Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका

Image
श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका चैत्यभूमी श्रामनेर शिबिरार्थीचा धम्मदीप बुद्ध विहारात सत्कार बीड (प्रतिनिधी ) श्रामणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात असे उद्गार अमरसिंह ढाका यांनी मुंबई येथे श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवलेल्या शिबिरार्थींच्या धम्मदीप बुद्ध विहार येथील सत्कार प्रसंगी अनुभव सांगताना प्रतिपादन केले. तथागतांचे तत्वज्ञान त्यांच्या वाणीतून निघालेल्या अनमोल पाली भाषेतील गाथेतून समजतात. गृहस्थी जीवनातील उपासक-उपासिका व बालकाकरता त्यांचे तत्त्वज्ञान समजण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेने चैत्यभूमी दादर मुंबई येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात बीड शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आयु.अमरसिंह ढाका. ॲड हनुमंत कांबळे जिल्हा पर्यटक संघटक बीड,ॲड चंद्रवदन जाधव धम्म महासंघ अध्यक्ष बीड यांनी सहभाग नोंदवून शिबिरातील आपले अनुभव उपस्थित उपासक -उपासिकांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगून त्यांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवण्यास प्रेरित केले. सत्कार कार्...

नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण

Image
नगर परिषद बीडमधील गणेश पगार चे कथित भ्रष्टाचार प्रकरण  चौकशी न झाल्यास २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अक्षय कोकाटे बीड | प्रतिनिधी नगर परिषद बीड येथील कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत संबंधितांविरोधात दिलेल्या निवेदनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मा. जिल्हाधिकारी बीड यांना दि. 29 एप्रिल 2026 रोजी तसेच मा. मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना दि. 23 एप्रिल 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये नगर परिषद बीड येथील आस्थापना, लेखा, स्वच्छता आदी विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडून कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलगा व मुलगी यांची नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून झालेली नियुक्ती, त्यांची ऑर्डर प्रक्रिया व भरतीची वैधता याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात श्री. गणेश तुळशीराम पगारे, सहा-लेखापाल नगर परिषद बीड यांच्या विरोधात स्वतंत्र चौकशी समिती स्थाप...

पाटोद्यात जोरदार वादळाचा तडाखा; अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा नागरिकांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरासह परिसरात आलेल्या जोरदार वादळ व वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून काही ठिकाणी झाडे व वीजतारा पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळामुळे विशेषतः कच्ची घरे व पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरावरील पत्रे उडून गेल्याने पावसात घरात पाणी साचले असून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अचानक आलेल्या वाऱ्यामुळे काही मिनिटांतच घरांची पत्रे उडून गेली. गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी व शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"

Image
"नाते विकासाचे आणि विश्वासाचे" स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे कोकलेगावच्या राजकारणात खूप मोठं प्रस्थ होतं.त्याचबरोबर कोकलेगावच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं असून, त्यांनी अनेक नव्या दमाच्या तरुणांना कोकलेगावच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी करून घेत अनेक मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे अतिशय संयत, शालिन,बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले,वाचक, समीक्षक, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ठाम वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारे तसेच शिस्तीच्या बळावर राजकारणात समतोल व आदरयुक्य दरारा निर्माण करणारे,आपल्या कर्तृत्वाची अमीठ छाप उमटवणारे, ज्ञानी आणि गुणी तसेच समाजाभीमुख विकासाची दृष्ठी असलेले, सामाजिक जाणीवेच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झालेलं समाजमान्य व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजात ओळख होती. कोकलेगावातील अनेक रुग्णांना ते स्वतः नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे. उपचार घेत असताना तो रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहायचे तसेच उपचारावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन असायचे. रुग्ण पूर्ण बरा हो...

नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Image
नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :- डॉ .गणेश ढवळे बीड (दि.२५ ) : देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांच्या नेतृत्वाखाली बीडमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक व सुजाण बीडकरांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे" एनपीए प्रशासन मुर्दाबाद, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था मुर्दाबाद, पेपरफुटी करणा-यांची संपत्ती जप्त करा " आदी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात एनटीए संस्था बरखास्त करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी तसेच पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या...

पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन

Image
पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन ​पाटोदा (प्रतिनिधी ) :पाटोदा तालुक्यातील विठ्ठलनगर (भाकरे वस्ती) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने अधिकमास तपपूर्ती सोहळ्यानिमित्त "भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा" याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. ​ह.भ.प. सुखनिवासवासी गु.श्री. बँकठस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सौ. सुनंदाताई सतिश म. उरणकर यांच्या संयोजनाखाली हा धार्मिक महोत्सव होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. संगीताताई सोळसकर करत आहेत. ​ ​सप्ताहभरात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० तुलसी अर्चन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन प्रसाद, दुपारी १ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध कथाप्रवक्त्या ह.भ.प. अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या सुश्राव्य वाणीतून 'देवी भागवत कथा' पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ७ ते ९ भव्य कीर्तन, ९ ते १० भोजन प्रसाद आणि रात्री १० ते १२ संगीत भ...

जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित

Image
जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितकरण्यात आले असून .प्रवेश घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतरही ४५९ जागा रिक्त राहिल्या आहेत नव्या सुचनेनुसार २९ मे पर्यंत या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे. नियमित प्रवेशात २५ टक्के जागा आरटीई कायद्यातंर्गत राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत २१४ शाळांमध्ये २ हजार ४२५ जागा आरक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात २ हजार ३६० विद्यार्थ्यांची निवड झाली होती . त्यातील १ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील वि...