Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

चौसाळ्यात शिवजयंती व भीमजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
​बीड (प्रतिनिधी ):कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाचे औचित्य साधून चौसाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​याप्रसंगी संदेश (शेठ) खिंवसरा, भाऊसाहेब जाधव, पत्रकार विकास नाईकवाडे, डॉ. प्रशांत जोगदंड आणि पत्रकार अजमेर मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक कुचेकर, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे, वैभव सोनवणे, प्रकाश पवार, बापू घोडके आणि शेखर सोनवणे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. ​यावेळी उपस्थित मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या विधायक उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरादरम्यान असंख्य रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली.

नेकनूर येथे इंटक सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगारांना संघटित होण्याचे आवाहन: श्री रामधन जमाले

Image
  नेकनूर (ता. जि. बीड) प्रतिनिधी :राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला आज मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शेतमजूर, बांधकाम मजूर, ऊसतोड मजूर तसेच संघटित व असंघटित कामगारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.       यावेळी इंटकचे जिल्हाध्यक्ष श्री. रामधन जमाले यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना संघटित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे असून, इंटकच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदस्य नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन अधिकाधिक कामगारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.       इंटकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्हाध्यक्ष श्री रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर इंटक बीड तालुका उपाध्यक्ष शेख सद्दाम सकलेन यां...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : शिर्डी येथील शेळके दांपत्याचा मृत्यू

Image
( यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक ) हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर धोत्रे परिसरात (दि. १७ एप्रिल) रोजी संभाजीनगरकडून शिर्डीकडे येत असताना भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत शिर्डी येथील जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोपरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगातील वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आणि घटनास्थळीच दाम्पत्याचा मृत्यू झाला. मृत जितेंद्र शेळके हे भोंदू बाबा खरात यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघाताचे नेमके कारण तसेच कंटेनर रस्त्यावर का उभा होता याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शिर्डी परिसरात शोककळा पसरली असून शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र

Image
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; जिल्हा बदनामी करण्याचे षडयंत्र:- डॉ.गणेश ढवळे  बीड (दि. १७) : बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळ प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करण्याच्या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित ती प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. दरम्यान, अलीकडील काळात खून, दरोडे, अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, ...

मनमाड-नांदगावच्या जनतेसाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांची दिल्लीत धडपड; वाहतूक कोंडीमुक्त भविष्यासाठी मोठा निर्णय

Image
यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची भेट घेऊन मनमाड शहरातील वाढत्या अपघातांची व भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती अत्यंत संवेदनशीलतेने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मनमाड, मालेगाव, येवला व कोपरगाव या मार्गांवरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः मनमाड ते येवला मार्गावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे की, अनेक वेळा रुग्णवाहिका देखील अडकून पडतात आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्णांना अमूल्य वेळ गमवावा लागतो — ही वेदना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत मांडली. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग 752G (मालेगाव–मनमाड–येवला–कोपरगाव) मार्ग मंजूर होण्यासाठी निवेदन सादर करून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊल उचलले. आमदार कांदे यांनी मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत मा. गडकरी साहेबांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला सूचना देत — मनमाड शहरात फ्लायओव्हरचे काम तातडीने सुरू करावे भविष्यातील नव्या रस्त...

उमापूर ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवकानी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत माघार नाही

Image
सखाराम पोहिकर बीड जिल्हा प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे उमापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामसभा न घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली जात नसल्यामूळे आज पंचायत समिती गेवराई येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तेव्हा आज संध्याकाळी 6 = 00 वाजेयपर्यत वरिष्ठ अधिकारी यांनी उपोषण करत्याची भेट सुद्धा घेतली नाही तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे . गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु ) गायक्रवाड तालुका सचिव किशोर भोले प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले राम साबळे . किशोर चव्हाण . राहुल सोनवणे . ऋषिराज कांडेकर . सुधाकर केदार . नितीन खापरे . दंबग ओबीसी नेतृत्व सिध्देश्वर काळे . कृष्णा सामसे . कृष्णा वीर . भारत हवाले . संतोष विठ्ठल वीर .महेश काकडे दता महाराज पाठक . राक्षसभूवनकर मोरे सह उमापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने अन्नात्याग आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांनी आसा निर्णय घेतला आहे की जोपर्यत सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रट्राचाराची चौकशी होत नाही तो पर्यत आम्...

भिम अनुयायांच्या जीवितास धोका निर्माण करणारे गणेश पगारे, किरण देशमुख,, प्रमोद माने यांना तात्काळ निलंबित करा-ॲड विकास जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी )14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्सवात पार पडली असून नित्यनियमाने व परंपरागत सायंकाळी 6 तें 12 पर्यंत   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तें बशीर गंज चौक मार्गे तें माळवेस तें डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येते  मिरवणुकीत हजारो च्या संख्येने भिम अनुयायी समाजातील माता, भगिनीं, बांधव यांचा सहभाग असतो तसेच वृद्ध, बालक देखील जयंती उत्सवात सहभागी होतात  परंतु नगर परिषद स्वच्छता विभागाचे प्रमुख गणेश तुळशीराम पगारे,  यांनी त्या मार्गावरील स्वच्छतेच्या बाबतीत कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने तसेच  बांधकाम विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी मिरवणूक मार्गातील खड्डे बुजविण्यासाठी केवळ कच्चखडी टाकून पसरविल्याने अनेक दोन चाकी वाहन चालक, पदाचारी घसरून पडल्याने जखमी झाले आहेत.  ही अतिशय गंभीर बाब असून  गणेश पगारे, किरण देशमूख, तसेच  पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रमोद माने यांच्या मनमानी कार...