Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी

Image
बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याची मागणी बीड जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन ​बीड प्रतिनिधी : सध्याच्या काळात लहान मुलींवरील लैंगिक शोषणाच्या आणि अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींना आठवड्यातून एकदा 'गुड टच-बॅड टच'चे प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी महिला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधीसमिती, महाराष्ट्र राज्य,मराठवाडा उपअध्यक्ष आम्रपाली सचिन साबळे यांनी बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ​नुकत्याच घडलेल्या नसरापूरसारख्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लहान वयात बालकांना चांगल्या व वाईट स्पर्शातील फरक समजण्याइतपत परिपक्वता नसते. योग्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि भीतीपोटी मुले अशा प्रसंगांना बळी पडतात व घडलेला प्रकार पालकांना सांगू शकत नाहीत. ​कोणतीही अनुचित घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, घटना घडण्यापूर्वीच शालेय स्तरावर सातत्याने जनजागृती करणे गरजेचे आहे...

पाटोद्यातील इतर सर्व समाज मंदिरांचा जीर्णोद्धार झाला; मग संत सावता महाराज मंदिराला निधी का नाही?

Image
पाटोद्यातील इतर सर्व समाज मंदिरांचा जीर्णोद्धार झाला; मग संत सावता महाराज मंदिराला निधी का नाही? लवकर निधी उपलब्ध करून सावता महाराज मंदिराचा कायापालट करावा – गणेश शेवाळे पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील इतर समाज मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध होऊन विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अद्याप अपेक्षित निधी उपलब्ध झालेला नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.संत सावता महाराज हे कष्टकरी, शेतकरी आणि वारकरी समाजाचे श्रद्धास्थान आहेत. पाटोदा शहरातील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची गरज आहे.पाटोदा शहरातील इतर समाज मंदिरांचा जीर्णोद्धार होत असताना संत सावता महाराज मंदिरही या सुविधांपासून वंचित राहू नये. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गणेश शेवाळे यांनी केली आहे.“संत सावता महाराज मंदिर हे भाव...

११ वी उत्तीर्ण खंडित विद्यार्थ्यांना १२ वीत प्रवेश मिळावा,बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेची मागणी

Image
बीड( प्रतिनिधी ) २०२४ व त्यापूर्वी इयत्ता ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये प्रवेश मिळावा कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार अशी मागणी मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हा यांनी शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे. सन 2024 आणि त्यापूर्वी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांनी मागील वर्षी ऑफलाइन प्रवेश घेतला होता आणि यावर्षीच्या शैक्षणिक वर्ष 26-27 साठी प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉगिन आयडी देऊन सदरील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी परीक्षा देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येऊन विद्यालय व महाविद्यालयास आपल्या स्तरावरून आपण सूचना आदेश निर्गमित करावा याविषयीचे निवेदन मुप्टा शिक्षक संघटना बीड जिल्हावतीने जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा.शशिकांत जावळे, प्रा. रोहित डोंगरे यांनी सादर केले.

उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात सहभागी होण्याचे भाई गौतम आगळे यांचे 59 जातीच्या समाजाला आवाहन

Image
    परळी दि. ८( प्रतिनिधी ) बौद्धांसोबत भांडायची ही वेळ नसून बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढाईची ही वेळ आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव आपल्याला म्हणून पडायचा आहे त्यासाठी ५९ जातीच्या समूहाने आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा हा आपला मोर्चा आहे असे समजून सर्व समाजाने या महामोर्चात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कामगार नेते तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.        आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारचे आहे, आणि ही फूट ५९ जातीच्या समाजासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण यातून समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास जाहीर पाठिंबा देऊन परळी वैजनाथ मध्ये निघणारा 10 ऑगस्ट चा उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा म्हणजे आपला मोर्चा आहे, असे समजून जो येईल त्याला सोबत घेऊन या ! मोर्चात हजारोच्या संख्येने स...

किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त कलाकार ग्रुप बीडच्या वतीने किशोर कुमार की यादे गीतांचा कार्यक्रम

Image
बीड । प्रतिनिधी सिनेमासृष्टीतील महान गायक, संगीतकार, कलाकार किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त दि.9 ऑगस्ट रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कलाकार ग्रुपच्या वतीने किशोर कुमार की यादे नव्या-जुन्या चित्रपट गितांचा कार्यक्रमाचे आयोजन आयोजक बबनराव वडमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचेउद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोकदिशाचे संपादक किशोर कागदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमामध्ये मराठी-हिंदी गीतांचा समावेश असून ेहा कार्यक्रम मोफत आहे तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बबन वडमारे, अ‍ॅड.अविनाश गडगे, डॉ.सुधीर साळवे, राजु जोसेफ, विनोद सवाई, शाम माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा

Image
वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा....  प्रतिनिधी (गेवराई ) गेवराई येथीलडॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बी. पी. मंडल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विजय मंडल दिवस वंचित व ओबीसीच्या वतीने साजरा करण्यात आला  मंडल_आयोग म्हणजे दुसरा मागासवर्ग आयोग 1 जानेवारी 1979 रोजी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मंडल आयोगाची स्थापना केली.  बी. पी. मंडल बिहारचे माजी मुख्यमंत्री. म्हणूनच याला "मंडल आयोग" म्हणतात.   7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये लागू केल्या.     यानुसार केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शिक्षणात OBC साठी 27% आरक्षण सुरू झाले. देशातील इतर मागासवर्ग OBC साठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देणे बंधनकारक झाले.  मंडल आयोग लागू करुन घेण्यासाठी श्रध्येय अॆड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री पदा चा नकार दिला व संसदेत राज्यसभेचे खासदार असतांना पूर्ण ताकद लावली, मंडल आ...

संपादक समीर काझी यांना 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई'चा मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

Image
​ बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक समीर काझी यांना जाहीर झाला आहे. ​पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन संघाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. समीर काझी यांच्या या यशामुळे पत्रकारिता क्षेत्रातून आणि सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.