Posts

Showing posts from November, 2025

प्रस्थापित भ्रष्ट धनदांडग्यांऐवजी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या ; सत्ताधाऱ्यांचा फसव्या घोषणांपासुन सावध रहा – डॉ. गणेश ढवळे

Image
बीड : (दि.१ ) बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “जाती-धर्म विरहित बीडच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा” असा प्रभावी संदेश देत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज दि.०१ सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनसंपर्क करत सुजाण मतदारांना विशेष आवाहन केले. डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, “शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरून लढणाऱ्या, चळवळीतील प्रामाणिक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या; प्रस्थापित, भ्रष्ट आणि धनदांडग्यांच्या राजकारणाला पूर्णविराम द्या.” यावेळी रामनाथ खोड, शिवशर्मा शेलार, शेलार शिवशर्मा, शेख मुबीन, आरूण ढवळे आदी सहकारी उपस्थित होते. निवडणुका ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया असल्याचे सांगताना त्यांनी पुढे म्हटले की, “मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता मुक्तपणे मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक प्रश्न सोडविण्याची खरी क्षमता फक्त चारित्र्यसंपन्न, विकासाभिमुख आणि लोकांशी सतत संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांत असते...

आजवर दिलेल्या शासन निधींचे काय दिवे पाजळले? हे फडणवीसांनी स्पष्ट करावे-बीड शहर बचाव मंचाची मुख्यमंत्र्यांना मागणी

Image
बीड प्रतिनिधी :- बीड शहरातील प्रस्थापितांना नगरपालिकेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मागील पाच वर्षात आणि या चालू तीन वर्षात कोणते व किती शासन निधी देण्यात आले, त्यात या प्रस्थापित दिवट्यांनी विकासाचे काय दिवे पाजळले...? कुठल्या योजना अपूर्ण ठेवल्या, कुठली विकास कामे पूर्णत्वाला नेली, कुठल्या कुठल्या योजना व कुठले कुठले निधी गिळंकृत केले या सर्व बाबींचा तपशीलवार खुलासा उद्या फडणवीस साहेबांनी जनतेपुढे मांडावा. अटल अमृत जल योजनेचे काय झाले ती कुठल्या टप्प्यावर आहे ? भुयारी गटार योजनेची कामे कुठल्या टप्प्यावर आहेत ..? याचाही खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्या जनतेपुढे करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत नगर पुनरुत्थानच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री निधीतून व वेगवेगळ्या खात्यांमधून विकास योजनांतर्गत किती पैसे बीड नगरपालिकेतून विकास करण्यासाठी प्रस्थापित दिवट्यांना पुरविले, त्याचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात आला, त्यातून किती विकास कामे 100% दर्जेदार आणि पूर्ण झाली, नाल्या, गटार, रस्ते विकास यासाठी शासनाचे किती कोटींचे निधी पुरवण्यात आले याचा तपशील माननीय मु...

बीड नगरपालिका सह परळी अंबाजोगाई गेवराई नगरअध्यक्षसह सर्व सहा नगरपालिकेच्या काँग्रेसचे उमेदवार यांना बहुमताने विजयी करा- रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

Image
बीड प्रतिनिधी - बीड नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या वतीने करुणा मिलिंद मस्के नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी निवडणुकी त उभे असलेले सर्व उमेदवार व गेवराई परळी अंबाजोगाई नगरअध्यक्ष पदसहित इतर नगरसेवक उमेदवार काँग्रेसच्या वतीने उभी आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आव्हान रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे बीड शहर या ठिकाणी मागील 40 वर्षापासून ठराविक माणसाच्या हाती सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी जनतेचे एकही कुठले काम केलेले नाहीत शहरातील नागरिकांना कुठलीही व्यवस्था व सुविधा पुरविलेली नाही उदाहरणार्थ घरासमोरील नाल्याची व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन रस्ता हे फक्त गुत्तेदार पोसण्यासाठी टेंडर काढून त्यांच्या घशात घातलेल्या आहेत.व आणि त्याचे बोगस बील उचलून स्वार्थ साधलेला आहे.त्याच धर्तीवर सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आज पर्यंत आंदोलने विविध निवेदने देऊन रस्त्याचे काम करू म्हणून फक्त आश्वासन देतात व काम करीत नाहीत.त्या साठी आता येणाऱ्या नगरपालिकेच्या सध्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त पैसा देऊन मते घेतात व पैसा कमवितात हे रणनीती बंद क...

बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अमरसिंग ढाका यांची बिनविरोध निवड

Image
बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अमरसिंग ढाका यांची बिनविरोध निवड   उपाध्यक्षपदी किरण सावंत तर सचिव पदी नितीन आमटे यांची बिनविरोध निवड  बीड प्रतिनिधी :- बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड संस्थेच्या संचालक मंडळातून उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संचालक मंडळाची सभा दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती या सभेमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी बीड पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड या संस्थेच्या संचालक मंडळातून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांची निवड करण्यासाठी मुख्य पोस्ट ऑफिस येथे सभा घेण्यात आली या सभेमध्ये अध्यक्षपदासाठी अमरसिंग ढाका यांचा एकमेव अर्ज आला व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली ते या अगोदर सचिव म्हणून कार्यरत होते.तसेच उपाध्यक्ष पदासाठी ही किरण सावंत यांचा व सचिव पदासाठी नितीन आमटे यांचाही एकमेव अर्ज आला व तिघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते त्यामध्ये,सहकारी संस्था...

आमदार सुरेश धस यांचे जाहिर आवाहन

Image
आमदार सुरेश धस यांचे जाहिर आवाहन,आष्टी /पाटोदा /शिरूर कासार तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण तात्काळ NSC ट्रांसफार्मर साठी तात्काळ अर्ज करावे आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :              शेतीपंपाच्या ट्रान्सफॉर्मर वरील घरगुती वीज वापराचा भार कमी करण्यासाठी NSC योजने अंतर्गत तातडीने महावितरणा कडे अर्ज करा . न्यू सर्व्हिस कनेक्शन (NSC)ही नवीन योजना आता लागू झाली असून त्या अंतर्गत जर १० घरगुती वीज वापरणारे ग्राहक जर एकत्र आले तर त्यांना २५ KVA चा ट्रान्सफॉर्मर देण्याची तरतूद आहे . जर २० ग्राहक एकत्र आले तर ६३ KVA आणि ४५ ग्राहकांच्या समूहाला देखील १०० KVA ट्रान्सफॉर्मर या योजनेतून मिळणार आहे . आणि विशेष म्हणजे ही योजना घरगुती ग्राहकांना प्रत्येकी २५०० रुपयांत मिळणार आहे .   या प्रकारे घरगुती वापरासाठी जर नागरिकांनी या योजनेत अर्ज केले तर शेती पंपाच्या साठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर येणारा अतिरिक्त ताण कमी होईल आणि घरगुती आणि शेती या दोन्ही ठिकाणी विजेचा सुरळीत पुरवठा शक्य होईल.   तेव्हा माझी ...

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

Image
परळी ( प्रतिनिधी )-परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधारी व विरोधी एकमेकांवर करीत आहेत. प्रचारातील एका सभेत आ. धनंजय मुंडे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधकांवर विविध आरोप केले. यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडण्यापासून ते दवाखान्याचा खर्च करण्यापर्यंत आरोप केले . यालाही त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार व नेते व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .संध्या दीपक देशमुख यांचे पती दीपक रंगनाथ देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा जनतेसाठी आपण काय केले परळीच्या विकासासाठी मंत्री पदाचा मिळालेला दिवा किती लावला. मी तुमच्या एका दमडीचाही लाभार्थी नाही. याउलट मीच तुम्हाला विधानसभेसाठी अर्थसहाय्य केले आहे. त्यावेळी तुमचा पराभव झाला होता. गोळ्या बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला असे ते म्हणाले. तसेच त्यांनी माझे घर शेतीवर चालते मी कुठलाही कॉन्ट्रॅक्टदार व...

परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण; “गोव्याचा जलद विकास भारताच्या प्रगतीस बळ देतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी

Image
परतगलै मठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७७ फूट श्रीराम मूर्तीचे अनावरण; “गोव्याचा जलद विकास भारताच्या प्रगतीस बळ देतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी परतगलै मठाने शतकानुशतके गोव्याची आध्यात्मिक परंपरा जपली आहे -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परतगलै, २९ नोव्हेंबर २०२५ : गोव्याच्या आध्यात्मिक इतिहासात आज एक नवे सुवर्ण पान लिहिले गेले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री संस्थान गोकर्ण परतगलै जीवोत्तम मठात प्रभू श्रीराम यांच्या ७७ फुटांच्या भव्य कांस्यमूर्तीचे अनावरण केले. स्थापनेची ५५० वर्षे पूर्ण करणाऱ्या या प्राचीन मठात हजारो भक्त, संत आणि पाहुणे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी जमले होते. या उत्सवाने परतगलै भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे केंद्र बनले. या उद्घाटन सोहळ्याने भक्त आणि अध्यात्मिक गुरूंना एकत्र आणत मठाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सातत्य केंद्र म्हणून असलेले महत्त्व अधोरेखित केले. पारंपरिक संगीत, भक्तिमय विधी आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण अधिक पवित्र झाले. पुढील ११ दिवस चालणाऱ्या फाऊंडेशन इयर उत्सवात देशभरातील आचार्य आणि पीठाधीश सहभागी होणार आहेत....

