Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाटोदा नगरपंचायतने लाखो रुपये खर्चून उभारलेली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका धुळखात पडून; विद्यार्थ्यांवर हजारो रुपये भरून खासगी अभ्यासिकेत अभ्यास करण्याची वेळ

Image
पाटोदा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना दर्जेदार व शांत वातावरणात अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाटोदा नगरपंचायतीने लाखो रुपये खर्चून उभारलेली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका सध्या धुळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या या अभ्यासिकेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्पर्धा परीक्षा, शासकीय भरती, महाविद्यालयीन शिक्षण तसेच इतर विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका मोठा आधार ठरणार होती. मात्र अभ्यासिका नियमित सुरू नसल्याने किंवा आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी दरमहा हजारो रुपये शुल्क भरावे लागत असल्याने विद्यार्थी व पालकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. नगरपंचायतीने सार्वजनिक निधीतून उभारलेली अभ्यासिका वापराअभावी पडून असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने खासगी अभ्यासिकांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे नेमके झाले काय, असा प्रश...

पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर ‘नमो उद्यान’चा डाव?

Image
पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर ‘नमो उद्यान’चा डाव? पत्रकारांच्या हक्काच्या जागेसाठी 11 जून रोजी भूमिपूजन; दीपक देशमुख यांचे आवाहन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पत्रकार व संपादक बांधवांसाठी पूर्वी राखीव ठेवण्यात आलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या सर्वे नंबर 422 जागेवर आता ‘नमो उद्यान’ उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आपल्या हक्काच्या जागेसाठी एकजूट दाखवण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी नियोजित करण्यात आलेल्या जागेबाबत प्रशासनाकडून नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. याच जागेवर नमो उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पत्रकारांच्या हक्काच्या जागेवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयाविरोधात पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पुढाकार घेत पत्रकार गृ...

डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात

Image
डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात ( प्रतिनिधी आशा रणखांबे ) कल्याण, शाहू शिक्षण संस्था, कल्याण शाखेअंतर्गत मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शाहू अध्यापक महाविद्यालय आणि देवजीभाई हरिया विधी महाविद्यालय, शहाड-कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी डॉ. गिरीश लटके यांच्या "चराग जलाओ यारो" आणि "रुजवावे पसायदान ओठी" या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनानिमित्त आयोजित ‘काव्य जल्लोष’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.  या सोहळ्यात ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास कल्याण शाखेचे अध्यक्ष जयंतीभाई हरिया, अभिनेते सुधाकर वसईकर, पी.एस.आय. अर्जुन डोमाडे, अभिनेते-दिग्दर्शक मंगेश सातपुते, मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे सह ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले , कवी रमेश आव्हाड, अभिनेते राम दोंड , प्रफुल केदार , कवयित्री स्वाती बांगर , प्रा. रुपाली लटके, कवी नवनाथ रणखांबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक म...

परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ?नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?

Image
परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ? नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?  नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन      निसर्गाचा लहरीपणा, खते, औषधाचां वाढता खर्च, न परवडणारी मजुराचीं मजुरी,यांत्रिकी खर्च करुन व चार महिने वारा,पाऊस पाण्यात राबुनही खरीप पिकास योग्य दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात खरिप पिकाच्यां भात, नागली व वरई च्या लागवडीत मोठया प्रमाणावर दिवसेंदिवस घट होत चालली आहे.    इगतपुरी तालुका हा महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो आहे.भरपुर पावसामुळे येथे भात पिकास अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे भात हे येथील प्रमुख पीक असुन त्या खालोखाल नागली व वरई ही पिकवली जाते.   दरम्यान भातामुळे या तालुक्याची ओळखच भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध आहे.येथील तांदुळ, मुरमुरा व पोहा संपुर्ण महाराष्ट्र भर परिचीत आहे.   भातासह नागली, वरई ही खरीप पिकेही येथे मोठयाप्रमाणात घेतली जातात.   मात्र पाण्या पावसात, वादळ वार्यात कष्ट करुन पिकवलेल्या भातासह खरीप पिकानां किमान उत्पादन खर्च भरुन निघेल इतकाही दर वा पैसा म...

पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील भेगा व ग्रामीण रुग्णालय ते भाकरे वस्ती अप्रोच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; टोल वसुली करूनही दुर्लक्ष का? – गणेश बामदळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ): पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हायवेपासून ग्रामीण रुग्णालय व भाकरे वस्तीला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, रुग्णवाहिका व नागरिकांची ये-जा होत असताना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश बामदळे यांनी या रस्त्यावरील भेगा व अप्रोच रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. या मार्गावर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसूल केला जात असताना रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टोल वसुलीचा उद्देश रस्त्यांची देखभाल, सुरक्षितता आणि दर्जा टिकवून ठेवणे हा असताना प्रत्यक्षात रस्त्यांवर भेगा पडणे आणि अप्रोच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून अपघातांचा धोका वाढला आहे. संबंधित टोल ...

देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने – डॉ. गणेश ढवळे बीड, दि . ८ : देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, देशातील सर्व कत्तलखाने बंद करावेत, मांस निर्यातीवर बंदी घालावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधानाच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी, या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करत गोसंवर्धन, पशुधन व्यवस्थापन आणि शेतकरीहिताचे दीर्घकालीन धोरण राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. आंदोलनात अँड .शेख शफीक भाऊ , शेख युनुस, शेख मुबीन, मुस्ताक शेख,सय्यद सादेक,रामधन जमाले,, हनुमान घोडके,भीमराव कुटे, बाजीराव ...

शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Image
शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक .रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त गढी ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे यांच्या हास्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच " जय भवानी जय शिवाजी " च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शौर्ये . दुरदृष्टी . न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श समाजाने अंगीकारण्याचे आवाहन गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी केले . शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला . आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहासात अजरामर कार्य केले . असे मत गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे व्यक्त केले या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आशा वर्कर . डॉक्टर ...