Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Image
क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ( निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्याचा सत्कार, महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल वाचनालयाचा उपक्रम )  बीड (प्रतिनिधी ) - अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड यांच्या जोखंडात आडकऊन सर्व स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे स्त्रियांची शुद्र, अति -शुद्राची जी अधोगती विद्ये अभावी झाली होती ती दूर करण्याकरिता वंचित, शूद्र अतिशूद्र व मुलींकरता शिक्षणाचे दारे उघडून भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ह्या आपल्या समस्ता स्त्रियांच्या, वंचितांच्या ज्ञानज्योती आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून तसे आचरण आपल्या जीवनात ठेऊन, फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारघारेनुसार संविधानिक मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय स्थापन होण्यास वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनमोल सहकार्य लाभेल असे प्रतिपादन प्रा. बबीता गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या 129 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रसंगी केले.  महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप लिंबागणेश (दि.११ मार्च ): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा–१) अंतर्गत लिंबागणेश येथे आज दि.११ बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेले महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थान सभामंडपात आयोजित या शिबिरात शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. या अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास राजेंद्र मस्के, बळीराम गवते, डॉ. गणेश ढवळे, गोरखनाथ सिंगर यांच्यासह महसूल विभागातील वि...

जीवाची वाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद, बायोमॅट्रीक उपस्थितीचा बोलबाला

Image
येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.११/०३/२०२५ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील आरोग्य उप केंद्र दि.०६ मार्च-२०२६पासुन कायम बंद असलेने ग्रामस्तानी मा. अधिक्षक प्रा.आ.उप केंद्रविडा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय !दुर्लक्ष असलेचे दिसुन येत असलेने आजारी रुग्नांचे हाल होत असलेचे दिसुन येत आहेत.रूग्नांना नाहाक आर्थिक खिशाल कात्री लागत आहे.   सविस्तर असे की जीवाची वाडी येथे युनानी दवाखाना आहे.तेथील कर्मचारी जागा भरल्या नाहीत एक सेवक होते ते बदली करून गेले,त्या जागी दुसरा कर्मचारी आलेच नाहीत.आरोग्य उप केंद्रात चार कर्मचारी आहेत.एमपीडब्लव नियमित आलेले दिसत नाहीत.तिन महिला कर्मचारी आहेत त्यापैकी एकीची गेल्या तिन वर्षा पासुन दुसऱ्या गावात प्रतिनियुक्ती केली आहे,समुदाय आरोग्य अधिकारी,ए एन एम दोन्ही सहा दिवसा पासुन अनु उपस्थित असलेने तालुका वैधकीय अधिकारी यांची पाठराखन!अभय कोणाचे?जीवाची वाडी आरोग्य उप केंद्र कायम बंद असलेने वरीष्ठ काय कारवाही करनारका याकडे ग्रामस्त लक्ष वेधुन आहेत.         आमच्या प्रतिनिधीने भ्रम्हध्वनी विच...

युवकांना आधी रोजगार व व्यवसायासाठी कर्ज द्या, तरच होतील लग्न; प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करा युवकांची मागणी

पाटोदा (प्रतिनिधी ) सध्याच्या काळात ग्रामीण भागातील युवकांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक युवकांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळत नसल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात जात आहे. त्यामुळे युवकांना तातडीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच युवा शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी युवकांकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतीसोबतच लघुउद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यामुळे शासनाने बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज योजना राबवून युवकांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यासोबतच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी उभारण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे. जर तालुकास्तरावर उद्योगधंदे सुरू झाले तर स्थानिक युवकांना त्यांच्या गावाजवळच रोजगार मिळू शकतो. त्यामुळे स्थलांतर थांबेल आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकासही वेगाने होईल.युवकांना रोजगार मिळाला,उद्योगधंदे वाढले आणि ...

एक वेळ भजन किर्तन ऐकू नका,महात्मा फुलेंचे 'शेतक-याचा आसुड','गुलामगिरी'हे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचा-ह.भ.प.नितीन महाराज पिसाळ.

Image
बीड दि (11) : निरगुडी ता.पाटोदा येथे 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने आयोजित प्रबोधनपर किर्तनासाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या "विष्णुमय जग,वैष्णवांचा धर्म ,भेदाभेद भ्रम,अमंगळ!" या अभंगाचे निरूपण करताना, भेदाभेदरहित- सामाजिक सलोखा,बंधूभाव,समता, स्वातंत्र्य ही मुल्ये अधोरेखित करताना वारकरी संप्रदाय व या परंपरेत पुढे विशेषत: शेतकरी वर्गाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज यांचे विचार,त्यानुषंगाने  जीवनभर अथक केलेले कार्य,लक्षात घेण्यासाठी त्यांचे साहित्य पुन्हा पुन्हा वाचावे. एक वेळ भजन किर्तन ऐकले नाही तरी चालेल ;परंतु महात्मा फुले यांचे 'शेतक-यांचा आसुड' 'गुलामगिरी',डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 'जातींचे निर्मूलन','शूद्र कोण होते?', 'स्त्रीवादी आंबेडकरवाद' कॉ गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?' प्रबोधनकार ठाकरे यांचे 'लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी संत गाडगे बाबा' संत कबीर,हे व असे सामाजिक एकता,एकात्मता, न्याय ,धार्मिक सद्भावना,...

मुळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार –

Image
मु ळुकवाडी – मसेवाडी शिवरस्त्याचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी; तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे ग्रामस्थांकडून आभार – लिंबागणेश (दि.११ ): बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरूनही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत. पावसाळ्यातील अडचण दूर – ग्रामस्थ पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चि...

जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार

Image
जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार गेवराई तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासनाने जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे त्या निमित्ताने गढी ग्रामपंचायतच्यावतीने गढी ग्रामपंचायत चे जल सुरक्षक व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉमेड सखाराम पोहिकर यांचा आज सकाळी १० = ०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी समोर आदर सत्कार करण्यात आला . यावेळी स्वच्छ आणि सुरक्षिक पाणी प्रत्येक घरापर्यत पोहोचवण्याचे काम गढी ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांचा आज गढी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विष्णूपंत घोगडे व गढी गावचे जेष्ठ नागरिक श्री . भागवत ( भाऊ ) नाकाडे . शेख नुर टेलर . श्री मिठू ( काका) नाकाडे . मा रविंद्र ( बप्पा ) सिरसट . या सर्वानी आज गढी ग्रामपंचायत कार्यालयासमोर . शाल . पुष्पहार देउन आदर सत्कार करण्यात आला . यावेळी गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगंडे . आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की गढी गावाला गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र मेहनत घेउन स्वच्छ पाणी देण्यासाठी सतत ...