Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी

Image
फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी पाटोदा (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. "फडणवीस सरकार मुर्दाबाद", "शेतकरी विरोधी सरकार हाय हाय", "संपूर्ण कर्जमाफी द्या", "शेतकरी एकजूट जिंदाबाद" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अपुरी, दिशाभूल करणारी व लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. किसान सभेचे उपाध्यक्ष ...

बांधावर खताचां फज्जा ? चढया दराने विक्री व अन्य मालाची सक्ती ?आता तरी कारभार सुधरणार का ?

Image
नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन -   शेतकर्यानां खते बांधावर देण्याची सवंग घोषणा झाली खरी,पण या घोषणेला प्रशासनाने फारसे गांभीर्याने न घेतल्याने या योजनेचा फज्जा उडाला आहे. गंमत म्हंणजे खते बांधावर तर जाऊ दया खत विक्री दुकानातही वेळेवर मिळत नाही. मिळाले तरी चढया भावाने विक्री होते. शिवाय त्या बरोबर इतर अनावश्यक सामुग्रीही लादली जाते.यंदा खरीप हंगामाचे तोंडावर तरी या कारभारात सुधारणा होणार का असा सवाल नागरीक करत आहे.   आम्ही शेतकर्याचे सरकार आहोत. शेतकरी हितासाठीच राबतो आहोत असा दावा सत्तेवरील हर एक सरकार करत असते खरे, मात्र अंमलबजावणीत कुचराई होत असल्याने शेतकरी हिताचे निर्णय, घोषणा कागदावरच राहतात हा नेहमीचा कटु व वास्तव अनुभव आहे.   असाच एक निर्णय म्हंणजे खते बांधावरच दयायची घोषणा करणेत आली होती.या घोषणेचा पुर्णत; फज्जा उडाल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.   बांधावर तर जाऊ दया, पण प्रत्यक्ष खत विक्री केंद्रावर ही शेतकर्याची सर्रास अडवणुक केली जाते.   नियमीत दरापेक्षा चढया दराने विक्री होत असुन, याच बरोबर अनावश्यक माल घेण्याचीही सक्ती केली...

आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत

Image
आरक्षण उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत  लिंबागणेश:- (दि.११ ) अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात "आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा" या घोषणेसह सुरू झालेल्या बीड ते मुंबई पायी लॉंग मार्चचे लिंबागणेश येथे गुरुवारी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दि. १० जून रोजी बीड येथून प्रारंभ झालेला हा लॉंग मार्च २६ जून रोजी मुंबई येथे पोहोचणार आहे. निळ्या झेंड्यांचा महासागर, संविधान संरक्षणाच्या घोषणा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा निर्धार यामुळे या मार्चकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता हा मार्च लिंबागणेश येथे दाखल झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायी लॉंग मार्चमधील सहभागी आंबेडकरवादी अनुयायांचे आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सुवासिनींनी सहभागी भीमसैनिकांचे औक्षण केले. ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सिद्धार्थ शिनगारे...

परळीत हिटलरशाहीचा कारभार?पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी?

Image
परळीत हिटलरशाहीचा कारभार? पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी? पत्रकारांच्या हक्काच्या ६० गुंठे जागेवर डल्ला टाकण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांकडे दाद मागणार – दीपक देशमुख परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी नगरपालिकेच्या कारभारात लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीचेच वर्चस्व वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जागेवर नमो उद्यान उभारण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांच्या हक्काच्या जागेची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी नंदागौळ रोड परिसरातील संबंधित जागेवर प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, आत्मलिंग शेटे, धीरज जंगले, बाबा शेख, धनंजय अरबुने, संतोष जुजगर, प्रल्हाद कडुकटले, बालाजी ढगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीब रॉय, संदीप मस्के, बालाजी जगतकर, गौतम आगळे, पद्माकर भंडारे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या हितासाठी जागेचा वापर? परळीचे विद्यमान...

छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावाचा इशारा; १५ जून रोजी ठिय्या आंदोलन

Image
छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावाचा इशारा; १५ जून रोजी ठिय्या आंदोलन बीड, दि. ११ : बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किष्किंधा पांचाळ यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. या मागणीसाठी दि. १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. छाया पांचाळ यांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी संघर्ष सुरू असून, विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आरोग्य परिमंडळ लातूर तसेच अंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकशी समित्यांनी सखोल तपास करून संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कर...

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Image
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर बीड (प्रतिनिधी ) दि.१० : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गाचे मोठ्या नाल्यासह चौपदरीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी बीड शहर व ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा केली. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहरातून जाणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग जालना रोड आणि बार्शी रोडमार्गे शहराबाहेर जातो. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत असल्याने वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वारंवार ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडव...

अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त

Image
अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त ! पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले ! तातडीने नुकसानभरपाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश:- ( दि.१० ) बीड तालुक्यातील बालाघाटावरील अंजनवती गावातील पाटील वस्तीवरील पंजाब आणि पंढरीनाथ येडे या दोन सख्ख्या भावांचा काल दि.९ मंगळवार रोजी सायंकाळी वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने संसार उद्धवस्त केला.घरावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, पेरणीसाठी घरात ठेवलेल्या खताचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वैष्णवी पंजाब येडे या १८ वर्षीय मुलीच्या डोक्याला ४ टाक्याची जखम झालेली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट द्यावी :- डॉ.गणेश ढवळे   आज दि.१० रोजी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत आणि तलाठी नारायण दराडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा स्थळपंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी फोनवरून संवाद साधत संपुर्ण संसार उद्धवस्त झाला असुन प्रत्यक्ष घटना स्थळी भे...