Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

परळी पत्रकार गृहनिर्माण संस्थेला ₹५ कोटींचा निधी द्यावा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बालाजी जगतकर यांचे निवेदन

Image
परळी पत्रकार गृहनिर्माण संस्थेला ₹५ कोटींचा निधी द्यावा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बालाजी जगतकर यांचे निवेदन बीड | प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील पत्रकारांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थांसाठी राज्य शासनाने ₹५ कोटींचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी लघु व मध्यम वृत्तपत्र संघटनेचे जिल्हा सचिव बालाजी श्रावण जगतकर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुमित्राताई अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, संपादक तथा भारतीय लघु व मध्यम पत्रकार संघटणा जिल्हा सचिव बालाजी जगतकर , कामगार नेते गौतम आगळे आदीचे शिष्टमंडळ भेटले. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाज, शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत. दिवस-रात्र जनहितासाठी कार्य करणाऱ्या अनेक पत्रकारांना आजही स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे परळी वैजनाथ आणि बीड येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्था सक्षमपणे उभारण्यासाठ...

कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा

Image
कै . अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा खाजगी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितल्याचा दावा; आर्थिक फसवणुकीचा संशय, दोषींवर कारवाईची माजी सैनिक अशोक येडे ,आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष यांची मागणी बीड, दि . ८ :कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून "संमतीपत्र (कन्सेंट लेटर) सुरू करण्याच्या" नावाखाली प्रत्येकी ₹५०० रक्कम एका खाजगी बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम शांतीकुमार आगलावे यांच्या नावावरील खाजगी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा आहे. लाभार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशात, "आज पैसे जमा केले नाहीत तर तुमचे संमतीपत्र सुरू होणार नाही. त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील. ज्यांनी पैसे जमा केले आहेत त्यांच्याच कामाची प्रक्रिया करण्यात येईल," असा मजकूर असल्याच...

आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे दत्तात्रय कदम यांचा समाजोपयोगी उपक्रम; सौंदाना येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदाना येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवराज कदम, नारायण कदम, शिवदास आगुंडे, महादेव कदम, दत्ता कदम, बालाजी कदम, ईश्वर कदम आणि सचिन कदम उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक...

​ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही-​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा

Image
​ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरामध्ये जनतेच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही-​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा   बिकानेर स्वीट होम' तातडीने बंद करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन-- मोरे / खेडकर ​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकात असलेल्या 'बिकानेर स्वीट होम'चा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असुन या दुकानाचा मालक शिरूर कासार तालुक्यातील दहीवंडी गावात अत्यंत घातक आणि भेसळयुक्त पदार्थ तयार करत असल्याचे उघड झाले .  ​ नागरिकांच्या आणि निष्पाप लहान मुलांच्या जीवाशी खेळून या ठिकाणी खालील विषारी आणि डुप्लिकेट पदार्थ बनवले जात होते .    भेसळयुक्त खवा/  केमिकल आणि डुप्लिकेट दुधापासून बनवलेला केक/  विषारी पेढे आणि गुलाबजामुन/   भेसळयुक्त बासुंदी आणि पनीर ​हा थेट माणसांना मारण्याचा आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार उघड झाला. बाहेरून येणाऱ्या लोकांना त्रास व्हावा ही आमची भूमिका नाही, परंतु बाहेरू...

पाटोद्यातील पाच व सात कोटींच्या रस्त्यांची थोड्याशा पावसातच लागली वाट

पाटोद्यातील पाच व सात कोटींच्या रस्त्यांची थोड्याशा पावसातच लागली वाट पाटोदा ते शंभरचिरा व पाटोदा ते साकत मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे; प्रवासी हैराण पाटोदा | प्रतिनिधी : पाटोदा तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले पाटोदा–शंभरचिरा व पाटोदा–साकत हे रस्ते थोड्याशा पावसातच उखडल्याचे चित्र समोर आले आहे. पाच व सात कोटी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अवघ्या वर्षभरातच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने खड्डे दिसून येत नाहीत आणि प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे.या दोन्ही मार्गांवरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनांची मोठी कसरत होत असून किरकोळ अपघातही घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.स्थान...

बीडमध्ये 'आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव' परिसंवाद संपन्न; अनुसूचित जातींचे आरक्षण संपवण्याचा डाव हाणून पाडण्याचे वक्त्यांचे आवाहन

Image
बीडमध्ये 'आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव' परिसंवाद संपन्न; अनुसूचित जातींचे आरक्षण संपवण्याचा डाव हाणून पाडण्याचे वक्त्यांचे आवाहन बीड (प्रतिनिधी ): अनुसूचित जातींचे (SC) वर्गीकरण करून आरक्षण संपवण्याचे जे षडयंत्र आखले जात आहे, त्याविरोधात समाजबांधवांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असा सूर बीड येथे आयोजित परिसंवादात उमटला. अनुसूचित जातीचे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच युवक व महिला आघाडीच्या वतीने 'आरक्षण बचाव वर्गीकरण हटाव' या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. या परिसंवादात राज्यातील नामांकित विचारवंत आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून समाजबांधवांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्यांचे विचार आणि मागण्या:मा. रोहिदास बन्सोडे (प्रदेश सचिव तथा राज्य प्रवक्ते, राष्ट्रीय चर्मकार महासंघ):    "आरक्षणाचे वर्गीकरण करून बहुजन समाजात फूट पाडण्याचे हे एक मोठे षडयंत...

"शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!" – लिंबागणेश येथे बॅनरबाजी

Image
"शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, अन्यथा राजीनामा द्या!" – लिंबागणेश येथे बॅनरबाजी सरसकट कर्जमुक्ती, २०२५ चा पिकविमा, शेतकरी अनुदान व अन्य प्रलंबित मागण्यांवर लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी; डॉ. गणेश ढवळे यांची मागणी लिंबागणेश:-( दि. ७) : राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी, २०२५ चार पिकविमा, घोषित थकीत अनुदान,विविध प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवावा, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारी बॅनरबाजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे करण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अजय बुरांडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथील मुख्य प्रवेशद्वारावर तसेच प्रमुख चौकांमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत.या बॅनरवर "सरसकट कर्जमाफी, २०२५ चा पिकविमा, घोषित शेतकरी अनुदान व इतर शेती प्रश्नांवर सभागृहात प्रश्न मांडणार नसाल तर राजीनामा द्या" असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले की, २०२५ चा पिकविमा, सरसकट कर्जमुक्ती, घ...