Posts

नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांचा सामाजिक कार्य कौतुकास्पद

Image
नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांचा सामाजिक कार्य कौतुकास्पद,  ग्रामीण भागातील महिलांना वंदना बरडे यांनी दिला न्याय,  बीड प्रतिनिधी अंकुश गवळी आरोग्य शीबिर, रक्तदान शिबीर, अवयव दान, नेत्रदान, देहदान, रक्तदान , करण्याचें आवाहन प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात असतें.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, पुण्यतिथी, हळदीकुंकू समारंभ, बीसी कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्या यांचे वाढदिवस , जीजामाता जयंती, सावित्रीबाई फुले जयंती,व ईतर सामाजिक कार्य करते.हे कार्य २००५ पासून करत आहे.तसेच आरोग्य योजनेची माहिती दिली जाते.आरोग्य खात्यात कर्तव्याला असल्याने आरोग्य सेवेतील सर्वंच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक पातळीवरील कार्यक्रम आयोजित करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम गेले १९९६ पासुन करतं आहे.आरोग्यदायी जिवन शैलीविषयी माहीतीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केलें जाते ‌. प्रसार व प्रचार करण्याचें आवाहन केले जाते.आरोग्यदायी पोस्टर प्रदर्शन लावले जाते.भरपुर पुरस्कार मीळाले त्यापैकी ठळक म्हणजे फ्लारेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्कार प्रथम क्रम...

मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा : मोहन नाना देवकते

Image
मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा : मोहन नाना देवकते,  मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद नाही,   बीड प्रतिनिधी ,अंकुश गवळी   अंतरवाली सराटी या ठिकाणी चालू असलेले उपोषण आणि त्यामध्ये चालू असलेले वाद यामध्ये आमचा धनगर समाज कदापी पडणार नाही.  मूळतः आमची धनगर समाजाची जी मागणी आहे ती S ते (अनुसूचित जाती) मध्ये असलेल्या आरक्षणाची आहे.  त्यामुळे मराठा समाज नेहमी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे त्याच प्रकारे धनगर समाज सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही. त्यामुळे मराठा समाजाची वेगळी मागणी आहे, आणि आमची धनगर समाजाची वेगळी मागणी एसटी आरक्षण संदर्भात, त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा फुल पाठिंबा आहे, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे आनंदवाडी चे विद्यमान सरपंच मोहन नाना देवकते यांनी सांगितले आहे,

लोकशाही पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

Image
  महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विकास समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी सारिका यादव, उद्योग विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी अमोल घोडके , तर कायदेशीर विधी सल्लागार समिती मराठवाडा अध्यक्षपदी अँड श्रीकांत जाधव यांची नियुक्ती  बीड दि.२१(प्रतिनिधी ) : पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला व बाल कल्याण विकास समितीच्या प्रदेश अध्यक्षपदी सारिका यादव, प्रदेश उपाध्यक्ष प्रयोगशाळा तंत्रज्ञ् तथा सामाजिक कार्य विकास समिती डॉ. सुरेश पिंपळे, मराठवाडा अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विकास समिती पदी नितेश उपाध्ये यांची निवड संघाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश उपाध्यक्ष साजेद सय्यद, मराठवाड्याचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय नरनाळे यांनी केली. त्यानंतर लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य , प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र विकास समिती राणी शेख, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, पाश्चिम बीड जिल्हा अध्यक्ष बिलाल शेख, महिला बचत गटाच्या बीड जिल्हा अध्यक्षा सौ. संजीवनी खोगरे य...

शिवसंग्राम च्या वतीने नवरात्र काळात "जागर मातृ शक्तीचा" अभियान

Image
शिवसंग्राम च्या वतीने नवरात्र काळात "जागर मातृ शक्तीचा" अभियान अभियानांतर्गत डॉ.ज्योती मेटे यांच्या वतीने लोकप्रिय "होम मिनिस्टर" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सिनेअभिनेता क्रांती नाना माळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांची असणार उपस्थिती बीड (प्रतिनिधी ) शिवसंग्रामच्या वतीने दी.२ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात "जागर मातृ शक्तीचा" हे अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त नवरात्र काळात संबंध महाराष्ट्रत महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा "होम मिनिस्टर" (खेळ रंगला पैठणीचा) सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर आणि टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांचा भव्य कार्यक्रम दि. ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वा. आशीर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड येथे शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी आयोजन केले आहे. लवकरच आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. या नवरात्रीमध्ये "मातृ शक्तीचा जागर" आपण नऊ दिवस आदीमायेच्या नऊ रूपांना पूजन करणार आहोत. आदिशक्तीचे स्वरूप असलेल्या महिला घर सांभा...

जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा - अनिल तुरुकमारे

Image
 बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील विविध मागणी संदर्भात 30 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे यामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष पी.आर.पी चे जयदीप भाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी बीड जिल्हाध्यक्ष समाजभूषण अनिल तुरुकमारे यांनी निवेदाद्वारे माहिती दिली आहे. मोर्चातील प्रमुख मागण्या बीड जिल्ह्यातील कसत असणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा तात्काळ देण्यात यावा. गायरान धारक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील पोट खराब शब्द काढुन त्यांना खरीप, रब्बी, पिक विमा भरण्याचा व राष्ट्रीयकृत बँकेकडुन पिककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा करुन पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा व इतर शासनाच्या सर्वयोजनेचा लाभ देण्यात यावा.महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास चर्मकार महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अपंग महामंडळाला तात्काळ निधी देऊन प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थीचे प्रस्ताव तात्काळ मंजुर करण्यात यावेत.  शासकीय जागेवर घरे बांधुन राहणाऱ्या शहरातील, ग्रामीण भा...

डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड

Image
पुणे / प्रतिनिधी   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले तसेच श्री.एस.एम.देशमुख यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे संपादक अनिल वाघमारे यांची डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित असलेले परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जात असल्याचे जाहीर करताच स...

विकासकामांच्या नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी ? वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट

Image
विकासकामांच्या नावाखाली तोडलेली झाडे लावणार कधी ? वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.२२ ) मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात २.४ ईतके कमी वनक्षेत्र असुन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित असताना वनक्षेत्र कमी असल्याने वारंवार दुष्काळाचे संकट ओढावत आहे.हरितक्षेत्र वाढवण्यासाठी शासनाकडून " झाडे लावा झाडे जगवा" जाहिरात बाजी करत कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो.मात्र वृक्षलागवड कागदोपत्रीच दिसून येते.त्यात भरीस भर म्हणून विकासकामांच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण अथवा रेल्वे लाईन ब्राड रोडवेज कामासाठी ५० वर्षापुर्वीचे महाकाय चिंच ,लिंब ,वड,पिंपळ,नांदुरकी आदि वृक्षांची कत्तल करण्यात ये मात्र पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी पाचपट झाडे लावणे बंधनकारक असताना काम पूर्ण होऊन ५ वर्षें उलटुनही संबंधित कंत्राटदार कंपनीकडून वृक्षलागवड करण्यात येत नाही.सामाजिक कार्यकर्ते यांच्या लेखी तक्रारी, आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा प्रशासन आणि विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि" अर्थपूर्ण" दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्याचे वाळवंट झाले...