Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र

Image
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र:- डॉ.गणेश ढवळे  बीड (दि. १७) : बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, ...

मनमाड-नांदगावच्या जनतेसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांची दिल्लीत धडपड; वाहतूक कोंडीमुक्त भविष्यासाठी मोठा निर्णय

Image
यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची भेट घेऊन मनमाड शहरातील वाढत्या अपघातांची व भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मनमाड, मालेगाव, येवला व कोपरगाव या मार्गांवरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः मनमाड ते येवला मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की, अनेक वेळा रुग्णवाहिका देखील अडकून पडतात आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्णांना अमूल्य वेळ गमवावा लागतो — ही वेदना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत मांडली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 752G (मालेगाव–मनमाड–येवला–कोपरगाव) मार्ग मंजूर होण्यासाठी निवेदन सादर करून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊल उचलले. आमदार कांदे यांनी मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत मा. गडकरी साहेबांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला सूचना देत — मनमाड शहरात फ्लायओव्हरचे काम तातडीने सुरू करावे भविष्यातील नव्या रस्त...

उमापूर ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवकानी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत माघार नाही

Image
सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे उमापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली जात नसल्यामूळे आज पंचायत समिती गेवराई येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तेव्हा आज संध्याकाळी 6 = 00 वाजेयपर्यत वरिष्ठ अधिकारी यांनी उपोषण करत्याची भेट सुद्धा घेतली नाही तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे . गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु ) गायक्रवाड तालुका सचिव किशोर भोले प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले राम साबळे . किशोर चव्हाण . राहुल सोनवणे . ऋषिराज कांडेकर . सुधाकर केदार . नितीन खापरे . दंबग ओबीसी नेतृत्व सिध्देश्वर काळे . कृष्णा सामसे . कृष्णा वीर . भारत हवाले . संतोष विठ्ठल वीर .महेश काकडे दता महाराज पाठक . राक्षसभूवनकर मोरे सह उमापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने अन्नात्याग आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांनी आसा निर्णय घेतला आहे की जोपर्यत सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत आम्...

भिम अनुयायांच्या जीवितास धोका निर्माण करणारे गणेश पगारे, किरण देशमुख,, प्रमोद माने यांना तात्काळ निलंबित करा-ॲड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी )14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्सवात पार पडली असून नित्यनियमाने व परंपरागत सायंकाळी 6 तें 12 पर्यंत   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तें बशीर गंज चौक मार्गे तें माळवेस तें डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येते  मिरवणुकीत हजारो च्या संख्येने भिम अनुयायी समाजातील माता, भगिनीं, बांधव यांचा सहभाग असतो तसेच वृद्ध, बालक देखील जयंती उत्सवात सहभागी होतात  परंतु नगर परिषद स्वच्छता विभागाचे प्रमुख गणेश तुळशीराम पगारे,  यांनी त्या मार्गावरील स्वच्छतेच्या बाबतीत कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने तसेच  बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी मिरवणूक मार्गातील खड्डे बुजविण्यासाठी केवळ कच्चखडी टाकून पसरविल्याने अनेक दोन चाकी वाहन चालक, पदाचारी घसरून पडल्याने जखमी झाले आहेत.  ही अतिशय गंभीर बाब असून  गणेश पगारे, किरण देशमूख, तसेच  पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रमोद माने यांच्या मनमानी कार...

धानोरा रोड ते राजू नगर–अंकुश नगर–लोकाशा नगर रस्त्याची दुरवस्था; दुरुस्ती कधी होणार?

Image
धानोरा रोड ते राजू नगर–अंकुश नगर–लोकाशा नगर रस्त्याची दुरवस्था; दुरुस्ती कधी होणार? कॅनॉल रोडवरील अतिक्रमण व बेकायदेशीर विक्रीविरोधात आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा बीड (प्रतिनिधी ) – बीड शहरातील धानोरा रोड ते राजू नगर, अंकुश नगर, लोकाशा नगर मार्गे जुना चराटा रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब व धोकादायक झाला असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती कधी होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पालवन–अंकुश नगर–कालिका नगर–लोकाशा नगर मार्गे तळेगावकडे जाणाऱ्या कॅनॉल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू असल्याची गंभीर तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या जागेवर तसेच ओपन स्पेस म्हणून राखीव असलेल्या सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा करून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत प्लॉट विक्री सुरू केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही खाजगी जमीनमालक व भूमाफिया संगनमताने नियमबाह्य रस्ते काढत शासनाच्या नियमांचे उघड उल्लंघन कर...

लिंबागणेशकरांची आर्तहाक; मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी ‘ मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चात’ सहभागी व्हा — डॉ. गणेश ढवळे

Image
लिंबागणेश (दि.१६ ) : मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, वि...

प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात निळा जनसागर उसळला; सनी वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर धडक निषेध आंदोलन

Image
​बीड प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शहरात दिसून आलेली प्रचंड अस्वच्छता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार याविरोधात आज सनी वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरपालिका कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बीड शहरातील नागरिक आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ​ ​१४ एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी गटाराचे पाणी साचले होते आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या गंभीर निष्काळजीपणामुळे अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच संतापाचे पडसाद आजच्या आंदोलनात उमटले. ​ ​शहरातील अस्वच्छतेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा. ​भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी लेखी हमी द्या. ​तुंबलेल्या नाल्यांची आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम राबवा. ​ ​यावेळी बोलताना सनी वाघमारे म्हणाले की, जयंती उत्सवाच्या दिवशी  नागरिकांना घाण पाण्यातून चालावे लागले, हे प्रशासनाचे मोठे अपयश ...