Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीड शहरासाठी शववाहिका दुरुस्त करून लवकरच सेवेत-शेख निजाम

Image
बीड, प्रतिनिधी — बीड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बीड नगरपालिका प्रशासन व स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्या सूचनेवरून शहरातील बंद पडलेली शववाहिका दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ती नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात आपत्कालीन परिस्थितीत किंवा दुःखद प्रसंगी शववाहिकेची अत्यंत गरज भासते. मात्र, मागील काही काळापासून तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा खंडित झाली होती. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता, ज्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शववाहिका त्वरित दुरुस्त करून सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नगरपालिका प्रशासनानेही या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तसेच, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार आमदार विजय सिंह पंडित, यांच्या मार्गदर्शनात नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळू...

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड

Image
मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ स्तरावरील ओलंपियाडमध्ये,मयंक शैलेश चौधरीची सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून निवड  मयंक शैलेश चौधरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी जागतिक मास्टर अबॅकस सर्वोत्कृष्ट स्पर्धक म्हणून झाली" बीड (प्रतिनिधी ) जागतिक स्तरावरच्या लाईव्ह मॅथ ओलंपियाडमध्ये सर्व स्पर्धेमध्ये मयंक चौधरीने सर्वोत्कृष्ट मानांकन, सर्वोत्कृष्ट स्पर्धक, सर्वोत्कृष्ट विजेता असे अनेक पदक आणि ट्रॉफी मेडल मिळवलेले आहेत. शालेय स्तरावरील सर्वांगिन विकास करण्याच्या मार्गाने गणित विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे त्यासाठी अबॅकस आणि वैदिक मॅथ गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील मॅथ आणि अबॅकस ट्रेनिंग केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. जागतिक स्तरावरच्या 19 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या लाईव्ह मॅथ ग्रँड मास्टर ओलंपियाड मध्ये मयंक शैलेश चौधरी याने सर्वोत्कृष्ट मॅथ ओलंपियाड म्हणून पदक मिळवलेले आहे. लाइव्ह मॅथ ओलंपियाड असोसिएशन दुबई आणि इंडिया आणि इंटरनॅशनल स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप तसेच अबॅकस ऑनलाई...

पाटोदा ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था;प्रवेशद्वारावरील रस्त्याच्या दुर्दशेमुळे रुग्णांना खाव्या लागतात खस्ता - नगरसेवक संतोष जाधव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता पूर्णतः खड्डेमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो  नगरसेवक संतोष जाधव तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांसाठी हा रस्ता सध्या धोकादायक ठरत आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रुग्णवाहिका आणि दुचाकीस्वारांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचणेही कठीण होत असल्याची स्थिती आहे. रुग्णालया समोरील रस्ता इतक्या वाईट अवस्थेत असणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करणे आवश्यक आहे,” असे नगरसेवक संतोष जाधव यांनी सांगितले.या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नगरसेवक संतोष जाधव यांच्या वतीने देण्यात आला आहे.

पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे

Image
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकांना जीवे मारण्याची धमकी बीड प्रतिनिधी - दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची, घरात घुसून मारण्याची आणि “पानसरेंना भेटायला वर जा” अशी थेट धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असून, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की, गायकवाड यांनी रात्री उशिरा फोन करून पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला. “शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अनादरकारक आहे,” असे म्हणत त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिव्या दिल्या आणि “तुझी जीभ कापेन, घरात घुसून मारेन, तूही पानसरेंना भेटशील” अशा धमक्या दिल्या. संभाषण सुमारे ९ मिनिटे चालले. गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप आपलीच असल...

" वाचाल तर वाचाल" तर्फे जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न

Image
129 पुस्तकाचे दोन संच वाचनाकरिता वितरित.  बीड (प्रतिनिधी ) सोशल मीडिया व इंटरनेटच्या मायावी जाळ्यात अडकून विद्यार्थी वाचनापासून; खेळाच्या मैदानापासून दूर राहत आहेत. लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाने 2016 पासून बीड शहरात व परिसरात 44 मोफत वाचनालये सुरू करून 3200 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे.आज दिनांक 23/ 4/ 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मौजे वरवटी तालुका जिल्हा बीड येथील 44 व्या केंद्रात 2 ऱ्या फेरीतील 41 पुस्तकांचा संच वाचण्याकरिता ॲड राजेश शिंदे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.एम. भोले सर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. संचातील पुस्तके वितरणाची जबाबदारी ॲड राजेश शिंदे यांनी तर प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या मोफत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 88 पुस्तकांचा संच वर्गशिक्षिका विशाखा वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. सदरील पुस्तकांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुउद्देशीय विकास प्रकल्प

. गेल्या एक शतकापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात कोणत्या आणि किती समस्यांना तोंड द्यावे लागेल याची माहिती आणि पूर्ण ज्ञान होते. त्यामुळेच त्यांना भारताचा द्रष्टा नेता, अंतर्यामी व्यक्तिमत्त्व, किंवा भविष्याचे वेध घेणारे शिल्पकार म्हणले तर वावगं ठरणार नाही. आज संपूर्ण देशात पाण्याचा प्रश्न टोकाचा आणि दुर्भिक्षेतेचा झाला आहे. काही विचारवंतांनी भाकीत केल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध जर झाले तर ते पाण्यासाठीच होईल. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी केलेले कार्य सुचविलेले धोरण जल,कर, विद्युत, शेती उत्पादन व उद्योगासंबंधीचे विचार आजही भारताच्या यशस्वीतेसाठी उद्बोधक ठरत आहेत. भारताची सामाजिक आर्थिक बैठक निर्धारित करण्यामध्ये 1920 ते 1950 हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो या काळात सामाजिक आणि आर्थिक साधन म्हणून नियोजन तंत्राचा स्वीकार झाला. या नियोजन विकासाची सुरुवात जल व ऊर्जा या विकास युद्धोत्तर पुनर्रचनेच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात झाली. हा काळ साधारण 1942-46 चा होता त्यावेळी गव्हर्नरच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांच्याकडे ऊर्जा, जलसिंचन आणि ...

आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Image
आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी कोल्हापूर स्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यास परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली. बीड (दि 23 ): बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरस्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरुन आई,बहिण,आणि पत्नीचा उल्लेख करुन,अतिशय अश्लील- अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांची चौकशी करुन अटक करावी आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी; अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना बीड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनामध्ये तीव्र निषेध नोंदवून म्हटले आहे की, " शिवाजी कोण होता" हे पुस्तक 38 वर्षांपुर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहीले आहे.मराठी सहीत अन्य भाषांमधील लाखों प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत.मात्र,या पुस्तकाचे शिर्षक शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करीत असल्याचे म्हणत पुस्तकाचे वितरण,विक्री करीत असले...