Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव

Image
संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव  संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते- सुरेश महाराज जाधव  श्रीक्षेत्र बेलेश्वर अधिकमास उत्सव.. कीर्तनाला हजारो भाविकांची गर्दी.. संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते- श्री ह भ प सुरेश महाराज जाधव लिंबागणेश- (१३ ) संत ईश्वर भारती महाराज यांच्या समाधीच्या सेवेने देवप्राप्ती होते. संतांच्या दरबारात सेवा करण्याचे भाग्य पूर्व पुण्याईने मिळते. अधिकमासात संतांच्या दरबारात केलेली सेवा दुप्पट फळ देते.असे प्रतिपादन श्री ह भ प सुरेश महाराज जाधव यांनी केले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सहाव्या दिवसाचे किर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज भारती श्री ह भ प महंत तुकाराम महाराज भारती, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे,श्री ह भ प बबन महाराज मंजरीकर, श्री ह भ प तुपे महाराज, बबन महाराज, यांच्यासह हजारो भावीक भक्तांची उपस्थिती होती....

घोटी येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा राज्यस्तरीय अभ्यास वर्ग

Image
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ गायकर यांजकडुन    ग्राहक हक्क, ग्राहक संरक्षण कायदे तसेच विविध शासकीय सेवांबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन शनिवार, १३ जून रोजी सिन्नर फाटा येथील मातोश्री हॉस्पिटल सभागृहात करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच , , ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष , राज्य सचिव , जिल्हाध्यक्ष , जिल्हा पुरवठा अधिकारी, आजी -माजी आमदार यांच्यासह ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, संघटक, सचिव, जिल्हा सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अभ्यास वर्गामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, लोकसेवा हक्क कायदा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध, सार्वजनिक वितरण व्यवस्था, ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, सदस्य, व्यापारी, सामाजिक कार्यकर...

देवाभाऊंचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन

Image
देवाभाऊंचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन : डॉ.गणेश ढवळे बीड:-( दि. १२ ) : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेली योजना असुन या योजनेतील त्रुटी दूर करून सर्व पात्र व अपात्र शेतकऱ्यांना समान न्याय देत सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१२ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "गाजर वाटप" करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. शासनाच्या सद्यस्थितीतील कर्जमाफी योजनेत अनेक अटी व निकष घालण्यात आले असून त्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनेक गरजू व कर्जबाजारी शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे किंवा अटींची पूर्तता न झाल्यामुळे कर्जमाफीपासून दूर राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून शासनाने...

फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी

Image
फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी पाटोदा (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. "फडणवीस सरकार मुर्दाबाद", "शेतकरी विरोधी सरकार हाय हाय", "संपूर्ण कर्जमाफी द्या", "शेतकरी एकजूट जिंदाबाद" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अपुरी, दिशाभूल करणारी व लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे उपाध्यक्ष ...

बांधावर खताचां फज्जा ? चढया दराने विक्री व अन्य मालाची सक्ती ?आता तरी कारभार सुधरणार का ?

Image
नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन -   शेतकर्यानां खते बांधावर देण्याची सवंग घोषणा झाली खरी,पण या घोषणेला प्रशासनाने फारसे गांभीर्याने न घेतल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. गंमत म्हंणजे खते बांधावर तर जाऊ दया खत विक्री दुकानातही वेळेवर मिळत नाही. मिळाले तरी चढया भावाने विक्री होते. शिवाय त्या बरोबर इतर अनावश्यक सामुग्रीही लादली जाते.यंदा खरीप हंगामाचे तोंडावर तरी या कारभारात सुधारणा होणार का असा सवाल नागरीक करत आहे.   आम्ही शेतकर्याचे सरकार आहोत. शेतकरी हितासाठीच राबतो आहोत असा दावा सत्तेवरील हर एक सरकार करत असते खरे, मात्र अंमलबजावणीत कुचराई होत असल्याने शेतकरी हिताचे निर्णय, घोषणा कागदावरच राहतात हा नेहमीचा कटु व वास्तव अनुभव आहे.   असाच एक निर्णय म्हंणजे खते बांधावरच दयायची घोषणा करणेत आली होती.या घोषणेचा पुर्णत; फज्जा उडाल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.   बांधावर तर जाऊ दया, पण प्रत्यक्ष खत विक्री केंद्रावर ही शेतकर्याची सर्रास अडवणुक केली जाते.   नियमीत दरापेक्षा चढया दराने विक्री होत असुन, याच बरोबर अनावश्यक माल घेण्याचीही सक्ती केली...

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत

Image
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत  लिंबागणेश:- (दि.११ ) अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात "आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा" या घोषणेसह सुरू झालेल्या बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे गुरुवारी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दि. १० जून रोजी बीड येथून प्रारंभ झालेला हा लॉंग मार्च २६ जून रोजी मुंबई येथे पोहोचणार आहे. निळ्या झेंड्यांचा महासागर, संविधान संरक्षणाच्या घोषणा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा निर्धार यामुळे या मार्चकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता हा मार्च लिंबागणेश येथे दाखल झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायी लॉंग मार्चमधील सहभागी आंबेडकरवादी अनुयायांचे आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सुवासिनींनी सहभागी भीमसैनिकांचे औक्षण केले. ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सिद्धार्थ शिनगारे...

परळीत हिटलरशाहीचा कारभार?पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी?

Image
परळीत हिटलरशाहीचा कारभार? पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी? पत्रकारांच्या हक्काच्या ६० गुंठे जागेवर डल्ला टाकण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांकडे दाद मागणार – दीपक देशमुख परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी नगरपालिकेच्या कारभारात लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीचेच वर्चस्व वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जागेवर नमो उद्यान उभारण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांच्या हक्काच्या जागेची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी नंदागौळ रोड परिसरातील संबंधित जागेवर प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, आत्मलिंग शेटे, धीरज जंगले, बाबा शेख, धनंजय अरबुने, संतोष जुजगर, प्रल्हाद कडुकटले, बालाजी ढगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीब रॉय, संदीप मस्के, बालाजी जगतकर, गौतम आगळे, पद्माकर भंडारे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या हितासाठी जागेचा वापर? परळीचे विद्यमान...