Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; कत्तलखाने व मांस निर्यात बंदीची मागणी

Image
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; कत्तलखाने व मांस निर्यात बंदीची मागणी शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि सामाजिक-धार्मिक सलोखा जपण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन; गोमाता प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : - सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी :- देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक-धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करावे, देशातील सर्व कत्तलखाने टप्प्याटप्प्याने बंद करावेत, विदेशात होणाऱ्या मांस निर्यातीवर संपूर्ण बंदी घालावी तसेच गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्यांची निष्पक्ष अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ८ जून) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक श्री. बाजीराव ढाकणे यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच...

परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील

Image
परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील गुन्हेगारांच्या दहशतीखाली शहर, पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय?;खून, मारामाऱ्या, टोळक्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे सावट परळी | प्रतिनिधी एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या परळी शहराची ओळख आता दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत चालली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परळीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात कायदा संस्थेचे तीन तेरा झाले असून पोलीस प्रशासनाचा कसलेही प्रकारचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या बाबत आपण लवकरच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   ...

पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप

Image
पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप लिंबागणेश (दि. ६) : बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील शेतकरी विश्वंभर मुरलीधर खिल्लारे यांच्या तीन दुभत्या म्हशींचा अवघ्या दोन दिवसांत संशयास्पद मृत्यू झाला असून चौथी म्हैसही मरणासन्न अवस्थेत आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. विश्वंभर खिल्लारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशी आजारी पडताच त्यांनी लिंबागणेश येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करूनही कोणीही तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर त्यांना खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागले. औषधोपचारासाठी सुमारे २० हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्याशी बोलताना विश्वंभर खिल्लारे यांनी तीव्र स...

२५० वर्षांचा वटवृक्ष कोसळला! ‘वडाचे गाव’ ही ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी लिंबागणेशकरांचा निर्धार; वटवृक्षांच्या फांद्यांची लागवड

Image
२५० वर्षांचा वटवृक्ष कोसळला! ‘वडाचे गाव’ ही ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी लिंबागणेशकरांचा निर्धार; वटवृक्षांच्या फांद्यांची लागवड :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश (दि. ६) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरात पूर्वी मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावर वडाची भव्य झाडे दिसली की ‘लिंबागणेश गाव आले’ अशी ओळख होती. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात लिंबागणेश बसस्थानकाजवळील सुमारे २५० वर्षे जुना महाकाय वटवृक्ष कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य आठवणी या वटवृक्षाशी जोडलेल्या होत्या. पूर्वी गावात चार महाकाय वटवृक्ष होते. त्यापैकी आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील एकमेव वटवृक्ष शिल्लक राहिला आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा मानल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या पडझडीमुळे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ‘वडाचे गाव’ ही पुसट होत चाललेली जुनी ओळख नव्याने निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले असून, मोठ्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची स्मशानभूमी, ग्रामपंचायत परिसर आणि बाजारतळ येथे लागवड करण्यात आली. भविष्य...

भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - पुरुषोत्तम वीर

Image
भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - पुरुषोत्तम वीर बीड प्रतिनिधी : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि बहुजन समाजाच्या एकतेच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या "उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद" या महत्त्वपूर्ण परिषदेस बहुजन समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने मराठवाड्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे. ही परिषद दि. 07 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. देशभरात अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत असताना बहुजन समाजाच्या हक्कांवर गदा येऊ नये आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने या संघर्ष परिषदेचे...

बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Image
बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय कामगारांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे, आरोग्य शिबिरे, जन्मदाखले व योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर बीड प्रतिनिधी :- ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, कामगारांच्या सुविधेसाठी तातडीने नवीन कार्यपद्धती (एसओपी) तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ओळखपत्रांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संचलित ऊसतोड कामगार प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय ‘स्थलांतर पूर्व नियोजन’ समन्वय बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त भोगले, जिल्हा आरोग्य अधिकारी गंडाळ, शिक्षणाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, ऊसतोड कामगार कृती समितीचे बाजीराव ढाकणे यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ...

पाटोदा मांजरसुबा मार्गावर रस्त्याला मोठ्या भेगा; टोल वसुलीवर नागरिकांचा संताप, ईश्वर माने यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही ते मांजरसुबा या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वैद्यकिन्ही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची अशी गंभीर अवस्था असतानाही काही टोल/शुल्क वसुली सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास सामाजिक कार्यकर्ते ईश्वर माने यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनीही या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.