Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ?नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?

Image
परवडत नसल्याने खरिप लागवडीक्षेत्रात घट ? नागली,वरई दिवसेंदिवस दुर्मिळ?  नाशिक जिल्हा प्रतिनिधी - नवनाथ गायकर यांजकडुन      निसर्गाचा लहरीपणा, खते, औषधाचां वाढता खर्च, न परवडणारी मजुराचीं मजुरी,यांत्रिकी खर्च करुन व चार महिने वारा,पाऊस पाण्यात राबुनही खरीप पिकास योग्य दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात खरिप पिकाच्यां भात, नागली व वरई च्या लागवडीत मोठया प्रमाणावर दिवसेंदिवस घट होत चालली आहे.    इगतपुरी तालुका हा महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो आहे.भरपुर पावसामुळे येथे भात पिकास अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे भात हे येथील प्रमुख पीक असुन त्या खालोखाल नागली व वरई ही पिकवली जाते.   दरम्यान भातामुळे या तालुक्याची ओळखच भाताचे आगार म्हणुन प्रसिद्ध आहे.येथील तांदुळ, मुरमुरा व पोहा संपुर्ण महाराष्ट्र भर परिचीत आहे.   भातासह नागली, वरई ही खरीप पिकेही येथे मोठयाप्रमाणात घेतली जातात.   मात्र पाण्या पावसात, वादळ वार्यात कष्ट करुन पिकवलेल्या भातासह खरीप पिकानां किमान उत्पादन खर्च भरुन निघेल इतकाही दर वा पैसा म...

पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील भेगा व ग्रामीण रुग्णालय ते भाकरे वस्ती अप्रोच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; टोल वसुली करूनही दुर्लक्ष का? – गणेश बामदळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ): पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हायवेपासून ग्रामीण रुग्णालय व भाकरे वस्तीला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, रुग्णवाहिका व नागरिकांची ये-जा होत असताना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश बामदळे यांनी या रस्त्यावरील भेगा व अप्रोच रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. या मार्गावर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसूल केला जात असताना रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. टोल वसुलीचा उद्देश रस्त्यांची देखभाल, सुरक्षितता आणि दर्जा टिकवून ठेवणे हा असताना प्रत्यक्षात रस्त्यांवर भेगा पडणे आणि अप्रोच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून अपघातांचा धोका वाढला आहे. संबंधित टोल ...

देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने – डॉ. गणेश ढवळे बीड, दि . ८ : देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, देशातील सर्व कत्तलखाने बंद करावेत, मांस निर्यातीवर बंदी घालावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधानाच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी, या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करत गोसंवर्धन, पशुधन व्यवस्थापन आणि शेतकरीहिताचे दीर्घकालीन धोरण राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. आंदोलनात अँड .शेख शफीक भाऊ , शेख युनुस, शेख मुबीन, मुस्ताक शेख,सय्यद सादेक,रामधन जमाले,, हनुमान घोडके,भीमराव कुटे, बाजीराव ...

शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

Image
शिवरायांच्या जयघोषात गढी ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक .रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिनानिमित्त गढी ग्रामपंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे यांच्या हास्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच " जय भवानी जय शिवाजी " च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या शौर्ये . दुरदृष्टी . न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श समाजाने अंगीकारण्याचे आवाहन गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी केले . शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला . आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहासात अजरामर कार्य केले . असे मत गढी ग्रामपंचायतचे सदस्य अमोल ससाणे व्यक्त केले या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आशा वर्कर . डॉक्टर ...

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; कत्तलखाने व मांस निर्यात बंदीची मागणी

Image
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; कत्तलखाने व मांस निर्यात बंदीची मागणी शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि सामाजिक-धार्मिक सलोखा जपण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन; गोमाता प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : - सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी :- देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक-धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करावे, देशातील सर्व कत्तलखाने टप्प्याटप्प्याने बंद करावेत, विदेशात होणाऱ्या मांस निर्यातीवर संपूर्ण बंदी घालावी तसेच गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्यांची निष्पक्ष अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ८ जून) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक श्री. बाजीराव ढाकणे यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच...

परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील

Image
परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील गुन्हेगारांच्या दहशतीखाली शहर, पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय?;खून, मारामाऱ्या, टोळक्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे सावट परळी | प्रतिनिधी एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या परळी शहराची ओळख आता दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत चालली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परळीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात कायदा संस्थेचे तीन तेरा झाले असून पोलीस प्रशासनाचा कसलेही प्रकारचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या बाबत आपण लवकरच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   ...

पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप

Image
पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप लिंबागणेश (दि. ६) : बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील शेतकरी विश्वंभर मुरलीधर खिल्लारे यांच्या तीन दुभत्या म्हशींचा अवघ्या दोन दिवसांत संशयास्पद मृत्यू झाला असून चौथी म्हैसही मरणासन्न अवस्थेत आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. विश्वंभर खिल्लारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशी आजारी पडताच त्यांनी लिंबागणेश येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करूनही कोणीही तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर त्यांना खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागले. औषधोपचारासाठी सुमारे २० हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्याशी बोलताना विश्वंभर खिल्लारे यांनी तीव्र स...