Posts

Showing posts from December, 2025

गोव्यातील प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी ‘कुशावती’ तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती

Image
पणजी, ३१ डिसेंबर : गोव्यातील प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी गोवा सरकारने ‘कुशावती’ हा राज्याचा तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा परिषदांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शासन व नागरिकांमधील अंतर कमी होऊन प्रशासन अधिक सुलभ होणार आहे. नवीन कुशावती जिल्ह्यात सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा हे तालुके समाविष्ट असतील. भौगोलिक सलगता, समान संस्कृती आणि जीवनशैलीमुळे हे तालुके एकमेकांशी जोडलेले आहेत. या जिल्ह्याला कुशावती नदीचे नाव देण्यात आले असून ही नदी चारही तालुक्यांतून वाहत असल्याने ती या भागाची ओळख ठरते. या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “गोव्यातील तिसरा जिल्हा म्हणून कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुशावती नदीला चालुक्य काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक बळकट होईल.” नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे नागरिकांना शासकीय कार्याल...

गोव्यातील जिल्हा पंचायत निकालांवर ‘म्हाजे घर’ योजनेचा ठसा

Image
गोव्यातील नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की स्थानिक पातळीवरील निवडणुका या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेल्या असतात. या निवडणुका केवळ राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी नसून, नागरिकांच्या अनुभवांवर आधारित शासनाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनसुद्धा ठरतात.   राज्य किंवा राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठमोठे मुद्दे आणि घोषणांनी मतदाराचे लक्ष वेधले जाते, पण स्थानिक निवडणुकांत मतदार अधिक प्रायोगिक दृष्टीने विचार करतात. त्यांच्या घरासमोरील रस्ते, दिवे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आणि सरकारी सेवा वेळेत मिळतात का, हे त्यांचे खरे मोजमाप असते. यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसले. मतदारांनी उत्साहाने मतदान केले आणि प्रशासनाच्या कामगिरीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ५,५२,८०७ मतदारांनी मतदानात भाग घेतला, तर मतदानाची टक्केवारी ७०.८१ इतकी राहिली, ही आकडेवारी नागरिकांची सहभागाची इच्छा आणि स्थानिक शासनाबद्दलची जागरूकता दर्शवते. ‘म्हाजे घर’ योजनेचा सुरुवात आणि हेतू ‘म्हाजे घर’ योजना गोवा सरकारने २०२५ मध्ये सुरू केली. दशकानुदशके प्रलंब...

बीड जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत रस्ते कामांमध्ये मोठा गैरव्यवहार, तांदळवाडी घाटमध्ये ओव्हरलॅपिंग व बोगस काम- नितीन सोनवणे

Image
 बीड, दि. ३१ डिसेंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) 'मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट गावात मंजूर झालेल्या खडीकरण व सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रारदार नितीन सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर केला आहे.तक्रारीनुसार, गावातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांमध्ये स्पष्ट ओव्हरलॅपिंग (एकाच जागी वारंवार काम दाखवणे) आढळून आले आहे. प्रत्यक्षात मैदानी पातळीवर काम नसतानाही पोर्टलवर काम पूर्ण दाखवण्यात आले आहे. बोगस ठराव करून सरपंचांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या असून, अपलोड केलेले फोटो दुसऱ्या ठिकाणचे असल्याचेही समोर आले आहे. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित कामांचा ठेकेदार उपसरपंच महादेव हरी खोसे असल्याने पदाचा गैरवापर करून कामे चुकीच्या पद्धतीने पूर्ण दाखवल्य...

पाटोदा–आष्टी तालुक्यातील २४६ पोलीस पाटील पदांसाठी १ जानेवारीला आरक्षण सोडत

पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा उपविभागातील पाटोदा व आष्टी या दोन तालुक्यांतील एकूण २४६ पोलीस पाटील पदे सध्या रिक्त असून ही पदे भरण्यासाठी महिला ३० टक्के आरक्षणानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय पाटोदा येथे होणार आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रियेकरिता इच्छुक नागरिकांनी दिलेल्या ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रोहन गलांडे पाटील यांच्या अमरण उपोषणाला यश !प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य !

Image
केज/प्रतिनिधी   केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पत्रकार, संपादक समाजसेवक रोहन गलांडे पाटील यांनी १३ दिवस अमरण उपोषण केले व त्यांच्या मागण्या केज प्रशासनाने,प्रशासनाचा भाग तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कृषी अधिकारी, ग्रामसडक योजना अधिकारी यांनी मान्य केल्या आहेत तसेच गावात दुःखत घटना घडली त्यामुळे उपोषण मागे घेतले या विषयी सविस्तर वृत्त असे की त्यांच्या मागणीनुसार चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे असे पत्र त्यांना देण्यात आले आहे तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुल योजनेचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे पत्र देण्यात आले आहे तसेच चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होती त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे त्यांची पुढील कार्यवाही उच्च शिक्षण संस्था अधिकारी यांच्या कडून करणार आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.तसेच केज तालुक्यातील महाडीबीटी योजनेची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे त्यांचे पत्र तालुक्याचा अहवालासह १० जानेवारी रोजी मिळणार आ...

लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू,बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन

Image
लिंबागणेश | (दि. ३१) नाफेड कृषी पणन मंडळाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत लिंबागणेश (ता. बीड) येथे नागनाथ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, खंडाळा यांच्या वतीने शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. ३०) रोजी श्री गुरू ईश्वर भारती बाबा बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते झाला. या खरेदी केंद्रामुळे लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि हमीभावाची विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार आहे. यावर्षी सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ₹५,३२८ इतका हमीभाव जाहीर करण्यात आला असून, सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हमीभाव योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, सुधीर वाणी, प्रदीप चौरे, श्रीनिवास चौरे, चव्हाण सर तस...

निवडून येताच ॲक्शन मोड! प्रभाग १४ चे नवनिर्वाचित नगरसेवक कामाला लागले; स्वतः उभे राहून करून घेतली साफसफाई

Image
​बीड (प्रतिनिधी ):बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून अवघा आठवडा उलटत नाही तोच, प्रभाग क्रमांक १४ मधील नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत, या दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रभागातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले असून, स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून साफसफाई करून घेतल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे. ​ ​बीड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. निकाल लागल्यानंतर सत्कार समारंभाच्या गर्दीत न अडकता, त्यांनी थेट जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ​ही बाब लक्षात घेता, आज शिंदे आणि बनसोडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रभागातील विविध गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांची साफसफाई करून घेतली. केवळ आदेश न देता, हे दोन्ही नगरसेवक सकाळपासून स्वतः रस्त्यावर उभे राहून कामाचे नियोजन करत होते. ​निवडणू...

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले

Image
बीड(प्रतिनिधी ) राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम, यांच्या आदेशावरून इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी बीड तालुक्यातील नेकनूर येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता शेख सद्दाम शेख सखलैन यांना बीड उप तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्तीपत्र देतानी जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव सखाराम बेगंडे,शेख आमेर पाशा, राम चव्हाण तसेच बीड तालुका येथील उप तालुका अध्यक्ष शेख सद्दाम शेख सखलैन यांची निवड करण्यात आली.तरी यावेळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्ह्यातील संघटित व असंघटित राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे पदाधिकारी यावेळी इत्यादी उपस्थित होते.

“गोदाकाठच्या वाघाने थंडीत उघड्यावर शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकडे पाहावे!”पालकमंत्री अजितदादांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा – डॉ. गणेश ढवळे

Image
बीड | प्रतिनिधी (दि. ३०) –माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्रांतर्गत दत्तनगर वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी अक्षरशः उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. सुसज्ज शाळा इमारत असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून शाळेकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली, थंडी–ऊन्ह–वारा सहन करत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री अजितदादा पवार व आमदार विजय­sinh पंडित यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दत्तनगर वस्ती शाळेत इयत्ता १ ते ४ चे ३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून २ ते ३ शिक्षक कार्यरत आहेत. २००७–०८ मध्ये शासनाने तीन वर्गखोल्यांची इमारत बांधली आहे. मात्र परिसराती...

रमाई घरकुल योजनेतील खरेदीखत व पीआर कार्डची सक्ती रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Image
​बीड प्रतिनिधी : रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून खरेदीखत आणि पीआर कार्ड सादर करण्याची जाचक अट रद्द करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. लाभार्थ्यांचा हक्काचा निधी थेट आरटीजीएस (RTGS) किंवा डीबीटी (DBT) पद्धतीने खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ​ ​निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रमाई घरकुल आवास योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक निवास उपलब्ध करून देणे हा आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, या प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे ध्येय आहे. मात्र, नगरपरिषदेकडून घातल्या जाणाऱ्या तांत्रिक अटींमुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा

Image
महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा प्रशासकीय दिरंगाईचा कळस; ग्रामस्थांच्या नुकसानीला जबाबदार कोण? ७ दिवसांचा अल्टिमेटम बीड : जिल्ह्यातील जातेगाव (ता. गेवराई) येथील ग्रामस्थांच्या हक्काचा 'गावठाण फिडर' महावितरणच्या फाईलमध्ये अडकून पडला आहे. काम पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी फिडर चार्ज न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा श्रीमती शितल धोंडरे यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे. "जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून यंत्रणा उभी केली, मग ती सुरू करायला मुहूर्त कोणाचा पाहत आहात?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यंत्रणा असूनही गाव अंधारात जातेगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात गावठाण फिडरचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा फिडर कार्यान्वित करण्यात आलेला नाही. परिणामी, संपूर्ण गावाचा भार जुन्या यंत्रणेवर येत असून 'लो-व्होल्टेज'मुळे नागरिकांचे घरगुती संसारोपयोगी साहित्य (टीव्ही, फ्रिज, एसी)...

बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे

Image
बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे कायद्याला हरताळ, न्यायालयाचा अवमान! बीडमध्ये बॅनरबाजीचा कहर; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने नवनिर्वाचितांची सत्तेची धुंदी; बीड शहर बॅनरच्या विळख्यात! ‘नाशिक पॅटर्न’ची अंमलबजावणीची जोरदार मागणी बीड :- (दि. २९ )बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते व चौकांमध्ये विजेच्या खांबांवर, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अनधिकृत बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ बीडमध्ये तातडीने राबवावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिक...

गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न

Image
गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी  गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे दिनांक 27 12 2025 रोजी सकाळी 11 वाजता गेवराई तालुक्याचे युवा नेते माननीय रणवीर काका पंडित यांच्या हस्ते गढी येथे पंधराव्या वित्त आयोगातील सुमारे 12 लाख रुपयांचे कामाचे लोकार्पण करण्यात आले माननीय अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनुसार व आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गढी गावात व रोड वरती होत असलेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गडी ग्रामपंचायतच्या वतीने एक नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली तसेच ज्या भागात पाणीपुरवठा केला जात नव्हता त्या भागात नवीन पाईपलाईन करून पाईप लाईन मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली तसेच पाण्याच्या टाकीचा परिसर या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून सुशोभीकरण करण्यात आले तसेच गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजना सातत्याने चालू आहे आणि ती बंद पडू नये म्हणून काही नवीन मोटार खरेदी करण्यात आले आहेत तसेच समशान भूमी मध्ये रात्रीची लाईटची व्यवस्था नव्हती त्यासाठी हायमासक ला...

बहिरवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याची विजय गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी कडे मागणी

Image
बीड ( प्रतिनिधी ) बहिरवाडी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष तथा निरीक्षक मनोज पाटील तसेच नगरसेवक राहुल गुरखुदे मागणी केली. जनप्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच स्थानी 1996 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्राथमिक सदस्यता तसेच विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना शासनाच्या योजना असतील शासकीय रुग्णालयातील गोरगरिबांच्या अडचणी असतील तसेच सामान्य नागरिकांची प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम केले असल्याने आपण या बहिरवाडी सर्कल मध्ये अनेक उत्तम काम सामान्य नागरिकांसाठी करण्याच्या उदात्त हेतूने आपण ही निवडणूक लढत असल्याचे यावेळी विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवली आहे.अशी मागणी सामान्य जनतेतून मागणी होत असून आपणही ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

चौसाळा शाळेच्या अंगणात पुन्हा अवतरले बालपण १९९१-९२ बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा

Image
बीड /​चौसाळा प्रतिनिधी :-वेळ कधीच थांबत नाही, पण काही क्षण मात्र आयुष्याच्या पाटीवर कायमचे कोरले जातात. असाच एक अविस्मरणीय सोहळा २८ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा, चौसाळा येथे संपन्न झाला. १९९१-९२ च्या १० वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल ३४ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय स्मृतींना उजाळा दिला. ​ ​शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या संसाराच्या आणि करिअरच्या व्यापात गुंतला होता. मात्र, आपल्या जुन्या सवंगड्यांना पुन्हा भेटावे, ही ओढ सर्वांना स्वस्थ बसू देत नव्हती. या बॅचच्या काही पुढाकारी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून प्रत्येकाचा शोध घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक साखळी तयार केली आणि बघता बघता सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एका छताखाली जमले. चौसाळा शाळेचे तेच मैदान आणि तोच परिसर पुन्हा एकदा जुन्या मित्रांच्या हास्याने दुमदुमून गेला. ​ ​या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या गुरुजनांची उपस्थिती. आयुष्याच्या कठीण वळणावर आपल्याला दिशा दाखवणाऱ्या आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मोठ्या आदराने निमंत्रित केले होते. आपल्या जुन्या विद्य...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोर काळे यांची बोरफडी आदर्श ग्रामपंचायतला भेट

Image
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक २६/१२/२०२५ रोजी सायं.०७:०० वा बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या आदर्श ग्रामपंचायत बोरफडी येथे भेट देऊन गावात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात आली यामध्ये प्लास्टिक बंदी ,बचत गट ,घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अनिमिया मुक्त गाव ,ग्रामपंचायत अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे यांसह इतर खासकरून उपक्रम राबवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यात ३७३९७ ग्रामपंचायत तिने सहभाग नोंदवला आहे .जि ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करील त्या घटकात त्या इंडिकेटर वरती काम करील त्यांना राज्यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.  यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय बक्षीसास पात्र ग्रामपंचायत होणार आहे त्याच धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत बोरफडीने देखील सहभाग नोंदवून सर्व इंडिकेटर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत बोरफडी च...

संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय

Image
संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येण्याएवजी गाडीने या व रस्त्याची वाट लागलेली पहा  पाटोदा (प्रतिनिधी ) चिचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांचा ५० वा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र एवढ्या मोठ्या व प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेला डांबराचा थर यामुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. हजारो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष हो...

केज प्रशासनाने रोहन गलांडे यांच्या उपोषणाचा निर्णय लावला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता?,उपोषणा ११/१२ वा दिवस, जबाबदार कोण- रोहन गलांडे पाटील

Image
  केज / प्रतिनिधी चिंचोली माळी ता.केज येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत.काही मागण्या मान्य झाल्या आहेत परंतु एक दोन मागणीसाठी रोहन गलांडे पाटील यांना जिवे मारायच ठरवले आहे असे चिन्ह दिसत आहेत कारण अमरण उपोषणाचा ११ वा दिवस आहे रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे व रोहन गलांडे यांनी जनतेला शेवटचा रामराम घ्यावा असे म्हटले आहे.कारण त्यांना बोलताना छातीवर दाब येत आहे,डोके दुखी उम्मघाम होत आहे,छातीत दुखायला सुरुवात झाली आहे,अंग थरथरत आहे एवढ्या वेदना होतात परंतु प्रशासनाला काही घेणे देणे नाही परंतु रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्या शिवाय अमरण उपोषण मागे घेणार नाही.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) ते संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरित सु...

अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली ! सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड :- ( दि.२७ )बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची ‘भागवत कथा’ आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरीत्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही ‘तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नेमकी परवानगी कोणी दिली? भंगार कुठे नेण्यात आले? त्याची नोंद कुठे आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. रात्रीच्या अंधारात भंगार उचललं; तीन दिवसांचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले. विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला. यासाठी दवाखान्य...

शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना

Image
शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना. बीडच्या त्या अतिप्रसंग झालेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबाने घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांची भेट..! मागील महिन्यात 5 तारखेच्या सायंकाळी 6 वाजता  नामक 11 वर्षाच्या मुलीला तिची आई ज्या घरी घर काम करण्यास गेली त्या घराच्या पार्किंग मधे खेळत असलेल्या जागेवरुन अपहरण सूरजकुमार खांडे या नाराधमाने केले.पुढे तिल सुनसान ठिकाणी नेऊन रात्री तीन वेळा तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला.मुलगी केवळ 11 वर्षाची चिमुकली व नराधम 23 वर्षाचा.मुलीच्या आई वडिलांनी रात्री मुलगी बेपत्ता असल्याने सगळीकडे शोधाशोध करून शेवटी शिवजी नगर पोलिस स्टेशन गाठले आणि मध्यरात्री 1:30 च्या सुमारास मिसिंगची तक्रार दाखल केली.नाराधामने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 च्या सुमारास मुलगी घरा बाहेर अनुन सोडली.घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला मात्र समाजात इज्जत जाईल या भीतीने कुटुंब शांत बसले. मात्र तो नराधम इथेच थाबला नाही तर त्या...

महावितरणच्या बीड विभागात ‘अंधेर नगरी चौपट राजा’; सामान्यांची कामे रखडली, गुत्तेदारांसाठी मात्र पायघड्या

Image
बीड :  महावितरणच्या संचलन व सुव्यवस्था (सं.व.सु.) विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे चालला आहे. सामान्यांच्या फाईल्सवर धुळ साचत असताना, टक्केवारीचे गणित जुळणाऱ्या गुत्तेदारांची कामे मात्र अर्ध्या रात्रीपर्यंत सुरू असल्याचे विदारक चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. "अंधेर नगरी चौपट राजा" अशीच काहीशी स्थिती या कार्यालयाची झाली असून, अधिकारी नियम धाब्यावर बसवून बेफाम वागत आहेत. ओळखपत्राचा पत्ता नाही; अधिकारी की दलाल ओळखणे कठीण! राज्य शासनाचे कडक आदेश असतानाही, या कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिस्तीचे वावडे असल्याचे दिसते. कार्यालयात ओळखपत्र (ID Card) लावणे बंधनकारक असताना, वरिष्ठ अधिकारीच नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. जेव्हा 'राजा'च नियमांचे पालन करत नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांवर वचक राहणार कसा? यामुळे कार्यालयात आलेला सामान्य नागरिक, समोर बसलेली व्यक्ती अधिकारी आहे की दलाल, याच संभ्रमात पडत आहे. टक्केवारीसाठी रेड कार्पेट; सामान्यांना मात्र 'तारीख पे तारीख' मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयात भ्रष्टाचाराचा...

‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू

Image
‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू सरन्यायाधीश सूर्यकांत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ पणजी, २७ डिसेंबर, २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने 'अंमली पदार्थांचा गैरवापर - अंमली पदार्थ: समाजासाठी एक धोका' या विषयावर ३० दिवसांची विशेष जनजागृती मोहीम सुरू केली. ही मोहीम मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात, भारताचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत, तसेच वरिष्ठ न्यायाधीश आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.  हा उपक्रम न्यायपालिका आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांचे प्रतीक आहे, ज्याद्वारे जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसन याद्वारे अंमली पदार्थांच्या गैरवापराचा सामना केला जाईल. गोव्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या चिंतेवर आणि त्याचा तरुण, कुटुंबे व समाजावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्य...

बीड नगरपरिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई क्षीरसागर

Image
बीड (प्रतिनिधी ) दि.२६ : बीड नगरपरिषदेतील भाजपच्या नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांची निवड शुक्रवारी (दि.२६) करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निवडीच्या ठरावाची पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे देण्यात आली.  नगरपरिषदेत भाजपचे १५ नगरसेवक विजयी झाले असून भाजपने प्रभावी कामगिरी करत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आता गटनेते पदाची जबाबदारी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह नेते, पदाधिकारी, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बीडची सह्याद्री–देवराई सुरक्षित आगीच्या बातम्या अफवा ठरल्या लागल ; अफवांवर विश्वास ठेवू नका – डॉ. गणेश ढवळे

Image
बीड | प्रतिनिधी (दि. २६) गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही दैनिके व युट्यूब चॅनेलवर “सह्याद्री–देवराई येथे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णतः चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात सह्याद्री–देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे २० गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे, झाडांचे नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती आहे. देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व वृक्षप्रेमी श्रीकृष्ण उबाळे यांनी सह्याद्री–देवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आग आटोक्यात आणणाऱ्या वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शेख अकबर, जयराम काळे, वनरक्षक अशोक केदार, विजय केदार, पद्माकर मस्के, अर्जुन साळुंखे, मधुकर नैराळे व विलास नवले यांचा समावेश होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये तसेच प्रसारमाध्यमांनी खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्...

सायकलवरून अवतरला सांता, सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूरमध्ये ख्रिसमसचा जल्लोष

Image
सायकलवरून अवतरला सांता, सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल बर्दापूरमध्ये ख्रिसमसचा जल्लोष  अंबाजोगाई | प्रतिनिधी सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे ख्रिसमस सण अत्यंत आनंदी, उत्साही व संस्मरणीय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात आगळ्यावेगळ्या उपक्रमाने झाली. शिक्षिका अर्पिता कुलकर्णी या सांता क्लॉजच्या वेशात सायकलवरून शाळेत दाखल झाल्या. सायकलवरून येणाऱ्या सांता क्लॉजला पाहताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला. सांता क्लॉजने विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत खाऊ वाटप केले. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. ताराचंद शिंदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत प्रेम, शांतता व एकात्मतेचा संदेश दिला. शाळेमध्ये असे उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास अमोल भडके, निकिता शिंपले, प...

शिरूर कासार तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी बांधणी-विविध पदांसाठी तरुणांना संधी-सोपान (काका) मोरे /आजिनाथ खेडकर यांचे जाहीर आवाहन

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :             आगामी जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर कासार ( जिल्हा बीड ) तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिक आक्रमक आणि सक्रिय झाला असुन पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुशिक्षित, निष्ठावंत तरुणांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी तालुक्यात अनेक रिक्त पदांवरती संधी देण्यात येनार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका )मोरे आणि उपजिल्हाप्रमुख आजिनाथभाऊ खेडकर यांनी तालुक्यातील तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याचे जाहीर प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर आवाहन केले .   पुढे सांगितले की, तरुणांच्या हाती शिवसेनेची धुरा असून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क नेते आबंदासजी दानवे साहेब संपर्क प्रमुख परशुराम जाधव साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार तालुक्य...

आमदार सुरेश धस यांच्या सूचनेला पाटोदा ग्राहक पंचायतचा प्रतिसाद

Image
आमदार सुरेश धस यांच्या सूचनेला पाटोदा ग्राहक पंचायतचा प्रतिसाद शासकीय कार्यालयात अडवणूक होत असल्यास संपर्क करा-विशाल देशमुख,अंगद सांगळे  पाटोदा (प्रतिनिधी ): पाटोदा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारीनंतर आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या कठोर सूचनांना राष्ट्रीय ग्राहक पंचायत,पाटोदा यांनी प्रतिसाद दिला आहे. तहसील कार्यालयात किंवा इतर शासकीय कामांसाठी कोणीही पैसे मागत असल्यास थेट गुन्हे दाखल करा आणि तहसील परिसरातील एजंटगिरीचा पूर्णपणे बंदोबस्त करा,या आमदार धस यांच्या सूचनेचे ग्राहक पंचायतने स्वागत केले आहे.ग्राहक पंचायतच्या वतीने सांगण्यात आले की, शासकीय सेवा मोफत असताना नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या एजंट व मध्यस्थांविरोधात संघटना आता सक्रिय भूमिका घेणार आहे. तहसील, महसूल, पंचायत समिती आदी कार्यालयांमध्ये नागरिकांना अडवणूक, विलंब किंवा पैशांची मागणी होत असल्यास अशा तक्रारी ग्राहक पंचायतकडे नोंदवाव्यात असे आवाहन ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विशाल देशमुख व उपाध्यक्ष अंगद सांगळे यांनी केले आहे. पाटोदा तालुका राष्ट्रीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष : विशा...

​बीडमध्ये 'स्त्री मुक्ती दिन' उत्साहात साजरा; रुक्मिणी नागापुरे यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन

Image
​बीड: (प्रतिनिधी ) भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करणारा ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जाणारा 'स्त्री मुक्ती दिन' बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्या उपस्थितीत मनुस्मृती दहन करून महिलांनी आपल्या हक्कांचा जागर केला. ​मनुस्मृतीचे दहन आणि निषेध कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीड शहरातील मुख्य भागात महिला एकत्र जमल्या होत्या. यावेळी मनुस्मृती या ग्रंथाने स्त्री स्वातंत्र्यावर लादलेली बंधने आणि विषमतेचा निषेध करण्यात आला. 'स्त्री मुक्तीचा विजय असो' अशा घोषणा देत प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. ​आणि स्त्री मुक्तीचे महत्त्व यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रुक्मिणी नागापुरे म्हणाल्या की, "स्त्रियांना शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यात महापुरुषांचे मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या भिंती पाडल्या आणि स्त्रियांना कायद्याने समान अधिकार दिले. आजच्या काळात महिलांनी या क्रांतीचे महत्त्व आणि विचारांची प्रेरणा समजून घे...

लिंबागणेश येथे महिला व विद्यार्थिनींनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करत “स्त्रीमुक्ती दिन” साजरा

Image
लिंबागणेश : (दि. २५ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील पंचशीलनगर येथे आज दि. २५ डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पुढाकाराने महिला व शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या हस्ते मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ,प्रा.लेहनाजी गायकवाड, सुरेश निर्मळ, बालाजी निर्मळ, सर्जेराव थोरात, गणेश थोरात, ऋषिकेश निर्मळ, बाबासाहेब निर्मळ,उमाजी निर्मळ, राजाभाऊ निर्मळ,गोदाबाई निर्मळ,स्नेहल निर्मळ,सोनल निर्मळ,सविता निर्मळ,विजाबाई निर्मळ, चंद्रकला निर्मळ, दिव्या निर्मळ,सुशिला निर्मळ,श्रुती निर्मळ,आरोही निर्मळ, योगिनी निर्मळ, बबिता निर्मळ, स्वप्निल निर्मळ,यश निर्मळ, पोपट निर्मळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध,माता रमाई आंबेडकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच भारतीय संविधान ग्रंथाचे पूजन करून करण्यात आली. मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारून पुरुषप्रधान संस्कृती बळकट करणाऱ्या...

217 कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी; गोव्यात 941 रोजगारनिर्मिती

Image
217 कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी; गोव्यात 941 रोजगारनिर्मिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 40वी IPB बैठक; ₹1,807 कोटींच्या प्रमुख औद्योगिक प्रस्तावांचा आढावा पणजी, गोवा : गोवा गुंतवणूक प्रोत्साहन व सुविधा मंडळाने (Goa-IPB) एकूण ₹217.25 कोटी गुंतवणुकीचे 10 नवे औद्योगिक प्रकल्प मंजूर केले असून, या प्रकल्पांमुळे 941 थेट रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याची औद्योगिक पायाभूत रचना विस्तारण्याच्या, आर्थिक उपक्रमांचे विविधीकरण करण्याच्या तसेच गोव्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मंजूर प्रकल्पांमध्ये विमानसेवा व साहसी पर्यटन, अन्न प्रक्रिया, वाहन व मोबिलिटी, पॅकेजिंग, पर्यटन व आदरातिथ्य, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स तसेच खेळणी उत्पादन अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून शाश्वत व विविधांगी औद्योगिक विकासावर गोव्याचा भर स्पष्ट होतो, तसेच राज्याच्या उत्पादन क्षमताही अधिक बळकट होणार आहेत. बैठकीदरम्यान गोवा औद्योगिक विकास व गुंतवणूक प्रोत्साहन धोरण, 2022 अंतर्गत सवलतींसाठ...

कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Image
कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड  बीड | प्रतिनिधी राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गुरुवार, दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चा संयोजकांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत — शेतकऱ्यांच्या कापसाला किमान ₹12,000 प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. सोयाबीनसाठी किमान ₹7,000 प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात यावा. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इ...

नियोजित लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्यावासियांवर अन्याय करू नये

Image
नियोजित लातूर–कल्याण जनकल्याण द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्यावासियांवर अन्याय करू नये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २३ )बीड जिल्ह्यातून प्रस्तावित असलेल्या लातूर–अंबेजोगाई–केज–बीड–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या लातूर–कल्याण (जनकल्याण) द्रुतगती मार्गाच्या आराखड्यात बदल करून बीड जिल्ह्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. परिवहनमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदर द्रुतगती मार्ग लातूर–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या मार्गाने नेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर केल्याचे समोर आले आहे. हा प्रस्ताव बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर अन्याय करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात उद्योगधंदे, रोजगारनिर्मिती तसेच कृषी व कृषीपूरक व्यवसायाला मोठा चालना मिळणार असून शेतकऱ्यांचे उत्पादन मुंबई–ठाणे महान...

माझे आंदोलन बदनाम करण्याचा अतिक्रमण धारकांचा लाजिरवाणा प्रयत्न - रोहन गलांडे पाटील

Image
  केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडेला व त्यांनी केलेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न अतिक्रमण धारक करत आहेत तरी रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की सर्व बाइट देणाऱ्या अतिक्रमण धारकांनी माझे ग्रामदैवत ज्यांच्या जिवावर आजपर्यंत अतिक्रमण धारक जगत आले आहे असे ग्रामदैवत श्री संत नामदेव महाराज यांच्या पींडीवर हात ठेवून लेकरांची स्वाताची शपथ घेऊन सांगावे जे खर आहे ते सांगाव ग्रामपंचायत प्रशासनाची कुठलाही कर नाही भरता जागा वापरल्या मुळे प्रशासनाने अतिक्रमण धारकावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच माझे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला नाहक बदनाम केल्या प्रकरणी उद्याची उद्या प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा माझ्या कड येऊ नये मी मेलो तर जबाबदार प्रशासन आहे याची नोंद घ्यावी केज तहसीलदार साहेब यांनी घ्यावी अतिक्रमण धारकांनी केलेले अरोप खोटे असुन जर ते खरे असतील तर खरे करुन दाखविले पाहिजे व ज्यांच्या कडुन खरेदी काय केले बिस्कीट पुडे खरेदी केले असे म्हणतात तर ते खरेदी केले नसुन मला पानी पीण्यासाठी बिस्लरी घेतो त्यांचे पैसे दीलेले आहेत तसेच,जे म्हणतो असे खरेदी क...