Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

सद्भावना सायकल यात्रेचे पाटोदा शहरात उत्स्फूर्त स्वागत

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) स्नेहालय संस्थेच्या युवानिर्माण प्रकल्प व समविचारी सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रव्यापी ‘सद्भावना सायकल यात्रा क्र. ११’ चे पाटोदा शहरात मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. “प्रत्येक माणूस मोलाचा” हा संदेश समाजात रुजविण्यासाठी निघालेल्या या यात्रेचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. पाटोदा शहरात यात्रेचे स्वागत करताना नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव,गटनेते बळीराम पोटे,माजी नगरसेवक बालाजी जाधव,माजी सभापती संदीप जाधव,बाळुशेठ जाधव,नामदेव जाधव,युवानेते जितेंद्र भोसले,पत्रकार गणेश शेवाळे, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यात्रेतील सहभागी सदस्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करत सद्भावना, बंधुता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.समाजात वाढत चाललेली धार्मिक तेढ,द्वेष, हिंसा व तणाव कमी करून जात- धर्म-भाषा-लिंग अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन माणुसकीचा विचार प्रबळ करणे, हा या सद्भावना सायकल यात्रेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र धर्म जागवाव...

मलकापूर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराने युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ सन्मानित

Image
 बीड प्रतिनिधी . :- मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघा च्या वतीने आयोजित दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2026 कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये गेवराई तालुक्यातील मौजे ईटकुर येथील प्रतिभावंत युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ यांना सन्मानित करण्यात आले.    या शानदार सोहळ्यात बीड जिल्ह्यातील मौजे ईटकुर येथील प्रतिभावंत युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ यांना राज्याचे सहाय्यक माहिती आयुक्त मा निलेशजी तायडे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.     महाराष्ट्र राज्यातील वेग...

उच्चशिक्षित तरुणांची शेतीकडे वाटचाल : महासांगवीत रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग; तहसीलदार निलावाड यांच्याकडून विशेष कौतुक

Image
 पाटोदा (प्रतिनिधी ) आजच्या स्पर्धात्मक युगात उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी व्यवसाय उभारता येतो, हे महासांगवी येथील श्रीकृष्ण गर्जे व प्रल्हाद गर्जे या दोन सख्ख्या भावंडांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. M.Com. व B.Ed. सारखे उच्च शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या संधी न मिळाल्याने खचून न जाता,या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रेशीम शेतीचा मार्ग स्वीकारत आज आर्थिक स्वावलंबन साधले आहे. निराशेतून नवउद्योगाकडे प्रवास शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करूनही अपेक्षित संधी न मिळाल्याने गर्जे बंधूंनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा व शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय शोधताना त्यांनी रेशीम शेतीचा अभ्यास केला. तज्ज्ञांचे मार्गदर्शन,प्रशिक्षण आणि आधुनिक पद्धती आत्मसात करत त्यांनी हा प्रयोग सुरू केला.शासकीय योजनांचा योग्य वापर रेशीम शेतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत (EGS) शेतकऱ्यांना आर्थिक मदत...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुरज जावळे यांची एकमताने निवड; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) संपूर्ण देशाला सामाजिक न्याय, समता व बंधुतेचा संदेश देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुरज जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात सागर आप्पा धस, नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव तसेच नगरसेवक प्रकाश जावळे यांनी सुरज जावळे यांना शुभेच्छा देत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.सुरज जावळे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा जयंती उत्सव अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास आंबेडकरवादी कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि समाजप्रबोधन करणारा ठरेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल; प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा!

Image
एकाच दिवसात ३० लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल; प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा!  निदान दर्शनी भागातील रेल्वे स्टेशनवरील वाळलेल्या झाडांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी “विवेक” जागा ठेवून पाहावे :- डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. ०७) हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची "इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र, या वृक्षलागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. “वृक्षलागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता, तिचे संगोपन व संवर्धन महत्त्वाचे असते. निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील लागवड केलेल्या झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनाच्या झगमगाटानंतर झाडांची दुरवस्था...

पाटोद्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा; अंगद सांगळे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा लेखणी देऊन सन्मान

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष अजय जोशी हे होते. या कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांचे मावळे अंगद सांगळे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. लेखणी ही पत्रकाराच्या सत्य, निर्भीड व निःपक्ष पत्रकारितेचे प्रतीक असल्याने या सन्मानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी युवा पत्रकार जितेंद्र भोसले यांनी पत्रकारितेच्या मूल्यांवर आपले विचार मांडले. समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणारी, सत्यनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता हीच लोकशाहीचा खरा कणा असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय भाषणात अजय जोशी यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत लोकहितासाठी काम करत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पत्रकारितेची मूल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे आभा...

जातीय द्वेषातून रा.प. अधिकार्याकडून सातत्याने छळ

  बीड । प्रतिनिधी :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बीड आगारात कार्यरत असलेले वाहतूक निरीक्षक भिमकिरण विनायक बनसोडे यांनी वरिष्ठ अधिकारी निलेश पवार यांच्यावर जातीय भावनेतून मानसिक, प्रशासकीय व वैयक्तिक छळ केल्याचा गंभीर तक्रार करत रा .प.प्रशासनाकडुन न्याय देण्यात यावा मागणी केली आहे. मागासवर्गीय समाजातील असल्यामुळेच आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा थेट तक्रार त्यांनी केलीआहे. बनसोडे हे मागील दोन वर्षांपासून बीड आगारात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना, सन 2022-23 या कालावधीत तत्कालीन आगार व्यवस्थापक निलेश पवार यांनी जाणीवपूर्वक खराब सी.आर. लिहून बढती रोखण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार त्यांनी केली. सहाय्यक वाहतूक अधिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि प्रतिक्षा यादीत नाव असतानाही जातीय आकसातून बढतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न वरीष्ठ अधिकारी श्री निलेश पवार करीत आहेत. यानंतर निलेश पवार यांची बदली विभागीय कार्यशाळेत ओ.एम.ई. म्हणून झाली. मात्र तेथे असतानाही त्यांना कर्मचारी वर्ग अधिकारी (डीपीओ) पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आणि त्या अधिकाराचा गैरवापर करून बनसोडे यांची बीड ...