Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षा किरण डोळस यांना 'राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार' जाहीर

Image
​बीड  प्रतिनिधी :- आपल्या आक्रमक शैलीने जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा किरण डोळस यांना या वर्षाचा मानाचा 'राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार' जाहीर झाला आहे. ​पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. किरण डोळस यांनी बीड जिल्ह्यात महिलांचे संघटन मजबूत करण्यासोबतच, उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत प्रतिष्ठानने त्यांना हा सन्मान जाहीर केला आहे. ​किरण डोळस यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. "हा पुरस्कार माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असून, यापुढेही वंचितांच्या सेवेसाठी मी तत्पर राहीन," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

चैत्यभूमी येथे धर्मांतरित बौद्धांसाठी विशेष श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

Image
चैत्यभूमी येथे धर्मांतरित बौद्धांसाठी विशेष श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन; संविधान व समतेच्या रक्षणासाठी एकजुटीचे आवाहन बीड | प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदू धर्मातील विषमतावादी परंपरांना नाकारत बौद्ध धम्म स्वीकारलेल्या ओबीसी, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी आदी समाजातील धर्मांतरित बौद्धांसाठी आयोजित विशेष श्रामणेर/बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी चैत्यभूमी, दादर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते या दहा दिवसीय शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २० धर्मांतरित बौद्ध युवक-युवती सहभागी झाले आहेत. बीड, जालना, नांदेड, परभणी, रायगड, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील सहभागी या शिबिरात बौद्ध धम्माचे सखोल प्रशिक्षण घेत आहेत. उद्घाटनप्रसंगी ॲड. ...

सौ. सारिका गायकवाड यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार जाहीर

Image
​बीड प्रतिनिधी - साहित्य, समाजसेवा आणि आपल्या कर्तृत्वाने स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या सौ. सारिका गायकवाड यांना या वर्षाचा मानाचा 'राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन देण्यात येत आहे. अत्यंत चिकाटीने आणि निष्ठेने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सौ. गायकवाड यांनी आपल्या कामातून राज्याच्या पटलावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ​या पुरस्कारामुळे केवळ गायकवाड कुटुंबाचाच नव्हे, तर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे. "हा पुरस्कार माझ्या कामाला मिळालेली पावती असून, यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे," अशी भावना सौ. सारिका गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. ​ अभिनंदन! सारिका ताईंच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी काळात त्यांच्या हातून अशीच देशसेवा आणि समाजसेवा घडो, हीच सदिच्छा!

लिंबागणेश येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन , तर ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने जयंती होणार साजरी.

Image
लिंबागणेश प्रतिनिधी   धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत महाराजांना विनम्र अभिवादन केले. गावामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य, पराक्रम व हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित युवक व ग्रामस्थांनी यंदाची होणारी पहिलीच जयंती अधिक मोठ्या प्रमाणावर आणि भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून साजरी करण्याबाबत चर्चा केली. गावातील सर्व समाजबांधव, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना एकत्र घेऊन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यासाठी लवकरच नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. “धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आणि त्यांचे शौर्य नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच गावामध्ये ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेली भव्य मिरवणूक काढण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी कॅप्टन सुंदर भाऊ वाण...

मिलिंद सरपते यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार जाहीर

Image
बीड, दि. १३ (प्रतिनिधी ) – समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार यंदा बीड जिल्ह्यातील मादळमोही (ता. गेवराई) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट समाजकार्य, जनआंदोलने आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. मिलिंद सरपते यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नांवर आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी भवन ते लेडी नाला रस्ता मंजूर करून घेण्यासाठी केलेले आंदोलन आणि प्रभावी पाठपुरावा विशेष चर्चेचा विषय ठरला होता. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, प्रशासनावर असलेला प्रभावी वचक आणि विनम्र स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वत्र आदराने पाहिले जाते. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्...

लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना पद्म पाणी राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर

Image
 लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना पद्म पाणी राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर...! बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 17 मे रोजी होणार पुरस्काराचे वितरण बीड प्रतिनिधी - प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पद्म पाणी संस्थेचे पुरस्कार अनेक मान्यवरांना जाहीर त्यामध्ये लोकशाही मराठीचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरे यांना या वर्षीचा राज्य राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर झाला असून गेली 10 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात जिद्द चिकाटी आणि मेहनत तसेच सामाजिक, राजकीय व शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड मजुरांसाठी सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जीव ओतून काम करणारे म्हणून हरिदास तावरे यांची ओळख आहे याच कामाची दखल घेत पद्म पाणी या संस्थेने हरिदास तावरे यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे पुरस्काराचे वितरण 17 मे रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

समाजसेवेच्या अखंड ज्योतीला, मानवतेच्या महान पुजारिण साधनाताई यांना आदरांजली

Image
समाजसेवेच्या अखंड ज्योतीला, मानवतेच्या महान पुजारिण साधनाताई यांना आदरांजली  -- लेखन आणि संकलन -- सौ आशाताई बाजीराव ढाकणे  सामाजिक कार्यकर्त्या तथा सचिव श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड ९४२०६५४१११ साधनाताई आमटे यांचे जीवन म्हणजे निस्वार्थ सेवा, त्याग आणि मानवतेची जिवंत शिकवण होय. साधनाताई आमटे या केवळ एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक विचारधारा होत्या—ज्या प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. त्यांचा जन्म साध्या कुटुंबात झाला, पण त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ त्यांनी समाजसेवेत शोधला. बाबा आमटे यांच्यासारख्या महान समाजसुधारकांची साथ मिळाल्याने त्यांच्या कार्याला अधिक व्यापक दिशा मिळाली. बाबा आमटे यांच्या कार्यात त्या केवळ सहचारिणी नव्हत्या, तर खऱ्या अर्थाने त्या त्यांच्या कार्याच्या समान भागीदार होत्या. आनंदवन या संस्थेच्या उभारणीत साधनाताईंनी मोलाचे योगदान दिले. आनंदवन हे केवळ एक आश्रम नव्हे , तर ते मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क पुनर्स्थापित करणारे केंद्र आहे. कुष्ठरोग्यांसाठी, अपंगांसाठी आणि वंचितांसाठी ...