Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे आयोजन

Image
बीड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आयोजित केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही जिल्ह्यातील इयत्ता 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. तालुकास्तरीय पहिली फेरी दिनांक 30 मार्च 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या फेरीतून प्रत्येक तालुक्यातील अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या अकरा तालुक्यांतील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय, बीड येथे पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5...

वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत

Image
 बीड प्रतिनिधी - एकतानगर नाळवंडी नाका परिसरातील “संगर” या निवासस्थानी चैत्यभूमी, मुंबई येथील भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघ यांचे वीर परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात स्वागत, सत्कार व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कालकथित नारायण वीर शिकवलेल्या धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत वीर परिवार ने आज धम्म सेवा केली आहे. धम्मरथाद्वारे चैत्यभूमी येथून आगमन झालेल्या भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे आगमन होताच परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. यावेळी अॅड.चंद्रवणी वीर तसेच समाजसेवक पुरुषोत्तम उर्फ (गोटु) वीर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भंन्ते व संघाची आदरपूर्वक सेवा केली. वीर परिवाराने अत्यंत श्रद्धा व समर्पण भावनेने भिक्खू संघाचे स्वागत करत पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. तसेच सर्व भिक्खूंना सन्मानपूर्वक भोजनदान देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात शांतता, करुणा व बंधुभाव यांचा सुंदर संदेश देत भंन्ते डॉ. सुमेधबोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मि...

लिंबागणेश येथे गतिरोधकाच्या मागणीसाठी पत्रकार हरिओम क्षीरसागर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Image
(लिंबागणेश प्रतिनिधी )  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (मांजरसुंबा – पाटोदा) मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोर तसेच गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार हरिओम सुधीरराव क्षीरसागर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या संदर्भात दि. १२ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा होऊन स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दि. २६ जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित विभागाला गतिरोधक बसविण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी आदेशांची दखल न घेता आजपर्यंत गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, शाळकरी विद्यार्थी...

नायगाव जिल्हा परिषद शाळेतील वृक्षतोड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? गणेश मोहळकर यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या प्रकरणावर प्रशासनाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा संतप्त आरोप महात्मा फुले युवा दलाचे तालुकाप्रमुख गणेश मोहळकर यांनी केला आहे. तब्बल 30 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.शाळेच्या आवारातील अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या व विद्यार्थ्यांना सावली देणाऱ्या झाडांची कोणतीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून, पर्यावरणाच्या हानीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.या संदर्भात तहसीलदार, वनविभाग, गट शिक्षण अधिकारी तसेच कृषी विभाग यांना लेखी तक्रारी देण्यात आल्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून “कर्मचारी वर्ग कमी आहे” अशी कारणे देत उघडपणे वेळकाढूपणा केला जात आहे. ही कारणे देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचा थेट आरोप मोहळकर यांनी केला आहे.“विद्यार्थ्यांच्या हितासाठी लावलेली झाडे तोडली जातात आणि प्रशासन बघ्याची भू...

जिल्हा प्रशासन गोट्या खेळतंय काय? स्थानिक वृत्तपत्रांची वृत्तपत्रांची आर्थिक कोंडी

Image
जिल्हा प्रशासन गोट्या खेळतंय काय? स्थानिक वृत्तपत्रांची वृत्तपत्रांची आर्थिक कोंडी  ५० लाखांची जाहिरातींची देयके रखडवणा-या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   ‘गोट्या खेळत’ लक्ष्यवेधी आंदोलन  बीड (दि.२३) : एकीकडे शासन पारदर्शकतेचे दावे करत असताना, बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र स्थानिक वृत्तपत्रांच्या जाहिरातींची बिले अडवून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत असुन गळचेपी करत आहे .जिल्ह्यातील विविध भूसंपादन कार्यालयांमार्फत देण्यात आलेल्या जाहिरातींची सुमारे ५० लाख रुपयांची देयके तब्बल १० वर्षांपासून प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२३, सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘गोट्या खेळत’ लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. “जिल्हा प्रशासन गोट्या खेळतंय काय?” असा सवाल करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. दफ्तर दिरंगाई करणा-या आधिका-य...

लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांचा दिपकभाऊ बोऱ्हाडे यांना जोरदार पाठिंबा; मुंबईकडे रवाना

Image
   लिंबागणेश (दि.२२): धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बोऱ्हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांनी आज रात्री मोठ्या उत्साहात मुंबईकडे कुच केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत ताशांच्या गजरात प्रदक्षिणा काढण्यात आली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो”, “दिपकभाऊ तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाज बांधवांनी सरकारकडे मागणी करताना सांगितले की, कोर्ट-कचेरी व समित्यांच्या प्रक्रियेत न अडकता धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा. तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसह शिफारस पत्र राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. दिपकभाऊ बोऱ्हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवून त्यांचा जीव वाचवावा, अशी आग्रही मागणी य...

लिंबागणेश येथे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत NCMC ( बस पास) कार्ड नोंदणी शिबिर

Image
लिंबागणेश (दि.२२): राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासातील सवलतींसाठी डिजिटल स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, “एनसीएमसी” (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज, रविवार (दि.२२) रोजी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महामंडळाकडून महिलांना अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तसेच स्वातंत्र्यसैनिक, राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. कार्ड अनिवार्य झाल्याच्या चर्चेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्ती बसस्थानकांवर रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ही धावपळ टाळण्यासाठी लिंबागणेश येथील मारोती मंदिरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड (मूळ प्रत + १ झेरॉक्स) आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पु...