Posts

Showing posts from February, 2026

लिंबागणेश भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड; ग्रामस्थांकडून हृद्य सत्कार

Image
लिंबागणेश भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड; ग्रामस्थांकडून हृद्य सत्कार लिंबागणेश (दि.०२ ): बीड तालुक्यातील लिंबागणेश गावचे भुमिपुत्र डॉ. विशाल मुळे यांनी एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर एम.डी. (फार्माकोलॉजी) अभ्यासक्रमासाठी निवड मिळविल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वडील कल्याण,आई मीरा मुळे यांचा सहकुटुंब हृद्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.गणेश ढवळे यांनी केले.यावेळी माजी सरपंच बाळासाहेब मुळे,कृष्णा पितळे,पोहे.परमेश्वर तागड, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांची समायोजित भाषणे झाली. शेतकरी कुटुंबातील डॉ. विशाल मुळे यांचे शालेय शिक्षण लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालय, लिंबागणेश येथे झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून एमबीबीएस पदवी संपादन केली. पदवी शिक्षणानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दोन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. आता त्यांची एम.डी. (फार्माकोल...

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा उर्स( संदल)निमित्त बैठकीचे आयोजन

Image
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा उर्स( संदल)निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते  सर्व मताने सैलानी बाबा संदल अध्यक्षपदी ::प्रथमेश आत्माराम वाघमारे  उपाध्यक्षपदी:: अमोल अचित सोनवणे सचिव:: प्रशांत बबन सोनवणे  कोषाध्यक्षपदी:: पंकेश विश्वास सोनवणे  खजिनदार:: अंकुश (तात्या )सोनवणे  निवड करण्यात आली आहे यावेळी  मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे बापू पवार स्वप्निल सोनवणे  शैलेश सोमीनाथ सोनवणे रवी सोनवणे आकाश सोनवणे किरण कुचेकर शंकर सोनवणे मया गायकवाड किशोर कुचेकर  चौसाळा येते सैलानी बाबा संदल निमित्त शोभेची दारू आणि बँड चे सामने कुस्त्या आणि दरवर्षी प्रमाणे पार पडतो सर्व गावकऱ्यांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा सैलानी बाबा संदल कमिटीची विनंती

अनंत इंगळे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Image
अनंत इंगळे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान सामाजिक कार्याची दखल; मान्यवरांच्या हस्ते सन्मान परळी (प्रतिनिधी ) – राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार नगरसेवक अनंत इंगळे यांना प्रदान करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना समर्थचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. अनंत इंगळे हे सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, सर्वसामान्य व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. आर्या तशाराच्या चळवळीत सक्रिय सहभाग, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार आणि नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते भीम महोत्सव व अशा अनेक समाज उपयोगी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. समाजहितासाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत सन्मान करण्यात आल्याने परळी शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. प्राचार्य...

"सत्य" परेशान हो सकता है, लेकिन "पराजित" नाही —अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त— माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड

Image
"सत्य" परेशान हो सकता है, लेकिन "पराजित" नाही —अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त — माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड बीड (प्रतिनिधी): “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही,” असे भावनिक उद्गार आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी व्यक्त केले. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सत्य कधीच पराजित होत नाही, अखेर सत्य समोर आले आणि न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष मुक्ततेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात आम आदमी पार्टीच्या वतीने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चौकामध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, जिल्हा कमिटी सदस्य माऊली शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, तालुकाध्यक्ष आजम खान, शेतकरी संघटना पदाधिकारी कुलदीप करपे सो किस्किंदाताई पांचाळ सामाजिक कार्यकर्त्या राजेंद्र आमटे शेतकरी हक्क मो...

दारुड्यांनी पोलिस जीपला दिली धडक; वाहन थेट शेतात कोसळले – ४ ते ५ पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी

Image
दारुड्यांनी पोलिस जीपला दिली धडक; वाहन थेट शेतात कोसळले – ४ ते ५ पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी लिंबागणेश येथील घटना; पुढील तपास सुरू बीड (दि. २८ ): अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे काल (दि.२७) रात्री साडेअकराच्या सुमारास अपघाताची घटना घडली. भायाळा येथील स्कॉर्पिओ (क्र. एमएच २० बीएन १५६५) या वाहनाने जामखेड येथील पोलिसांची जीप (क्र. एमएच १६ डीजी ६०८१) हिला पवार वस्ती जवळ पाठीमागून जोरदार धडक दिली. सदर पोलिस जीप बीड येथील कारागृहात आरोपीला पोहोचवून परत जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर पोलिसांचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कोसळले. या अपघातात जीपमधील ४ ते ५ पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले भाऊराव शिंदे व विक्रांत वाणी यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, पोलिस जीपला धडक देणाऱ्या स्कॉर्पिओमधील चार ते पाच जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. घटनेनंतर नेकनूर व पाटोदा येथील पोलिस प्रशासनाने रात्रीच घ...

चांदापुर येथे ७ मार्च शनिवार रोजी १२ व्या धम्म परिषदेचे आयोजन

Image
चांदापुर येथे ७ मार्च शनिवार रोजी १२ व्या धम्म परिषदेचे आयोजन धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन परळी (प्रतिनिधी ) परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी बाराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या हस्ते होत असलेल्या धम्म परिषदेत तर विशेष अतिथी म्हणून पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो (संचालक, द ग्रेट हॅपिनेस चॅनल, छत्रपती संभाजीनगर), पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव, अहमदपुर), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर) पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली, बीड) आणि पुज्य भिक्खू धम्मसार (किल्लारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त उपासकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धम्म परिष...

शिवजयंतीनिमित दिव्यांग विद्यार्थ्याना मिष्ठान्न भोजन व ब्लॅकेटचे वाटप

Image
शिवजयंतीनिमित दिव्यांग विद्यार्थ्याना मिष्ठान्न भोजन व ब्लॅकेटचे वाटप गेवराईत अनावश्यक खर्चाला फाटा देत छावा सेनेचा स्तुत्य उपक्रम सखाराम पोहिकर बीड जिल्हाप्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मतिमंद निवासी विद्यालयात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत दिव्यांगा विद्याथ्र्याना मिद्यार्ध्या ना मिष्टान्न भोजन तसेच ब्लॉकेटचे वाटप व मोफत आरोग्य तपासणी करून सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली . या स्तुल्य उपक्रमाबद्दल छावा क्रांतीवीर सेतेचे उपस्थित मान्यवरांसह आदीकडून कौतूक केले जात आहे . तर प्रत्येक महापुरूषांची जयंती अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमाने साजरी केली पाहिजे असे आवाहनही यावेळी करण्यात आले . यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर गेवराई पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर पवार . गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप . छावाचे प्रदेश सरचिटणीस अनिल राउत . सपोनि संतोष जंजाळ . पोउनि बोडखे . छावा सेनेचे . भगवान सोरमारे . ज्ञानेश्व...

पाटोदा नगरपंचायत प्रशासनाविरोधात नवनाथ जावळे यांचा एल्गार; चौकशी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत नवनाथ जावळे यांनी दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी निवेदन सादर केले असून प्रशासनाविरोधात गंभीर आणि थेट आरोप केले आहेत 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व मुद्यांवर ठोस कारवाई न झाल्यास दि. 02 मार्च 2026 रोजी आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे.निवेदनात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाचे मागील दहा वर्षांपासून वेतन रोखून ठेवण्यात आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वार्ड क्र. 12 मध्ये नागरिकांची कोणतीही मागणी नसताना रस्ते व स्वच्छ पाणी योजनांच्या नावाखाली बोगस कामे राबविण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करत त्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मंगेवाडी येथे सर्व गावकऱ्यांना नगरपंचायतीमार्फत नळजोडणी देण्यात आली; मात्र आपण एकमेव मागासवर्गीय असल्याने जातीय आकसातून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप जावळे यांनी केला आहे. हा प्रकार सामाजिक समतेला क...

मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या हस्ते ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Image
उदगीर /प्रतिनिधी   उदगीर मध्ये एप्रिल या महिन्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन होत असून या ठिकाणी एक संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे  मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.  याबाबत अधिक वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी  एप्रिलच्या तिस-या आठवड्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला 2500 पत्रकार उपस्थित राहतील.त्यादृष्टीनं नियोजन करण्यात येत आहे. या तयारीची पाहणी करण्यासाठी नुकतेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर हे उदगीर मध्ये होते. तयारीच्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी असलेल्या अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्याच बरोबर शहरात नव्याने 44 व्या अधिवेशनाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन श्री.एस.एम.देशमुख यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीचं केंद्र असलेल्या उदगीर शहरात परिषदेचं हे अधिवेशन नक्की यशस्वी हो...

NMMS परीक्षेच्या निकालात लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालय अग्रेसर; २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र, सत्कार समारंभ उत्साहात

Image
बीड प्रतिनिधी ( दि.२६ )भारत सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship (NMMS) परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यान दरवर्षी ₹१२,००० म्हणजेच दरमहा ₹१,००० शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार,...

कु. प्रणया रोडे हिचे NMMS परीक्षेत नेत्रदीपक यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली कामगिरी

Image
परळी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षेत कन्हेरवाडी (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील सोमनाथ विद्यालयाची प्रज्ञावंत विद्यार्थीनी कु. प्रणया लहुदास रोडे हिने उल्लेखनीय यश संपादन करत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. NMMS ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने सन 2007-08 पासून दरवर्षी घेतली जाते. आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना इयत्ता 12 वीपर्यंत शिक्षणासाठी दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींवर मात करत शिक्षणाची वाट अधिक आत्मविश्वासाने चालता येते. इयत्ता 8 वीतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत कु. प्रणया हिने विशेष प्राविण्य मिळवत आपल्या शाळेचा व गावाचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशाबद्दल सोमनाथ ...

बड्या प्रकल्पांचा मुंबई महापालिकेवर बोजा,ठेवी मोडण्याची वेळ

Image
यूसूफ पठाण प्रतिनिधी  मुंबई प्रतिनिधी :पालिकेच्या मोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी २ लाख ४४ हजार कोटींच्या पुढे गेली असून, येत्या आर्थिक वर्षात ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरित दायित्वे पुढील चार-पाच वर्षांत महापालिकेला द्यावी लागणार आहेत. पालिकेच्या एकूण मुदत ठेवी जानेवारी २०२६ अखेरीस ८१ हजार ४४९ कोटींपर्यंत असून त्यातील २८,०६० कोटी या करता वापरले जाणार आहेत. त्यापैकी १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत, तर १४,२९५ कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प बुधवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीला सादर केला. या प्रकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीच्याच प्रकल्पांची प्रचंड देणी पालिकेवर असून या कर्जाच्या ओझ्याखाली मुंबई महापालिका दबली असल्याचेच चित्र आहे. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे, पुलांची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देख...

वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ बीड येथे लक्ष्यवेधी आंदोलन

Image
वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ बीड येथे लक्ष्यवेधी आंदोलन “चला कागदोपत्री झाडे लावूया आणि विश्वविक्रम करूया” – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२६ ):बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि.२६ रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावूया आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. निवेदन जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले,शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), सय्यद सादेक...

प्रसिद्ध ढोलकी वादक नितीन प्रधान यांना सर्वोत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर

Image
​बीड प्रतिनिधी : रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा 'सर्वोत्कृष्ट कलावंत' पुरस्कार नामांकित ढोलकी वादक नितीन प्रधान यांना जाहीर झाला आहे. त्यांनी आजवर कलेच्या क्षेत्रात केलेली प्रदीर्घ सेवा आणि ढोलकी वादनातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येत आहे. ​या निवडीबद्दल कलाक्षेत्रातून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे देण्यात येणार आहे, ​रयत सामाजिक प्रतिष्ठान आणि समस्त कलावंतांच्या वतीने नितीन प्रधान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. शुभेच्छा देण्यात येत आहेत.

आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करावा – मनोज जाधव यांची मागणी

Image
आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करावा – मनोज जाधव यांची मागणी पोद्दार शाळेचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करावा - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि त्यानंतर निर्णय रद्द झालेल्या ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, शिक्षण मंत्री ,तसेच प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, काही शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. संबंधित शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाबाबत यापूर्वीच स्थगिती असतानाही काही तासांत प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची दखल घेत माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित निर्णयास स्थगिती दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांकडून अर्ज सादर केले जात आहेत. मात्र, न...

नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे

Image
नगर नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर अपघात वाढले,स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत- नितीन सोनवणे.   बीड प्रतिनिधी : शहरातील नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान नुकतेच नवीन सिमेंट रोड झाल्याने वाहनांचा वेग धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. डिव्हायडर नसल्यामुळे मोटरसायकलस्वार रॉंग साईडने धावत असून, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तहसील कार्यालय आणि जिल्हा न्यायालय या महत्वाच्या ठिकाणांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.टू-व्हीलर, फोर-व्हीलर तसेच मोठे ट्रक्स सुसाट वेगाने धावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः जिल्हा न्यायालय परिसरात वर्दळ जास्त असल्याने अनेक अपघातांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. त्यात नगर नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या संपूर्ण रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. स्पीड ब्रेकर हे वाहनांचा वेग नियंत्रित करण्याचे प्रभावी साधन आहे. योग्य ठिकाणी बसवलेले स्पीड ब्रेकर...

अरहान आरेफ बागवान या बालकाच्या जीवनातील पहिला रोजा पुर्ण

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई पोलिस स्टेशनचे कर्तव्य पार पाडणारे आरेफ बागवान यांचा मुलगा अरहान बागवान याने वयाच्या ७ व्या वर्षी आपल्या जिवनातील पहिला रोजा पुर्ण केला आहे . एवढ्या कमी वयात रोजा पुर्ण केल्याबद्दल अरहान बागवान यांचे बागवान बिरादरी व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे . अरहान बागवान ने एवढ्या कमी वयात त्यांच्या जिवनातील पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल या बालकाचे बागवान परिवारातर्फे व मित्र परिवाराकडून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षेव होत आहे व पुढील जिवनात आसाच धार्मिक कार्यात आग्रेसर राहो हिच आपेक्षा तुझ्याकडून आम्ही बाळगतो

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा इंटककडून तीव्र निषेध - रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

Image
बीड प्रतिनिधी  : पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रानंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने मा. गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. इंटकचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. माध्यमांवर चर्चा करून राजकीय भूमिका मांडणे हा गुन्हा ठरू शकत नाही. अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यावर हल्ला करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असून ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लोकशाही पद्धतीने मतभेद व्यक्त करण्याऐवजी हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे ही गंभीर बाब आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इंटकच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत— संबंधित हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ गुन्हा...

बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Image
बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन; पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन बीड (प्रतिनिधी ) दि.२५ : तालुक्यातील नवगण शिक्षण संस्था संचलित सैनिकी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता ६ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे. यानिमित्त प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ.व्ही.टी.देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार, उपप्राचार्य रविंद्र झोडगे, राजकुमार ससाणे, गणेश निर्मळ, शिवाजी सोनवणे व मेघराज कोल्हे उपस्थित होते. इयत्ता ६ वीसाठी खुली तुकडी ४५ व आदिवासी तुकडी ४५ अशा एकूण ९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश पूर्व निवड प्रक्रिया इयत्ता ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेद्वारे होणार असून पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल....

एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा

Image
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा परिवहन विभाग व राज्य शासनाने चुकीचे आर्थिक घोरण बदलावे  बीड | प्रतिनिधी   महाराष्ट्राची व ग्रामिण व्यवस्थेची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाबाबत (एसटी) सुरू असलेल्या निर्णय प्रक्रियेवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिलांचे अर्धे तिकीट आणि 75 वर्षांवरीील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी मोफत प्रवास सुविधा बंद करण्याचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाये यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. “एसटी तोट्यात असेल, तर त्याला सामान्य जनता जबाबदार नाही. चुकीची आर्थिक धोरणे, व्यवस्थापनातील त्रुटी आणि मेंटेनन्समधील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार हेच खरे कारण आहे. सवलती बंद करून सरकार स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून ग्रामीण महाराष्ट्राचा श्वास असल्याचे सांगत नितीन जायभाये म्हणाले, “शेतकरी, कामगार, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि विशेषतः माता-भगिन...

बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे

Image
बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे. आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी. बीड जिल्हा वकील संघ उद्या कामबंद ठेवणार. बीड | प्रतिनिधी बीड जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला व मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत बीड जिल्हा वकील संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वकील संघात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, वकील बंधू तसेच महिला वकील भगिनी यांनी एकत्र येत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन सादर केले. न्यायालयीन परिसरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वकील संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, जो पर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून ...

चौसाळा येथील हजरत सैलानी बाबा संदलच्या अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर सचिवपदी प्रशांत सोनवणे

Image
(बीड प्रतिनिधी )प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बीड तालुक्यातील चौसाळा येथील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत सैलानी बाबा संदल निमित्त शासकीय विश्रामगृह चौसाळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रथमेश वाघमारे तर उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे व सचिवपदी प्रशांत सोनवणे तर खजिनदार म्हणून अंकुश(तात्या )सोनवणे यांची निवड करण्यात आली या बैठकीस बापू पवार,ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे,विशाल सोनवणे, शैलेश सोमीनाथ सोनवणे, आकाश सोनवणे, रवी सोनवणे, दादू गायकवाड, धर्मा सोनवणे, प्रेम गायके, विशाल काळे, साहील सोनवणे इत्यादी उपस्थित होते तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर, पञकार पंडित जोगदंड, पञकार मिराज मुलानी, पञकार बळीराम राऊत,पञकार ख्वाजाभाई जहागिरदार यांची निवड करण्यात आली.

रांची-दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात

Image
(यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव )   झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या झालेल्या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्तांनी पीटीआयला दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सला अपघात झाला. रांची येथून उड्डाण घेतल्यानंतर काहीकाळ हे चार्टर विमान रडारवरुन गायब झाले होते. दरम्यान, काही वेळानंतर त्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. बेपत्ता झाल्यानंतर लगेच अपघात रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडार दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते दरम्यान, आता सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उपायुक्तांनी काय माहिती दिली? चतरा उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला अपघाताबाबत माहिती दिली. 'एअर अ‍ॅम्ब्युल...

पायाभूत सुविधा, गुंतवणुकीवर भर; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन

Image
पायाभूत सुविधा, गुंतवणुकीवर भर; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचे प्रतिपादन. (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव) मुंबई प्रतिनिधी :राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 'व्हिजन मॅनेजमेंट युनिट'ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सरकारचा भर असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी सांगितले.  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाद्वारे झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी सरकार वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक...

हृदय पिळवटून टाकणारी घटना; रस्त्याच्या कडेला सापडलेल्या अनाथ तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू

Image
हृदय पिळवटून टाकणारी घटना; रस्त्याच्या कडेला सापडलेल्या अनाथ तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू जिव्हाळा परिवार व शहर पोलिसांची तत्पर धाव; शेवटच्या क्षणीही नातेवाईकांचा आधार नाही बीड | प्रतिनिधी शहरातील भाजी मंडई परिसरात सोमवारी (दि. 23/02/2026) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाचा एक अनोळखी तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत पडलेला असल्याची माहिती जिव्हाळा परिवाराला फोनद्वारे मिळाली. “लवकर या, उपचार मिळाले नाहीत तर तो वाचणार नाही,” असा आर्त संदेश मिळताच जिव्हाळा परिवाराचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. वेळ न दवडता शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्परता दाखवत पोलीस हवालदार गर्जे यांना घटनास्थळी पाठवले. उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्या तरुणाला रिक्षामधून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या तरुणाची ओळख पटू शक...

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
लिंबागणेश:- ( दि.२४ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दि.२४ वार मंगळवार रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूर्या नेत्रालय येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अंजली गायकवाड यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. गणेश ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्म्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच डोळ्यांच्या विविध समस्यांचे निदान करून रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली चिटकुलवार, डॉ. ऋषिकेश आंधळे, डॉ. प्रमोद गोरे (सीएचओ, बोरखेड), आरोग्य निरीक्षक अशोक लोखंडे, आरोग्य सेवक वीर सापते, प्रयोगशाळा तज्ञ ऋषिकेश शेळके, औषध निर्माता जे. एस...

विस्तारित कार्यकारिणी सभेत संघटन बळकटीवर भर- डॉ.कैलास भाऊ कदम महाराष्ट्र इंटक प्रदेशाध्यक्ष

Image
मुंबई (प्रतिनिधी ) – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य यांची विस्तारीत कार्यकारिणी सभा रविवारी दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मामा फाळके सभागृह, मजदूर मंजिल, परेल, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. यावेळी सरचिटणीस मा. गोविंद मोहिते, चिटणीस मुकेश तिगोटे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनीही सभेला उपस्थित राहून जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. या बैठकीत राज्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या, नव्या कामगार कायद्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, वेतनवाढ, सामाजिक सुरक्षा योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. कैलास कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कामगार हक्कांच्या संरक्षणासाठी एकजू...

