Posts

Showing posts from September, 2026

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा

Image
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा भांडवलदारधार्जिण्या सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीडमध्ये सात महिन्यांत १२३ शेतकरी आत्महत्या — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि.१ ) बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या सात महिन्यांत १२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. सततची नापिकी, ओला व कोरडा दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना विविध जाचक नियम व अटी लावल्या जातात; मात्र मोठ्या उद्योगपतींच्या कर्जप्रकरणांमध्ये सवलती दिल्या जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांसाठीही कर्जमाफीचे स्वतंत्र धोरण लागू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली. उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या कर्जप्रकरणातील कथित सेटलमेंटचा दाखला देत, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करावे, अशी म...