Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ : विकसित भारत क्विझमध्ये बीडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Image
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ : विकसित भारत क्विझमध्ये बीडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांचे आवाहन बीड प्रतिनिधी : - देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि नव्या भारताच्या उभारणीसाठी तरुणांच्या कल्पना, नेतृत्वगुण व नवोन्मेषाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) २०२७’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा असलेल्या ‘विकसित भारत क्विझ २०२७’मध्ये बीड जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केले आहे. १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विकसित भारत क्विझचे आयोजन करण्यात आले असून, १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ही क्विझ MY Bharat आणि MyGov या डिजिटल व्यासपीठांवर आयोजित करण्यात...

शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा

Image
शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा लिंबागणेशकरांचे हलगी वाजवत शेतकऱ्यांना आवाहन; पिकांचे पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई व २०२० चा थकीत पीकविमा तात्काळ जमा करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड : (दि. १२) दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा अक्षरशः धुराळा झाला आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शनिवारी दि. १२ सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे हलगी वाजवत केले.  प्रमुख मागण्या - नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. - मागील अतिवृष्टीच्या घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्या...

जिव्हाळा बेघर निवारासाठी उपनगराध्यक्ष विनोद विनोद मुळूक यांना बीड शहर बचाव मंचाचे निवेदन

Image
जिव्हाळा बेघर निवारासाठी उपनगराध्यक्ष विनोद विनोद मुळूक यांना बीड शहर बचाव मंचाचे निवेदन   कृष्णाई नगर, आगलावे इस्टेट भागातील पिण्याच्या पाण्याचा व पथदिव्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी  माने कॉम्प्लेक्स समोरील चौकाला महात्मा गांधी चौक व रस्त्याला महात्मा गांधी मार्ग नाव देण्याची आग्रही मागणी बीड प्रतिनिधी दि. 11/09 : बीड शहरातील नवी भाजी मंडई भागातील सातत्याने कार्यरत असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रासाठी शासन निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने बीड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांना भेट घेऊन निवेदन दिले . माननीय उपनगराध्यक्ष साहेब यांना शासनाच्या जीआर सह निवेदन सादर करण्यात आले. जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला अद्यापही शासन निधी मिळत नसल्याचे यातून निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कसल्याही प्रकारची मदत कार्य उपाययोजना मिळत नसल्याचेही सांगण्यात आले. आपल्या नगर परिषदे तर्फे कसल्याही सोयी सुविधा व गरजे नुसार मदत कार्य तिथे केल्या जात नाही हे पण निदर्शन...

लिंबागणेश येथे कुणबी प्रमाणपत्र विशेष शिबिर

Image
लिंबागणेश येथे कुणबी प्रमाणपत्र विशेष शिबिर  तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे मार्गदर्शन; ८ गावांचे महसुली रेकॉर्ड जळाल्याने कुणबी नोंदी शोधण्याचे आव्हान लिंबागणेश : (दि.११)मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजातील नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र सुलभतेने व विनाविलंब मिळावे, यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांच्या स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबिर घेण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरास लिंबागणेश महसूल मंडळाधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी शेख गफुर, ग्रामपंचायत अधिकारी दत्ता नागरे, सरपंच बालासाहेब जाधव,प्रमोद कोळपकर ( तलाठी बोरखेड), विपुल बन...

बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील कृतज्ञतेचा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण – डॉ. जितीन वंजारे

Image
बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील कृतज्ञतेचा आणि परंपरेचा महत्त्वाचा सण-डॉ.जितीन वंजारे बैलांच्या कष्टांना वंदन करणारा, निसर्गाशी नाते सांगणारा आणि गावच्या संस्कृतीला एकत्र आणणारा सण,बैलपोळा हा केवळ बैलांची पूजा करण्याचा सण नसून, शेतकरी आणि त्याच्या शेतीच्या कामात वर्षभर खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्राच्या समृद्ध ग्रामीण संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळ्या प्रथा-परंपरांनुसार हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. काही भागांत याला ‘बेंदूर’ असेही म्हटले जाते, असे प्रतिपादन डॉ. जितीन वंजारे यांनी केले. वर्षभर ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांसाठी पोळ्याचा दिवस विशेष असतो. या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची मळवट, रंगरंगोटी आणि आकर्षक बाशिंग बांधून, फुगे झिरमाळ्या लावून सजावट केली जाते. आदल्या दिवशी त्यांना तूप व लोणी लावून खांदा मळणी केली जाते वर्षभर ओझं ओढणाऱ्या आणि राबून अन्न धान्यांची पोती घरात ओढून आणल्याने उपकार म्हणून खांदा ...

मिलिंद मस्के यांची काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

Image
मिलिंद मस्के यांची काँग्रेस जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती बीड : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी मिलिंद मस्के यांची काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या तथा खासदार रजनीताई पाटील यांच्या हस्ते मिलिंद मस्के यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, युवा नेते आदित्य पाटील, गणेश राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद मस्के यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या विचारधारा आणि ध्येयधोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी मस्के यांनी सांगितले. नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिलिंद मस्के यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हवे असल्यास याच बातमीची दमदार हेडलाईन, उपशीर्षक आणि सोशल मीडिया पोस्टही तयार करून देऊ शकतो.

जिव्हाळा बेघर निवारासाठी नगरपरिषद सी.ओ. समवेत बीड शहर बचाव मंचाची बैठक

Image
जिव्हाळा बेघर निवारासाठी नगरपरिषद सी.ओ. समवेत बीड शहर बचाव मंचाची बैठक कृष्णाई नगर, आगलावे इस्टेट भागातील पिण्याच्या पाण्याचा व पथदिव्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी  माने कॉम्प्लेक्स समोरील चौकाला महात्मा गांधी चौक व रस्त्याला महात्मा गांधी मार्ग नाव देण्याची आग्रही मागणी बीड प्रतिनिधी   : बीड शहरातील नवी भाजी मंडई भागातील सातत्याने कार्यरत असलेल्या जिव्हाळा बेघर निवारा केंद्रासाठी शासन निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बैठक केली. या बैठकीमध्ये शासनाच्या जीआर सह निवेदन सादर करण्यात आले. जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला अद्यापही शासन निधी मिळत नसल्याचे यातून निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कसल्याही प्रकारची मदत कार्य उपाययोजना मिळत नसल्याचेही सांगण्यात आले. आपल्या नगर परिषदे तर्फे कसल्याही सोयी सुविधा व गरजे नुसार मदत कार्य तिथे केल्या जात नाही हे पण निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मुख्याधिकारी साहेबांनी सकारात्मकतेने सविस्तर पणे प...