Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त

Image
अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवाऱ्यासह पावसाने उद्ध्वस्त ! पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले ! तातडीने नुकसानभरपाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश:- ( दि.१० ) बीड तालुक्यातील बालाघाटावरील अंजनवती गावातील पाटील वस्तीवरील पंजाब आणि पंढरीनाथ येडे या दोन सख्ख्या भावांचा काल दि.९ मंगळवार रोजी सायंकाळी वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने संसार उद्धवस्त केला.घरावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, पेरणीसाठी घरात ठेवलेल्या खताचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वैष्णवी पंजाब येडे या १८ वर्षीय मुलीच्या डोक्याला ४ टाक्याची जखम झालेली आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट द्यावी :- डॉ.गणेश ढवळे   आज दि.१० रोजी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत आणि तलाठी नारायण दराडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा स्थळपंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी फोनवरून संवाद साधत संपुर्ण संसार उद्धवस्त झाला असुन प्रत्यक्ष घटना स्थळी भे...

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्या सोडवा- सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी

Image
 बीड : अंबाजोगाई स्वाती शासकीय रुग्णालयात अनेक विभागात वेगवेगळ्या समस्या रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भासत आहेत याच संदर्भात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री धपाटे सर व सर्व विभाग प्रमुखांचे बैठक घेतली यामध्ये प्रामुख्याने लेबर रूम चा विषय घेण्यात आला संबंधित विभागात इन्फेक्शन होत असल्यामुळे अनेक मातांना व जन्मलेल्या बाळांना त्याचा धोका निर्माण होत आहे लेबर रूमसाठी जवळपास पाच ते सहा वार्डांची आवश्यकता असताना फक्त दोनच वार्डामध्ये हा विभाग चालवला जातो या विभागात बीडची संख्या वाढवण्यात यावी तसेच अनेक तपासण्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून आणायला सांगितले जाते त्याच तपासण्या जर अद्यावत मशनरी आणून रुग्णालयातच झाल्या तर संबंधित पेशंटची होणारी गैरसोय थांबेल शासकीय रुग्णालयाने यासाठी प्रयत्न करून अशा अद्यावत मशनरी शासनाकडे मागून घ्याव्यात तसेच रुग्णालयातील रुग्णांना 70 टक्के औषध गोळ्या बाहेर मेडिकलून आणण्यास सांगतात हे तत्काळ बंद करण्यात यावे व संबंधित औषध गोळ्या रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात याव्यात संबंधित शासकीय रुग्णालया...

पाटोदा नगरपंचायतने लाखो रुपये खर्चून उभारलेली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका धुळखात पडून; विद्यार्थ्यांवर हजारो रुपये भरून खासगी अभ्यासिकेत अभ्यास करण्याची वेळ

Image
पाटोदा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना दर्जेदार व शांत वातावरणात अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाटोदा नगरपंचायतीने लाखो रुपये खर्चून उभारलेली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका सध्या धुळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या या अभ्यासिकेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्पर्धा परीक्षा, शासकीय भरती, महाविद्यालयीन शिक्षण तसेच इतर विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका मोठा आधार ठरणार होती. मात्र अभ्यासिका नियमित सुरू नसल्याने किंवा आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी दरमहा हजारो रुपये शुल्क भरावे लागत असल्याने विद्यार्थी व पालकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. नगरपंचायतीने सार्वजनिक निधीतून उभारलेली अभ्यासिका वापराअभावी पडून असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने खासगी अभ्यासिकांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाचे नेमके झाले काय, असा प्रश...

पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर ‘नमो उद्यान’चा डाव?

Image
पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर ‘नमो उद्यान’चा डाव? पत्रकारांच्या हक्काच्या जागेसाठी 11 जून रोजी भूमिपूजन; दीपक देशमुख यांचे आवाहन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पत्रकार व संपादक बांधवांसाठी पूर्वी राखीव ठेवण्यात आलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या सर्वे नंबर 422 जागेवर आता ‘नमो उद्यान’ उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आपल्या हक्काच्या जागेसाठी एकजूट दाखवण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी नियोजित करण्यात आलेल्या जागेबाबत प्रशासनाकडून नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. याच जागेवर नमो उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पत्रकारांच्या हक्काच्या जागेवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयाविरोधात पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पुढाकार घेत पत्रकार गृ...

डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात

Image
डॉ. गिरीश लटके यांच्या काव्यसंग्रह प्रकाशनानिमित्त ‘काव्य जल्लोष’ उत्साहात ( प्रतिनिधी आशा रणखांबे ) कल्याण, शाहू शिक्षण संस्था, कल्याण शाखेअंतर्गत मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शाहू अध्यापक महाविद्यालय आणि देवजीभाई हरिया विधी महाविद्यालय, शहाड-कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी डॉ. गिरीश लटके यांच्या "चराग जलाओ यारो" आणि "रुजवावे पसायदान ओठी" या काव्यसंग्रहांच्या प्रकाशनानिमित्त आयोजित ‘काव्य जल्लोष’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.  या सोहळ्यात ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास कल्याण शाखेचे अध्यक्ष जयंतीभाई हरिया, अभिनेते सुधाकर वसईकर, पी.एस.आय. अर्जुन डोमाडे, अभिनेते-दिग्दर्शक मंगेश सातपुते, मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे सह ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले , कवी रमेश आव्हाड, अभिनेते राम दोंड , प्रफुल केदार , कवयित्री स्वाती बांगर , प्रा. रुपाली लटके, कवी नवनाथ रणखांबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक म...

परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ?नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?

Image
परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ? नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?  नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन      निसर्गाचा लहरीपणा, खते, औषधाचां वाढता खर्च, न परवडणारी मजुराचीं मजुरी,यांत्रिकी खर्च करुन व चार महिने वारा,पाऊस पाण्यात राबुनही खरीप पिकास योग्य दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात खरिप पिकाच्यां भात, नागली व वरई च्या लागवडीत मोठया प्रमाणावर दिवसेंदिवस घट होत चालली आहे.    इगतपुरी तालुका हा महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो आहे.भरपुर पावसामुळे येथे भात पिकास अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे भात हे येथील प्रमुख पीक असुन त्या खालोखाल नागली व वरई ही पिकवली जाते.   दरम्यान भातामुळे या तालुक्याची ओळखच भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध आहे.येथील तांदुळ, मुरमुरा व पोहा संपुर्ण महाराष्ट्र भर परिचीत आहे.   भातासह नागली, वरई ही खरीप पिकेही येथे मोठयाप्रमाणात घेतली जातात.   मात्र पाण्या पावसात, वादळ वार्यात कष्ट करुन पिकवलेल्या भातासह खरीप पिकानां किमान उत्पादन खर्च भरुन निघेल इतकाही दर वा पैसा म...

पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील भेगा व ग्रामीण रुग्णालय ते भाकरे वस्ती अप्रोच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; टोल वसुली करूनही दुर्लक्ष का? – गणेश बामदळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ): पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हायवेपासून ग्रामीण रुग्णालय व भाकरे वस्तीला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, रुग्णवाहिका व नागरिकांची ये-जा होत असताना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश बामदळे यांनी या रस्त्यावरील भेगा व अप्रोच रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. या मार्गावर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसूल केला जात असताना रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टोल वसुलीचा उद्देश रस्त्यांची देखभाल, सुरक्षितता आणि दर्जा टिकवून ठेवणे हा असताना प्रत्यक्षात रस्त्यांवर भेगा पडणे आणि अप्रोच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून अपघातांचा धोका वाढला आहे. संबंधित टोल ...