Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा

Image
महावितरणचा 'शॉक'! सहा महिन्यांपासून जातेगावचा फिडर बंदच; शितल धोंडरे यांचा आंदोलनाचा इशारा प्रशासकीय दिरंगाईचा कळस; ग्रामस्थांच्या नुकसानीला जबाबदार कोण? ७ दिवसांचा अल्टिमेटम बीड : जिल्ह्यातील जातेगाव (ता. गेवराई) येथील ग्रामस्थांच्या हक्काचा 'गावठाण फिडर' महावितरणच्या फाईलमध्ये अडकून पडला आहे. काम पूर्ण होऊन सहा महिने उलटले तरी फिडर चार्ज न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा श्रीमती शितल धोंडरे यांनी महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे. "जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून यंत्रणा उभी केली, मग ती सुरू करायला मुहूर्त कोणाचा पाहत आहात?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यंत्रणा असूनही गाव अंधारात जातेगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात गावठाण फिडरचे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा फिडर कार्यान्वित करण्यात आलेला नाही. परिणामी, संपूर्ण गावाचा भार जुन्या यंत्रणेवर येत असून 'लो-व्होल्टेज'मुळे नागरिकांचे घरगुती संसारोपयोगी साहित्य (टीव्ही, फ्रिज, एसी)...

बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे

Image
बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे कायद्याला हरताळ, न्यायालयाचा अवमान! बीडमध्ये बॅनरबाजीचा कहर; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने नवनिर्वाचितांची सत्तेची धुंदी; बीड शहर बॅनरच्या विळख्यात! ‘नाशिक पॅटर्न’ची अंमलबजावणीची जोरदार मागणी बीड :- (दि. २९ )बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते व चौकांमध्ये विजेच्या खांबांवर, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अनधिकृत बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ बीडमध्ये तातडीने राबवावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिक...

गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न

Image
गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी  गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे दिनांक 27 12 2025 रोजी सकाळी 11 वाजता गेवराई तालुक्याचे युवा नेते माननीय रणवीर काका पंडित यांच्या हस्ते गढी येथे पंधराव्या वित्त आयोगातील सुमारे 12 लाख रुपयांचे कामाचे लोकार्पण करण्यात आले माननीय अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनुसार व आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गढी गावात व रोड वरती होत असलेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गडी ग्रामपंचायतच्या वतीने एक नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली तसेच ज्या भागात पाणीपुरवठा केला जात नव्हता त्या भागात नवीन पाईपलाईन करून पाईप लाईन मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली तसेच पाण्याच्या टाकीचा परिसर या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून सुशोभीकरण करण्यात आले तसेच गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजना सातत्याने चालू आहे आणि ती बंद पडू नये म्हणून काही नवीन मोटार खरेदी करण्यात आले आहेत तसेच समशान भूमी मध्ये रात्रीची लाईटची व्यवस्था नव्हती त्यासाठी हायमासक ला...

बहिरवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याची विजय गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी कडे मागणी

Image
बीड ( प्रतिनिधी ) बहिरवाडी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष तथा निरीक्षक मनोज पाटील तसेच नगरसेवक राहुल गुरखुदे मागणी केली. जनप्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच स्थानी 1996 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्राथमिक सदस्यता तसेच विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना शासनाच्या योजना असतील शासकीय रुग्णालयातील गोरगरिबांच्या अडचणी असतील तसेच सामान्य नागरिकांची प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम केले असल्याने आपण या बहिरवाडी सर्कल मध्ये अनेक उत्तम काम सामान्य नागरिकांसाठी करण्याच्या उदात्त हेतूने आपण ही निवडणूक लढत असल्याचे यावेळी विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवली आहे.अशी मागणी सामान्य जनतेतून मागणी होत असून आपणही ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

चौसाळा शाळेच्या अंगणात पुन्हा अवतरले बालपण १९९१-९२ बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा

Image
बीड /​चौसाळा प्रतिनिधी :-वेळ कधीच थांबत नाही, पण काही क्षण मात्र आयुष्याच्या पाटीवर कायमचे कोरले जातात. असाच एक अविस्मरणीय सोहळा २८ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा, चौसाळा येथे संपन्न झाला. १९९१-९२ च्या १० वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल ३४ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय स्मृतींना उजाळा दिला. ​ ​शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या संसाराच्या आणि करिअरच्या व्यापात गुंतला होता. मात्र, आपल्या जुन्या सवंगड्यांना पुन्हा भेटावे, ही ओढ सर्वांना स्वस्थ बसू देत नव्हती. या बॅचच्या काही पुढाकारी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून प्रत्येकाचा शोध घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक साखळी तयार केली आणि बघता बघता सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एका छताखाली जमले. चौसाळा शाळेचे तेच मैदान आणि तोच परिसर पुन्हा एकदा जुन्या मित्रांच्या हास्याने दुमदुमून गेला. ​ ​या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या गुरुजनांची उपस्थिती. आयुष्याच्या कठीण वळणावर आपल्याला दिशा दाखवणाऱ्या आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मोठ्या आदराने निमंत्रित केले होते. आपल्या जुन्या विद्य...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोर काळे यांची बोरफडी आदर्श ग्रामपंचायतला भेट

Image
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक २६/१२/२०२५ रोजी सायं.०७:०० वा बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या आदर्श ग्रामपंचायत बोरफडी येथे भेट देऊन गावात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात आली यामध्ये प्लास्टिक बंदी ,बचत गट ,घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अनिमिया मुक्त गाव ,ग्रामपंचायत अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे यांसह इतर खासकरून उपक्रम राबवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यात ३७३९७ ग्रामपंचायत तिने सहभाग नोंदवला आहे .जि ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करील त्या घटकात त्या इंडिकेटर वरती काम करील त्यांना राज्यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.  यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय बक्षीसास पात्र ग्रामपंचायत होणार आहे त्याच धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत बोरफडीने देखील सहभाग नोंदवून सर्व इंडिकेटर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत बोरफडी च...

संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय

Image
संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येण्याएवजी गाडीने या व रस्त्याची वाट लागलेली पहा  पाटोदा (प्रतिनिधी ) चिचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांचा ५० वा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र एवढ्या मोठ्या व प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेला डांबराचा थर यामुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. हजारो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष हो...