Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जिल्हाधिकारी साहेब, अहिल्यानगर– बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; तरी पाटोदा प्रशासनाची डोळेझाक? संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घालतय कोण? चौकशी करून कारवाई करा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) अहिल्यानगर, जामखेड,सौताडा, रोहतवाडी, नायगाव, बीड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याच्या कामाच्या आड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा गंभीर प्रकार सुरू असल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने “प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकली जात आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालय पाटोदा येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, B.R.N. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., जयपूर या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित कंपनीकडून सौताडा ते शिरापूर फाटा या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान, विशेषतः पाटोदा परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी मुरूम उत्खनन करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.तक्रारीनुसार, गावातील तलाव, पाझर तलाव तसेच गायरान जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर मुरूम काढण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे उत्खनन करताना कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसून, सरळ शासनाच्या महसुलावर डाका टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ...

अंजनवती येथे अखंड हरिनाम सप्ताहात रक्तदान शिबिर संपन्न

Image
बीड (दि.०९) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील अंजनवती येथे श्री संत तुकाविप्र महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून यंदा ५१ व्या वर्षाचा महोत्सव साजरा केला जात आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या भावनेतून गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थांनी एकत्र येत या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिराचा शुभारंभ श्री संत तुकाविप्र महाराज पालखी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा दिंडीचालक ह.भ.प. अर्जुन महाराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारत बबनराव येडे पाटील व बाळासाहेब विजयराव येडे पाटील हे प्रारंभीचे रक्तदाते ठरले. गावातील तरुणांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास पैठण येथील सुप्रसिद्ध गायनाचार्य ह.भ.प. रामेश्वर महाराज मस्के, विठ्ठलराव अंजनवतीकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे पाटील, अशोकराजे येडे, बाजीराव भूमकर, सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह बीड येथून...

महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का?

Image
महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.०९ ): बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल ५४ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिल रोजी नुकत्याच घडलेल्या कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झालेल्या ज्यात ७ मयत बालकांचा समावेश असलेल्या घटनेचा दाखला देत, “अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. --- दिंडोरी दुर्घटनेची पार्श्वभूमी नाश...

अंबाजोगाई कृषी विभागात महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजना कागदावरच- लोकजनशक्ती पार्टी (रा)

Image
       अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात उदा. 1)नमो शेतकरी महासन्मान निधी योजना  2)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  3)प्रधानमंत्री पिक विमा योजना मागेल त्याला शेततळे योजना 4)ठिबक व तुषार सिंचन योजना जलयुक्त शिवार अभियान योजना 5)कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ट्रॅक्टर अवजारे खरेदी योजना  6)सोलर स्प्रे पंप अनुदान योजना  7)एकात्मिक उत्पादन विकास अभियान योजना  8)राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना  9)शरद पवार ग्राम समृद्धी योजना  10)प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना  11) बी बियाणे स्वस्त दरात किंवा मोफत वाटप योजना अशा अनेक योजना महाडीबीटी पोर्टल द्वारे चालवल्या जातात या योजना भरण्यासाठी किंवा पाहण्यासाठी अँड्रॉइड स्वरूपाचा मोबाईल लागतो प्रत्येक शेतकऱ्याकडे अशा प्रकारचा मोबाईल नसल्यामुळे अनेक योजना कागदावरच दिसत आहेत तालुका कृषी अधिकारी मोहीम अधिकारी कृषी सेवक कृषी सहाय्यक असे विविध अधिकारी आंबेजोगाई तालुक्याला लाभले असताना सुद्धा हे अधिकारी शेतकऱ्यांची ...

बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल

Image
बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन   नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल . आमदार विजयसिंह पंडित, व मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार - प्रेमलताताई पारवे, विनोद मुळूक बीड : शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देणारी अत्याधुनिक आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद गाडी (Emergency Response Sanitation Unit) आज नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली असून,स्व.अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या आदेशानुसार मा.आमदार विजयसिंह पंडित व मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढाकारातून ही गाडी बीड नगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाबद्दल नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आ.विजयसिंह पंडित साहेब ,जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या गाडीचा अधिकृत शुभारंभ नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक,स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, प्रवक्ते भागवतजी तावरे, नगरसेवक,जैतुल्ला खान,शेख अशफाक इनामदार, मनोज गोडसे, नगरसेवक दत्ता जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, अ...

नेपाळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत शिक्षण द्यावा – नगरसेवक संतोष दादा जाधव यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) नेपाळमध्ये खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे.जाधव म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात समानता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आज खासगी शाळांच्या वाढत्या फीमुळे अनेक पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवून त्या अधिक सक्षम केल्यास समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी एकसमान शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेपाळप्रमाणे धाडसी निर्णय घ्यावा,अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे

शिक्षकांचे वेतन १४ एप्रिलपूर्वी अदा करा : मुप्टा संघटनेची मागणी

Image
बीड | प्रतिनिधी शिक्षक संघटना (मुप्टा), बीड जिल्ह्याच्या वतीने माहे मार्च २०२६ चे प्रलंबित वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी, म्हणजेच १४ एप्रिलपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शिक्षकांच्या दैनंदिन गरजा व आर्थिक अडचणी लक्षात घेता वेतन वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन लवकर मिळाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही संघटनेने स्पष्ट केले. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा. शशिकांत जावळे, जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप तसेच प्रा. प्रविण तरकसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या या न्याय्य मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वेतन अदा करावे, अशी अपेक्षा मुप्टा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.