Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड

Image
येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड  येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची तर उद्घाटकपदी लोणी, जि. अहिल्यानगर येथील जेष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांची निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ तसेच प्रतिष्ठानचे सचिव मा. राजेश वाघ यांनी कळविले आहे.                                                                                                                                   ...

आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे

Image
आष्टी पंचायत समितीचा भोंगळ कारभार; अल्टिमेटम संपत आला तरी प्रशासन सुस्त, तरुणाचा पुन्हा उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुरज काकडे यांनी दिली आहे  आष्टी (प्रतिनिधी ): आष्टी पंचायत समितीमधील कथित भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभाराविरोधात प्रशासनाला दिलेला आठ दिवसांचा अल्टिमेटम आता संपत आला आहे. मात्र, अद्यापही भ्रष्ट व्यवस्थेने या तक्रारीवर लेखी किंवा तोंडी कोणत्याही प्रकारचे निवेदन न दिल्यामुळे, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अधिकारी हे समाजाचे नोकर आहेत हे विसरले असून, शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते,' असा घणाघाती आरोप करत या व्यवस्थेविरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक टेबलावर पैशांची मागणी; शेतकरी हवालदिल आष्टी पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांची प्रचंड पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न असो की विहीर मंजुरी, शेततळे मंजुरी, घरकुल मंजुरी किंवा मस्टर भरणे आणि कामाची मागणी करणे— प्रत्येक कामासाठी इथे वेगवेगळ्या टेबलावर उघडपणे पैशा...

मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे

Image
मौलाना आझाद महामंडळाचे कार्यालय शासकीय की खाजगी?; मनसेकडून महापुरुषांचे फोटो भेट देणार – वर्षाताई जगदाळे बीड | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयातील कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले आहे. एका कामानिमित्त कार्यालयाला भेट दिल्यानंतर या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे दिसून आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे. वर्षाताई जगदाळे यांनी सांगितले की, शासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांचे छायाचित्र लावण्याची परंपरा असताना, संबंधित कार्यालयात अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गौरवाचे आणि सत्काराचे फोटो लावले आहेत. हे फोटो महापुरुषांच्या छायाचित्रांपेक्षा अधिक ठळकपणे लावण्यात आल्याने, “हे कार्यालय शासकीय आहे की खाजगी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यालयाला महापुरुषांची छायाचित्रे भेट देऊन योग्य शिस्त लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, कार्यालयातील कथित गोंधळ आणि भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात ...

बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘ लाडके भाचे ’ आर्थिक संकटात

Image
बालसंगोपन योजनेचे अनुदान रखडल्याने ‘ लाडके भाचे ’ आर्थिक संकटात दीड ते दोन वर्षांपासून लाभार्थी प्रतीक्षेत; शिक्षण, पोषण आणि दैनंदिन गरजांवर परिणाम बीड प्रतिनिधी : - राज्यातील अनाथ, निराधार, एकल पालकांच्या तसेच अत्यंत गरजू मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘ सावित्रिबाई फुले बालसंगोपन योजना ’ सध्या निधीअभावी रखडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. अनेक लाभार्थ्यांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष खात्यात अनुदान जमा झाले नसल्याने संबंधित कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना वाढत असून शासनाने तातडीने प्रश्न सोडवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र मुलांना दरमहा २२५० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ विशेषतः अनाथ, निराधार, एकल पालकांच्या मुलांना तसेच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कुटुंबांतील मुलांना दिला जातो. या निधीतून मुलांचे शिक्षण, वह्या-पुस्तके, शाळेची फी, कपडे, औषधोपचार आणि पोषण आहाराचा खर्च भागविला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नव्हे तर अनेक ठिकाणी दोन वर्ष...

महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे

Image
महावितरणची मान्सुनपूर्व दुरुस्ती व देखभाल मोहीम कागदावरच; ग्रामीण भागात लोंबकळणा-या तारांमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.१९) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून मान्सुनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल मोहीम राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी ग्रामीण भागात ही मोहीम प्रत्यक्षात केवळ कागदोपत्रीच सुरू असून महावितरणचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या वीजतारांमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. रस्त्यावर किंवा घरांच्या अगदी जवळ आलेल्या वीजतारांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेले असून, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे जीर्ण झालेल्या कमकुवत तारा रस्त्यावर पडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही भागांत वीजतारा माणसांच्या उंचीपर्यंत खाली आल्याने लहान मुले व जनावरांना विजेचा धक्का लागण्याच्या घटनाही घडत असल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी वीज खांब, ट्र...

बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस आणि व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने “गोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?” – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.१८ ) : बीड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करत बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमणे, ओपन स्पेस गिळंकृत प्रकरणे तसेच व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१८ सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, रामधन जमाले, बाजीराव ढाकणे, प्राचार्य. डी. जी. तांदळे, डॉ. संजय तांदळे , बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, सिताबाई भोसले ,सिता दहे, आदी सहभागी झाले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हातावर पोट भरणाऱ्या चहा-नाश्ता चालक, टपरीधारक, फळविक्रेते, फुलहा...

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी

अंगणवाडीतील बालकांना उष्णतेच्या तिव्रतेपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हाळी सुट्टी द्यालेक लाडकी अभियानाची मागणी; बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन बीड प्रतिनिधी : - राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून बीड जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात लेक लाडकी अभियानाचे मार्गदर्शक प्राचार्य डी जी तांदळे, लेक लाडकी अभियानाचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या उष्णतेमुळे अंगणवाड्यांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये वायुवीजन, पंखे तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी आहे. परिणामी उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा, चक्कर येणे आदी आरोग्यविषयक समस्या निर...