Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

NMMS परीक्षेच्या निकालात लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालय अग्रेसर; २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र, सत्कार समारंभ उत्साहात

Image
बीड प्रतिनिधी ( दि.२६ )भारत सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी ₹१२,००० म्हणजेच दरमहा ₹१,००० शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार,...

कु. प्रणया रोडे हिचे NMMS परीक्षेत नेत्रदीपक यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली कामगिरी

Image
परळी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षेत कन्हेरवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील सोमनाथ विद्यालयाची प्रज्ञावंत विद्यार्थीनी कु. प्रणया लहुदास रोडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. NMMS ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने सन 2007-08 पासून दरवर्षी घेतली जाते. आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षणासाठी दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींवर मात करत शिक्षणाची वाट अधिक आत्मविश्वासाने चालता येते. इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत कु. प्रणया हिने विशेष प्राविण्य मिळवत आपल्या शाळेचा व गावाचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशाबद्दल सोमनाथ ...

बड्या प्रकल्पांचा मुंबई महापालिकेवर बोजा,ठेवी मोडण्याची वेळ

Image
यूसूफ पठाण प्रतिनिधी  मुंबई प्रतिनिधी :पालिकेच्या मोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी २ लाख ४४ हजार कोटींच्या पुढे गेली असून, येत्या आर्थिक वर्षात ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरित दायित्वे पुढील चार-पाच वर्षांत महापालिकेला द्यावी लागणार आहेत. पालिकेच्या एकूण मुदत ठेवी जानेवारी २०२६ अखेरीस ८१ हजार ४४९ कोटींपर्यंत असून त्यातील २८,०६० कोटी या करता वापरले जाणार आहेत. त्यापैकी १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत, तर १४,२९५ कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प बुधवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीला सादर केला. या प्रकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीच्याच प्रकल्पांची प्रचंड देणी पालिकेवर असून या कर्जाच्या ओझ्याखाली मुंबई महापालिका दबली असल्याचेच चित्र आहे. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे, पुलांची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देख...

वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ बीड येथे लक्ष्यवेधी आंदोलन

Image
वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ बीड येथे लक्ष्यवेधी आंदोलन “चला कागदोपत्री झाडे लावूया आणि विश्वविक्रम करूया” – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२६ ):बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.२६ रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावूया आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. निवेदन जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले,शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), सय्यद सादेक...

प्रसिद्ध ढोलकी वादक नितीन प्रधान यांना सर्वोत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर

Image
​बीड प्रतिनिधी : रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा 'सर्वोत्कृष्ट कलावंत' पुरस्कार नामांकित ढोलकी वादक नितीन प्रधान यांना जाहीर झाला आहे. त्यांनी आजवर कलेच्या क्षेत्रात केलेली प्रदीर्घ सेवा आणि ढोलकी वादनातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येत आहे. ​या निवडीबद्दल कलाक्षेत्रातून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे देण्यात येणार आहे, ​रयत सामाजिक प्रतिष्ठान आणि समस्त कलावंतांच्या वतीने नितीन प्रधान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. शुभेच्छा देण्यात येत आहेत.

आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करावा – मनोज जाधव यांची मागणी

Image
आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करावा – मनोज जाधव यांची मागणी पोद्दार शाळेचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करावा - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि त्यानंतर निर्णय रद्द झालेल्या ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, शिक्षण मंत्री ,तसेच प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, काही शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. संबंधित शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाबाबत यापूर्वीच स्थगिती असतानाही काही तासांत प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची दखल घेत माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित निर्णयास स्थगिती दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांकडून अर्ज सादर केले जात आहेत. मात्र, न...

नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे

Image
नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे.   बीड प्रतिनिधी : शहरातील नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान नुकतेच नवीन सिमेंट रोड झाल्याने वाहनांचा वेग धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. डिव्हायडर नसल्यामुळे मोटरसायकलस्वार रॉंग साईडने धावत असून, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तहसील कार्यालय आणि जिल्हा न्यायालय या महत्वाच्या ठिकाणांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.टू-व्हीलर, फोर-व्हीलर तसेच मोठे ट्रक्स सुसाट वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः जिल्हा न्यायालय परिसरात वर्दळ जास्त असल्याने अनेक अपघातांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. त्यात नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या संपूर्ण रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. स्पीड ब्रेकर हे वाहनांचा वेग नियंत्रित करण्याचे प्रभावी साधन आहे. योग्य ठिकाणी बसवलेले स्पीड ब्रेकर...