Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

Image
बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा केवळ कागदावरच; डॉ. गणेश ढवळे यांचा आरोप लिंबागणेश( दि.३० ) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत २०० लोकसंख्या असलेल्या बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह थेट बीड तहसील कार्यालय गाठून शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट तसेच शेतीच्या कामांसाठी वापरला जाणारा रस्ता काही व्यक्तींनी अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) व शेख युनूस उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. शेतरस्ता बंद झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागत, खत-बियाणे वाहतूक तसेच दैनंदिन ये-जा यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याने रस्ता तातडीने मोकळा करून...

जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे

Image
जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे  बीड | प्रतिनिधी जांब (ता. शिरूर) येथील अनुसूचित जातीच्या ढाकणे कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार माणिक ढाकणे, विजय ढाकणे व संगीता माणिक ढाकणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. किरकोळ कारणावरून — ढाकणे कुटुंबीयांच्या शेळ्या आरोपींच्या दारासमोर गेल्याच्या कारणावरून — हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल 9 महिला व 11 पुरुष सहभागी असल्याचा आरोप असून संपूर्ण घटना घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे रात्री बीट अंमलदारांनी वाद मिटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील चौकात बैठक बोलावून तुषार ढाकणे यांना सार्वजनिकरित्या महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, गावातील सरपंचांनी “मारा, काय करतोय बघून घेऊ” असे म्हणत आरोपींना प्रोत्साहन दिले. तसेच शिरूर पोलीस ठाण्या...

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यासाठी समिती स्थापन

Image
एकल महिलांच्या प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मसुदा समिती नेमली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे एकल महिलांच्या क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून खूप समाधान आहे त्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन.!!  या मसुदा समितीमध्ये साऊ एकल महिला समितीचा राज्य निमंत्रक म्हणून हेरंब कुलकर्णी यांचासमावेश करण्यात आला आहे. यातून धोरणात्मक सूचना करता येतील..  राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले तरीसुद्धा या एकल महिलांची मोठी संख्या बघता स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. २०११ साली महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७०लाख असेल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज होतीच.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्या घोषणेच्या अंमलबजावणीची विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे संवेदनशील प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठक...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन; श्रामनेरांचा सत्कार

Image
बीड | प्रतिनिधी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बीड बसस्थानकाजवळील बुद्ध विहार येथे दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया, शाखा जि. बीड (प.) यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी मुंबई येथील ऐतिहासिक चैत्यभूमी येथे आयोजित विशेष श्रामनेर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन श्रामनेर झालेल्या बीड जिल्ह्यातील श्रामनेरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. महालिंगदादा निकालजे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. बापू निकाळजे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, राज्य संघटक आयु. डी. एस. नरसिंगे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजाभाऊ आठवले, महिला विभाग बीड जिल्हा (प.) अध्यक्षा आयु. अरुणाताई निसर्गंध, माजी विभागीय सचिव आयु. निसर्गंध गुरुजी, माजी अध्यक्षा आयु. पद्मिनताई गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष आयु. विष्णू कांबळे, शिवाजीराव, अनिल डोळस, हिशोबनिस आयु. सोनवणे आप्पा, बीड तालुका संस्कार सचिव प्रा. खैमाडे सर, ता. वड...

रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त नवीन समितीचा लवकरच विस्तार -भाई गौतम आगळे सर

Image
बीड प्रतिनिधी :-रोजंदारी मजदूर सेनेची बीड जिल्हा कार्यकारणीला बरखास्त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली. कार्यरत पदाधिकारी यांनी संघटनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे नवीन कार्यपद्धतीत आवश्यक बदल करून नव्या उत्साहाने संघटनात्मक कामकाज सुरू करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.      भाई गौतम आगळे सर यांनी सांगितले की बीड जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच कष्टकरी कामगारांना संघटनेशी जोडण्यासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. नव्या समितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सक्रिय आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन गोर, गरीब व कष्टकरी कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी विविध आंदोलने लोकशाही मार्गाने राबिन्यावर भर दिला जाणार असून, नवीन समितीचा विस्तार लवकरच जाहीर केला जाईल...

वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील स्वच्छालयात अस्वच्छतेचा कळस,प्रवाशांमध्ये संताप; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यातील मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही जवळ असलेल्या टोलनाक्यावरील सार्वजनिक स्वच्छालयामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.दररोज शेकडो वाहनांची ये-जा असलेल्या या टोलनाक्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने स्वच्छालयाची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी घाण साचलेली असून पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “टोल आकारला जातो, मात्र मूलभूत सुविधा स्वच्छ ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे,” अशी नाराजी वाहनधारकांनी व्यक्त केली. सध्या राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात असताना वैद्यकिन्ही टोलनाक्यावरील ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन स्वच्छालयाची निय...

महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे

Image
महिला कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - सौ मिरा रोडे  परळी प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मजदूर कांग्रेस चे दोन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा प्रदेश अध्यक्ष डॉ कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली लोळावणा येथे दिनांक 30 में 31 मे रोजी आयोजित केली त्या कार्यशाळाला परळी तालुक्यातील महिला कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी केले आहे  दरम्यान आज परळीत महाराष्ट्र राज्य महिला कांग्रेस च्या अध्यक्षा सौ सिमाताई गुट्टे उपस्थित असताना त्यांनी परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कामगारांच्या हितासाठी मोठ्या संख्येने संघटीत व्हा असे आवाहन केले याप्रसंगी त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी परळी तालुका अध्यक्ष इंटक सौ मिरा रोडे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळाला परळी तालुक्यातील असंघटीत महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे