Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाटोदा शहरात दहावीपर्यंत एकही जिल्हा परिषद शाळा नाही हे पाटोद्याचे भाग्य की दुर्भाग्य?

पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकही जिल्हा परिषद शाळा उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्य कुटुंबांसाठी शिक्षणाचा आधारस्तंभ मानली जाते. मात्र पाटोदा शहरातच अशी सुविधा नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडत आहे. अनेक पालकांनी शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पाटोदा शहरात दहावीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, शहरातच शासकीय शिक्षणाची सोय नसणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा भाग असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही जणांच्या मते, खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असल्यामुळे शासन जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष करत आहे,असा सवालही उपस्थित केला जात आहे.पाटोदा शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ...

परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लीनिक चे उदघाटन संपन्न

Image
बीड प्रतिनिधी :- दिनांक 31 मार्च 2026 रोजी मौजे मानूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी श्री. ष.ब्र. 108 गुरुविरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते डॉक्टर जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लिनिक चे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.मानूर या ऐतिहासिक नगरीत आणि पुरातन बाजारपेठ असूनही येथे रुग्णाचे हाल होतात येथे दर्जेदार एमेरजन्शी वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने डॉ जितीन वंजारे यांनी येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 31 मार्च रोजी सर्वांच्या उपस्थिती त संजीवनी क्लिनिक चा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानूर नगरीचे जेष्ठ नेते दशरथरावजी वणवे दादा माजी जी प सदस्य यांनी लागेल ते सहकार्य करू, वैद्यकीय सेवा चांगली पुरवा, जास्तीत जास्त वेळ देता येईल हे प्रयत्न करा आणि गावाकऱ्यांची सेवा करा असे आपल्या भाषणात बोलले यानंतर जी प सदस्य रामदास नाना बडे यांनी आपल्या भाषणात डॉ जितीन वंजारे यांना शुभेच्छा दिल्या आणि मानूर नगरीत डॉक्टर ची नितांत गरज आहे, वाटेल ते सहकार्य करू, किफायतशीर दरात योग्य सेवा द्या असे बोलून शु...

हायटेक सिग्नल की हायटेक भ्रष्टाचार ? सुरू होण्यापूर्वीच कोसळले ! बीडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड (दि.०२) : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या गाजावाज्यात बसविण्यात आलेले ६४ लाख रुपये खर्चाचे हायटेक सिग्नल सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका परिसर आणि शिवराज पान सेंटर चौक या चार ठिकाणी प्रत्येकी १६ लाख रुपये खर्चून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र नगर नाका परिसरातील सिग्नल अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले सिग्नल देखभाल अभावी निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल तरी टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आ...

शेती जमिनीवर अतिक्रमणाचा गंभीर प्रकार; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) — संत चोखामेळा सहकारी संस्था मर्यादित, परळी वै. यांच्या मालकीच्या शेती जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सन १९६१-६२ पासून सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेजारील काही व्यक्तींनी बेकायदेशीर कब्जा करून बांधकाम सुरू केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. ४४० मधील मेसाजी आबाजी जगतकर व सिताराम भोजाजी जगतकर यांच्या सुमारे १० गुंठे जमिनीवर उत्तम भिमा राठोड व संतोष नामदेव राठोड यांनी अतिक्रमण करून थेट बांधकाम सुरू केले आहे. संबंधित बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, सर्व्हे नं. ४३९ मधील रामकिशन मिराजी जगतकर यांच्या जमिनीवर रमेश उत्तम गित्ते यांनी १० x १०० फुट जागेवर कब्जा करत विहिरीचे साहित्य टाकले आहे. हे साहित्य तातडीने हटवून जमीन मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, सर्व्हे नं. ४३९ मधील लक्ष्मण नारायण जगतकर व रानबा किशन ताटे यांच्या जमिनीवर एका शेजार्याने तब्बल एक ते दीड एकर क्षेत्रावर बांधकाम व तळ्याचे साहित्य ट...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

​माजलगाव (प्रतिनिधी ): माजलगाव तालुक्यातील चाहूरतांडा (तालखेड) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून ज्योती कृष्णा पवार (वय २६) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. ​ ​मयत ज्योती यांचे लग्न २०१८ मध्ये कृष्णा मनोहर पवार याच्याशी झाले होते. फिर्यादी आई संद्राबाई शामराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही वर्षे नीट नांदवल्यानंतर पती कृष्णा हा ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करू लागला. तसेच "तू रंगाने काळी आहेस, मला आवडत नाहीस" असे म्हणून हिणवत असे. यासोबतच, माहेरून गुत्तेदारीच्या कामासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार यांनी तिला वारंवार उपाशीपोटी ठेवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. ​ ​१२ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सासरच्या छळाला कंटाळून ज्योतीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिने विष घेतल्याचे समजूनह...

जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार

Image
जनसुरक्षा विधेयक रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू –रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष चा एल्गार बीड, दि. १ एप्रिल (प्रतिनिधी ): राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्ह्याच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, कामगारविरोधी धोरणांचा निषेध करत देशव्यापी ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हाध्यक्ष रामधन रानबा जमाले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकामुळे लोकशाही मूल्यांना तडा जाईल तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे कामगार वर्गावर अन्याय होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कायदे तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. इंटक च्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.  मुख्य म...

लिंबागणेश येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती; भालचंद्र विद्यालयात पालक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Image
लिंबागणेश(दि.०१ ): गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.०१) बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. रूपाली चिटकुलवार यांनी केले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्रांती देशपांडे आणि डॉ. सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीक...