Posts

Showing posts from March, 2025

उच्च स्वप्नपूर्ती करिता जिद्द व चिकाटीच्या प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता प्रा. डॉ.नामदेव शिनगारे

Image
उच्च स्वप्नपूर्ती करिता जिद्द व चिकाटीच्या प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता प्रा. डॉ.नामदेव शिनगारे  (महामानव अभिवादन ग्रुप तर्फे शालेय साहित्य वाटप)  बीड प्रतिनिधी - शिक्षण म्हणजे सत्य जाणणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून, दैववाद, किंवा अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरेतून, बाहेर पडल्याशिवाय उच्च स्वप्नपूर्ती करिता. जिद्द, चिकाटी व प्रयत्नाच्या सातत्याची आवश्यकता आहे. अशी प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी खुणगाट बांधावी असे प्रतिपादन प्रा. डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुपला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन म्हणजेच 2024 रोजी मिळालेले साहित्य वाटपाचा नव्या फेरीतील धानोरा रोड बीड नागसेन बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदी लाभलेल्या नागसेन बुद्ध  विहार मंडळाच्या सचिव केशर कांबळे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.नामदेव शिनगारे , अँड तेजस वडमारे व एस.एस. सोनवणे यांच्या हस्ते 43 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन) वाटप करण्यात आले. याप्रसंगी  ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले , वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी. वानखेडे, कॅप्टन राजाभाऊ...

महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह 5 मंत्र्यांच्या उपस्थितीत; लोकशाहीचा लोकरत्न पुरस्कार सोहळा शाही थाटात होणार साजरा!

Image
लोकशाही पत्रकार संघाच्या लोकरत्नसह विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारास प्रस्ताव पाठवावे- प्र. अ. प्रताप साळुंके   संभाजीनगर प्रतिनिधी : लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी लोकरत्न, पुरस्कारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्जांना राज्यस्तरीय समाजरत्न,कृषीरत्न,शिक्षणरत्न,उद्योगरत्न,, सहकाररत्न, साहित्यरत्न, कलारत्न, क्रीडारत्न, आरोग्यरत्न, आदर्श पत्रकार,आदर्श पोलीस, आदर्श व्यक्ती,आदर्श ग्रामपंचायत, आदर्श शिक्षक,आदर्श प्राध्यापक, आदर्श शासकीय अधिकारी,आदर्श कॉन्ट्रॅक्टर, आदर्श वकील, आदर्श शाळा यांना राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते लोकरत्नसह विविध रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, हा सोहळा संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर येथे करण्याचे आयोजित केले आहे. 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी माननीय महामहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे , राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाठ, कॅबीनेटमंत्री अतुलजी सावे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मा. पालकमंत्री तथा मंत्री खासदार...

शिवसेनेचा सामुदायिक विवाह सोहळा सामाजिक न्याय मंत्री ना. संजयजी सिरसाठ यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये संपन्न होणार- संतोष चौधरी

Image
परळी (प्रतिनिधी ): शिवसेना आयोजित हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्राचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, छत्रपती संभाजी नगर चे पालक मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते ना. संजयजी सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रसार माध्यमांना दिली आहे.       दिनांक २ एप्रिल वार बुधवार रोजी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ६ वाजता मोंढा मैदान मारोती मंदिर समोर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ५ या वेळेत सावता माळी मंदिर येथे भोजन व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी अन् वधू वराना आशीर्वाद देण्यासाठी मोंढा मैदान येथे उपस्थीत रहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी यांनी केले आहे.

भारतीबाई यशवंत पवार यांना कवितेच्या माध्यमातून आदरांजली

Image
( प्रतिनिधी नाशिक )       भारतीबाई यशवंत पवार यांचा पुण्यनोमोदन तथा जलदान धार्मिक विधीचे आयोजन रोटरी क्लब हॉल नाशिक येथे संपन्न झाले. कालकथित मातोश्री भारतीबाई यांना उच्चशिक्षित विनोद यशवंत पवार ,राजेंद्र यशवंत पवार , सुप्रिया नाना नेटावटे असे दोन मुले आणि एक मुलगी आहे .      यावेळी आईला कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. वाढत्या वृद्धाश्रमाची संख्या पाहता आईचे महान महत्त्व कळावे व सामाजिक कवितेतून जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आईच्या व परिवर्तनाच्या कवितांचे सादरीकरण जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, संजय आहेरे, मनिषा मेश्राम , सुरेखा गायकवाड, देवभाऊ उबाळे आदी. प्रसिद्ध कवींनी केले.       कर्करोगाची सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून 'कर्करोग विषयावर माहिती व जनजागृती' या विषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते, प्रा. रोहिणी थविल व डॉ. सुरजकुमार मगर यांनी या विषयी व्याख्यान देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथाचा उपयोग होऊन भविष्यात प्रशासकीय अ...

पारंपरिक शेती ऐवजी फुलशेती करत मुळुकवाडी येथील शेतकरी चंद्रसेन ढास यांनी फुलवला समृद्धीचा मळा

Image
लिंबागणेश:- ( दि.३१) बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी चंद्रसेन शेषेराव ढास या शेतकरी कुटुंबाने पारंपरिक पिकांऐवजी फुलाची शेती करत समृद्धीचा मळा फुलवला आहे. साधारणतः १००० लोकसंख्या असलेल्या मुळुकवाडी गावातील शेतकरी प्रामुख्याने कांदा पिक घेतात.संपुर्ण लिंबागणेश पंचक्रोशीत एकमेव फुलशेती करणारे शेतकरी म्हणून चंद्रसेन ढास यांची ओळख आहे.१२ वर्षांपूर्वी मुळुकवाडी येथील १० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गुलाब फुलांची गटशेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केवळ चंद्रसेन ढास यांनीच फुलशेती व्यावसाय तग धरून जिद्दीने करत आहेत. सकाळी उठून कळी तोडली तरच २ दिवस ती टिकते त्यामुळे यासाठी घरचे मजुर असणे गरजेचे आहे. चंद्रसेन ढास यांना ५ एक्कर शेती असुन त्यापैकी ३ एक्कर शेतात फुलशेती करतात. फुलांना योग्य दर मिळण्यासाठी लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजे पाणी टंचाईच्या काळात करावी लागते.पावसाळा सुरू असताना उत्पादन निघण्यास सुरूवात होत असल्याने अनेकदा कमी जास्त पावसाचा फटका फुलशेतीस बसतो मात्र अस्मानी सुलतानीचा विचार न करता जोखीम पत्करून फुलशेती करतात. फुलांना श्रावणात, गणेशोत्सवात तसेच नवरात्रोत्...

जीवाची वाडी येथे गुढी पाडव्या निमित्त कीर्तन संपन्न.

Image
 येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.३० रोजीरूढी परंपरा नुसार मूळ जीवाची वाडी येथील रहिवासी व पंढरपूर येथे कायम वास्तव्यस असणारे ह.भ.प.श्री.कृष्णा भागवत चौरे, महाराज पंढरपूर,यांचे आज दि.३०मार्च-२०२५ रोजी दुपारी o१ते०३:०० वाजता या वेळेत कीर्तनाचे आयोजन ग्रामस्थ जीवाचीवाडी कर यांनी केले. कीर्तन सेवा रुपीअभंग॥रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी बहुत सुखदुताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बापरूकमा देवीवर॥तसेच गुढीपाडव्यानिमित्त काला व श्रीकृष्णाच्या खोडी लिला यांचे विविध दृष्टांत देत किर्तन संपन्न झाले कार्यक्रमास टाळकरी, विणेकरी,मृदंगाचार्य,गायक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लिंबागणेशकरांनी नाकारली गुढी ; गुढी ऐवजी फडकविला शंभुराजेंचा भगवा ध्वज

Image
  लिंबागणेश:- ( दि.३० ) तोडले मी बंधन, गाडल्या त्या रूढी, माझ्या शंभुराजांच्या नावाने उभारा भगवी पताका लावून गुढी अशा शुभेच्छांची देवाण घेवाण करत मागील काही वर्षांपासून परिवर्तनवादी गुढी उभारण्यास सुरुवात झाली आहे. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र असलेले भगवे ध्वज गावोगावी लावण्यात आले आहेत. भगवी पताका हिच आमुची खरी गुढी आता नाही लटकविणार घरावर साडी; अशुभ आहे तो उलटा तांब्या,मयतालाच लागतात कडुनिंबाच्या फांद्या,तिरडीला बांधतो एरंडाची काठी,सोडा मायबापहो फक्त आपल्या शंभुराजासाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. गुढीपाडव्याच्या पुर्व दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती.त्यामुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बहुतांश बहुजण कुटुंबियांनी पारंपरिक गुढी न उभारता आज दि.३० रविवार रोजी आपल्या घरांवर भगवी पताका उभारून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली.त्यामुळे हा दिवस अशुभ आहे.एवढेच नव्हे तर मंगलकार्यात कलश सरळच असतो पण नेमका गुढीपाडव्यालाच उलटा का टांगला जातो, कु...

मनाचे कंगोरे उलगडल्याशिवाय माणूस कळत नाही-देवीदास खडताळे

Image
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन -         मानवी मन हे सदैव विचार करत राहतं. या मनात अनेक प्रकारचे विचार येतात. या मनाचे कंगोरे उलगडल्याशिवाय माणूस आपलासा होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक देवीदास खडताळे यांनी केले.ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ही आहेत.      गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही...' या उपक्रमात 'कंगोरे मनाचे' या पुस्तकावर देवीदास खडताळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री सुनंदा पाटील होत्या.      खडताळे पुढे म्हणाले की, कवी मनाचा आशय घेऊन मनात सुरू असलेल्या भावना उलगडून दाखवत असतो. मन पावसासारखे असते... कधी रिमझिम तर कधी सरीसारखे बरसत असते. मनात श्रद्धा असायला हवी. आपण दुसऱ्याला समजून घेतले तर एकमेकांमध्ये सहजपणे एक वेगळं नातं निर्माण होतं. दु:ख विसरण्यासाठी आयुष्यातील कोडे दूर करण्यासाठी आपल्यात वैचारिक भावना निर्माण झाली पाहिजे, असे सांगून त्यांनी काही कविता सादर केल्या. ...

राज्यातील 560 गोशाळांना देशी गोवंश परिपोषण योजनेचा लाभ वितरण म्हणजे नवसंजीवनी-बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले जेष्ठ समाजसेवक सन्माननीय शेखर भाऊ मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्यातील गोमाता संकटात सापडलेल्या आहेत हे हेरले व गोमातांच्या संगोपनासाठी काही तरी आगळीवेगळी योजना सुरू करण्याचे ठरविले आणि मागिल २ वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेत देशी गोवंश परिपोषण योजना कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी व मंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा करून योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणून महाराष्ट्र राज्यातील ५६० गोशाळांना गुरुवार दिनांक २७ मार्च रोजी जानेवारी ,फेब्रुवारी व मार्च या ३ महिन्यांचे अनुदान म्हणून २५ कोटी रुपये संबंधित गोशाळांच्या बॅक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहेत. याबद्दल महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी सन्माननीय शेखर भाऊ मुंदडा यांचे आभार मानले आहेत. गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन प्रति गाय ५० रुपये अनुदान योजनेअंतर्गत दि २७ मार्च २०२५ रोजी राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोट...

अशोक खरसाडे यांच्या इफ्तार पार्टी ला मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील समाज एकवटला

Image
 बीड ( प्रतिनिधी ) वर्ष (5) प्रति वर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून बीड शहरालगत असणाऱ्या मौ.आहेर वडगावातील मज्जित मध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री.अशोक खरसाडे यांच्या वतीने सर्व जाती धर्मातील लोकांना आवर्जून बोलावून सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय एकात्मता, भाईचारा कायम अबाधित राहावा या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते  याही वर्षी प्रतिसाला प्रमाने दि.27/03/2025 वार गुरुवार रोजी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमानंतर खरसाडे यांनी एकीचा,आपुलकीचा, एकमेकांविषयी प्रेमाचा,जिव्हाळ्याचा मुस्लिम बांधवांसाठी संदेश देत पवित्र रमजान महिन्याचे महत्व व नेकी काम करणाऱ्याला अल्ला कडून कसा दुंवा मिळतो यावर भाष्य केले आणि वातावरण आनंदीमय झाले. पो.नि.बंटीवाड यांनी देखील जात धर्म पंथ याच्या पलीकडे कर्मश्रेष्ठ आहे असेच एकोप्याने राहा आणि आनंदित रहा असे म्हणत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी आप जिल्हाध्यक्ष अशोक येडे , प.स. गुंडीबा नवले,पो. ह आनंद मस्के, मोराळे, मुंडे, योगेश निर्धार...

आष्टी तालुक्यातील जामगांव येथील मातंग समाजातील धनु रणसिंग ची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी-किशन तांगडे

Image
      .        रात्री 10:30 वाजता जामगांव येथे जाऊन किशन तांगडे यांनी अन्यायग्रस्त कुठूबाची भेट घेऊन सांत्वन केले. बीड -प्रतिनिधी :--- जामगांव,ता.आष्टी,जी.बीड येथील मातंग समाजातील धनु दामू रणसिंग हा आपल्या पत्नी सोबत गावातीलच वीट भट्टी वर कामगार म्हणून काम करून आपली व आपल्या कुठूबाची उपजीविका भागवून मजूर म्हणून काम करीत होता. वीट भट्टी मालकाने त्याला उचल म्हणून तीस हजार रुपये दिले होते.      या उचल म्हणून दिलेल्या पैशावर गावातीलच गुंड प्रवृत्तीच्या दोघांचा डोळा होता,त्या दोघांनी(आरोपीने)धनु रणसिंग च्या कडील तीस हजार रुपये बळजबरी करून हिसाकावून त्याची जातीय द्वेषातुन/मानसिकतेतून हत्या(खून)केली. सदरील हत्या पुरोगामी महाराष्ट्राला हदरून सोडणारी आहे. गोर-गरीब,दिन-दलित,मागासवर्गीया वर सातत्याने होणारे हल्ले,अन्याय,अत्याचार,दहशत आणि खून या सारख्या होणाऱ्या घटना कधी संपतील असा संतप्त सवाल किशन तांगडे यांनी उपस्थित केला.              मातंग समाजातील धनु रणसिंग याची हत्या झाल्या नंतर किशन तांगडे यांन...

लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी शुभांगी पाटील

Image
पुणे प्रतिनिधी लोकशाही पत्रकार महाराष्ट्रराज्य उद्योग विकास समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड श्रद्धा कंडूडे प्रदेश अध्यक्ष,संध्या सरोदे प्रदेश कार्याध्यक्ष उद्योग विकास समिती, पांडुरंग साळुंके पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके, प्रदेश सचिव गणेश जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण, आयेशाखान मुलानी, निलोफर शेख प्रदेश अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रदेश उपाध्यक्ष वसीम आजाद, साजेद सय्यद, अनिस कुरेशी यांच्या आदेशानुसार केली. या यावेळी संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य म्हणाले की, पाटील ह्या ब्युटी पार्लर, टेलरिंग क्षेत्रात कलासेस च्या माध्यमातून महिला आपल्या पायावर उभा करीत आहेत. गारमेंट क्षेत्रातील मोठं क्लस्टर उभा करून अनेक महिलांना रोजगार निर्मिती करणार आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन निवड केली आहे. तसेंच लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकारांच्याआणि महाराष्ट्र मधील तमाम सर्व सामान्य नागरिकांचे देखील विविध मागण्या शासन दरबारी मांडून मंजूर करून घेणार आहेत. विविध समित्या स्थापन करून महाराष्ट्र राज्यात तालुक्यात ...

नकली शिवभक्त कुणाल कामराचा निषेध करतात मग छत्रपतींचा अपमान करणारे कोरटकर,सोलापूरकर आणि भिडे याच्या वेळेस कोणत्या बिळात होते?- डॉ जितीन वंजारे

Image
        बीड प्रतिनिधी :- काल परवा एक घटना घडली काही नेत्यांचे विडंबन गीत आपल्या कॉमेडी अंदाज मध्ये सादर करून कुणाल कामराने येथील राजकीय व्यवस्था आणि सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती जगासमोर आणली आपला देश टॅक्स च्या माध्यमातून कसा लुटला जातोय, जनतेने मोठ्या हिमातीने एकत्र येऊन मोठे केलेले पक्ष संघटना येथील सत्ताधारी कसे फोडतात आणि इंग्रजाचं तोडो फोडो राज्य करो ही नीती वापरून कसे येथील जनतेला लुटतात हे च त्याने दाखवले. शिवसेना शिवसेनेतून फोडली, राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुन फोडली माणसात माणूस ठेवला नाही या नितीने काम केल आणि आपला देशात देश ठेवला नाही अक्खा लुटून कसा खाल्ला हेच त्याने एक- दोन गीतांच्या माध्यमातून दाखवून दिल आहे. यावर बरेच बाजारू आणि विकत आणलेल्या लोकांनी प्रतिक्रिया दाखल केल्या पण मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विचारू पाहत आहे की तो भडवा राहुल सोलापूरकर आणि रस्त्यावरील आंबा खाऊन पैदा झालेला प्रशांत कोरटकर आणि तो भिडे जेंव्हा उघड उघड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होता तोंडातून गरळ ओकत होता तेंव्हा तुम्ही षंड होऊन कोणत्या बिळात बसला होतात....

२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणा-या उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री तथा नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त करणार-डॉ.गणेश ढवळे

Image
२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणा-या उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री तथा नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून नाराजी व्यक्त करणार-डॉ.गणेश ढवळे  ऊन पावसात बसणा-या चिमुकल्यांना कोणी ईमारत देता का ईमारत ; बीड जिल्ह्यात १६०५ वरवगखोल्यांच्या दुरूस्ती गरज तर ५९२ वर्गखोल्या धोकादायक ; पालकमंत्री अजितदादांना काळे झेंडे दाखवणार :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.२७ ) बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २४७६ शाळा आहेत. या शाळांमध्ये १०,४७९ वर्गखोल्या असून यातील ५९२ वर्गखोल्या आता धोकादायक असून या ठिकाणी अध्यापन करू नये असे शिक्षण विभागाने कळविलेले आहे. दरम्यान धोकादायक इमारतीतील विद्यार्थी मंदिर, ग्रामपंचायत आणि झाडांचा आसरा घेऊन ऊन पावसात बसत आहेत. या धोकादायक शाळांना कोणी इमारत देत का इमारत असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण विभाग, आमदार, खासदार, शिक्षणमंत्री यांना गेल्या ३-४ वर्षांपासून निवेदने आणि आंदोलने करूनही शासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याने दि.२ एप्रिल रोजी बीड मध्ये नियोजन बैठकीसाठी येणारे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मं...

डॉ.अशोक थोरात शैल्य चिकित्सक यांचे निलंबन तात्काळ रद्द करा नसता आम आदमी पार्टी आंदोलन करणार-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

Image
   बीड प्रतिनिधी :- आम आदमी पार्टीच्या वतीने मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे की दिनांक 25 मार्च 2025 रोजी अधिवेशनात मा. आमदार मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली त्यावर आरोग्य मंत्री यांनी कसलाही विचार न करता तडका फडके राजकीय दबाव तंत्रा पोटी डॉ. अशोक थोरात शैल्य चिकित्सक बीड. यांचे निलंबन करण्यात आले या विषयावर विभागीय चौकशी चालू असताना त्या चौकशीच्या घेय्रामध्ये बारा अधिकारी असताना एकावरच कारवाई का? असा प्रश्न देखील उद्भवत आहे डॉ. अशोक थोरात यांचे कोविड काळातील आरोग्यसेवा ही चांगल्या प्रकारे व उत्कृष्ट दर्जाची देण्याचे काम बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आले होते त्या सेवेचा देखील विचार केला गेला पाहिजे पण तोही केला गेला नाही त्या काळामध्ये नागरिकांना जीव वाचवणे हे सर्वात पहिले उद्दिष्ट होते ते कार्य 24 तास संपर्कात राहून जनतेला सेवा देण्याचे काम या आरोग्य अधिकाऱ्याने केलं जर काही चुकीचे घडले असेल तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे परंतु यामध्ये संपूर्ण चौकशी न होता सर्वांची चौकशी करून त्यामध्ये लिप्त असणारे अधिकारी कर्मचारी व त्या क...

महामानव महिला नागरी पतसंस्थेच्या निवडी बिनविरोध

Image
  महामानव महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कौशल्या भोले, उपाध्यक्षपदी रेश्मा आठवले, तर सचिवपदी कावेरा इनकर यांची बिनविरोध निवड बीड प्रतिनिधी - बीड येथील महामानव महिला नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक (२०२५-२०३०) बिनविरोध संपन्न झाली. संचालकानी नुतन पदाधिकारीची निवड बिनविरोध केली. अध्यक्षपदी कौशल्य गुलाबराव भोले, उपाध्यक्षपदी रेश्मा राजाभाऊ आठवले तर सचिवपदी कावेरा गौतम इनकर यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पिठासीन अधिकारी पी.एस. रोडे यांच्या उपस्थितीत दि. २०/०३/२०२५ रोजी संपन्न झाली. सर्व संचालकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले. सदर बैठकीस नवनिर्वाचित संचालिका नंदाबाई दळवी,विजया जौजांळ, विद्या डोळस,वंदना वाघमारे व प्रभारी व्यवस्थापक पूजा जोंजाळ उपस्थित होत्या. महामानव अभिवादन ग्रुप , पतसंस्थेचे ज्येष्ठ सभासद डी.जी.वानखेडे, जी.एम.भोले, ए.बी. जौजांळ, डी.एम.राऊत, एस.एस.सोनवणे, के.एस.वाघमारे, प्रा.अशोक गायकवाड, सुजाता वासनीक, प्रशांत वासनिक, यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालीका ...

डॉ.अशोक थोरात यांचे निलंबन मागे घेण्यात यावे,अन्यथा ५ एप्रिला आत्मदहन करणार - रोहन गलांडे पाटील

Image
केज/ प्रतिनिधी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात साहेब यांचे निलंबन ५ एप्रिल २०२५ पर्यंत मागे घेतले नाही तर ५ एप्रिल २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा रोहन गलांडे पाटील यांनी सरकारला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात साहेब यांचे निलंबन ५ एप्रिल २०२५ पर्यंत मागे घेतले नाही तर ५ एप्रिल २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला देतो निवेदनाद्वारे देण्यात येत आहे तरी मला आंदोलना दरम्यान काही झाले तर सरकार, प्रशासनान जबाबदार राहील यांची नोंद प्रशासनाने तातडीने घेऊन माझी मागणी मान्य करण्यात यावी अशी मागणी रोहन गलांडे यांनी सरकारला व प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात केली आहे. बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात कथित भ्रष्टाचार केला असा आरोप केज मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी विधान सभेत लक्षवेदी लावुन चुकीच्या व सुड बुध्दीने कार्यावाही केलेली आहे म्हणून सकल बहुजन समाज, केज तालुका यांच्या वतीने सुध्दा डॉ. अशोक थोरात यांच्यावर केलेली कार्यवाही नात्काळी मागे घ्यावी अन्यथा केज तालुक्यात तिवृ स्...

निविदेमध्ये (टेंडर) गोलमाल करून मर्जीतील गुत्तेदारांना पोसणाऱ्या कार्यकारी अभियंता स्वामी यांचे निलंबन करा-लोक जनशक्ती पार्टी

Image
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 18 3 2025 रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या केज धारूर अंबाजोगाई परळी येथे अनेक कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे शासन नियमानुसार प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टेंडर प्रोसेस आणि वर्क ऑर्डर करणे परंप्राप्त असते पण अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग येथील कार्यकारी अभियंता स्वामी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून फेब्रुवारी महिन्यात या कामाची टेंडर प्रोसेस आणि वर्क ऑर्डर करून आपल्या संबंधित गुत्तेदारांना हे टेंडर मिळवण्यास मदत केली आहे सामान्य गुत्तेदारांना कामे मिळू नयेत म्हणून अनेक कामांचे क्लबिंग केले जाते त्यामुळे सामान्य गुत्तेदारांना काम मिळणे अवघड होत आहे त्यातच शासन नियमानुसार 25 लाख ते पाच कोटी टेंडर प्रोसेस कालावधी दहा दिवसाचा असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तो नियम न धरता सात दिवसांचा कालावधी करून टेंडर आणि वर्क ऑर्डर करून घेतलेले आहेत तरीही मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांना लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक ...

ज्ञानज्योती बहुऊदेशी राष्ट्रीय प्राध्यापक डॉ.सोपान सुरवसे यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Image
 बीड प्रतिनिधी ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा मराठी भाषा संशोधन व संवर्धन अध्यापन कार्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार 2025 सन्मानपूर्वक प्राध्यापक डॉ.सोपान सुरवसे यांना प्रदान करण्यात आला . या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून रेखाताई भंडारे , मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अध्यक्ष प्रा डॉक्टर केशव देशमुख, स्वागत अध्यक्ष माननीय पोपटराव पठारे व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हेमंत भोसले यांच्या उपस्तित देण्यात आला. प्रा डॉ सोपान माणिकराव सुरवसे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ सुरेंद्र अलुरकर, मा. डॉ हेमंत वैद्य, कार्यवाह भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल अध्यक्ष.मा. डॉ पुरुषोत्तम कुलकर्णी, स्थानिक कार्यवाह डॉ अविनाश देशपांडे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष.मा.प्रा.चंद्रकांत मुळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ सुहास मोराळे, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ उत्तम साळवे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शनिवारी वार्षीक स्नेहसंमेलन ; कार्यक्रमास उपस्थित राहावे-विलास खाडे

Image
यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शनिवारी वार्षीक स्नेहसंमेलन ; कार्यक्रमास उपस्थित राहावे-विलास खाडे बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते उद्घाटन तर कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडेची उपस्थितीत लाभणार परळी वैजनाथ / दिंद्रुड (प्रतिनिधी ) :-              कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २९ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले असुन या संमेलनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक विलास खाडे व यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले.              यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बीड चे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे...

विविध मागण्या; रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण

Image
विविध मागण्या; रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण. सफाई कामगारांना पुर्ववत कामावर रुजू करून घ्यावे, प्रमुख मागणी. बीड प्रतिनिधी (२४ ) बीड शहरातील मागील २० महिणे झाले कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून पुर्व सुचना न देता मुख्याधिकारी निता अंधारे मॅडम यांनी कामा वरुन कमी केले आहे . कामगारांना कामावर रुजु करून घ्यावे या प्रमुख व ईतर मागण्यासाठी केंद्रिय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वात सोमवार दि. २४ मार्च २०२५ सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेशकुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती   रोजंदारी मजदुर सेना केंद्रिय महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय हक्क सोई सुविधा प्राप्त व्हाव्यात म्हणुन सनदशीर कायदेशीर मार्गाचा अवलंब करत धरणे निदर्शने आंदोलन दरम्यान महिला कामगारांना सलग आठ दिवस कारागृहात डांबुन ठेवण्यात आले , राजेशकुमार जोगदंड यांनी जिल्हाधिकारी कार...

बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था "चाळणी झालेल्या रस्त्यांवर अजितदादा अवतरले" मुखवटे घालून लक्ष्यवेधी आंदोलन

Image
बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था "चाळणी झालेल्या रस्त्यांवर अजितदादा अवतरले" मुखवटे घालून लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे   बीड:- ( दि.२४ )बीड शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे,वाळुमिश्रित खडीचा धुराळा उडत असुन अपघातांची संख्या वाढली असुन चाळणी झालेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे बीड शहरातील ११० कोटी रुपयांच्या ४० फुट रूंदीच्या १७ मुख्य रस्त्यांच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राज्याच्या नगरविकास विभागाकडे वर्षभरापूर्वी पाठविण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला असुन त्यास तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसह धुळे ते सोलापूर रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवुन रखडलेले दुभाजकांचे काम पूर्ण करून साईडपंखे भरण्यात यावेत. बीड ते अहिल्यानगर मार्गाचे काम संथगतीने होत असुन प्रमुख शासकीय कार्यालये असणाऱ्या रस्त्यांवर गर्दी होत असुन जलदगतीने पुर्ण करण्यात यावे या मागण्यांसाठी सामाजिक   सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बी...

विद्यानगर येथील प्रेरणा महिला मंडळ, लेझीम पथकाचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव

Image
        विद्यानगर सांकवाळ परिसरातील शिवप्रेमी कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्य सेवा मंडळ , आणि गेली चार वर्षे महिलांचा सहभाग असलेल्या लेझीम पथकाच्या योगदानमुळे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. प्रेरणा महिला मंडळ विद्यानगर च्या महिला दिनानिमित्त गेली चार वर्षे सहभागी असलेल्या लेझीम पथकाच्या महिलांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भारतनगर कालनीतील कम्युनिटी हॉलमध्ये छोट्याशा शानदार गौरव सोहळ्याचे आयोजन महिला मंडळ आणि छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्य सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मा श्री चंद्रकांत गावस मा श्री अमोल कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करताना " प्रेरणा महिला मंडळाच्या भगिनींचे गोडभरुन कौतुक केले " अँड. अनिता सौ अनिता थोरात ताईसाहेब यांनी मार्गदर्शन केले . विशेष अतिथी म्हणून गोवा पोलीस माजी निरिक्षक मा जयवंत पाटील आणि प्रेरणा महिला मंडळ च्या अध्यक्षा सौ संगीता प्रकाश नाईक लाभल्या होत्या. छत्रपतीची स्मृती असलेल्या सन्मानचिन्हेआणि प्...

बीड शहरातील व्यापरांकडून सक्तीने वसुली करू नये-भाजपा नेते नवनाथ अण्णा शिराळे

Image
बीड प्रतिनिधी . बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून सक्तीने वसुली करू नये असे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती  नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी  की बीड नगरपालिके मार्फत बीड शहरातील व ग्रामीण भागातील फळविक्रेते भाजीपाला विक्रेते शेळी मेंढी कोंबड्या इत्यादी विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वसुली करत दरवर्षी बीड नगरपालिके मार्फत टेंडर काढले जातात यावर्षी 15 मार्च रोजी टेंडरची मुदत संपलेली आहे याबाबत संबंधित गुत्तेदार व्यापाऱ्याकडून व शेतकरी बांधवांकडून सक्तीने वसुली करत आहे मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांनी स्वतः या विषयाचा फॉलोअप घेऊन जातीने लक्ष घालून ही केली जाणारी वसुलीवर तात्काळ प्रतिबंधक उपाय म्हणून शोधावेत आणि वसुली करण्यास निर्बंध लावावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगरपालिकेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे गोरगरीब व्यापाऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर आपण स्वतः नगर परिषदेचा चाललेला हा सावळा गोंधळ हा आपण बंद केल्याशिवाय...

बीड मधील आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला ॲड.माधव जाधव यांनी केली 25 हजार रुपयांची मदत

Image
जातीपातीच्या भिंती तोडून पीडित नागरगोजे कुटुंबाला दिला आधार केज : देवगाव ता.केज जिल्हा बीड येथील रहिवासी असणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी बीड येथील बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. 18 वर्ष शिक्षकाची नोकरी मोफत केल्यानंतर सुद्धा त्यांना पगार चालू न झाल्यामुळे धनंजय नागरगोजे यांनी तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक वर पोस्ट टाकून स्वतःची जीवन यात्रा संपवली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी व त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ही सहा महिन्याची गरोदर आहे.घरामध्ये वृद्ध आई-वडील आहेत.अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये व संकटामध्ये आहे. ॲड माधव जाधव यांनी देवगाव ता.केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील भानुदासराव नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत 25000 रुपयाचा धनादेश देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत केली.यावेळी ॲड माधव जाधव यांचे...

डॉ.गौरव कुलकर्णी यांचे हिमॅच्युरिया या आजारावर मोलाचे मार्गदर्शन लाभले- डॉ जितीन वंजारे

Image
      दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत चालल्या आहेत, ऊन जास्तीत जास्त वाढत चालले आहे त्यामुळे तापमानात दिवसेंदिवस भर पडत आहे, ग्लोबल वार्मिंग सगळीकडेच वाढत असल्याकारणाने जीवघेना उकाडा जाणवत आहे त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊन उष्माघात होऊन बरेच लोक आपल्या जीवाला मुकतात. त्यातच लघवीत रक्त जाणे म्हणजे हिमॅच्युरिया हा आजार सर्व साधारणपने सर्रास दिसून येत आहे. लघवीत रक्त जाणे या विषयावर सखोल असं मार्गदर्शन अहिल्या नगर चे प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ गौरव कुलकर्णी यांनी केले. ही सी एम ई पाथर्डी येथील हॉटेल संस्कृती या ठिकाणी तालुक्यातील तीस ते चालीस डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली.ह्यावेळी पाथर्डी मेडिकल असोसिएशन चे जवळजवळ सर्वच डॉक्टर्स उपास्थित होते या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा बीड हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर उपास्थित होते. यावेळी चिंतामणी हॉस्पिटल आणि युरोलॉजी सेंटर चे सर्वेसर्वा सन्माननीय प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ गौरव कुलकर्णी यांचा सत्कार पाथर्डी मेडिकल असोसिएशन च्या तर्फे करण्यात आला.     ...

चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह मानवी हक्काची लढाई - अँड. सिद्धार्थ शिंदे

Image
   महामानव सार्वजनिक वाचनालय डॉ. बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन व थोर इतिहासकार मा.म.देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली  बीड प्रतिनिधी - उच्च शिक्षण घेऊन विद्या विभूषित होऊन आपले संपूर्ण आयुष्यभर दीन दलित वंचित बहुजनांच्या व देशाच्या हिताकरता झटलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लढा मानव विकास करता व स्वाभिमानाची लढाई होती. त्यापैकी त्या काळात नैसर्गिक संपत्ती पासून देखील दीनदलित अस्पृश्य समाजाला सार्वजनिक मालकीच्या पाण्याला देखील स्पर्श करू देत नव्हते, त्याकरता डॉ. बाबासाहेबांनी फुले, शाहूंच्या विचाराने प्रेरित झालेल्या त्या काळातील उच्चवर्णी यांच्या बहुमोल सहकार्यांनी महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याकरता 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता. तो चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह मानवी हक्काची लढाई होती. त्या लढाईची स्मृति प्रेरणादायी आहे असे उद्गार अध्यक्षपदी लाभलेले अँड. सिद्धार्थ शिंदे यांनी काढले. महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे महाडच्या सत्याग्रह "संग्राम दिन" म्हणून संपन्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. तसे...

पाऊस आणि पाणी सजिव सृष्टीच्या निर्मितीसाठी लागणारे अविभाज्य घटक आहेत - जलप्रेमी बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी . :- १६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी " जलजागृती सप्ताह " म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आपणही पाणी जपून वापरा आणि इतरांनाही जपून वापरण्याचे आवाहन करावे असे आवाहन जलप्रेमी बाजीराव ढाकणे यांनी केले आहे. त्याचबरोबर पाऊसाचे पाणी आणि निसर्गनिर्मित पाणी जपून वापरावेच लागणार त्याशिवाय भविष्यात पाणी मिळणार नाही. पाऊस हा नैसर्गिक पाण्याचा मुख्य स्रोत आहे. तो नदी, तलाव, भूजल, आणि समुद्र यांच्या पाणीपुरवठ्याला पूरक ठरतो. पाऊस पडल्यामुळेच आपल्याला गोडे पाणी मिळते आणि शेती, जंगल, पशुपक्षी तसेच मानवांचे जीवन टिकून राहते. पावसाचे महत्त्व: 1. जलस्रोत भरण्यास मदत – पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि भूजलसाठे भरतात. 2. शेतीसाठी उपयुक्त – चांगला पाऊस असल्यास शेतीसमृद्ध होते आणि अन्नोत्पादन वाढते. 3. हवामान संतुलन राखते – पाऊस तापमान कमी करून वातावरण गार आणि प्रसन्न करतो. 4. जैवविविधतेसाठी महत्त्वाचा – पावसामुळे जंगल आणि तळ्यातील जलसंपत्ती टिकून राहते, जी प्राण्यांसाठी आवश्यक असते. पावसाचे पाणी संकलन आणि संवर्धन कारण हवामान बदलामुळे अनियमित पाऊस आणि पाण्याची ट...

जीवाची वाडी येथील जल जीवन पाणी पुरवठा योजन उपोषन स्थगीत.

Image
येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.२१/मार्च-२०२५रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन वर्षापासून जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम मंद गतीने चालू असल्याने सध्याची भिषण पाणीटंचाई विचारात घेता गावातील ग्रामस्थ भागवत चौरे सह जीवाची वाडी येथील हनुमान मंदिरावर दि.२० वेळ१०:००वा.पासुन आमरण उपोषणास बसले आहेत पंधरा दिवसात योजना कार्यनीतन करा उपोषन चालु होते त्याची दकल घेत उप अभियंता श्रीमती वंदना साळवे सह कर्मचारी उपोषन स्थळी हजर होऊन जल जीवन मिशन योजना जिवाची वाडी झालेल्या निकृष्ठ कामाची चौकशी मा.आयुक्त विभागीय कार्यालय,छत्रपती संभाजी नगर कार्यालय मार्फत चौकशी करण्याचे लिखी पत्रविल्याने तुर्तास स्थगीत करण्यात आले, उपोषनस्थळी उप अभियंता श्रीमती वंदना साळवे,भागवत चौरे,डिगांबर चौरे,गोकुळ सारूक,चौरे बि.के.आसाराम चौरे, डॉ.दादासाहेब चौरे,भागवतफुंदे,राजाभाऊ केदार,गोपाळ चौरे,शिवाजी चौरे, इत्यादी उपस्थित होते.                           उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक वैभव पाटील यांच्...

मनसे व म्हाळसा यांच्या डान्स स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

Image
मनसे व म्हाळसा यांच्या डान्स स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद महिला मुलींनी नोंदवला अभूतपूर्व सहभाग बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे संकल्पनेतून व म्हाळसा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित डान्स स्पर्धा २०२५ ला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची सुरुवात छ.शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रा. दुष्यंता रामटेके, बीड प्रसारचे संपादक समीर काझी, दैनिक पार्श्वभूमीचे आनंद वीर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, म्हाळसा प्रतिष्ठानच्या सचिव मयुरीताई बाबर यांचे समवेत दुसरे मान्यवर करीत झाले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले.  डान्स स्पर्धेत महिलांच्या व मुलींच्या सहभागाची नोंद घेण्यात आली, ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जागतिक महिला दिन निमित्ताने साजरा करण्यात आला.  यावेळी, डान्स स्पर्धेत सहभागी महिला व मुलींनी आयोजक वर्षाताई जगदाळे यांचे ...

विकास बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या - शैलेंद्र पोटभरे

Image
 बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात प्रेमसंबंधाच्या संशयावरून विकास बनसोडे या तरुणाला पत्र्याच्या शेडमध्ये डांबून बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विकास अण्णा बनसोडे (वय २३) असून, तो जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी होता. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर तो तीन वर्षांपासून चालक होता. काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते. मात्र, तो दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथे मित्रासह आला होता. याचदरम्यान भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी विकासचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना आला. या काणावरून आरोपींनी संगनमत करून विकासला दोरी आणि वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपींनी मृतदेह चारचाकी वाहनात टाकून कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आणि पसार झाले. या हत्येपूर्वी दोन दिवस बेदम मारहाण करतानाच विकासच्...

जीवाची वाडी येथील जल जीवन योजना तात्काळ चालू करा ग्रामस्थाचं उपोषण

Image
येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१९/मार्च-२०२५रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन वर्षापासून जल जीवन योजनेचे काम मंद गतीने चालू असल्याने सध्याची मिषण पाणीटंचाई विचारात घेता गावातील ग्रामस्थ भागवत चौरे हे जीवाची वाडी येथील हनुमान मंदिरावर दि.१९ वेळ१०: ००वा.पासुन मरण उपोषणास बसले आहेत पंधरा दिवसात योजना कार्यनीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.                          क्षणचित्रे  उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक वैभव पाटील यांच्याशी भ्रम्हध्वनी वर संपर्क केला परंतु संपर्क झाला नाही नंतर पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस ठाणे,केज यांना तात्काळ कळवितो.पोलीस अधिक्षक कार्यालय,बीड              उपोषण स्थळे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी दिसून आले नाहीत. आमच्या प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता जल जीवन कार्यालय,बीड मुकुंद आंधळे यांच्याशी चार वेळा भ्रमध्वनी वरून संपर्क केला परंतु त्यांनी जानीव पूर्वक...

रविवारी रंगणार पवनराजे इंग्लिश स्कूलमध्ये लहान- चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन

Image
  स्नेहसंमलन सोहळ्यास उपस्थित रहा-सौ. प्रणिता खंडेराव चौरे  केज । प्रतिनिधी   केज येथील नामांकित इंग्रजी माध्यमांची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूलमध्ये येत्या रविवारी (२३ मार्च) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाट्य, गायन आणि भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक मान्यवर, शिक्षण तज्ञ आणि पालक उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी जोरदार तयारी केली आहे . शाळेमधे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात त्यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष तथा केळगाव-बेलगाव च्या सरपंच सौ . प्रणिता खंडेराव चौरे तसेच मुख्याध्यापक अशोक मस्के, रामेश्वर घुले याच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यानगर,सांकवाळ येथे थोड्याच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार - संभाजीनगरचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांची ग्वाही

Image
.       "छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य सेवा मंडळ, विद्यानगर" आणि अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत, गोवा शाखा" यांच्या संयुक्त विद्यमाने ३९५ व्या, तिथीनुसार शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संभाजीनगरचे आमदार दाजी साळसकर यांनी वरील उद्गार काढले.               विद्यानगर चौक सिग्नलला नेहमी फडकत असणारा भगवा ध्वज, शिवजयंतीचे अवचित्य साधून, जुना काढून नवीन बदलन्यात आला.            सिग्नल ते एम्.ई.एस्. कॉलेज पर्यंत,हनुमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रेरणा महिला मंडळातर्फे,लेझीम पथकाने शिवजयंती सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.         एम्.ई.एस्.कॉलेज,वसंत जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात उर्वरित सोहळा संपन्न करण्यात आला.          संभाजीनगरचे आमदार श्री. कृष्णा (दाजी )साळकर आणि झेडपी सदस्य एडव्होकेट सौ.अनिता थोरात यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला.       ...

पाण्याचा काटकसरीने वापर करून उत्पादनात वाढ करण्याची बोरखेड येथे शेतकऱ्यांनी घेतली शपथ

Image
" पाणी हेच आपले जीवन आहे " - जलप्रेमी बाजीराव ढाकणे        बीड प्रतिनिधी . :- रविवार दिनांक १६ मार्च २०२५ रोजी जलजागृती सप्ताहानिमित्त मौजे बोरखेड ता जि बीड येथील यशोदिप शेतकरी बचत गटांच्या शेतकरी सदस्यांनी सहभागी होत आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून शेतीच्या उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे अशी संकल्पना करून सर्वांनी मिळून पाण्याचा काटकसरीने वापर करूया असा निर्णय घेत शपथ घेतली. यावेळी जलप्रेमी बाजीराव ढाकणे, बाळासाहेब गावडे यांच्यासह यशोदिप शेतकरी बचत गटांचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, सचिव विठ्ठल घरत , सदस्य विठ्ठल शिंदे, महादेव गावडे , आदम खॉ पठाण , बाबु बोराटे सुशिल बोराटे, गोरख अनपट, दत्ता सोनटक्के, खंडु सगळे इत्यादींची उपस्थिती होती.   _------------------------------------ राज्यात १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान साजरा केला जातो " जलजागृती सप्ताह " या निमित्ताने आपणही पाणी जपून वापरले पाहिजे                   पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीसाठी पाणी आवश्यक आहे. मानव, प्राण...