Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महापुरुषांचा आवमान करणाऱ्या मुजोर अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा-- कुमार टकले (सर)

Image
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय/ जिल्हा परिषद शाळा/ पशुवैद्यकीय दवाखाना/ जनता विद्यालय /कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शासकीय जयंतीचा विसर   महापुरुषांचा आवमान करणाऱ्या मुजोर अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा-- कुमार टकले (सर)         आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :   दिनांक ३१ मे २०२६ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ( ३०१ ) र्वी शासन आदेशानुसार जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली .   प्रत्येक वर्षी या जयंतीनिमित्त आम्ही चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी जयंती साठी आवर्जून उपस्थित राहतोत . येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी होते . परंतु यावर्षी दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय केंद्रीय जिल्हा परिषद शाळा, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक व...

राज्य मंत्री कामगार मा.ना. आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठकीस कामगार नेते भाई गौतम आगळे रवाना

Image
परळी ( प्रतिनिधी ) मा.ना. राज्यमंत्री कामगार आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई मंगळवार दिनांक २ जून २०२६ रोजी दुपारी २: ३० वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीस कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर मुंबईस रवाना झाले आहेत,अशी माहिती रोजंदारी मजदुर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी दिली आहे.      याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर कामगार राज्यमंत्री मा.ना.आशिष जयस्वाल मंत्री महोदयांचे समिती कक्ष ३१९ विस्तार, मंत्रालय मुंबई, यांच्या अध्यक्षतेखाली कामगार विभागाने आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. सदरील बैठकीस प्रधान सचिव कामगार विभाग, प्रधान सचिव ऊर्जा विभाग, कामगार आयुक्त तसेच स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार कृती समिती चे सल्लागार व संयोजक   ‌कॉम्रेड नचिकित मोरे  संघटना, अध्यक्ष वामन बुटले ,उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर, तथा रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव. यांच्यासह राज्यातील कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, पारस, भ...

अंजनवती येथील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा-नितीन सोनवणे

Image
  बीड तालुक्यातील अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. लिंबागणेश–अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात किरण सोनावणे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ MH 16 AR 2661 क्रमांकाची दुचाकी आढळली असून वाहन केवळ खाली पडलेल्या अवस्थेत होते. वाहनाचे कोणतेही गंभीर नुकसान दिसून न आल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना अपघात नसून गळा दाबून खून झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नागरिकांसह ऑल इंडिया पॅंथर सेना सामाजिक संघटनांकडून होत आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाकडे या प्रकरणात तात्काळ भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, घटनेच्या वेळेत त्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या संशयितांची चौकशी, निष्पक्ष वैद्यकीय पथकाकडून इन-कॅमेरा पोस्टमार्टम, सर्व पुरावे जतन करून पार...

केज तहसीलदारांची धडक कारवाई, एका दिवसात पाच रस्त्याचे अतिक्रमण केले खुले.

Image
येवता:प्रतिनिधी :आप्पाराव सारूक दि.२९ रोजी केज तालुक्यातील लव्हुरी-कोठी या गावचे जुने अनेक वर्षापासून अतिक्रमण करून शिव रस्ते बंद केलेले होते.दोन्ही ग्रावच्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा रस्ता खुला करण्याची मागणी नियमा प्रमाणे तहसील कार्यालय,केज यांच्या कडे अनेक वर्षा पासुन होत असलेने.केजचे कर्तव्यदक्ष तहसीलदार,शुभम पवार यांनी आपल्या कर्मचारी फौज-फाट्यासह मस्साजोगच्या मंडळ अधिकारी,वैशाली देशमुख, ग्राम महसुल अधिकारी सज्जा,लव्हुरीचे ग्राम महसुल अधिकारी,अशोक चटप,भूमिअलेख कार्यालय,केजचे सुदाम चौरे,केज पोलीसांच्या बंदोबस्तात.शुक्रवारी दि.२९/०५/२०२६ रोजी लव्हुरी-कोठी येथील रस्ता अतिक्रमण कि.मी.खुले केले तसेच लव्हुरी येथील गट नं. ११०व १११ मधील पाच सर्वे नं. मधील अतिक्रमण खुले केले एकाच दिवसात पाच रस्ते खुले केल्याने शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा प्रश्न सुटलेने कर्तव्यदक्ष मा.तहसीदार साहेब शुभम पवार यांचे शिस्तप्रिय व धाडसी अधिकारी म्हणुन सर्वत्र चर्चा होऊन सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.       आमच्या प्रतिनिधीने कोठी येथील सरपंच संपर्क साधला"रस्त्याचा प्रश्न सोडविला तहसीलदार शुभम...

बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

Image
बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह गाठले तहसील कार्यालय; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईच्या घोषणा केवळ कागदावरच; डॉ. गणेश ढवळे यांचा आरोप लिंबागणेश( दि.३० ) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत २०० लोकसंख्या असलेल्या बेलेश्वरवस्तीवरील महिलांनी लेकराबाळांसह थेट बीड तहसील कार्यालय गाठून शेतरस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट तसेच शेतीच्या कामांसाठी वापरला जाणारा रस्ता काही व्यक्तींनी अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) व शेख युनूस उपस्थित होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेत मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी गणपत पोतदार यांना तातडीने स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. शेतरस्ता बंद झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागत, खत-बियाणे वाहतूक तसेच दैनंदिन ये-जा यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याने रस्ता तातडीने मोकळा करून...

जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे

Image
जांब (ता. शिरूर) येथे ढाकणे दलित कुटुंबावर अमानुष अत्याचार-ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध- नितीन सोनवणे  बीड | प्रतिनिधी जांब (ता. शिरूर) येथील अनुसूचित जातीच्या ढाकणे कुटुंबावर गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुषार माणिक ढाकणे, विजय ढाकणे व संगीता माणिक ढाकणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. किरकोळ कारणावरून — ढाकणे कुटुंबीयांच्या शेळ्या आरोपींच्या दारासमोर गेल्याच्या कारणावरून — हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तब्बल 9 महिला व 11 पुरुष सहभागी असल्याचा आरोप असून संपूर्ण घटना घरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे रात्री बीट अंमलदारांनी वाद मिटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील चौकात बैठक बोलावून तुषार ढाकणे यांना सार्वजनिकरित्या महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत सांगितले की, गावातील सरपंचांनी “मारा, काय करतोय बघून घेऊ” असे म्हणत आरोपींना प्रोत्साहन दिले. तसेच शिरूर पोलीस ठाण्या...

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्यासाठी समिती स्थापन

Image
एकल महिलांच्या प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मसुदा समिती नेमली आहे. एकल महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र धोरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहे एकल महिलांच्या क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून खूप समाधान आहे त्याबद्दल सरकारचे मनापासून अभिनंदन.!!  या मसुदा समितीमध्ये साऊ एकल महिला समितीचा राज्य निमंत्रक म्हणून हेरंब कुलकर्णी यांचासमावेश करण्यात आला आहे. यातून धोरणात्मक सूचना करता येतील..  राज्य सरकारने महिला धोरण जाहीर केले तरीसुद्धा या एकल महिलांची मोठी संख्या बघता स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. २०११ साली महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या ५४लाख होती ,ती १५ वर्षानंतर किमान ७०लाख असेल. त्यामुळे या महिलांचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक ग्रामीण शहरी असे सर्व प्रश्न बघता धोरणाची गरज होतीच.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणात एकल महिलांसाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्या घोषणेच्या अंमलबजावणीची विनंती केल्यावर मुख्यमंत्री यांचे संवेदनशील प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी एकल महिला प्रश्नावर दोन बैठक...