Posts

महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड

Image
ना. धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतून निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानत अजून जोमाने दिव्यांग कल्याण्यासाठी काम करत राहू असा निर्धार व्यक्त केला सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉ. संतोष मुंडे हे सातत्याने कार्यरत असतात. आपल्या निवडीबद्दल ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार डॉ. संतोष मुंडेंनी मानले. *कोण आहेत डॉक्टर संतोष मुंडे?*            मुळचे नाथऱ्याचे असलेले डॉ. संतोष मुंडे हे पेशाने डॉक्टर आहेत. मुळातच समाजकार्याचे बाळकडू आणि सामाजिक से...

आमची प्रगती आरक्षणामुळे नाहीतर बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मामुळे झाली आहे - डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन

Image
मौजे शिवणी येथे अखिल भारतीय चौथी बौद्ध धम्म परिषद उत्साहात साजरी  बीड(प्रतिनिधी ):- अनुसूचित जाती जमातीमध्ये ५९ जातींना आरक्षण मिळत आहे. आमची प्रगती मूळ आरक्षणामुळे झाली नाही तर आमची प्रगती बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मामुळे झाली आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी केले. प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड यांच्या विद्यमाने ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवार दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता महाविहार धम्मभूमी डॉ. भदंत आनंद कौसल्यायान नगर मौजे शिवणी येथे चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते. या धम्मपरिषदेत प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु तथा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर धम्म परिषदेला शिवणी येथे बोलत होते . पुढे बोलताना डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले की, १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी भदंत चंद्रमणी यांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध होण्यापूर्वी आम्ही विविध जातीमध्ये विभा...

मराठ्यांच्या न्यायासाठी छत्रपती संभाजीराजेंचे सीमोल्लंघन!

Image
काल नवरात्र उत्सवाची सांगता झाली. करवीर छत्रपती घराण्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात सोनं लुटले. शाही लवाजमा न्यू पॅलेस येथे परतला. या संपुर्ण सोहळ्याचा क्षीण उतरण्याच्या अगोदरच पहाटे संभाजीराजे यांनी कोल्हापूर सोडले व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाकडे अंतरवली निघाले. साधारणतः पावणे ५०० किलोमीटर चे अंतर होते. ९ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम संपवून राजे निघाले.  या ९ दिवसांमध्ये छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजापासून दूर करण्याचा डाव काही राजकीय पक्षांनी हाती घेतला होता. संभाजीराजेंना मराठा समाजाचे प्रश्नांवरून सोशल माध्यमातून हेतूपुरस्कर बदनाम केले जात होते, यात पक्षीय कार्यकर्ते अधिक... छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा सर्वांना माहितेय, स्वतः आमरण उपोषण केले, सुप्रीम कोर्टात प्रत्येक तारखेला स्वतः हजर राहिले, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी झंझावाती दौरे केले व आत्महत्या केलेल्या मराठा युवकांच्या घरी देखील महाराज अनेक वेळा पोहचले.  अगदीच अंतरवली सराटी मध्ये १ सप्टेंबरला अमानुष लाठीचार्ज केला तेव्हा देखील रात्री २ वाजत...

पुढारी गावात आलाच तर लाठ्या काठ्याचा प्रसाद देऊ - रोहन दादा गलांडे.

Image
तालुक्यात अनेक गावांमध्ये मराठाआरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी ! केज/प्रतीनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी ,केवड,वरपगाव,ढांकेफळ,येवता ,सोनसांगवी,भालगाव, जाधव जवळा अशा अनेक गावांमध्ये सकल मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असेल असा निर्णय केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील येथील नागरिकांनी  २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला.मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मराठा समाजांचा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या लढाईमुळे अनेक राजकीय नेत्यांची चांगलीच कुचंबणा झाली आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना विविध समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांसह आमदार, खासदार आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्यात आली आहे.केज तालुक्यातील चिंचोली माळी व अनेक गावांमध्ये आता सकल मराठा समाजाच्या वतीने बॅनर लावून राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावबंदी असेल असं गाव...

विजया दशमीला विद्यानगर, सांकवाळ, दक्षिण गोवा, येथे भगवा ध्वजारोहण आणि सोनं लुटने कार्यक्रम संपन्न

Image
   दसरा सण मोठा निमित्ताने आपट्याची पाने सोनं म्हणून लुटणे आणि छत्रपतींच्या भगव्या झेंडा फडकावून आनंद व्यक्त करणे हा शानदार छोटासा सोहळा विद्यानगर येथील वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सेवक मंडळ विद्यानगर, सांकवाळ गोवा आयोजित दाबोळी विमानतळ ते मडगाव राजमार्गावरील एम ई एस महाविद्यालय बसस्थानक चौकात भगवा ध्वजारोहण सन्माननीय श्री बस्तवाडकर सर ( सेवानिवृत्त सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक ) आणि सन्माननीय श्री पी ए बोरगावे सर ( सेवा निवृत्त महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण अधिकारी ) यांच्या उपस्थितीत करण्यात आले . नवरात्र उत्सव देशात सर्वत्र साजरा केला जातो आणि दहाव्या दिवशी सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारले जाते . जवळच्या शेजारी राज्यात ( महाराष्ट्र आणि कर्नाटक ) छत्रपतींचे मावळे भगव्या झेंड्याची दौड ( प्रभात फेरी/ मिरवणूक ) काढून विजयाची पताका फडकवली जाते.भगवाध्वज हे आपलं स्वांस्कृतीक, धार्मिक आणि स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिक मानले जाते.आणी म्हणून वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्य...

लिंबागणेश येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरूवात,राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

Image
लिंबागणेश येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरूवात,राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश:- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना अंतरवली सराटी याठिकाणी आमरण उपोषण दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेली मुदत २४ आक्टोबर रोजी संपली असुन कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मराठा समाजामध्ये विश्वासघात केल्याची भावना समाजामध्ये असुन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कल मधील सकळ मराठा समाजाने आज दि.२५ आक्टोबर पासुन साखळी उपोषणाला सुरुवात केली असुन यादरम्यान सर्वपक्षीय राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आली असुन तशाप्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, गृहमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडुन साखळी उपोषणाला सुरुवात झाली.यावेळी लिंबागणेश मुळुकवाडी,बेलगाव,मसेवाडी, सोमनाथवाडी, पोखरी (घाट),पिंपरनई, मोरगाव, पाटोदा,बेलखंडी, ...

वकील संघ पाटोदा येथे ई- फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचे उद्‌घाटन संपन्न

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) वकील संघ पाटोदा येथे ई फायलिंग व फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बार कौन्सिलचे सदस्य सन्माननीय प्रसिद्ध वकील अँड.व्ही.डी.साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्रीमती एस.एन. निकम मॅडम,सह दिवाणी न्यायाधीश आदरणीय श्रीमती ए.ए.पाटील मॅडम ,औरंगाबाद उच्च न्यायालयाचे वकील संघाचे अध्यक्ष अँड.एन.एल जाधवसाहेब,ई-फायलिंग जिल्हा समन्वयक अॅड.मायकर साहेब, पाटोदा तालुका वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष अँड.सुशील कोठेकर साहेब,वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.सुधीर घुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. सुशील कोठेकर यांनी केले,सर्व प्रमुख मान्यवरांनी शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन अँड.सुधीर घुमरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड.संभाजी कोकाटे यांनी केले.  यावेळी पाटोदा तालुका वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.