Posts

Showing posts from May, 2025

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या विशेष योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी-नितीन सोनवण,ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी

Image
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या विशेष योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. ही योजना 2021 साली जाहीर झाली होती, परंतु महाराष्ट्र शासनाने अद्याप ती कार्यान्वित केलेली नाही. सोनवणे यांनी सांगितले की, बार्टीच्या या विशेष योजनेमुळे अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळेल. मात्र, ही योजना बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्य धोक्यात आहे. "ही योजना तातडीने सुरू करून सामाजिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे," अशी मागणी त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनावर दबाव आणण्यासाठी पुढील काळात आंदोलनात्मक पावले उचलण्याचा विचार करत आहे. याबाबत सोनवणे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कोणतीही...

एकवीस वर्षानंतर आदर्श विद्यालय खालापूरी शाळेच्या 2003-4 च्या बॅच च स्नेह संमेलन

Image
    बीड प्रतिनिधी :- खालापूरी येथील आदर्श विद्यालयातील सण 2003-04 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हॉटेल गोल्डन चॉईस येथे स्नेह संमेलन पार पाडले. मैत्री आणि तीपण बाल पणाची निस्वार्थ मैत्री आणि त्यात तब्बल एकवीस वर्षांनी भेट हा योग जवळजवळ सर्वांनी अनुभवला आजकाल सर्वजण करत असलेली गेट टुगेदर ची परंपरा याही विद्यार्थ्यांनी पार पाडली यावेळी जवळजवळ पस्तीस विद्यार्थी विध्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केले सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या आणि सोबत स्नेहभोजन करून कार्यक्रम पार पडला. खूप दिवसानंतर विखरलेली ही पाखर एकवीस वर्षांनी एकत्र आल्यावर सगळ्यांना भावनावश अनुभव प्राप्त झाला. एक अवस्मरनीय भेट आणि त्या भेटीचा क्षण प्रत्येकाने मोबाईल मध्ये कैद केला एकमेकांना शेअर केला आणि अगदी आंनदमय वातावरनात विदयार्थी स्नेहसंमेलन पार पडलं.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू परजने, भारत ठोसर,आदम शेख,किशोर उगले, चंदू खरपाडे,श्रीकांत तुरुकमारे यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी गेट टुगेदर या कार्यक्रमाला बापू परजणे,किशोर उगले, मिलन उगले, आजिनाथ उगले, अमोल भस्मारे, महाद...

चिंचोली माळी अतिक्रमण हटविण्यात यावे !अन्यथा २७ मे रोजी अमरण उपोषन करणार- रोहन गलांडे

Image
केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील व ग्रामीण महामार्ग हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी २६ एप्रिल रोजी आत्मदहन दिला होता परंतु आपन दिलेल्या पत्राद्वारे ३० दीवसाचा वेळ मागितला आहे तरी आपन ३० दीवसात अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर २७ में २०२५ रोजी अमरण उपोषन करणार आहे तरी उपोषणा दरम्यान मला काही झाले तर हानिक बांधकाम विभाग पंचायत समिती केज व प्रशासन जबाबदार राहील.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील बांधकाम विभाग केज यांच्या हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी २६ एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांना देतो आहे तरी आंदोलन दरम्यान मला काही झाले तर प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे आपनास कळविण्यात येते आहे तरी ३० दीवसात अतिक्रमण हटविण्यात यावे ही नम्र कळकळीची विनंती प्रशासनाला निवेदन देण्यात दीला आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

Image
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव ! 23 देशांतील 25 हजार, तर बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञा भरतबुवा रामदासी यांच्यासह 30 हून अिधक हिंदू उपस्थित रहाणार! सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव; रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल !         बीड प्रतिनिधी  - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्‍वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. 23 देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्‍वस्त आणि 25 हजारांहून अधिक साधक, भाविक यांचा सहभाग अन् राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञा भरतबुव...

गेवराई तालुक्यातील नागरिकांनी ग्रामीण आवास योजनेचा लाभ करून घ्यावा : . सखाराम पोहिकर

Image
बीड : महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान गावठाण जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसतील तर त्या लाभार्थ्याला जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून एक लाख रुपये दिले जातील तरी ज्यांना आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा प्रपत्र ड यादीत नाव नाही अशा लाभार्थ्यांनी घरकुलचा सर्वे करण्यासाठी शासनाने यापूर्वी 15 मे पर्यंत वाढून झाली होती परंतु महाराष्ट्रातील बरेच गोरगरीब लोकांना वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे आता घरकुल योजनेचा सर्वे करण्याची तारीख 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेली असून घरकुल च्या सर्व ग्रामसेवक यांच्या मार्फत करून घ्यावा अशी आव्हान ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर यांनी केले आहे जर ग्रामसेवक हा सर्व करण्यासाठी तर स्वतःच्या मोबाईलवरून हा सर्व करून घ्यावा एका मोबाईल वरून एका लाभार्थ्याच्या सुरू होईल तेव्हा या योजनेचा लाभ घेण्याकरता शासनाने आता पंधरा मे ऐवजी 31 मे पर्यंत घरकुल योजनेचा सर्व करून घ...

बीड या ठिकाणी मध्यरात्री बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.

Image
स्वप्निल वरपे या तरुणाने स्वखर्चाने बसवला पुतळा, शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण,  बीड प्रतिनिधी अंकुश गवळी बीड शहरातील महालक्ष्मी चौक परिसरात रामनगर या ठिकाणच्या भागांमध्ये बीड येथील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व स्वप्निल वरपे या तरुण कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा मध्यरात्री पुतळा बसवला, गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला प्रश्न एकंदरीत पाठपुरावा स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीला ते जमले नाही ते एका तरुण कार्यकर्त्यांनी करून दाखवला आहे, त्यांच्या सहकारी मित्रा बरोबर रात्रीच्या दरम्यामध्ये तीन वाजण्याच्या सुमारास पुतळा बसवण्यात आला ,यामध्ये काही शिव प्रेमींना अटक करण्यात आली आहे, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे, एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे,

पांढऱ्या धोट रंडक्या माथ्याचा आत्महत्याकरी पुत्र, संघर्षमय जीवनात नुसता अंधार....!

Image
       काल परवा एक रुग्ण म्हतारी माझ्याकडे आली, अतिशय हताश होती, दुःखी होती, तीच स्वतःच्या देहावरील भान विसरल होत पदर खाली पडलेला, पांढरे मोकळे केस सोडून दुःखी मनाने ती आली,अतिशय खिन्न उदास आणि काहीतरी चिंतेत असलेली ही माता पाहून आपसूकच मी त्यांना विचारले काय झालं आई? त्या अतिशय हळू आवाजात म्हणाल्या काय सांगावं दैवाचा खेळ न्यारा, तुम्हाला तरी काय सांगावं? अन काय ठुवावं? मलाच कळनं काय झालं अन काय नाही? आता तुम्हीच तपासून सांगा काय झालय मला? असा उलट सवाल करून त्या तपासनीच्या बाकावर आडव्या झाल्या. मी स्टेथो आणि बीपी मिटर घेऊन तपासले तर बीपी अगदीच कमी होता अशक्तपणा वाढला होता शरीर चिंतेन क्षीण झालं होत. मी सलाईन लावण्यासाठी लिहून दिल आणि सलाईन लावली तोवर म्हातारी दुसऱ्या पेशंट महिलेला सांगत होती. पहाडासारखा ल्योक गेला,देवाने चोरून नेला त्यानं फाशी घेतली काय कराव कळत नाही? घास नरड्याच्या खाली उतरत नाही.आठ महिने झालं,सून खायला विचारत नाही, मोल मजुरी करून पोट भरते माझं मी. हे बोलत असताना मी ऐकलं मनात प्रश्न पडला आणि कुतूहलाणे विचारानं आई लेकाने फाशी का घेतली तर ...

कर्नल सोफिया कुरैशी यांच्या सन्मानार्थ पॅंथर सेनेचे आवाहन: विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- पॅंथर नितीन सोनवणे

Image
बीड प्रतिनिधी :- मध्य प्रदेशचे भाजप मंत्री कुंवर विजय शहा यांनी भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल कुरैशी यांना "आतंकवाद्यांची बहीण" असे संबोधत शहा यांनी त्यांच्या धर्मावरून निशाणा साधल्याचा आरोप आहे. या वक्तव्याविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 14 मे 2025 रोजी शहा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पॅंथर सेनेचा जाहीर निषेध आणि आवाहन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे नेते नितीन सोनवणे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. "कर्नल सोफिया कुरैशी या आतंकवाद्यांची बहीण नव्हे, तर भारत देशाची शूर बेटी आहेत. धर्म पाहून गोळ्या चालवणारे आणि धर्मावरून आतंकवाद्यांशी नाते जोडणारे एकाच वृत्तीचे आहेत," असे सोनवणे म्हणाले. त्यांनी भारतीय संविधान आणि देशाच्या एकतेचा जयघोष करत कर्नल कुरैशी यांच्या सन्मानार्थ देशभरातून नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पॅंथर सेनेच्या वतीने एक अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे....

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अंजनवती येथे अभिवादन कार्यक्रम

Image
बीड प्रतिनिधी :-अंजनवती, ता. १४ मे २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अंजनवती (ता.जि.बीड) येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमात गावकऱ्यांसह मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी नितीन सोनवणे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना बीड.बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भिमशक्ती विचार मंच), अशोक येडे पाटील (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), कैलास येडे पाटील (सरपंच, अंजनवती) यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. हा कार्यक्रम गावातील एकता आणि इतिहासाप्रती आदराचे प्रतीक ठरला.

आमदारांनी स्टंट करू नये, नाळवंडीप्रमाणे राजुरीतील बोगसगिरीची चौकशी करणार का?नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांचा सवाल

Image
आमदारांनी स्टंट करू नये, नाळवंडीप्रमाणे राजुरीतील बोगसगिरीची चौकशी करणार का?  नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांचा सवाल; आमदारांच्या कामांचे ‘पोस्टमार्टम’ करू बीड (प्रतिनिधी ) दि.१४ : बीड मतदारसंघात नरेगा अंतर्गत झालेल्या कामांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केल्यानंतर नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांनी आपणही आमदारांच्या कामांचे ‘पोस्टमार्टम’ करू शकतो, असा इशारा दिला आहे. नाळवंडीमध्ये अचानक पाहणी करून स्टंटबाजी केली जाते, पण नवगण राजुरीसारख्या गावांमध्ये झालेल्या मोठ्या गैरव्यवहारांचीही चौकशी आमदार करणार आहेत का? असा थेट सवाल करत ॲड.राऊत यांनी आमदारांनी स्टंटबाजी थांबवावी, असे म्हटले आहे. नाळवंडी ग्रामपंचायतीने नरेगा अंतर्गत नियमांचे पालन करत कामे केली असून, संबंधित कामांची यापूर्वीच चौकशी झाली आहे, समितीचे अहवाल पाहूनच बिले अदा केली आहेत, आताही रस्ते लोकांच्या वापरात आहेत, कोणत्याही ग्रामस्थाची तक्रार नाही, असे ॲड.राऊत यांनी स्पष्ट केले. सदरील कामांवर आमदारांनी जाऊन केवळ फोटोसेशन केले. ते सध्या काही निवडक गावांमध्येच लक्ष केंद्रित करत असून, त्यांनी शिफारस के...

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर बैठक-भाई गौतम आगळे सर

Image
परळी (प्रतिनिधी ) रोजंदारी मजदुर सेना या संघटनेच्या वतीने एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना किमान वेतनासहित विविध कामगार कायद्यांच्या सोयी सवलती व नगरपरिषद बीड मधील कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या करिता संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी सलग ११ दिवस अन्नत्याग उपोषण केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १३.०५.२०२५ सकाळी 11: 30 वाजता जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत, सरकारी कामगार अधिकारी, रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांची संयुक्त बैठक घेऊन कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करण्यात येइल, असे लेखी पत्र विक्रम मांडुरके, जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दिले होते. त्या प्रमाणे नियोजित बैठक मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.         सदरील बैठक तब्बल दिड तास उश...

एकल महिलांच्या प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक - बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी :- जेष्ठ समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साऊ एकल महिला समितीचे राज्यभरातील कार्यकर्ते मागिल पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नावर राज्य सरकार बरोबर पत्रव्यवहार, बैठका व निवेदनाद्वारे झगडत असुन त्या प्रत्येक गोष्टी सरकार कडून सुरू करून घेण्यात यशस्वी होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. आज मंगळवार दिनांक १३ मे रोजी मुंबईत मंत्रालयात एकल महिलांच्या प्रश्नावर महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी एकल महिलांच्या प्रश्नावर बैठक घेतली. या बैठकीस आमच्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब दादा कुलकर्णी व अभ्यासू कार्यकर्ते मिलिंदकुमार साळवे सहभागी झाले होते. या बैठकीत एकल महिलांचे सर्वेक्षण करणे, बालसंगोपन योजनेचे पैसे दर महिन्याला नियमित मिळणे,तालुका स्तरावर या महिलांसाठी समित्या तयार करून सक्रीय करणे, एकल महिलांसाठी कमी व्याजदराची व्यक्तिगत कर्ज योजना तयार करणे असे अनेक मुद्दे मांडले. त्याला सन्माननीय मंत्री व अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल राज्य सरक...

दारात गाय आणि घरात माय जो पर्यंत आहे तोपर्यंत माणुसकी जिवंत आहे-डॉ जितीन वंजारे

Image
     मी पिंपरी चिंचवड सारख्या शहरांत मोठ हॉस्पिटल थाटलं चालवलं पैसे कमावले,एल अँड टी सारख्या भारतातील नव्हे तर जगातील नंबर वन असणाऱ्या कंपनी च्या मेडिकल सेंटर ला लोणावळा सारख्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले,पण शहरांत अन ग्रामीण भागात सेवा देताना मला ग्रामीण भागात आणि विशेष जिथे सेवा पोहचली नाही जिथे लोकांचे आरोग्य सेवा वाचून हाल होतात तिथे सेवा द्यायला आवडत. मी आजपर्यंत वीस हुन अधिक ठिकाणी सेवा दिली आहे. पैसा कमावन हाच फक्त उद्देश असता तर मी एका ठिकाणी सेवा देऊन शहर सोडलच नसत, पण सेवेचा आनंद घ्यायला हवा, सेवा आपल्या फक्त अर्थार्जनाच साधन नसून ती आपली आवड आणि पॅशन असायला हवं. लोक एका जागेवरून दुसरीकडे जायला घाबरतात कस होईल? काय होईल? पण पैसा कामावणे हे आपलं उद्दिष्ट नसून सेवा गोर- गरीब,तांडा,वस्ती, वाडी आणि गावापर्यंत पोहचली पाहिजे त्यातून आपल्या कामाची ओळख आणि लोकसंपर्क वाढवणं हेच माझं ध्येय आहे असे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध डॉक्टर डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.लोकांना चांगली सेवा ते पण ग्रामीण भागात देण हाच आपला मोटो आहे बऱ्याच...

जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित,बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव

Image
जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव मोफत जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत अखेर दि.७ मे रोजी संपुष्टात येणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीईद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत. अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते दत्ता आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.      आरटीई प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये २ हजार २३५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ५ हजार ७८१ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे २ हजार १८३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर ६ मे पर्यंत १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात ये...

' तिम्मा ' म्हणजे गुलामगिरीच्या पलिकडे माणसांनी माणसांचा केलेला कोंडमारा-सुभाष सोनवणे

Image
' तिम्मा ' म्हणजे गुलामगिरीच्या पलिकडे माणसांनी माणसांचा केलेला कोंडमारा-सुभाष सोनवणे,अ.नगर दीर्घ वेदना अक्रांदणे आणी शून्य नजरा घेऊन जगणा-या अनेक मानवांचे समुह ह्या देशातील जाती पातींच्या व धर्मांच्या बंधनात बांधलेली आहेत. ती मानसं समाजाच्या परिघा बाहेर गावकुसांच्या रेषे बाहेर आजही सततच आपल्या मनाला मारुन. वेदनेच्या आगीत होरपळत होरपळत.... आपला जीव मुठीत धरून अनेक वर्षापासून ह्या देशामध्ये जीवन जगत आहेत. अतिशय काष्टांची कामे ही माणसं सतत करतात. त्या साठी शेकडो मैल भटकांती करतात. कधी कधी त्यांना काम ही मिळत नाही. दिवस दिवस उपाशी राहावे लागते. अत्यंत हिन दर्जाची वागणूक यांना समाजा कडून मिळत असते. जाती पातींच्या मिळालेल्या शिक्या बरोबरच "चोरी करणारी माणसं" हा सुद्धा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजा कडून गोंदला गेलेला आहे. त्यांच्या अंतर्बाह्य मनाचा सततच कोंडमारा होत असतो.  असे जीवन जगणारे भटक्या समाजातील घिसडी,शिकलकरी, कोल्हाटी, लोहार, पारधी, जोशी, चित्रकथी, मातीवडारी, गाडी वडारी ,दगड वडारी, रामोशी, कैकाडी,पिंगळा,डवरी, गोसावी वगैरे.... दगड वडारी त्यापैकीच एक ....

मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत अंधारच अंधार !पाण्यासाठी शहरातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ - वर्षाताई जगदाळे

Image
  बीड प्रतिनिधी - शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणाऱ्या बीड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नेता अंधारे यांनी तुघलकी कारभार सुरू केला आहे का? शहरातील नागरिकांना 25 दिवसाला पिण्याचे पाणी येत नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी नगरपालिकेत गेलेल्या मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांना आपली जबाबदारी पाण्याची नसल्याचे सांगत हात वर करणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तात्काळ बीड मधून निलंबित करत हकलपट्टी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले असून बीड नगरपालिकेचा कारभार नीता अंधारे यांच्या कार्यकाळात दयनीय झाला आहे. शहरात साचलेले कचऱ्याचे ढीगारे पसरलेली रोगराई रात्रीच्या वेळी मुख्य ठिकाणी असलेले पथदिवे बंद यासह शहरात मोकाट जनावरांचा वावर तुंबलेल्या नाल्या यासह शहरातील नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याने शहरात पाणी बानी असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांच्या सह मनसेचे शिष्टमंडळ कधीही हजर नसलेल्या नीता अंधारे यांच्या भ...

जातीयवादी वसंत खेडकरची दलित महिलेस बेदम मारहाण,घटना सीसीटीव्ही मध्ये कैद-आंबेडकरी जनतेत प्रचंड संताप

Image
बीड (प्रतिनिधी ) एका दलित महिलेस घरासमोर राहणाऱ्या रिटायर्ड फौजीने बेदम मारहाण केली असून उपचारासाठी त्या महिलेस जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असा कि, महात्मा फुलेनगर, धानोरा रोड, बीड. या ठिकानी शिक्षक असलेले अंकुश कोरडे व रिटायर्ड फौजी वसंत खेडकर हे समोरासमोर राहतात, गत दोन वर्षापासून किरकोळ कारणांवरून वसंत खेडकर हे कोरडे दाम्पत्यास जानिवपूर्वक त्रास देत आहेत, बुधवार दिनांक 30 एप्रील रोजी असेच कुठलेतरी कारण काढून खेडकर हे कोरडे यांच्या मुलांना रागावले व धमकावून प्रखरतेने जातीचा उल्लेख करून शिवीगाळ केली. त्यावरून कोरडे यांच्या मुलांनी आईस घरात जाऊन सांगितले की बाहेर समोरचे काका ओरडत आहेत. त्याबाबत घराबाहेर येवून दीक्षा अंकुश कोरडे यांनी खेडकर यांना विचारताच मी तुझ्या मुलांच्या अंगावर गाडी घालीन अशी धमकी देवून त्यांनी दिक्षा कोरडे यांचे केस पकडून त्यांचे डोके यांनी त्यांच्या गेटवर आपटले तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणत होते तुम्ही महाराचे लोक खुप माजलात तुमचा माज उतरायला मला वेळ लागणार नाही. मी आर्मीत नोकरी केली आहे तुम्हा महारगाडयांना स...