FIDE वर्ल्ड कप 2025 गोव्यात संपन्न,गोवा क्रीडा हब बनण्यासाठी सज्ज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Image
पणजी, 27 नोव्हेंबर 2025 : जगातील सर्वात प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेल्या FIDE वर्ल्ड कप 2025 चा समारोप आज संध्याकाळी गोव्यातील भव्य कार्यक्रमाने झाला. जोवोखीर सिंदारोव यांनी वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले, तर यी वेई यांनी रौप्य पदक आणि अंद्रेई एसीपेंको यांनी कांस्य पदक मिळवले. समारोप समारंभात उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा सिंदारोव यांना दिलेला अभिनंदन संदेशही प्रसारित करण्यात आला. समारोप समारंभाने स्पर्धेची भव्यता आणि ऊर्जा अधोरेखित केली. या स्पर्धेत जगभरातील अव्वल बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता, तसेच भारतीय खेळाडूंनीही उल्लेखनीय व दमदार कामगिरी केली. स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक उपक्रम जसे की अनाथालय भेटी आणि चॅरिटी उपक्रम यांच्याद्वारे स्पर्धेला मानवतावादी स्पर्शही मिळाला. समारंभात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोवा आता क्रीडा क्षेत्रात मोठी भूमिका पार पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. राज्यात सशक्त क्रीडा संस्कृती घडवण्यासाठी आम्ही स्पष्ट दृष्टीकोनातून काम करत आहोत. आमचे ध्येय बुद्धिबळ प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक शाळेत पोहोचवून तर...

‘विकसित गोवा २०३७’च्या दिशेने स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण

Image
‘विकसित गोवा २०३७’च्या दिशेने स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण MSRY अंतर्गत लघु उद्योगांना आर्थिक मदत, कौशल्यविकास आणि व्यवसाय तयारीची सर्वसमावेशक सुविधा पणजी प्रतिनिधी : विकसित गोवा २०३७ अंतर्गत गोवा त्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टिकोनाकडे काम करत आहे आणि स्वयंपूर्ण गोवा, स्वयंरोजगार आणि स्थानिक उद्योग विकास यासारखे चालू कार्यक्रम वारंवार येणारे विषय म्हणून उदयास आले आहेत. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना (एमएसआरवाय) ही या धोरणात्मक परिदृश्यात अलिकडच्या काळात समाविष्ट करण्यात आलेल्या जोड्यांपैकी एक आहे, ज्याचा उद्देश लहान व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देणे आहे.  ही योजना कर्ज समर्थनावर केंद्रित असली तरी, ती प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योग तयारीचे व्यापक वातावरण तयार करण्याचा देखील प्रयत्न करते. गोव्याच्या आर्थिक प्राधान्यांच्या संदर्भात एमएसआरवाय समजून घेतल्याने राज्य अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक भविष्यासाठी स्वतःला कसे स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे याची अंतर्दृष्टी मिळते.  गोव्यातील उपजीविकेचे बदलते संदर्भ:-  गोव्याचे...

'पंकजाताईंचा जुमलेनामा' बीडमध्ये दाखल प्रस्थापितांकडून होतेय बीडकरांची दिशा'भूल'-बीड शहर बचाव मंच

Image
 'पंकजाताईंचा जुमलेनामा' बीडमध्ये दाखल प्रस्थापितांकडून होतेय बीडकरांची दिशा'भूल'-बीड शहर बचाव मंच   ताई आता तुम्हाला बीडची परळी' करायची आहे काय...? बीड करांना नीट जगू द्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे   रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही हाय प्रोफाईल लोकं कसे सोडवणार आहात..? .भ्रष्टाचाराचा महामेरू असलेल्या प्रस्थापितांकडून बीडकरांवर भुलतंत्राचा' वापर.. पूर्ण मुस्लिम समाज ही दिशाभूलित व दिशाहीन. बीड प्रतिनिधी -: आदरणीय मोदीजींनी 100 स्मार्ट सिटीज देशामध्ये निर्माण करणार असा जुमलेनामा दिला होता. आज पर्यंत कधीच पूर्ण होऊ शकला नाही. एक स्मार्ट सिटी सुद्धा देशात करता आली नाही. आ. कै. दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेल्यापासून आपण बाबांच्या नावाचा पुरेपूर वापर करून राजकारणामध्ये आहात. तुमचे स्वकर्तृत्व शून्य आहे. व्हिजन- विकास या सर्व गोष्टींचा आपलाशी लाखो किलोमीटर दूरून सुद्धा संबंध येत नाही. बाबांनी उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव तुमच्या हातुन झाला एवढ्या तुम्ही यशस्वी आहात. कारखाना कर्जबाजारी करून खाऊन टाकलात. बीड क...

गोव्यात राज्यस्तरीय पश्चिम भारत विज्ञान मेळाव्याचे उत्साहात प्रारंभ

Image
पणजी, २६ नोव्हेंबर २०२५ :डीएम पीव्हीएस एस.एम. कुशे उच्च माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक अभ्यास संस्था, पीव्हीएस कुशे नगर, आसगाव-बार्देश यांच्या वतीने राज्यस्तरीय पश्चिम भारत विज्ञान मेळा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या मेळ्यात राज्यभरातील ४० हून अधिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचा सहभाग असून १५ शिक्षक समित्यांनीही आपली उपस्थिती नोंदवली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी संशोधन, प्रयोगशीलता आणि सर्जनशील विचारांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली. “अशा विज्ञान मेळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता वाढते. प्रयोग करण्यास घाबरू नये. विज्ञानाशिवाय आज पर्याय नाही. विचारशक्ती विकसित झाली तर संशोधनाची दिशा अधिक मजबूत होते,”असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, स्व. मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट अवॉर्ड हा गोव्यासाठी अभिमानाचा विषय आहे. गोव्याच्या विद्यार्थ्यांनी या पुरस्काराकडे लक्ष्य ठेवून अधिक प्रगती साधावी.” राज्यातील चालू संशोधन प्रकल्पांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की धारगळ येथे आयुर्वेद...

लिंबागणेश येथे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करत संविधान दिन साजरा

Image
लिंबागणेश येथे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करत संविधान दिन साजरा संविधान देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे :– डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश :– (दि. २६) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून “राष्ट्रीय संविधान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, दगडू वाघमारे आदींची समायोजित भाषणे झाली. आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य समीर शेख यांनी केले. कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी उपसरपंच शंकर वाणी, सुरेश निर्मळ, दादा गायकवाड, महादेव कुदळे, नामदेव आवसरे, मधुकर थोरात, नाना निर्मळ, केशव गिरे, सिताराम थोरात, महादेव ढास, ग्रामपंचायत कर्मचारी जिवन मुळे, सुखदेव ...

शिरूर कासार येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना(ठाकरे )पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Image
शिरूर कासार येथील मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन  रस्ता तात्काळ दुरुस्त न केल्यास १ डिसेंबर रोजी जिजामाता चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन - मोरे /खेडकर  आष्टी (प्रतिनिधी- गोरख मोरे ) :            शिरूर कासार( जिल्हा बीड) शहरातील जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक आणि कोळवाडी चौकापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्याने सर्व सामान्य नागरिक /व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असुन या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडुन नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे .या मध्ये दमा /श्वसनासंबंधी आजार वाढल्याचे निदर्शनास आले .तर दुसरीकडे या धुळीमुळे सर्व सामान्य छोटे-मोठे व्यापाऱ्यांच्या मालाचेही नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले .   याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरुर कासार तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर आदी कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार शिरूर कासार यांना निवेदन देण्य...

शिरूर कासार शहर / ग्रामीण भागात पूर्ण दिवस उच्च दाबाचा वीज पुरवठा सुरू ठेवा-मोरे / खेडकर

Image
आष्टी (प्रतिनिधी- गोरख मोरे) :         शिरूर कासार तालुक्यातील गेल्या एक ते दोन महिन्यापासून ग्रामीण भागातील नागरिकांना बिबट्या दिसून येत असल्याचे शेतकरी वर्गाकडून समजले. परंतु वन विभागाचे अधिकारी कर्मचारी या बाबत काही एक नागरिकांना योग्य ती माहिती दिली नाही , त्यामुळे वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यामार्फत रात्रीच्या वेळी ग्रस्त घालने आवश्यक असुन शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या हरभरा/ गहू /ज्वारी आदी पीकासह , भाजीपाला यासारखे पिकांना पाणी देण्याचे काम शेतकरी वर्ग करत असून ाशेतकऱ्यांना शेतीमध्ये रात्रीचे पिकाला पाणी देण्यासाठी बिबट्याची दहशत झाल्याने भय निर्माण झाले असून शिरूर कासार शहरांमध्ये अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे जळू लागल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याने   तहसीलदार साहेबांना विनंती करण्यात येते की , शिरूर कासार शहरात / ग्रामीण भागात पूर्ण दिवस उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे , नसता शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र...

निवडणुक रणधुमाळीच्या तोंडावर आमदार सुरेश धस यांची कट्टर समर्थक योगेश सानप यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना उधाण

Image
पाटोदा (गणेश शेवाळे) अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग आले असताना आष्टी- पाटोदा-शिरूर मतदारसंघात महत्त्वाची घडामोड घडली भाजपचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांनी आपल्या कट्टर समर्थक आणि सक्रिय युवा कार्यकर्ते योगेश सानप यांच्या महासांगवी येथील निवासस्थानी भेट दिली असताना संपूर्ण परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही भेट साधी भेट नसून भाजपच्या आगामी रणनीतीशी थेट जोडली जात असल्याचे स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत. पारगाव पंचायत समिती गणात उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये या भेटीमुळे स्थानिक पातळीवरील चर्चा आमदार धस यांनी जर पारगाव पंचायत समिती गणातून योगेश सानप यांना उमेदवारी दिली, तर गणातील राजकीय मांडणी पूर्णपणे बदलू शकते, अशी चर्चा जोर धरत आहे. सानप यांचे तरुणांमध्ये मोठे समर्थन, सक्रिय जनसंपर्क आणि कट्टर कार्यकर्त्यांची साथ यामुळे त्यांचे नाव आघाडीवर येत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. विरोधकांमध्येही या भेटीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असुन या भेटीनंतर पारगाव गणात निवडणुकीचे वातावरण तापले असून, कार्यकर्...

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री.चंद्रशेखर मारूरतराव घुले पाटील यांची बिनविरोध निवड

Image
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511 दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि माजी आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. चंद्रशेखर मारूरतराव घुले पाटील यांची बिनविरोध निवड आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एकमताने निवड झाली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री श्री. राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केल्या हि निवड चार महिन्यांच्या अल्पावधीसाठी जरी असली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा शेखरभाऊंवार विश्वास टाकल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेवगांव तालुक्यात आनंदाची लाट पसरली आहे 

पुरात वाहुन गेलेल्या चौसाळयाच्या तरुणाचा मृतदेह(सापळा) दोन महिन्याने सापडला

Image
बीड जिल्हा ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :                   बीड जिल्हयासह मराठवाड्यात ऑगस्ट- सप्टेंबर महीन्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने हाहाकार उडाला होता, त्याच वेळी दिनांक २७/०९/२०२५ रोजी चौसाळा व परिसरात झालेल्या अतिवृष्टी पावसाने चौसाळा जवळील वाडवाना -पिंपळगाव रोडवरील नदीला पूर आला होता. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते . त्याच दिवशी रात्री चौसाळा येथील युवक स्वप्निल विक्रम शिंदे वय ३३ वर्ष याचे नदीपलीकडे घर /शेती असल्याने रात्री ९ वाजता मोटरसायकल वरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असताना मोटरसायकल सहपुरात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी काही अंतरावर मोटरसायकल सापडली , यावरून तो पाण्यात वाहून गेला असल्याचा अंदाज त्याच्या नातेवाईकांना आला , त्याचा शोध घेतला असता सापडला नाही . बीड जिल्हा स्तरावरून शोध पथके पाचारण केले परंतु याचा शोध लागला नाही . हे पथके तीन दिवस शोध घेत होते परंतु कुठेच शोध लागला नाही . १५ ते २० कि,मी शोधले परंतु पथकाला त्यात अपयश आले. शेवटी शोध यंत्रणा बंद झाली . परंतु ...

गिनीज बुकात नोंद झालेली बीडची वृक्ष लागवड कागदोपत्रीच?

Image
गिनीज बुकात नोंद झालेली बीडची वृक्ष लागवड कागदोपत्रीच? लिंबागणेश ग्रामपंचायतीत आलेली झाडे पडूनच, तर लावलेली झाडेही जळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी. (लिंबागणेश प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या हरित बीड अभियानाला मोठा गाजावाजा करण्यात आला. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खंडेश्वरी परिसरात वृक्षारोपण करून जिल्हाभरात एकाच दिवशी तब्बल ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला आणि या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र या मोहिमेचे वास्तव गाव पातळीवर पूर्णपणे वेगळे चित्र उभे करत आहे. लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा प्रशासनाकडून ५०० ते १००० रोपे पाठविण्यात आली होती. या रोपांपैकी काहींची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने झाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच पडून आहेत. दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने त्यापैकी काही रोपे जळूनही गेल्याचे निदर्शनास आले आहे. वनवाढ आणि पर्यावरण संवर्धनासारख्या संवेदनशील उपक्रमात असा निष्काळजीपणा झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. ग्रामपंच...

डोंगराळे गावातील बालकावरील अत्याचाराच्या घटनेचा गेवराई येथे महिला दक्षता समितीच्या वतीने तीव्र निषेध

Image
गेवराई ( प्रतिनिधी ) दि. 22 - नाशिकजिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर व अमानुषपणे हत्या करण्यात आलेली घटना समोर आली आहे. या घटनेमुळे केवळ मालेगाव परिसरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी गेवराई येथे महिला दक्षता समितीच्या वतीने आज 22 नोव्हेंबर 2025 रोजी गेवराई पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.          या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी अशा विकृत आणि निर्घृण कृत्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून समाजात अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल आणि मुली-मुलांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी राज्यकर्त्यांची व यंत्रणेची ठाम इच्छा दिसून येईल. या पार्श्वभूमीवर यावेळी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आले आहेत.  1) या प्रकरणात...

अखेर लिंबागणेश–पोखरी–पालवण रस्त्यावरील खड्ड्यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या स्वखर्चातून दुरुस्ती सुरू– डॉ. गणेश ढवळे

Image
अखेर लिंबागणेश–पोखरी–पालवण रस्त्यावरील खड्ड्यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या स्वखर्चातून दुरुस्ती सुरू– डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि. २३ ) तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पालवण ते लिंबागणेश या २४ किमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र पडलेले खोल खड्डे व भगदाडांमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अपघातांचे प्रमाणही वाढले होते. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून प्रशासन आणि कंत्राटदाराचा निषेध नोंदविला होता. दरम्यान मदन मस्के कन्स्ट्रक्शन, बीड यांनी दुरुस्ती कालावधी संपल्याचे कारण देत जबाबदारी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्ड्यांचे तात्पुरते डांबरीकरण सुरू केले असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत. "दुर...

शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ?

Image
संडे स्पेशल दणका मोडला नगराध्यक्ष पदासाठी अघोरी विद्दयेचा चा आधार घेणाऱ्या उमेदवाराचा मणका  शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ? शेवगांव नगरपरिषद निवडणुकीत आपलाच विजय निश्चित व्हावा यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही काहींनी पक्ष बदलले काहींनी अपक्ष भरले तर काहींच्या घरी महाराज अवतरले आणि शेवगांवचे आख्खे मतदार मंतरले ? [ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511   दिनांक 23 नोव्हेंबर 2025 वार रविवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि शेवगांव नगरपरिषदेचे वातावरण ऐन हिवाळ्यात चांगलेच गरम झाले असून साम दाम दंड भेद नीती वापरून विजय आपलाच कसा होईल व शेवगांव शहर माझ्याच कस ताब्यात राहील यासाठी काहींनी आपले नेते पाण्यात ठेवले तर काहींनी देव पाण्यात ठेवले तर विजय मिळविण्यासाठी शेवगांव मध्ये नगराध्यक्षपदासाठी आपलीच निवड व्हावी म्हणुन एका उमेदवाराने पाचारण केले अघोरी विद्या जाणणाऱ्या बाबाला पाचारण करून केली शहर प्रदक्षिणा ? आणि शहर मंतरून टाकले शेवगांव नगरपरिषद न...

धर्मयोद्धा संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
धर्मयोद्धा संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा केला गौरव इगतपुरी तालुका : हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाज संघटितपणे उभा आहे, हे दाखवून देण्यासाठी धर्मयोद्धा संघ, इगतपुरी तालुक्यातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे, तसेच पी.आय. मथुरे आणि मगर यांच्या टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोहत्या थांबविण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे डॉ. रुपेश नाठे यांच्या कार्याचेही ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. सोहळ्यात ह.भ.प शिवा महाराज अडके यांच्या कीर्तनासह सतीश महाराज, रहाडे महाराज, पुरशोत्तम महाराज आणि राव महाराज यांची पवित्र साथ लाभली. कीर्तनादरम्यान अडके महाराजांनी धर्माचे महत्व स्पष्ट करत निर्भीडपणे गोरक्षणाचा मुद्दा मांडला. धर्मकार्य करताना मानसिक, शारीरिक व आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो; तरीही संकटांना न घाबरता कार्य चालू...

शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णय :- बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या विधवा,घटस्फोटीत,परित्यक्ता अशा एकल महिलांच्या मुलांची संख्या संकलित करण्याचे आदेश काढून एक संवेदनशील निर्णय घेतला आहे असे महाएनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. या महिलांचे अल्प शिक्षण,रोजगाराची संसाधने नसणे,सासर माहेरचा अनेकींना आधार नसणे अशा स्थितीत त्या मुलांना फार शिकवू शकत नाहीत ही बाब सन्माननीय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती हाच धागा पकडून मंत्री महोदय यांनी तातडीने उचित ठरेल अशी प्रक्रिया सुरू केली आहे त्याबद्दल महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्माननीय मंत्री महोदय भुसे यांचे बाजीराव ढाकणे यांनी आभार मानले आहेत. मध्यंतरी शिक्षण मंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत या महिलांचे दुःख सांगितले व मुलांसाठी काही करण्याची विनंती केली पण विशेष म्हणजे या महिलांसाठी काही करण्याचे त्यांच्या मनात होते असे त्यांनी सांगितले आणि त्याप्र...

पान टपरी चालकाचा मुलगा इंडियन आर्मी मध्ये झाली निवड

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील सर्व सामान्य कुटूबातील वैभव सुभाष जाधव यांने आपल्या आई वडीलाचे स्वप्र केले पुर्ण गेल्या अनेक वर्षापासून वैभवचे वडील पान टपरी चालून आपल्या कुटूब चालवत आहे सुभाष हा गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पान टपरी चालवत आहेत तेव्हा वैभव ने त्यांच्या आई वडीलाचे स्वप्न पूर्ण केले व भारतीय सैन्यात भरती झाल्या बद्दल वैभव चा . भारतीय सैन्यात तुला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा तुझा प्रवास नुकताच सुरू झाला आहे तु पराक्रमाने सेवा कर आणि गढी गावाचे नाव गौरवाने घेतले जावो हिच सदिच्छा पर शुभेच्छा . आई वडीलाचे स्वप्न पुर्ण केल्या बद्दल गढी गावातुन वैभवचे अभिनंदन केले जात आहे व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

