राज्यव्यापी आंदोलनाला न्याय द्यावा- नितीन सोनवणे

 

परभणी ते मुंबई लॉंगमार्च निघालेला असून गेली 8 दिवस झालं भीम अनुयायी रस्त्याने चालत आहेत.

 लॉंगमार्च समर्थनार्थ ऑल इंडिया पँथर सेना निवेदन देत असून खालील मागण्या तातडीने मान्य करत या राज्यव्यापी आंदोलनाला न्याय द्यावा! 
1) देशद्रोही सोपान पवार याची नार्को टेस्ट करुन मास्टरमाईंडला अटक करावी. पवारवर देशद्रोह सहित सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला जबाबदार धरून 302 अंतर्गत कार्यवाही करा.
2) आंदोलक निरपराध भीमसैनिक महिलांवर हल्ला करणारे, सोमनाथ सूर्यवंशीचे हत्याकांड घडवणाऱ्या पोलीसांना तात्काळ मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करुन कायमस्वरूपी बडतर्फ करावे.
3) आंदोलनकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या.
4) बी. आर. आंबेडकर या नावाच्या गाड्या फोडणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कार्यवाही करा.
5) परभणी गठीत केलेली न्यायालयीन चौकशी मान्य नसून तात्काळ न्यायधीश बदलवला पाहिजे.
6) पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांचे रिपोर्ट लपवणाऱ्या आरोग्य अधिकारी व जेलरला तात्काळ निलंबीत करावे.
7) कलम 176 (A) सीआरपीसी अंतर्गत चौकशी करावी.
8) परभणी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही जप्त करुन ते तपासावेत.
9) शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या पीडित कुटुंबाला रु. 2 कोटी तसेच शहीद विजय बाबा वाकोडे यांच्या पीडित कुटुंबाला रु. 1 कोटींची मदत करून दोन्ही परिवारातील एका एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
10) वच्छालाबाई मानवते या रमाईच्या लेकीला अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीसांवर 354/307 अंतर्गत कार्यवाही करावी. या लेकीला रु. 10 लाखांची मदत करून तिचे पुनर्वसन करावे.
11) पोलीसांनी कोमिंग मध्ये मारहाण करून जखमी केलेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत करावी.
12) शहीद सोमनाथ सूर्यवंशीचे परभणीत स्मारक करावे.
13) संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपीना अटक करुन आरोपीना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झालीच पाहिजे. अटक आरोपीची नार्को टेस्ट झालीच पाहिजे. कुटुंबाला आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी. 
14) लातूर माऊली सोट च्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व भावाला शासकीय नोकरी द्यावी. 
15) अमृतसर पंजाब येथील महामानवाच्या पुतळ्यावर जाऊन पुतळा तोडला आणि खाली असलेल्या संविधान प्रतिक जाळले त्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशी देण्यात यावी.
जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.
तरी या सर्व तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सुंदर वाघमारे, आनंद गवळी, राजेंद्र दाभाडे यांनी दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी