Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच

Image
भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच....   गेवराई (प्रतिनिधी ) - दि.१३ जून २०२६  भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी यात्रा" काल रात्री गेवराई तालुक्यातील विलासनगर येथे पोहोचली.     विलासनगर या ठिकाणी मागील काही वर्षांपासून नाथपंथी डवरी गोसावी,वडार समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शहराबाहेर असलेल्या विलासनगर येथे हा समाज पालाच्या घरात राहत आहे. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले तरी आजही भटके विमुक्त समाजाला घर, मुलांना शिक्षण, रोजगार, शेती, निवासी जागा उपलब्ध नसल्याने अशा कठीण परिस्थितीतही या समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत भटकंती करावी लागते.          या कार्यक्रमांमध्ये बोलताना ॲड. डॉ.अरूण जाधव म्हणाले की, एकीकडे भारत देश महासत्ता बनवू पाहत आहे तर दुसरीकडे आजचा भटके विमुक्त समाज हा अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठीच पिढ्यानपिढ्या संघर्ष करीत आहे. त्यांच्या या संघर्ष...

पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा

Image
पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा माजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट पंढरपूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष) यांनी भेट दिली. यावेळी अशोक येडे यांनी बीड जिल्ह्यात आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राबविलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. यामध्ये केळवाटो आंदोलन, गाजर आंदोलन, आसूड आंदोलन तसेच शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर पक्षाने केलेल्या संघर्षाची सविस्तर चर्चा केली. रोहित पवार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, शेतीसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आंदोलनाला नैतिक समर्थन दिले. यावेळी सय्यद सादिक (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), राजेंद्रजी आमटे (शेतकरी हक्क मोर्चा), आकाश आमटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित ...

रोहित पवार यांच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात दीपक देशमुख यांचा सहभाग; गौतम आगळे यांचा जाहीर पाठिंबा

Image
परळी / पंढरपूर | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत असून, परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख तसेच रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव गौतम आगळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच एकवेळ समझोता (OTS) योजनेतही ही अन्यायकारक अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी उर्वरित रक्कम भरण्याची अट न घालता थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग दोन वर्षे नियमित कर्जफेडीची अट रद्द करावी, तसेच 2017 च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनह...

संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव

Image
संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव  संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते- सुरेश महाराज जाधव  श्रीक्षेत्र बेलेश्वर अधिकमास उत्सव.. कीर्तनाला हजारो भाविकांची गर्दी.. संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव लिंबागणेश- (१३ ) संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते. अधिकमासात संतांच्या दरबारात केलेली सेवा दुप्पट फळ देते.असे प्रतिपादन श्री ह भ प सुरेश महाराज जाधव यांनी केले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सहाव्या दिवसाचे किर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज भारती श्री ह भ प महंत तुकाराम महाराज भारती, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,श्री ह भ प बबन महाराज मंजरीकर, श्री ह भ प तुपे महाराज, बबन महाराज, यांच्यासह हजारो भावीक भक्तांची उपस्थिती होती....

घोटी येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा राज्यस्तरीय अभ्यास वर्ग

Image
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ गायकर यांजकडुन    ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण कायदे तसेच विविध शासकीय सेवांबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन शनिवार, १३ जून रोजी सिन्नर फाटा येथील मातोश्री हॉस्पिटल सभागृहात करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच , , ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष , राज्य सचिव , जिल्हाध्यक्ष , जिल्हा पुरवठा अधिकारी, आजी -माजी आमदार यांच्यासह ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, संघटक, सचिव, जिल्हा सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अभ्यास वर्गामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, लोकसेवा हक्क कायदा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, सार्वजनिक वितरण व्यवस्था, ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य, व्यापारी, सामाजिक कार्यकर...

देवाभाऊंचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन

Image
देवाभाऊंचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन : डॉ.गणेश ढवळे बीड:-( दि. १२ ) : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेली योजना असुन या योजनेतील त्रुटी दूर करून सर्व पात्र व अपात्र शेतकऱ्यांना समान न्याय देत सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१२ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "गाजर वाटप" करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शासनाच्या सद्यस्थितीतील कर्जमाफी योजनेत अनेक अटी व निकष घालण्यात आले असून त्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनेक गरजू व कर्जबाजारी शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे किंवा अटींची पूर्तता न झाल्यामुळे कर्जमाफीपासून दूर राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून शासनाने...

फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी

Image
फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी पाटोदा (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. "फडणवीस सरकार मुर्दाबाद", "शेतकरी विरोधी सरकार हाय हाय", "संपूर्ण कर्जमाफी द्या", "शेतकरी एकजूट जिंदाबाद" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अपुरी, दिशाभूल करणारी व लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे उपाध्यक्ष ...