आष्टीआतालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ,वन विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करावे- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक (भैय्या) गरुड

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले असून आष्टी वन विभागाने तात्काळ बिबट्यासाठी पिंजरा लावून कैद करावे अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक (भैय्या) गरुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .  पुढे सांगितले की , एकीकडे बिबट्याची दररोज संख्या वाढत असून दुसरीकडे वनविभागाची उदासीन भूमिका पहावयास मिळत आहे .  तालुक्यातील अनेक शेतकरी/ शेतमजूर सध्या शेतात काम करताना दिसत असून दररोज बिबट्या आला गेल्याच्या चर्चा ऐकव्यास मिळत असून यामध्ये शेतकरी/ शेतमजूर भयभीत झाले असून बिबट्या केव्हाही मनुष्य प्राण्यावर हल्ला करू शकतो हे वन विभागाने नाकारू नये .  शेतकरी/ शेतमजूर /नागरिक कामा निमित्ताने गेलेले उशिरा का होईना कामा वरुन ये - जा चालु असते. आष्टी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहुल सावधानता बाळगावी अशी विनंती केली असून सध्या वाघुळुज/ पठार भाग/ कुंभारवाडी/ दौलावडगाव /सुलेमान देवळा/  पाटण सांगवी, आदी भागात बिबट्या आला गेल्याच्या चर्च...

५६ व्या इफ्फीचा जल्लोषमय प्रारंभ : जपान फोकस कंट्री, गोव्या-भारताची सांस्कृतिक मैफल जागतिक पटलावर

Image
५६ व्या इफ्फीचा जल्लोषमय प्रारंभ : जपान फोकस कंट्री, गोव्या-भारताची सांस्कृतिक मैफल जागतिक पटलावर सर्जनशीलता, नवतंत्रज्ञान आणि जागतिक सिनेमाला नवा आयाम पणजी प्रतिनिधी : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आज गोव्यात मोठ्या थाटामाटात सुरू झाला, ज्यामुळे एका रोमांचक चित्रपट महोत्सवाचा सूर तयार झाला. उद्घाटन समारंभाची सुरुवात रंगीत झलक आणि मनमोहक लाईव्ह सादरीकरणांनी झाली, ज्यात गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारतीय चित्रपटाच्या शाश्वत भावनेचे प्रतिबिंब पडते.  या वर्षीचा महोत्सव सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचे अभिसरण या थीमवर केंद्रित आहे, जो दृश्य नवोपक्रम, प्रगत डिजिटल साधने आणि उदयोन्मुख स्वरूपांद्वारे चित्रपट निर्मिती कशी विकसित होत आहे यावर प्रकाश टाकतो. जपानला फोकस कंट्री म्हणून निवडण्यात आले आहे, जो सांस्कृतिक देवाणघेवाणीवर महोत्सवाचा भर मजबूत करतो आणि जपानी चित्रपटांच्या सखोल सर्जनशील प्रभावाची कबुली देतो.  इफ्फी माइल देखील परतला आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रतिष्ठापने, लाईव्ह संगीत आणि सामुदायिक जागा आहेत ज्यामुळे लोकांना महोत...

लोकनेते बाबुरावजी जोगदंड यांच्या पाठीशी युवकांची फौज उभी करू :- विवेक कुचेकर

Image
(चौसाळा प्रतिनिधी) :- चौसाळा हे शहर ग्रामीण भाग असले तरी या पंचक्रोशीतील सर्व जाती, धर्म, पंथ, आणी समुदाया च्या नागरिकांसाठी दिलदार मनाचा राजा म्हणून लोकनेते डॉ. बाबुरावजी जोगदंड यांचे नाव अग्रक्रमाने प्रथम येते. या नावाला वलयं आहे तो सामाजिक कार्याचा, सामाजिक भानाचा, अडल्या नडल्याचा, दुःखीतांचा, शोषित, वंचितांचा, समाजा समाजात मानव हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे ही उदात्त भावना पेरणाऱ्या बाबुरावजी जोगदंड या लोकनेत्याचा. बाबुरावजी जोगदंड हे व्यक्तीमत्व म्हणजे चौसाळा गणातले निःस्वार्थ समाजकार्य करणारे महामेरू पर्वत आहेत. असा लोकनेता आम्हा चौसाळकर नागरिकांसाठी जिल्हा परिषद गणातुन आमच्या हक्काचा उमेदवार म्हणून मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये असावा अशी आम्हा सर्वांची लोकभावना आहे. असे मत बाबुरावजी जोगदंड यांचे खंदे समर्थक समजले जाणाऱ्या विवेक कुचेकर यांनी व्यक्त केले आहे. मागील गेल्या सतरा वर्षापासुन युवा कार्येकर्ते विवेक कुचेकर यांचा सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग असुन,दलीत आदीवासी,भटके विमुक्त, ओबीसी समाजासह प्रत्येक जाती धर्मातील युवकाची फलटण विवेक कुचेकर या तरुण नि...

सीएम डॉ. सावंत यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी कल्याणासाठीच्या वचनबद्धतेची पुनरुज्जीवित पुष्टी

पणजी : गोव्यात जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अद्वितीय शौर्य, नेतृत्व आणि त्यागाला अभिवादन करण्यात आले. भारतातील आदिवासी ओळखीला दिशा देणारी आणि पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देणारी त्यांची परंपरा राज्याने राष्ट्रीय स्तरावर साजरी केली. सरकारने गोव्याच्या आदिवासी समाजाची सांस्कृतिक समृद्धी व त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. Readjustment of Representation of Scheduled Tribes Act, 2025, PM-JUGA, JANMAN Mission आणि PMJVM यांसह महत्त्वपूर्ण उपक्रमांद्वारे शिक्षण, उपजीविका, आरोग्य सेवा आणि आदिवासी पट्ट्यातील दीर्घकालीन कल्याण अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रसंगी बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले, “गोव्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंब सन्मान, संधी आणि अभिमानाने पुढे जावे ही आमच्या सरकारची बांधिलकी आहे. विस्तारित प्रतिनिधित्व, केंद्रित विकास कार्यक्रम आणि आवश्यक सेवांपर्यंत अधिक चांगली पोहोच याद्वारे, आम्ही आमच्या आदिवासी समाजाला पुढील पिढ्यांसाठी समर्थ बनवणार...

आम आदमी पार्टी न.प. निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे प्रस्थापितांचे दणाणले धाबे

Image
आम आदमी पार्टी न.प. निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे प्रस्थापितांचे दणाणले धाबे माजी सैनिक अशोक येडे – जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड बीड नगरपरिषद निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्वबळावर दमदार पणे प्रवेश केला असून नगराध्यक्ष पदासह 16 प्रभागांत उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. लोकाभिमुख, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पर्याय उभा राहिल्याने वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापित गटांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील मतदारांना खऱ्या अर्थाने विकासाचा, प्रामाणिकतेचा आणि स्वच्छ राजकारणाचा पर्याय मिळत असल्यामुळे काही विरोधक आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना लालच, दबाव व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम आदमी पार्टीचा एकही कार्यकर्ता वा उमेदवार दबावाला बळी पडणार नाही.” कारण आम आदमी पार्टीची ताकद म्हणजे जनतेचा विश्वास व प्रामाणिक लढा. सत्तेच्या लालसेपोटी सुरू असलेल्या राजकीय डावपेचांपुढे आमचे उमेदवार खंबीरपणे उभे आहेत. जनतेसमोर दिलेल्या पर्यायामुळे प्रस्थापितांची झोप उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यावर आम आदमी पार्टी पूर्णपणे सक्षम आहे. बीड शहरातील प्रत्येक मतदारामध्ये आज बदलाची त...

मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

Image
मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी लिंबागणेश येथे तीव्र निदर्शने; आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश :- (दि. २०) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात ३ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याच्या भीषण घटनने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गुरुवार, दि. २० रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली. निदर्शनाच्या सुरुवातीला स्व. यज्ञा दुसाने या चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी “आरोपींना फाशीच झाली पाहिजे”, “बलात्कार्यांना कायद्याची भीती निर्माण करा” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या : आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवावा सर्व सहआरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत द्यावी म...

मनुवादी विचारसरणीच्या पक्षाची गुलामी करून निवडनूकीत उभे असणाऱ्या खापऱ्या महाराणा पाडा- डॉ. जितीन वंजारे

Image
      बीड जिल्ह्यासह सबंध महाराष्ट्र मध्ये नगरपरिषद, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रोग्राम ठरलेला आहे, निवडणूक आली की पक्ष,विचारसरणी,जात, धर्म, पंथ, डावी, उजवी, पुरोगामी, अधोगामी सगळेच आले, मतदारांना स्वतःच्या गावातील, शहरातील, तालुका आणि जिल्ह्यातील प्रश्न सोडवणाऱ्या नेत्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे परंतु तसं न घडता दोन रुपये घेऊन , दारू,चिकन, मटन घेणे आणि सर्रास मध्ये एक दोन हजारात विकणे हे सर्रास चालू आहे.आजकाल तर काहीजण ह्या सगळ्या झंजेटीमध्ये न पडता डायरेक्ट ईव्हीएम घोटाळा करून निकालही बदलता येऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही परंतु महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणाचा अधिकार गाजवून जे जे मंडळी उभे राहणार आहेत त्यांची राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका आणि समाजाला असणारे योगदान लक्षात घेऊनच मतदारांनी मतदान करावे अन्यथा आरक्षित जागेवर मनूवादी विचारसरणीच्या पक्षाच्या लोकांचे गुलामी करून फक्त नावापुरतेच पद घेण्यासाठी उभे असणाऱ्या 'खापऱ्या महाराणा' त्याची जागा दाखवा खापऱ्या महार...