचा शोधही समांतरपणे सुरू राहतो. संग्रहातील शीर्षक कविता “स्वयंदीप”’ झलक,-- “स्वयंदीप हो तू मानवा  आपला विकास आपल्याच हाती पैका ...