Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंटककडून तीव्र निषेध - रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

Image
बीड प्रतिनिधी  : पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रानंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने मा. गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. माध्यमांवर चर्चा करून राजकीय भूमिका मांडणे हा गुन्हा ठरू शकत नाही. अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यावर हल्ला करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असून ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लोकशाही पद्धतीने मतभेद व्यक्त करण्याऐवजी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे ही गंभीर बाब आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इंटकच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत— संबंधित हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ गुन्हा...

बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Image
बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन; पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन बीड (प्रतिनिधी ) दि.२५ : तालुक्यातील नवगण शिक्षण संस्था संचलित सैनिकी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता ६ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे. यानिमित्त प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ.व्ही.टी.देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार, उपप्राचार्य रविंद्र झोडगे, राजकुमार ससाणे, गणेश निर्मळ, शिवाजी सोनवणे व मेघराज कोल्हे उपस्थित होते. इयत्ता ६ वीसाठी खुली तुकडी ४५ व आदिवासी तुकडी ४५ अशा एकूण ९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश पूर्व निवड प्रक्रिया इयत्ता ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेद्वारे होणार असून पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल....

एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा

Image
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा परिवहन विभाग व राज्य शासनाने चुकीचे आर्थिक घोरण बदलावे  बीड | प्रतिनिधी   महाराष्ट्राची व ग्रामिण व्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाबाबत (एसटी) सुरू असलेल्या निर्णय प्रक्रियेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिलांचे अर्धे तिकीट आणि 75 वर्षांवरीील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी मोफत प्रवास सुविधा बंद करण्याचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाये यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. “एसटी तोट्यात असेल, तर त्याला सामान्य जनता जबाबदार नाही. चुकीची आर्थिक धोरणे, व्यवस्थापनातील त्रुटी आणि मेंटेनन्समधील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार हेच खरे कारण आहे. सवलती बंद करून सरकार स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून ग्रामीण महाराष्ट्राचा श्वास असल्याचे सांगत नितीन जायभाये म्हणाले, “शेतकरी, कामगार, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि विशेषतः माता-भगिन...

बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे

Image
बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे. आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी. बीड जिल्हा वकील संघ उद्या कामबंद ठेवणार. बीड | प्रतिनिधी बीड जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला व मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत बीड जिल्हा वकील संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वकील संघात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, वकील बंधू तसेच महिला वकील भगिनी यांनी एकत्र येत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन सादर केले. न्यायालयीन परिसरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वकील संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, जो पर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून ...

चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा संदलच्या अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर सचिवपदी प्रशांत सोनवणे

Image
(बीड प्रतिनिधी )प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सैलानी बाबा संदल निमित्त शासकीय विश्रामगृह चौसाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे व सचिवपदी प्रशांत सोनवणे तर खजिनदार म्हणून अंकुश(तात्या )सोनवणे यांची निवड करण्यात आली या बैठकीस बापू पवार,ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे,विशाल सोनवणे, शैलेश सोमीनाथ सोनवणे, आकाश सोनवणे, रवी सोनवणे, दादू गायकवाड, धर्मा सोनवणे, प्रेम गायके, विशाल काळे, साहील सोनवणे इत्यादी उपस्थित होते तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, पञकार पंडित जोगदंड, पञकार मिराज मुलानी, पञकार बळीराम राऊत,पञकार ख्वाजाभाई जहागिरदार यांची निवड करण्यात आली.

रांची-दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात

Image
(यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव )   झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या झालेल्या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्तांनी पीटीआयला दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सला अपघात झाला. रांची येथून उड्डाण घेतल्यानंतर काहीकाळ हे चार्टर विमान रडारवरुन गायब झाले होते. दरम्यान, काही वेळानंतर त्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. बेपत्ता झाल्यानंतर लगेच अपघात रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडार दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते दरम्यान, आता सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपायुक्तांनी काय माहिती दिली? चतरा उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला अपघाताबाबत माहिती दिली. 'एअर अ‍ॅम्ब्युल...

पायाभूत सुविधा, गुंतवणुकीवर भर; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन

Image
पायाभूत सुविधा, गुंतवणुकीवर भर; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन. (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव) मुंबई प्रतिनिधी :राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 'व्हिजन मॅनेजमेंट युनिट'ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सरकारचा भर असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी सांगितले.  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाद्वारे झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक...