Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

खंडेश्वरी माता मंदिर खिंड रस्त्याच्या विकासकामास सुरवात ; २१ सप्टेंबरला भव्य उद्घाटन

Image
खंडेश्वरी माता मंदिर खिंड रस्त्याच्या विकासकामास सुरवात ; २१ सप्टेंबरला भव्य उद्घाटन ​बीड प्रतिनिधी : बीड शहराचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र खंडेश्वरी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या एमआयडीसी ते खिंड रस्त्याच्या विकासकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, आज नाली कामाचा प्रारंभ करण्यात आला. येत्या सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते व नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्त्याचे अधिकृत उद्घाटन होणार असल्याची माहिती नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी दिली. ​आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात ये-जा करणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, नागरिक व वाहनधारकांची गैरसोय टळावी म्हणून हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. ​ ​ या मार्गावर नवीन काँक्रीट रस्ता तयार केला जाणार असल्याने वाहतूक अधिक सुरक्षित व सुकर होईल. रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेवर कचरा टाकण्याला आळा बसून परिसराचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी नालीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. ​या कार्यक्रमास उपनग...

बीड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

Image
बीड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर बीड (प्रतिनिधी) दि.१३ : बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन भाजपचे नेते डॉ.योगेश क्षीरसागर व ‘कल्पतरू’च्या सचिव तथा भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळे लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. गतवर्षी गणरायाचे आगमन होणार आहे. मागील काही वर्षांपासून ‘कल्पतरू’च्या पुढाकारातून आकर्षक देखावे साकारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन येते. देखाव्यांमध्ये सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच स्थानिक ग्रामीण व शहरी जीवनाशी संबंधित सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणे ...

गोरगरीब कुटुंबांना ‘एक हात मदतीच्या’ उपक्रमातून किराणा कीटचे वाटप

Image
गोरगरीब कुटुंबांना ‘एक हात मदतीच्या’ उपक्रमातून किराणा कीटचे वाटप ​बीड प्रतिनिधी : ​सामाजिक बांधिलकी जपत ‘एक हात मदतीचा’ या विशेष उपक्रमाअंतर्गत गरजू व गोरगरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात लोकशाही पत्रकार संघाचे श्री. बी. बी. वैद्य, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व लोकशाही पत्रकार संघ सामाजिक कार्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई ओस्तवाल आणि सुजाता मॅडम यांच्यासह लोकशाही पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू हिरिरीने सहभागी झाले होते. ​समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या आणि पत्रकारांच्या हस्ते प्रत्यक्ष कुटुंबांना भेटून दैनंदिन गरजेच्या वस्तू व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. ​पत्रकार केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही नेहमी पुढे असतात, हेच या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि लाभार्थी कुटुंबांनी आयोजक व सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे विशेष कार्यक्रम

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे विशेष कार्यक्रम [ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 7219491445 दिनांक 13 सप्टेंबर 2026 वार रविवार प्रतिनिधी ~ यां बाबत सविस्तर वृत्त असे की लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६व्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानेश्वरनगर यांच्या वतीने विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याचे संस्थापक व परिसराचे भाग्यविधाते लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ऊस उत्पादनात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागेबाबा भक्त निवास, भेंडा बु.।।, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे हा गौरव समारंभ होणार आहे. कार्यक्रमाचे शुभहस्ते गरुडबुवा महंत ह.भ.प. उद्धव महारा...

नाळवंडीतील पीडित कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भेट

Image
नाळवंडीतील पीडित कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा फोनद्वारे संवाद; आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन पाटोदा (प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पाटोदा तालुक्याच्या वतीने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यात आला. तसेच या प्रकरणात पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा बीड जिल्ह्याचे संपर्कमंत्री भरतशेठ गोगावले यांनी फोनद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. सदर घटना अत्यंत गंभीर असून सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल तसेच घटनेतील आरोपीवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पीडित कुटुंबीयांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार देत, “न्य...

विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ : विकसित भारत क्विझमध्ये बीडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Image
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ : विकसित भारत क्विझमध्ये बीडच्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांचे आवाहन बीड प्रतिनिधी : - देशाच्या विकासप्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि नव्या भारताच्या उभारणीसाठी तरुणांच्या कल्पना, नेतृत्वगुण व नवोन्मेषाला राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) २०२७’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा असलेल्या ‘विकसित भारत क्विझ २०२७’मध्ये बीड जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केले आहे. १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विकसित भारत क्विझचे आयोजन करण्यात आले असून, १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ही क्विझ MY Bharat आणि MyGov या डिजिटल व्यासपीठांवर आयोजित करण्यात...

शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा

Image
शेतकरी हक्क मोर्चाच्या ‘हलगी बजाव’ आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा लिंबागणेशकरांचे हलगी वाजवत शेतकऱ्यांना आवाहन; पिकांचे पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई व २०२० चा थकीत पीकविमा तात्काळ जमा करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड : (दि. १२) दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा अक्षरशः धुराळा झाला आहे. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शनिवारी दि. १२ सप्टेंबर रोजी लिंबागणेश येथे हलगी वाजवत केले.  प्रमुख मागण्या - नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. - मागील अतिवृष्टीच्या घोषणेनुसार हेक्टरी १७ हजार रुपये पीकविमा द्या...