शासन दफ्तरी गुन्हे नोंद असणाऱ्यांचा शस्त्र परवाना रद्द करा ; जिल्हाधिका-यांमार्फत गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन
शासन दफ्तरी गुन्हे नोंद असणाऱ्यांचा शस्त्र परवाना रद्द करा ; जिल्हाधिका-यांमार्फत गृहमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२७ ) बीड जिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना धारकांपैकी २४५ जणांवर एक किंवा एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे असल्याची पोलिस ठाण्यात नोंद असुन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळुमाफिया,अपहरण,खुन, खंडणी, मटका बहाद्दर , गोळीबार या सारखे गंभीर गुन्ह्यांची शासन दफ्तरी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी गुन्हा नोंद असलेल्या २४५ शस्त्र परवाना धारकांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना ऑक्टोबर मध्येच पाठवली होती. त्यावर तातडीने निर्णय घेऊन शस्त्र परवाने रद्द करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस च-हाटकर , शेख मुबीन,रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष ( इंटक), माजी सैनिक बीड जिल्हाध्यक्ष आप, नितिन सोनावणे बीड जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना यांनी शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे केली असून सोमवारी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते आक्टोबर २०२४ या गेल्या १० महिन्यात ३६ खुन, खुन करण्याचा प्रयत्न केल्याच्या १६८ तसेच गर्दी करून मारामारी करणे,दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्हे तसेच यापैकी ७ गुन्हे अजुनही उघड झालेले नाहीत.शिवाय बीड जिल्ह्यातील महिला ,मुली सुरक्षित नसुन १५६ अत्याचाराच्या घटना तर विनयभंग , छेडछाडीच्या ३८६ घटना घडल्याची पोलिस दरबारी नोंद आहे.बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत १२८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे.प्रत्येक परवाना देताना पोलिसांकडून संबंधित अर्जदाराची शहानिशा केली जाते.त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का??याची माहिती घेतली जाते.परंतु मागणी काही वर्षांत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे जिल्ह्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांनी परवाना घेतल्यावरही गुन्हे करणे सुरूच ठेवले आहे अशांकडेही शस्त्र परवाना ठेवला आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त १६ गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची जिल्हा विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना आक्टोबर मध्ये पाठवली होती.आता डिसेंबर संपत आलाय तरीही जिल्हाधिका-यांकडुन यावर काहीच कारवाई झालेली नाही. दरम्यान सावकार, खंडणीखोर गुन्हेगार, राजकीय नेते यांच्याकडे बंदुक परवाने आहेत.
शस्त्र परवाना देण्यासाठी पुढारी व आधिका-यांचीच लॉबी सक्रिय
बीडमध्ये २०२१ मध्ये बीड जिल्ह्यात १०९८ परवाना धारक होते.२०२४ पर्यंत हि संख्या १२८१ पर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे या ४ वर्षाच्या कालावधीत १८३ परवाने वाटप केले गेले.पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन परवाना मिळवून देण्यात बीड जिल्ह्यातील मोठ्या आधिका-यांचीच लॉबी सक्रिय असुन आमदार आणि खासदार यांनी केलेल्या शिफारशीनंतर ५ ते १० लाख रुपयात शस्त्र परवाना मिळवल्याचे बोलले जाते.
एकुण शस्त्र परवाने १२८१ आणि गुन्हे दाखल असलेल्या दिलेले परवाने
१ गुन्हा असलेले १५५
२ गुन्हे असललेले ४०
३ गुन्हे असलेले २०
४ गुन्हे असलेले १७
५ गुन्हे असलेले ३
६ गुन्हे असलेले ५
९ गुन्हे असलेले १
१० गुन्हे असलेला १
१२ गुन्हे असलेला १
१४ गुन्हे असलेला १
१६ गुन्हे असलेला १
जिल्हाधिका-यांनी २९५ प्रस्ताव फेटाळले
जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव पाठविण्याआधी पोलिसांकडून त्याची खातरजमा केली होती.हे सर्व करून पाठविलेले २९५ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातुन नाकारण्यात आले आहेत.हे प्रस्ताव आगस्ट २०२३ पुर्वीचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिस प्रशासनावरही संशय व्यक्त होत असुन दुसऱ्या बाजूला २४५ परवाने रद्द करण्याचा प्रस्तावर जिल्हाधिका-यांकडून निर्णय घेतला जात नाही त्यामुळे महसूल विभागही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येते.
Comments
Post a Comment