Posts

Showing posts from October, 2025

१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती — पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार; डॉ. गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा

Image
१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती — पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार; डॉ. गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा बीड – प्रतिनिधी(दि.०१ ) तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून, प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते, त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बसस्थानकात उभे राहावे लागले. जून २०२५ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे; शौचालय बांधले असले तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच बसस्थानक परिसरात पथदिवे बंद असुन योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचेप्रकार आढळून आले आहेत. गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत. संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत अ...

"शेतकऱ्यांचं दुःख सरकारला जाणवतं”! मुख्यमंत्री सावंत यांचा अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

"शेतकऱ्यांचं दुःख सरकारला जाणवतं”! मुख्यमंत्री सावंत यांचा अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा राज्य शेतकरी आधार निधी योजनेअंतर्गत प्रति हेक्टर ₹४०,००० मदत; डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार पणजी, ऑक्टोबर २०२५ : दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मुसळधार पाऊस झाला असून या हंगामात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शेतकरी आधार निधी योजनेअंतर्गत भरपाई मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. पीकाचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी वेळेवर आर्थिक मदत देणे आणि पुढील कृषी चक्रासाठी शेतकऱ्यांना बळकटी देणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.  “प्रत्येक शेतकरी गोव्याच्या समृद्धीचा कणा आहे. आमचे सरकार प्रत्येक गोव्यातील शेतकऱ्याच्या गरजेच्या वेळी त्यांच्यासोबत उभे आहे. पीक गमावल्याचे दुःख आम्हाला समजते आणि आमच्या शेतकरी समुदायाला वेळेवर मदत आणि आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.  या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹४०,००० मिळतील, ज्याची कमाल मर्यादा चार हेक्टरसाठी ₹१.६ लाख असेल. डिसेंबर...

गोव्याचे कचरामुक्तीच्या दिशेने पाऊल! एप्रिल २०२६ पासून ठेव परतफेड प्रणाली लागू; प्लास्टिक, काच, ॲल्युमिनियमचा पुनर्वापर होणार

Image
गोव्याचे कचरामुक्तीच्या दिशेने पाऊल! एप्रिल २०२६ पासून ठेव परतफेड प्रणाली लागू; प्लास्टिक, काच, ॲल्युमिनियमचा पुनर्वापर होणार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा पर्यावरण संवर्धनात घडवतोय नवा इतिहास पणजी, ऑक्टोबर २०२५ : स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्याकडे एक ऐतिहासिक पाऊल उचलत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार एप्रिल २०२६ पासून ठेव परतफेड प्रणाली (DRS) लागू करण्यास सज्ज आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारने उत्पादक, कचरा उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालकांसह सर्व भागधारकांना www.goadrs.com वर नोंदणी करण्यासाठी आणि या परिवर्तनकारी मोहिमेत सक्रिय भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.  गोव्याने DRS लागू करणारे भारतातील पहिले राज्य आणि सर्वात आव्हानात्मक पॅकेजिंग साहित्यांपैकी एक, मल्टी लेयर्ड पॅकेजिंग (MLP) पर्यंत ते विस्तारित करणारे जगातील पहिले राज्य बनून इतिहास घडवला आहे. हा टप्पा गोव्याची शाश्वततेसाठीची दृढ वचनबद्धता आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनात उदाहरण म्हणून नेतृत्व करण्याचा त्यांचा संकल्प प्रतिबिंबित करतो.  डीआरएसच...

"वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाला 15 ग्रंथाचे दान,आयु. माया दिवाण-सोनवणे यांच्या कडून दान पारमीतिचे पालन

Image
( लेख) "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाला 15 ग्रंथाचे दान,आयु. माया दिवाण-सोनवणे यांच्या कडून दान पारमीतिचे पालन    तथागतांनी उपदेशीलेला पंचशील,अष्टांगिक मार्ग व दहा पारमिते नुसार जीवनात आचरण केल्यास माणूस दुःख मुक्तीच्या मार्गाने जातो हे समजून घेण्याकरता वाचन,पूज्य भिक्खूंच्या देसना समजून घेणे हा मार्ग आहे. लहानपणापासूनच मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून सतत प्रयत्नशील असलेल्या व त्या उद्देशानेच वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाचे 40 केंद्र स्थापन करणाऱ्या आयु.डी.जी वानखेडे बाबा यांच्या मित्र नगर मधील मोफत वाचनालयाला "रमाई" चरित्र ग्रंथ; लेखिका आयु माया दिवाण- सोनवणे तर्फे 15 ग्रंथ वाचनालयाला दिले.त्यांचा उपयोग मुलांना,पालकांना वाचण्याकरिता वाचनालयातर्फे करण्यात येणार आहे. वाचनालयांनी 2016 पासून आतापर्यंत 40 केंद्र शहरातील व बीड परिसरातील तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात स्थापन करून त्यामध्ये 3000 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे. या वाचनालयाचे समाजउपयोगी कार्य बघून आतापर्यंत प्रो.डॉ. उपप्राचार्य उत्तमराव साळवे, प्रो. डॉ. मनोहर सिरसाट,शिक्षण अध...

बीड नगरपरिषद निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेस कार्यालयात अर्ज करावेत- परवेज कुरेशी

Image
बीड प्रतिनिधी - काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहूल गांधी, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील,माजी मंत्री अशोकराव दादा पाटील, आदित्य दादा पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या आदेश व सूचनेवरून बीड नगरपरिषद निवडणुकी करीता इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेस कार्यालयात अर्ज करावेत असे परवेज कुरेशी यांनी पत्रकार द्वारे कळवले आहे.  बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता शहरातील नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात उमेदवारी करिता अर्ज करावेत. नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष पदांकरिता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी १ नोव्हेंबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या कार्यकालात अर्ज घ्यावेत. उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्ष शहर कार्यालय,फिनिक्स हॉस्पिटल जवळ जालना रोड बीड येथे करावे.कार्यकालात अर्ज घेऊन पुन्हा तो परवेज कुरेशी शहराध्यक्षयांच्याकडे जमा करावयाचा आहे. १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळ...

चौसाळा जिल्हा परिषद गटात लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या नावाची चर्चा

Image
(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गटात लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन चौसाळा जिल्हा परिषद निवडणुक लढवावी म्हणून गावोगावी वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यामध्ये जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे चौसाळा सर्कलचा प्रलंबित विकास करण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार असल्याची चर्चा दिसत आहे गोरगरीब लोकाना सढळ हाताने मदत करणारे प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुखात सामील होणारे समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग असलेले लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांच्या पाठिशी सर्वसामान्य जनतेची मोठी ताकत असुन अनेक गावातील विकासकामे मार्गी लावलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक कार्यामुळे आणी सर्वसमावेशक व्यक्तिमत्वामुळे लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड साहेब यांना चौसाळा जिल्हा परिषद गटात मतदारांची पसंती मिळत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे त्यांच्याकडे युवकांची लोकप्रियता कायम असल्याने त्यांनी चौसाळा जिल्हा परिषदेची निवडणुक लढवावी अशी मागणी सर्वसामान्य मतदारातुन होत आहे

बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलनाला पाठिंबा; लिंबागणेश येथे निदर्शने

Image
बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलनाला पाठिंबा; लिंबागणेश येथे निदर्शने — डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि. ३० ) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह विविध शेतकरीविषयक मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. “आपला भिडू बच्चु कडू! शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, बच्चु भाऊ तुम आगे बढो — हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला . सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; मात्र ते आश्वासन हवेतच विरले, असा आरोप या निदर्शनातून करण्यात आला. दिलेले आश्वासन तातडीने पाळावे आणि विनाकारण चर्चेचे गुऱ्हाळ लांबवू नये, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रात दररोज १०-१२ शेतकरी आत्महत्या करत आह...

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषद आली धावून

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मल आयडी व केवायसी प्रक्रियेमुळे अनुदान मिळण्यात अडथळे येत असल्याने पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तहसीलदार साहेबांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ वेळेवर मिळावेत, यासाठी केवायसी व फार्मल आयडी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली. तहसीलदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव तसेच पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

पाटोदा डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्यावतीने डॉ. संपदा मुंडे घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा तीव्र निषेध पाटोदा तालुक्यातील डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्यावतीने करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच अशा अमानवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.या संदर्भात डॉक्टर असोसिएशन व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटोदा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना प्रमुख उपस्थितीत डॉक्टर, शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.या वेळी वक्त्यांनी म्हटले की, “महिला डॉक्टरवर झालेली ही घटना अत्यंत संतापजनक असून संपूर्ण वैद्यकीय व सामाजिक क्षेत्र या घटनेने हादरले आहे. शासनाने आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी.”या निषेध आंदोलनात पाटोदा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी डॉक्टर,व किसान सभेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संशयास्पद रित्या मृत पावलेली डॉ.संपदा मुंडे यांना मरणोपरांत न्याय मिळावा

Image
संशयास्पद रित्या मृत पावलेली डॉ.संपदा मुंडे यांना मरणोपरांत न्याय मिळावा एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन बीड प्रतिनिधी  : जिल्ह्यात व राज्यात महिलां-मुली-बालिकांवरील अत्याचाराच्या अनेक घटना नित्याने घडत आहेत ,याकडे शासन -प्रशासन जबाबदारीने गंभीर नाही. महिलांना सर्व ठिकाणी सुरक्षितता असणे,यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ,परंतु डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्या (की हत्या) करायला भाग पडणारी यंत्रणा- जी पोलिस अधिकारी, आरोग्य अधिकारी व राजकिय लोकांच्या दबावामुळे संपदाच्या झालेल्या हत्या याची गंभीरतेने दखल घेणे व सध्या समाजात आरोपींची वाढलेली गुंडप्रवृत्ती दिसते. या घटनेचा निषेध व्यक्त करत 'एकल महिला संघटना' च्या वतीने बीडच्या लेकीला- डॉ संपदाला मृत्युत्तोर तरी न्याय मिळावा; यासाठी खालील मागण्या करण्यात आल्या... राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था रसातळाला गेली असून फलटण येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी खा.निंबाळकर याना क्लीनचिट दिल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. पी...

आष्टी तालुक्यातील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना तात्काळ पुनस्थापित करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ३१ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :                    आष्टी तालुक्यातील कामधेनू म्हणून ओळख असलेल्या कारखाना येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळांनी कर्ज भरून पुन्हा कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करून कारखान्याचे यंदा धुराडे पेटवण्याच्या दृष्टीने वेगाने कामकाज सुरू केले. मात्र राज्य/ केंद्र सरकारने परवाना रद्द केल्याने परवाना पुनस्थापित करण्याच्या मागणीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकरी, उत्पादक शेतकरी, सभासद ,संचालक मंडळ यांचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ शुक्रवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी/ पोलीस अधीक्षक यांच्याकडे २७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात दिला.   निवेदनात पुढे सांगितले की, महेश सहकारी साखर कारखाना बीड /अहिल्यानगर /धाराशिव /७ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा वर्ग या कारखान्यावर अवलंबून असून मोठ्या प्रमाणावर दुष्काळी आष्टी म्हणून ओळखल्या ज...

भ्रष्टयंत्रणेमुळे पाटोदा पंचायत समितीत वर्षात तीन अधिकारी बदलून गेले नवीन आलेले बीडीओ सानप साहेबांसमोर भ्रष्टाचारावर लगाम लावणे,शिस्त व पारदर्शकतेचं मोठं आव्हान

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील पंचायत समितीत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनातील भ्रष्टाचार, कामचुकारपणा आणि गैरव्यवहारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भ्रष्ट यंत्रणेला वैतागून मागील एका वर्षात तब्बल तीन बीडीओ बदलून गेले, परंतु स्थिती पूर्वीप्रमाणेच कायम आहे. अशा पार्श्वभूमीवर नुकतेच कार्यभार स्वीकारलेले नवीन बीडीओ सानप साहेब यांच्याकडून आता सर्वसामान्य जनतेत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शासकीय वेळेत अनेक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात, तर काहीजण आपली कामे करण्यासाठी अनावश्यक विलंब करतात. विशेषतः इंजिनियर विभागात “दामाशिवाय काम नाही” अशी प्रथा जणू सर्वमान्य झाली आहे. ग्रामविकासाच्या योजनांपासून ते रस्त्यांच्या कामांपर्यंत सर्व ठिकाणी भ्रष्टाचाराचे सावट असल्याचे चित्र दिसून येते.अनेक वेळा नागरिकांनी पंचायत समितीकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता लोकांच्या नजरा नवीन बीडीओ सानप साहेबांकडे वळल्या आहेत. त्यांच्याकडून कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, भ्रष्ट यंत्रणेला लगाम घालणे आणि पारदर्शक ...

साई धाव ना ... या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी   भूषण सरदार दिग्दर्शित व वैशाली सोनवणे आणि भूषण सरदार निर्मित साई धाव ना या मराठी गाण्याच्या शूटिंगला जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सुरुवात करण्यात आलेली आहे या गाण्याचे लेखक गोरक्षनाथ वाघमारे व सोपान महाराज असून या गाण्याला लिरिक्स सोपान महाराज यांनी दिला आहे या गाण्यांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आर्यमेघ सरदार व प्रसिद्ध अभिनेत्री काव्या साळवे पाहायला मिळणार आहे  या गाण्याचे कोरिओग्राफर मयूर माळी असून कॅमेरामन आकाश महाजन हे आहेत या गाण्याच्या सहाय्यक दिग्दर्शक अश्विनी सांगळे असून सहाय्यक निर्माता सतीश नारायण शिंदे आहेत या गाण्यांमध्ये बालकलाकार म्हणून ओमी चौधरी यांची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे साई धाव ना हे गाणे प्रसिद्ध गायक पप्पू मोरे यांनी गायले आहे तसेच सहाय्यक कलाकार म्हणून देविदास महाजन हा आदित्य वानखेडे सौरव शेलारे सोपान महाजन भूषण सरदार हे कलाकार या गाण्यांमध्ये पाहायला मिळणार आहे या गाण्याला विशेष सहकार्य सोनू पटेल ( सोनू खानदेशी ) व सागर हरणे यांच्या आहे गाण्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून लवकर चे गाण...

मौजे चन्हाटा गावात धार्मिक संपत्तीचा अपहार; सार्वजनिक मस्जिद पाडून बेकायदेशीर विक्री – मुस्लिम समाजात तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

Image
बीड – ( दि.२८ ) प्रतिनिधी तालुक्यातील मौजे चन्हाटा गावात धार्मिक संपत्तीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील सार्वजनिक मस्जिद पाडून तिच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजात तीव्र संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ग्रामस्थ शेख युनुस महेबुब यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे दिलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की, मौजे चन्हाटा येथील मिळकत क्रमांक ३४१ ही जागा ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये ‘सहन नामा’ म्हणून नोंदवलेली होती. त्या ठिकाणी वर्षानुवर्षे सार्वजनिक मस्जिद अस्तित्वात होती, जी स्थानिक मुस्लिम समाज उपासनेसाठी वापरत होता. मात्र, ग्रामसेवक आणि शेख शब्बीर यांनी संगनमत करून त्या मस्जिदीचे बेकायदेशीर पाडकाम केले आणि सुमारे तीस हजार रुपयांत ती जागा एका खाजगी व्यक्तीस विकल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या कृतीमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नसून ग्रामपंचायत रजिस्टर व सरकारी अभिलेखांचा गंभीर गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण व्यवहा...

पाटोदा पत्रकार अध्यक्ष अजय जोशी यांनी आर.डी.सी. शिवकुमार स्वामी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या केवायसी व अनुदान विषयावर चर्चा

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष अजय जोशी यांनी आर.डी.सी. शिवकुमार स्वामी साहेब यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीत पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केवायसी संदर्भातील अडचणी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय अनुदानासंबंधी विषय तसेच तालुक्यातील इतर शासकीय योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.अजय जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, तसेच सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी केली. स्वामी साहेबांनी योग्य ती दखल घेत शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.

लोकजनशक्ती पार्टी (र) च्या वतीने गायरान हक्क परिषद तथा कार्यकर्ता मेळावा उत्सवात संपन्न

Image
लोकजनशक्ती पार्टी (र) च्या वतीने गायरान हक्क परिषद तथा कार्यकर्ता मेळावा उत्सवात संपन्न.........              धाराशिव जिल्ह्यात तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी,रविवार लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)यांच्या वतीने धाराशिव जिल्हा वतीने विभागीय, गायरान हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेला मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर विचार मंथन करण्यात आले. पार्टीचा अजेंडा,विचार,ध्येयधोरणे, सभासद नोंदणी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातून विचार आणि आदरणीय रामविलास पासवान साहेब यांच्या केलेल्या कार्याची माहिती देत,असतानाच सध्याचे लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांनी केलेल्या कार्यासंबंधी माहिती देण्यात आली.बिहारमध्ये होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी विषयी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना महाराष्ट्राच्या लोक जनशक्ती पाठीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच बिहार मध्ये निश्चितच पार्टी बहुसंख्य उमेदवारांना निवड...

“सोयाबीनची होळी अन सरकारच्या नावाने शिमगा” शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
बीड:- ( दि.२७ )बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ ८५ रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच सोयाबीनची हमीभावाने खरेदी आणि भावांतर योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७. सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा” करत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले आदी सहभागी होते. (अ) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी सरकारने जाहीर केलेली ८५ रुपये गुंठा मदत अत्यल्प आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्...

कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदर निमित्त आले एकत्र

Image
कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदर निमित्त आले एकत्र   सोमनाथ विद्यालय येथील विद्यार्थी यांनी घेतली उच्च स्तरावर उंच भरारी परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील मौजे कण्हेरवाडी येथील वर्गमित्र तब्बल 18 वर्षानंतर एकत्र आले होते. यावेळेस शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देणात आला होता, इयत्ता 10 मधून शाळा सोडल्यानंतर काही जण तालुक्यात तर बाहेर जिल्ह्यात शीक्षणासाठी गेले होते यामध्ये बरेच जण उच्च अश्या सरकारी नोकरी मध्ये लागले तर काही जण प्रायवेट जॉब करू लागले होते.वर्गमित्रापैकी बरेच जण आज डॉक्टर, शिक्षक, पोलीस, भारतीय सैन्य दलात जवान, व्यापारी, उधोजक,पत्रकार,लोको पायलट, अश्या अनेक पदावर कार्यरत असून यावेळी सर्वांचा सन्मान करण्यात आला. या धावपळीच्या युगात वेळ नसल्यामुळे एकमेकांची भेट घेणे तसे शक्य नव्हते, परंतु सोशल मीडिया असल्यामुळे वर्गमित्र बळीराम तिडके याने सर्व वर्गमित्र एकत्र ग्रुप करून जोडले त्यामुळे काही प्रमाणात बरेच मित्र जोडले गेले आणि आज त्यानिमित्ताने गेट टुगेदर साजरा करून जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. यापुढे ही असेच मिळून नवीन उपक्रम राबवून ...

अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Image
अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष निवडून आणणार अनिलदादा जगताप    बीड, प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब, मराठवाडा संपर्क मंत्री ना. संजयजी शिरसाट साहेब व मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची काल दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी बीड शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे महत्त्वपूर्ण रणनीती बैठक पार पडली असून या बैठकीत शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन साहेब आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी प्रभाग निहाय उमेदवार कसे असावेत?, प्रचार कसा करावा?, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक स्तरावरील रणनीतीवर सखोल मार्गदर्शन करून शिवसैनिकांशी मुक्त संवाद साधला....

पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्याच्या बेकायदेशीरपणे संपादित जमिनीबाबत उच्च न्यायालयाचे आदेश चार आठवड्यांत निर्णय घ्यावा बीड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील मौजे पारनेर येथील शेतकरी रवींद्र साधू कांबळे यांच्या मालकीची दोन एकर जमीन मे रेणु ग्रीन पॉवर एमएचपी २ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पवनऊर्जा टॉवर उभारण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता बेकायदेशीरपणे संपादित केली होती. या प्रकरणात आता माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड यांना चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.याचिकाकर्त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर कंपनीने रस्ता तयार करून, टॉवर उभारून आणि इलेक्ट्रिक लाईन ओढून जवळपास दोन एकर जमीन वापरली असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. याबाबत याचिकाकर्त्यांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) पाटोदा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तहसीलदार पाटोदा यांनी मंडळ अधिकारी कुसलंब यांना वस्तूनिष्ठ चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत कंपनीने शेतकऱ्यांची जमीन वापरल्याचे स्पष्ट झाले.तथापि, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ठरवलेल्या धोरणानुसार जमीन अधिग्रहण व नुकसानभरपाई प्रक्रियेचे पालन न झाल्याने याचिकाकर्त्यांनी रीट याचिका क्रमांक...

धस आण्णा जात,पात,धर्म विसरून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अंगद सांगळेंना मोठी जबाबदारी देऊन न्याय द्यावा कार्यकर्त्यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) आमदार सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करणारे अंगद सांगळे हे कार्यकर्ते जिल्ह्यात ओळखले जातात. समाजातील जात, पात, धर्म या भिंती ओलांडून त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी निस्वार्थपणे काम केले आहे. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांच्या मते, सांगळे यांनी पक्षनिष्ठा आणि जनसेवा यांचा उत्तम समन्वय साधत नेहमीच विकासात्मक कामांमध्ये पुढाकार घेतला आहे. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, मदत कार्य, तसेच युवकांच्या संघटनांमधून जनतेचा विश्वास जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून आता मागणी होत आहे की, अशा निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आण्णाने मोठी जबाबदारी देऊन न्याय द्यावा. “अंगद सांगळे यांसारखे कार्यकर्ते हेच आमदार सुरेश आण्णा धस यांची खरी ताकद आहेत,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.हळूहळू ही मागणी जोर धरू लागली असून आण्णाने याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डॉ. संपदा मुंडेंची आत्महत्या नाही तर हत्याच; गुन्हेगारांना मरे पर्यंत फाशी द्या

Image
डॉ. संपदा मुंडेंची आत्महत्या नाही तर हत्याच; गुन्हेगारांना मरे पर्यंत फाशी द्या! विविध सामाजिक, शासकीय संघटना, सोमवारी कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा! बीड (प्रतिनिधी ) : पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी व राजकीय दबावामुळे बीड जिल्ह्य़ाची कन्या डॉ. संपदा मुंडे हिने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे. डॉक्टर संपदाच्या खूनास जबाबदार पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी व दबाव आणणारे खासदार व राजकीय पदाधिकाऱ्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी यासाठी बीड शहरातील विविध सामाजिक संघटना कॅन्डल मार्च तथा आक्रोश मोर्चा काढणार आहेत.         याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्य़ाची भूमिकन्या, शेतकरी कन्या डॉक्टर संपदा मुंडे ही फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या जाचाला कंटाळून तीने आत्महत्या केली. त्यामुळे राज्यात संतापाची लाट ऊसळली असून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारांना फाशी द्यावी या मुख्य मागणीसह आदी मागण्यासाठी बीड शहरातील विविध सामाजिक संघटना छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते ...

डाॅ.संपदा मुंडे यांच्या हत्येचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने तीव्र निषेध

Image
डाॅ.संपदा मुंडे यांच्या हत्येचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने तीव्र निषेध.... प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा व पाच कोटी कुटुंबाला आर्थिक मदत द्या नितीन जायभाये  खाकीतील सैतानांनी "सावित्रीबाई फुले" यांच्या लेकीला छळ करून अशा पद्धतीने संपवून महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासली...   शाहू, फुले,आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात प्रशासनातून व खाकीतूनच सैतान जन्माला येतोय... बीड शहर बचाव मंचाच्या वतीने डॉ. संपदा मुंडे यांना आदरांजली व आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात येत असून खाकीतील सैतान व त्यांच्यासोबत असणारे सर्व अधिकारी यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज हा निषेध नोंदवण्यासाठी भाषेच्या कोषात शब्द कमी पडत आहेत.डाॅ.संपदा मुंडे या गरीब घरातल्या एक शेतकरी कन्या होत्या. आई-वडिलांनी कर्जे काढून काढून मुलीचे शिक्षण पूर्ण केलं होतं.मुलगी उच्च शिक्षित झाली होती. नुकतीच कुठं त्याची चिमुकल्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. आपल्या शेतकरी आई वडिलांसाठी डोळ्यात हजारो स्वप्न होते.आपल्या गरीब शेतकरी कुटुंबाचे कर्ज फिटणार होते. या उच्च शिक्षित डॉक्टर कन्य...

डॉ.संपदा मुंडे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही का? तिच्या व्यवस्थेतील मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या-डॉ.जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणच्या मूळ रहिवासी असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी तळहातावर आत्महतेचे कारण लिहिले होते, आत्महत्यापूर्वी माझ्या कुटुंबियांवर पोस्ट मोर्टम रिपोर्ट बदलवण्यासाठी दबाव आणला जातोय मला मानसिक अन शारीरिक त्रास दिला जातोय अशी तक्रार ही त्यांनी उप विभागीय कार्यालयात दिली होती. परंतु त्यांनी त्यावर तात्काळ कार्यवाही न केल्यामुळे डॉ संपदा मुंडे यांचा त्रास वाढला असावा आणि त्यामुळे त्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे. हा सपशेल शासकीय व्यवस्थेचा बळी असून संबंधित अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि त्यांना त्रास देणारे सर्वच राजकीय लोकांवर कठोर शासन करा.डॉ संपदा मुंडे ह्या गरीबी परिस्थितीतून एमबीबीएस सारखे उच्च शिक्षण पूर्ण करून फलटण या ठिकाणी शासकीय सेवेत रुजू होत्या परंतु येथील शासन प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून आज त्या व्यवस्थेचा बळी ठरल्या आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री फक्त निवडणुकीपुर...

"विकसित भारत २०४७" साठी पारदर्शक व्यापाराचा पाया गोव्यात

Image
"विकसित भारत २०४७" साठी पारदर्शक व्यापाराचा पाया गोव्यात  कायदेशीर मापनशास्त्र परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स आणि ग्राहक संरक्षणावर चर्चासत्र पणजी , प्रतिनिधी  : डिजिटल सुधारणा, पारदर्शकता आणि व्यापारातील ग्राहकांचा विश्वास यावर लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भारतातील पहिल्या राष्ट्रीय कायदेशीर मापनशास्त्र नियंत्रक परिषदेचे केंद्रस्थान आज गोवा बनले. "व्यवसाय सुलभता (EoDB), डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक जागरूकता" या थीम असलेल्या या परिषदेत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कायदेशीर मापनशास्त्र नियंत्रकांसह उद्योग संस्था, ग्राहक संघटना आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. आधुनिकीकरण, धोरणात्मक सुधारणा आणि कार्यक्षमता आणि ग्राहक संरक्षण वाढविण्यासाठी उद्दिष्ट असलेल्या eMaap पोर्टल आणि QR कोड-सक्षम साधनांसारख्या डिजिटल उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ म्हणून काम करत होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ...

चिंचोली माळी कर्मवीर विद्यालयाची चौकशी करा अन्यथा १ नोव्हेंबरला अमरण उपोषण- रोहन गलांडे पाटील

Image
केज/प्रतिनिधी   केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २००५ ते २०२५ पर्यंतची चौकशी करण्यात यावी व पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात तसेच शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे समजले जाते तरी यांची चौकशी करण्यात यावी व संस्थाचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी व विद्यार्थी पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे अन्यथा १/११/२०२५ पर्यंत मागणी मान्य करण्यात आली नाही तर श्री संत नामदेव महाराज सभागृह चिंचोली माळी येथे अमरण उपोषणाला बसणार आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची २००५ ते २०२५ पर्यंतची चौकशी करण्यात यावी व पटसंख्ये पेक्षा जास्त शिक्षक भरती करणाऱ्या संस्थाचालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात तसेच शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षकांकडून संस्थाचालकांनी अंदाजित आठ नऊ लाख रुपये घेतले आहे समजले जाते तरी यांची चौकशी करण्यात यावी व संस्थाचालक यांच्यावर ...

निष्ठा-प्रामाणिकपणा व कर्तुत्ववान सेवेमुळे जे.आर.पवार उत्कृष्ट प्रशासक ठरले-माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :             आपल्या कामाप्रती निष्ठा, कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्ववान सेवा यामुळे आदरणीय जे.आर.पवार साहेब हे उत्कृष्ट प्रशासक ठरले असून ते एक कुटुंब वत्सल व्यक्ती असल्यामुळे त्यांनी आपला गोतावळा जपून ठेवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात यांनी आष्टी तालुक्यातील मौजे पिंपळा येथे जे आर पवार यांच्या आयोजित कृतज्ञता सोहळ्यामध्ये काढले .     अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आस्थापनेतून कार्यकारी संचालक व कार्यकारी सल्लागार या पदावरून पवार साहेब नुकतेच निवृत्त झाले . त्या निमित्त त्यांच्या जन्मगावी पिंपळा येथे शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता .   पुढे बोलताना मा. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की , पाथर्डी सारख्या दुष्काळी भागातील, तीन वर्षे बंद पडलेला वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्यांनी आपल्या कार्य कुशलतेने यशस्वीपणे आज तागायत चालवून दाखवला . वृद्धेश्वर चे...

आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

Image
 आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी  शेख अब्बास मुसा सामाजिक कार्यकर्ते यांचा आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश!  बीड जिल्हा बैठक यशस्वी संपन्न! आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने ठराव केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील. देशभरात माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांमध्ये होत असलेल्या परिवर्तनाचा विचार करून बीड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बैठकीस उपस्थित: अशोक येडे (जिल्हाध्यक्ष), रफिक पठाण, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, रामभाऊ शेरकर, सय्यद सादेक, किस्किंदा ताई पांचाळ, अ‍ॅड. दिनेश बिकड, सुहास चौधरी, नासर मुंडे, सारिका गायकवाड, शहनाज पठाण, चंद्रकला बावचकर, शकुंतला गुगाशे आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शेख अब्बास मुसा यांचा आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश बीड (प्रतिनिधी ): आम आदमी पार्टी ब...

फलटण येथील घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी द्या सावता सेनेच्या वर्षा शिंदे यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) फलटण येथे घडलेली अमानुष व संतापजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. वडवणी येथील डॉ. स्व. संपदा मुंडे यांच्या दुःखद निधनाने समाजमन हेलावून गेले असून या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. सावता सेना माहिला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्षा वर्षा शिंदे यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.वर्षा शिंदे म्हणाल्या की, “डॉ. संपदा मुंडे या एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांच्यावर झालेला अत्याचार आणि निधन ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची शोकांतिका आहे. अशा घटना समाजाच्या संवेदनशीलतेला तडा देणाऱ्या असून त्यामागील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे.” त्या पुढे म्हणाल्या की, “महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने केवळ घोषणांपुरते न थांबता, ठोस कायदेशीर आणि सामाजिक उपाययोजना राबवायला हव्यात. प्रत्येक शहरात व गावात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तसेच गुन्हेगारांना भीती वाटेल अशी कडक यंत्रणा उभी करणे, हीच खरी काळाची गरज आहे.” वर्षा शिंदे ...

डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने

Image
डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने  बीड:- ( दि.२५ ) सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्याच्या भुमिकन्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनात शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली  आज दि.२५ शनिवार रोजी चौसाळा बसस्थानक येथे सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. डॉ. संपदा मुंडे (रा. कोठारबन, ह.मु. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) यांनी फलटण येथे कार्यरत असताना पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते, तसेच घरच्यांना “शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जातो” असे सांगितले होते. त्यांनी ...

शिरूर पोलिस स्टेशनच्या हाद्दीतील जाटवड या गावांमध्ये एका वृध्द व्यक्तीला व त्याच्या कुटूंबीयाला जीव मारण्याचा प्रयत्न

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी                  भर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला थरारक शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साहेब आपण या वृध्द बाबाला व त्यांच्या मुलीला व कुटूंबीयांना न्याय देणार का ? शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गाव जाटवड मानुर तालुका शिरूर कासार या गावांमध्ये भर दिवाळी भाऊबीजच्या दिवशी भाऊकीतील लोकांनी भगिनाथ पाटीलबा पाखरे . अंबादास भागिनाथ पाखरे . शोभाबाई भागिनाथ पाखरे . शिवनाथ भागिनाथ पाखरे . या त्यांच्या भावकीतील लोकांनी मिळून एका वृद्ध बाबाला व त्यांच्या अहिल्यानगर येथील वैशाली बडे या लेकीला व त्यांच्या मुलगा लक्ष्मण पारखे व त्यांच्या पत्नीला व सुनेला या सर्व मंडळीला या आरोपीने हातात लाट्या . काठ्या . कुराडी घेऊन असे मोठे मोठे शस्त्र घेऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला . स्वतःच्या वडिलांना मारू नका असे म्हणताना त्यांच्या लेकीचा वैशालीताई बडे यांचा या आरोपींकडून विनयभंगाचा प्रकार देखील घडल्याचे समोर आले आहे . हा थरारक प्रकार भर दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी घडला यामुळे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व...

पोलिसांच्या अत्याचाराने संपदा मुंडेंचा जीव घेतला, रक्षकच भक्षक झाले,कठोर कारवाईची मागणी- राज्य प्रवक्ते नितीन सोनवणे

Image
बीड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ (विशेष प्रतिनिधी ): सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गेल्या रात्री टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलिस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार आणि दुसऱ्या पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याच्यावर शारीरिक-मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ दोषींवर कठोरात्कठोर कारवाई करून पीडितेच्या आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.डॉ. संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील साध्या शेतकरी कुटुंबातील होत्या. आई-वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांना शिकवून डॉक्टर आणि नंतर वैद्यकीय अधिकारी बनवलं. डॉ. मुंडे यांनी वरिष्ठांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या होत्या. "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन," असा इशाराही त्यांन...

धनगर एसटी आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात आनंद कोकाटे या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Image
धनगर एसटी आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात आनंद कोकाटे या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या    धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीकरता दिलेले बलिदान वाया जाऊन देणार नाही.. प्रकाश भैय्या सोनसळे (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)  बीड(प्रतिनिधी ):- मांजरसुंबा येथिल धनगर समाजातील आनंद न्यायमूर्ती कोकाटे वय-38 यांने धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी लढा अनेक वर्षापासून धनगर समाजाने मोर्चे,आंदोलन, रस्ता रोको, आमरण उपोषणे करूनही या धनगर समाजाला राज्य सरकार हे जाणीवपूर्वक आरक्षण अंमलबजावणी करत नसल्याकारणामुळे आपल्या मूलाबाळांना आरक्षण नसल्यामुळे कसे होईल या नैराश्यातून गेली दहा ते पंधरा दिवस डोक्यामध्ये आरक्षणाचा विचार येत होता आणि एक दिवस असा विचार आला की आनंद कोकाटे या तरुणाने धनगर एसटी आरक्षणासाठी आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडच्या अँगलला दोरी बांधून पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.    आंनद कोकाटे यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी,दोन मुली,मुलगा असा परिवार आहे.आंनद यांच्या आत्महत्येने जिल्हाभर,पंचक्रोशीतून,परिसरातुन, समाजातुन सर्वत्र हळहळ व दु:ख व्यक...

के टी एम स्टार इव्हेट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र कार्यक्रम 24 ऑक्टोबर ला गडचिरोली येथे आयोजित

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी   जे टी एम स्टार इव्हेंट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र सीजन २ हा कार्यक्रम सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या ठिकाणी फॅशन शो मॉडेलिंग स्पर्धा मेकअप आणि मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्री राजे धर्म राव बाबा आत्राम तसेच खासदार डॉक्टर नामदेव किरसान आणि आमदार मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष उपस्थिती म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती व तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम या सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ज्योती उंदीरवाडे चव्हाण यांनी दिली दिनांक 24 10 2025 रोजी शुक्रवार सकाळी 11 वाजता सुमानंद हॉल गडचिरोली या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद असून अधिक माहितीसाठी 75 88 49 0407 या नंबर वर संपर्क करावा अशी माहिती ज्योती उंदीरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे

आम आदमी पार्टीची बीडमध्ये विशेष बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवार चाचपणी

Image
आम आदमी पार्टीची बीडमध्ये विशेष बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी उमेदवार चाचपणी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड  बीड (प्रतिनिधी ) – येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीची उद्या शनिवार रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे राज्यसचिव माननीय संग्राम जी घाडगे पाटील व प्राध्यापक वैजनाथजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येत आहे या बैठकीमध्ये आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक मा. अरविंद केजरीवाल माजी मुख्यमंत्री दिल्ली राज्य यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन पक्षात सक्रियपणे काम करण्याची इच्छा असणारे तसेच निवडणुकीत उमेदवारी इच्छुक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी केले आहे. बैठकीदरम्यान इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून उमेदवारीसाठी अर्ज (फॉर्म) भरून घेतले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आम आद...

बीड मध्ये माजी मॅनेजरचा मालकावर ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला

Image
बीड मध्ये माजी मॅनेजरचा मालकावर ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला गणेश गोरे यांनी पुराव्यासह सोशल मीडियावर उघड केले आरोप बीड, दि. २३ ऑक्टोबर २०२५ : बीड शहरातील एका व्यावसायिकावर माजी कर्मचाऱ्याने ब्लॅकमेल, धमकी आणि हिंसाचाराचा सिलसिला चालू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुराव्यासह सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट टाकून तक्रारदाराने हे प्रकरण उघड केले असून, पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आणि ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न) कलमाची भीती निर्माण झाली असल्याने स्थानिक ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची आली आहे.तक्रारदार गणेश गोरे हे बीड येथे हाॅटेल व्यवसाय चालवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबू बजरंग तावरे नावाच्या व्यक्तीने २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांच्या हाॅटेल वर झाडू-पोचा करायचे काम केले. नंतर गोरे यांनी त्याला विश्वास ठेवून बीड मधील ऑफिसमध्ये मॅनेजर म्हणून नेमले, जिथे त्याने २०२२ ते २०२४ पर्यंत चांगले काम केले. मात्र, या कालावधीत तावरेने व्यसनाधीनता वाढवली आणि कामाच्या ठिकाणी अनुचित वर्तन केल्याने गोरे यांन...