Posts

Showing posts from December, 2024

ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून ज्येष्ठ पत्रकार आयुब पठाण यांची नियुक्ती

Image
ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून ज्येष्ठ पत्रकार आयुब पठाण यांची नियुक्ती  जनतेचे आरोग्य अबाधीत रहावे म्हणून ऑर्गेनिक भाजीपाला शहर वासीयांसाठी उपलब्ध करून देण्यावर भर देणार- ज्येष्ठ पत्रकार आयुब पठाण छत्रपती संभाजीनगर (श्याम पिंपळे )- १० हजार मेट्रीक टन महिन्याला उत्पादन असलेल्या ओयासिस ऑर्गेनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या विविध संस्थांचे पद भूषवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आयुब पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार या प्रश्नावर ज्येष्ठ पत्रकार आयुब पठाण सर म्हणाले की, शहरातील सर्व मॉल्सच्या माध्यमातून जनसमान्याच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ऑर्गेनिक भाजीपाला वितरीत केला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य अबाधीत राहणार आहे. कुठल्याही रोगांना प्रतिकार करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातील खर तर शहरवासीयासाठी नव्या वर्षेाच्या दृष्टीकोनातून हे सकारात्मक पाऊलच म्हटले पाह...

रामकिसन राऊत जिल्हा परिषद सेवेतु निवृत्त

Image
येवता :केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्माळा या शाळेमध्ये -३३वर्षाची सेवा पूर्ण करीत प्राथमिक शिक्षक श्री. राऊत रामकिसन प्रल्हादराव कानडी माळी येथील रहिवाशी आज दि.३१ डिसेंबर-२०२४ रोजी वयानुरूपी सेवानिवृत्त होत असल्याने,लव्हूरी केंद्रांतर्गत 46 जिल्हा परिषदच्या शाळेच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीचा सह पत्नीक निरोप देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी(प्रा.)भगवानराव फुलारी प्रमुख पाहूने म्हणुन उपस्थित होते,केज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रेय चाटे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनीलराव केंद्रे,केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे,केंद्रीय मुख्याध्यापक श्रीराम चाटे, प्रस्तावित पर भाषणात फुलारी म्हणाले की केज चे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे ज्यावेळी विस्तार अधिकारी होते त्यावेळी मी शिक्षक होतो. आणि त्यांची एक तळमळ असते माझ्याकडून काहीतरी कामे व्हावेत त्यांची तळमळ असलेने त्यांच्या आग्रहास्तव मी रामकिसन राऊत सरांच्या निरोप समारंभ कार्यक्रमास उपस्थित ...

शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे-१३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन

Image
शेती मातीच्या संघर्षाचे प्रतिबिंब साहित्यातुन उमटायला हवे १३ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांचे आवाहन साहित्य, भाषा व संस्कृती संशोधन केंद्रासाठी आमदार खोसकर यांनी केला एक कोटीचा निधी जाहिर कावनई मध्ये केंद्र उभारणीसाठी जागा देण्याची सरपंच गोपाळ पाटिल यांची घोषणा आहुर्ली प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन    साहित्य हे वास्तवाशी निगडीत असावे.सामान्य माणसाला केंद्रबिंदु ठेवुन त्याच्या जगण्याचा संघर्ष साहित्यात यायला हवा. सत्तेचे गुलाम नको, भांडवलदाराच्यां हातचे बाहुल नको, तर प्रस्थापितानां देशोधडीला लावणार्या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष हवा. हे खरे साहित्य.शेती मातीचा लढा साहित्यातुन प्रतिबिंबित होऊन व्यवस्थेला हादरा देणारं साहित्य हवं असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने मोडाळे ता.ईगतपुरी येथे आयोजीत १३ वे नवोदिताचें व ग्रामिण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, सुप्रसिध्द साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी केले.    व्यासपिठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे, आमदार हिरामण खोसकर, स्वागताध्यक...

मुरगाव बंदराच्या कुशीत वसलेल्या मंदिरात शानदार भजन सोहळा

Image
.   गोमंतकाच्या पश्चिम समुद्रकिनारी अर्थात मुरगाव बंदराच्या कुशीत श्री दामोदर राष्ट्रोळी ईस्वीटी ब्राह्मण देवता छोटेसे मंदिर वसलेले आहे . मंदिर निर्माण साठी सन्माननीय श्री अनिल कानकोणकर संस्थापक आणि अध्यक्ष यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटिश कालगणनेनुसार वर्षाच्या शेवटी येणारा सोमवार सन्माननीय सौ आणि श्री विनोद रामचंद्र आर्लेकर यांच्या यजमान पदाखाली उत्साहाने साजरा करण्यात आला. गोमंतकातील नामवंत भजन संगीतकार कै. मनोहर बुवा संगीत सांस्कृतिक संस्था आयोजित "मनोहर भजन रंग"या कार्यक्रमात श्री अशोक मांद्रेकर , श्री सूर्या शेट्ये, शिवम पालेकर, नंदकिशोर नारूळकर, गजानन नाईक, प्रदीप बांदेकर, कुमारी स्नेहा नार्वेकर, विनोद आर्लेकर, शिवराम गावस, आनंद शेट्ये, प्रेमानंद पेडणेकर, रामचंद्र मयेकर,, प्रेमानंद केरकर, देवेंद्र शेट्ये, ऋषक काणकोणकर, आणि बालकलाकार निमेश मयेकर व पुजारी सुहास लिमये. इ. कलाकारांचा सहभाग होता. मंदिराचे अध्यक्षांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन श्री अशोक मांद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यजमान श्री विनोद आर्लेकर (माजी वहातूक स़ंचालक गोवा सरकार ) यांचा स...

पत्रकारितेत उल्लेखनीय कार्यासाठी आयेशा शेख यांना पुरस्कार जाहीर

Image
बीड प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील दैदिप्यमान कार्याबद्दल आयेशा शेख यांना पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, संत ज्ञानेश्वर नगर, शासकीय आयटीआय मागे, बीड येथे संपन्न होणार आहे.आयेशा शेख यांना मिळालेल्या या सन्मानामुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे.

बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा

Image
बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा परभणी हत्याकांड प्रकरणी सर्व दलित संघटनांची आंदोलनाची हाक बीड प्रतिनिधी - बीड येथील सर्व दलित - बहुजन समाजातील समाजातील संघटनां एकत्र येऊन दि .६ जानेवारी २०२५ रोजी बीड येथे संविधान बचाव- जनआक्रोश मोर्चा काढणार असून , या मोर्चात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .    परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे गृहमंत्री अमीत शाह यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी , परभणीत महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत , देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात , शासकीय नौकरीतील गुत्तेदार पध्दत रद्द करण्यात येऊन, रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भराव्यात , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दरमहा देण्यात यावी , शासकीय सेवेतील आरक्षणामधील वर्गीकरण कायदा रद्द करण्यात येऊन शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे , आदी मागण्यासाठी दि.६ जानेवारी रोजी बीडच्या जिल्हाधि...

'मिशन अयोध्या'चे मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचे भव्य प्रदर्शन

Image
मुंबई, (संगीत प्रतिनिधी ):अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक व तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा अतिशय ग्लॅमरस आणि भव्य कॅनव्हासवर आज थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून अयोध्यातील लोकप्रिय 'साधो बँड'ला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या रामलल्लाच्या भक्तीगीतांनी सारा परिसर प्रसन्न झाला होता. या मंगल प्रसंगी अयोध्या मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचे, प्रख्यात आर्टिस्ट विनय गावडे यांनी काढलेले अप्रतिम स्केच निर्माते कृष्णा दादाराव शिंदे व योगिता कृष्णा शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रेरणा व अनुभव कथन केले. 'रामराया' आणि 'श्रीराम अँथम'ची जादू! या सोहळ्यात भव्य एलईडी वॉल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर झालेल्या रामलल्लाच्या सूरमयी मोहक रूपाने संपूर्ण उपस्थिता...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालयात विनम्र अभिवादन

Image
 बीड प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर सावलीसारखी साथ देणारे व जर माझे जीवन चरित्र लिहिले तर अर्धे चरित्र दादासाहेब गायकवाड यांचे लिहिल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या महान कार्याबद्दल काढले होते असे थोर कर्मवीरांना त्यांच्या 53 व्या स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने भावपूर्ण विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता या संगीत प्रा. गजानन चित्रे अध्यक्षपदी तर आयु. बौद्धाचार्य सुभाष तांगडे व प्रशांत वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादा साहेबांच्या प्रतिमेस पुष्प पुष्प माला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास महामानव अधिवर्धन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.जि.वानखेडे यांनी केले तर सूत्रसंचालन राऊत यांनी केले ह्याप्रसंगी अध्यक्षांनी दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की बाबासाहेबांच्या महापरिनिवान नंतर चैत्यभूमीची निर्मिती ...

रोजंदारी मजदूर सेनेच्या नव्या नेतृत्वाच्या दिशेने सन २०२५ची क्रांतिकारी सुरुवात

Image
रोजंदारी मजदूर सेनेच्या नव्या नेतृत्वाच्या दिशेने सन २०२५ची क्रांतिकारी सुरुवात परळी (प्रतिनिधी )  रोजंदारी मजदूर सेनेने सन २००७ ते २ डिसेंबर २०१६ सलग ९ वर्षे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत/ कालकथीत बाबुभाई भालाधरे या खंबीर नेतृत्वाने कंत्राटी कामगारांसाठी आपले जीवन समर्पित करून विविध उपक्रम व आंदोलन केली. कंत्राटी कामगारांचे प्रश्न लावून धरले राज्यातील विविध ठिकाणी निवेदन देऊन व प्रसंगी आंदोलनाद्वारे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु दिनांक ०२ डिसेंबर २०१६ रोजी त्यांचे अपघाती दुःखद निधन झाले.      दरम्यानच्या काळात बाबुभाईंच्या पत्नीने युनियनच्या कोराडी येथील कार्यालयाचा बेकायदेशीर कब्जा घेतला. तसेच युनियनच्या अध्यक्षपदाचा सुद्धा वारसा हक्काने दावा केला. परंतु लोकशाही मार्गाने केंद्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेऊन द्वितीय केंद्रिय अध्यक्ष म्हणुन दिवंगत/ कालकथीत भाई लखन वासनिक यांची निवड करण्यात आली. त्यांनी सुद्धा जानेवारी २०१८ ते २८ जून २०२० या कालखंडात विविध आंदोलन करून कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा अविरत प्रयत्न केला .त्यामुळ...

गुन्हेगारांचे शस्त्र परवाने तातडीने रद्द करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तूलाने टिकल्या उडवत लक्ष्यवेधी आंदोलन

Image
गुन्हेगारांचे शस्त्र परवाने तातडीने रद्द करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तूलाने टिकल्या उडवत लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.३० ) बीड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या गेल्या ११ महिन्यात ४० खुन,खुन करण्याचा प्रयत्न केल्याच्या १७८ तसेच गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्हे तसेच बीड जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित नसुन १६६ अत्याचाराच्या घटना तर विनयभंग, छेडछाडीच्या ४१३ घटना घडल्याची पोलिस दरबारी नोंद आहे.तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त १६ गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळुमाफिया, अपहरण,खुन, खंडणी,मटका बहाद्दर, गोळीबार या सारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि याप्रकरणी गांभीर्य नसलेल्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधि...

चकलांबा पोलिसांकडून तलाठी शेख जावेद यांच्या तक्रारीवरून लोकशाहीचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न

Image
चकलांबा पोलिसांकडून तलाठी शेख जावेद यांच्या तक्रारीवरून लोकशाहीचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न..! सा.बीड सिटी लाईफ'चे संपादक व सहसंपादकावर खोटा आरोप करत तक्रार दाखल; पत्रकारांकडून निषेध व्यक्त माध्यमांचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच तडा! गेवराई | प्रतिनिधी गेवराई : शासन व गोरगरीब सर्व सामान्य माणसाला आरसा दाखवण्याचे काम प्रसार माध्यम करतात. तसेच लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने गेवराई तालुक्यातील चकलांबा महसूल मंडळात असणाऱ्या महारटाकळी सज्जाचे तलाठी शेख जावेद यांच्या विरोधात पुराव्यानिशी बातमी सा.बीड सिटी लाईफ या वृत्तपत्रांमध्ये दोन बातम्या प्रकाशित केली होती. त्या बातमी आधारे गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी चौकशी करून सदरील तलाठ्याची बदली केली असून, बदली केल्याचा राग मनात धरून तलाठी जावेद शेख यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात संपादक शेख आमीन व सहसंपादक सय्यद बादशहा यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आह...

शासन दफ्तरी गुन्हे नोंद असणाऱ्यांचा शस्त्र परवाना रद्द करा ; जिल्हाधिका-यांमार्फत गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

Image
शासन दफ्तरी गुन्हे नोंद असणाऱ्यांचा शस्त्र परवाना रद्द करा ; जिल्हाधिका-यांमार्फत गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.२७ ) बीड जिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना धारकांपैकी २४५ जणांवर एक किंवा एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे असल्याची पोलिस ठाण्यात नोंद असुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळुमाफिया,अपहरण,खुन, खंडणी, मटका बहाद्दर , गोळीबार या सारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दफ्तरी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी गुन्हा नोंद असलेल्या २४५ शस्त्र परवाना धारकांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना ऑक्टोबर मध्येच पाठवली होती. त्यावर तातडीने निर्णय घेऊन शस्त्र परवाने रद्द करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस च-हाटकर , शेख मुबीन,रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष ( इंटक), माजी सैनिक बीड जिल्हाध्यक्ष आप, नितिन सोनावणे ब...

मुप्टा संघटनेच्या 'बीड जिल्हा संपर्क कार्यालय' उदघाटन समारंभास उपस्थित रहा - शरद मगर

Image
 बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एकमेव लढवय्ये संघटना म्हणून ज्याचे नाव आहे त्या मुप्टा शिक्षक संघटनेचे कार्य अधिक वेगाने होण्यासाठी व संघटन बळकट करून शेवटच्या शिक्षकांपर्यंत न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मुप्टा शिक्षक संघटनेचे संपर्क कार्यालय होणे गरजेचे होते . त्या अनुषंगाने मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव प्रा सुनील भाऊ मगरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संपर्क कार्यालय सुरू होत आहे.  या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन प्रा. सुनील (भाऊ ) मगरे यांच्या हस्ते तर शरद मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.  दिनांक 29 डिसेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी चौक डीपी रोड, बीड येथे संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी मुप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संभाजी वाघमारे डॉ.समीउल्ला खान( उर्दू मुप्टा राज्याध्यक्ष) प्रा. प्रदीप रोडे (कार्याध्यक्ष) , सुभाषजी पवळ (समर्थ शिक्षण संस्था सिरसमार्ग ), डॉ. भास्कर टेकाळे (विभागीय कार्याध्यक्ष), रा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे गुणवंत पुरस्कार २०२४ जाहिर

Image
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे गुणवंत पुरस्कार २०२४ जाहिर आदर्श जनसेवक पुरस्कार माजी जि.प.सदस्य गोरख बोडके यांना जाहिर ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन -     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या गुणवंताचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हया गुणवंत पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे.   या गुणवंत पुरस्काराची घोषणा कार्यक्रमाचे आयोजक,निमंत्रक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी केली आहे.    आदर्श जनसेवक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देशभरात आदर्श गाव म्हणुन राष्ट्रपती व पंतप्रधान यांनीही नावाजलेल्या मोडाळे गावच्या विकासाचे शिल्पकार तथा माजी जि.प. सदस्य गोरख बोडके यांना जाहिर करण्यात आला आहे.     महर्षी आमदार स्व.पुंजाबाबा गोवर्धने यांचे स्मृती निमित्ताने दिला जाणारा यंदाचा पुरस्कार शोषित,वंचित व अकुशल कामगार, कष्टकर्याचें नेते कॉ.राजु देसले, नाशिक यांना जाहिर करण्यात आला आहे.    सहकार महर्षी...

नितीन सोनवणे यांचा रक्तदान शिबिर घेऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा

Image
 नितीन सोनवणे यांचा रक्तदान शिबिर घेऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा    बॅनर बाजी व अनावश्यक खर्चाला टाळून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर यशस्वी   बीड प्रतिनिधी - अनेक नेते आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक बॅनरबाजी होर्डिंग, आतिश बाजी करून पैशाचा अपव्यय करतात, या सर्व गोष्टीला फाटा देऊन, समाज उपयोगी व अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे रक्तदान हे श्रेष्ठदान याचे बीड शहरात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन केला आहे.  काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रातून जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा आहे अशा बातम्या आल्या होत्या, त्याची दखल घेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून जाणीवपूर्वक रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.  त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या बीड जिल्हा येथील मध्यवर्ती कार्यालयात सकाळपासूनच रक्तदान शिबिराला सुरुवात झाली यामध्ये शेकडो युवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रक्तदान देऊन आपल्या नेत्याप्रती व समाजाप्रती एक जागरूक नागरिक असल्याची प्रचित...

संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणी याचं कुणी राजकारण करू नये व दोषी आरोपीला कठोर शासन करावे : बलभीम बारगजे

Image
 बीड (सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुणहत्या झाली त्या प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शासन करून त्यांच्या कुटूंबाला न्याय द्या अशी मागणी माणूसकी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलभीम बारगजे यांनी केली हे करत असताना याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वास येतोय स्वतः च्या स्वार्थासाठी स्वतःला पद मिळवण्यासाठी काही बीड जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी या गोष्टीचं घाणेरडे राजकारण करत आहेत त्या कुटूंबाना न्याय मिळावा जी घटना घडली ती फार चुकीची आहे बीड जिल्ह्याला लाजिरवाणी आहे ही घटना जाती - धर्माच्या विरहित आहे ज्याच्या कुटुंबात हा प्रसंग घडतो त्यांची वेदना त्या कुटूबप्रमुख व त्यांच्या मुलांना माहित असते त्यांच्यामुळे जे काय बीड जिल्ह्यात घाणेरडे राजकारण चालू आहे हे थांबवावे व देशमुख कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न करू व त्या कुटूंबांना न्याय मिळवून देऊ पण यांच्यामध्ये राजकारण कोणाचं पद आणि प्रतिष्ठा किवा कोणता समाज बदनाम होता कामा नये शेवटी बीड जिल्ह्याची जनता ही जो पर्यंत संतोष देशमुख . कुटूंबाला न्याय मिळत नाही तोपर्यत...

बीड शहर बचाव मंचाने घेतली एस.पी. नवनीत कॉवत यांची भेट

Image
बीड शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थे बाबतच्या विविध प्रश्नांवर,बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट दरम्यान चर्चा   बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात नुकतेच सेवेत रुजू झालेले IPS अधिकारी नवनित कॉंवत SP बीड शहर बचाव मंचच्या वतीने भेट घेवून सस्नेह स्वागत करण्यात आले. विशेषतः विद्यार्थिनींना ट्यूशन्स, क्लासेस, वस्तीग्रह, इत्यादी ठिकाणी होणारा टवाळखोरांचा त्रास, बुलेट व दुचाक्यांवर फिरून मुलींना त्रास देणाऱ्या याच टवाळखोरांचा ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना शहरात विविध ठिकाणी होणारा त्रास -महिला सुरक्षा,रहदारी,ट्राफिक,नोपार्किंग,अतिक्रमण, विनापरवाना ध्वनिक्षेपकांचे,फटाक्यांचे अवेळी रात्री उशिरापर्यंत होणारे त्रास,चोऱ्या, नगरपालिकेचा गलथान कारभार व शहरामध्ये झालेले दुर्लक्ष, शहरात वाढत चाललेले अवैध धंदे व मादक पदार्थ इत्यादींचे वाढते जाळे,पोलीस चौक्या चालू असाव्यात वआवश्यक त्या ठिकाणी नवीन चालू करणे, एकंदरीत नागरिकांची गैरसोय व सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक समस्यांवर तपशिलात चर्चा केली.साहेबांनी लगेच नोंद घेत,अधिकारी वर्गास बोलावून काय कारवाई क...

पालकमंत्री बीडचाच हवा ; बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री अतुल सावे यांचा कार्यकाळात बीडकरांनी भोगलंय ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड:- ( दि.२६ ) बीड जिल्ह्याला कायम अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान तर संपूर्ण मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक गेल्या १ जानेवारी २०२४ ते ३१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ११ महिन्यात १७४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. सध्या बीड जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरून मिळणार अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहेत. मात्र आम्हा बीडकरांचा मागील अनुभव पहाता जेव्हा मागच्या सरकारमध्ये बाहेर जिल्ह्यातील बीडचे पालकमंत्री अतुलजी सावे असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे आम्हाला दि.१० एप्रिल २०२३ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " " निष्क्रिय पालकमंत्री हटाव आंदोलन " करावे लागले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी बीड जिल्ह्यातील जनतेचा विचार करून बीडचा पालकमंत्री बीड जिल्ह्यातील असावा.  बाहेरचा पालकमंत्री असल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठका वेळेवर होत नसुन निधी अभावी बीडचा विकास खुंटतो  बीड जिल्ह्यासाठीचा पालकमंत्री अजुनही जाहीर झाले नसल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकली नसल...

एकल महिला संघटना च्या वतीने मनुस्मृती दहन

Image
 बीड प्रतिनिधी - दि 25 डिसेंबर 2024 रोजी तुळजाई चौक येथे मनुस्मृती दहन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी एकल महिला संघटना च्या सुरुवात केलेल्या सदस्य सामाजिक कार्यकर्त्या अर्चना ताई नागरगोजे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात झाली महिलांच्या जाचक असलेल्या त्यातील लिखित स्वरूपात विषमतेची भिंत तोडून संविधान मध्ये दिलेल्या महिलांसाठी हक्क व अधिकार याविषयी माहिती देण्यात आली अर्चना ताई, कोमल ताई यांचे भाषणे झाली आपल्या भाषणात अर्चना ताई यांनी संघटना ची सुरुवात महिलांच्या असलेल्या समस्या, प्रश्न व त्यांच्या बोलण्याची संधी यावर माहिती देऊन संघटना बांधणी व संघटना ची आजची गरज आजचे प्रश्न व संघटना ही निरंतर प्रक्रिया असून जोपर्यंत महिलांचे प्रश्न संपत नाही तोवर संघटना आहे व ही संघटना कुणी एक जणीची नसते ती सर्वांसाठी असते, महिलांना सर्व स्वतंत्र जगता यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे, यावेळी कोमल ताई यांनी मनुस्मृती मध्ये महिलांच्या विरोधात सांगितले त्यावर माहिती दिली व संविधान मध्ये महिलांचे अधिकार सांगित...

संपादक जितेंद्र सिरसाट यांना एकेरी भाषेत धमकी देवुन बोलणारया जिल्हाधिकारी कार्यातील महीला कर्मचारयांनी तात्काळ माफी मागावी-विवेक कुचेकर

Image
संपादक जितेंद्र सिरसाट यांना एकेरी भाषेत धमकी देवुन बोलणारया जिल्हाधिकारी कार्यातील महीला कर्मचारयांनी तात्काळ माफी मागावी-विवेक कुचेकर   युवा ग्रामीण पत्रकार संघटना करणार आंदोलन बीड जिल्हा (प्रतिनिधी) : परखडपणे लेखन करणारे दै.वास्तव चे संपादक तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आ.जितेंद्र सिरसाट साहेब यांच्या बद्दल एकेरी भाषेत आणि धमकी देऊन बोलणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील महिला कर्मचारी आघाव यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघटना जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे .     ज्या लेखणीमुळी सामान्य जनता आपले हक्क अधिकार मिळवू शकते,तसेच तळागाळातील जनतेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय दिला जातो,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला,लोकशाहीच्या रक्षणकर्त्याला एक सरकारी कर्मचारी महिला सगळ्या गोष्ठी विसरून धमकी देत एकेरी भाषेत आरे तुरी ची भाषा करत आहे आणि च्यालेंज करत आहे,हा हुकूमशाहीचा एक भाग आहे,सर्व प्रथम या सर्व ...

बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त ; नगरपालिका प्रशासन दिशाभूल करत कागदोपत्री कारवाईत व्यस्त

Image
बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त ; नगरपालिका प्रशासन दिशाभूल करत कागदोपत्री कारवाईत व्यस्त :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.२५ ) बीडकरांची रस्त्यांवरील मोकाट कुत्री आणि जनावरांच्या त्रासापासून सुटका होण्याची शक्यता नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मावळली आहे.जनावरे रस्त्यावर मोकाट सोडण्याच्या प्रकाराने नागरीकांना रस्ते,पाणी, पथदिवे आदी नागरी समस्यांनी त्रस्त असताना मोकाट कुत्री आणि जनावरांमुळे नविन समस्येत भर पडली आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन अथवा आंदोलनानंतर नीता अंधारे मुख्याधिकारी नगरपरीषद बीड कागदोपत्री सर्वकाही आलबेल असल्याचे आणि दोषींवर कारवाई सुरू असल्याचे गोलगोल उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत असुन कागदोपत्रीच कारवाई केल्याचे दाखवत आंदोलकांची दिशाभूल करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत  असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे. कोंडवाडा कार्यान्वित आहे तर रस्त्यावर मोकाट जनावरे क...

मेहनत आणि संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काही मिळणार नाही-प्रो.डॉ सुधाकर शेंडगे

Image
मेहनत आणि संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काही मिळणार नाही-प्रो.डॉ सुधाकर शेंडगे    भगवान महाविद्यालयात आजीवन शिक्षण विभागाचे दोन दिवसीय शिबिर उत्साहात संपन्न आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :         ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता ओळखून व कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. कारण संघर्षाशिवाय विद्यार्थ्यांना भविष्यात काहीच मिळणार नाही . आपले व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये 'आजीवन शिक्षण आणि विस्तार' विभागाचे कार्यक्रम खूप उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक प्रो डॉ सुधाकर शेंडगे यांनी केले . ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व भगवान महाविद्यालय आष्टी (जिल्हा बीड) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 'आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागा अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व्यवसाय मार्गदर्शन व प्लेसमेंट कार्यशाळे'त २१ डिसेंबर २०२४ (२०२४-२५) समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावि...

मुलीचा झाला म्हणून या आनंदाने एका गरजवंत कुटुंबाला 50 किलो धान्य देऊन मुलीचे केले स्वागत

Image
 बीड (सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील उमापूर येथील भुसार मालाचे व्यापारी विश्वंभर टेकाळे यांना नात झाली म्हणून त्या आनंदाच्या भरात याच गावातील एका गरीब कुटुंबाला 50 किलो बाजरीचे धान्य देऊन नातीच्या जन्माची केली स्वागत आजच्या युगात जग झपाट्याने बदलत असताना अशिक्षित कुटुंबामध्ये नव्हे तर सुशिक्षित कुटुंबामध्ये आज देखील मुलाच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यामध्ये केले जात आहे दुर्दैवाने आज देखील कित्येक मोठ मोठ्या घरामध्ये सुशिक्षित कुटुंबामध्ये लोकांना प्रबोधन देणाऱ्या वर्गामध्ये यांच्या घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आजही त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात आजही कित्येक कुटुंबामध्ये तू समजना मुलगी जन्माला आली तर काहीही दोष नसताना त्या मुलीच्या आईचा छळ केला जातो मुलगी ही भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थाने म्हातारपणाची काठी असताना आजही तिला गावाला जाते मुलगीही खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे रूप आहे याच भावनेतून आजही समाजातील काही वर्ग मुलीच्या जन्माचे कौतुकाने स्वागत करतात मात्र हा वर्ग खूपच नगन्य आहे उमापूर येथील भुसार मालाचे व्यापारी विषांबर टेकाळे यांनी त्यांना नाद झाल्याबद्दल म्हणजेच...

विकासाच्या नावावर बीडमध्ये बौद्ध विहाराची विटंबना,बांधकामाचे साहित्य अस्थाव्यस्थ टाकून विहाराचे पावित्र केले मलिन

Image
विकासाच्या नावावर बीडमध्ये बौद्ध विहाराची विटंबना, बांधकामाचे साहित्य अस्थाव्यस्थ टाकून विहाराचे पावित्र केले मलिन. संबंधीत कंस्ट्रक्शनवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी. बीड प्रतिनिधी ,       येथील प्रभाग क्रमांक 13 मधील अजिंठा बौद्ध विहाराच्या विकासाचे काम  वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश असतांना देखील गेल्या वर्षभरापासून एस-एस कंस्ट्रक्शनच्या ठेकादाराने विकास कामास चालढकल करत असतांना सुद्धा बीड पालिका प्रशासनाने देखील अशा ठेकादाराला कामाचे बीले अदा केली असल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. दरम्यान गेल्या गत वर्षभरात विहारात कोणतेही धम्म कार्य असो की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवच काय तर महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम देखील एस-एस कंस्ट्रक्शनच्या पुर्वाग्रह दुषित मानसिकतेमुळे झाला नाही. तसेच विहाराच्या आत आणि परिसरात ठेकेदाराने अस्थाव्यस्थपणे बांधकामाचे साहित्य टाकून विहाराचे पावित्र मलिन करुन विटंबना केल्याने बीडमधील बौद्ध समाजामध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. त्...

पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Image
रक्तदान हेच श्रेष्ठ दान :- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर मानवी रक्त कुठल्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्यावेळेस मानवी शरीरातूनच काढून घ्यावे लागते. म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे‌. जेव्हा तुम्ही रक्तदान करतात तेव्हा फक्त एकाच रुग्णाला फायदा होतो. परंतु जेव्हा तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतात त्यात संकलित झालेल्या रक्त पिशव्यांमुळे शेकडो रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतात. त्यामुळेच शिबिर आयोजित करणे महत्त्वाचे आहे रक्तदान हे अनमोल असे जीवदान आहे. आपले रक्तदान एखाद्या गरजवंत रुग्णांना, अपघातग्रस्तांना जीवदान ठरू शकते,  कोणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही. म्हणूनच रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी हा विचार आपण सर्वांनीच अंगीकारला पाहिजे तसेच रक्तदानामुळे रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्त निर्माण करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना मिळते. म्हणून दिनांक 26/12/2024 रोजी माझा वाढदिवस आहे. मी तो वाढदिवस साजरा करणार नाही. कारण परभणी प्रकरणामध्ये आंदोलन कर्ता...

घटप्रभेत ऊस मजुराचा मुकादमाकडून निघृण खून

Image
गोकाक, ता. २३ : येथून जवळच असणाऱ्या घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरीदरम्यान असणाऱ्या प्रख्यात दवाखान्याच्या आवारात ऊसतोडणी कामगार विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याचा त्याच्याच गावाचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याने झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. घटप्रभा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्या बाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता. श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंड च्या  डोक्यात चाळीस किलो पैक्षा मोठा दगड   घातला.व छातीवर बसून दगडणे तोंड डोके ठेचू लागला हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने ताबोड तोब ढाकणे याला पकडले. घटप्रभा पोलिसांना माहिती दिली.ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्र...

'मिशन अयोध्या'ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत

Image
'मिशन अयोध्या'ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत मुंबई :प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा प्रवास, त्याच्या अत्यंत आकर्षक मोशन पोस्टरमुळे सर्वांचे आकर्षण ठरत असून भक्त आणि चित्रपट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता तयार झाली आहे. नुकताच या चित्रपटाचे नवे पोस्टर आणि कॅप्शन चर्चेत आली आहे. "पुढच्या पिढयांना आपण कोणता 'राम' शिकवणार आहोत? रावणावर विजय मिळवणारा राम कि "रामराज्य" प्रत्यक्षात आणणारा आदर्श 'राजाराम'? हे दोन प्रश्न या कॅप्शनद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. समाजमाध्यमात याविषयी अनेक तर्कवितर्कांसह च्रर्चा सुरु झाल्या आहेत.  भस्मासुरी आगीच्या वावटळीत उभ्या असलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीचा शक्तिशाली प्रतिमाविष्कार, तिच्या हातातील प्रभू श्रीरामांच्या झेंड्याचा तेजस्वी अभिमान आणि पार्श्वभूमीवर...

हिंदू मॅरेज ऍक्ट,कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, खावटी,महिला पुनर्वसन इत्यादी कायदे सुधारणे गरजेचे- डॉ जितीन वंजारे

Image
आजकाल फारकत (डिवोर्स) घेणं काही लोकांचा धंदा.मोठी रक्कम मागून पत्नीकडून पतीचा शारीरिक,मानसिक,आर्थिक छळ हिंदू मॅरेज ऍक्ट,कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, खावटी,महिला पुनर्वसन इत्यादी कायदे सुधारणे गरजेचे- डॉ जितीन वंजारे अतुल सुभाष आत्महत्या म्हणजे येथील महिला शशक्तिकरण व संरक्षण कायद्यामुळे अभय असणाऱ्या मुजोर महिलांकडून झालेला निष्पाप खून होय- डॉ जितीन वंजारे      काल परवा एक प्रकरण घडलं ए आय प्रोफेशनल आय टी इंजिनीअर अतुल सुभाष ह्या दीड लाख पगार असणाऱ्या आय टी इंजिनीअर ने सुमारे चोवीस पाने आणि दीड तास विडिओ रेकॉर्डिंग करून स्वतःचा झालेला मानसिक शारीरिक कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक छळ जगासमोर मांडला. जिथे जाईल तेथून प्रताडना, हीन वागणूक,सगळ्यांनी मागीतलेले पैसे त्यामुळे स्वतःच्या बायकोकडून आणि तिच्या नातेवाईकांकडून झालेला त्रास, कोर्टात झालेली पिळवणूक, दोन वर्षात सुमारे एकशे वीस वेळा कोर्टाच्या फेऱ्या मारून स्वतःला झालेला मानसिक,शारीरिक, कौटुंबिक आर्थिक त्रास त्यातून कंटाळून शेवटी केलेली आत्महत्या हे अतिशय भयावह आहे. वास्तव जगातील पुरुषांचा छळ कश्या प्रकारे होतो, मह...

पत्रकार हरीओम क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Image
लिंबागणेश:- ( दि.२४ ) बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२४ मंगळवार रोजी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब हांगे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बकेचे मॅनेजर अविनाश सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे उपस्थित होते.यावेळी सहशिक्षक भरत चौरे,संदिपान आगम, माधुरी कुलकर्णी, सुवर्णा अयाचित , बँक कर्मचारी समाधान ढास उपस्थित होते. सुत्रसंचलन भरत चौरे यांनी केले तर वाढदिवसाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना पत्रकार हरीओम क्षीरसागर यांनी याच शाळेचा विद्यार्थी असल्याने याच शाळेत सामाजिक भान ठेवून मुलांसाठी खारीचा वाटा उचलण्याचा योग आला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद :- आबासाहेब हांगे मुख्याध्यापक जि.प.कें.प्रा.शाळा लिंबागणेश ) आजकाल वाढदिवस म्हटलं की बॅनरबाजी,केक ,हार,तुरे, पार्टी अश...

अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ५७८ डी मार्गावर गतिरोधक असतिल तर एचसीपीएल कंपनीला लिंबागणेश येथे गतिरोधक बसविण्यात अडचण काय?? :- डॉ.गणेश ढवळे

Image
लिंबागणेश:- ( दि.२२ ) बीड तालुक्यातील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील येळंबघाट येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून गतिरोधक बसविण्यात आलेले आहेत. मात्र याच मार्गावर लिंबागणेश येथील बसस्थानक आणि भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोर सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविण्यास एचसीपीएल कंपनीला काय अडचण आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व हरिओम क्षीरसागर यांनी विचारला आहे.         अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक ५४८ डी मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असुन शाळेचे मुख्य प्रवेशद्वार अगदी महामार्गाला लागुनच असल्याने शाळा भरताना आणि शाळा सुटल्यानंतर गर्दी असते.याठिकाणी यापूर्वी सुद्धा वारंवार अपघाताच्या घटना घडलेल्या असुन या अपघात प्रवण क्षेत्रात गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या २ वर्षांपासून पालकांची असुन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली २-३ वेळा रास्तारोको आंदोलन करण्यात आलेले आहेत. एचसीपीएल कंप...