Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे

Image
पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२१) बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्य...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश; राज्य सरकारची सकारात्मक भूमिका : - सौ आशाताई बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक गाव व शहरातील एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमात निमंत्रित करावे आणि त्यांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव व्ही. आर. ठाकूर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांवर सव...

प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान– आ. सुरेश धस

Image
प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान – आ. सुरेश धस आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – महापौर ज्योती गाडे आष्टी | प्रतिनिधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अहिल्यानगर येथे मेघनंद हॉटेल मध्ये दि २० जून रोजी आयोजित ‘महाराष्ट्र आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी भाषणात बोलत होते. पुढे बोलताना आ धस यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात वेळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, प्रत्येकाने आपल्या कार्यात वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. “आज कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही,” असेही त्यांनी नमूद केले.तर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने ...

झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे

Image
मायबाप सरकार प्रकाशदादा, विजयसिंह पंडित राजे चिमुकल्यांवर दया करा..... झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे बीड:- (दि.१९ ) माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील काळेगाव थडी केंद्र टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने सध्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग झाडाखाली भरवले जात आहेत. त्यामुळे मायबाप सरकार माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तातडीने निधी उपलब्ध करून या विद्यार्थ्यांवर उपकार करावेत, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सन १९६३ मध्ये विटा व चुन्यापासून उभारण्यात आलेली शाळेची इमारत आज मरणासन्न अवस्थेत आहे. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून छतावरील पत्रे गंजून गळती होत आहे. सिमेंटचे खपले सतत कोसळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वर्गखोल्यांम...

परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन

Image
परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन पिट लाईन, नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसह विविध मागण्यांचा पाठपुरावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले परळी वैजनाथ रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असूनही अपेक्षित पायाभूत सुविधा आणि रेल्वे सेवांपासून हा परिसर वंचित असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विविध विकासकामांसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतरण, स्थानकावर पिट लाईन मंजूर करणे, तसेच ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पर्यटक माहिती केंद्र उभारणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच म...

सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन

Image
सतत गैरहजर असणारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध आंदोलन करताना . लो ज पा. भीमशक्ती. युवा आंदोलन  बीड : अंबाजोगाई  कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई यांच्या वतीने तालुक्यात अनेक विकास कामे केली जातात या विकास कामांवर अंकुश ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध इंजिनियर चे नियुक्ती केली जाते परंतु संबंधित इंजिनियर गुत्तेदारांची संगणमत करून होणारे विविध कामे निष्कृष्ट दर्जाचे करत आहेत शहरातील अनेक भागात कोट्यावधी रुपयांचे फूटपाथ मंजूर झाले असताना आंबेजोगाई शहरात एकही ठिकाणी फूटपाथ केलेला दिसत नाही विविधअशा अनेक नाल्या या रस्त्यापेक्षा अर्धा ते एक फुटाणे उंच झालेल्या आहेत याचा प्रत्यय आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसात शहराने पाहिला रस्त्याच्या कडेला केलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी न गेल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले . विविध ठिकाणी असे चित्र पाहावयास मिळत आहे आंबेजोगाई शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे कोट्यावधी रुपयांचा फंड वापरून सुद्धा संबंधित क्रीडा संकुल...

‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन

Image
‘काव्यमुदिता’ पुस्तक प्रकाशन सोहळा व मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन (मुंबई, प्रतिनिधी ) पंचपीर ट्रस्ट कार्यक्षेत्र भारत यांच्या वतीने कवी अशोक भवार यांच्या ‘काव्यमुदिता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २१ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता चंद्रमणी बुद्धविहार, आयआयटी मेनगेट, पवई, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत नवनाथ रणखांबे राहणार आहेत. कार्यक्रमास सार्थक साहित्य प्रकाशनच्या संचालिका प्रा. आशा नवनाथ रणखांबे, साहित्यिक भदू जगदेव, पंचपीर ट्रस्टचे संचालक तथा साहित्यिक शाम परशुराम बैसाणे आणि भाऊ पंडागळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत.      पुस्तक प्रकाशनानंतर मानवतावादी निमंत्रित कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून बबन सरोदे, गजानन गावंडे, राजरत्न राजगुरू, किरण सोनवणे, नवनाथ रणखांबे, संदेश कर्डक, के. पुरुषोत्तम, भदू जगदेव, प्रतीक कांब...