Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

Image
शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव) मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टिने प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...

शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत

Image
शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत बोअर बंद – पाण्याविना अंत्यसंस्कार | रस्ता अरुंद – काटेरी झुडपांचा विळखा | न. प. प्रशासन ढिम्म परळी प्रतिनिधी :परळी शहरातील परिसरातील सर्वात मोठी असलेली शांतीवन सार्वजनिक स्मशानभूमी सध्या नगरपालिकेच्या बेजबाबदार व निष्क्रिय कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. तब्बल सात एकर क्षेत्रफळात उभारलेली ही स्मशानभूमी आज दुर्लक्ष, असुविधा आणि अव्यवस्थेचा अड्डा बनली असून मृतांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणीला परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी उभारलेल्या ओट्यांवर आजतागायत लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. परिणामी, अंत्यविधी करताना नागरिकांना जीव मुठीत धरून विधी करावे लागत असून प्रशासनाची ही गंभीर बेपर्वाई कधी जीवघेणी ठरणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत काटेरी झाडे, झुडपे व गवत प्रचंड प्रमाणात वाढले असून प्रवेशद्वारापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत ...

बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन पाणी पुरवठा योजना राबवावी

Image
बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन पाणी पुरवठा योजना राबवावी भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागरांसह शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.४ : शहरातील सध्याचा विस्कळीत पाणीपुरवठा, उन्हाळ्यात दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई, पुरवठ्याच्या नियोजनातील त्रुटी आणि येत्या उन्हाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आता बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन अतिरिक्त पाणीपुरवठा योजना तातडीने प्रस्तावित करून कामांना गती द्यावी, अशी मागणी भाजपच्या गटनेत्या व नगरसेविका डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन मंगळवारी (दि.३) केली. या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या बीड शहराला बिंदुसरा प्रकल्पातून अंशतः पाणीपुरवठा होत असून तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शहरालगत घुमरे वस्ती व धानोरा रोड मार्गे नवीन पाणीपुरवठा योजना उभारणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. तसेच, नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांसाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था उभारण्यात यावी. ...

बीडमध्ये माता रमाई यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी होणार - महालिंग निकाळजे

Image
त्याग, समता आणि करुणेचा जागर   बीडमध्ये माता रमाई यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी होणार - महालिंग निकाळजे  बीड / प्रतिनिधी — भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी बीड शहरात अत्यंत आनंदात, भक्तिभावाने व हर्ष-उल्हासात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी ठीक ८.०० वाजता भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा कार्यालय येथे त्रिसरण-पंचशील घेण्यात येणार असून, त्यानंतर भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही धम्म रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे. तेथे समता सैनिक दलाच्या मानवंदनेने व अभिवादनाने रॅलीची सांगता होणार आहे. यानंतर जिल्हा कार्यालयात आयु. वामनराव निकाळजे यांचे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला जिल्हा व तालुका कार्यकारिणी, केंद्रीय शिक्षक-श...

डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी जिल्हाध्यक्षांना केले आवाहन.

Image
डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी जिल्हाध्यक्षांना केले आवाहन. मुंबई /प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आर्दश तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आर्दश जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या अध्यतेखाली होत असुन या अभुतपूर्व सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्ष यांनी आप आपल्या जिल्हयाच्या ठिकाणी एक व्यापक बैठक घेऊन सर्वांना निमंत्रीत करावे. व सर्वांना सोबत घेऊन या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार...

राज्य पोलिसिंग परिषदेत गोव्यातील अंतर्गत सुरक्षेला भक्कम चालना

Image
राज्य पोलिसिंग परिषदेत गोव्यातील अंतर्गत सुरक्षेला भक्कम चालना “अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे ही राज्याची मूलभूत जबाबदारी” – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पणजी, ३ फेब्रुवारी २०२६ : गोव्यातील पोलिसिंग व अंतर्गत सुरक्षेबाबतची राज्यस्तरीय परिषद पणजी येथे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली. गोवा पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांतील हितधारकांनी अंतर्गत सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सखोल चर्चा केली. या परिषदेदरम्यान डिचोली पोलीस ठाण्यास देशातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोत्तम पोलीस ठाणे तसेच गोव्यातील सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले असून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. परिषदेत PRISM या केंद्रीकृत गुप्तचर समन्वय प्रणालीवर विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे गुप्तचर-आधारित पोलिसिंग अधिक प्रभावी होणार आहे. तसेच सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये तक्रार नोंदणी व तत्काळ प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी e-Zero FIR या नागरिक-केंद्रित उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला. समार...

बीड जिल्ह्यात वर्षभरात २५६ शेतकरी आत्महत्या ; १६८ वारसांना मदत वितरित, ३४ प्रकरणे अपात्र तर २९ चौकशीअंती प्रलंबित — शासनाच्या उपाययोजना निष्प्रभ : डॉ. गणेश ढवळे

Image
बीड :- (दि. ०४ )बीड जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या कालावधीत (१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५) तब्बल २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि विदारक माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे या सर्व आत्महत्यांची अधिकृत नोंद असून ही आकडेवारी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची भयावह अवस्था अधोरेखित करणारी ठरत आहे. शेतीतील सततची नापिकी, वाढते उत्पादन खर्च, खाजगी सावकार व बँकांचे कर्ज, बाजारभावातील अस्थिरता, तसेच अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे बळीराजा आर्थिक कोंडीत सापडत असून अनेकांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. १९३ प्रकरणे पात्र, मात्र सर्वांनाच मदत नाही जिल्हा प्रशासनाने आत्महत्येची प्रकरणे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत तपासून १९३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरवली आहेत. यापैकी १६८ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे. तर ३४ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली असून २९ प्रकरणे चौकशीअंती प्रलंबित असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे. नोव्ह...