Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लिंबागणेशमध्ये “शेतकरी सहवेदना दिवस” पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली

Image
लिंबागणेश (दि.१९) – शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात “शेतकरी सहवेदना दिवस” पाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती आदर व सहवेदना व्यक्त करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेला यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली असून ती शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद म्हणून ओळखली जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे ४५ तर महाराष्ट्रात सुमारे १५ शेतकरी आत्महत्या करतात. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २५६ आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तु कायदा, जमिन अधिग्रहण कायदा हे नरभक्षी शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, तसेच प्रशासनाच्या निष्क्...

महसूल विभागाची ढिलाई; पाटोद्यातील ६६ शेतकरी ‘पीएम किसान’पासून वंचित शेतकऱ्यांचा संताप

पाटोदा (प्रतिनिधी ) लँड सीडिंग प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा व जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या महसूल विभागाच्या कारभारामुळे पाटोदा तालुक्यातील तब्बल ६६ शेतकरी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ७/१२ उताऱ्यांतील नोंदी अद्ययावत करण्यास टाळाटाळ, तांत्रिक कारणांची आड घेऊन कामे प्रलंबित ठेवणे, तसेच जबाबदारी झटकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, महसूल व कृषी विभागांच्या ढकलाढकलीत शेतकरी भरडले जात आहेत. शेतकऱ्यांननी तहसिल व कृषी “कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा हप्ता जमा होत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे राम आदोडे यांचा सचिव पदाचा राजीनामा

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) – भीमनगर येथील रहिवासी राम बाबासाहेब अदोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. दिनांक 9 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत अदोडे यांची सर्वानुमते सचिवपदी निवड करण्यात आली होती. मात्र, निवड झाल्यानंतर समितीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला. समितीचे अध्यक्ष व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून, तसेच राजकीय पाठबळ असलेल्या काही नेत्यांच्या प्रभावामुळे, जयंती उत्सवाच्या नियोजनात आपल्याला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप अदोडे यांनी केला आहे. “समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती भव्य आणि उत्कृष्ट पद्धतीने साजरी व्हावी, या उद्देशाने मी कोणत्याही स्वार्थाशिवाय सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मला विश्वासात घेतले जात नसल्याने आणि वेगळेच वातावरण निर्माण झाल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,” असे अदोडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे जय...

गेवराई तालुक्यात पुरवठा विभागाची धडक कार्यवाही एकूण १२ सिलेडर केले जप्त

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय तसेय तालुकास्तरीय पथक गठीत करण्यात आलेले होते . त्यानुसार गेवराई तालुक्यात बीड बायपास ते जालना बायपास परिसर व शहरातील इतर भागात अचानक तपासणी केली असता . एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत . वरीते कार्यवाही माननीय श्री . शिवकुमार स्वामी जिल्हा पुरवठा अधिकारी बीड . श्री संदीप खोमणे तहसीलदार गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे असे श्री नायब तहसिलदार गजानन मोरे यांनी सांगितले . सदर कार्यवाहीत श्रीकृष्णा मिसाळ . सचिन जाधव . मनोज पवार . सुधीर जोशी . गजानन वादे हे उपस्थितीत होते . तसेच यापुढे देखील सदर मोहीम सुरूच राहील त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना घरगुती गॅसचा वापर न करता पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुरवठा विभागाने आवाहन केले आहे असेही श्री गजानन मोरे नायब तहसिलदार यांनी आमच्या प्रतिनिधी शी चर्चा करताना आसे सांगितले आहे

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर 420 चा गुन्हा; केजमध्ये खळबळ

Image
माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या पती विजयप्रकाश ठोंबरे वर '420’ चा गुन्हा; केजमध्ये खळबळ “सत्य परेशान हो सकता है,लेकीन पराजित नही ” – अनिल तुरूकमारे  तात्कालीन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त रवींद्र शिंदे वरही लवकरच होणार कार्यवाही? केज (जि. बीड ) : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी प्रकरणात मोठी कारवाई करत केज पोलीस ठाण्यात माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे व तत्कालीन लिपिक राजकुमार वाव्हळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (IPC 420) व (IPC 34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरूकमारे (रा. बीड) यांनी तक्रार दिली असून, त्यांच्या मुलासह 464 विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे माहिती अधिकारातून मिळवून, त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सूत गिरणीच्या सभासद यादीत नावे दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सन 2017 ते 2020 या कालावधीत तब्बल 464 अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला. सूत गिरणीच्या रेकॉर्डवर संबंध...

दादर रेल्वे स्थानकाचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करामागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे अंबाजोगाईत धरणे आंदोलन

Image
दादर रेल्वे स्थानकाचे नांव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करा मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे अंबाजोगाईत धरणे आंदोलन अंबाजोगाई (प्रतिनिधी ) दादर रेल्वे स्थानकाचे नांव बदलून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी करण्यात यावे या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे यांच्या नेतृत्वात मंगळवारी अंबाजोगाईतील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी, बीड यांना उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्राच्या वतीने १७ मार्च २०२६ पासून महाराष्ट्रभर आपल्या सर्वांचेच आदरणीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राज्यघटनाकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नांव देण्यात यावे. अशा प्रकारची मागणी घेऊ...

वेतन ‘एक तारखेलाच’ द्या; अन्यथा कारवाई करा – सूर्यकांत जोगदंड यांचा इशारा

Image
बीड प्रतिनिधी : शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तांचे पेन्शन दर महिन्याच्या एक तारखेलाच अदा करणे बंधनकारक असतानाही, अनेक कार्यालय प्रमुखांकडून जाणूनबुजून विलंब केला जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कास्ट्राईब व इतर कर्मचारी संघटनांच्या वतीने सूर्यकांत जोगदंड यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “वेतन व पेन्शन उशिरा देणे ही केवळ निष्काळजीपणा नसून कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे. कार्यालय प्रमुखांकडून मुद्दाम खोडसाळपणे विलंब केला जात असल्याचे चित्र आहे, जे सहन केले जाणार नाही.” एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्राट अशोक जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती यांसारखे महत्त्वाचे सामाजिक उपक्रम पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना वेळेवर आर्थिक तरतूद होणे अत्यावश्यक असून, पगार व पेन्शन वेळेवर मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सर्व कार्यालय प्रमुखांना कडक सूचना द्य...