Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

के के वाघ विद्याभवनात हनुमान जन्मोत्सव उत्साहात.

Image
 निफाड.ता-२यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक :-.के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथील 'क्रीडा विभागातर्फे' प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी समन्वयक यशवंत ढगे उपमुख्यध्यापिका सुनीता वडघुले,पर्यवेक्षक डि.के मोरे,ज्युनि.कॉलेज प्रमुख बस्तीराम रानडे,जेष्ठ शिक्षक आर.डी. गांगुर्डे,प्रवीण रणदिवे,बाजीराव वाघ,राजेंद्र उगले,मनोज तुसे,संदीप खिस्ते,संजय धनगर,निलेश पाटील,राकेश तोरवणे,अनिल शिंगणकर,अमोल वाघमारे,क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर, शीतल साळी,कांचन सोनार,गायत्री आंबेकर,शारदा पेलमहाले,अश्विनी जावळे, किरण कदम,उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य दिवाकर शेजवळ यांनी रामभक्त हनुमान हे शक्ती आणि बुद्धीची देवता मानले जातात त्यामुळे मारुतीरायाची आराधना करून बळ आणि विद्या मिळवण्यासाठी विद्यार्थी खेळाडू व्यायामाद्वारे व शैक्षणिक पुस्तके वाचून विद्यार्जन करतात.तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेदरम्यान,व्यायाम शाळांमध्ये हनुमानाची सर्वत्र पूजा केली जाते असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी समन्वयक श्री यशवंत ढ...

पाटोदा बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर तोडा;- नगरसेवक संतोष जाधव यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे मोठ्या वाहनांना अडचणी निर्माण होत असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित डिव्हायडर तात्काळ तोडण्याची मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे तसेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीकडे येणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू गाड्यांना वळण घेताना किंवा थांबताना पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, ही वाहने मुख्य रस्त्यावरच उभी राहतात आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. विशेषतः सकाळी व दुपारच्या वेळेत ट्रॅफिकची समस्या अधिक तीव्र होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे

पाटोदा शहरात दहावीपर्यंत एकही जिल्हा परिषद शाळा नाही हे पाटोद्याचे भाग्य की दुर्भाग्य?

पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकही जिल्हा परिषद शाळा उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्य कुटुंबांसाठी शिक्षणाचा आधारस्तंभ मानली जाते. मात्र पाटोदा शहरातच अशी सुविधा नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडत आहे. अनेक पालकांनी शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पाटोदा शहरात दहावीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, शहरातच शासकीय शिक्षणाची सोय नसणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा भाग असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही जणांच्या मते, खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असल्यामुळे शासन जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष करत आहे,असा सवालही उपस्थित केला जात आहे.पाटोदा शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ...

परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लीनिक चे उदघाटन संपन्न

Image
बीड प्रतिनिधी :- दिनांक 31 मार्च 2026 रोजी मौजे मानूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी श्री. ष.ब्र. 108 गुरुविरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते डॉक्टर जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लिनिक चे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.मानूर या ऐतिहासिक नगरीत आणि पुरातन बाजारपेठ असूनही येथे रुग्णाचे हाल होतात येथे दर्जेदार एमेरजन्शी वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने डॉ जितीन वंजारे यांनी येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 31 मार्च रोजी सर्वांच्या उपस्थिती त संजीवनी क्लिनिक चा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानूर नगरीचे जेष्ठ नेते दशरथरावजी वणवे दादा माजी जी प सदस्य यांनी लागेल ते सहकार्य करू, वैद्यकीय सेवा चांगली पुरवा, जास्तीत जास्त वेळ देता येईल हे प्रयत्न करा आणि गावाकऱ्यांची सेवा करा असे आपल्या भाषणात बोलले यानंतर जी प सदस्य रामदास नाना बडे यांनी आपल्या भाषणात डॉ जितीन वंजारे यांना शुभेच्छा दिल्या आणि मानूर नगरीत डॉक्टर ची नितांत गरज आहे, वाटेल ते सहकार्य करू, किफायतशीर दरात योग्य सेवा द्या असे बोलून शु...

हायटेक सिग्नल की हायटेक भ्रष्टाचार ? सुरू होण्यापूर्वीच कोसळले ! बीडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड (दि.०२) : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या गाजावाज्यात बसविण्यात आलेले ६४ लाख रुपये खर्चाचे हायटेक सिग्नल सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका परिसर आणि शिवराज पान सेंटर चौक या चार ठिकाणी प्रत्येकी १६ लाख रुपये खर्चून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र नगर नाका परिसरातील सिग्नल अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले सिग्नल देखभाल अभावी निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल तरी टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आ...

शेती जमिनीवर अतिक्रमणाचा गंभीर प्रकार; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) — संत चोखामेळा सहकारी संस्था मर्यादित, परळी वै. यांच्या मालकीच्या शेती जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सन १९६१-६२ पासून सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेजारील काही व्यक्तींनी बेकायदेशीर कब्जा करून बांधकाम सुरू केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. ४४० मधील मेसाजी आबाजी जगतकर व सिताराम भोजाजी जगतकर यांच्या सुमारे १० गुंठे जमिनीवर उत्तम भिमा राठोड व संतोष नामदेव राठोड यांनी अतिक्रमण करून थेट बांधकाम सुरू केले आहे. संबंधित बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सर्व्हे नं. ४३९ मधील रामकिशन मिराजी जगतकर यांच्या जमिनीवर रमेश उत्तम गित्ते यांनी १० x १०० फुट जागेवर कब्जा करत विहिरीचे साहित्य टाकले आहे. हे साहित्य तातडीने हटवून जमीन मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, सर्व्हे नं. ४३९ मधील लक्ष्मण नारायण जगतकर व रानबा किशन ताटे यांच्या जमिनीवर एका शेजार्याने तब्बल एक ते दीड एकर क्षेत्रावर बांधकाम व तळ्याचे साहित्य ट...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

​माजलगाव (प्रतिनिधी ): माजलगाव तालुक्यातील चाहूरतांडा (तालखेड) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून ज्योती कृष्णा पवार (वय २६) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. ​ ​मयत ज्योती यांचे लग्न २०१८ मध्ये कृष्णा मनोहर पवार याच्याशी झाले होते. फिर्यादी आई संद्राबाई शामराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही वर्षे नीट नांदवल्यानंतर पती कृष्णा हा ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. तसेच "तू रंगाने काळी आहेस, मला आवडत नाहीस" असे म्हणून हिणवत असे. यासोबतच, माहेरून गुत्तेदारीच्या कामासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार यांनी तिला वारंवार उपाशीपोटी ठेवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. ​ ​१२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सासरच्या छळाला कंटाळून ज्योतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिने विष घेतल्याचे समजूनह...