Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

व्यापाऱ्यावर 60 टक्के भाडेवाढ व पन्नास हजार ना परतावा डिपॉझिट सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा उपोषणाचा इशारा

Image
व्यापाऱ्यावर 60 टक्के भाडेवाढ व पन्नास हजार ना परतावा डिपॉझिट सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांचा उपोषणाचा इशारा २९ जून रोजी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण; २५ जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याची प्रशासनाला मुदत परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी नगर परिषदेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुखौ यांनी २९ जून २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद परळी यांना देण्यात आले असून २५ जूनपर्यंत मागण्या मान्य करून लेखी कळविण्याची मागणी करण्यात आली आहे.  निवेदन देण्यापूर्वी तब्बल परळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत पाच तास प्रदीर्घ सर्व विषयावर चर्चा करण्यात आली आहे. देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात परळी शहरातील व्यापारी, पत्रकार, बौद्ध समाज, कंत्राटी कामगार तसेच विविध सार्वजनिक प्रश्नांशी संबंधित सात महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. नगर परिषदेकडून व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेली भाडेव...

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवड; प्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार

Image
परळी | प्रतिनिधी रविवार दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयुनी प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जाधव-आठवले परिवारातील सदस्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून केली. त्यानंतर आयु. एस. ए. सोणवणे यांनी बुद्धवंदना घेत कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण प्राप्त करून दिले. यावेळी उमाजी वाघमारे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. आर. डी. जाधव, ॲड. के. आर. गाडे तसेच माजी सरपंच मारुती सुरवसे यांनी आयुनी प्रज्ञा जाधव-आठवले यांचा शाल, पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर मिळविलेल्या या यशामुळे परिसरातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता शरणयत्तने करण्यात आली. यावेळी नागसेन बुद्धविहार परिसरातील...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १२ वर्षांत रामराज्याची संकल्पना साकारली – भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख

Image
बीड, प्रतिनिधी : बीड येथील सोमेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज रामायण पारायणाच्या पावन प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सलग १२ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल भगवान श्रीरामचंद्रांचे विशेष पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि राष्ट्रसेवेच्या संकल्पांना अधिक बळ प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना श्रीराम चरणी करण्यात आली. यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने विकास, सुशासन, राष्ट्रीय सुरक्षा, गरीब कल्याण आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.” देशमुख म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, आयुष्मान भारत, पीएम किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी गरीब, शे...

एसटी बीड विभागातील नियमबाह्य बदल्या व बढत्यांची चौकशी करून विभाग नियंत्रकांवर कारवाई करा- बबन वडमारे

Image
बीड । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागात दि. 1 जानेवारी 2024 पासून झालेल्या बदल्या, बढत्या, पदनियुक्त्या आणि प्रतिनियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच विभाग नियंत्रक यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इंटकचे प्रादेशिक सचिव बबनराव वडमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई तसेच मध्यवर्ती कार्यालयातील सुरक्षा व दक्षता अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, बीड विभागात विविध पदांवरील बढत्या आणि बदल्या करताना सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलण्यात आले असून नियम व परिपत्रकांना बगल देत काही कर्मचार्‍यांना लाभ मिळवून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहक ते लिपीक-टंकलेखक तसेच वाहक ते वाहतूक नियंत्रक या पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत वरिष्ठतेचा विचार न करता निर्णय घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच चालक, वाहक, सहाय्यक वाहतूक नियंत्रक, एटीआय, टीआय, पर्यवेक्षक आणि इतर पदा...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "रांजण ठेवले पण पाणीच नाही ! पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध

Image
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "रांजण ठेवले पण पाणीच नाही ! पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध :- डॉ.गणेश ढवळे  बीड, दि. १५ : शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तसेच आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार निवेदने व लक्ष्यवेधी आंदोलने झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन रांजण ठेवून पाणपोई सुरू केल्याचे दाखविले. मात्र काही दिवसांतच ही व्यवस्था केवळ दिखाऊ ठरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. या रांजणांमध्ये नियमितपणे पाणी भरले जात नसल्याने पाणपोई अनेकदा कोरडी राहत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. या कथित निष्काळजीपणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १५) डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली कोरड्या रांजणाला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून गांधीगिरीच्या मार्गाने जिल्हा प्रशासनाच्या संवेदनहीन कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल...

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता

Image
श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सांगता महंत बबन बहिरवाळ महाराजांच्या ‘काल्याच्या कीर्तनाने’ भाविक मंत्रमुग्ध लिंबागणेश:-(दि. १४ ): बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानमध्ये अधिकमासानिमित्त दि. ७ जूनपासून मठाधिपती महंत शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याची आज दि.१४ रविवार रोजी श्री ह.भ.प. बबन महाराज बहिरवाळ (श्री संत मदन महाराज संस्थान, कडा) यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह उत्साहात पार पडला. सांगता प्रसंगी बबन महाराज बहिरवाळ यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी ह.भ.प. अर्जन महाराज येडे, ह.भ.प. रंजीत महाराज, ह.भ.प. बबन महाराज वायकर, ह.भ.प. तुकाराम महाराज भोसले, ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे, किशोर महाराज येडे, माऊली...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच

Image
भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच....   गेवराई (प्रतिनिधी ) - दि.१३ जून २०२६  भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी यात्रा" काल रात्री गेवराई तालुक्यातील विलासनगर येथे पोहोचली.     विलासनगर या ठिकाणी मागील काही वर्षांपासून नाथपंथी डवरी गोसावी,वडार समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शहराबाहेर असलेल्या विलासनगर येथे हा समाज पालाच्या घरात राहत आहे. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले तरी आजही भटके विमुक्त समाजाला घर, मुलांना शिक्षण, रोजगार, शेती, निवासी जागा उपलब्ध नसल्याने अशा कठीण परिस्थितीतही या समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत भटकंती करावी लागते.          या कार्यक्रमांमध्ये बोलताना ॲड. डॉ.अरूण जाधव म्हणाले की, एकीकडे भारत देश महासत्ता बनवू पाहत आहे तर दुसरीकडे आजचा भटके विमुक्त समाज हा अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठीच पिढ्यानपिढ्या संघर्ष करीत आहे. त्यांच्या या संघर्ष...