Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जुनाट प्रथा झुगारून एकल महिलांचा– तिळगुळ कार्यक्रम

Image
बीड प्रतिनिधी:- एकल महिला संघटना आयोजित मकर संक्रांत निमित्ताने परंपरेला समाज प्रबोधनाची जोड देऊन एकल महिलांचा तिळगूळ कार्यक्रम झाला. विधवा महिलेचा तिळगुळ विधायक कार्यक्रम बीड येथील गर्गे वाचनालय येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी ताई नागापुरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला तसेच उपस्थितीमध्ये घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली  एकल महिलांचा हळदी- कुंकू कार्यक्रम हा परंपरेला छेद देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलत्या जीवनमानात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एकल महिलांसाठी केलेल्या कामकाजाचा बद्दल माहिती व तसेच सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या कार्यावर रुक्मिणीताई नागापुरे यांनी मार्गदर्शन केले  महिलांशी एकटेपण पेलताना या विषयावर संवाद केला. आयुष्यात संकट आली तरी संघर्ष हा करावा लागतो. महिलाही खंबीरपणे आयुष्य हे पेलत असते. आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांच्या जीवनाबद्दल त्यांनी माहिती दिली. आज अनेक भगिनींना घरातील कमवता व्यक्ती गेल्या...

महामानव अभिवादन ग्रुप तर्फे प्रकाश आंबेडकर नगर येथे 43 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Image
वाचाल तर वाचाल तर्फे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे बक्षीस वितरण  बीड (प्रतिनिधी ) आपल्या देशात अनेक थोर महापुरुष व आदर्श महामाता होऊन गेल्या आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ व आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले,समाज सुधारक व शिक्षण तज्ञ शेख फातिमा व महाराणी अहिल्याबाई होळकर अशा अनेक थोर महामातांचे जयंती दिन सणासारखे संपन्न करून त्यांच्या जीवन कार्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे व नवीन पिढी पुढे त्यांचा आदर्श कसा राहील हे समजावून सांगणे गरजेचे आहे तरच राष्ट्र प्रेमाने प्रोत्साहित होऊन सुसंस्कारित पिढी घडेल असे प्रतिपादन समता सैनिक दलाच्या कंपनी कमांडर सुजाता वासनिक यांनी केले. "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाने महामानव अभिवादन ग्रुप संचलित प्रकाश आंबेडकर नगर येथील मोफत शिकवणी वर्गात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून भारतीय सेनेच्या बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये 30 वर्षे सेवा करून निवृत्त झालेले ऑनररी सुभेदार मेजर मोहन घाडगे तर प्रमुख ...

पहिला वन जैवविविधता महोत्सव पणजीत उत्साहात सुरू

Image
पहिला वन जैवविविधता महोत्सव पणजीत उत्साहात सुरू ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ संकल्पनेतून जंगले, वन्यजीव व पारंपरिक ज्ञानाचा गौरव पणजी, १७ जानेवारी २०२६ : पहिला वन जैवविविधता महोत्सव आज पणजी येथील आर्ट पार्कमध्ये सुरू झाला. गोवा वन विकास महामंडळाने आयोजित केलेला हा महोत्सव, 'गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील ओळख' (गोवा बियॉन्ड बीचेस) सादर करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पित करण्यात आला आहे, ज्यात जंगले, वन्यजीव, पारंपरिक ज्ञान आणि समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाश्वत पद्धतींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.  ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटवणारा महोत्सव:- या महोत्सवात असे अनुभव-आधारित दालन आहेत, जे सजीव परंपरा आणि शाश्वत पद्धती अधोरेखित करतात. अभ्यागत 'आंगण अनुभव' (Angon Experience) पाहू शकतात, जिथे चणेकार, खाजेकार, नारळाच्या वस्तू बनवणारे कारागीर, मातीची भांडी बनवणारे कुंभार, माळी आणि कोकेडामा कलाकार यांच्याद्वारे पारंपरिक कौशल्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. 'ग्रीन बाजार'मध्ये पर्यावरणपूरक उत्पादने आणि वनांवर आधारित उपजीविका सादर केल्या जातात, तर 'फॉर...

जनमत चाचणीची आठवण जपणारा गोवा अस्मिता दिन साजरा

Image
जनमत चाचणीची आठवण जपणारा गोवा अस्मिता दिन साजरा जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याचा पारंपरिक वारसा संरक्षित – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पणजी, १६ जानेवारी २०२६ : राज्याची वेगळी ओळख, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा याबद्दलचा अभिमान अधोरेखित करण्यासाठी आज पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात गोवा अस्मिता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गोव्याच्या राज्यत्वाचे महत्त्व अधोरेखित करून गोव्याची अद्वितीय ओळख जपण्याच्या महत्त्वाविषयी तरुण पिढीमध्ये जागरूकता वाढवण्याचा उद्देश सांगण्यात आला. १९६७ च्या ऐतिहासिक जनमत चाचणीच्या स्मरणार्थ गोवा अस्मिता दिन साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जनमत चाचणीत गोव्याच्या जनतेने महाराष्ट्रात विलीन होण्याच्या विरोधात मतदान करून एक स्वतंत्र राज्य म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने गोव्याच्या वेगळ्या ओळखीचा पाया घातला, जी आजही आत्मसन्मान, सांस्कृतिक अभिमान आणि लोकशाही निवडीचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते.  जीआय-टॅग उत्पादनांमुळे गोव्याची अद्वितीय ओळख जपण्यास मदत:- मुख्यमंत्री उपस्थितां...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिपकभाऊ बो-हाडे यांना पाठिंबा देण्यासाठीलिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधव मुंबईकडे रवाना होणार

Image
लिंबागणेश : (दि. १७) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे हे दि. २१ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या न्याय्य मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि. १७ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य प्रवेशद्वारावर धनगर समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “जय मल्हार बोलो, मुंबई चलो”, “दिपकभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. दिपकभाऊ बो-हाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या न्याय मागणीला मराठा समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधवांचा जाहीर पाठिंबा असून, सर्व समाजबांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मरा...

अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

Image
अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट  वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला  बीड प्रतिनिधी : (दि.१६)बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील अंजनवती गावात काल मध्यरात्री बिबट्याने राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या बोकडावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुपारी वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तर चौसाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी बहिरवाळ यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे लिंबागणेश पंचक्रोशीमध्ये काही दिवसांपूर्वी मागे पडलेला बिबट्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेवण येडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री अंजनवती गावातील अर्जुन येडे यांनी शेतात बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्याच सुमारास, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या गोठ्यातील बोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांच्या मते बिबट्याने बोकड उचलून नेला असावा. दुसऱ्या दिवशी दुपारी शोध घेत...

ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Image
गेवराई (प्रतिनिधी ): मकरसंक्रांतीसारख्या सणासुदीच्या काळात नवीन गेवराई परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत लाईट जात असल्यामुळे हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन गेवराई येथील माऊली फिडर व नवीन गेवराई फिडर हे जवळपास दररोज सकाळच्या वेळेत बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे ही वीजखंडिती नियमितपणे होत असताना त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. सबस्टेशनला फोनद्वारे संपर्क साधल्यास “लोड वाढल्याने लाईट बंद केली जाते” असे कारण दिले जाते. मात्र, दररोज सकाळच्या ठराविक वेळेत लाईट कशी आणि का जाते, याबाबत अजूनही रहस्य कायम आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस उत्तर अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. सणासुदीच्या काळात महिलांची संध्याकाळची वर्दळ वाढलेली असते. अशा वेळी अंधारामुळे गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत न...