Posts

Showing posts from January, 2026

जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश

Image
जिल्हा परिषद शाळांच्या स्वच्छतेसाठी सीईओ जितिन रहेमान यांचे कठोर निर्देश जिल्हा परिषद कार्यालयातील “शौचालय स्वच्छता” गांधीगिरी आंदोलनास यश :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. ३१) बीड जिल्हा परिषद अंतर्गत दि. १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात आलेली “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही मोहीम केवळ कागदोपत्रीच राबविण्यात आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सहकाऱ्यांसह गांधीगिरी आंदोलन केले. दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी शौचालयांचा अभाव असून, काही ठिकाणी उपलब्ध शौचालये वापरण्यायोग्य नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक कुचंबणा होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य इमारतीतील सीईओ यांच्या केबिनसमोरील पुरुष शौचालयाची स्वच्छता करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत सीईओ जितिन रहेमान यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथ...

31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे - वैभव स्वामी

Image
31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे - वैभव स्वामी  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन बीड प्रतिनिधी  वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 106 वर्षापूर्वी मूकनायक हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डी जी वानखेडे यांना मूकनायक 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्व पत्रकार आणि आंबेडकर प्रेमी व अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.  बीड येथील तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर,डीपी रोड, बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप व महामानव सार्वजनिक वाचनालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभ ...

आजचे करिअरचे निर्णय उद्याच्या गोव्याला आकार देतील- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Image
आजचे करिअरचे निर्णय उद्याच्या गोव्याला आकार देतील- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करिअर कॉन्क्लेव्ह २०२६ : गोव्याच्या युवकांना उदयोन्मुख करिअर संधींचे मार्गदर्शन करणाऱ्या मंचांचे आयोजन पणजी, ३० जानेवारी २०२६ : कामगार व रोजगार विभागाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, बांबोळी येथे करिअर कॉन्क्लेव्ह २०२६ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना व युवकांना करिअर नियोजन, कौशल्य विकास तसेच उदयोन्मुख रोजगार संधींबाबत मार्गदर्शन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दिवसभर चाललेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र, संवादात्मक चर्चा तसेच विविध करिअर पर्याय, स्टार्ट-अप्स, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या मंचामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, उद्योगांच्या गरजा समजून घेता आल्या तसेच पारंपरिक आणि नव्या क्षेत्रांतील संधींचा शोध घेता आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून युवकांची संख्या मोठी असल्यामुळे राष्ट्रनिर्मित...

बीडच्या विकासाला गती देणाऱ्या विकासपुरुष लोकनेते अजितदादांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कट्यावर आंदोलनकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Image
बीड :- (दि. ३० )महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात त्यांनी विकासाची नवी आशा जागवली होती. पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी रेल्वे, विमानतळ, ट्रिपल आयटी (III-T), सहकार भवन, जिल्हा क्रीडा संकुल, सिल्क पार्क, रुग्णालयांसाठी नवीन इमारती व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाड्यांसाठी निधी, स्मशानभूमी विकास, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहे, फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी मदत, कंकालेश्वर मंदिर, नाट्यगृह आदींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यांच्या या विकासकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आज दि. ३० (शुक्रवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बीडकरांच्या व...

मुक्त पत्रकार डी.जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा मूकनायक पुरस्कार जाहीर

Image
मुक्त पत्रकार डी.जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा मूकनायक पुरस्कार जाहीर 31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी जाहीर कार्यक्रमात होणार वितरण बीड प्रतिनिधी :- सेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा मूकनायक 2026 हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मूकनायक दिन समारंभामध्ये सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी दिली आहे.  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने बीड येथील ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांचे अविरत जनहितार्थ सुरू असलेले सेवा कार्य लक्षात घेऊन त्यांना 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मूकनायक दिन समारंभ कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सीईओ पी व्ही बनसोडे लाभणार असून अनेक मान्यवर संपादक, पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा गुणगौरव सोहळा तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर, डीपी रोड बीड येथे आयोजित करण्य...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते GSSC मार्फत निवडलेल्या २१ लेखापालांना नियुक्तीपत्रांचे वितरण

Image
पणजी, २८ जानेवारी २०२६ : पारदर्शक प्रशासन आणि कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाबाबत आपली कटिबद्धता अधिक दृढ करत, गोवा सरकारने मंगळवारी पणजी येथील मंत्रालयात लेखा संचालनालयात नव्याने नियुक्त झालेल्या २१ लेखापालांच्या समावेशानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कर्मचारी निवड आयोग (GSSC) मार्फत लेखा संचालनालय, गोवा सरकारसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “भरती प्रक्रिया गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने राबविण्यात आली आहे. सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि गोव्याच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करत असलेल्या त्यांच्या व्यावसायिक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो.” डॉ. सावंत यांनी राज्यातील आर्थिक शिस्त राखणे आणि कार्यक्षम वित्तीय व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात लेखा संचालनालयाची महत्त्वाची भूमिका असल्याचे अधोरेखित केले. नव्याने नियुक्त लेखापालांनी आपली कर्तव्ये बजावताना प्रामाणिकपणा, जबाबदार...

जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळांपासून विद्यार्थ्यांना मुक्ति देण्यासाठी १५ कोटींची मागणी केल्यानंतर तब्बल ३० कोटींचा भरभरून निधी देणारे पालकत्व हरपले : डॉ. गणेश ढवळे

Image
बीड :- (दि. २९ )बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक शाळा मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील ९४ शाळांकडे स्वतःची इमारत नाही, तर ३८१ शाळांमधील ६०७ वर्गखोल्यांना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. पावसाळ्यात छप्पर कोसळणे, भिंती पडणे आणि विद्यार्थ्यांना इजा होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदने व आंदोलनांद्वारे सातत्याने निधीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा नियोजनमधून १४ कोटी ८५ लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र दोन वर्षे निधी मंजूर होत नव्हता. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर, डॉ. ढवळे यांनी सातत्याने लक्ष्यवेधी आंदोलने करत निधीची मागणी लावून धरली. याची दखल घेत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये नवीन शाळा इमारत बांधकामासाठी १६ कोटी ५० लाख रुपये अशी तरतूद मंजूर केली. नियमानुसार दीडपट कामे हाती घेतली जाणार असल्य...

पाटोदा–मांजरसुंबा महामार्गावर अपघातांची साखळी कायम,जाधववस्ती जवळ ट्रक–दुचाकीचा भीषण अपघात; संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू

Image
पाटोदा–मांजरसुंबा महामार्गावर अपघातांची साखळी कायम जाधववस्ती जवळ ट्रक–दुचाकीचा भीषण अपघात; संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू बीड प्रतिनिधी :- ( दि.२८ ) अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आज दि.२८ बुधवार रोजी सायंकाळी सव्वा ७ वाजता जाधववस्ती परिसरात ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात संतोष मधुकर कागदे वय ४२ वर्षे (रा. मोरगाव, ता. व जि. बीड) यांचा मृत्यू झाला. ते दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच १२ एच डी १५१४ आणि दुचाकी क्रमांक एम एच १२ ए एल ८५६१ यांच्यात जोरदार धडक झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक अत्यंत भीषण होती. अपघातात संतोष कागदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस प्रशासनास कळविण्यात आले. त्यानंतर लिंबागणेश पोलीस चौकीचे पोह. मन्सूर शेख, पोशि. बाबासाहेब खाडे व पोशि. अब्दुल सय्यद हे अधिकारी व क...

के के वाघ क्रिकेट संघ राज्यस्तरावर 'द्वितीय'.

Image
   कसबे सुकेणे -नाशिक येथील नमो गार्डन येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेब नगरच्या १९ वर्षीय संघाने द्वितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर गोल्ड मिळविले.त्याबद्दल  संघनायक ओम पाटील,वैभव बोरसे,वेदांत गवारे,क्षितिज पवार,राज आहेर,किरण माळी,विशाल गोयेकर,ऋषिकेश गोयेकर,आदित्य वाघ,संकेत फापाळे वेदांत सोनवणे,सिद्धेश खैरे,संकेत रोटे आदी खेळाडूंना सिव्हर मेडल प्रदान करून तसेच क्रीडामार्गदर्शक धनंजय मोरे क्रीडाप्रमुख गोविंद कांदळकर यांचे अभिनंदन करून यथोचित सन्मान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.प्रसंगी के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ,जनसंपर्क प्रमुख अजिंक्य वाघ,अधीक्षक श्रीकांत ढवळे,शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी नाठे,समन्वयक यशवंत ढगे,प्राचार्य दिवाकर शेजवळ,मुख्याध्यापिका उज्वला तासकर,प्राचार्य बाळासाहेब मोंढे उपमुख्याध्यापिका सुनीता वडघुले,डॉ राहुल घायाळ,बस्तीराम रानडे,आर डी गांगुर्डे, प्रवीण रणदिवे,संजय धनगर,उपस्थित जेष्ठ नागरिक संतु जाधव परिसरातील पालक आदींनी ...

ओएनजीसी, बेतुल गोवा येथे India Energy Week 2026 चे उद्घाटन

Image
ओएनजीसी, बेतुल गोवा येथे India Energy Week 2026 चे उद्घाटन स्वच्छ ऊर्जा भारताच्या शाश्वत विकासाचा केंद्रबिंदू ठरेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०५० पर्यंत १००% नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी गोव्याकडून स्वच्छ ऊर्जा रोडमॅप निश्चित: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पणजी, २७ जानेवारी २०२६ : भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा अधिक बळकट करत दक्षिण गोव्यातील ओएनजीसी बेतुल येथे India Energy Week (IEW) 2026 चे उद्घाटन करण्यात आले. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संरक्षणाखाली आयोजित या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय मंचात ऊर्जा संक्रमण, ऊर्जा सुरक्षा, तांत्रिक नवकल्पना आणि शाश्वत आर्थिक विकास यावर चर्चा व मार्गदर्शन केले जात आहे. या जागतिक स्तरावरील कार्यक्रमात ७५,००० हून अधिक ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक, ७०० प्रदर्शक, ११ विषयक विभाग (थीमॅटिक झोन) आणि ९ हून अधिक देशांचे पॅव्हिलियन सहभागी झाले असून India Energy Week हा जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा क्षेत्रातील परिषदांपैकी एक ठरत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उच्चस्तरीय परिषद, तंत्रज्ञान प्रदर्शन आणि धोरणा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन

Image
वाराणसीतील मणिकर्णिका घाटाची तोडफोड करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ  लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन लिंबागणेश :- (दि.२७ ) उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील जगप्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामाच्या नावाखाली ऐतिहासिक मूर्ती व शिवलिंगांची तोडफोड करण्यात आल्याचे प्रकार सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून समोर आले आहेत. संपूर्ण भारतात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक संरचनांचे झालेले नुकसान हा केवळ बांधकामाचा प्रश्न नसून तो धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशावर झालेला घाला असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (दि. २७) रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविंद्र निर्मळ, कृष्णा पितळे यांची समयोचित भाषणे झाली.निवेदन मंडळ अधिकारी ...

गढी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांला दिला ध्वजारोहण करण्याचा दिला मान

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज सकाळी ७ =३० वाजता ७७ वा प्राजकसत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी आजपर्यत कोणत्याही सरपंचांनी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला नव्हता तो आज गढी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच घोंगडे विष्णूपंत यांनी गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांना प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने गढी ग्रामपंचायत मध्ये आज प्रजाकसताक दिनानिमित्त ध्वज फडकवण्याचा मान देउन एक नवा इतिहास घडवला यावेळी हा प्रजाकसत्ताक दिन सरपंच घोंडगे विष्णूपंत . यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच विष्णूपंत घोगडे म्हणाले की हा ध्वजारोहणाचा मान सन्मान हा त्यांचा असतो आणि आजपर्यत हा मान सरपंचानी कुणालाही दिला नाही परंतू मी गेल्या दोन वर्षापासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक वेळी ध्वज फडकवण्याचा मान सर्वसामान्य व्यक्तीला देत आलो आहे तेव्हा आजचा प्रजाकसत्ताक दिन निमित ध्वज फडकविण्याचा मान मा...

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ

Image
जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ शिक्षणप्रेमी अमोल जाधवांवर येणे हि शासन–प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ; खाजगी संस्थानिकांशी संधान बांधून सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. २६ ) नांदुरघाट ता. केज जि. बीड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी वर्गखोल्या मंजूर न झाल्याने तसेच शाळा बांधकामातील कथित गैरव्यवहारावर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांना प्रजासत्ताकदिनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, ही घटना शासन व प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असून अत्यंत लाजिरवाणी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली आहे. नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळा बांधकामातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी अमोल जाधव गेल्या दोन वर्षा...

प्रजासत्ताक दिन विशेष :अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा

Image
लेख : प्रजासत्ताक दिन विशेष :अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा प्रजासत्ताक दिन विशेष : अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया ! प्रस्तावना : २६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे. जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने : आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन अस...

अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांच्या हस्ते सत्कार

Image
       बीड (प्रतिनिधी ) : - मौजे जोला (ता. केज) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे व सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला. त्यांनी धिरज भवर (रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी) या तरुणास १०८ रुग्णवाहिकेतून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी सौ आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे दाम्पत्याचा सत्कार करून विशेष कौतुक केले. केज–बीड रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. अशा स्थितीत सौ. आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. जखमी तरुणास त्वरित रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू होऊ शकले. वेळेत मदत मिळाल्याने पुढील उपचाराची प्रक्रिया सुलभ झाली, असेही सांगण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी ढाकणे दाम्पत्याच्या कार्य...

बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य !परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी

Image
बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य ! परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी  जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; तात्काळ स्वच्छता न राबविलास जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन ! मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांचा इशारा  बीड( प्रतिनिधी ) बीड शहराला मागील अनेक दशकापासून पाणीपुरवठा करणारे पाली गावाजवळी बिंदुसरा धरण हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणारे अनेक प्रवासी व बीड शहरातील पर्यटन प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकनिक करण्यासाठी व धरण पाहणसाठी येतात. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाली धरणाची देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेची जबाबदारी असणारे जलसंपदा विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असून येणाऱ्या पर्यटकांना मात्र धरणातील शुद्ध पाणी पाहण्याऐवजी घाणीचे दर्शन होत आहे. या गंभीर बाबीकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे. पाली गावाजवळ सोलापूर बीड राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराला ...

लिंबागणेश येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांची किर्तनाने सांगताकिर्तन, महापुराण, यज्ञ व संत महंतांचा सत्कार सोहळा संपन्न

Image
लिंबागणेश प्रतिनिधी ):बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्री भालचंद्र गणपती देवस्थानच्या वतीने श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत श्रीमत् गणेश महापुराण कथा व पंचकुंडी गणेश यज्ञास शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी विधिवत प्रारंभ झाला होता. या धार्मिक सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची विस्तृत रूपरेषा आखण्यात आली होती. बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी श्री भालचंद्र गणेशाचा महाभिषेक, श्रीमत् गणेश महापुराण कथेचे वाचन, श्री मन्मथ स्वामी पालखी आगमन सोहळा तसेच हरिपाठ कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. यानंतर पुढील दिवशी सर्व ब्रह्मवृदांच्या हस्ते सहस्त्र आवर्तन महाभिषेक करण्यात आला. यावेळी गणेश जन्मकथेचे वाचन तसेच डॉ. वीरूपक्ष शिवाचार्य स्वामी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनातून त्यांनी भक्ती, संस्कार व धार्मिक परंपरेचे महत्त्व भाविकांना पटवून दिले. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाची सांगता शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर यांच्या सुश्राव्य व प्रेरणादायी किर्तनान...

“नवनित कांवत साहेब, डोळे उघडा आणि नीट पाहा!”सर्वसामान्यांना हेल्मेट नियमांची सक्ती; मात्र पोलिसांकडूनच नियमांची ऐसी की तैसी!

Image
“नवनित कांवत साहेब, डोळे उघडा आणि नीट पाहा!” सर्वसामान्यांना हेल्मेट नियमांची सक्ती; मात्र पोलिसांकडूनच नियमांची ऐसी की तैसी! पोलीस अधीक्षकांना निवेदन:- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. २४) केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत दि. १९ जानेवारी २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्ट आदेश स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक मा. नवनित कांवत यांनी जिल्हा प्रशासनाला निर्गमित केले आहेत. या आदेशाच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८० शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विविध दैनिकांत प्रसिद्ध झाली आहे. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे पोलीस अधीक्षकांच्या आदेशांनाच केराची टोपली दाखवत पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वतः विना हेल्मेट बिनधास्तपणे दुचाकी चालवत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात सर्रास दिसून येत आहे. यामुळे हेल्मेट सक्तीच्या नियमांचीच नव्हे, तर कायद्याचीही खुलेआम पायमल...

26 जानेवारी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन

Image
26 जानेवारी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन  बीड प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची माहिती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:05 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे होईल. बीड शहरातील सर्व सुजाण नागरिकांना या महत्त्वपूर्ण वेळी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण हा दिवस आपल्या देशाच्या लोकशाहीचा आणि स्वातंत्र्याचा गर्विष्ठ प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, कृपया खालील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याचे आवाहन करण्यात येते: कार्यक्रम 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:05 वाजता प्रारंभ होईल. कृपया या वेळेस कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याची तयारी करा.   या ध्वजारोहणाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे होणार आहे, ज्याचे ऐतिहासिक महत्त्व सर्व उपस्थित व्यक्तींनी जाणून घेणे गरजेचे आहे. सर्व सुजाण नागरिकांना या विशेष प्रसंगाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपली उपस्थिती हा क...

भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्स्पो आणि शिखर परिषद २०२६ चे गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

Image
भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्स्पो आणि शिखर परिषद २०२६ चे गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन 'योगाच्या प्रचारासाठी आम्ही नेहमी गोवा सरकारच्या पाठीशी राहू', आचार्य बाळकृष्ण यांची स्पष्टोक्ती पणजी, २३ जानेवारी, २०२६ : भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि वेलनेस एक्स्पो आणि शिखर परिषद २०२६ च्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन आज बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाले. हा कार्यक्रम आयुर्वेद आणि सर्वांगीण आरोग्यसेवेला राष्ट्रीय प्राधान्य म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उद्घाटनानंतर मान्यवरांनी एक्स्पोला भेट दिली, ज्यात ‘फ्लेवर्स ऑफ वेलनेस’ पॅव्हेलियन आणि ‘एक्सपिरियन्स झोन पॅव्हेलियन’चे उद्घाटनही समाविष्ट होते. या ठिकाणी आयुर्वेद-आधारित उपचार पद्धती, योग, पोषण, जीवनशैली-आधारित आरोग्य आणि एकात्मिक आरोग्यसेवा पद्धती प्रदर्शित करण्यात आल्या, ज्यातून भारतातील समृद्ध परंपरा आणि आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना अधोरेखित झाल्या. या एक्स्पोने देशभरातील आरोग्य तज्ञ, चिकित्सक, संशोधक, विद्यार्थी आणि आरोग्यप्रेमींना...

मुख्याधिकारी साहेब, गरिबांच्या गाड्यावर हातोडा ; श्रीमंतांच्या अनधिकृत बांधकामांना अभय

Image
मुख्याधिकारी साहेब, गरिबांच्या गाड्यावर हातोडा ; श्रीमंतांच्या अनधिकृत बांधकामांना अभय  ओपन स्पेस, गार्डन गायब ; तीन मजले इमारतीचे परवानगी असताना बीड शहरात सात मजली इमारती कशा ? तात्काळ दखल घ्या, नसता नगरपालिकेसमोर आंदोलन  मनसे राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा ! बीड (प्रतिनिधी ) बीड नगरपालिकेत मागील सात वर्षापासून प्रशासन राज होते, नगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर या ठिकाणी आता लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. मात्र प्रशासकीय राज असताना अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का ? बीड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेली आहेत, लोकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करत बांधकामे केली असून शहरातील विविध भागात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चहा वडापाव व इतर खाद्यपदार्थांची गाडी लावणाऱ्या गरीब लोकांवर मुख्याधिकारी कारवाई करत स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, बीड शहरात मोठ्या प्रमाणात ओपन स्पेस गायब आहेत गार्डन नावालाच तर लहान मुलांच्या खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने क्रीडांगणावर लहान लेकरांना जावे लागते, ...

गोव्यासाठी १६,५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

Image
गोव्यासाठी १६,५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर नाबार्ड राज्य पतपुरवठा परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 'राज्य फोकस पेपर २०२६-२७' चे अनावरण पणजी प्रतिनिधी :- नाबार्ड (NABARD) द्वारे आयोजित राज्य पतपुरवठा परिषद २०२६-२७, हॉटेल नोवोटेल येथे पार पडली. यामध्ये धोरणकर्ते, बँकिंग संस्था आणि विकास क्षेत्रातील भागधारक एकत्र आले होते, ज्यांनी गोव्याच्या सर्वसमावेशक, शाश्वत आणि लोककेंद्रित विकासाचा आराखडा तयार केला.  राज्य फोकस पेपर २०२६-२७ चे अनावरण या परिषदेत राज्याच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांना संस्थात्मक पतपुरवठा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान, माननीय मुख्यमंत्र्यांनी गोव्यासाठी राज्य फोकस पेपर २०२६-२७ चे अनावरण केले, ज्यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी १६,५१२ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याच्या संभाव्यतेची रूपरेषा मांडण्यात आली आहे. या आराखड्याचा उद्देश कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs), मत्स्यव्यवसाय, संलग्न क्षेत्रे, सहकारी संस्...

केज–बीड रस्त्यावर खड्यात पडून तरुण १२ तासांहून अधिक काळ बेसुध; ढाकणे दाम्पत्यामुळे जीव वाचला

Image
केज–बीड रस्त्यावर खड्यात पडून तरुण १२ तासांहून अधिक काळ बेसुध; ढाकणे दाम्पत्यामुळे जीव वाचला अपघातस्थळी कोणाच्याच नजरेस न पडल्याने रक्तस्रावातच पडून होता तरुण केज प्रतिनिधी : - केज–बीड रस्त्यावर आंबाळाच्या बरडाजवळ दुचाकी अपघात होऊन एक तरुण तब्बल १२ तासांहून अधिक काळ खड्यात बेसुध अवस्थेत पडून असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची अवस्था नाजूक बनली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे व सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांच्या सतर्कतेमुळे वेळेत मदत मिळून त्याचा जीव वाचला. जखमी तरुणावर सध्या अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. केज–बीड रोडवरील आंबाळाच्या बरडाच्या पूर्वेस असलेल्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला चार फूट खोल खड्यात पॅशनप्रो (MH 24 AC 1275) ही मोटारसायकल पडलेली आढळून आली. या ठिकाणी धिरज भवर (रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत बेसुध पडलेला होता. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास लातूरहून आष्टी तालुक्यातील हरीनारायण आष्टा येथे जात असताना हा अपघात झाला असावा. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्त...

डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गोवा सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सामंजस्य करार

Image
पणजी प्रतिनिधी : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आज राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (MoU) केला.  हा सामंजस्य करार आल्तिन्हो येथील मुख्यमंत्री निवासस्थानी करण्यात आला. गेल्या महिन्यात स्टारलिंकच्या अधिकाऱ्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासाठी हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. चर्चेपासून करारापर्यंतची ही जलद प्रगती, विशेषतः दुर्गम भागांमधील कनेक्टिव्हिटीची दरी कमी करण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दर्शवते.  दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार:- मुख्यमंत्री या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे दुर्गम भागात विश्वसनीय हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध करून गोव्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. यामुळे शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये चांगल्या सेवांना पाठिंबा मिळेल आणि आपत्कालीन प्रतिसादाला बळकटी मिळेल.”  यावेळी माहित...

धानोरा येथील जनता जुनियर कॉलेज मध्ये कै.धोंडीराम (दादा) बांदल यांची पुण्यतिथी साजरी

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :              आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांची ( २५ ) वी पुण्यतिथी सालाबाद प्रमाणे याही वर्षी धानोरा ,तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील जनता जुनिअर कॉलेज मध्ये साजरी करण्यात आली .  या प्रसंगी,संस्थेचे सचिव/ आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती विजयकुमार बांदल (आण्णा) उपस्थित होते .  तसेच मुख्याध्यापक-प्राचार्य ढोबळे सर, उपमुख्याध्यापक सय्यद ए डी सर , उपप्राचार्य तिपुळे सर, तसेच माध्यमिक विद्यालयाचे व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी या प़सगी उपस्थित होते .

३५ हजार फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा अनोखा वाढदिवस; एअर इंडियाने दिला अविस्मरणीय अनुभव

Image
नाशिक : आकाशात ढगांच्या वर, तब्बल ३५,००० फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि रोमांचक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्राहकांना नेहमीच खास आणि अविस्मरणीय क्षण देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाने यावेळीही आपल्या वेगळेपणाची प्रचिती दिली. आपण अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे केले असतील, मात्र आकाशात, ढगांच्या वर, थंडगार वातावरणात हवाई सुंदरींसोबत वाढदिवस साजरा होणे हे खरोखरच स्वप्नवत अनुभव असतो. असे स्वप्नातील क्षण प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी नाशिकमधील युवा नेतृत्व डॉ. रुपेश नाठे यांना मिळाली.  या विशेष प्रसंगी हवाई सुंदरींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले एअर इंडियाचे अभिनंदन पत्र डॉ. नाठे यांना सादर केले. “तुमचा वाढदिवस अविस्मरणीय ठरो आणि येणारे वर्ष सुख-समृद्धीचे जावो,” अशा मनःपूर्वक शुभेच्छा या पत्रातून देण्यात आल्या. याशिवाय, डॉ. नाठे यांच्यासाठी विशेष शुगर-फ्री केक आणि फ्रूट ज्यूसचे आयोजन करण्यात आले. ३५,००० फूट उंचीवरच एक आगळीवेगळी ‘आकाशातील पार्टी’ रचण्यात आली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  या संपूर्ण आयोजनाचे श्रेय हवाई सुंद...

माजी सैनिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयावर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे गंभीर आरोप

Image
बीड (प्रतिनिधी ) : माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी केला आहे. कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना बगल देत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पिडीत माजी सैनिकांवर अन्याय केल्याचा दावा त्यांनी केला. वाघमारे यांनी सांगितले की, माजी सैनिकांच्या तक्रारी सोडवण्याऐवजी त्यांचीच पडताळणी व अडवणूक केली जाते. अमृत जवान सन्मान योजना वेळेत राबवण्यातही दुर्लक्ष करण्यात आले असून, याबाबत तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. तसेच, असंवैधानिक समित्या स्थापन करून काही माजी सैनिकांना मोहरा बनवत अन्यायकारक कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडूनही आपल्यावर अन्याय होत असून, यासंदर्भात न्यायालय, मानवाधिकार आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी सैनिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी दिला आहे.

वडगाव ढोक येथे श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या पत्नी यांचा गावकऱ्यावतीने सत्कार व होलार समाज दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न

Image
गेवराई (१९ ) वडगाव ढोक तालुका गेवराई येथील प्रसिद्ध विद्रोही शाहीर श्री मोहन आविळे व त्यांच्या पत्नी या दांपत्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व होल्हार समाज दिनदर्शिका प्रकाशन गावकरी मंडळांच्या वतीने करण्यात आले.        सविस्तर वृत्त असे की प्रथम थोर स्वातंत्र्य सैनिक विदा आविळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वडगाव ढोक येथील विद्रोही शाहीर यांनी ठाणे येथे पार पडलेल्या होलार समाज मेळाव्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या विविध पत्नी यांनी ठाणे येथे संपन्न झालेल्या होलार समाज मेळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपल्या जिल्ह्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवला अशा या शाहिरांचा सत्कार वडगाव ढोक गावकरी मंडळींच्या वतीने आज करण्यात आला व होलार समाज दिनदर्शकेचे प्रकाशन ही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी चळवळीमध्ये काम करणारे गावातील युवक गावकरी मंडळी महिला समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे.

Image
प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे. येवता :प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१९ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे प्रथमच जीवाची वाडी -पंढरपुर पायी दिंडी सोहळा प्रारंभ सुरू करण्यात आला,प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार श्री. केशवराव(दादा)आंधळे म्हणाले की यावर्षी प्रथमच जीवाची वाडी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा सुरू होत आहे.मनुष्याने प्रामार्थ केला तर खरोखरच सुख आणि समाधान मिळते.स्वातंत्र्य सैनिक कै.भगवान काळे यांच्या आत्म्यास खरोखरच शांती लाभेल असे धार्मिक उलखनीय कार्य त्यांचे तिन्ही चिरंजीव पद्माकर,आण्णासाहेब व नामदेव यांनी केले आहे.लागलीच ह.भ.प.श्री.जालींदर महाराज नेहरकर यांचे किर्तनाचे आयोजन केलेले असुन या सुवर्ण संधीचा भावीकांनी लाभ घेण्याचे आव्हान केले,काळे कुटूंब व ग्रामस्थांनी आमदार आंधळे साहेबांचा हृदय सत्कार करून त्यांचे आभार मानले.

कुठंनही घुसा पण मुंबईत दिसा.धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांच्या आवाहनाला लिंबागणेश पंचक्रोशीतील बांधवांचा प्रतिसाद

Image
लिंबागणेश:- ( दि.२० ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एसटी) प्रवरगाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे या न्याय मागणी गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज बांधव करत आहेत.ईतर राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात येतो मात्र महाराष्ट्र राज्यात धनगड आणि धनगर एकच असताना सरकारने आश्वासन देऊनही पाळले नाही.आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असुन धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी आज दि.२० मंगळवार रोजी मुंबई येथे ऊद्या दि.२१ रोजी पासुन आझाद मैदान मुंबई येथे सुरू होणा-या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन केले असुन या आवाहनाला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधवांनी कोणत्याही वाहनाने आणि कोणत्याही मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा ठाम निर्धार केला आहे. यावेळी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो" मल्हारराव होळकरांचा विजय असो ""दिपकभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " मल्हार बोलो मुंबई चलो " कुठुनही घुसा पण मुंबईत दिसा" अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी क...

सरकारी बाबूंना दंड, मात्र कंत्राटदारांना पायघड्या!

Image
सरकारी बाबूंना दंड, मात्र कंत्राटदारांना पायघड्या! वडवणी–तेलगाव २५५ कोटींच्या शक्तीपीठ महामार्गावर काम सुरू असतानाच तडे कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २० )केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत १९ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८० शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एकीकडे जिल्हा प्रशासन व रस्ता सुरक्षा समिती नियम मोडणाऱ्या सरकारी बाबूंवर तत्परतेने दंडात्मक कारवाई करत असताना, दुसरीकडे मात्र कोट्यवधींचे रस्ते काम निकृष्ट दर्जाचे असतानाही संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रशासनाच्या या दुजाभावावर तीव्...

पाचोरा पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या १२ तासांत मोबाईल चोरीचा छडा, आरोपी जेरबंद

Image
 यूसूफ पठाण प्रतिनिधी   पाचोरा शहरात मोबाईल चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शोध पथकाच्या जलद व अचूक तपासामुळे आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दि. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ५.२५ वाजता, फिर्यादी किशोर आनंदराव नेरकर (वय ३१, व्यवसाय – स्वीट व कोल्ड्रिंक्स विक्री, रा. कुंभारपुरी, पाचोरा) हे आपल्या चारचाकी वाहनात मोबाईल चार्जिंगसाठी ठेवलेला असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २९/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसमाची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी सौरभ नाना भिल (वय २३, रा. कळमसरे, ता. पाचोरा) यास ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीकडून ₹१५,०००/- किमतीचा शाओमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल (IMEI No. 8671...

विदर्भातील तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, शिष्यवृत्ती आणि आधुनिक करिअर यावर एक दिवसीय कार्यशाळेतून मार्गदर्शन

Image
बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी तांडा फाउंडेशन आणि वसंतराव नाईक अध्ययन मंडळ, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर यांचा संयुक्त उपक्रम बदलत्या काळात सामाजिक शास्त्र शाखेतील उच्च शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत. या संधींची योग्य माहिती, मार्गदर्शन आणि दिशा मिळावी या उद्देशाने ही एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात करण्यात आली होती. रविवारी पार पडलेल्या या कार्यशाळेत देशातील तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठे, प्रवेश प्रक्रिया, फेलोशिप्स आणि सामाजिक विकास क्षेत्रातील विविध करिअर मार्गांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये 115 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कायशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून तांडा फाउंडेशन चे संचालक प्रशांत चव्हाण, युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स आणि चेवनिंग स्कॉलर असलेले आकाश नवघरे, फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सेक्युरिटी चे आदिनाथ जाधव, शिव नाडर यूनिवर्सिटी दिल्ली एनसीआर च्या हिमांशी भालाधरे, अझीम प्रेमजी फाउंडेशन चे रोशन जाधव, महिंद्रा विद्यापीठ हैदराबाद च्या वैष्णवी जाधव, ...