Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे श्रीसंत एकनाथ महाराज षष्ठी निमित्त प्रस्थान

Image
लिंबागणेश:-( दि.०३ ) श्री गुरू ईश्वर बाबा भारती श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे श्रीसंत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज षष्ठी निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन मठाधिपती ह.भ.प.महादेव बाबा भारती महाराज आणि ह.भ‌.प. शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आज दि.०३ मंगळवार रोजी सकाळी श्रीक्षेत्र बेलेश्वर व श्रीगुरु ईश्वर बाबा भारती यांचा अभिषेक करून पायी दिंडीचे प्रस्थान झाले.पायीदिंडींचे हे १२ वे वर्ष असुन मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी झाले आहेत. टाळ मृदंगाच्या गजरात " ग्यानबा तुकाराम" च्या नामघोषात दंग दिंडीतील भाविकांचे दिंडी मार्गावरील भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान महंत महादेव भारती महाराज व शांती ब्रम्ह तुकाराम महाराज यांची ठिकठिकाणी आतषबाजी करत, सडासमार्जन, रांगोळी काढून सुवासिनींनी पाद्यपुजन करत औक्षण करत मनोभावे स्वागत केले. ग्रामस्थांनी दिंडीतील भाविकांची ठ...

लिंबागणेशमध्ये उत्साहात पारंपरिक होलिकेचे दहन११ क्विंटल सरपनाची केली होळी

Image
लिंबागणेशमध्ये उत्साहात पारंपरिक होलिकेचे दहन ११ क्विंटल सरपनाची केली होळी .   बीड तालुका उत्सवाचे गाव म्हणून ओळख असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे यंदा होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मारुती मंदिर, लिंबागणेश समोर पारंपरिक पद्धतीने ११ क्विंटल सरपनाची भव्य होलिका दहन करण्यात आली. होलिका दहनापूर्वी विधिवत पूजन करण्यात आले. गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक मंत्रोच्चारात पूजा संपन्न झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्य हलगीच्या गजरात वातावरण दणाणून गेले. हलगीच्या तालावर तरुणांनी जल्लोष करत उत्साहात होळी प्रज्वलित केली. पुर्वी गावातील पाटलांना होलिका दहन करण्याचा मान असायचा , गावातील तरुणांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा करून ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेली ही मानाची होळी पुन्हा पेटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी हरिओम क्षीरसागर यांनी सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानत पुढील वर्षी यापेक्षा अधिक भव्य स्वरूपात होळी साजरी करण्याचा मानस व्यक्त केला. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि...

मेरा युवा भारत अंतर्गत विमला शाळेत निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Image
          गेवराई प्रतिनिधी : मेरा युवा भारत योजने अंतर्गत रंगार चौक, गेवराई येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन सत्यजित संतोष, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत यांनी केले. प्रमुख उपस्थितीत प्रकाश त्रिभुवन (जिल्हा समन्वयक, मेरा युवा भारत, छत्रपती संभाजीनगर), कडुदास कांबळे (प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती), पांडुरंग खरात (गेवराई तालुका समन्वयक, मेरा युवा भारत) व निलेश त्रिभुवन (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश होता.              या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मुख्याध्यापक श्री. जोगदंड के. जी. यांचे राहिले. या निबंध स्पर्धेचे विषय होते - १) सुभाषचंद्र बोस, २) विजयी दिवस, ३) माझ्या स्वप्नातील भारत. ८वी व ९वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.         कडुदास कांबळे (महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक) या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना त्यांनी ...

बीड येथील नाथ सृष्टीत मंगलमय वातावरणात फाल्गुण पौर्णिमा उत्साहात संपन्न

Image
बीड येथील नाथ सृष्टीत मंगलमय वातावरणात फाल्गुण पौर्णिमा उत्साहात संपन्न भदंत सुमेध बोधी यांच्या प्रभावी धम्मदेशनाने उपस्थितांना मिळाली समतेची व मानवतेची प्रेरणा बीड (प्रतिनिधी ) – भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे महासचिव तथा मुंबई येथील पूज्य भदंत सुमेध बोधी ए. यांच्या मौल्यवान व प्रभावी धम्मदेशनाने बीड येथील नाथ सृष्टी परिसर मंगलमय वातावरणात उजळून निघाला. फाल्गुण पौर्णिमेच्या पावन निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने धम्म उपासक उपस्थित राहून धम्मश्रवणाचा लाभ घेतला. धम्मदेशनामध्ये भदंत सुमेध बोधी यांनी सांगितले की, “भूक आणि तृष्णा हे मानवी जीवनातील मोठे महारोग आहेत. मनुष्याने सम्यक विचार, सम्यक आचरण आणि कुशल कर्माच्या माध्यमातून या दुःखातून मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे.” त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या, मानवतेच्या आणि परिवर्तनशील विचारांची आठवण करून देत सदधम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘चिवर धारणेचा सम्यक संकल्प’ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. “भारतभूमी ही बुद्धांची भूमी आहे. भारतात जन्मलेला प्रत्येक जण मुळतः बौद्ध आहे,” असे सांगत त्यांनी तथागत...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शेतकरी विरोधी कायद्यांची होळी

Image
शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शेतकरी विरोधी कायद्यांची होळी !  शेतकरी विरोधी सरकारच्या नावाने बोंबा ठोकल्या  ; एनडीपीएस कायद्यांतर्गत बदल करून शेतकऱ्यांना गांजा,अफु, तंबाखू लागवडीस परवानगी द्या  :- डॉ.गणेश ढवळे  बीड:-( दि.०२ ) एनसीबीआरच्या अहवालानुसार सन २०२३ मध्ये भारत देशात १०,७०० शेतकरी आत्महत्यांची नोंद असुन त्यात महाराष्ट्र राज्यात ३८.५ टक्के प्रमाण असुन महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. मराठवाड्यात गेल्या सन २०२५ वर्षात ११२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन बीड जिल्ह्यात  २५६ शेतकरी आत्महत्यांची नोंद असुन नव वर्षाच्या सुरुवातीला दिड महिन्यात ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्यांची नोंद आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आणि शेतकरी विरोधी कायद्यांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक जिवनमान उंचावत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एनडीपीएस कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना गांजा,अफु,तंबाखु लागवडीसाठी रीतसर परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता मह...

रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ दिमाखात संपन्न

Image
रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ दिमाखात संपन्न सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; प्रेरणादायी सोहळा बीड | प्रतिनिधी सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रयत सामाजिक प्रतिष्ठानचा १६वा पुरस्कार वितरण सोहळा २०२६ बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अत्यंत भव्य आणि दिमाखदार वातावरणात उत्साहात पार पडला. यशवंतराव चव्हाण सभागृहात उपस्थित मान्यवर, कलाकार आणि नागरिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानितांचा गौरव करण्यात आला. हा सोहळा प्रतिष्ठानच्या रोहिणीताई गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलोचना माने व शुभांगी माने यांनी केले होते. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रमुख उपस्थिती राजेश दादा खर्डे (वेसावकर) यांची पारंपरिक कोळी वेशातील दमदार एन्ट्री. त्यांच्या आगमनाने ...

अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना “मातृभूमी समाजरत्न” पुरस्कार

Image
संघर्षाचा झेंडा राज्यस्तरावर फडकला! अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना “मातृभूमी समाजरत्न” पुरस्कार बीड (प्रतिनिधी ) : कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरणारे इंटक जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांना राज्यस्तरीय “मातृभूमी समाजरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. संघर्षातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या जमाले यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. मातृभूमी प्रतिष्ठान आयोजित भव्य सोहळ्यात अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांच्या हस्ते जमाले यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी जमाले यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचे आणि निर्भीड भूमिकेचे कौतुक केले. जिल्ह्यातील कामगार प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क, शासकीय योजनांतील त्रुटी, तसेच विविध विभागांतील अनियमिततेविरोधात जमाले यांनी मोर्चे, धरणे, निवेदने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर त्यांनी उघडपणे टीका करत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. ...