Posts

Showing posts from April, 2023

स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीत स्वातंत्र्य सैनिकांना मोफत आरोग्य सेवा - डॉ जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सामाजिक वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील उतूंग व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी एक नवीन स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीमध्ये म्हणजेच पिंपळनेर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी सर्व रुग्णांसाठी सूख-सोयी उपयुक्त हॉस्पिटल आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी मोफत आरोग्य सेवा अविरतपणे देण्यासाठी हॉस्पिटल निर्माण केले आहे या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वीर पत्नी यांना अविरतपणे मोफत आरोग्य सेवा देण्याचे डॉक्टर जितीन वंजारे यांनी ठरवले आहे.          स्वातंत्र्यसैनिक कै.सुखदेव जायभाये यांच्या स्मतीप्रित्यर्थ मौजे पिंपळनेर या ठिकाणी भाऊ बाबा मंदिरा पाठी, इंदूवासिनीदेवी रोडलगत भव्य दिव्य अशा पद्धतीचे सर्व सुविधा उपलब्ध असणारे हॉस्पिटल डॉक्टर जितीन वंजारे आणि नवनाथ जायभाये यांनी चालू केले असून या हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना व त्यांच्या वीर पत्नी यांना मोफत आरोग्य सेवा पुर...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या समृद्धी चषक निबंध स्पर्धेत सोयगाव येथील कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगाव ची विद्यार्थिनी कु.गुंजन कडुबा ठाकरे

Image
सोयगाव प्रतिनिधि मुश्ताक शाह    विद्यार्थीनीची जिल्हास्तरावर घवघवीत यश. कु.गुंजन कडुबा ठाकरे या विद्यार्थीनी ने 25 हजाराचे प्रथम बक्षिस जिंकले या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मधुकर चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, योजना शिक्षणाधिकारी ए.बी.झाडबुके,शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर संचलित ,कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल सोयगाव च्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई रंगनाथरावजी काळे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश यादव, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर एलीस, एकनाथ कोलते, प्रा.डॉ. दादासाहेब पवार, आदींनी कौतुक केले. तर आमखेडा चे सरपंच श्री गजानन ढगे ,कडुबा ठाकरे, योगेश काळे, प्रणय कुलकर्णी, शितल वराडे,मनिषा पाटील, शितल पगार, अंजली कथलकर ,विद्या पाटील, आशा गणगे,जयश्री श्रीवास्तव, नम्रता पाटील, नलिनी पाटील, रोहिणी पाटील, प्रेरणा मोरे,मुश्ताक शहा,संजय डापके,ज्ञानेश्वर पंडित, आदी पालक व शिक्षकांनी या विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला कृषी उत्पन्न बाजार समितीेतील विजयी उमेदवारांचा सन्मान

Image
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला कृषी उत्पन्न बाजार समितीेतील विजयी उमेदवारांचा सन्मान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पेढे भरवत उमेदवारांना दिल्या शुभेच्छा   शेतकरी हितासाठी एकत्रित रित्या काम करावे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक :-कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतांना सर्वांना सोबत घेऊन काम करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येऊन सुयोग्य कारभार करावा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयी झालेल्या उमेदवारांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी पेढे भरवत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना देखील छगन भुजबळ यांनी स्वतः पेढे दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,किसनराव धनगे,ॲड.बाबासाहेब देशमुख, विश्वासराव आहेर,शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरनारे, शेतकरी नेते संतू पाटील...

साऊन्ड लाईट व्यापारी असोशीयन बीड अध्यक्ष पदी धम्मानंद वाघमारे सचिव पदी संदीप पटेकर

Image
बीड प्रतिनिधी   आज दी. 30/04/2023 रोजी बीड शहरातील शासकीय विश्रांमग्रह या ठीकांणी साऊन्ड लाईट असोशीयन ची बैठक पार पडली या वेळी साऊन्ड व्यावसायिकांचे अनेक अडचणी असल्याची माहिती मिळाली तसेच सर्वानुमते साऊन्ड व्यावसायिकांची नवीन समीती नेमण्यात आली  या वेळी अध्यक्ष धम्मानंद वाघमारे, उपाध्यक्ष ओमकार सवाई,सचिव संदीप पटेकर ,कार्याध्यक्ष विशाल येदें संघटक कान्हा पवार, सहसचिव सुशील रसाळ सदस्य अभिषेक मोठे यांची सर्वांनुमते नीवड करण्यात आली तसेच सर्व साऊन्ड व्यवसायिकांच्या हिताचे निर्णय व त्यांचे प्रश्ण मार्गी लावण्यात येतील अशे आश्वासन धम्मानंद वाघमारे यांनी दीले या वेळी उपस्थित सिद्धार्थ पागोटे,गणेश कुडुक, प्रकाश ढोकणे,आकाश हातागळे,लक्षीमण नेवळे,गणेश निर्मळ,आमीत गायकवाड,आमीत पवळे,गुड्डु राऊत,सचिन जाधव,काशीद रोकडे,कीरण कदम इत्यादी सर्व साऊन्ड मालक व आॅपरेटर उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 100 व्या मन की बात आष्टी येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

Image
आष्टी प्रतिनिधी   देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 100 व्या मन की बात आष्टी येथे भगवान महाविद्यालया त भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाजपा नेते मा.आ. भीमरावजी धोंडे , भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष ॲड. साहेबराव म्हस्के, ॲड. वाल्मीक तात्या निकाळजे,पं.स.सदस्य दादासाहेब झांजे, सरपंच दादा जगताप, सरपंच पोपटराव गोंडे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक दादासाहेब गर्जे, नगरसेवक आस्लम बेग, आस्ताक भाई शेख, एन.टी.भाऊ गर्जे, बाबासाहेब गर्जे, आण्णासाहेब लांबडे, जालिंदर सेठ गोंडे, बबन भाऊ कदम, संभाजी जगताप, हरिभाऊ जंजिरे, रघुनाथ शिंदे,सदाभाऊ दिंडे, ज्ञानेश्वर गदादे, बाबुराव कदम, बबनराव औटे, बाजीराव वाल्हेकर, आदेश निमोनकर, पवन धोंडे, निखिल खेडकर, रामभाऊ शेळके,गणेश धोंडे, दत्ता भाऊ बोडखे यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते

संभाजी शेळके यांची भारतीय मानव अधिकार आयोग, महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी निवड.

Image
बीड प्रतिनिधी         भारतीय मानव अधिकार आयोग हि एक सामाजिक संघटना आहे. पीडित समाजाच्या उन्नतीसाठी या संघटनेचे काम भारतभर चालू आहे. दिल्ली आणि उडीसामध्ये हि संघटना फार मोठ्या प्रमाणात जनहिताचे कार्य करत आहे.         या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जवाहरलाल ओझा यांनी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदाची धुरा युवक सामाजिक कार्यकर्ते श्री. संभाजी शेळके यांच्या कडे दिली आहे.      संभाजी यांच्या या निवडीने सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.

जाती धर्माचे राजकारण देशासाठी घातक- सतीश बनसोडे

Image
नितीवान निर्लोभी राज्यकर्त्यांची देशाला गरज; बीडमध्ये एकदिवशीय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न  बीड प्रतिनिधी : भारतामध्ये जातिव्यवस्थेची उतरंड ही प्रमुख समस्या आहे. देशाच्या राजसत्तेचे सूत्र नेहमी ठराविक विशिष्ट घराणेशाहीच्या हातात असल्याचा पुरावा देण्याची गरज नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण लोकशाहीमध्ये अपेक्षित असते. आज नितीवान, निर्लोभी राज्यकर्त्यांची देशाला गरज आहे. देशात जाती- धर्माच्या नावाने राजकारण केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण आपल्या देशासाठी घातक असल्याची मांडणी फुले- आंबेडकरी विचाराचे अभ्यासक सतीश बनसोडे यांनी केली.  बीड येथे रविवारी सकाळी ११ ते सायं ०५ या वेळेत परिवर्तनवादी विचाराच्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर तुलशी संगणकशास्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश बनसोडे बोलत होते. विचारमंचावर विविध परिवर्तनवादी विचारसरणीचे जाणते अभ्यासक सूर्यकांत गायकवाड, चंद्रप्रकाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सतीश बनसोडे म्हणाले की, भारतातील राजकीय समीकरणे नेहमी जात...

आदिवासी-अतिदुर्गम भागातील कुशेगाव बससेवा सुरु करा -गायकर यांची मागणी

Image
     ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन ) - महाराष्ट्रातील शिवसेना व भाजपच्या युती सरकारने एस.टी. सेवेत अनेकानेक सवलती जाहिर केलेल्या आहेत. या सवलतीचां फायदा आदिवासी बहुल अतिदुर्गम भागातील प्रवाशानां होणे गरजेचे आहे. मात्र ईगतपुरी आगाराकडुन आदिवासी बहुल अतिदुर्गम भागातील एस.टी.फेर्याच बंद असल्याने हे नागरिक या लाभापासुन वंचितच रहात आहे. याची दखल घेऊन ईगतपुरी आगाराने तालुक्यातील एस टी फेर्याचे योग्य सु व्यवस्थापन करावे व शासनाच्या सवलतीचा थेट लाभ तळागाळात पोहचवावा अशी मागणी आहुर्लीचे माजी चेअरमन तथा सामाजीक कार्यकर्ते नवनाथ अर्जुन पा गायकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.     ईगतपुरी तालुक्यातील कुशेगाव, मोडाळे व शिरसाटे ही आदिवासी बहुल अतिदुर्गम अशी गावे आहेत. या गावांमध्ये पुर्वी ईगतपुरी आगाराची बसफेरी सुरु होती.मात्र आगारा तील अनागोंदी कारभाराच्या पाश्र्वभूमीवर सदरची बसफेरी बंद झालेली आहे. यामुळे येथील जेष्ठ नागरिक, महिला व शालेय विदयार्थी आदि सर्वच घटक या सवलतीपासुन वंचित रहात आहे. सदरची फेरी पुर्ववत सुरु करावी अन्यथा ठिय्य...

सहकारात पुन्हा एकदा गुळवेचांच करिश्मा

Image
   ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन ) -     नाशिक जिल्हयातील लाखोची उलाढाल असणारी व बहुचर्चित अशी ईगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा संदिप गुळवे यांचे रुपाने गुळवेचेंच कायम वर्चस्व राहिले आहे. गेली पाच दशके गुळवे यांचेच बाप लेकाच्या हाती सत्ता कायम रहावी हा एक करिश्माच असुन एक विक्रमच मानावा लागणार आहे.     कै.गोपाळराव गुळवे यांनी तब्बल चार दशके या बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवले होते.त्यांचे निधनानंतर बाजार समितीची सत्ता सुत्रे संदिप गुळवे यांचेकडे आली.प्रारंभी सहानुभुती म्हणुन व वडिलाचीं पुण्याई चे बळावर गुळवे हे सत्ता पुढील काळात राखण्यात यशस्वी ठरले खरे.पण नंतर मात्र बाजार समितीवर दोनदा सत्ता प्राप्तीनंतर गुळवे हटाव मोहिमेचाकाही लोकानीं प्रारंभ केला.या निवडणुकीच्या दरम्यान हा तीव्र विरोध ठळकपणे जाणवला.    मात्र यानंतर ही गुळवे यांनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध करत एकहाती विजय खेचुन आणला आहे. या मागे गुळवेनीं केलेले बेरजेचे राजकारणच कारणीभुत आहे.   ईगतपुरी तालुक्यात सहकार म्हंणजे गुळव...

कुमशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक हिंगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
बीड प्रतिनिधी - दि.30 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे कुंमशी येथे 30 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील, वंचित चे नेते ईजि,विष्णू देवकते, बबनराव वडमारे, बालाजी जगतकर, बीड तालुका अध्यक्ष किरण वाघमारे सह गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुमशी येथील जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे शाल, हार घालून स्वागत व सत्कार केला. जयंतीच्या निमित्ताने मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी बोलताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकासाठी काम केले आहे, त्यांच्या कार्याचा आदर्श आपन सर्वांनी घेतला पाहिजे व सर्वांनी त्यांच्या विचाराचे व कार्याचे स्मरण केले पाहिजे,सर्व महापुरुषांच्या जयंत्या एकोफ्याने साजर्या केल्या पाहिजे, यावेळी इ...

कन्हेरवाडी येथील आनंद नगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती अत्यंत थाटामाटात साजरी

Image
कन्हेरवाडी येथील आनंद नगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती अत्यंत थाटामाटात साजरी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मानले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार परळी प्रतिनिधी - कन्हेरवाडी येथील आनंदनगर येथे 27 एप्रिल रोजी भीम जयंती उस्ताहात आणि अत्यंत आनंदात साजरी करण्यात आली होती यावेळी असंख्य कार्यकर्ते व गावातील नागरिक आवर्जून उपस्थित राहिलेले होते.परमपूज्य,विश्वरत्न,बोधिसत्व,महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अत्यंत धूम धडाक्यात साजरी करण्यात आली आहे. तालुक्यातील अत्यंत नावाजलेले गाव असलेले कन्हेरवाडी येथील यावर्षी नव्याने सुरुवात केलेली भीम जयंती अत्यंत आकर्षणाचा व मोलाचा विषय ठरली होती कारण सर्व समजातील युवकांनी आणि नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन जयंती ही एकट्या समाजाची नसून सर्वांची आहे या भावनेतून सर्वांनी पुढाकार घेऊन करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन,वही,ट्रॉफी यांचे वितरण व सत्कार करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच...

आदर्श माता पुरस्कार विजेत्या द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांचे दुःखद निधन

Image
बीड प्रतिनिधी  माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील आदर्श माता पुरस्कार विजेत्या स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले  स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांनी नातवाना संस्कार केले शिकवले नातू आकाश दिवटे यशवंती प्रेरणादायी आधार समाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते, लेखक राजेश दिवटे यांना मोठ्या कष्टाने घडवले स्व.द्रोपदाबाई दगडोबा दिवटे यांच्या सामाजिक,आध्यत्मिक कार्यची दखल पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्या वतीने 2019 मध्ये द्रोपदाबाई दिवटे यांना राज्यस्तरीय आदर्श माता पुरस्कार देण्यात आला.   त्यांच्या पाठीमागे मुलगा बाबासाहेब दगडोबा दिवटे एक मुलगी यमुना नारायण खामकर त्यांच्या सहा नाती नातू व नातसुना असा मोठा परिवार आहे ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

१ मे जागतिक कामगार दिनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर द्वार सभेचे आयोजन - भाई गौतम आगळे

Image
  परळी वैजनाथ, दि.२९ ( प्रतिनिधी ) एक मे जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर द्वार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली आहे.        ‌ या द्वार सभेत सफाई कामगारां सहित इतर कंत्राटी कामगारांच्या मुलभूत हक्क, अधिकार व त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर अॅड. अजय गंडले मार्गदर्शन करणार आहेत. सफाई कामगारां सहित इतर कंत्राटी कामगारांना शासनाने निश्चित केलेले किमान वेतन व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक ०९ मे २०२३ मंगळवारी सकाळी ११ वा. साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, चौक औरंगाबाद / छत्रपती संभाजी नगर येथे संघटनेच्या बॅनरखाली चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचे नियोजन सुध्दा करण्यात येणार आहे. या द्वार सभेला बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर, मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड, बीड जिल्हा अध्यक्षा अनिता बचु...

महिला विकास संघाच्या जालना जिल्हा कार्यकारणी जाहीर

Image
 शोभा वाघराळ,जालाना वाळकेशोर येथे विकास संघ महाराष्ट्र राज्य ऐप जालना जिल्हा विविध निवडी करण्यात अल्या आहेत. जालना जिल्ह्यात महिला विकास संघाच्या माध्यमत्तून विविध प्रोजेक्ट राबविणार आहोत.जसे की,युवती राज महिला बचत गट योजना मध्ये फक्त रोज 10 रुपये भरा. आणी काही दिवसांनी 10 हजार ते 50 हजार रुपये कर्ज मिळवा.उद्योजक,ब्रॅण्डिंग,पेकेजिंग,मार्केटिंग ची चिंता सोडा.फक्त उद्योजक बना.असा संदेश महिला विकास संघा् मार्फत देण्यात येत आहे.  महिला विकास संघांचे चीएफ मॅनेजिन्ग डिरेक्टर मा विजय दादा पोकळे, एम. डी. भागवत वैद्य, राज्य संघटक पूनम वाघमारे, यांच्या आदेशाने शोभा वाघराळ यांनी वाळकेशोर येथे मिटिंग आयोजित केली होती.या बैठकीत सविता बाबासाहेब ये टाळे (जालना जिल्हा अध्यक्ष), स्वाती विठ्ठल घोडके(जालना जिल्हा उपाध्यक्ष),लंका सर्जेराव येंटले( जालना जिल्हा सचिव),अश्विनी किरण उदे(अंबड तालुका अध्यक्ष),अंजुम अहेमद शहा(अंबड तालुका उपाध्यक्ष),माधुरी रमेश शिनगारे (वाळकेशोर शाखा अध्यक्ष)पदी निवडी जाहीर करण्यात अल्या आहेत.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. राज्य उपाध...

गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया शांततेत पार

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; ९३ टक्के मतदान  पंडित - पवारांची प्रतिष्ठा पणाला; भर पावसात राजकीय मंडळी ठाण मांडून  गेवराई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवार दि.२८ एप्रिल २०२३ रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. १७ जागेसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हा परिषद मा.कन्या शाळा, गेवराई येथे सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकुण ९३ टक्के मतदान होवून ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान यावेळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र दोन्ही गटातील राजकीय मंडळी मतदान केंद्रावर ठाण मांडून होते.  सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय पातळीवर विचार केला तर सत्ताधारी व विरोधकांची प्रतिष्ठा पणाला लागली. सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात सत्तांतरासाठी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडीत यांनी युती करुन शेतकरी विकास आघाडी करत कंबर...

गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, फळबागांचे नुकसान, झाडे उन्मळून पडली, नदी नाल्यांना आला पूर, फळबागांचे झाले प्रचंड नुकसान

Image
 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे :- गेवराई तालुक्यातील विविध भागात, शुक्रवार ता. 28 रोजी सकाळी अकरा वाजता  अचानक अवकाळी  वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने, नदी नाल्यांना पूर आल्याचे विचित्र चित्र पहायला मिळाले असून, शेत पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना बेजार केले आहे. अवकाळी पावसाने शेत पिकांसह फळबांगाच्या मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने काही भागातील झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणच्या घरावरचे पत्रे उडाले आहेत. शेतात, जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्यांचे छप्पर उडाले असून, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गुरूवार ता. 27 व 28 एप्रिल रोजी, सलग दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. वारा, पाऊस, विजांचा कडकडाट सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने,    गेवराई तालुक्यातील गोदाकाठ व उजवा कालव्या जवळच्या शेत परिसरात फळबांगाचे मोठे नुकसान झाले असून वाऱ्याने अंबा, पपई, मोसंबीचा सडा पडला आहे. दरम्यान, उमापूर, जातेगाव, चकलांबा, तलवडा, सिरसदेवी, प...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या - निलाताई पोकळे

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा पाटोदा शिरूरच्या सर्वांगिण विकासासाठी व आमदार बाळासाहेब आजबे यांचे हात बळकट करण्यासाठी पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी जनविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केले याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जाहीर झाले असून बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असून विरोधी पक्षाच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदारांनी पाटोदा शिरुर मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी दमदार आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करावे असे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष निलाताई पोकळे यांनी केले आहे

'मन की बात' कार्यक्रमाचा 100 व्या भागात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - मा.आ भीमराव धोंडे

Image
आष्टी प्रतिनिधी 'मन की बात' कार्यक्रमाचा 100 व्या भागात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे मा.आ भीमराव धोंडे यांनी केले आहे 'मन की बात'कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवारी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे प्रसारण केवळ भारतच नव्हे तर जगभर प्रसारित करण्यात येणार आहे. पतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. उल्लेखनीय असे की हा कार्यक्रम पूर्णपणे ध्वनिमुद्रीत म्हणजेच ऑडिओ रुपात असतो. 'मन की बात' कार्यक्रम जगभरात प्रसारित व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष देखील जोरदार तयारी केली असुन मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. 100 व्या भागात आष्टी-पाटोदा -शिरुर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे नेते मा.आ.भीमरावजी धोंडे यांनी केले आहे

भारताच्या घटनाकारांची 132 वी सार्वजनिक नागरि स्वरूपाची जयंती साजरी करून कौडगाव करांनी दिला महाराष्ट्राला सामाजिक समतेचा संदेश

Image
भारताच्या घटनाकारांची 132 वी सार्वजनिक नागरि स्वरूपाची जयंती साजरी करून कौडगाव करांनी दिला महाराष्ट्राला सामाजिक समतेचा संदेश  मिरवणुकीत संपूर्ण गाव झाला सामील होऊन जयंती उत्सव पडला पार-युवा जनशक्ती ग्रुपच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जेवणाची केली सोय. केज/प्रतिनिधी :- सामाजिक समतेचे महानायक ज्ञानयोगी परिवर्तनाचा अग्रदूत सामाजिक समतेचा महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 सार्वजनिक जन्मोत्सव हा हजारो लोकांनी जगामध्ये साजरा केला व महामानवाचा जन्मोत्सव जगामध्ये प्रचंड उत्साहात साजरा झाला जसा जगामध्ये हा उत्सव प्रचंड उत्साहामध्ये साजरा झाला या सगळ्याला अपवादात्मक महामानवाचा जन्मोत्सव हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये केज तालुक्यातील कौडगाव ह्या गावामध्ये संपूर्ण गावाने मिळून साजरा केलेल्या जन्मोत्सवाचं एक वेगळेपण यावर्षी पाहायला मिळालं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा सार्वजनिक नागरी स्वरूपाचा जन्मोत्सव हा दोन दिवसीय साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार असलेल्या विचारवंत यांचे प्रबोधनपर व्याख्यान आणि...

फुले पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना

Image
बीड प्रतिनिधी - दि.28  फुले पिंपळगाव ता.माजलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर 132 वी जयंती निमित्त बीड समता सैनिक दलाची वतीने मानवंदना देण्यात अली‌. सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले व सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व आंबेडकर प्रेमी महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रसंगी कॅप्टन राजाभाऊ आठवले,अमरसिंह ढाका व महिला समता सैनिक,युवक समता सैनिक यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आष्टी गावाचा नादच खुळा;बैलासमोर नाचविले गौतमी पाटीलला-कार्यक्रमास नव्हता एकही माणूस

Image
आष्टी गावाचा नादच खुळा;बैलासमोर नाचविले गौतमी पाटीलला-कार्यक्रमास नव्हता एकही माणूस  गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 सबसे कातिल” असे जिला म्हटले जाते त्या गौतमी पाटीलची संपूर्ण महाराष्ट्रात एकच हवा आहे.जिथे जिथे गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या त्या ठिकाणी गर्दीचा पूर वाहू लागतो. आत्तापर्यंत वाढदिवस, लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमात हजारोंच्या समोर गौतमीने आपली अदाकारी पेश केली.मात्र आता गौतमीच्या लावणीचा एक बैलही दिवाणा झाल्याचे पाहायला मिळाले.मुळशीत बावऱ्या बैलासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त बैलच होते. नृत्यांगना गौतमी पाटीलचे नृत्य ठेवण्यासाठी राज्यभरातून चढाओढ लागते.गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे.अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात.तिचे मानधनही गब्बर असते.तिचा कार्यक्रम म्हटले की, टाळ्या आणि शिट्ट्यांची नुसती बरसात होते.गौतमी आणि वाद हे एक समीकरणच आहे. सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्...

आरटीई प्रवेशात बोगसगिरी ; खोटे भाडेपत्र, आधार आणि बँक पासबुक पालकांकडून सादर

Image
आरटीई प्रवेशात बोगसगिरी ; खोटे भाडेपत्र, आधार आणि बँक पासबुक पालकांकडून सादर बोगस प्रवेश रोखण्याची शिवसंग्राम कडून मागणी पडताळणी समिती कडून बोगस प्रवेशाला पाठबळ बीड (प्रतिनिधी ) आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी लॉटरी द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गटशिक्षाधिकारी कार्यालयात पडताळणी समिती कडून कागदपत्रांची पडताळणी झाल्या नंतरच प्रवेश निश्चित होतात यासाठी सध्या जिल्ह्यात निवड झालेल्या १ हजार ८२१ विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना रहीवासी पुरावा सादर करावा लागतो यात बहुतांश पालकांनी खोटे भाडेपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुक रहिवासी पुरावा म्हणून सादर केले आहेत त्यांची पडताळणी समिती द्वारे प्रत्यक्ष भेट देवून पालक त्याठिकाणी राहतात की नाही याची तपासणी करावी आणि ऑनलाईन अर्ज दाखल केल्या नंतरचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्या पालकांच्या पाल्याचे प्रवेश रद्द करावा या बाबत आज शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले.        ...

काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची कर्नाटक निवडणुकीसाठी प्रचारकपदी नियुक्ती.

Image
मुंबई, दि. २७ एप्रिल कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होत असून काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते व पदाधिकारी यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारकपदी नियुक्ती केली आहे. गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात ते काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करतील. “कर्नाटकात ४० टक्के कमिशनवाले सरकार असून भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला कर्नाटकची जनता कंटाळली आहे. भाजपाच्या भ्रष्ट सरकारला घरी बसवण्याचा ठाम निर्धार कर्नाटकच्या जनतेने घेतलेला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देशभरातील वातावरण काँग्रेसमय झाले आहे. काँग्रेसवर जनतेचा विश्वास आणखी दृढ झालेला आहे. काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण करणारा पक्ष आहे ही जनतेची भावना असून जनतेचा विश्वास काँग्रेस पक्ष सार्थ ठरवेल. काँग्रेस उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी प्रचारासाठी घराघरात जाऊ”, असा निर्धार राजहंस यांनी व्यक्त केला आहे.     यापूर्वीसुद्धा त्यांन...

धारगाव प्रा.आ.केंद्राचा मनमानी कारभार,आदिवासी रुग्णाचीं उपचारासाठी अन्यत्र धावाधाव

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडुन) -    ईगतपुरी तालुक्यातील विविध प्राथमीक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभाराच्या सुरस कथा सातत्याने प्रसिद्द होत असतानांही निर्ढावलेल्या आधिकारी व कर्मचार्यांवर याचा ढिम्म परिणाम होतानां दिसत नाही.असाच आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जी कारभाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असुन या यंत्रणेचा कारभार कधी सुधरणार ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.    ईगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील अत्यंत महत्त्वाचे प्राथमीक आरोग्य केंद्र आहे. मात्र सदरचे आरोग्य केंद्र येथील वैदयकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे.     आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख सुविधांवर कोटयावधी रुपयाचां खर्च करीत असतानांही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्षच आहे.    या प्रा.आ.केंद्रात एकही कर्मचारी वा आधिकारी निवासी नसतो. सर्वच जण नाशिक, घोटी आदी शहरातुन ये जा करतात. रात्री तर हे केंद्...

मार्केट कमिटीतील भ्रष्टाचाराचा अड्डा मोडीत काढण्यासाठी शेतकरयांच्या पोरांना संधी दया-- पवन कुचेकर

Image
(बीड प्रतिनिधी ) बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक ही परिवर्तनाची निवडणुक ठरणार असुन चाळीस वर्षापासूनची जुलमी राजवट उलथुन टाकणायासाठी मतदारांनी शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या स्वाभिमानी उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी केले आहे. शेतकरी परिवर्तन महाआघाडीची ताकत ही शेतकरयांच्या हिताची आहे  आज सर्व सामान्य घरातील शेतकरयांची पोर निवडणुकीच्या रंणागंणात उतरलेले आहेत बीडची बाजार समिती अनेक वर्षांपासून त्याच त्याच लोकांच्या ताब्यात आहे  शेतकरयांच्या घामाच्या कष्टातुन आलेल्या संपत्तीवर डोळा ठेवुन गेल्या चाळीस वर्षात भ्रष्टाचाराचा मोठा कळस गाठला आहे हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा बीड तालुका अध्यक्ष पवन कुचेकर यांनी केले आहे.

गुंठेवारी प्रस्ताव स्विकारण्याची मुदतवाढ द्या, जिल्हाधिका-यांना निवेदन:- डॉ.गणेश ढवळे

Image
---- मार्च २०२३ पासून नवीन गुंठेवारीची प्रकरणे स्विकारणे बंद झाले असून परीणामी बीड, शिरूर व गेवराई तालुक्यातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे.उपविभागीय कार्यालयाच्या चकरा मारून सर्वसामान्य नागरीक बेजार झाले असून गुंठेवारी प्रस्ताव स्विकारणे पुन्हा सुरू करण्यात यावेत.अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सविस्तर माहितीस्तव ---- महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ नुसार भुखंड नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचे भुखंड आणि प्लाट गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची प्रक्रिया जानेवारी २०२२ मध्ये सुरू झाली होती. गुंठेवारी पद्धतीने विक्री केलेले भुखंड व प्लाट नियमित करण्यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जानेवारी २०२२ मध्ये परिपत्रकही काढले होते.गुंठेवारी सुरू असल्याने अनेकांनी प्रकरणे दाखल केली.त...

