शिरुर कासार बसस्टँड मधे जाण्यासाठी पाण्यातुन मार्ग


  आठ दिवसांत बसस्थानका मध्ये येणारे दोन्ही रस्ते दुरुस्त नाही केले आणि प्रवाशांची गैरसोय झाली तर ! शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा - शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर / तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे

आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :    
          शिरुर बसस्टँड मधे येणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करत यावे लागत असून, प्रवाशांना पाण्यातुन यावं लागतं असून, सर्व परिसर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे / कचऱ्या मुळे फारच घाण झाला असून, याची तक्रार नेमकी कोणाकडे करायची ? एसटि मंडाळाचे डिसी यांच्याशि बरोबर फोनवर संपर्क साधून चर्चा करून त्यांच्या कानावर सर्व प्रकार घातला असून , बसस्टँडला येणारे रोड दुरुस्त करायचे सांगितले असून, त्यांनी दुरुस्त करु म्हणुन सांगितले . पण आमच्या वेळेला करु मला आताच सांगता येणार नाही?ते अधिकारी आहेत.त्यांच्या मर्जीने काम होईल! पण इथं रोजच प्रवाशांना त्रास सहन कराव लागतो त्याच काय? रोजच चार/ पाच प्रवासी त्या खड्यात आणि घाण पाण्यात पडतात.याला जबाबदार कोण? आज शिरुर मधे चांगले काम करायचे आसल्यास मांजरा पेक्षा माणसच आडवी ज्यास्त येतात . मी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर व शिवसेना तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे रोजच समाजिक कामा साठी झटतोत- पळतोत.याची किंमत कोणालाच नाही.मात्र काही लोकांना समाज कार्याचं काही देण घेण नाहि , रोज प्रवाशांना त्रास होतोय ,पडतात , लागतय तरी कोणी आवज उठवत नाही?रोज प्रवाशाला आनंत आडचणीला तोंड द्यावे लागत असून दरवर्षी बसस्टँडची रोडची दुरुस्ती होते!ती पण आगदि जुजबी स्वरुपात . मग बजेट किती पडते ?आणि निधि किती आसतो? कोण दुरुस्ती करते ?प्रतेक वर्षी दुरुस्ती होऊन बसस्टँड खरब कसे होते?याचा जाब जनता विचारते.जर ८ दिवसात बसस्थानका मधे येणारे दोन्ही रस्ते दुरुस्त केले नाही तर, आणि प्रवाशांची गैरसोय झाली तर! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ,संपर्क प्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवसेना लोकसभा मतदारसंघ प्रमुख सुनिल दादा धांडे ,शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वरजी सातपुते सर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना स्टाईलने आदोंलन केले जाईल आसे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर व शिवसेना तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .
     या प्रसगि साईनाथ ढाकणे,वैभव जाधव,उमेश गवळी,नारायण आघाव,नामदेव आघाव,गणेश स्वामी आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी