Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक

Image
एसटीच्या बीड विभागात ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक आत्मसन्मानासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल श्रीरंग बरगे यांचा बीड जिल्ह्यातील एसटीच्या व्यवस्थापनाला इशारा बीड (दिनांक १४ जुलै ) एसटीच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देणाऱ्या जेष्ठ चालक, वाहकांना स्वतःला मात्र कामगिरी करताना तुम्ही बाहेरून बदली करून आलात, ज्येष्ठता सूचित खाली आहात, ही कामगिरी मिळणार नाही, ती कामगिरी मिळणार नाही असं वारंवार हिणवलं जात असेल तर हे दुर्दैवी असून आत्मसन्मानासाठी संघर्ष करावा लागेल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बीड जिल्ह्यातील एसटीच्या व्यवस्थापनाला दिला आहे. ते आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,बीड येथील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर झालेल्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेच्या नाम फलक अनावरण प्रसंगी बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने इतर संघटना मधील अनेक कामगारांनी संघटनेत प्रवेश केला. बरगे पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील तरुण नोकरीच्या निमित्ताने गाव, परिवार व संसार सोडून राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्यात जाऊन काम करण्याचे ...

नामकरणाच्या श्रेयवादात संत मुक्ताईंच्या आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीची दुर्दशा विसरले का?

Image
नामकरणाच्या श्रेयवादात संत मुक्ताईंच्या आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीची दुर्दशा विसरले का? समाधीचा जीर्णोद्धार रखडला; कोनशिला गळून पडली, संरक्षक भिंतीला तडे – पालकमंत्री सुनेत्रा पवार, आ.विजयसिंह पंडित यांनी लक्ष घालावे : डॉ. गणेश ढवळे बीड, दि . (१४ ):बीड शहरातील सुभाष रोडचे 'संत मुक्ताई मार्ग' असे नामकरण करण्यासाठी पुढाकार घेणारे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संत मुक्ताईंचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळाच्या दुरवस्थेकडे मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. समाधीस्थळावरील रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून परिसराचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी बीड आणि मुख्याधिकारी, नगरपरिषद बीड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. डॉ. ढवळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी सुभाष रोडचे 'संत मुक्ताई मार्ग' असे नामकरण करण्य...

अंबाजोगाई कृषी कार्यालयाचे कर्मचारी झाले गुटखा प्रेमी-लोक जनशक्ती पार्टी (रा)

Image
अंबाजोगाई कृषी कार्यालयाचे कर्मचारी झाले गुटखा प्रेमी-लोक जनशक्ती पार्टी (रा) बीड : शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो याच शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यालय अस्तित्वात आहे परंतु अंबाजोगाई कृषी कार्यालय हे गुटख्यामुळे चर्चेत येत असल्याचे दिसून येत आहे काल दिनांक 13/7/2026 रोजी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने संबंधित कृषी कार्यालयात पाहणी केली असता या कृषी कार्यालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे अनेक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकलेले डाग स्पष्ट दिसत आहेत यातील कळसच म्हणजे एका अधिकाऱ्याच्या टेबल खाली गुटखा खाऊन थुंकण्यासाठी एक डस्टबिन दिसत आहे त्या डस्टबिनमध्ये गुटखा खाऊन लाल रंगाचा मोठा थर निर्माण झालेला संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे तसेच कार्यालयातील बेसिंग हे हात धुण्यासाठी आहे का गुटखा खाऊन थुंकण्यासाठी आहे हेच संबंधित व्हिडिओ पाहून कळत नाही कृषी अधीक्षक साहेब आपण कार्यालयाकडे थोडे लक्ष देऊन संबंधित गुटखा खाऊन थुंकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तुमच्या कार्यालयात अनेक ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून बंदी असलेला गुटखा विमल याच्या पुड्यांचा खच संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे ...

पाटोद्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

Image
पाटोद्यात संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत सय्यद आबुशेठ मित्र मंडळाकडून वारकरी भाविकांना फळे व पिण्याच्या पाण्याचे वाटप; सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक पाटोदा (प्रतिनिधी ) पैठण ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज पाटोदा शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात पालखीचे आगमन होताच टाळ- मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिक, वारकरी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला साजेशा वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेक भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.यावेळी सय्यद आबुशेठ मित्र मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना फळे व पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करण्यात आले....

कर्तव्याबरोबरच वारकऱ्यांची सेवा; पाटोदा पोलिसांचा आदर्श सेवाभावी उपक्रम

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) आषाढी वारीनिमित्त पाटोद्यात आगमन झालेल्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यादरम्यान पाटोदा पोलिसांनी कर्तव्याबरोबरच सेवाभावाचाही आदर्श घालून दिला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकरी भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडताना पोलिसांनी पिण्याचे शुद्ध पाणी, चहा व नाश्त्याची व्यवस्था करून वारकऱ्यांची मनापासून सेवा केली. पालखी मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, वारकऱ्यांना सुरक्षित मार्गदर्शन करणे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना आवश्यक ती मदत करणे, ही सर्व जबाबदारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली.सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळाला. पाटोदा पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे आणि मानवतेचे वारकरी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले."खाकी वर्दीतील कर्तव्यदक्षता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम म्हणजे पाटोदा पोलीस," अशा शब्दांत अनेक वारकरी भाविकांनी भावना व्यक्त केल्या. संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सेवाभावी उपक्र...

महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

Image
महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या माऊली गोंडे व कृष्णा उगले यांच्या कुटुंबीयांना न्याय व आर्थिक मदतीची मागणी; स्मार्ट मीटर सक्ती, मान्सूनपूर्व दुरुस्ती व कथित घोटाळ्यांवर कारवाईची मागणी बीड |( दि.१३ ):बीड जिल्ह्यातील महावितरणच्या अनागोंदी कारभार, कागदोपत्री मान्सूनपूर्व दुरुस्ती, ऐच्छिक असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती, विजेच्या धक्क्याने झालेल्या माऊली गोंडे आणि कृष्णा उगले या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि गेवराई उपविभागीय कार्यालयांतर्गत ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरणविरोधात घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उप...

आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

Image
आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा मुंबई११(प्रतिनिधी )सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून 1 जुलै रोजी टीईटी पेपरफुटीच्या विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरासमोर आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दादा भुसे यांच्या निवासस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्याच्या चर्चा करून निवेदन दिले त्यापैकी टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून करण्यात आली. आठ दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. पण दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांकडून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलनाने आले तर मारण्याची धमकी दिली आहे. याच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठासमोर दाद...