Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले

Image
न.प.अग्निशमनमध्ये ढिसाळपणा, अंबेवेस येथील पुलाच्या कामात बोगसपणा व काही अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने? -नितीन बागवाले परळी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन बागवाले यांचा प्रशासनावर जोरदार हल्लाबोल परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): परळी वैजनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरत जोरदार भूमिका मांडली. सभेदरम्यान नगरसेवक नितीन बागवाले यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र समाचार घेतला. अलीकडील आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच अंबेवेस येथील सरस्वती नदीवरील पुलाच्या कामातील बोगसपणा सभागृहात उघडकीस आणत, संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात अभियं...

वृक्षारोपणातून जिजाबाई जगतकर यांच्या अस्थी विसर्जनास अनोखी श्रद्धांजलीजगतकर कुटुंबीयांचा आदर्श पायंडा

Image
परळी प्रतिनिधी – स्मृतीशेष मातोश्री जिजाबाई शंकरराव जगतकर यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम आज, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी परळी येथे श्रद्धापूर्वक संपन्न झाला. राजमाता जिजाऊ मुलींच्या वस्तीगृहाच्या वॉर्डन तसेच दलित मित्र पुरस्कारप्राप्त स्व. शंकरराव राजाराम जगतकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांचे वृद्धापकाळाने ९८ व्या वर्षी म्हणजे २७ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले होते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जगतकर कुटुंबीयांनी एक आदर्श उपक्रम राबवत वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन केले. सकाळी ‘रक्षा सावडणे’ या विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर चांदापूर येथील संत चोखामेळा सोसायटीतील शेतजमिनीत, स्व. शंकरराव जगतकर यांच्या समाधीजवळ वृक्षारोपण करून अस्थी विसर्जन करण्यात आले. दुपारच्या सत्रात पुण्यानुमोदन व जलदान विधी तसेच धम्मदेशना कार्यक्रम विधीचार्य आनंद तूपसमुद्रे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला अँड. अनंतराव जगतकर,अरुण जगतकर, अशोक जगतकर, राजाभाऊ जगतकर, बहिणाबाई कांबळे तसेच सुना, नातवंडे, आप्तेष्ट, नातेवाईक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्...

रोहितळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; 'सर्वधर्मसमभावा'चे दर्शन

Image
​गेवराई प्रतिनिधी : तालुक्यातील रोहितळ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावात पाहायला मिळालेला. जयंतीनिमित्त भीमगीत संगीत रजनी आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ​ गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात अबालवृद्धांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ​ उत्सवादरम्यान गावातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे सामाजिक सलोख्याचे आणि एकतेचे दर्शन घडले. ​गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रोहितळमधील हा जयंती सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम

Image
मुस्लिमांच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार कटिबद्ध मुलींचे वसती गृह व माटीॅ साठी ठाम भूमिका - शेख निजाम   अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेली बैठक सकारात्मक आणि परिणामकारक चर्चेसह यशस्वीरीत्या संपन्न झाली.   यावेळी शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात व बीड येथील अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित मुलीचे वसतिगृह व जागा उपलब्ध करून कामाला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले मा.आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, शेख मुजीबभाई,फारुख पटेल, भागवत तावरे यांच्या सतत पाठपुरावा चालु आहे.. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी ...

गढी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगाना ग्राम निधी अतर्गत 5% टक्के प्रमाणे निधी वाटप

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज दिनांक 28 / 4 /2026 रोजी सकाळी 11 = 00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी येथे गढी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी पठण आय व्ही .व गढी ग्रामपंचायतचे क्लार्क नारायण जाधव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गढी येथील अपंगाना 5% टक्के प्रमाणे ग्राम निधीचे वाटप करण्यात आले . या निधी वाटप कार्यक्रमास गढी गावातील नोदणीकृत अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पठाण आय व्ही यांनी सर्व आलेल्या अपंग बांधवाना गढी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतुन 5% टक्के निधी अपंग बांधवाना वाटप करत आहोत असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व अपंगांना निधीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थितीत अपंग बांधव सखाराम पोहिकर . विक्रम कांबळे . राहुल कांबळे . अमर कांबळे . आशाबाई सोळुके .बबलू शेख . ताहेरा भाभी . आयशा शेख . इतर अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत हो...

अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा; कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

Image
अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा;  कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश (दि.२९) : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, तडे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या आणि ८७८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गावर मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान विशेषतः रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दुचाकी वाहनांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न करता संबंधित कंत्राटदार एचसीपीएल कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा तात्पुरता केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची दुरुस्ती असल्याने समस्या कायमच राहार आहे. दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीकडील कामही रखडलेल्या अवस्थेत आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि रस्त्याल...

पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून? केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र

Image
बीड प्रतिनिधी – केज पोलीस स्टेशन आधीच राज्यभर चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील तरुण आशिष धिवार यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या कथित मारहाणीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हा मृत्यू नसून थेट खून असल्याचा आरोप होत आहे. रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी कठोर भूमिका घेत, “केज पोलिसांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी जोरदार मागणी केली आहे. “हा साधा मृत्यू नाही, तर पोलीस अत्याचाराचा परिणाम आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मयत आशिष धिवार यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आधी गुन्हा दाखल करा, मगच अंत्यसंस्कार,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याशिवाय, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी पोस्टमार्टम इन-कॅमेरा पद्धतीने, बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांकडून करण्याची मागणी हीही पुढे करण्यात आली आहे. या घटन...