Posts

Showing posts from October, 2025

कॉन्ट्रॅक्टर अनिल मस्के यांच्यासह मान्यवरांनी केले जगतकर कुटुंबियांचे सांत्वन

Image
परळी / प्रतिनिधी – परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार बालाजी जगतकर तसेच इंजी. राजू जगतकर यांचे वडील स्मृतिशेष श्रावणदादा जगतकर यांचे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहरासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनमान्य कॉन्ट्रॅक्टर व समाजसेवक अनिल मस्के यांनी परळीतील कासुमाय निवासस्थानी भेट देऊन जगतकर कुटुंबीयांना सांत्वनपर दिलासा दिला. दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे त्यांनी धीर देत, श्रावणदादांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. या वेळी पी.आर.पी. पक्षाचे नेते सोपान ताटे, समाजसेवक सुनील गोदाम, तलाठी प्रमोद सावंत, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, राजाभाऊ जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे दिवंगत श्रावणदादा जगतकर यांच्या कार्याची आठवण काढत, त्यांचे जीवन समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. श्रावणदादा जगतकर हे परळी शहरातील सर्वांसोबत प्रेमळ वर्तन, सुसंस्कारित कुटुंब आणि समाजनिष्ठ वृत्तीमुळे परिचित होते. त्यांच्या जाण्याने परळी शहराने एक प्रेमळ, सज्जन व समाजाभिमुख व्यक्तिमत्व गमाव...

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता महाविद्यालयातील दोन मुलींनी कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे साठी पुन्हा निवड

Image
धानोरा येथील जनता महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा   आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता महाविद्यालयातील दोन मुलींनी कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे साठी पुन्हा निवड आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :               कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता महाविद्यालयातील तीन कुस्तीपटू विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दोन मुलींनी कुस्ती चिटपट करत आपापल्या वजनी गटात यश प्राप्त केले असून यामध्ये सावरी सातकर आणि तुलसी पाथरे या कुस्ती खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त केले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच पैलवान श्री. किरण मोरे सर उपस्थित होते.   या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , आम...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर नामफलकाचे मौजे काजळा फाटा येथे मोठ्या उत्साहात अनावरण

Image
  फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील समाजाल न्याय हक्कासाठी सातत्याने लढा उभारून कायम संघर्ष करावा लागतो या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील मौजे काजळा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61वर वसलेले गाव आहे गावातील बौध्द बांधव हे वस्ती करुन राहतात त्यामुळे शासन प्रशासन दरबारी या साबळे वस्तीची नोंद नसल्याने जागृत असलेल्या बौध्द तरुण वर्गाने शासन दरबारी, पोलिस प्रशासन यांच्याशी रितसर कागदोपतत्राचा पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 काजळा फाटा येथे दिनांक 20/10/2025 रोजी सर्व नागरिक प्रमुख पाहुणे तरुण युवक महिला ज्येष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशाच्या तोफा फटाक्यांच्या अतिषमाजीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर हे नाव उभारण्यात आले या नामकरण सोहळा उभारणी कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर नामकरण फलकाचे उध्दघाटन हे संघर्ष महिला बचत गटाच्या अध्यक्षा सचिव व सर्व महिलाच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले,गावचे सरपंच दशरथ साबळे या नामकरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नामकरण सोहळ्य...

लिंबागणेश येथे बलिप्रतिपदा निमित्ताने महात्मा बळीराजाला अभिवादन "ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" घोषणबाजी, सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी

Image
लिंबागणेश येथे बलिप्रतिपदा निमित्ताने महात्मा बळीराजाला अभिवादन "ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" घोषणबाजी, सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश :- ( दि.२२ )अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील ७ लाख २१ हजार हेक्टरवरील पिकांचे पुर्ण नुकसान होऊन ८ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. शिवारातील सोयाबीन, कपाशी, तूर यांसह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीनाल्यांच्या पुरामुळे शेतीबरोबरच जनावरे व शेतीतील साहित्य वाहून गेले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. सरकारने पंचनामे करून "दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल आणि दिवाळी गोड करण्यात येईल" असे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा फक्त कागदावरच राहिली. राज्यात दिवाळीचा प्रकाश साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अजूनही निराशेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज बलिप्रतिपदेच्या दिवशी लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढ...

आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता,आष्टी तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा

Image
आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी ह.भ.प. श्री.संत बाळूदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १६ ऑक्टोबर ते २३ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व जगतगुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न होत असून, या मध्ये पहाटे काकडा, पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, हरीकिर्तन व हरीजागर असे कार्यक्रम होत असून या सप्ताहाचे हे ४८ वे वर्ष असून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळात ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असून, या अखंड हरिनाम सप्ताहात महाप्रसाद श्री नामदेव विठोबा शेळके (सामाजिक कार्यकर्ते ) व नागेश भगवान शेळके यांची पंगत राहणार असून या काल्याच्या कीर्तनाचा आष्टी तालुक्यातील सर्व नागरिक/ माता -भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळूदेव महाराज सप्ताह कमिटी , समस्त ग्रामस्थ मंडळी व बाळूदेव महाराज भजनी मंडळ धानोरा (तालुका आष्टी ) यांनी केले आहे .

जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये वाढदिवस साजरा करून गायकवाड परिवाराने पाडला नवीन पायंडा

Image
 बीड प्रतिनिधी , शहरात असलेल्या “जिव्हाळा बेघर निवारा केंद्र” यामध्ये गायकवाड दांपत्याने त्यांचा मुलगा रणवीर कुणाल गायकवाड याचा दुसरा वाढदिवस साजरा करून एक नवीन पायंडा पाडल्याचे पहावयास मिळाले. आपले आनंदाचे क्षण आपण केवळ एकट्यात न साजरे करता ते सामुहिक तसेच सामाजिक पद्धतीने साजरे करावे. त्यामुळे समाजात एक आदर्श तर निर्माण होईलच त्याचबरोबर मुलांना समाजाप्रती जाणिवेचे संस्कार ही घडतील.रणवीर गायकवाड याचा हा दुसरा वाढदिवस असताना, बेघर लोकांसोबत कसलाही बडे जाऊ पणं न करता हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच केक कापणे या प्रथेला देखील नकार या वाढदिवसातून देण्यात आला.    यावेळी बीड शहर बचाव मंचाचे डी.जी तांदळे सर,बाजीराव ढाकणे,नितीन जायभाये, दैनिक बीड प्रसाराचे संपादक समीर काझी, पत्रकार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

दिपदान कार्यक्रम म्हणजेच दीपावली.......!

Image
दिपदान कार्यक्रम म्हणजेच दीपावली.......! हिंदुधर्मातील अनेक मंदिर हे बौद्ध स्तूप आहेत पण त्यावर अतिक्रमण करून ते बौद्धाची स्तूप हिंदु मंदिरात रुपान्तरीत केलेली आहेत. काही बुद्ध परंपरा ही चोरल्या गेलेल्या आहेत भारत ही बुध्दाची जननी आहे. इथे बुद्धाचा वावर झालेला आहे. इथेच बुध्दाची विरासत आहे. बुद्ध प्राचीन सनातन म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला आहे. तो देव नसून एक मार्गदर्शक मार्गदाता आहे तो धर्म नसून धम्म आहे. अखंड भारतात जेंव्हा सम्राट अशोकाचे राज्य होते त्याकाळी जगाला युद्ध सोडून बुद्ध हवा असा साक्षात्कार चक्रवर्ती सम्राट अशोकाला झाला हातातून शस्र टाकून दिली आणि सम्राट अशोक राजा बुद्धाला शरण गेला. आणि त्याने बुद्ध धम्म स्वीकारला. त्याने ठरवलं ह्याच बुद्ध धम्माला वाढवायचं मोठ करायचं त्याने भिक्कू संघाला प्रचारक म्हणून प्रस्थापित केले आणि चारही दिशेने पाठवले. त्याने त्याकाळी कुशल कारागीर बोलावून चौर्याऐंशी हजार बुद्धस्तूप तयार केली त्यात बुद्ध विहार, बुद्ध मुर्त्या, बुद्ध स्तूप तयार केली आणि बुध्दाची विचार सांगण्यासाठी भिक्कू संघ तयार केला. आणि ह्याच चौर्याऐंशी हजार बुद्ध स्तुपाचे उदघा...

"वर्षावास" काळात "बुद्ध आणि त्यांचा धम्म"ग्रंथाचे वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे गरजेचे - पूज्य भिक्खू धम्मशील थेरो

Image
"वर्षावास" काळात "बुद्ध आणि त्यांचा धम्म"ग्रंथाचे वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे गरजेचे - पूज्य भिक्खू धम्मशील थेरो नागसेन बुद्ध विहार येथे वर्षावास धम्म ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम उत्साहात संपन्न   बीड (प्रतिनिधी ) 2500 वर्षापूर्वी तथागतांनी श्रावस्ती, राजगृह, वैशाली, नालंदा अशा विविध ठिकाणी आपल्या देशनेतून मानव कल्याणाकरिता प्रज्ञा,शील,अष्टांगिक मार्ग व मैत्री, करुणा, दान पारमिता बद्दल बहुमोल उपदेश केला. तीच परंपरा भिक्खू संघाने पुढे चालू ठेवून वर्षावासातील 3 महिने तथागतांचा उपदेश परिसरातील उपासक,उपासिकांना विहारात राहून समजावून सांगत असत. अभ्यासाअंती खूप मेहनत घेऊन डॉ. बाबासाहेबांनी तथागतांचा बहुमोल उपदेश "बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ" या ग्रंथाद्वारे सर्वसामान्यांना समजावा म्हणून लिखित स्वरूपात जो की त्यांचा शेवटचा लिहिलेला ग्रंथ आहे. वर्षावासातील या ग्रंथाचे वाचन हे केवळ वाचन न करता ते वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे कसे मानव कल्याणाचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे नागसेन बुद्ध विहार धानोरा रोड बीड येथे धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी आपल...

मंत्री.बाळासाहेब थोरात,पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थित जे.आर पवार साहेबांचा सेवानिवृत्ती सोहळा,मोठ्या संख्येने उपस्थित रहा-प्रदिप थोरवे

Image
आष्टी (प्रतिनिधी गोरख मोरे ) : सहकार,शिक्षण,राजकारण, समाजकारनातील दांडगा अभ्यास,कामावरील निष्ठा,आरोग्यदूत,दानशूर म्हणून ओळखले जाणारे सामाजिक बांधिलकी हेच ब्रीद जपणारे जे आर पवार साहेब, शासकीय तलाठीची नोकरी सोडून सुरवातीला आष्टी तालुक्यातील कडा कारखाना आणि नंतर त्यांनी 38 वर्ष वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे मैनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले.व दादा पाटील राजळे महाविद्यालय ची संचालक पदाची धुरा देखील त्यानी सांभाळली असून एकूण ४८ वर्ष सेवा करून वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना ली. येथून मैनेजिंग डायरेक्टर पदावरून ते सेवा निवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती सोहळा  मंत्री.बाळासाहेब थोरात , पद्मश्री.पोपटराव पवार (हिवरेबाजार),  खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सुरेश(आण्णा)धस ,  माजी आमदार भीमराव धोंडे ,माजी आमदार साहेबराव दरेकर (नाना), माजी आमदार बाळासाहेब आजबे (काका) ,  डॉ.एस बी निमसे (कुलगुरू) , आणि बीड / अहिल्यानगर जिल्ह्यातील साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पिंपळा या गावी प...

खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमणे निष्कषित करण्याबाबतच्या तक्रारीवर सहा महिन्यात निर्णय घेण्याचा जिल्हाधिकारी यांना माननीय उच्च न्यायालयाचा आदेश

Image
पाटोदा शहरातील सर्वे नंबर ७१५ शासकीय (गायरान) जमिनीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमणे निष्कषित करण्याबाबतच्या तक्रारीवर सहा महिन्यात निर्णय घेण्याचा जिल्हाधिकारी यांना माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आष्टी ( प्रतिनिधी- गोरख मोरे ) :                पाटोदा शहरातील सर्वे नंबर ७१५ एकूण ३८ एकर ३३ गुंठे शासकीय जमिन असून सदरील जमिनीपैकी २८ गुंठे जमीन १९७६ साली जिल्हाधिकारी बीड यांनी सुंदर सोसायटी बीज उत्पादक संस्था पाटोदा यांना काही अटी व शर्ती द्वारे जमीन तत्कालीन चेअरमन माननीय कै. आमदार लक्ष्मणराव विठोबा जाधव यांच्या बरोबर करारनामा करून जिल्हाधिकारी बीड यांनी त्त्यांच्या ताब्यात दिली होती. सदरील जागेचा वापर गोडाऊन तसेच कार्यालय इत्यादी वापराखेरीज दुसऱ्या वापराकरता करता येणार नाही अशी अट सदरील करारनाम्यात होती. २८ गुंठे जमिनीवर १९८६ मध्ये व्यवस्थापक सुंदर सोसायटी बीज उत्पादक संस्था पाटोदा यांनी लेखी तक्रार करून सय्यद यासीन सय्यद कामोलोद्दीन या गृहस्थाने अनाधिकृत अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले सदरील बांधक...

शासकीय सेवेतील आदर्श अधिकारी पूरस्थितीत मंडळ अधिकारी अशोक दराडे व तलाठी राहुल भरणे यांचे उल्लेखनीय कार्य

Image
पाटोदा (प्रतिनिधी )शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण म्हणजे मंडळ अधिकारी अशोक दराडे व तलाठी राहुल भरणे यांचे कार्य. संकटाच्या काळात जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदार वृत्ती आदर्श ठरली आहे.पूरग्रस्त भागात घराघरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, अन्न, पाणी व आरोग्य सेवांची सोय करून देणे तसेच शासनाच्या मदतीचा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तात्काळ पोहोच होण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.  तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राहिली. प्रशासन, पोलिस, ग्रामपंचायत व स्वयंसेवक यांच्या संयुक्त समन्वयातून पूरग्रस्त भागात वेळेत मदत पोहोचवून जनतेचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले.ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही अशोक दराडे व राहुल भरणे यांच्या प्रामाणिक कार्यनिष्ठा, जनसेवा भाव आणि शासकीय कार्यक्षमतेचे मनापासून कौतुक केले आहे.  “अशा अधिकारीवर्गामुळेच शासन खर्‍या अर्थाने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे,” अ...

स्मृतीशेष श्रावणदादा जगतकर यांच्या अस्थींचे शेतीमध्ये बोधीवृक्ष लावून विसर्जन

Image
परळी प्रतिनिधी . आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक स्मृतीशेष श्रावणदादा जगतकर यांचे नुकतेच निधन झाले होते.त्यांच्या अस्थींचे आज दिनांक 18 रोजी शेतामध्ये बोधीवृक्षाचे रोप लावून तिथे विसर्जन केले.         भीमनगर येथील श्रावणदादा जगतकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते.त्यांच्यावर काल शांतीवन स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.पत्रकार बालाजी जगतकर यांचे ते वडील होते.त्यांच्या अस्थींचे आज त्यांच्या शेतात बोधीवृक्ष लावून त्या ठिकाणी अस्थींचे विसर्जन केले.यावेळी जगतकर कुटुंबिय उपस्थित होते.

सकल हिंदू समाजाच्या वतीने गोहत्याविरोधी निषेध सभा यशस्वीरीत्या पार पडली

Image
सकल हिंदू समाजाच्या वतीने गोहत्याविरोधी निषेध सभा यशस्वीरीत्या पार पडली आई भवानीचा आशीर्वादाने हिंदू धर्माचा कार्याला सुरवात सकल हिंदू समाज व डॉ. रुपेश नाठे यांच्या पुढाकाराने हिंदू समाजाच्या आक्रोशाला न्याय देण्यासाठी आयोजित गोहत्याविरोधी निषेध सभा मोठ्या उत्साहात आणि जाज्वल्य हिंदुत्वभावनेने पार पडली. या सभेला भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख राजू नांठे, माजी उपसभापती हरिश्चंद्र नाठे, तसेच गोपाळा लहांगे, तुकाराम वारघडे, सरपंच भाऊसाहेब धोंगडे, केरु चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. अलीकडेच बेलगाव कुर्हे येथे गुळवे नामक व्यक्तीने अवैध कत्तलखाना चालवून सुमारे १०० पेक्षा अधिक गोमातांची निर्दय हत्या केल्याने हिंदू समाजात संतापाची लाट उसळली होती. स्थानिक गोरक्षकांच्या तत्परतेने पोलीस प्रशासनाने ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि १०० हून अधिक गाई-नंदी ताब्यात घेतले, तसेच आरोपींना अटक केली. तथापि, अवघ्या काही दिवसांत आरोपींना जामीन मिळाल्याने ल...

देशसेवेपासून समाजसेवेपर्यंत! मेजर हनुमंत सानप पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात

Image
पाटोदा (गणेश शेवाळे )महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या त्रिदल संघटनेच्या वतीने मेजर हनुमंत सानप पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. देशाच्या सीमारेषेवर उभे राहून अनेक वर्षे राष्ट्रसेवा केलेले मेजर सानप आता आपल्या मातीत परत येऊन समाजसेवेचा ध्यास घेत आहेत.रिटायरमेंटनंतरही “सेवा” हीच त्यांची ओळख ठरावी या भावनेतून त्यांनी विकासाचा संकल्प घेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे. पारगाव गटातील विकास, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस बदल घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.त्रिदल संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत, राष्ट्रसेवेचा जोश ग्रामविकासात उतरवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे. मेजर हनुमंत सानप यांच्या उमेदवारीने पारगाव परिसरातील राजकीय समीकरणात चैतन्य निर्माण झाले आहे.

वाचन संस्कृती जोपासून सुसंस्कृत पाल्य घडविणे पालकांचे कर्तव्य :-प्रो. डॉ. मनोहर सिरसट

Image
( प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमाने संपन्न ) बीड (प्रतिनिधी ) "वाचाल तर वाचाल" हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनमोल उपदेश लक्षात ठेवून वाचन संस्कृती जोपासून सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी पालकांनी लहानपणीच आपल्या पाल्यांच्या हातात चांगली पुस्तके देऊन आपले पाल्य सुजाण,सदाचारी नागरिक बनण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे ; माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन प्रो. डॉ. मनोहर सिरसट यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्ग प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयातर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची संयुक्त जयंती विविध उपक्रमाने संपन्न करून "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास अध्यक्षपदी से.नी. सी.ई.ओ( जि. प )आयु.पी व्ही बनसोडे तर प्रो.डॉ. मनोहर सिरसट,प्रो डॉ. उपप्रचार्य उत्तमराव साळव...

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी लाईटीचा लपंडाव पाटोदा महावितरणच्या कामकाजावर पाटोदेकर नाराज

पाटोदा (प्रतिनिधी )दिवाळीच्या आनंदी वातावरणातच पाटोदा शहर व परिसरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू राहिल्याने व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. बाजारपेठेतील दिवाळीच्या खरेदीला शिखर असताना अचानक वीज गायब झाली. त्यामुळे दुकानदारांना अंधारात दिवे, सजावट आणि व्यवहार करणे कठीण झाले. काही भागात वारंवार वीज ये-जा होत राहिल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून पुढे येत आहेत.महावितरणचे अधिकारी मात्र देखभाल आणि तांत्रिक अडचणींचे कारण सांगत आहेत. परंतु दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सततचा वीजलपंडाव सहन न करता नागरिक सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत आहेत.“दिवाळी घरात अंधार, दुकानात अंधार मग महावितरणचं कामकाज कुठं?” असा प्रश्न पाटोदेकरांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी तातडीने नियमित आणि स्थिर वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

बीड पंचायत समिती कार्यालयाकडून महिलांच्या स्वच्छतागृहाला कुलूप

Image
पाणी नसल्याचे कारण देत प्रशासनाची टाळाटाळ; स्वच्छ भारत मिशनला हरताळ; पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा – डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. १७ ) बीड पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिला अभ्यागतांसह कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी असलेले स्वच्छतागृह ‘पाणी नाही’ या कारणावरून बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करण्याऐवजी “बाहेरील शौचालय वापरा” अशी लाजिरवाणी सूचना प्रवेशद्वारावर लावून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे स्वच्छतागृहात दुर्गंधी येत असल्याने कार्यालयात आलेल्या अभ्यागतांनी बाहेरील स्वच्छतागृह वापरावे.” ग्रामीण भागातून कार्यालयात येणाऱ्या महिलांसाठी बाहेर शौचालय शोधणे हे अत्यंत गैरसोयीचे असून सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. तसेच कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना यामुळे मोठी अडचण भासत आहे. महिलांच्या आरोग्याच्या आणि गोपनीयतेच्या दृष्टीने स्वच्छतागृह ही मूलभूत गरज असून शासकीय कार्यालयांनी ती सुविधा कायम ठेवणे ब...

महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कम्पनी तर्फे नासिक परिमांडळ मधील भव्य विभागिय क्रीडा स्पर्धा संपन्न

Image
महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कम्पनी तर्फे नासिक परिमांडळ मधील भव्य विभागिय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या मध्ये, येवल्याचे पैलवान श्री.सूर्यकांत गायकवाड विजेते, नाशिक जिल्हा महावितरण विभाग कोकण प्रादेशिक कार्यालय, नासिक, अहमदनगर, मालेगाव,जळगाव,धुळे विभागा अंतर्गत,  सन - 2025 - 2026 अमरावती एथे होणाऱ्या राज्यस्तरीय भव्य क्रीड़ा स्पर्धा, मध्ये येवल्याचे, सुप्रसिद्ध आदर्श युवा पैलवान मा.श्री.सूर्यकांत शांताराम गायकवाड यांची आज निवड चाचणी यशस्वी होऊन, संपूर्ण महाराष्ट्र राज्य स्थरावर निवड आज जाहीर झाली आहेत, तरी त्यांच्या साठी विशेष परिश्रम त्यांचे, वडील येवला येथील आदर्श समाजभूषण मा.श्री.शांताराम किसनराव गायकवाड सर यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत, तसेच येवला येथिल लोणारी क्रीड़ा संकुल येथे दररोज सराव करतात त्यांना उपमहाराष्ट्र केसरी श्री. पै.राजूभाऊ लोणारी तसेच उत्कृष्ट महाराष्ट्र चैंपियन श्री. पै. विजुभाऊ लोणारी यांच्या कडून कुस्ती चे. धड़े दिले जात आहे तसेच पुढील भावी कार्यास वाटचालीस,नासिक परिमण्डळा चे म...

राष्ट्रवादी पक्षाने आदेश दिलातर अजित पवार गटाचा ढाण्यावाघ शामराव हुले पारगाव जिल्हा परिषद रणांगणात उतरणार

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे शामराव हुले पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पक्षाने आदेश दिल्यास,जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी रणांगणात उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. शामराव हुले हे फक्त राजकारणी नसून, लोकांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, गावोगाव परिचित असलेले समाजसेवक आहेत. पूरस्थिती असो वा दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण असो वा विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रत्येक वेळी त्यांनी तत्परतेने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे पारगाव परिसरातील नागरिकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे.गेल्या काही वर्षांत त्यांनी “राजकारण हे सेवेसाठी असतं, सत्तेसाठी नव्हे” हा विचार अंगीकारून जनतेत काम केलं आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि शेतकरी वर्गीय समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या हुले यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे.आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाने आदेश दिल्यास, पा...

बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बोलावली बैठक

Image
बीड (प्रतिनिधी ) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात आज (दि.१६) सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा होणार आहे. नगरपरिषद निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढविली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस स्थानिक कार्यकर्ते, इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

पत्रकार बालाजी जगतकर यांना पितृशोक. श्रावणराव जगतकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Image
 परळी प्रतिनिधी :- पत्रकार बालाजी जगतकर यांचे वडील श्रावणराव जगतकर यांच्या अल्पशा आजाराने दिनांक 16 ऑकटोबर 2025 रोजी रात्री 1:30 वाजल्याच्या दरम्यान निधन झाले त्यांचा अंत्यविधी परळी येथे दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान शांतीवन स्मशानभूमी भीम नगर परळी येथे अंत्य संस्कार होणारा असून त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी,पत्नी, सुना नात वनडे मोठा परिवार आहे. स्मृतीशेष श्रावणराव जगतकर यांच्या स्मृतीस न्यूज 23 मराठीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

जरेवाडीतील आगीत खामकर यांच्या घराची झाली राख भाऊसाहेब आण्णा भवर बनले आधाराचा हात

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) जरेवाडी गावात हनुमान खामकर यांच्या राहत्या घराला लागलेल्या आगीत काही क्षणांतच सर्व काही जळून खाक झाले. कष्टाने उभारलेले घर, संसाराचा प्रत्येक कोपरा क्षणभरात राखेत परिवर्तित झाला. डोळ्यांसमोर आयुष्यभराची जमा-पूंजी जळताना पाहून खामकर कुटुंबाचे डोळे अश्रूंनी भरून आले.या दुःखाच्या काळात अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब आण्णा भवर यांनी गावात येऊन जळीतग्रस्त कुटुंबाला भेट दिली. त्यांनी आधाराचा हात देत मनापासून दिलासा दिला. त्यांच्या चेहऱ्यावरची माया आणि आपुलकी पाहून कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंऐवजी कृतज्ञतेचे पाणी दाटले.भाऊसाहेब आण्णा भवर यांनी संकटग्रस्त कुटुंबाला ₹21,000/- ची आर्थिक मदत देत माणुसकीचा सुंदर आदर्श घालून दिला.त्यांनी केवळ पैशांनी नव्हे, तर आपल्या उपस्थितीने आणि मनःपूर्वक शब्दांनी जखमी मनांना मलम लावले.“आगीत आमचं सर्व काही गेलं, पण भाऊसाहेबांनी दिलेला आधार आम्हाला नवसंजीवनी देऊन गेला,” असे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी खामकर यांनी सांगितले. गावकऱ्यांनी एकमुखाने म्हटलं “संकटात माणसाची ओळख होते... आणि भाऊसाहेब आण्णा भवर यांनी खरी ...

प्रत्यक्ष जनतेत काम करणाऱ्या ऍड.शोभा ताई सुनिलकाका लोमटे याच अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासाठी पात्र उमेदवार.

Image
अंबाजोगाई (अश्विनी लोमटे यादव ) नुकतेच संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले.अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी झाले जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली.त्यातच भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती. ऍड.शोभाताई सुनिलकाका लोमटे यांच्या नावाची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक तसेच राजकीय जीवनामध्ये कार्यरत असणाऱ्या ऍड. शोभाताई सुनिल (काका) लोमटे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनता पक्षात केली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती, हिंदुत्ववादी चळवळीचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या प्रत्यक्ष जनतेत काम करत असल्यामुळे शहरात व शहराबाहेरही सर्वत्र परिचित आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीत-सुखदुःखात धावून जाणे, जनतेची कामे धसास लावणे ,सर्वांशी आपुलकीने वागणे, सर्वधर्मसमभाव जपणे या गोष्टींमुळे त्या समाज प्रिय आहेत.आणि विशेष म्हणजे कायद्याची पदवी प्राप्त असलेल्या रणरागिणी ला मानणारा अंबाजोगाई शहरात मोठा वर्ग आहे.  त्यामुळे आत्ताच्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या त्या भ...

लिंबागणेश जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” साजरा

Image
लिंबागणेश जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” साजरा – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर लिंबागणेश :- (दि.१५): भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्यातील लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामागचा उद्देश वाचन संस्कृती वाढवणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे, ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाज घडविणे हा आहे. राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्था दरवर्षी या दिवशी विविध वाचन उपक्रम राबवतात, तर काही ठिकाणी १५ ते २२ ऑक्टोबर या आठवड्यात “वाचन प्रेरणा सप्ताह” सुद्धा साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक दीपक घाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर याची उपस्थिती होती.सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा गीते उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा अयाचित यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती ज्योती सानप यांनी केले. या प्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्र...

बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. स्नेहा सोनकाटे ओबीसी नेत्या

Image
बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. स्नेहा सोनकाटे ओबीसी नेत्या शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात होणार ओबीसींचा महाएल्गार! बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड येथे ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी महाएल्गार सभेला ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे आव्हान डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी केले आहे शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाएल्गार सभा होणार असून याप्रसंगी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब,...

पूरस्थितीत सभापती रामेश्वर गोरे ठरले खरे संकटमोचक! आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून अन्न,निवारा व शासकीय मदत मिळवून दिली

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरात काही दिवसां पूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या भीषण परिस्थितीत पाटोदा नगरपंचायतचे सभापती रामेश्वर गोरे यांनी लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत खऱ्या अर्थाने संकट मोचकाची भूमिका बजावली. आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहून सभापती गोरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे जबाबदारीचे काम अत्यंत तत्परतेने पार पाडले. तर पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न,निवारा,आणि शासकीय साहाय्य मिळवून देण्यासाठी त्यांनी धावपळ केली.गोरे यांनी नगरपंचायतच्या यंत्रणेला सतत सज्ज ठेवत मदत पोहोचविण्याचे काम केले. पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर देत, त्यांच्या अडचणी ऐकून घेत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत उपाययोजना केल्या. नागरिकांची अडचण दूर होईपर्यंत त्यांनी स्वतः घटनास्थळी राहून देखरेख केली.गावातील वयोवृद्ध, महिला, लहान मुलांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, अन्नधान्य वितरण, तात्पुरते निवारा केंद्र उभारणे, तसेच नागरिकांना शासकीय मदत मिळवून देणे या सर्व आघाड्यांवर सभापती गोरे यांनी पुढाकार घेतला. ...

युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना निवेदन.

Image
युवा विद्यार्थी असोसिएशनच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घेणार. गोपीचंद पडळकर.  बीड प्रतिनिधी. अंकुश गवळी शिक्षक भरती 2025 राज्यभर निवेदन मोहिम लोकप्रतिनीधी जत विधानसभा चे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिले लवकरच शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांच्याशी संपर्क करू तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण बोलून योग्य ते पाऊल उचलू असे सांगितले , यावेळी करण भोंडवे सर, ,कृष्णा ठेंकर सर, अर्चना विद्यागर मॅडम, प्रशांत शेळके सर ,अनिकेत दळवी सर, रविराज सर, अरुण जायभाय सर. व अन्यअभियोग्यताधारक बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  बीड अभियोग्यताधारक टीम   युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने निवेदन देण्यात आले,

‘माझे घर योजना’ अर्ज वितरणाचा राज्यव्यापी शुभारंभ गोव्यात

Image
‘माझे घर योजना’ अर्ज वितरणाचा राज्यव्यापी शुभारंभ गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मायेम येथून वितरणाला प्रारंभ,नागरिकांच्या दारी गृहसुधारणा मायेम, गोवा | 13 ऑक्टोबर 2025 : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज मायेम ग्रामपंचायत कार्यालयात ‘माझे घर योजना’ अंतर्गत अर्ज वितरणाचा राज्यव्यापी शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्री श्री. अमित शहा यांच्या हस्ते सुरू झालेल्या या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा टप्पा आजपासून सुरू झाला असून, गोव्यातील नागरिकांना घराचा हक्क, गृहसन्मान आणि कायदेशीर स्थैर्य देण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. लोककेंद्री दृष्टीकोन स्वीकारत, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वतः नागरिकांना अर्जांचे वितरण केले. सरकार ही योजना थेट लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या निर्धाराने कार्यरत असल्याचे यानिमित्ताने त्यांनी दाखवून दिले. राज्यभर या योजनेचा प्रसार व जनजागृतीसाठी मुख्यमंत्री यांनी १३ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रत्येक मतदारसंघात प्रत्यक्ष भेट देत अर्ज वितरण मोहीम सुरू केली आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत सर्व ...

आमदार धस आण्णा एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची संधी द्याच

Image
आमदार धस आण्णा एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची संधी द्याच अंमळनेर गटात भाऊसाहेब भवर, तर डोंगरकिन्हीत अनिलशेठ काथवटे आमदार धस यांच्या निष्ठावंत शिलेदाराची चर्चा पाटोदा (गणेश शेवाळे) राजकारणात सत्ता येते-जाते, पण निष्ठा आणि निःस्वार्थ कार्यकर्त्यांचा आदर कायम राहतो. आजही आमदार सुरेश आण्णा धस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही निष्ठा जिवंत आहे. सत्ता असो या नसो, पद असो वा नसो कायम तुमचा निर्णय अंतिम म्हणून काम करणार्या एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना रणांगणात उतरण्याची संधी द्याच!”हीच जनतेची अपेक्षा अंमळनेर जिल्हा परिषद गटात भाऊसाहेब भवर हे कार्यकर्ते सतत आमदार धस यांच्या विचारधारेवर चालत, संघटनात प्रावीण्य दाखवत आणि गावपातळीवर विकासाची नवी दिशा दाखवत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरलेला आहे,आणि आता रणांगणात उतरायला त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डोंगरकिन्हीत जिल्हा परिषद गटात अनिलशेठ काथवटे हे कार्यकर्ते देखील आमदार धस यांचे कट्टर समर्थक आहेत. गावागावातील समस्यांवर ठामपणे काम करणारे, संघटनशक्ती असलेले आणि ज...

केजच्या कोरडेवाडी गावचा साठवण तलावासाठी 30 ते 35 वर्षांपासूनचा संघर्ष -स्वप्निल वरपे

Image
प्रशासन कोरडेवाडी गावच्या ग्रामस्थांना न्याय देणार आहेत का.  केज प्रतिनिधी    कोरडेवाडी या गावचा गेली 30 ते 35 वर्षापासून साठवण तलावासाठी संघर्ष चालू आहे. केज तालुक्यातील शासन प्रशासन इथली संत्री मंत्री खासदार आमदार पुढारी आणि एक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील गावकऱ्यांना कॉल द्वारे आश्वासन दिले होते तरी देखील आतापर्यंत आश्वासन दिली पण पूर्ण कोणीच केले नाही.   कोरडेवाडी हे गाव गेले 30-35 वर्ष झाले कोरडेवाडी साठवण तलावाच्या मागणीसाठी लढत आहे आत्तापर्यंत या तालुक्याचे जिल्ह्याचे शासन प्रशासन अधिकारी प्रतिनिधी पुढारी संत्री मंत्री आमदार खासदार यांनी फक्त या गाववाल्यांना आश्वासन दिली पण पूर्ण काम कोणीच केले नाही आज गेली 30-35 वर्ष झालं हे गाव साठवण तलावासाठी संघर्ष करत आहे कारण या गावांमध्ये पाणी नाही म्हणुन इथले ग्रामस्थ आत्महत्या करण्यापर्यंत गेले आहेत. कारण या गावांमध्ये कुठल्या प्रकारचं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या पुढार्‍यांच्या आश्वासनाला बळी पडून वैतागून गेली आहेत कारण या गावांमध्ये फक्त प...

आमदार सुरेश धस यांचे आदेश हनुमानाप्रमाणे पालन करणारा शिलेदार सरपंच पद्माकर घुमरे यांची पारगाव जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच पारगाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण गरमावले आहे. या गटातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, आमदार सुरेश धस आण्णा यांच्या आदेशाचे हनुमानाप्रमाणे पालन करणारे आणि त्यांचे खरे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सरपंच पद्माकर घुमरे यांचे नाव आता जोरदार चर्चेत आहे.सुख-दुःखाच्या काळात आमदार धस यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे, आदेश दिला की तत्काळ पालन करणारे असे पद्माकर घुमरे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नाव जोरदार चर्चेत येत आहे.  पद्माकर घुमरे हे कधीही जाती-पातीच्या राजकारणात न अडकता, फक्त आमदार सुरेश धस आण्णा यांचा फायदा आणि त्यांच्या कार्याला बळकटी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रामाणिकपणा,जनसंपर्क कौशल्य आणि प्रशासनासोबत समन्वय यामुळे ते स्थानिक जनतेमध्येही अत्यंत लोकप्रिय आहेत.जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी जोरदार चर्चा सुरू असुन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आशा आहे आमदार सुरेश धस यांचे विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरपंच...

अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे टाळ-मृदंगासह निदर्शने

Image
अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे टाळ-मृदंगासह निदर्शने — डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश :-(दि.१३ )परळी शहरातील सिद्धेश्वरनगर येथील “नर्मदेश्वर गुरूकुल” या वारकरी शिक्षण संस्थेतील ११ बाल वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेधार्थ आणि आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर आज दि.१३ सोमवार रोजी सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात"निदर्शने करण्यात आली. अध्यात्म आणि संस्कार शिकवणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ला अत्यंत दुर्दैवी असून वारकरी संप्रदायावरचा हा हल्ला सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या निदर्शनानंतर पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री बीड ,पोलिस महासंचालक परीक्षेत्र संभाजीनगर,यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, कल...

दलित, आदिवासी व अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा- जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे

Image
 बीड जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेले निवेदन,  बीड, दि. १३ ऑक्टोबर २०२५ (विशेष प्रतिनिधी ) : देशभरात दलित, आदिवासी, बहुजन व शोषित घटकांवर होणाऱ्या जातीय अत्याचारांनी थैमान माजले असून, ही स्थिती राष्ट्रीय आपत्तीप्रमाणे निर्माण झाली आहे, असा आरोप करत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील बीड जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान व विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमार्फत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात आयपीएस अधिकारी वाय. पुरणकुमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबत तसेच दलित अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सेनेचे अध्यक्ष दीपक भाई केदार व महाराष्ट्र प्रवक्ता व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी भारत बंदची हाक देण्याचा इशारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू व लडाखपर्यंत संपूर्ण देशात जातीय अत्याचारांनी कहर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई जी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर महामानव डॉ...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली अहिरे यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

Image
सखाराम पोहिकर गोवराई तालुका प्रतिनिधी   ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली अहिरे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . त्या ठाणे परिसरातील अनाथ मुलांना . वृद्ध लोकांना . त्यांच्या संस्थेच्या वतीने वर्षभर मदत करत असतात . या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत .   त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बीएसएफ बहुउद्देशीय संस्थेने त्यांना कृती गौरव पुरस्कार जाहीर केला . व हा पुरस्कार सोहळा 30 नोव्हेंबर रोजी श्री शेत्र शेगाव या ठिकाणी आपण उपस्थित रहावे अशी बीएसएफ बहुउद्देशीय संस्था . उपेक्षित नायक न्यूज व संकल्प बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कृती गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .  हा पुरस्कार सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील श्री शेत्र शेगाव येथे होणार असून या पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक . पत्रकारिता . सामाजिक . कृषी . कला . अशा विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांना प्रीती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .  त...

“गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Image
“गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 गोव्यात संपन्न, विविधता आणि प्रतिभेला सन्मान पणजी, 12 ऑक्टोबर 2025 : मनोरंजन समाज गोवा, पणजी येथे आज आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 चा समारोप पार पडला. हा कार्यक्रम समावेश, विविधता आणि सशक्तीकरण यांच्यासाठी समर्पित एका आठवड्यापासून चाललेल्या उत्सवाचा भव्य शेवट ठरला. भारतातील आणि परदेशातील सहभागी या महोत्सवात एकत्र आले आणि विकलांग व्यक्ती तसेच समावेशक विकासाचे प्रवर्तक यांच्यातील प्रतिभा, नवकल्पना आणि सहकार्य याचे सजीव दर्शन घडवले. मागील आठवडाभर राज्याची राजधानी विविध कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि संवाद सत्रांनी उजळून निघाली. या कार्यक्रमातून समाजाने समानता आणि सहानुभूतीला प्राधान्य दिल्यास व्यक्तींच्या असीम क्षमतांचा साक्षात्कार कसा होतो, हे स्पष्ट झाले. हा कार्यक्रम फक्त गोव्याच्या सहानुभूतिपूर्ण वृत्तीचे प्रतिनिधित्व करीत नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेशयोग्यता आणि समावेशाला पुढाकार देणाऱ्या...

जीवनातील विविध प्रसंग,घटना अचुक सांगणारे लोखंडे महाराज

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) राजेंद्र महाराज लोखंडे या अवलियाला एक अदभुत किमया अवगत आहे.लोखंडे महाराज आपल्या अदभुत लॉजीकने पुढील व मागील अनेक वर्षमधील सणावारांच्या तारखा अगदी अचुकपणे सांगतात. एवढेच नाही तर समोरील माणसांच्या जन्मतारखा देखील वारासह सांगतात. पाटोदाजवळ असलेल्या दिघोळ येथील राजेंद्र गंगाराम लोखंडे हे काही वर्षांपूर्वी शिक्षण व कामाच्या निमीत्ताने पाटोदा शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले. शाळेत असल्या पासुनच राजेंद्र लोखंडे हे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत. काहीसे गुढ वागत, त्यावेळी खेमानंद महाराज यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले होते. पाटोद्यात आल्यानंतर त्यांनी एम.ए.पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण करून काही काळ ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या संस्थेत नोकरी ही केली मात्र त्यांच्या अध्यात्माकडेच अधिक कल राहीला. महाराज ब्रम्हचारी आहेत.दरम्यान त्यांच्या या गुढ वागणुकीतुनच त्यांच्यातील अनोख्या तर्कशक्तीची जाण होऊ लागली.एकादा अनोळखी व्यक्ती जरी त्यांच्यासमोर गेला आणि त्यांना वाटले तर ते व्यक्तिची जन्मतारीख वारासह अगदी अचुकपणे सांगतात.त्यांच्या तारखेच्या तर्कशास्त्रानुसार त्या व्यक्ति...