नऊ वर्षाच्या सय्यद आरिफ़ ने पूर्ण केले रमज़ानचे कमाल रोज़े,लहान रोज़ेदार यातून प्रेरणा घेतील - एस.एम.युसूफ़

Image
नऊ वर्षाच्या सय्यद आरिफ़ ने पूर्ण केले रमज़ानचे कमाल रोज़े,लहान रोज़ेदार यातून प्रेरणा घेतील - एस.एम.युसूफ़   बीड (प्रतिनिधी ) - नुकतीच २२ एप्रिल रोजी इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र अशी रमजान ईद जगभरात साजरी करण्यात आली. यावर्षीही रमज़ान महिना जीवाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात आल्याने रोजेदारांच्या सहनशक्तीचा चांगलाच कस लागला. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शहरातील आसेफ़नगर भागात राहणारे सय्यद कौसर नदीम यांचा जेमतेम साडेनऊ वर्षाचा मुलगा व महावितरण कंपनी चे सेवानिवृत्त दिवंगत अभियंता सय्यद सरफ़राज़ अहेमद यांचा नातू सय्यद आरिफ़ याने रमज़ान महिन्याचे एक-दोन नव्हे तर २९ मधून चक्क २६ रोज़े धरून अत्यंत कमी वयात कमाल रोज़े धरणारा रोज़ेदार ठरला. उर्वरित तीन रोज़े ही तो पूर्ण करू शकला असता परंतु आजारी पडल्याने त्याला तीन रोजे धरता आले नाही. याची खंत ही या बालरोज़ेदाराने बोलून दाखवली. यामुळे एस.एम.न्युज़चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ आणि कार्यकारी संपादक शेख वासेख़ यांनी त्यांच्या घरी जाऊन आरिफ़ यास शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयी अभिनंदन केले. यावेळी आरिफ़ चे नाना सय्यद अब्दुल हमीद, ...

श्रीमती. सुवर्णलता गायकवाड यांना माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित

Image
  शिरूर: शिरूरमधील कवयित्री श्रीमती. सुवर्णलता पांडूरंग गायकवाड यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहता या ठिकाणी दि २३ एप्रिल २०२३ रोजी काव्यलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांकाने माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेखणी ता श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे कार्यरत आहेत. दि २३.०४.२०२३ रोजी राहता जि अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचा शताब्दी महोत्सव व कृतज्ञता सन्मान सोहळा २०२३ संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील काही कवयित्रींना काव्यलेखन स्पर्धेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मंचावर सहकार मंत्री मा अतुलजी सावे, पालकमंत्री मा राधाकृष्ण विखे पाटील, माजी सहकार मंत्री मा हर्षवर्धन पाटील उपस्थित होते  महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ, शाखा अहमदनगर , गुरुमाऊली मंडळ व जिल्हा कला साहित्य संघ व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने दि ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महिला काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेत श्रीमती. सुवर्णलता पांडूरंग गाय...

लघुपाटबंधारे विभाग अंतर्गत भुसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणी चंद्रकांत सुर्यवंशी व श्री निवास मुळे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा

Image
  बीड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात मोठ्याप्रमाणात भुसंपादन मावेजा वाटपात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाले असून बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने अपहार करून तक्रारी नंतर संचिका गायब करण्यात आल्या असून संचिका गहाळ प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच चौकशीस जाणिवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२४ एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनात शेख युनुस च-हाटकर, शेख मुस्ताक , शेख मुबीन, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, बाबासाहेब मेंगडे,गवळण मेंगडे, रावसाहेब मेंगडे, अमोल ...

अवकाळी पावसामुळे चौसाळा अंजनवती लिंबागणेश नेकनूर या भागात जनावरांच्या चाऱ्याची अडचण भासणार

Image
अवकाळी पावसामुळे चौसाळा अंजनवती लिंबागणेश नेकनूर या भागात जनावरांच्या चाऱ्याची अडचण भासणार-माजी सैनिक आशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड शेतकऱ्यांच्या जनावरांना यावर्षी अवकाळी पावसामुळे चाऱ्याची अडचण भासणार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार बीड प्रतिनिधी -बीड तालुक्यामध्ये चौसाळा लिंबागणेश अंजनवती मोरगाव नेकनूर बालाघाट या भागामध्ये सर्व मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी केली जाते यावर्षी ही पेरणी लांबल्यामुळे ज्वारीचे पीक देखील लांबणीवर पडले आणि ज्वारी शेतामध्ये उभी असताना वाऱ्याने गारपिटीने ज्वारीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर वर्षभर जनावरांसाठी चारा एकत्र केला जातो त्यामध्ये मुख्य चारा म्हणून ज्वारीचे गुड, कडबा, म्हणजे वैरणची साठवणूक केली जाते परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे या वैरणीचे भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस लांबला किंवा व्यवस्थित झाला नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहू शकतो शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणा...

'अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा २८ एप्रिलला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

Image
'अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा २८ एप्रिलला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री! हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी आणि ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटा...

पुन्हा एकदा रविवार असुन सुद्धा तहसीलदार सुहास हजारे यांनी वडवाडी ग्रामस्थांचा अडवलेला रस्ता खुला करून दिला:- डॉ.गणेश ढवळे

Image
---- बीड तालुक्यातील मौजे.बोरखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वडवाडी येथील १५० लोकसंख्या असलेल्या अवचर, नवले, भोसले, गायकवाड,सुरवसे वस्तीवरील ग्रामस्थांचा दैनंदिन रहदारीचा रस्ता बांध कोरण्याच्या तसेच बांधावरील झाडे,झुडपे तोडल्याच्या वादातून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मोठमोठाली बाभळीची झाडे टाकून अडवण्यात आला होता.संबधित प्रकरणात ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयात लेखी तक्रार सुद्धा केली होती.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रत्यक्ष अडवलेल्या रस्त्याची पाहणी करत तहसीलदार सुहास हजारे यांना छायाचित्रे व व्हिडिओ पाठवत फोनवर संवाद साधत रस्ता खुला करून द्यावा अशी विनंती केली होती.काल दि.२२ एप्रिल शनिवार रोजी सुहास हजारे यांनी घटनास्थळी येण्याचे आश्वासन दिले होते.त्याप्रमाणे आज रविवार असून सूद्धा वडवाडी येथील अडवलेल्या रस्त्याची पाहणी करत ग्रामस्थांसोबत चर्चा करून रस्ता खुला करून दिला.याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांसाठी सुट्टीच्या दिवशी धाऊन येण्याची तहसीलदार सुहास हजारे यांची दुसरी वेळ यापुर्वीही मौजे.सोमनाथवाडी येथील कदम, दाभाडे,जाधव, इंगोले, शेळक...

साधना वाचनालयातर्फे जागतिक ग्रंथ दिनानिमित्याने समाजसुधारकाच्या पुस्तकांचे प्रदर्शन.

Image
                    मालेगाव (प्रतिनिधी )- .वाचन ही प्रक्रिया निरतंनपणे सुरुच राहणार असून फक्त माद्यमे बदलतील त्यामुळे वाचन चळवळी ची काळजी वाहण्याची गरज नाही. असे प्रतिपादन कवी, गझलकार सुरेंद्र टिपरे यांनी येथे केले. साधना वाचनालय, संगमेश्वर येथे आज जागतिक ग्रंथ दिवस साजरा करण्यात आला. वाचनालयाचे संचालक सुधाकर बागुल कार्यक्रमाच्या अध्यकस्थानी होते.   झाडाची पाने नंतर पुस्तके व आता संगणक याद्वारे वाचन सुरुच आहे. असे सांगून टिपरे यांनी ग्रंथ व वाचन यांचे महत्व सांगून जगातील क्रांती ग्रंथामुळे झाली.आक्रमकत्यानी सर्व प्रथम ग्रंथालये जाळली. ग्रंथामुळे प्रगती झाली. संत ज्ञानेश्वरानी पसायदानात ग्रंथाचे महत्व विषद केले आहे असे टिपरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.  प्रारभी थोर समाजसुधारकांच्या विविध पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन ग्रंथपुजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. म.ज् योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, म. गांधी आदीची ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले होते. बाल वाचक सुम...

लोकनेत्या पंकजाताई मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग!

Image
लोकनेत्या पंकजाताई मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग! सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती बीड । दिनांक २२ - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा कार्यक्रमाच्या बाबतीतला सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग आज बीडकरांना पहावयास मिळाला.शहरातील सर्व धर्मियांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या. पंकजाताई मुंडे यांचं सायंकाळी शहरात आगमन झालं.भाजपचे नगरसेवक जगदीश गुरखूदे यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन त्यांच्या प्रभागातील विकास कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणूकीत सहभागी होऊन त्यांनी भगवान परशुराम यांना वंदन केले.  भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले.  रमजान ईद सणानिमित्त भाजप नेते सलीम जहांगीर यांनी आयोजित केलेल्या ईद म...

आधुनिक युगातील दानशूर कर्ण म्हनून भाऊसाहेब आण्णा भवर यांची पंचक्रोशीत ओळख

Image
आधुनिक युगातील दानशूर कर्ण म्हनून भाऊसाहेब आण्णा भवर यांची पंचक्रोशीत ओळख अंमळनेर पंचक्रोशीत कोठेही हरिनाम सप्ताह्यामध्ये“अन्नदानाचा”यज्ञ करणारा जनसेवक भाऊसाहेब भवर  पाटोदा (गणेश शेवाळे )संपत्ती सर्वांकडे असती मदत करायला पण दानतच लागते आशेच काही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव सारख्या खेडेगावातील एक सामान्य माणूस भाऊसाहेब भवर यांचा कडुन पाहिला मिळते एका छोट्या गावातुन गेली अनेक वर्षे अखंडपणे अंमळनेर पंचक्रोशीत अखंड हरिनाम सप्ताहृया मध्ये अन्नदान  वाटपाचे चांगले काम करत आहे. भाऊसाहेब भवर हे सप्त्याह्यामध्ये अन्नदान करत एवढ्यावरच न थांबता ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून विविध गावात शासकीय निधीची वाट न पहाता स्वखर्चातून शाळा खोल्या बांधून दिल्या तसेच अनेक शाळेला आर्थिक मदत ही करत आहेत आयुष्य जिकिरीचं असतं समस्यांनी भरलेलं असतं पण त्यातून देखील रडकुंडीचा डाव न मानता आयुष्य घडवणारा संग्राम करून इतरांच्या आयुष्यात मदतीचा नंदादीप तेवत ठेवण्याचे काम करणाऱ्या या अवलियाची ही कथा…!! ‘स्वतः साठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ‘या व...

27 एप्रिल रोजी बीड येथे होत असलेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी गेवराई ते वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न

Image
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहेकर :-गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन आघाडी च्या गेवराई येथील संपर्क कार्यालय मध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीस गेवराई तालुक्यातील आजही माझी पदाधिकारी सर्कल प्रमुख प्रमुख गणप्रमुख व गेवराई शहरातील पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली यावेळी 27 एप्रिल रोजी बीड येथे होत असलेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी व आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे साहेब त्याने सविस्तर मार्गदर्शन केले या बैठकीस बीड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध वीर दगडू दादा गायकवाड यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी गेवराई तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोतदार भटके विमुक्त राज्य सदस्य भीमराव महाराज चव्हाण वंचित चे शहराध्यक्ष दस्तगीर शेख वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोरजी भ...

गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित,असलेल्या, रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून थेट बेमुदत आमरण उपोषणाचा ईशारा

Image
गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित,असलेल्या, रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून थेट बेमुदत आमरण उपोषणाचा ईशारा नगरसूल ता. येवला , येथील 3 कि. मी. अंतरावर असलेल्या, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्या च्या बाजूला, पुढे कोळगाव डोंगरा कडे जानारा रस्ता, बोरसे वस्ती, पासून ते.कटके / कापसे, वाडी , श्री. म्हसोबा महाराज बंधाऱ्या वरील फरशी पूल, सरसगट संपूर्ण डांबरी रस्ता, थेट, कोळगाव, शिवार श्री. क्षेत्र ओम चैतन्य कानिफनाथ महाराज गडा वर पर्यंत, करण्यात यावा, सरकारी वही - वाट शिव, रस्ता,येवला तहसीलदार, यांच्या, रजिस्टर रेकॉर्ड ला नोंद असून तरी, येवला जि. प. पं. स. अधिकारी व. सदरील लोकप्रतिनिधी, याबाबतचे कोणतेही, कामे पूर्ण करीत नाही म्हणून, गेल्या, 25 ते. 30 वर्षां - पासून खड्डे मय प्रलंबित असलेल्या या, रस्त्यावर, खडीकरण , डांबरी करण, व. साईट पट्ट्या भरीत नाही म्हणून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे, वाईट अवस्था झा...

वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांनी सावंत कुटुंबीयांची घेतली सांत्वन भेट

Image
   आष्टी / बीड ( प्रतिनिधी -गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सांगवी येथील राणीताई सावंत या शेतात काम करत असताना अचानक वादळ पाऊस विजांचा कडकडाट सुरू झाला आणि विज अंगावर पडून यात त्यांचा मृत्यू झाला .    या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांना मिळताच आष्टी तालुक्यातील सांगवी या गावी सावंत कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन सावंत कुटुंबीयांना धीर दिला . राणी सावंत यांच्या पाश्चात पती मुलं असून सावंत कुटुंबियांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांनी जाहीर केले .    याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष अनुराग वीर , आष्टी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष किरण भाऊ आखाडे , अमोल साखरे , दादासाहेब गायकवाड ,आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवारी प्रत्यक्ष आढावा घेतला.

Image
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते होणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी आज शुक्रवारी प्रत्यक्ष आढावा घेतला.  सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )       मंत्री विखे पाटील यांचे सोयगाव येथे हेलिकॉप्टर ने आगमन होणार आहे. त्याअनुषंगाने यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे करण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भूमिपूजन स्थळ व येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. रविवार रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्या निमित्त प्रभावी नियोजन करावे अशा सूचना मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  यावेळी तहसीलदार रमेश जसवंत, एपीआय अनमोल केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन राठोड, वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित गौर, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, नगर पंचायत शिवसेना गटनेता अक्षय काळे, संजय आगे, दिलीप देसाई आदींची उपस्थिती होती.

सोयगाव येथे ईदगावर ईदुलफितर नमाज अदा करण्यात आली

Image
सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग )  ईदगावर नमाज ईदची अदा,( ईदुलफितर करताना नमाज हाफिज सैफुल्लाह यांनी यांचा मार्फत अदा करण्यात आली तर मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळे भेट घेऊन ईदचा सलाम घेतला यावेळेस मुस्लिम बांधव म्हणतात की हा सण वर्षातून भर उन्हाळ्यात मध्ये येतो हासन तरी वर्षभरात एकच महिना असा असतो की 30 दिवस उपावस असतो याला रोजा असे म्हणतात तसेच सोयगाव सिद्दिकी मज्जिद चे मौलाना यांनी ईदची नमाज यांच्यामार्फत युक्त करण्यात आली तसेच नमाज आजार झाल्यावर मुस्लिम बांधव एकमेकांशी गळे भेट घेतले व घेताना आनंद झाला यावेळीस , तायर देशमुख , बबलु हाजी , शेख , रउफ , कदिर शहा , लतीफ शहा , शाकीर देशमुख , मौलाना सैफुल्लह ,यासीन बेग , शेख, जाकीर , मुस्ताक शहा, जमील पटेल, शेख, कासीम , सर्व मुस्लिम बांधव आनंद घेताना,

तळवट बोरगाव येथे अज्ञात जातीवादी लोकांनी बॅनर फाडले गावात तणावाचे वातावरण

Image
 गेवराई तालुक्यातील मौजे तळवट बोरगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौकात बॅनर लावले असता रात्री गावातील काही जातीवादी लोकांनी जाणूनबुजून बॅनर फाडले त्यामुळे गावातील बौध्द समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तलवाडा पोलिस प्रशासनाने संबंधित अज्ञात जातीवादी लोकावर कडक कारवाई करण्यात यावी व आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी बौध्द समाजाने कडक भूमिका घेतली असून गावांमध्ये जंयतीला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत असे बौध्द समाजाकडून मागणी होत तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर फाडलेल्या जातीवादी लोकावर ककड कारवाई करण्याची मागणी समाज बांधवांकडून होत आहे

नगरदेवळा येथे चिमुकलीने पूर्ण केले रमजानचे२९(रोजे) उपवास.!!!

Image
पाचोरा प्रतिनिधी :- पवित्र रमजान महीन्यात पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा इरफान शेख रऊफ याच्या मुलगी व अंशरा शेख यांनी रोजे पूर्ण केले आहे.  सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हात पहाटे सकाळी चार वाजेला सहेरी जेवन करुण ते सायंकाळी सात वाजे पर्यंत ना अन्न ना पाणी घेता उपासी पोटी राहून अंशरा शेख यांनी अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. सध्या नगरदेवळा शहराचे तापमान ४० ते ४२ अंश से तापतानाची पातळी बघावयास मिळत आहे. इतक्या उन्हात सामान्य माणसाला बाहेर फिरणे कठीण आहे. लोकाना उन्हाचा त्रास होत आहे. इतक्या कठीण परिस्थितीत रखरखत्या उन्हात चिमुकलीनी अंशरा शेख रमजानचा उपवास यशस्वी रित्या पूर्ण केला आहे. मुलगी वयाच्या ७ व्या वर्षी अंशरा शेख इरफान आपल्या जीवनाचा रमजानचा २९ रोजे पूर्ण केल्याबद्दल गावात कौतुक होत आहे.अंशरा शेख ही शिव सेना ठाकरे गट अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष जिब्बू शेख व अच्चु पैहलवान यांची पुतणी आहे

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती आष्टी यांच्या वतीने रामशेठ मधुरकर यांचा बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

Image
 आष्टी( प्रतिनिधी )  कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून आमदार सुरेश धस यांच्या गटाचे १२ संचालक , माजी आमदार भीमराव धोंडे यांचे समर्थक ०३ संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे ०३ संचालक अविरोध निवडून आले असल्यामुळे कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली आहे नवनिर्वाचित संचालक रामशेठ बाळनाथ मधुरकर यांचा आज शुक्रवार दि.21.04.2023 रोजी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती आष्टी यांच्या वतीने रामशेठ मधुरकर हे बिनविरोध संचालक झाल्या बद्दल कडा कृषी उत्पन्न उप बाजार समिती आष्टी येथील आडत व्यापारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी प्रा.रावसाहेब काळे ,मनोहर कवडे ,गौतम धस ,विठ्ठल राख ,सुनिल कुलकर्णी ,सिध्देश्वर सुनिल ,सचिन शेकटे, तूकाराम म्हेत्रे, संतोष शेकडे , कमलाकर शिंदे , व ईतर व्यापारी उपस्थित होते