Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार

Image
जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार बीड, दि. १ एप्रिल (प्रतिनिधी ): राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्ह्याच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, कामगारविरोधी धोरणांचा निषेध करत देशव्यापी ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांना तडा जाईल तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे कामगार वर्गावर अन्याय होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. इंटक च्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.  मुख्य म...

लिंबागणेश येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; भालचंद्र विद्यालयात पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Image
लिंबागणेश(दि.०१ ): गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.०१) बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रूपाली चिटकुलवार यांनी केले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती देशपांडे आणि डॉ. सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीक...

शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा-नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा

Image
शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर रस्ते कामात तत्काळ सुधारणा करा  नवनाथअण्णा शिराळे पाटील यांचा इशारा ​बीड प्रतिनिधी : बीड शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अशोक नगर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी सभापती नवनाथअण्णा शिराळे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने संबंधित गुत्तेदाराला कडक आदेश देऊन हे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्याची मागणी त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या मुख्य रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे.  रस्त्यावर केवळ माती टाकून 'बोगस' काम केले जात असल्याचा आरोप शिराळे पाटील यांनी केला आहे. मातीऐवजी चांगल्या प्रतीचा मुरूम वापरून, त्यावर पाणी मारून बुलडोझरने योग्य पद्धतीने दबाई करण्यात यावी, जेणेकरून रस्ता मजबूत होईल. ​ जुन्या नियोजित सिमेंट रोडची कामेही रखडली असून ती तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात ...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Image
 (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक) नवी दिल्ली, 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम विहित मुदतीत आणि अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे असे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज येथे सांगितले.   श्री बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गाझियाबाद येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली. इंदू मिल स्मारकासाठी तयार होत असलेल्या पुतळ्याच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि कामाच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतला.    पाहणीनंतर महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीवर सविस्तर माहिती दिली. स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य धातूंच्या जागतिक दरात झालेल्या वृद्धीमुळे प्रकल्पाच्या मूळ निविदा दरांमध्ये आणि सध्याच्या वास्तविक खर्चामध्ये तफावत निर्माण झाली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अतिरिक्त निधीची तातडीने तरत...

भगवान महावीर जयंतीनिमित्त पाटोद्यात भव्य रक्तदान शिबीर

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) भगवान महावीर जयंतीच्या पावन निमित्ताने पाटोदा शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, करुणा व सेवाभावाच्या शिकवणीचा जागर केला. “जीवदया हीच खरी सेवा” या संदेशाला अनुसरून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य विभागाच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रक्तदान करणाऱ्या युवकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. रक्तदानानंतर दात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून पाटोदा शहरात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. आयोजकांनी भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाटोदयात विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती मेळावा; गर्भाशय कॅन्सर जनजागृतीनंतर HPV लसीकरणाला सुरुवात

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात  दिनांक 30/ 03/ 2026 रोजी पाटोदा शहरातील प्रियदर्शिनी माध्यमिक कन्या शाळा व वसंतराव माध्यमिक शाळा येथे विद्यार्थिनी व पालकांसाठी भव्य आरोग्य जनजागृती व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आठवी ते नववीच्या वर्गातील मुलींसह त्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.हा कार्यक्रम डॉ.नरेशजी कासट THO पाटोदा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सखोल माहिती देण्यात आली. विशेषतः वय वर्ष 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी HPV लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. समुपदेशक चव्हाण यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले व आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.या कार्यक्रमात TNO दराडे मॅडम यांची उपस्थिती विशेष ठरली. दराडे मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच पालकांनाही ...

लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी

Image
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी सौर कुंपण योजना सरसकट लागू करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.३१ ) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. “ रात्री पाणी देताना जीव धोक्यात” – रामदास मुळे (नुकसानग्रस्त शेतकरी) सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका यांसारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते...