Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

चौसाळा येथे मा. खा. प्रितमताई मुंढे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवुन साजरा

Image
(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा येथे मा. खासदार प्रितमताई मुंढे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी बीड तालुका मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाना फळ वाटप करण्यात आली यावेळी भाजपा बीड तालुका मंडळ प्रमुख अशोक(दादा)रसाळ, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष पवन कुचेकर,बीड तालुका उपप्रमुख अंकुश गोरे, भाजपा बीड तालुका सरचिटणीस अप्पासाहेब झोडगे, भागवतराव आंधळे, चौसाळा शहर अध्यक्ष विनोद कळासे, महादेव चौधरी, बाळासाहेब हावळे पाटील, अक्षय माळी, पञकार बळीराम राऊत, प्रदीप जोगदंड यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

अरोपींना अटक करुन पारधी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करु.

Image
अनुसूचित जमातीच्या लोकांच्या घरांची तोडफोड करून जिवे मारण्याच्या उद्देशाने शस्त्र हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करा. अरोपींना अटक करुन पारधी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन करु. गेवराई (प्रतिनिधी ) दि. १७ तालुक्यातील सुर्डी येथे उदरनिर्वाहासाठी गायराण जमीनीवर झोपड्या उभारून वास्तव्य करणाऱ्या अनुसुचित जमातीतील पारधी समाजाच्या मुलांना तुम्ही या शाळेत यायचे नाही म्हणत शाळेतील लहान मुला-मुलींना बाहेर काढून मारहाण करत हाकलून दिले, नंतर पारधी वस्तीवर ३० ते ४० गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या जमावाने जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, कुऱ्हाड, कोयते, लाठ्यासह हल्ला चढवला यात महिलांचा विनयभंगदेखील करण्यात आला, लहान मुलांसह महिला पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुरु असून जखमींच्या जवाबावरुन तसेच घटनास्थळी पंचनामा करत पारधी वस्तीवरील लोकांच्या व स्थानिकांच्या जवाबानुसार तलवाडा पोलिस ठाण्यात प्रथम तक्रार (FIR) नोंद करण्यात आली आहे. यात पोलिसांनी काही आरोपींवर अनुसुचित जाती/जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये ग...

लिंबागणेश येथे शेतकरी विरोधी भारत-अमेरिका कृषी कराराची प्रतिकात्मक होळी; दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध

Image
  बीड प्रतिनिधी : (दि.१७) अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित महा एक्स्पो २०२६ पशुप्रदर्शनात भारत-अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते. कृषी क्षेत्रात कोणत्याही अमेरिकन मालाला भारतात खुली सूट दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या वक्तव्याला विरोध करत डॉ. गणेश ढवळे यांनी प्रत्यक्षात अमेरिकन कृषी प्रक्रिया मालावर शून्य टक्के आयात शुल्क देण्यात आल्याचा, तर भारतीय कृषी मालावर १८ टक्के शुल्क कायम असल्याचा आरोप केला. या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दि‌.१७ मंगळवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत-अमेरिका कृषी कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजाभाऊ गिरे, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्रामपं...

नगरपरिषद सीओ, बदली मागू नका!बीड शहर बचाव मंचाची शैलेश फडसे यांना विनंती

Image
बीड प्रतिनिधी : बीड शहर बचाव मंचाच्या वतीने विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद बीडचे मुख्याधिकारी (सीओ) शैलेश फडसे यांची भेट घेऊन त्यांनी बदली मागू नये, अशी विनंती केली. बीड शहराच्या विकासासाठी त्यांच्या कार्यपद्धतीची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सीओ शैलेश फडसे यांनी बीडमध्ये रुजू झाल्यापासून नगरपरिषदेच्या कामकाजात शिस्त व पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. गत मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळानंतर नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते. मात्र, त्यांनी कर्तव्यदक्ष आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रशासनाची धुरा सांभाळत कामकाजाला गती दिली आहे. नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न आता फलदायी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः नगरपरिषद व्यवस्थेत रूढ झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी तसेच बोगस कंत्राटदार व बोगस बिलांविरोधात उघडलेल्या मोहिमेबद्दल बीड शहर बचाव मंचाच्या वतीने त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आले. त्यांच्या धाडसी आणि निडर भूमिकेमुळे प्रशासनात ...

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवाभाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या बीड नगरपरिषद प्रशासनाला सूचना

Image
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या बीड नगरपरिषद प्रशासनाला सूचना वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी दोन्ही चौकात यंत्रणेसोबत पाहणी  बीड (प्रतिनिधी) दि.१६ : शहरातील अत्यंत वर्दळीचे अंबिका चौक आणि राजीव गांधी चौक येथील वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी निर्माण झालेले सर्व प्रकारचे अडथळे तात्काळ हटविण्याच्या सूचना भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि संबंधित यंत्रणेसोबत सोमवारी (दि.१६) दोन्ही चौकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अंबिका चौकातील सुशोभीकरणामुळे वारंवार निर्माण होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्याबरोबरच परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. तसेच, राजीव गांधी चौकातील मध्य रस्त्यात उभा असलेला विजेचा खांब तातडीने हलविण्याची मागणीही करण्यात आली. अंबिका चौकातील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) अन्यत्र हलविण्याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली. ही कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी महावितरण ...

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहाची ‘काल्याच्या किर्तनाने’ भक्तिमय सांगता.

Image
"बेलेश्वर येथे भक्तांचा तुडूंब महा जनसागर लोटला" श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहाची ‘काल्याच्या किर्तनाने’ भक्तिमय सांगता . बीड प्रतिनिधी :- तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दि.९ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज दि.१६ रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त बेलेश्वर येथे भक्तांचा तुडूंब महासागर लोटला होता. गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह उत्साहात पार पडला. सांगता प्रसंगी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य, अमृततुल्य दहिहंडी कार्यक्रम अर्थात ‘काल्याच्या किर्तनाने’ उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी मोरेश्वर संस्थान, कोळवाडी येथील मठाधिपती हरिहर भारती महाराज, बबन महाराज मंझरीकर, भक्तिदास महाराज शिंदे (बेलखंडी, पाटोदा), रणजित महाराज शिंदे (नेकनुर) यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनादरम्यान त्यांनी...

श्री गोवेश्वर देवस्थानाची प्राणप्रतिष्ठा महाशिवरात्रीच्या निमित्ताने जुने गोवा येथे संपन्न

Image
श्री गोवेश्वर देवस्थानाची प्राणप्रतिष्ठा महाशिवरात्रीच्या निमित्ताने जुने गोवा येथे संपन्न आजचा हा सोहळा गोव्याच्या गाढ आध्यात्मिक परंपरेचे आणि अखंड सांस्कृतिक सातत्याचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. जुने गोवा, प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जुने गोवा येथील रामानंदाचार्य दक्षिणपीठ उपपीठात श्री गोवेश्वर देवस्थानाची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. परमपूज्य जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. वेदिक परंपरेनुसार मंत्रोच्चार, अभिषेक आणि विविध धार्मिक विधींनी हा प्रतिष्ठापना सोहळा पार पडला, ज्यातून राज्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडले. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच, ३०० हून अधिक कुटुंबांनी सार्वजनिकरित्या सनातन हिंदू धर्मावरील आपला विश्वास पुनःप्रस्थापित केला; हा आध्यात्मिक पुनर्मिलन आणि परंपरेशी नव्याने बांधिलकी व्यक्त करणारा भावनिक क्षण ठरला. या शुभ प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाल...