Posts

मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले

Image
मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या पात्र ऊसतोड कामगारांच्या वारसांना शासन निर्णयानुसार देय असलेले ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हा साखर उद्योगाचा महत्त्वाचा आधार असून, ऊसतोडणी व वाहतूक करताना अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का, रस्ते अपघात तसेच अन्य दुर्घटनांमध्ये अनेक कामगारांचा मृत्यू होतो. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी, मुले, आई-वडील व इतर वारसांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र...

लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज अभिवादन कार्यक्रम

Image
लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज अभिवादन कार्यक्रम बीड( प्रतिनिधी ) लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार असून, मेटे साहेबांवर प्रेम करणारे सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात समाजहिताचे अनेक प्रश्न सातत्याने लावून धरले आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर तसेच शाही शहनशावली दर्ग्याला दर्जा मिळवून देत विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणे, शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण, श्रीक्षेत्र नारायणगडाच्या विकासाला गती देणे तसेच पाली येथील शांतीवनाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शिवाय मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठीही त्यांनी सातत्याने संघर्ष केला. समाजातील...

सर्प विज्ञानाची जनजागृती मानव जातीच्या प्रगतीसाठी आवश्यक - प्राचार्य सविताताई शेटे

Image
बीड प्रतिनिधी :- दिनांक १३ ऑगस्ट रोजी गुरुकुल पब्लिक स्कूल बीड येथे सर्पविज्ञान प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शाळेच्या उप मुख्याध्यापिका शर्मिला पाटील , बीड जिल्हा उपाध्यक्ष कॉ प्राचार्य डी जी तांदळे, शाखा कार्याध्यक्ष विजय घेवारे, व्यसन विरोधी प्रबोधन आणि संघर्ष विभागाचे कार्यवाह बाजीराव ढाकणे मंचावर उपस्थित होते. सर्प विज्ञान या विषयावर डॉ सविता शेटे यांनी मार्गदर्शन केले. सापांचे प्रकार, विषारी आणि बिनविषारी सापांची माहिती , त्यांचे खाद्य, निवास, शरीररचना, सापाचे विष , त्याची उपयुक्तता, साप दिसल्यास काय काळजी घ्यावी , चावल्यास काय करावे अशा सर्व बाबी विषयी त्यांनी माहिती दिली. सापाविषयी असणाऱ्या अंधश्रध्दा, जसे की साप दूध पितो, साप डूख धरतो, साप संगीताच्या तालावर नाचतो, साप गुप्तधनाचे रक्षण करतो इत्यादी अशा अनेक अंधश्रद्धाची माहिती देवून या बाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. साप हा पूर्णतः मांसाहारी प्राणी आहे तो दूध पित नाही. दूध हे त्याच्यासाठी विष असते. त्याचा मेंदू अविकसित असल्यामुळे त्याला स्मरण करणे , लक्षात ठेवणे, विचार करणे, गुप्तधनाचे रक...

आश्रमशाळेतील सहा मुलींना सर्पदंश; तिघींचा दुर्दैवी मृत्यू

Image
आश्रमशाळेतील सहा मुलींना सर्पदंश; तिघींचा दुर्दैवी मृत्यू यंत्रणेच्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करा; प्रत्येक आश्रमशाळेत निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांची मागणी बीड प्रतिनिधी : - गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील सहा निष्पाप विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन त्यापैकी तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर असून, या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासन आणि संबंधित प्रशासनाची आहे. विशेषतः आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत असल्याने त्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. सर्पदंश, अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या अन्य वैद्यकीय आपत्कालीन...

श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला

Image
श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला  लिंबागणेश येथील विविध मंदिरांची स्वच्छता; भाविक, वारकरी आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग बीड :( दि.१३) : श्रावण महिना हा अध्यात्म, मनःशुद्धी, पावित्र्य आणि व्रतवैकल्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ऊन-पावसाचा लपंडाव, हिरवाईचा सडा आणि धार्मिक परंपरांनी नटलेला श्रावण महिना गुरुवार, दि. १३ ऑगस्टपासून सुरू झाला असून, १५ सप्टेंबरपर्यंत त्याची पर्वणी अनुभवता येणार आहे. सण-उत्सव आणि धार्मिक विधींची रेलचेल सुरू झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमात भाविक, वारकरी आणि तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात ह .भ.प. अनंतकाका मुळे, दशमे महाराज,चिंतामण जोशी, कल्याण वाणी, राजेभाऊ गिरे, श्रीकांत जोशी, शिवाजी वाणी, बाळकृष्ण मुळे, बाळकृष्ण थोरात, दगडु कांबळे,भगवान मोरे, गणपत ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम

Image
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम   बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये 'समग्र शिक्षा अभियान 'अंतर्गत कामांना वेग; विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार :- डॉ.गणेश ढवळे  बीड:-( दि.१३ ) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट करण्यासाठी जितिन रहेमान सीईओ जिल्हा परिषद बीड यांनी ' समग्र शिक्षा अभियान' योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना दर्जेदार आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी सुरू असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता सुरेश बाहेगव्हाणकर यांनी दिली. ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालयांचा अभाव असून काही ठिकाणी असलेली स्...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व कॉम्रेड सखाराम पोहिकर

Image
 वाढदिवसानिमित्त विशेष लेख  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व   कॉम्रेड सखाराम पोहिकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! गेवराई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा ‘संदेश जनतेचा न्यूज’चे संपादक कॉम्रेड सखाराम पोहिकर यांचा जन्म १२ ऑगस्ट १९६९ रोजी झाला. सामाजिक, पत्रकारिता आणि कर्मचारी चळवळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे एक लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या पाच वर्षांपासून ते समर्थपणे सांभाळत आहेत. या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. केवळ निवेदन आणि मागण्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. कर्मचाऱ्या...