Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पुणे येथे राज्यस्तरीय कर्तृत्व गौरव पुरस्काराने माया दिवाण यांचा सन्मान

Image
पुणे/ बीड (प्रतिनिधी ) – नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये माया दिवाण यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सोहळा २१ मार्च २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या नालंदा फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा माया दिवाण यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माया दिवाण यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत समाजासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. लेखिका, कवयित्री, म्हणून त्यांची कार्य अधोरेखित आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेत प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून व कवितेतून सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता आणि समर्पण यांचे उत्कृष्ट दर्शन घडते. या सन्मानामुळे त्यांच्या ...

नाशिकच्या भोंदू बाबावर कारवाई करा; बीड जिल्हाधिकाऱ्यांना 'अंनिस'चे निवेदन

Image
भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा-बुवाबाजी-सत्ता-संपत्तीच्या संगनमताने चालू असलेले 'महिलांचे शोषणा'विरोधी राज्यस्तरावर कठोर कारवाई व्हावी          राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना 'मअंनिस' बीड शाखेचे निवेदन बीड (दि 24 ):नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकर णाकडे केवळ त्या एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रुपात पाहणे,ही मोठी चूक ठरेल.अंधश्रद्धा,सत्ता,संपत्ती,बुवाबाजी,ज्योतिष्य, व 'तथाकथीत अध्यात्म व दैवी शक्तीच्या' अतिशय धोकादायक संगनमताचे हे राज्याला हादरवून सोडणारे गंभीर उदा. आहे.करिता,या व अशा प्रकरणांची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता,त्या मागील संपुर्ण जाळ्याचा शोध घेण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,बीड शाखेच्या वतीने विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मा.मुख्यमंत्री महोदयांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविले असल्याची माहिती जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी दिली आहे. यासंबंधाने अधिक माहिती अशी की,समाजातील असुरक्...

भगव्या रंगात रंगणार पाटोदा; विराट हिंदू संमेलनाची पाटोद्यात जोरदार तयारी

पाटोदा (प्रतिनिधी )सकल हिंदू समाज,पाटोदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाटोदा शहर भगव्या रंगात न्हाऊन निघत असून वातावरणात धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे. येत्या गुरुवारी, दि. २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य संमेलनासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र भगवे ध्वज आणि आकर्षक सजावट करण्यात येत आहे.श्रीराम मंदिर व काळा हनुमान मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात नामांकित शिवचरित्रकार अशोक बांगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या विचारांतून हिंदू संस्कृती, इतिहास आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे.तसेच ह.भ.प. राधाताई महाराज आईसाहेब या मातृशक्ती प्रबोधन करणार असून समाजातील महिलांच्या सशक्त भूमिकेवर भाष्य करतील. ह.भ.प. लक्ष्मण महाराज सस्ते आणि ह.भ.प. केदारेश्वर महाराज जाधव हे प्रबोधनातून अध्यात्मिक व सामाजिक संदेश देणार आहेत.कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ही संमेलनाची मुख्य आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे आयोजन

Image
बीड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आयोजित केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही जिल्ह्यातील इयत्ता 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. तालुकास्तरीय पहिली फेरी दिनांक 30 मार्च 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या फेरीतून प्रत्येक तालुक्यातील अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या अकरा तालुक्यांतील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय, बीड येथे पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5...

वीर यांच्या "संगर" निवासस्थानी भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे उत्स्फूर्त स्वागत

Image
 बीड प्रतिनिधी - एकतानगर नाळवंडी नाका परिसरातील “संगर” या निवासस्थानी चैत्यभूमी, मुंबई येथील भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघ यांचे वीर परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात स्वागत, सत्कार व भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कालकथित नारायण वीर शिकवलेल्या धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करत वीर परिवार ने आज धम्म सेवा केली आहे. धम्मरथाद्वारे चैत्यभूमी येथून आगमन झालेल्या भंन्ते डॉ. सुमेधबोधी व भिक्खू संघाचे आगमन होताच परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले. यावेळी अॅड.चंद्रवणी वीर तसेच समाजसेवक पुरुषोत्तम उर्फ (गोटु) वीर यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भंन्ते व संघाची आदरपूर्वक सेवा केली. वीर परिवाराने अत्यंत श्रद्धा व समर्पण भावनेने भिक्खू संघाचे स्वागत करत पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. तसेच सर्व भिक्खूंना सन्मानपूर्वक भोजनदान देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात शांतता, करुणा व बंधुभाव यांचा सुंदर संदेश देत भंन्ते डॉ. सुमेधबोधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मि...

लिंबागणेश येथे गतिरोधकाच्या मागणीसाठी पत्रकार हरिओम क्षीरसागर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Image
(लिंबागणेश प्रतिनिधी )  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (मांजरसुंबा – पाटोदा) मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोर तसेच गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार हरिओम सुधीरराव क्षीरसागर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या संदर्भात दि. १२ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा होऊन स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दि. २६ जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित विभागाला गतिरोधक बसविण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी आदेशांची दखल न घेता आजपर्यंत गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, शाळकरी विद्यार्थी...

नायगाव जिल्हा परिषद शाळेतील वृक्षतोड प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? गणेश मोहळकर यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीच्या प्रकरणावर प्रशासनाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा संतप्त आरोप महात्मा फुले युवा दलाचे तालुकाप्रमुख गणेश मोहळकर यांनी केला आहे. तब्बल 30 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याची शंका व्यक्त होत आहे.शाळेच्या आवारातील अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या व विद्यार्थ्यांना सावली देणाऱ्या झाडांची कोणतीही परवानगी न घेता कत्तल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून, पर्यावरणाच्या हानीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.या संदर्भात तहसीलदार, वनविभाग, गट शिक्षण अधिकारी तसेच कृषी विभाग यांना लेखी तक्रारी देण्यात आल्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून “कर्मचारी वर्ग कमी आहे” अशी कारणे देत उघडपणे वेळकाढूपणा केला जात आहे. ही कारणे देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचा थेट आरोप मोहळकर यांनी केला आहे.“विद्यार्थ्यांच्या हितासाठी लावलेली झाडे तोडली जातात आणि प्रशासन बघ्याची भू...