Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

शिक्षक कवी गवाजी बळीद यांच्या दिनविशेष काव्यधारा काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Image
 शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कवी गवाजी बळीद यांचा बहुउपयोगी काव्यग्रंथ "दिनविशेष काव्यधारा "नुकताच महाराष्ट्र राज्य एकता फौंडेशनचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक मा अनंतजी कराड यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मा कल्याणरावजी नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतांना आदर्श मूल्ये जोपासणारी समाजनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांवर ऊठसूठ टिका करणाऱ्या बेताल प्रवृत्तींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा काव्यग्रंथ म्हणजे कवी गवाजी बळीद लिखित "दिनविशेष काव्यधारा " हा काव्यग्रंथ स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याची शिकवण देणारा असून लेखन पसरून घसरून विसरुन न करता लेखन सामाजिक सांस्कृतिक भान जपून आवरावे लागते असे मत जेष्ठ साहित्यिक अनंतजी कराड यांनी व्यक्त केले . याप्रसंगी प्रसिद्ध कवी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव बाळासाहेब कोठुळे यांनी दिनविशेष काव्यधारा हा काव्यग्रंथ मौलिक व दुर्मिळ निर्मिती असल्याचे नमूद केले. निसर्गाची राष्ट्राची एकात्मत...

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे

Image
​ ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय मिळालाच पाहिजे--शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे ​ शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा बुडू देणार नाही..शेवटच्या पैशासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार!" शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर   ​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :             आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोरील वातावरण ठेवीदारांच्या आक्रोशानं आणि शिवसैनिकांच्या गर्जनेनं चांगलंच तापलं! ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये फसलेल्या तमाम निष्पाप ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उग्र निदर्शनं करण्यात आली.   ​या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख आदरणीय सोपान (काका ) मोरे, उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर आणि पीडित ठेवीदारांनी केले. ​ मुख्य मागण्या सह थेट दिला इशारा अधिवेशनात आवाज उठवणार--- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'ज्ञानराधा'चा विषय तारांकित झाला पाहिजे! ​ पैसा परत मिळालाच पाहिजे--फसलेल्या...

पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Image
पुणे दुर्घटनेची पुनरावृत्ती परळीत? विषारी हातभट्टी दारू पिऊन युवकाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील साठेनगर परिसरात विषारी हातभट्टी दारू पिल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, नगरसेवक नितीन रोडे, रतन आदोडे,भैय्यासाहेब आदोडे, बालाजी मस्के,नवनाथ मस्के, नागनाथ मस्के, दीपक लोंढे, ऋषिकेश क्षीरसागर, आनंद कांबळे, दर्शन लोंढे, बाळू मस्के, संजय कुमार शिंदे, बाबुराव मस्के, सोमनाथ मस्के व सर्व महिलाकेली आहे. पुण्यात नुकत्याच घडलेल्या विषारी हातभट्टी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळीतही अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, साठेनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम हातभट्टी दारूची विक्री सुरू असून याब...

बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा

Image
बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.२२ : बीड नगरपरिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सोमवारी (दि.२२) निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, नगर विकास विभागाच्या दि. २४ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार बीड नगरपरिषदेला १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या उभारणीसाठी प्राधान्याने करण्यात यावा. डॉ. क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत वीजबिल भरून अतिरिक्त वीजभार मंजूर करून घेण्याची मागणी केली. यामुळे शहराला पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्या...

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे

Image
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या २३ जून 'आंतरराष्ट्रीय विधवा दिना' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे. शासन स्तरावर एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी विविध सकारात्मक पावले उचलली जात असून, राज्याचे महिला व बालविकास विभाग एकल महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी आयोजित होणारा 'एकल महिला दिवस' हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, एकल महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यांच्या न्याय्य मागण्य...

धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन

Image
धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन :- डॉ. गणेश ढवळे  बीड :- (दि.२२ ) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था असून अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेल्या या शाळांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२ सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात इमारत नसलेल्या ५८ शाळा, मोडकळीस आलेल्या १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या तसेच विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ७० शाळांमध्ये ९८ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा इमारतींसाठी ५७ कोटी रुपये तसेच २९० वर्गखोल्य...

अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड

Image
अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड बौद्धांसह 58 जाती समूहाने एकत्र येण्याची गरज बीड (प्रतिनिधी ) 22 जुन  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने शोषण केलेल्या जाती समूहांना, सामाजिक आर्थिक धार्मिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या आघाडीवर येण्यासाठीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आर्थिक मागास प्रवर्ग या तीन प्रवर्गांची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्मिती सभेत, अस्पृश्य-शूद्रातीशूद्र समाजास न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवाची परकाष्टा केली. बाबासाहेब आपल्या भाषणात वेळोवेळी सांगायचे की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठीही तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनुसूचित जाती हा प्रवर्ग निर्माण केला. हा प्रवर्ग मानवी संवेदना नसणाऱ्या जातींचा एक समूह आहे. हा समूह प्रगतीपथावर असून, या जातीतील तिसऱ्या पिढीने मोक्याच्य...