Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बळीरामजी थोरात,दिलीप आंबाड सेवा निवृत्त.

Image
येवता:प्रतिनिधी :दि.४- जुलै-२०२६ रोजी केज तालुक्यातील कुंबेफळ येथे सेवापूर्ती कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले. केकत सारणी येथे कार्यरत असनारे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून बळीराम थोरात सर सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज येथे महत्त्वाच्या पद्धावर गटसमन्वयक,काळेगाव केंद्र येथे केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या बळीराम थोरात सर हे विद्यार्थी प्रिय अधिकारी होतेच पण सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच   दिलीप अंबाड यांनी मुख्याध्यापक बंकरंजा येथे काम केले ते पण सेवा निवृत्त झाले या सेवापूर्ती कार्यक्रम मा.अशोक थोरात,रमेशराव आडसकर,सुनिल केंद्रे,गट शिक्षणाधिकारी,केज,श्रीम.डॉ. प्रतिभा थोरात, ग्रेड पद्धाचे मुख्याधापक राजाभाऊ कदम, अरुण धपाटे,केंद्रप्रमुख,केंद्रीय मुख्याधापक,घटक शाळेचे मुख्याधापक,शिक्षकवृन्द,विधार्थी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीडमधील सुभाष रोडवरील नाल्याची डॉ.सारिकाताई क्षीरसागरांकडून पाहणी

Image
बीडमधील सुभाष रोडवरील नाल्याची डॉ.सारिकाताई क्षीरसागरांकडून पाहणी तत्काळ स्वच्छता करण्याच्या बीड न.प.प्रशासनाला सूचना बीड (प्रतिनिधी ) दि.५ : शहरातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असलेल्या सुभाष रोड परिसराला भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी रविवारी (दि.५) भेट देऊन येथील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांसह नागरिकांशी संवाद साधत परिसरातील समस्यांची माहिती घेतली. मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामात मोठ्या नाल्याची सफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचून नाला तुंबल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बोलताना डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहरातील सुभाष रोड ही सर्वात महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असून येथे दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. असे असतानाही परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नाल्यांची स्वच्छता न झाल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची निविदा काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे या पाहणीतून झाल्याचा आरो...

पाटोद्यात भटक्या कुत्र्यांची दहशत घरात घुसून लहान मुलांवर व शेळ्यांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Image
पाटोद्यात भटक्या कुत्र्यांची दहशत घरात घुसून लहान मुलांवर व शेळ्यांवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाटोदा ( प्रतिनिधी ) पाटोदा शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांमध्ये भटके कुत्रे थेट घरात घुसून लहान मुलांवर तसेच शेळ्यांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लहान मुले घराबाहेर खेळण्यासाठी जाण्यास घाबरत असून, वृद्ध नागरिकांनाही रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे.नागरिकांनी संबंधित प्रशासन आणि नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. याबाबत नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांत...

आठ महिन्यांपासून वेतन थकीत; वैद्यनाथ विद्यालयाच्या शिक्षकांचे 6 जुलै पासून आमरण उपोषण

Image
आठ महिन्यांपासून वेतन थकीत; वैद्यनाथ विद्यालयाच्या शिक्षकांचे 6 जुलै पासून आमरण उपोषण बीड | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ विद्यालय, माध्यमिक विभागातील शिक्षकांचे मागील आठ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने संतप्त शिक्षकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सोमवार, दि. ६ जुलै २०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आमरण उपोषण जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालय, बीड येथे होणार असून, शिक्षकांनी प्रशासनाकडे थकीत वेतन तात्काळ अदा करण्याची प्रमुख मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शिक्षकांनी सांगितले. "शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्यात यावे" हीच आमची प्रमुख मागणी असून, "न्याय मिळाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही," असा निर्धार समस्त शिक्षकवृंदाने व्यक्त केला आहे. या आंदोलनात वैद्यनाथ विद्यालय, माध्यमिक विभाग, परळी वैजनाथ येथील सर्व शिक्षक सहभागी होणार असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही करण...

जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याची शहर बचाव मंचने केली पाहणी

Image
जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याची शहर बचाव मंचने केली पाहणी बीड ( प्रतिनिधी ) : अनेक वर्षापासून जिल्हा परिषद ते नगरपरिषद रस्त्यालगतच्या नाल्या व रस्ता हेतूपुरस्सर पणे दुर्लक्षित ठेवण्यात आलेला होता. हा रस्ता मुद्दामच का दुर्लक्षित ठेवण्यात आला त्यालाही अनेक कारणे आहेत. गेल्या दोन वर्षापासून सतत बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेमध्ये आजवर घेतलेल्या सर्वच बैठकांमधून निवेदने देऊन सातत्याने या रस्त्या साठी पाठपुरावा केलेला आहे. वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची व रस्ता करण्याची मागणी लावून धरलेली आहे. नुकतेच बदलून गेलेले मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी मी हा रस्ता प्राध्यान्यक्रमाने मार्गी लावेल असे वारंवार आश्वासित केले होते. तरी या रस्त्याची व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजित दादा पवार यांच्यासमोरही मांडण्यात आली होती. बीड शहर बचाव मंचाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व मुख्याधिकारी शैलेश खडसे यांनी केलेल्या सर्व कार्यवाहीनंतर या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मिळवण्यात आला. बीड शहराला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. शहराला एखादी...

राजे संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय; तातडीने वर्गखोल्या उपलब्ध करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची उपायुक्तांकडे मागणी

Image
वर्गाअभावी व्हरांड्यात भरतोय वर्ग राजे संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसोय; तातडीने वर्गखोल्या उपलब्ध करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची उपायुक्तांकडे मागणी कोल्हापूर, प्रतिनिधी : तपोवननगर येथील कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजे संभाजी विद्यालयात वर्गखोल्यांच्या तीव्र कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना वर्गाऐवजी व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका वर्गातील विद्यार्थीसंख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने काही विद्यार्थी वर्गात तर उर्वरित विद्यार्थी व्हरांड्यात बसून शिक्षण घेत आहेत. शिक्षकांनाही वर्गाच्या दारात उभे राहून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी अध्यापन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन जिजाऊ ब्रिगेड, कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तातडीने किमान दोन अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याबरोबरच, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत शाळेजवळ महानगरपालिकेने बांधलेले सभागृह तात्पुरत्या स्वरू...

महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’, अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार

Image
महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’, अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार मुंबई (प्रतिनिधी) :मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (फिल्मसिटी) आणि उत्तर अमेरिकेतील नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार यापुढे अमेरिकेतील प्रतिष्ठित 'नाफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, महोत्सवाच्या सर्व अधिकृत प्रसिद्धी व प्रचार साहित्यावर 'महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने' असा अधिकृत उल्लेख तसेच शासनाचा अधिकृत लोगो वापरण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय (जी.आर.) नुकताच निर्गमित करण्यात आला असून, त्याअंतर्गत महोत्सवासाठी महाराष्ट्र शासन तसेच फिल्मसिटीमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या सामंजस्य करारा...