Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित

Image
महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर, गोरक्षण आणि सामाजिक कार्याची दखल बीड : मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मराठा साम्राज्य विजय उत्सवा’निमित्त राक्षसभुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राक्षसभुवन लढाई स्मरण सोहळ्यात समाजसेवक स्वपनील वरपे पाटील यांना त्यांच्या सामाजिक व वैचारिक कार्याची दखल घेत ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दि. १० ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवन येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. मराठा साम्राज्याच्या या ऐतिहासिक विजयाची स्मृती आणि मराठ्यांच्या शौर्याची गौरवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी राक्षसभुवन येथे मराठा साम्राज्य विजय उत्सव व लढाई स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याच ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यात स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. बीड ...

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'भिम शक्ती' संघटनेचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'भिम शक्ती' संघटनेचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ​बीड प्रतिनिधी :अल्पसंख्याक व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणि‍क भविष्याशी निगडित विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, यासाठी 'भिम शक्ती' सामाजिक संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत शिफारस करण्याची मागणी करण्यात आली आहे. ​ ​मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ योजना पुनरुज्जीवन: महामंडळांतर्गत बंद असलेली 'एज्युकेशन लोन' (शैक्षणिक कर्ज) योजना आणि अल्पसंख्याक समाजासाठीची 'स्कॉलरशिप' (शिष्यवृत्ती) त्वरित सुरू करावी. तसेच महामंडळाचा बंद केलेला रु. २ कोटींचा निधी पुन्हा सुरू करून वाढीव तरतुदीसह तो प्रत्येक जिल्ह्याला वितरीत करावा. ​ प्रत्येक जिल्ह्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला कामकाजासाठी स्थानिक 'सामाजिक न्याय भवन' मध्ये हक्काची जागा मिळावी. ​ महात्मा ज्योतिबा फुले इतर मागासवर्ग विकास महामंडळाला शासनाकडून पुरेसा व भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता...

'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ' वर्धापनदिनानिमित्ताने बीड शाखेचा गीत जागर कार्यक्रम संपन्न

Image
बीड प्रतिनिधी : - क्रांतिदिनी,९ ऑगस्ट,१९८९ रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापित 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या बीड शाखेने शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा ज्योतिबा फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या शेजारी संघटनेचे पदाधिकारी,समविचारी पक्ष-संघटनेचे प्रमुख,सामाजिक कार्यकर्ते यांनी जनजागृतीचे ,उदबोधक, स्फुर्तीदायी अशी 'चळवळीची गाणी' सामुदायिकपणे गात 'जन जागर अभियान' राबविले.   कार्यक्रमाच्या सर्वप्रथम विवेक वाहिनीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ सविता शेटे,कॉ नामदेव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे, शाखा कार्या ध्यक्ष प्रा विजय घेवारे, व्यसनमुक्ती विभागाचे प्रमुख बाजीराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता प्रभाळे, शुभांगी कुलकर्णी, संपादक शेखर कुमार,कौशल्या बावणे यांनी कृतिशील समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ सविता शेटे, कॉ नामदेव चव्हाण, कॉ डी जी तांदळे, शेखर कुमार यांनी वर्तमानात बोकाळलेली भोंदूगिरी, भ्राम...

नेहा बोरा यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
नेहा बोरा यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने शाईफेक करून विद्यार्थी आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा मनुवादी विचारसरणीचा प्रयत्न; दोषींवर कठोर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. १० )– झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी व अनियमिततेच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा जेएनयूच्या संशोधक नेहा बोरा यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१०) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नेहा बोरा यांच्या समर्थनार्थ तसेच रांचीतील घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही मार्गाने विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रय...

उघड हाथ पाय काढण्याची भाषा करणाऱ्याला अटक कधी, दुबाले याचा जाहीर निषेध-डॉ.जितीन वंजारे

Image
       बीड प्रतिनिधी :- भर मीडिया समोर हाथ पाय काढण्याची खून करण्याची भाषा करणारा पोलीस बॉईज संघटनेचा मोरख्या राहुल दुबाले याला पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मुसक्या आवळा, त्याला अटक करा कारण त्याच्या चिथावणींखोर वक्ताव्यामुळे महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या आणि अभिजित दिपके यांच्या समर्थकांत असंतोषीचं वातावरण तयार झाले आहे.अभिजित दिपके यांच्या घरासमोर हजारो पोलीस आजपर्यंत येऊन गेले वेगवेगळे नेते अधिकारी पदाधिकारी येऊन गेले पोलिसांना चहा नास्ता जेवण पुरवताना अभिजित दिसलं फक्त एक पीएसआय ज्याने भेटायला येणाऱ्या लोकांना अपमानस्पद वागणूक दिल्या कारणाने आणि अभिजित यांना अडवल्याने त्या पी एस आय वर अभिजित दिपके भडकले याचा उहापोह करणारा संधीसाधू पोलीस बॉईज वाला रस्त्यावर उतरू देणार नाही, हाथ पाय काढू अशी भाषा करत आहे.त्याच्यावर योग्य कार्यवाही करून त्याला अटक करा नसता आम्ही रस्त्यावर उतरू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.          पोलीस प्रशासन हे भारतीय न्याय संहितेचे रक्षक असतात स...

सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून मिळतंय तरी काय?; परळी शहरातील स्वच्छतेवरून राष्ट्रवादीचा नगरपालिकेला सवाल

Image
सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून मिळतंय तरी काय?; परळी शहरातील स्वच्छतेवरून राष्ट्रवादीचा नगरपालिकेला सवाल श्रावण सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्ते, फुटपाथ आणि कीटकनाशक फवारणीचा मुद्दा ऐरणीवर परळी प्रतिनिधी : श्रावण महिना सुरू होणार असून परळी वैजनाथ येथे बाहेरगावाहून मोठ्या संख्येने शिवभक्त महिला आणि भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर परळी शहरातील स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या स्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सामान्य माणसाच्या कराच्या पैशातून आम्हाला मिळतंय तरी काय?” असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी उपस्थित केला आहे. परळी शहरातील मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचऱ्याची समस्या दिसून येत असल्याचा आरोप करत, शहरातील एक तरी मुख्य रस्ता पूर्णपणे स्वच्छ आहे का? असा सवाल त्यांनी केला. फक्त एखाद्या घरासमोरचा भाग किंवा एखादा चौक स्वच्छ करून संपूर्ण शहर स्वच्छ झाल्याचा दावा करता येणार नाही. संपूर्ण रस्ता स्व...

बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी

Image
बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी बीड जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन ​बीड प्रतिनिधी : सध्याच्या काळात लहान मुलींवरील लैंगिक शोषणाच्या आणि अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींना आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी महिला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधीसमिती, महाराष्ट्र राज्य,मराठवाडा उपअध्यक्ष आम्रपाली सचिन साबळे यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ​नुकत्याच घडलेल्या नसरापूरसारख्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लहान वयात बालकांना चांगल्या व वाईट स्पर्शातील फरक समजण्याइतपत परिपक्वता नसते. योग्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि भीतीपोटी मुले अशा प्रसंगांना बळी पडतात व घडलेला प्रकार पालकांना सांगू शकत नाहीत. ​कोणतीही अनुचित घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, घटना घडण्यापूर्वीच शालेय स्तरावर सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे...