Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

नगर परिषद कर्मचाऱ्यांना जयंतीपूर्वी वेतन व १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्याची मागणी

Image
परळी वै (प्रतिनिधी ) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ११ एप्रिल व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच प्रत्येकी १० हजार रुपये अग्रीम (फेस्टिव्हल लोन) दि. १० एप्रिल २०२६ पूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, शाखा नगर परिषद परळी वै यांच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल महिन्यात महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या पार्श्वभूमीवर नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि ते जयंती उत्सव आनंदमय वातावरणात साजरा करू शकावेत, यासाठी वेतन वेळेवर देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्यात यावे व फरकाची रक्कमही अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या मासिक हप्त्यांची कपात एप्रिल महिन्यात न करता कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात यावे, अशीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली...

महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन  बीड (दि. ०६): राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड) रामधन जमाले ...

जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!

Image
जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!  विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवावे : उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापुरुष जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन बीड शहरातील तुलशी संगणक महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते . दर सालाबादप्रमाणे या ही वर्षी समितीच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आले .या स्पर्धेच्या तालुकास्तरीय स्पर्धेतून निवडक प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड केली होती .बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला. बीड जिल्ह्यातून एकूण या परीक्षेसाठी सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी जिल्हास्तरीय साठी 110 विद्यार्थी पात्रता धारक होते . सदर परीक्षा सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग आयु. नानाभाऊ हजारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मध्ये विचार मंचावर प्रवी...

लिंबागणेश पाणीपुरवठा विहिरीच्या मोटारची वायर दीड महिन्यात २ वेळा चोरी; नेकनुर पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान ! पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल

Image
लिंबागणेश (दि.०४ ) : बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात तब्बल दोन वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज (दि.०४) नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, विक्रांत व...

लेखक भटू हरचंद जगदेव यांच्या माप कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Image
( प्रतिनिधी /भिवंडी )    अनित्य प्रकाशन व वारकरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदेव भटू यांच्या "माप'' या कथासंग्रहाचे प्रकाशन अध्यक्ष साहित्यिक विजयकुमार भोईर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते, साहित्यिक नवनाथ रणखांबे, प्रमुख पाहुणे संपादिका सुप्रिया जाधव, वारकरी प्रकाशनाचे राहुल मुंडे आदी.मान्यवरांच्या हस्ते स्काऊट ग्राउंड सदाशिव पेठ पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी नवनाथ आनंदा रणखांबे , राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , विजयकुमार भोईर राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , श्रीकृष्ण टोबरे जागल्या पुरस्कार, सुरेखा गायकवाड हिरकणी पुरस्कार इत्यादी. पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.     यावेळी बोलताना विजय कुमार भोईर म्हणले की, माफ या कविता संग्रहातील कथा छान आहेत . नवनाथ रणखांबे यावेळी बोलतांना म्हणाले की, जगदेव भटू यांचा “माप” हा कथा संग्रह केवळ वाचण्याचा अनुभव देत नाही; तर तो वाचकाला विचार करायला, स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरित करतो. तर भरत सातपुते यांनी माप कथासंग्रहाचे ल...

३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक

Image
३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम पर्यायी पूल उभारावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): अंबेवेस परिसरातील जुन्या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी आज शुभारंभ करण्यात आला असला, तरी या कामाच्या पद्धतीवर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता घाईघाईत शुभारंभ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अंबेवेस येथील पूल हा प्रभाग क्रमांक १६ मधील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा असून, या भागातील नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी याच पुलाचा आधार आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यापूर्वी नागरिकांसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे बागवाले यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेच्या मंजूर इस्टीमेटमध्येच सुमारे ९ लाख रुपयांची तरतूद पर्यायी पुलासाठी करण्यात आलेली असताना, सत्ताधाऱ्यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष करून थेट मुख्य पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करणे हे निष्काळजीपणाचे व नागरिकांच्या अडच...

पाली बिंदुसरा धरणात पाच तास जलसमाधी आंदोलन

Image
📰 प्रेस नोट    ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी पांडुरंग आंधळे यांचे उपोषण १४ व्या दिवशी; प्रशासन अद्याप उदासीन   बीड (प्रतिनिधी ) – ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार श्री. पांडुरंग वामनराव आंधळे हे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून व ऊसतोड कामगार श्री पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री.बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना) यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.   प्रमुख मागण्या: ऊस तोडणी व भरणी दर ₹500 प्रति टन करण्यात यावा व वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी ऊसतोड भरणी व वाहतुकीचा करार दरवर्षी करण्यात यावा ऊस तोडणीदरम्यान प्रसूती झाल्यास माता भगिनींना ₹25,000 प्रसूती भत्ता देण्यात यावा ऊसतोड ...