बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान ; वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती वन विभागाकडेच नाही संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्यांचा आधार

बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान ; वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची माहिती वन विभागाकडेच नाही संरक्षणासाठी रंगीबेरंगी साड्यांचा आधार:- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:- नैसर्गिक संकटासह वराह व अन्य वन्यजीवामुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असुन वनविभागाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाई बाबत शेतकरी संभ्रमात आहेत तसेच वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केल्यानंतर किती जणांना मदत मिळाली याविषयी माहिती विभागीय वन कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली असुन प्रशासनाने याबाबत जागृती राबवुन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार बीड,विभागीय वन अधिकारी (प्रादेशिक) बीड यांना केली असुन सध्या तरी शेतकरी रंगीबेरंगी साड्यांचे शेताभोवती कुंपन करत नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

सविस्तर माहितीस्तव
---
बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश सर्कल मधिल डोंगराळ भागातील पिंपरनई , पोखरी (घाट), बेलगाव फुकेवाडी,सोमनाथवाडी, आदि परीसरातील शेतशिवारात संचार करणाऱ्या वराहांनी धुमाकूळ घातला असुन वराहाच्या झुंडीच्या झुंडी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

नुकसान टाळण्यासाठी साड्यांचा कुंपण म्हणून वापर:- बाबासाहेब वायभट (शेतकरी पिंपरनई )
---
शेतातील सोयाबीन, भुईमूग आदि उगवलेल्या पिकांची डुकरे खाण्यापेक्षा नासाडी जास्त करतात.रंगीबेरंगी साड्यांना घाबरून डुकरे तिकडे फिरकत नाहीत म्हणून आम्ही पिकाला साड्यांचे कुंपण केले आहे.

दुष्काळात तेरावा म्हणीप्रमाणे दिवसेंदिवस शेतातील वाढत चाललेला उत्पादन खर्च, शेतमालाचे पडलेले भाव,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यासह आता वराहांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे.

वन्यप्राण्यांच्या केलेल्या हल्ल्यांची वन विभागाकडे माहीतीच उपलब्ध नाही

वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये मनुष्यहानी तसेच पशुधन,मृत,अपंग,व जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत राज्य शासनाने आगस्ट २०२२ मध्ये मदतवाढ केलेली असुन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी किंवा व्यक्ती मृत झाल्यास २० लाख रुपये दिले जातात त्यात धनादेशाद्वारे तात्काळ १० लाख रुपये व उर्वरित १० लाख रुपये फिक्स डिपाझिट केले जाते. तसेच व्यक्ती अपंग झाल्यास ५ लाख रुपये,जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, किरकोळ जखमीस २० हजार रुपये तसेच पशुधनामध्ये गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा ७० हजार रुपये, अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये,जखमी झाल्यास बाजारभाव किंमतीच्या २५ टक्के रक्कम किंवा ५ हजार रुपये दिले जातात.
     बीड जिल्ह्यात मागच्या वर्षभरात शेतकरी व जनावरांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केलेल्या घटनांची विभागीय वन कार्यालयाकडे माहिती उपलब्ध नसुन वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत किंवा जखमींना मदत दिली नसल्याचे दिसून येते. हि अतिशय गंभीर बाब आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी