Posts

Showing posts from May, 2024

लिंबागणेश येथे कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर जयंती साजरी ; शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृती श्लोकांना विरोध हिच खरी आदरांजली

Image
---- लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे आज दि.३१ मे शुक्रवार रोजी कर्मयोगीनी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ह.भ.प. अनंतकाका मुळे यांनी अहिल्यामाता यांचा जीवनपट उलगडून सांगताना अहिल्यामाता यांच्या शासन व्यवस्थेच्या कालावधीत अनेक धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार केला.धर्मशाळा रस्ते, दवाखाना यांची निर्मिती करताना वस्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार,सोनार, चर्मकार अशा अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना करवसुलीची मर्यादा निश्चित ठरवून दिली त्यामुळे शेतकऱ्यांना जादा शेतसारा द्यावा लागत नसे.शेती पुर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने तलाव, विहीर घाट,कुंडाची निर्मिती केली.यावेळी बाळासाहेब मुळे रमेश गायकवाड, समीर शेख,नाना वाणी यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन बाळासाहेब मुळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.गण...

झाडे लावा झाडे जगवा ही शासकीय योजना न राहता लोकचळवळ झाली पाहिजे:- बळीराम उबाळे

Image
बीड प्रतिनिधी :- सध्या उन्हाळा एवढा कडक झाला आहे की, गेल्या १०० वर्षात जेवढे उन पडले नव्हते तेवढी उष्णता या वर्षात निर्माण झाली आहे. काही भागात ४० ते ५५ पर्यंत उष्णता चा पारा गेला आहे.व त्यामुळे जवळ जवळ देशातील ६० ते १०० व्यक्तीचा मृत्यू उष्माघतामुळे झाला आहे. उष्णता वाढल्यामुळे सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांना झाले आहे. कोचिंग क्लासेस व शाळा कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थि यांनायाचा त्रास होत आहे. उष्णतेमुळे शेतमजूर, कामगार विद्यार्थी व सर्व सामान्य माणसे भोवळ येऊन बेशुद्ध पडत आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या तान वाढला आहे. शेतकऱ्यांची कामेही या उष्णतेमुळे रखडली आहेत. मित्रहो तुम्हाला पुढील नवतरुण व लहान बालकांना जिवंत ठेवायचे असतील तर प्रत्येकानी कमीत कमी २० झाडे लावण्याची व ती जगवण्याची हमी प्रत्येक गावातील, शहरातील नागरिकांनी घेतली पाहिजे त्या शिवाय वातावरणात बदल घडणार नाही. झाडे ही उष्णता ,पाणी याचे शोषण करतात त्यामुळे जमिनीची धूप न होता ओलावा, थंडावा निर्माण होतो. व जमिनीत पाणी साठवण क्षमता वाढते. शासनाने तर प्रत्येक वेळेस झाडे लावून झाडे जगवत आहेत परंतु ते कमी प्रमाणात ह...

बीड जिल्ह्याच्या तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात-जगताप, मुळूक

Image
शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन बीड, प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम पुढाकार घेणारे बीड शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात यासाठी आज दि. 30 में रोजी दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन दिले. याबरोबरच सध्या बीड जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेला पाणी टंचाई तथा जनावरांच्या चाऱ्यासाठी करावी लागत असलेल्या भटकंती बाबत अडचणी मांडल्या. याबरोबरच पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील आणि तातडीने या गंभीर प्रश्नाचे कसे निवारण करता येईल याबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी शिवसेनेच्या वतीने अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यावर प्रशासनाकडून गंभीर्याने दखल घेण्यात येळ आणि सामान्य जनतेला होत असलेल्या पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची तातडीने ...

कु.साक्षी सोमनाथ (बाळासाहेब) राऊत ९४.२० गुण घेवून मिळविले घवघवीत यश

Image
(बीड प्रतिनिधी )संत रविदास प्रतिष्ठानचे बीड जिल्हाध्यक्ष सोमनाथ (बाळासाहेब) राऊत यांची कन्या कु. साक्षी सोमनाथ (बाळासाहेब) राऊत हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत ९४.२० टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. २०२३- २४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्डच्या शालांत परीक्षेत संस्कार विद्यालयाची विद्यार्थीनी कु. साक्षी सामेनाथ (बाळासाहेब) राऊत हिने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ९४.२०टक्के गुण संपादीत करुन यश मिळविल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे. तसेच या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका वृंद या सर्वांचे योग्य मार्गदर्शनामुळे साक्षीच्या यश संपाद‌नासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. तिच्या यशाबद्दल आजोबा बबन राऊत, आजी कुसूम डोईफोडे, आई अर्चना राऊत, वडिल सोमनाथ (बाळासाहेब) राऊत, संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे, प्रभारी अध्यक्ष आप्पा सोंनटक्के, शाम गायकवाड, गणेश शेवाळे, पांडूरंग रामगुडे, विष्णू गायकवाड, पुष्पा वाघमारे आदींनी कौतुक करुन अभिनंद केले.

मोफत त्वचारोग तपासणी शिबिर आणि ५०% सूटचा लाभ घ्यावा - डॉ. पूनम भालेराव

Image
बीड (प्रतिनिधी ) - शहरातील स्किनोवेशन क्लिनिक, स्किन, हेअर अँड लेसर सेंटर, बी.एच.एम.एस. कॉलेजच्या बाजूस, सिद्धी फोटो स्टुडिओ शेजारी, माने कॉम्प्लेक्स रोड, बीड येथे येत्या शनिवार रोजी दिनांक १ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक २० जून २०२४ पर्यंत विविध सुविधांवर ५०% सूट ही देण्यात येणार आहे. या शिबिराचा व सूटचा गरजवंत रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पूनम भालेराव यांनी केले आहे.        या शिबिरामध्ये पिंपल्स (मरूम), वांग, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळे डाग, कोरडी त्वचा, नखांचे आजार, गजकर्ण, पांढरे डाग (कोड), सोरियासिस, स्ट्रेच मार्क (व्रण), त्वचेचे सर्व आजार, सनटेन ट्रीटमेंट, स्कीन टायटनिंग, केस गळती, केसातील कोंडा, केसांची वाढ खुंटणे, हायड्रोफेशियल (ॲडव्हान्स मशीनद्वारे), मायक्रो नीडलिंग, पी.आर.पी. (केसांसाठी व त्वचेसाठी), लेझर मशीनद्वारे शरीरावरील अनावश्यक केसांसाठी उपचार, टॅटू-गोंदण काढणे, केमिकल पिलिंग, मस-चामखीळ काढणे, इत्यादींची तपासणी शिबिरात मोफत केली जाणा...

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा सिमेंटच्या पाण्याने बुजवण्यास सुरूवात

Image
एचपीएम कंपनीने लाजच सोडली अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा सिमेंटच्या पाण्याने बुजवण्यास सुरूवात; थातुरमातुर डागडुजी न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्तीची आवश्यकता :- डॉ.गणेश ढवळे  बीड प्रतिनिधी :- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते केज दरम्यान येळंबघाट गावाजवळ निकृष्ट कामामुळे मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनचालकांच्या गाड्यांचे चाके फसुन वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असुन संबंधित प्रकरणात तातडीने भेगा बुजवण्याचे दर्जेदार काम करण्यात यावे आणि जबाबदार कंत्राटदार कंपनी एचपीएम इन्फ्रा एल एल पी कंपनीला काळ्या यादीत टाकुन जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत नितिनजी गडकरी, अरविंद काळे, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्...

सुरेश कुटे यांना तात्काळ अटक करा-वर्षाताई जगदाळे

Image
बीड ... मागील सहा महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव अर्बन मल्टीस्टेट चे संचालक सुरेश कुटे यांनी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांना फक्त ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले. नेहमीच ठेवी परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव ,नेकनूर व बीड येथे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्यापही पोलीस यंत्रणा सुरेश कुटे यांना अटक करू शकले नाही. निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या सारखे कुटे पळून जाण्याची वाट बीडची पोलीस यंत्रणा पाहत आहे का. तत्काळ सुरेश कुटे यांच्यासह सर्व संचालकांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना आर्थिक संकटात टाकून नाम निराळे झालेले सहा महिन्यापासून आश्वासन तारीख पे तारीख देणारे सुरेश कुटे यांच्या यांच्या विरोधात 420 कलम सह वित्तीय संस्था मधील हितसंबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. नेकनूर, बीड ,माजलगाव सह इतर ठिकाणीही गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू असून सुरेश कुटे पोलीस यंत्रणेला चकवा देत इत...

परचुंडी तालुका परळी वैजनाथचा युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे ‘एमपीएल’मध्ये चमकणार

Image
कोल्हापूर टस्कर संघामध्ये निवड परळी ता. 29 ः शहरातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे यंदाच्या महाराष्ट्र प्रिमियम लिगमध्ये (एमपीएल) चमकणार आहे. कोल्हापूर टस्कर संघात भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली भूषण खेळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आयपीएल’च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमियम लीगचे गेल्या काही वर्षांपासून आयोजन केले जात आहे. यंदा दोन जूनपासून सुरू होणाऱ्या ‘एमपीएल’मध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजी किंग्ज, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर, पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स संघांचा समावेश आहे. परचुंडी तालुका परळी वैजनाथ येथील भूषण नावंदे याची पुनीत बालन प्रायोजक असलेल्या कोल्हापूर टस्कर या संघामध्ये निवड झाली आहे. केदार जाधव यांच्या नेतृत्वाखालील संघात अंकित बावणे यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यात भूषण याची वर्णी लागली आहे. भूषण याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. सय्यद मुश्‍ताक अली सराव शिबिरात त्याची निवड झाली होती. भूषण लंडन येथे क्लब काऊंटी स्पर्धेमध्ये अनेक वेळा क्रिकेट खेळला आ...

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर

Image
उत्तर अमेरिकेतील 'आंबेडकराईट असोसिएशनचा' विशेष पुरस्कार प्रदान चिपळूण प्रतिनिधी - दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील "आंबेडकराईट असोसिएशन " या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला . आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे . ज . वी. पवार यांच...

मी शेवगावकरचा दणका मोडला नगरपरिषद शेवगांव ला फसवणाऱ्या भामट्या पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर चा मनका

!!! मी शेवगावकरचा दणका मोडला नगरपरिषद शेवगांव ला फसवणाऱ्या भामट्या पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर चा मनका !!!  एक कोटी 56 लाख 60 हजाराची बनावट बँक गॅरंटी आणि किल्ले धारूर तालुका बीड येथील बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याने इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री सुनील कुमार नागरगोजे यांच्यावर नगरपरिषद चव्हाण एकला 420 चा गुन्हा दाखल { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755  याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक- 02/02/2023 रोजी पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रिया सुरु झाली. शेवगाव शहरात नगरपरिषद मार्फत महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानंतर्गत पाणी पुरवठा योजनेची टेन्डर प्रक्रियेची निवेदा "ईद्रायणी कन्स्ट्रक्शन" संभाजीनगर यांनी भरतेवेळी त्यांचे अनुभवाचे कागदपत्र शेवगाव नगर परिषद ता. शेवगाव यांचेकडे जमा केले होते. सदर कागदपत्रांची तपासणी करुन ते पात्र ठरल्याने त्यांचा आर्थीक तक्ता ओपन करण्यात आला. प्राप्त निवेदा पैकी आर्थीक तक्तामध्ये ते सर्वात कमी दराचे असलेने त्यांना दि 12/05/2023 रोजी निवेदा स्विकृती जा. क्र.730/23 दि.12/05/2023 नुसार पत्र देण्यात आले. त्यानुसा...

गटविकास अधिकाऱ्यांकडून कायद्याचं उल्लंघन खाजगी गाडीवर लिहिले महाराष्ट्र शासन असे नाव

Image
    कायद्याचं उल्लंघन करणारा वर कायदेशीर तात्काळ कारवाई करा-महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर आष्टी ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :            शासनामार्फत अधिकारी / कर्मचाऱ्यांना वाहने उपलब्ध करून देण्यात येत असली तरी , काही कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांकडून खाजगी वाहनावर सरकारी नावाच्या पाट्यांचा सर्रास दुरुपयोग होताना दिसून येत आहे .    आष्टी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गरजे हे देखील याला अपवाद नसून ते आष्टी पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून सरकारी वाहन उपलब्ध असूनही खाजगी वाहनाचा वापर करून महाराष्ट्र शासन या नावाची पाटी लावून मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनावर सरकारी नावाची पाठी वापरण्यास सक्त मनाई असताना सुद्धा नियमचा भंग करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आपल्या स्वतःच्या मालकीची खाजगी गाडीवर , गाडी क्रमांक एम एच २३ ए ३७ ७३ या गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून गटविकास अधिकारी राजेंद्र गरजे हे तालुका बाहेर व तालुक्यामध्य...

परळी नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामांना वेग ; मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- नगर परिषदच्या वतीने शहरातील मोठ्या नदी व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मान्सून तोंडावर आला असताना नगरपालिका क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाईच्या कामे वेगाने सुरु आहेत. यासाठी जे.से.बी., ट्रॅक्टर आदी मशनरीसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करुन साफसफई करण्यात येत असल्याची माहिती देऊन यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.          शहरातील नाल्यामध्ये कचर्‍यामुळे पाणी साचु नये आणि नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी येऊ नये यासाठी परळी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडुन मान्सुन पुर्व स्वच्छता कामांना गती देण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्याधिकारी संतोष रोडे व स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, विशाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील विश्वेश्वर डुबे, विलास केदारी, सुरेश वाल्मिकी, राजाभाऊ जगतकर, राजाभाऊ गायकवाड, जेसीबी चालक सिद्धार्थ कसबे, धनराज कसबे व सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने पावसाळ्यापूर्व कामे हाती ...

बीड शहरात दोन हजार वृक्षांची लागवड करणार- अनिलदादा जगताप

Image
गणपती नगर भागात अखंड हरिनाम सप्ताहा मोठ्या उत्सहात संपन्न बीड, प्रतिनिधी -  भरकटलेल्या समाजाला, माणसांना दिशा देण्याचे काम संत-महंत आणि महाराजांसारखी माणसं करतात. महाराजांच्या सांगण्यावरून आज या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता वृक्षारोपण करून होत आहे. आज आपण पाहतोय सर्वत्र वाढत्या उन्हामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिकडं पाहावं तिकडं पाण्याची समस्या उद्भवली आहे. तापमानाचा पारा 43 डिग्रीवर जाऊन पोहचला आहे आणि हा पारा भविष्यात देखील वाढत जाणारा आहे. एका मर्यादेपर्यंतच माणूस तापमान सहन करू शकतो. त्यामुळे वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. म्हणून प्रत्येकाने झाड लावणे आणि ते जगवने काळाची गरज आहे. अध्यात्मच्या या पवित्र वातावरणात महाराज आणि माता माऊलींच्या साक्षीने मी संकल्प करतो की, येणाऱ्या काळात आम्ही बीड शहरात दोन हजार झाडांची लागवड करणार आहोत आणि ती झाड जगवणार देखील आहोत.  काल दि. 27 रोजी बीड शहरातील गणपती नगर भागात वैकुंठवासी गुरूवर्य ह.भ.प. बंकटस्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनी...

रितेश क्षीरसागर चे घवघवीत यश

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ गायकर- यांजकडुन -    घोटी बु!!, ता.ईगतपुरी येथील जनता विदयालयातील विदयार्थी कु.रितेश संतोष क्षीरसागर या इ. १० वी च्या विदयार्थ्याने माध्यमीक शालांत परिक्षेत ९० टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे.   घोटी सारख्या आदिवासी, अतिदुर्गम भागात राहुन त्याने हे सुयश प्राप्त केले आहे.विशेष म्हंणजे यासाठी त्याने कुठल्याही खाजगी शिकवणीचा आर्थिक परिस्थितीमुळे आधार घेतला नव्हता.   दरम्यान आपल्या या यशाचे श्रेय रितेश ने आई ललिता व वडिल संतोष यांना दिले आहे. आई वडिलानीं मोल मजुरी करुन रितेश ला शिक्षणासाठी सातत्याने मदत व प्रोत्साहन दिले आहे.   शिक्षिका श्रीमती मनिषा सोनवणे यांचे त्यास विशेष मार्गदर्शन लाभले आहे.    पुढे जाऊन आपल्याला संगणकीय क्षेत्रात अभियंता ( साफ्टवेयर इंजिनिअर ) बनायचे स्वप्न असल्याचे रितेशने प्रसारमाध्यमाशी बोलतानां सांगितले.    दरम्यान रितेशचे या योगदानाबद्दल अभिनेते तथा विश्वकर्मा संघटनेचे गणेश बोराडे यांचेसह परिचीत नातेवाईक आदीनीं हार्दिक अभिनंदन केले आहे.  माफक दरात...

कामखेडा हायस्कूल चा निकाल शंभर टक्के

बीड (प्रतिनिधी ): तालुक्यातील आदर्श शिक्षण संस्था संचलित कामखेडा हायस्कूल कामखेडा, तालुका जिल्हा बीड विद्यालयाने प्रति वर्षाप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयातून एकूण 33 विद्यार्थी बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्यसह 19 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत अकरा विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयातून सर्वप्रथम कु. नेवडे कोमल गोकुळ 88.20% सर्व द्वितीय कु. भडके अस्मिता अशोक 87.60% व सर्व तृतीय कु. शिंदे आरती विलास 85.80% घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या उज्वल यशाबद्दल जयदत्त अण्णा क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.डॉ. राजू मचाले, कार्यकारी अधिकारी राऊत, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुऱ्हे, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक मोमीन बिलाल, भांडवलकर, मोरे, लेहने, धापसे, शेख, मचाले, श्रीमती. शेख, श्रीमती राऊत, शिक्षकेत्तर कर्मचारी राऊत, शेख तलहा, सर्व कामखेडा, कांबी, पवार तांडा ग्रामस्थांनी व परिस...

लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

Image
  लिंबागणेश :- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील माजी सरपंच अशोक सुंदरराव जाधव ( वय ४४ वर्षे) यांचे आज दि.२८ मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजता बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. सन २०१२ ते २०१७ दरम्यान लिंबागणेश गावचे उपसरपंच असलेले अशोक जाधव गेल्या २ वर्षांपासून आजारी होते. गुरुवार रोजी अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी बेबी,मुलगा शुभम,मुलगी सानिया,भाऊ महावीर,आई शिलावती,वडिल सुंदरराव जाधव असा परीवार आहे.

सफाई कामगारांचे शोषण करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईसाठी नवी मुंबईत अर्ध नग्न आंदोलन सुरू

Image
(मुंबई प्रतिनिधी ) राज्यातील 337 नगरपरिषद नगरपंचायत व 29 महानगरपालिका मध्ये घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांचे बेकायदेशीर शोषण चालू आहे. या संदर्भात सतत आंदोलन केली तरी कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळत नाही. मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या भारत सरकार मान्यता प्राप्त सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकर मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अर्ध लग्न आंदोलनाला सुरुवात केली, असल्याची माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की यासंदर्भात बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत सह राज्यातील सर्व 337 नगरपरिषद/ नगरपंचायत व 29 महानगरपालिकेत अपात्र /बोगस कंत्राटदारांना कामे दिली जातात, ते किमान वेतनासह प्रचलित क...

ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळे

Image
--- लिंबागणेश :- बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधान कारक पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तिव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठला आहे.१४३ धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील लघु ,मध्यम प्रकल्प कोरडे पडल्याने जमिनीतील पाणी पातळी घटल्याने विहिरी, बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने पाणी पातळी खालावल्याने अनेक गाव वाड्या तांड्यावर तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते.ग्रामीण भागातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागते.त्यात महिला आणि लहान बालके यांच्या डोक्यावर हंडे, घागरी,सायकलला अडकवलेली केंड, घागरी व इतर माध्यमातून पाणी मिळवण्यासाठी त्यांची धावपळ दिसुन येते.अलीकडे पुरुष मंडळी घरातील महिलांसोबत पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न मात्र तोकडे पडताना दिसत असुन जिल्हा प्रशासन पाणीटंचाईचा आराखडा वातानुकूलित रुम मध्ये बसुन प्रसारमाध्...

कन्हेरवाडी येथील फर्निचर चालकाची मुलगी कु.यशश्री देविदास रोडे हिने इयत्ता दहावी मध्ये मुलींमध्ये 94 टक्के गुण घेऊन मिळवला बहुमान

Image
सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथील निकालामध्ये 100 टक्के यशाशी परंपरा कायम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील रहिवाशी असलेले रोहिदास देविदास रोडे हे वैष्णवी फर्निचर या नावाने परळी येथे त्यांचे छोटे मोठे लाकडाचे दुकान असून त्यांची मुलगी कुमारी.यशश्री देविदास रोडे ही सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथे शिक्षण घेत होती यावर्षी इयत्ता दहावी या वर्गामध्ये तिने घवघवीत असे यश संपादित करून मुलींमध्ये 94% घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिचा आज 26/05/24 रोजी निकाल लागला असून दहावी या वर्गामध्ये 94% इतके गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे.  यशश्री उर्फ पिऊ हिने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केलेले असून पुढील शिक्षण पाचवी ते दहावी हे सोमनाथ विद्यालय येथे केले आहे तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.धुमाळ सर, वर्ग शिक्षक राजूरकर सर,पाटील सर, थोरात सर ,क्षीरसागर सर,शिंदे सर,शेख सर,आंधळे सर,सरवदे सर,शिंदे मॅडम,साखरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाख...

तुलसी इंग्लिश स्कुलचा दहावीचा १००% टक्के निकाल

गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर यांनी केले अभिनंदन बीड, (प्रतिनिधी ): येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १००% टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी १००% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे आहे.  प्रथम क्रमांक क्षितिज धनवे ९४.००%, द्वितीय क्रमांक आर्या चव्हाण ९३.८०%, तृतीय हर्मिका जगतकर ९२%, आर्यन कोरडे ९२%,दीक्षा सरपते ९२% तसेच सार्थक पोकळे ९१.८०%, शेख झोया ९१.४०%, निशा मस्के ८९.६०%, कृष्णा दबडे ८९.४०%, जिया लोखंडे ८८.६०% निकाल जाहीर झाला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर क्राईम आणि कॉमेडी चित्रपटांचा धमाका

Image
आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अल्ट्रा झकास मे महिन्यात दोन जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहे. क्राईम आणि रहस्याने भरलेला साऊथचा डब चित्रपट ‘अभ्युहम’ म्हणजेच ‘संभ्रम’ २४ मे २०२४ आणि हसून हसून पोट दुखेल असा हॉलीवुड डब कॉमेडी चित्रपट ‘टायगर रोबर्स’ म्हणजेच ‘चोरीचा मामला’ ३१ मे २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.  संभ्रम चित्रपटात आपले वडील निर्दोष आहेत हे कळाल्यावर जयंत त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुरावांचा शोध घेऊ लागतो तर दुसरीकडे चोरीचा मामला चित्रपटात एका वाघीणीचे अपहरण होते तेव्हा तिचा आईसारखा सांभाळ करणारी एक स्त्री एका एजन्सीची मदत घेते. जयंतचे वडील तुरुंगातून सुटतील की नाही आणि वाघीण सापडते की नाही हे त्या त्या चित्रपटात रंजकपणे कळणार आहे.   “ भाषेचे सर्व अडथळे तोडून दोन वेगळ्या संस्कृतींचे चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे. रसिक प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट नक्कीच आवडतील अशी आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. 

कु. आकांक्षा नितीन जोगदंड हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

Image
बीड दि.२७ (प्रतिनिधी ) द.बा.घुमरे, धांडे नगर बीड ची विद्यार्थिनी कु. आकांक्षा नितीन जोगदंड हिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना ८९.८०% गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. कु.आकांक्षा नितीन जोगदंड ही बीड योगभूषण चे संपादक नितीन जोगदंड यांची कन्या आहे. तिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ८९.८० % टक्के मिळवले आहेत. तिच्या या यशासाठी आई अर्चना जोगदंड, आजोबा दिलीप जोगदंड, आजी शकुंतला जोगदंड यांचे विशेष परिश्रम घेतले आहे. आकांक्षा ने कसलीही टिवीशन न लावता अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून हे यश मिळवले आहे. कु.आकांक्षा हिने इंग्रजी या विषयात ८६, मराठी ७९, हिंदी ८२, गणित ९५, सायन्स अँड टेक्नलॉजी ९४ आणि सोशल सायन्स ९२ असे गुण मिळवत एकूण ५०० पैकी ४४९ गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल द.बा.घुमरे शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह सर्व पत्रकार बांधव आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

कु.स्नेहल विष्णु मुंडे हिने 10 बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के गुण घेत यश संपादन

Image
परळी प्रतिनिधी - राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत टोकवाडी गावची रहिवासी व विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहल विष्णू मुंडे हिने 97 टक्के गुण घेत दहावी बोर्डाच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. कु.स्नेहल विष्णु मुंडे ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थीनी आहे. तिने शालेय स्तरावर अनेक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. जिद्द मेहनत, चिकाटी च्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. विद्यावर्धिनी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले गुण पुढील प्रमाणे मराठी 92 संस्कृत 97 इंग्रजी 92 गणित 96 विज्ञान 96 समाज विज्ञान 94 गुण मिळवले आहेत, एकूण 500 गुणा पैकी तिला 475 + 10 एकूण 97% गुण मिळवलेले आहेत. तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.व तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देखील देण्यात आले आहे.

कु. हार्मीका बालाजी जगतकर हिचे दहावी बोर्ड परिक्षेत उत्तुंग यश

Image
बीड प्रतिनिधी:- तुलसी इंग्लिश स्कुल बीडची विद्यार्थिनी कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने राज्य माध्यमिक शालांत परिक्षेत 91.80 टक्के गुण घेवून प्रथमश्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेमध्ये 91.80% गुण घेऊन उत्तुंग यश संपादित केले आहे. कु.हार्मिका ही तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ.उमाताई जगतकर व बीड अक्षरधामचं संपादक प्रा.बालाजी जगतकर यांची कन्या आहे.कु.हार्मिका हिने अथक परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास करून घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.कु. हार्मिका ही खूप गुणवान असून लहानपणापासून विविध स्पर्धा परिक्षेतही तिने यश संपादन केले आहे. कु.हार्मिका हिने इंग्लिश विषयात 71, मराठी 84, हिंदी 84, गणित 93, सोशल अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी 95, सोशल सायन्स या विषयात 88 मार्क असे 500 पैकी 444 मार्क घेतले आहेत. तिच्या या यशाबद्दल तुलसी इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त,खते व बियाणे मुबलक उपलब्ध करा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन

Image
बीड जिल्ह्यातील बोगस व कृत्रिम बियाण्याची व खतांची टंचाई करून विक्री करणाऱ्या घोटाळा खोरांवर नियंत्रण ठेवा माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी   मुख्यमंत्री, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त,खते व बियाणे मुबलक उपलब्ध करा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन   बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे खते व अवजारे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे परंतु बीड जिल्ह्यातील मागील इतिहास पाहता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे, शेतकऱ्यांना बियाणे बोगस मोठ्या प्रमाणात विकण्यात आले होते व खतेही बोगस देण्यात आलेले आहेत तरी यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात आलेली नसून यावर्षी ते वेळीच नियोजन करण्यात यावे, शेतकऱ्यांना मागेल त्या कंपनीचे बियाणे देण्यात यावे व मुबलक खते उपलब्ध करून द्यावे , बोगस ब्याने व खत विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे असे आढळल्यास किंवा शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्या दुकानावर कंपनीवर किंवा व्यापाऱ्यावर तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यात यावे मागील वर्षी संपूर्ण खते व बियाणे वि...

दाऊदपूर येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण प्रकरणी काचगुंडे बंधुवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

अद्याप आरोपी मोकाट,परळी ग्रामीण च्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष  परळी प्रतिनिधी - बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील दाऊतपूर या गावात मागासवर्गीय लोकांवरती अन्याय व अत्याचाराची घटना घडली आहे, मागासवर्गीय कुटुंबातील चार युवकाला, जातिवाच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये भादवी 324, 504 ,505, 34,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत 3(1)( r), 3(2)(पाच‌) तसेच 3(2)(vs) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाऊतपुर येथील गावगुंड ज्यांच्यावर या अगोदर 302 सारखे गुन्हे व औष्णिक विद्युत केंद्रात ब्लास्टींग करण्यासारखे गुन्हे नोंद आहेत. अशा गुंड लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यांना तात्काळ अटक करून योग्य कारवाई मागणी करण्यात आली आहे. दाऊदपुर येथील चार जनावर गुन्हा नोंद झाला आहे त्यातील आरोपी मारुती उत्तम काचगुंडे, ज्ञानदेव बाबुराव काचगुंडे, खंडू उत्तम काचगुंडे, वैजनाथ बाबुराव काचगुंडे व त्यांचे सहकारी यांनी जातिवाचक शिवागाळा करून जीव...

सौ.संध्या नागुरे (चौधरी) यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान

Image
परळी वैजनाथ/प्रतिनिधी येथील विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. संध्या नागुरे (चौधरी) यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय परळी वैजनाथ येथील उपक्रमशील शिक्षका सौ. संध्या विश्वनाथ नागुरे यांना महाराष्ट्र शिक्षण पॅनल (एमएसपी) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार नाशिक येथील गुरूदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षण फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकिकरण्यासाठी, राष्ट्रनिष्ठा समाजनिष्ठा ज्ञाननिष्ठा विद्यार्थी निष्ठेपाई कार्य करणार्‍या शिक्षक शिक्षकांचा नाशिक येथे 24 मे रोजी आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल बीड जिल्हा जिल्हा समन्वयक वैशाली अकुस्कर (बुरांडे) यांची प्रम...

शिवरस्ता जेसीबीने खोदून अडवला; तहसिल प्रशासन डोके फुटण्याची वाट बघतंय का? पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील प्रकार

Image
शिवरस्ता जेसीबीने खोदून अडवला; तहसिल प्रशासन डोके फुटण्याची वाट बघतंय का? पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील प्रकार :- डॉ.गणेश ढवळे   पाटोदा:- दि.२६. पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही शिवारातील गट क्रमांक २५४ मधिल वैद्यकिन्ही ते वैजाळा रस्त्यावरुन वैद्यकिन्ही वैजाळा शिवावरुन पश्चिमेकडे जाणारा रस्ता हरिदास सोपान खुळे आणि विक्रम किसन काळे यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन अडवला असुन तक्रारदार पिराजी उत्तमराव शिंदे यांच्या लेखी तक्रारीनंतर वर्षभरापूर्वी पाटोदा मामलेदार न्यायालयात तहसीलदार रुपाली चौगुले यांनी प्रतिवादी यांना वारंवार नोटीस बजावुनही न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने मामलेदार अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार प्राप्त आधिकारांचा वापर करत अर्जदार पिराजी शिंदे यांचा अर्ज अंशतः मान्य करत वैद्यकिन्ही -वैजाळा दोन गावच्या शिवबांधालगतची जमिन उप अधिक्षक भुमी अभिलेख पाटोदा यांच्याकडुन मोजणी करून घेऊन हद्दी खुना निश्चित करून मंडळ अधिकारी दासखेड यांना उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय पाटोदा यांच्या कडुन निश्चित करण्यात आलेल्या हद्दी व खुना नुसार सदरील रस्ता तात्काळ खुला करण्य...

अवैध हातभट्टी दारू विक्रीची दुकाने बंद व्हावी या नागरिकांची बैठक

Image
संभाजीनगर व शहर पोलीस ठाणे येथील पी.एस.आय. यांची घेतली शिष्टमंडळाने भेट परळी प्रतिनिधी - कालरात्री देवी मंदिर परिसरा असलेल्या साठेनगर, भिमनगर या भागात खुले आम, पोलिसांच्या नाकावर टिचुन, राजरोस पणे, मोठ्या प्रमाणात अवैध्य हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असून दहा ते पंधरा जण हा व्यवसाय करतात, या सर्वांची नावे व पत्ते देण्यात आला. या भागातील तरुण स्वस्तातली हातभट्टी दारू पिऊन व्यसनाधीन झाला आहे, यामुळे त्याला अनेक आजार होत आहे, अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहे, व्यसनाधीनते मुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, या अवैद्य हातभट्टी दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी येथील या भागातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन जिजामाता उद्यान येथे व्यापक बैठक घेतली. बैठकीमध्ये विचार विनिमय करून, सर्वानुमते तात्काळ हातभट्टी अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली. दुपारी ही बैठक पार पडल्यानंतर सायंकाळी सर्वानुमते शिष्टमंडळ परळी शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या भेटीसाठी गेले व त्यांनी सविस्तरपणे या भागात होणाऱ्या अवैध हातभट्टी दारू विक...

जीबीएस आजार अत्यंत दुर्मिळ, चर्चा मात्र गंभीर!

Image
जीबीएस आजार अलीकडच्या काही दिवसात जाम चर्चेत आला आहे. वास्तविक पाहता जीबीएस आजार हा अत्यंत दुर्मिळ आहे. लाखो-करोडो लोकांमधून एखाद्यालाच हा आजार होतो, असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय हा आजार काही नवीन नाही, बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहे. अलीकडील काही दिवसात या आजारावर चर्चा मात्र अतिशय गंभीरपणे होत आहे. म्हणून या आजारावर हा लेख प्रपंच. कृपया संपूर्ण लेख आवर्जून वाचावा. बहुतेक या आजाराविषयी होत असलेली चर्चा व भीती दूर होईल. ---------------------------------------- आजार कोणताही असो वेळीच औषधोपचार घेतल्याने तो निश्चितपणे बरा होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कृपया जीबीएस आजाराचं कोरोना सारखं बाऊ करू नका. घाबरून जाऊ नका. लक्षणे दिसून आल्यास वेळीच तपासण्या करून उपचार करून घ्या. तसे पाहता जीबीएस हा आजार काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो अस्तित्वात आहे. हे आपण युट्युब वर किंवा गुगल वर जाऊन पाहिले तर सहज दिसून येईल. गेल्या काही वर्षात युट्युब वर या आजाराविषयी अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आपल्याला दिसून येतील. तसेच गुगल वर सुद्धा याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. आपण या ज...

नाशिकहून हजारो शिवभक्त शिवराज्यभिषेक सोहळ्याला राहणार उपस्थित

Image
          दुर्गराज रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या ०६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे.   रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिकहून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहे .नाशिकच्या शिवभक्तांना होळीचा माळ येथील व्यवस्थापन नियोजन जबाबदारी देण्यात आली असून त्याबाबत नियोजन करण्यासाठी आज नाशिक येथे कालिका देवी मंदिर सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.यात नाशिकचे नियोजन करण्यासाठी शिवप्रेमीची समिती केली असून वाहतूक ,पार्कींग,भोजन आदी बाबत माहितीसाठी संपर्क करून सहकार्य व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. यात डॅा.रुपेश नाठे,ज्ञानेश्वर थोरात,उमेश शिंदे ,रोशन खैरे , विजय खर्जुल , नितीन पाटील,सागर पवार, ललीत उशीर , समाधान चव्हाण, समाधान मते , समाधान जाधव , वंदना कोल...

पैठण ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पालखीमार्ग नव्हे मोक्षमार्ग ; जन आंदोलनाचा ईशारा :-डॉ.गणेश ढवळे

Image
---- पाटोदा:- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातुन जाणारा जाणारा पैठण ते पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ एकुण ६७ किलोमीटर लांबीचा असुन आष्टी पाटोदा मतदान संघातुन जात असुन परळी येथील केशव आघाव यांच्या तिरूपती कन्स्ट्रक्शन मार्फत रस्त्याचे काम ४-५ वर्षांपासून सुरू असुन अजुनही पुर्णत्वास गेलेले नाही मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाटोदा शहर ते घुमरा पारगाव दरम्यान रंदवेवस्ती याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असुन दुचाकी वाहनांचे टायर भेगात अडकून वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.या सुमार दर्जाच्या कामास जबाबदार कंत्राटदार तिरुपती कन्स्ट्रक्शन व या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, पाटोदा तालुका कार्याध्यक्ष पत्रकार शेख जावेद, तालुकाध्यक्ष हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अरविंद काळे, प्रकल्प संचा...

कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांचे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
धारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतली कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांचे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बीड (प्रतिनिधी ) - जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतली आहे. कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सर्वे नं. ६२२, ६२३ मौजे धारुर ता. धारुर जि. बीड येथील अकृषी परवानगी नं. २०१२/मशाका/जमा २ अकृषि प/सिआर/ ११ दि.०४.०६.२०१२ रोजीचा अकृषी परवाना रद्द करण्यात यावा. दिलीप हरिनाथ कोमटवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अकृषी परवाना मिळणे बाबत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या पुर्णपणे चौकशी कार्यवाही झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर अटी व नियम घालुन देवून दि.०४.०६.२०१२ रोजी अकृषी परवाना मंजुर केला आहे. परंतु सदर अकृषी परवाना मंजुर करतेवेळी संबंधीत महसुल अधिकारी यांनी सदर परवाना देणे बाबत काही अटींची पुर्तता होत नसल्याने त्या खऱ्या व कायदेशीर वस्तुस्थिती लपवल्या आहेत...

जाती-अंताच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेणारे,कर्मवीर -एकनाथ आवाड“जिजा

Image
जाती-अंताच्या चळवळीला जागतिक स्तरावर नेणारे,कर्मवीर -एकनाथ आवाड“जिजा”.... 25 मे ही कर्मवीर एकनाथराव आवाड - ज्यांना प्रेमाने “जिजा” म्हटले जाते – ह्यांचा स्मरणदिवस. जिजांना जाऊन आज 9 वर्ष होत आहेत परंतु ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे’ ह्या उक्तीनुसार ते आजही आपल्याला प्रेरणा देत आपल्या सोबत आहेत. मांग जातीच्या पोतराजाच्या एका साधारण कुटुंबात जन्मलेली एक व्यक्ति हलाखीच्या परिस्थितीत शिकून, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अवलंब करून, जाती-अंताची व त्याद्वारे सामाजिक समतेची मशाल लाखों वंचितांच्या हातात देवून जातो हे जितके खरे आहे तितकेच कल्पना करण्यापलिकडलेही आहे! मला माझ्या अभ्यासाच्या योगाने जिजांनी 1989 साली स्थापन केलेल्या ‘मानवी हक्क अभियान’ ह्या संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी, शेकडो दलित आणि वंचित परिवार ज्यांच्या आयुष्याला जिजारूपी परिसाचा स्पर्श झाला त्यांचासोबत वेळ घालविण्याचा योग आला. मी माझे अनुभव कथन माझे 6 वर्षापासूनचे अमेरिकेतील वास्तव्य, माझ्या जमीन आणि जात ह्या संबंधातील पुस्तकी अभ्यास आणि मराठवाड्यातील क्षेत्र भ्रमण ह्या आधारे केले आहे. बाबासाहेब आंबेडकरां...

नितीन काळे यांचा मृतदेह तलावात फुगून आला वर

Image
येवता प्रतिनिधी :दि.२४केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दि.२३- गुरुवारी दुपारी १२ वाजता मासे धरण्यासाठी गेले नितीन मच्छिंद्र काळे वय-३४ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना पोहता येत होते!परंतू ते मासे पकडण्यासाठी पोहत जाताच त्यांचा मृत्यू झालेचे प्रथम समयी माहिती वरून दिसून आले.मृत्तदेह शोधन्यासाठी परळी-वै.येथील बचावकार्य पथकास पाचारन केले.परंतू २३ तासा नंतर नितीन काळे यांचा मृतदेह आपोआप तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसताच येथील स्थानीक मासेमारी करनारे पांडुरंग मारूती चुंबळे व बचावकार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढला,केज पोलीस स्टेशन अंतर्ग विडा बिटचे राजु वंजारे व शेख समीन पाशा यांनी प्रेताचा पंचनामा केला,यावेळी गुरूवार रात्री केज तहसीलदार अभिजीत जगताप चार तास घटनास्थळी तळठोकून दाखल,तलाठी उत्तरेश्वर घुले,ग्रामविकास अधिकारी महिंद्र मुंडे,शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नंतर प्रेत ग्रामीण रुग्णालय,विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व दुपारी ठिक ०३:०० वाजता त्यांच्या मुळ गावी जिवाची वाडी येथील शमशानभुमी येथे संत्य...