आवकाळी पावसाचा तडाखा; रामपुरीत ज्वारीचे पिके भुईसपाट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Image
आवकाळी पावसाचा तडाखा; रामपुरीत ज्वारीचे पिके भुईसपाट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  नुकसान भरपाई चे तात्काळ पंचनामे करा - विश्वनाथ शरणागत बीड | प्रतिनिधी गेवराई तालुक्यात आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आवकाळी पावसासह जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे मौजे रामपुरी येथील शिवारात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रामपुरी येथील लिंबाजी रामभाऊ मस्के यांच्या शेतात प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, भरघोस उभे असलेले ज्वारीचे पीक वादळाच्या तडाख्याने जमिनीवर कोसळलेले दिसून आले. काही ठिकाणी संपूर्ण शेती आडवी झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रामपुरी हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. यापूर्वी गोदावरीच्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र त्या वेळीही महसूल प्रशासनाकडून योग्य पंचनामे करण्यात आले नाहीत किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, अशी तीव...

चौसाळा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

Image
(बीड प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते पप्पू पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर ढोकणे, ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम जोगदंड, चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर,शिवाजी जोगदंड, संभाजी जोगदंड, लखन जोगदंड, दादाराव ढोकणे,इसाक सय्यद, महेश पवार, आप्पा नाईकवाडे इत्यादी उपस्थित होते.

महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा !जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

Image
लोकशाही वाचवा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या  महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन   बीड (दि.२३) – बीड शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब व उघड्यावरील रोहित्रांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, तसेच महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गोरे वस्ती येथील १५ वर्षीय आवेज परवेज शेख याचा विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी “आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या!”, “लोकशाही वाचवा!” अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस,मुबीन शेख, शेलार शिवशर्मा,माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी प...

माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाचा दणका- ॲड.सदानंद वाघमारे

Image
माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाचा दणका- ॲड.सदानंद वाघमारे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा पारदर्शकतेला नकार. आयोगाचे 30 दिवसांत माहिती द्या अन्यथा कारवाई! बीड प्रतिनिधी : राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र यांनी माहिती अधिकार प्रकरणात महत्त्वाचा आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांना 30 दिवसांच्या आत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच माहिती देण्यात टाळाटाळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मिळालेल्या आदेशानुसार, दुसरे अपील क्र. 2992/2025 संदर्भात सुनावणी पार पडली. अपीलार्थी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 19(3) अंतर्गत अपील दाखल ॲड.सदानंद वाघमारे यांनी दाखल केले होते. या प्रकरणात संबंधित जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी नियमानुसार माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. सदर प्रकरणात अपीलार्थी यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नावानिशी उपस्थिती व रजा नोंदीची माहिती मागितली होती. मात्र निर्धारित कालावधीत माहिती न दिल्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा भंग झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आ...

प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे

Image
प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या पुढाकारासह अशोक वीर यांच्या पाठपुराव्याला यश बीड (प्रतिनिधी ) – बीड शहरातील इमामपूर रस्त्यावरील प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनी परिसरातील प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांच्याकडे कैफियत मांडली होती. या मागण्यांना त्यांनी तात्काळ प्राधान्य देत मुख्याधिकारी (सीओ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विषयावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार वॉर्ड क्र. २६ मधील बार्शी रोड ते इमामपूर रोड जोडणाऱ्या सुमारे ६०० मीटर रस्त्याचे डांबरी/सिमेंट काँक्रीट बांधकाम, नाली व सार्वजनिक सुलभ शौचालय उभारणीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.  बहिरवाडी चे माजी सरपंच तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारणीचे प्रणेते अशोक वीर यांनी या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराला यश आल्याने परिसरा...

बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न

Image
बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न बीड | प्रतिनिधी सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय, बीड येथे स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब मुंडे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पांडुरंग सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृत्वाचे महत्त्व, संस्कारांची परंपरा आणि शिक्षणाची गरज यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली. या सोहळ्यात सौ. सविता मोहनराव रणदिवे (अकलूज) व सौ. कांता संतोष सोनवणे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सौ. मीनाक्षी भास्कर वडमारे, श्रीमती सविता मनोहर पंडित आणि सौ. शकुंतला किसन शीलवंत यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांच्या टाळ्यां...

बीडमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचा उत्साह; भव्य रॅलीने शहरात स्वागत

Image
​बीड प्रतिनिधी : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे आज बीड शहरात आगमन झाले. या निमित्ताने आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ​ शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये हजारो निष्ठावान भक्त आणि भाविक सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग जालना रोड श्री संत सेवालाल महाराज चौक' मार्गे 'कॅनॉल रोड' असा निश्चित करण्यात आला.   बीड शहर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग नोंदवला.  'जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज की जय' च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ​पादुका दर्शनासाठी प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून, दिवसभर दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

लिंबागणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Image
लिंबागणेश (दि. २१ ): महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी घटना चिखला गाव येथे घडली असून शिवस्मारक उभारणीच्या वादातून मराठा समाजातील बांधव व महिलांवर दगडफेक व अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेत संजीवनी वाघ यांच्यासह अन्य महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. स्त्रीसन्मान व न्यायाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या विचारांना ही घटना काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी केली. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून प्रशासनाने निष्पक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थितांना संयम राखत लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच बालासाहेब जाध...

जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदबहुजन समाजाच्या एकतेचा, प्रबोधनाचा आणि धम्मदीक्षेचा भव्य सोहळा

Image
परळी (प्रतिनिधी ): ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर, ता. धारूर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क परिसर, जवळा फकीर येथे होणाऱ्या या धम्ममय सोहळ्यास बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रा. खेमधम्मो (मुळावा) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पूर्णा) राहणार आहेत. ध्वजारोहणाचा मान डॉ. प्रा. भदन्त एम. सत्यपाल महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) यांना मिळणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पु. भदन्त डॉ. इंदवंश महाथेरो (कुशीनगर, उत्तर प्रदेश), भदन्त मुदितानंद महाथेरो (परभणी), भदन्त पय्याबोधी थेरो (नांदेड), भदन्त पय्यानंद थेरो (लातूर) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच भदन्त धम्मसार थेरो (किल्लारी), भदन्त सुभूती थेरो (नांदेड), भदन्त धम्मशील थेरो (बीड), भदन्त नागसेन बोधी (उदगीर) आदी भन्ते या परिषदेत मार्गदर्शन...

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा २१ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये

Image
बीड (प्रतिनिधी ) : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे भव्य दर्शन सोहळा शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीड–जालना रोड, श्री संत सेवालाल महाराज चौक, कॅनॉल रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. रामानंद संप्रदायाच्या वतीने देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, या कार्याची व्याप्ती व्यापक आहे. संस्थानमार्फत राष्ट्रीय महामार्गांवर ५४ विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. व्यसनमुक्ती अभियानातून लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे. याचबरोबर दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या १५ दिवसांच्या कालावधीत संप्रदायाच्या माध्यमातून १ लाख ७१ हजार १५० रक्तकुप्यांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आले, जो एक विश्वविक्रम मानला जात आहे. तसेच १३३ अवयवदान आणि १७९ देहदान विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. “पाणी अडवा, पाणी जिरवा” उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ४५९८ कच्चे बंधा...

बोरफडी येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार

Image
बोरफडी येथे आज सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत कार्यक्रमास उपस्थित रहा -सरपंच कैलास घुगे बीड (प्रतिनिधी ) दि.१९ : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आज (दि.२०) सकाळी १० वाजता बीड तालुक्यातील बोरफडी येथे भेट देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन बोरफडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच कैलास घुगे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे तसेच गटविकास अधिकारी अनिकेत सानप उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विविध विकासकामांची प...

आम आदमी पार्टी बीड कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
बीड (प्रतिनिधी ) – आम आदमी पार्टी बीड कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई जाधव उपस्थित होत्या. तसेच बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, बीड शहर सचिव मिलिंद पाळणे, आजिनाथ जी रसाळ, राजश्री येडे, संजय गायकवाड, अभिषेक टाळके, स्वप्निल गायकवाड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते.