Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ

Image
नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ. नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप पर्यंत सरर्वीस रोड तात्काळ करण्यात यावा अन्यथा अंदोलन करु :- पप्पु गायकवाड गेवराई प्रतिनिधी दि. २२ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गेवराई शहराच्या बाहेरून जाणारा झमझम पेट्रोल पंप ते नायरा पेट्रोल पंप चौक या ठिकाणी उड्डाण पुलाचे कामे चालू आहेत मात्र ती कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे एका साईडचा रस्ता बंद करून दुसऱ्या साईटचा रस्ता सुरू असून त्या रस्त्यावरून दोन्ही साईटचे वाहने येजा करत असल्या मुळे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांतून सतत वाळू सांडत असल्यामुळे व सिग्नल कमकुवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली असून मागील दोन महिन्यात १४ ते २० अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  एकाच साईडने दोन्ही साईटचे वाहने ये जा करत असल्यामुळे रुग्णवाहिकेला देखील खूप त्रास होत आहे तसेच रुग्णवाहिकेला रुग्ण नेताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रुग्णांचे देखील प्राण गमावले आहेत.   नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रो...

मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप चौकशी करण्याची भाजपाचे माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडितांची मागणी

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी  गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाचे झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैर यावर व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सकल चौकशीची मागणी केली आहे याबाबत माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की वंजारवाडी गावातील अनेक कामे हेमेट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखविण्याचा दावा करण्यात आला आहे निवेदनानुसार चिरखा वस्तीतील सिमेंट रस्ता मारुती मंदिर ते येवले यांच्या घराकडे जाणारा रस्ता वंजारवाडी येथे यादव यांच्या शेताकडे जाणारा रस्ता तसेच वंजारवाडी ते रांजणी शिव रस्ता पवार यांच्या शेताकडे ही कामे बोगस दाखवून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करून तसेच खालील कामे पुस्तकी मोजमाप करून झा...

कोक्रोच जनता पार्टी चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांना झेड प्लस सेक्युरिटी द्या-डॉ जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी :- आज देशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कोणीही बोलले असता त्याला जेलमध्ये टाकण्याची परंपराच येथील सत्ताधाऱ्यांनी चालू केलेली आहे,विरोधकांना ईडी सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांचा धाक देऊन त्यांना जेलमध्ये टाकून विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली बाहेर काढून त्यांच्यावर दबावतंत्र टाकून स्वतःच्या पक्षांमध्ये त्यांची इनकमिंग केली जात आहे. भारतीय जनता पार्टीकडे अशी कोणती वाशिंग मशीन आहे की ज्या पक्षांमध्ये भ्रष्टाचारी नेता नसताना त्याच्यावर गंभीर आरोप केले जातात आणि तोच भ्रष्टाचारी नेता सरेंडर होऊन भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्याच्या सर्व भ्रष्टाचारी चौकशी यंत्रणा बंद होतात आणि तो नेता मंत्री आमदार खासदार बनतो.हे का घडत आहे याला जबाबदार कोण आहे आणि याच कारणांमध्ये आज भारतामध्ये विरोधी पक्ष कमकुवत झाला आहे. टीव्ही पत्रकार सरकार ची दलाली करत आहे. येथील टीव्ही पत्रकार केवळ विशिष्ट सत्ताधारी लोकांचे गुलाम असताना आम्ही पाहत आहोत. मीडिया विकला गेलेला आहे. नवयुवकांना जातीवाद अन धर्मवाद शिकवून आणि जातीवादाच्या नावाखाली त्यांची माथी भडकवली जात आहे...

परळी पंचायत समितीत ग्रामसेवकांची कमतरता; नागरिकांची कामे रखडली

Image
परळी वैजनाथ प्रतिनिधी : परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांची एकूण ६२ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ५१ ग्रामसेवक कार्यरत आहेत, तर तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे अतिरिक्त गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. सध्या अनेक ग्रामसेवकांकडे एका पदासोबत आणखी ३ ते ४ गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामसेवक हे दररोज १०० ते १६० किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक कामे रखडत आहेत. रहिवासी दाखला, पीटीआर नक्कल, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, हयात दाखला तसेच विविध शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा

Image
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा; मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून गोर गरीब रुग्णांना न्याय,   तीन महिन्यांत 15 रुग्णांना सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची वैद्यकीय मदत बीड प्रतिनिधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्षामार्फत गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. स्वप्नील वरपे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आजपर्यंत तब्बल 2652 रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून या रक्तपुरवठ्याची एकूण किंमत अंदाजे 39 लाख 78 हजार रुपये इतकी आहे. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मागील तीन महिन्यांत 15 गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) तसेच विविध सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुमारे 2 लाख 95 हजार रुपयांची आर्थिक म...

येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड

Image
येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड  येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची तर उद्घाटकपदी लोणी, जि. अहिल्यानगर येथील जेष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांची निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ तसेच प्रतिष्ठानचे सचिव मा. राजेश वाघ यांनी कळविले आहे.                                                                                                                                   ...

आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे

Image
आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे  आष्टी (प्रतिनिधी ): आष्टी पंचायत समितीमधील कथित भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभाराविरोधात प्रशासनाला दिलेला आठ दिवसांचा अल्टिमेटम आता संपत आला आहे. मात्र, अद्यापही भ्रष्ट व्यवस्थेने या तक्रारीवर लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारचे निवेदन न दिल्यामुळे, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अधिकारी हे समाजाचे नोकर आहेत हे विसरले असून, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते,' असा घणाघाती आरोप करत या व्यवस्थेविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक टेबलावर पैशांची मागणी; शेतकरी हवालदिल आष्टी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांची प्रचंड पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न असो की विहीर मंजुरी, शेततळे मंजुरी, घरकुल मंजुरी किंवा मस्टर भरणे आणि कामाची मागणी करणे— प्रत्येक कामासाठी इथे वेगवेगळ्या टेबलावर उघडपणे पैशा...