Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महाजनवाडी ते अयोध्याधाम पायी जाणाऱ्या रथयात्रेचे लिंबागणेश येथे भव्य स्वागत

Image
बीड  प्रतिनिधी :-श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र महाजनवाडी, ता. बीड येथून अयोध्याधामकडे निघालेल्या ७५ दिवसीय सुमारे २ हजार किलोमीटर अंतराच्या पायी “नमो श्रीराम नाम रथयात्रा” दिंडी सोहळ्याचे लिंबागणेश येथे जल्लोषात व भक्तिभावाने भव्य स्वागत करण्यात आले. ही ऐतिहासिक व अध्यात्मिक रथयात्रा रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान मंदिर, श्रीक्षेत्र महाजनवाडी येथून प्रारंभ झाली असून गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे तिची सांगता होणार आहे. ही यात्रा केवळ पायी चालण्यापुरती मर्यादित नसून, अखंड श्रीराम नामस्मरण, भक्ती, त्याग, सेवा, समाजजागृती व अध्यात्मिक संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ आहे. पायी नामजप करीत ही रथयात्रा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी रामकथा, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लिंबागणेश येथे रथयात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्रीराम ना...

पत्रकारितेला समाजसेवेची दिशा देणारे, वंचितांचा आधार आणि पीडितांचा आवाज : प्रा. बालाजी जगतकर

Image
शब्दांना धार आणि विचारांना ठामपणा असलेले, अन्यायाविरोधात नेहमीच उभे राहणारे आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बनलेले डॅशींग पत्रकार प्रा. बालाजी जगतकर आज आपल्या आयुष्याचा आणखी एक सुवर्णक्षण साजरे करत आहेत. त्यांच्या लेखणीतून केवळ बातम्या नाहीत, तर समाजबदलाची चळवळ उभी राहते. अशा या निर्भीड, संवेदनशील आणि समाजभान असलेल्या पत्रकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!  प्रा. बालाजी जगतकर हे आजच्या पत्रकारितेतील एक वेगळे, ठळक आणि विश्वासार्ह नाव आहे. ते केवळ बातमी देणारे पत्रकार नाहीत, तर समाजातील वंचित, पिडीत आणि दुर्लक्षित घटकांचा खरा आवाज आहेत. त्यांच्या लेखणीमध्ये धार आहे, पण त्याहून अधिक त्यात माणुसकी आहे. नेहमी हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे प्रा. जगतकर हे स्वभावाने जितके साधे आहेत, तितकेच ते विचारांनी ठाम आहेत. सामान्य माणसाचे दुःख, अडचणी, प्रश्न आणि अन्याय त्यांच्या मनाला सतत अस्वस्थ करत असतात. त्यामुळेच ते या प्रश्नांना शब्द देतात, त्यांना दिशा देतात आणि थेट शासनाच्या दालनापर्यंत पोहोचवतात. एखादी समस्या समोर आली की, ती फक्त छापून थांबणे त्यांना मान्य नसते...

अखेर चिमुकल्यांच्या आक्रोशाने जिल्हा प्रशासन जागे

Image
अखेर चिमुकल्यांच्या आक्रोशाने जिल्हा प्रशासन जागे सव्वा दोन महिन्यांपासून लिंबाच्या झाडाखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘वनवास’ संपला सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश; प्रसारमाध्यमांचे आभार – डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. ११ )माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण जिल्हा परिषद शाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या दत्तनगर वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांना अखेर त्यांच्या हक्काची शाळा इमारत मिळाली आहे. शाळेसाठी सुसज्ज इमारत उपलब्ध असतानाही शाळेकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली, उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत होते. या गंभीर प्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पालकांनी वरिष्ठ कार्यालयांकडे वारंवार लेखी निवेदने सादर केली होती; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सहकारी, शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थ्यांनी दि. ०५ जानेव...

'कुशल तरुणाईच्या माध्यमातून ‘विकसित गोवा २०२७’चा संकल्प दृढ' – मुख्यमंत्री सावंत

Image
'कुशल तरुणाईच्या माध्यमातून ‘विकसित गोवा २०२७’चा संकल्प दृढ' – मुख्यमंत्री सावंत उच्च शिक्षण, साक्षरता व कौशल्य विकास क्षेत्रातील उपक्रमांना राष्ट्रीय स्कोच पुरस्कार पणजी, १० जानेवारी २०२६ : गोवा सरकारला उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता आणि कौशल्य विकास क्षेत्रातील उपक्रमांसाठी अनेक राष्ट्रीय स्कोच पुरस्कार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण आणि कौशल्य विकासाचे परिणाम बळकट करण्याच्या राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत, १० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योग-शिक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या “कन्व्हर्ज - शिक्षा उद्योजक संगम” या उपक्रमासाठी उच्च शिक्षण संचालनालयाला सन्मानित करण्यात आले. गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (SCERT) गोवा राज्य पूर्णपणे साक्षर झाल्याबद्दल सुवर्ण स्कोच पुरस्कार मिळाला, तर शिक्षण संचालनालयाला मुख्यमंत्री शिक्षण सहाय्य योजनेसाठी रौप्य स्कोच पुरस्कार प्रदान करण्यात आला.  या योजनेअंतर्गत इयत्ता १०वी आणि १२वी...

संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्यान्‌पिढ्या मार्गदर्शक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्यान्‌पिढ्या मार्गदर्शक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत वामनभाऊ महाराज यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कळशारोपण कार्यक्रम युसुफ पठाण प्रतिनिधी बीड दि. 10 : समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अधिकच सुसंगत ठरत असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्यान्‌पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. संत वामनभाऊ महाराजांच्या ५० व्या, सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार धनंजय मुंडे, सुरेश धस, मोनिका राजळे,  योगेश क्षीरसागर, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, विक्रमानंद शास्त्री, स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घे...

हर्षद टायर्स या दोन क्रमांकाच्या भव्य शाखेच्या शोरूमच्या उद्घाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मुकुंद लंगडे

Image
बीड वडवणी प्रतिनिधी ,अंकुश गवळी  वडवणी तालुक्यातील खापरवाडी रत्नापूर परिसरातील मुकुंद वसंत लंगडे हे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले हे व्यक्तिमत्त्व आता यांच्या माजलगाव शहरांमध्ये त्यांच्या BKT या कंपनीच्या या दोन शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत, याच शाखेचा भव्य उद्घाटन शोरूमच्या सोहळा सोमवार दिनांक 12,1.2026, सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे, यावेळी हर्षद टायर्स या BKt शोरूमच्या भव्य उद्घाटन समारंभ युवा उद्योजक मुकुंद लंगडे यांच्या आई-वडिलांचे हस्ते करण्यात येणार आहे, तरी पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आव्हान युवा उद्योजक हर्षद टायरचे संचालक मुकुंद लंगडे यांनी केले आहे,

महा एनजिओ फेडरेशन आणि लेक लाडकी अभियान यांच्या वतीने मौजे कुक्कडगाव चे भुमिपुत्र यशवंत कदम यांचा सेवापुर्ती निमित्ताने सन्मान

Image
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव चे भुमिपुत्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड चे सचिव यशवंत राणाप्रताप कदम पस्तीस वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शासन सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि लेक लाडकी अभियान यांच्या वतीने सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दैनिक आत्ताचा एक्स्प्रेस जिल्हा प्रतिनिधी किशोर देवा कुलकर्णी, साप्ताहिक संघर्ष यात्रा चे संपादक आत्माराम वाव्हळ, प्रकाश गाढे, पत्रकार संजय कुलकर्णी, कुक्कडगाव ग्रामपंचायत सदस्य आत्माराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, सोनवणे मॅडम, भागवत वैद्य, तुळशिदास पवार,सुदाम आरेकर, महा एनजीओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.        बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव येथील भुमिपुत्र यशवंतराव राणाप्रताप कदम शासकीय सेवेतुन प्रदिर्घ काळानंतर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार आणि सन्मान महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केला होता.