Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी?

Image
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम  (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी? मुंबई (प्रतिनिधी ) – राजगृहाशी एकनिष्ठ राहून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले पुरुषोत्तम (गोटू )वीर यांनी आज मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात येये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षाचे नेते विजय साळवे यांच्या उपस्थितीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, पक्षाचा विस्तार वाढवणे तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक संवाद झाला. तसेच पुरुषोत्तम वीर यांना लवकरच रिपब्लिकन सेनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाली. या प्रसंगी लक्ष्मण गव्हाणे, अशोक वाघमारे, बी. एस. जगतकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आष्टीचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांना मातृशोक

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :         आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी व सध्या आष्टी शहरातील विनायक नगर येथे स्थायिक असलेले आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्री कौशल्याबाई चंद्रभान धारक (वय वर्षे ९०) यांचे आज शुक्रवार पहाटे वर्धापकाळाने निधन झाले . त्यांचा अंत्यविधी धानोरा येथील अमरधामा येथे करण्यात आला .   कौशल्याबाई धारक यांच्या पाश्चात बापूराव   धारक,नायब तहसीलदार भगीरथ धारक, संतोष धारक, गुलाब धारक ४ मुले असुन सुनंदा रामदास दळवी १ मुलगी आहे .    अंत्यविधी प्रसंगी माजी आ. साहेबराव दरेकर , उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील, ॲड.हनुमंतराव थोरवे,माजी सभापती संजय ढोबळे,माजी सरपंच सतीशशेठ धस, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, माजी सभापती विजयकुमार बांदल, पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका) शेळके, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अनिलतात्या ढोबळे,संजय मेहेर, सुभाष राऊत, जालिंदर वांढरे, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, मच्छिंद्र शेळके, भगवान गायकवाड, मा...

हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कलमजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत

Image
हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कल मजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत  लिंबागणेश (दि.१४ ) – गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी करण्यासाठी मजुरांऐवजी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र लिंबागणेश परिसरात दिसून येत आहे. यंत्राद्वारे काढणी केल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला पसंती देत असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी गणपत तागड यांनी व्यक्त केली. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रब्बी पिकांच्या कापणी-मळणीची लगबग सुरू आहे. गत काही वर्षांपासून गव्हाची काढणी हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीकामासाठी मजुरांची टंचाई तसेच वाढलेले मजुरीदर यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने कापणी करणे कठीण होत आहे. मजुरांच्या मदतीने गव्हाची कापणी, बांधणी आणि मळणी करण्यासाठी साधारणतः ४ ते ५ दिवस लागतात व त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने हेच काम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होत असून प्रति एकर सुमारे ३००० रुपयांत का...

सरकार करत असलेली व्यक्तिस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी म्हणजे सपसेल हुकूमशाहीच की- डॉ जितीन वंजारे

Image
सरकार करत असलेली व्यक्तिस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी म्हणजे सपसेल हुकूमशाहीच की- डॉ जितीन वंजारे रविराज साबळे आणि त्रिशूल पाटील यांच्या सोबत अक्खा महाराष्ट्र  काल परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक वल्गना केली आणि सोशल मीडियाचा वापर करून जेही लोक सरकार विरोधात बोलतील त्यांच्यावरती कार्यवाही करण्याचा कायदा पारित करणार असल्याचे सांगितले आजपर्यंत चालू बीजेपी सरकारने आपले सर्वच्या सर्व विरोधक ब्लॅकमेल करून संपविले आहेत कोणाला सीआयडी, ईडी किंवा इतर चौकशी यंत्रणा पाठीमागे लावून आपल्या विरोधात विरोधकच तयार न होऊ देण्याचा तंतोतंत कार्यक्रम अखला आहे.विरोधक कायमचा संपवण्यात आलेला आहे विरोधकांच्या बुडाखालचा अंधार उघडा करून त्यांच्यावर शासकीय कार्यवाही करून बळजबरीने त्यांचा पक्षप्रवेश स्वतःचा पक्षामध्ये करून घेतला परंतु स्वतःच्या प्रानाची आहूती देण्यासाठी तयार असलेले सामाजिक कार्यकर्ते यांचीही मुस्कटदाबी करण्यासाठीच ह्या कायद्या चे प्रयोजन आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे की उघडपणे सरकार कुठलेही असो काम चुकीचे केलं क...

पाटोदा तालुक्यात घरगुती गॅसची अडवणूक करणाऱ्या एजन्सींवर तात्काळ कारवाई करा – संतोष कवठेकर

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही काही गॅस एजन्सीकडून नागरिकांना वेळेवर गॅस देण्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. घरगुती गॅस उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष कवठेकर यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधत संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, घरगुती वापरासाठी असलेला गॅस नागरिकांना सहज उपलब्ध व्हावा, ही एजन्सीची जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी सिलेंडर उपलब्ध असूनही ग्राहकांना विलंब केला जातो किंवा विविध कारणे सांगून अडवणूक केली जाते.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी एजन्सींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतोष कवठेकर यांनी केली आहे. तसेच पाटोदा तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींची तपासणी करून नागरिकांना घरगुती गॅस सुरळीतपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही त...

नागसेन बुद्धविहार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती जाहीर

Image
परळी (प्रतिनिधी ) – महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त नागसेन बुद्धविहार परिसरातील उपासक-उपासिका यांची सभा दिनांक ११ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. ही सभा गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांनी मागील वर्षातील जमा-खर्चाचा ताळेबंद सभागृहात सादर केला. उपस्थितांनी त्यास एकमताने मान्यता दिली. यानंतर सर्व उपस्थितांच्या चर्चेनंतर व एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती महोत्सव समिती पुढीलप्रमाणे निवडण्यात आली –अध्यक्ष ए. एस. उजगरे(बापू),उपाध्यक्ष : ईश्वर धन्वे,सचिव : ॲड. के. आर. गाडे,सहसचिव : श्रीमंत उजगरे, कोषाध्यक्ष : उमाजी वाघमारे (बापू) या सभेला परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये बौद्धाचार्य डी. एन. पोटभरे, शारदाताई औसरमल, ॲड. डी. एम. विद्यागर, प्रा. टी. जी. कांबळे, ए. एस. उजगरे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. डी. ज...

हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही

Image
हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही मा. तहसीलदार बीड यांनी रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. रस्ताच नसल्याने 50 ते 60 कुटुंब जगत आहेत बंदिवासात (बीड प्रतिनिधी ) :- बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील मौजे हिंगणी (खुर्द) या गावाचे 50 ते 60 कुटुंब सध्या हवालदिल झाले आहे आहेत. कारण या कुटुंबाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीला जाण्यासाठी जो रहदारीचा मुख्य रस्ता होता तो रस्ताच गट क्रमांक 404 मधील शेतकऱ्याने अडवला आहे. आणी रस्ता अडवल्यामुळे हे 50 ते 60 कुटूंब सध्या एकाद्या बंधीस्त जागेत कैद केल्यागत कैद आहेत. कारण यांचा येण्याजाण्यासाठीचा रस्ताच गट क्रमांक 404 मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यानी बंद केल्यामुळे या 50 ते 60कुटुंबाना बंदिस्त जागेत आणी बंदिस्त अवस्थेत राहावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती संबंधित बांध रस्ते, वस्त्यावर जाणारे रस्ते, पांदन रस्ते,सार्वजनिक वाद निर्माण असलेले रस्ते खुले करण्याची योजना आणली आहे. मात्र मौजे हिंगणी खुर्दच्या या गट क्रमांक 404 मधील रस्त्या बाबतीत ही योजना हवेतच विरून गेली की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आ...