Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी

Image
न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी आनंदराज आंबेडकर यांचा शब्द; आर्थिक मदत, शासकीय नोकरी व घरकुलासाठी प्रशासनाला सूचना बीड प्रतिनिधी : बीड शहरातील मातंग समाजातील युवक उमेश दळवी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गंभीर दखल घेत दळवी कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना धीर दिला. “या प्रकरणात पूर्ण न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,” असा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला. रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी तसेच बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम गोटू वीर यांनी उमेश दळवी यांच्या पत्नी, आई, भाऊ व बहिणीची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती आनंदराज आंबेडकर यांना दिली. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तात्काळ पोलीस प्रशासन, समाजकल्याण विभाग तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दळवी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरी, तातडीची आर्थिक मदत तसेच घरकुल योजना मंजूर करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करा...

एकल महिलांसाठी स्वतंत्र सर्वंकष धोरण बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन एकल महिलांच्या जीवनात आशेची पालवी फुटली - बाजीराव ढाकणे

Image
एकल महिलांसाठी स्वतंत्र सर्वंकष धोरण बनविण्यासाठी मसुदा समिती स्थापन  एकल महिलांच्या जीवनात आशेची पालवी फुटली - बाजीराव ढाकणे  बीड प्रतिनिधी : - राज्यातील लाखो एकल महिलांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक आणि मानसिक परिवर्तन घडवून आणणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, एकल महिलांसाठी स्वतंत्र राज्य धोरण तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या समितीत विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था आणि तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्यभर एकल महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करत साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी हा निर्णय राज्यातील एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “महाराष्ट्र हे देशातील ...

त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन

Image
त्यागमूर्ती माता रमाईंना स्मृतिदिनानिमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन लिंबागणेश, दि.२७ : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवार दि.२७ रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, महादेव कुदळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, अँड. गणेश वाणी, सुरेश निर्मळ, गणपत तागड, दादासाहेब गायकवाड, मोहन कोटुळे, हरि पाटील, संजय पावले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविबापू निर्मळ यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, वंचितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाई यांचा त्याग, प्रेरणा आणि खंबीर साथ मोलाची होती. बाबासाहेब परदेशात उच्च शिक्षण घेत ...

श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका

Image
श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका चैत्यभूमी श्रामनेर शिबिरार्थीचा धम्मदीप बुद्ध विहारात सत्कार बीड (प्रतिनिधी ) श्रामणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात असे उद्गार अमरसिंह ढाका यांनी मुंबई येथे श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवलेल्या शिबिरार्थींच्या धम्मदीप बुद्ध विहार येथील सत्कार प्रसंगी अनुभव सांगताना प्रतिपादन केले. तथागतांचे तत्वज्ञान त्यांच्या वाणीतून निघालेल्या अनमोल पाली भाषेतील गाथेतून समजतात. गृहस्थी जीवनातील उपासक-उपासिका व बालकाकरता त्यांचे तत्त्वज्ञान समजण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेने चैत्यभूमी दादर मुंबई येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात बीड शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आयु.अमरसिंह ढाका. ॲड हनुमंत कांबळे जिल्हा पर्यटक संघटक बीड,ॲड चंद्रवदन जाधव धम्म महासंघ अध्यक्ष बीड यांनी सहभाग नोंदवून शिबिरातील आपले अनुभव उपस्थित उपासक -उपासिकांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगून त्यांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवण्यास प्रेरित केले. सत्कार कार्...

नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण

Image
नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण  चौकशी न झाल्यास २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अक्षय कोकाटे बीड | प्रतिनिधी नगर परिषद बीड येथील कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत संबंधितांविरोधात दिलेल्या निवेदनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांना दि. 29 एप्रिल 2026 रोजी तसेच मा. मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना दि. 23 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये नगर परिषद बीड येथील आस्थापना, लेखा, स्वच्छता आदी विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलगा व मुलगी यांची नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून झालेली नियुक्ती, त्यांची ऑर्डर प्रक्रिया व भरतीची वैधता याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात श्री. गणेश तुळशीराम पगारे, सहा-लेखापाल नगर परिषद बीड यांच्या विरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थाप...

पाटोद्यात जोरदार वादळाचा तडाखा; अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा नागरिकांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून काही ठिकाणी झाडे व वीजतारा पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळामुळे विशेषतः कच्ची घरे व पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरावरील पत्रे उडून गेल्याने पावसात घरात पाणी साचले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अचानक आलेल्या वाऱ्यामुळे काही मिनिटांतच घरांची पत्रे उडून गेली. गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"

Image
"नाते विकासाचे आणि विश्वासाचे" स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे कोकलेगावच्या राजकारणात खूप मोठं प्रस्थ होतं.त्याचबरोबर कोकलेगावच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं असून, त्यांनी अनेक नव्या दमाच्या तरुणांना कोकलेगावच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी करून घेत अनेक मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे अतिशय संयत, शालिन,बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले,वाचक, समीक्षक, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ठाम वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारे तसेच शिस्तीच्या बळावर राजकारणात समतोल व आदरयुक्य दरारा निर्माण करणारे,आपल्या कर्तृत्वाची अमीठ छाप उमटवणारे, ज्ञानी आणि गुणी तसेच समाजाभीमुख विकासाची दृष्ठी असलेले, सामाजिक जाणीवेच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झालेलं समाजमान्य व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजात ओळख होती. कोकलेगावातील अनेक रुग्णांना ते स्वतः नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे. उपचार घेत असताना तो रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहायचे तसेच उपचारावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन असायचे. रुग्ण पूर्ण बरा हो...