Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे 'बाल आनंद मेळावा' उत्साहात संपन्न

Image
​बीड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य आणि आत्मविश्‍वास वाढीस लागावा, या उद्देशाने शहरातील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे नुकताच 'बाल आनंद मेळावा' अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्याला पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ​ ​या मेळाव्यात शाळेच्या बालचिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध स्टॉल्स लावले होते. यामध्ये प्रामुख्याने: ​खाद्यपदार्थ: घरगुती पौष्टिक फराळ आणि अल्पोपहार.खेळणी व वस्तू: मुलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला वस्तू आणि खेळणी. इत्यादीची  विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तूंचे दर ठरवून त्यांची विक्री केली. ​केवळ पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्ष जीवनात व्यवहार कसा करावा, ग्राहकांशी कसे बोलावे आणि हिशोब कसा ठेवावा, या गुणांचा विकास व्हावा हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी अतिशय चपळाईने स्टॉल सांभाळत आपल्या विक्री कौशल्याने सर्वांची मने जिंकली. विद्यामंदिरआपल्या पाल्यांमधील हा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून पालकांनी शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या मेळाव्यामुळे मुलांच्या संवाद कौशल्यात ...

अखेर अजितदादांनी यशवंतराव नाट्यगृहात केलेला वादा निभावला..तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी दिला.अजितदादांचे आभार- डॉ.गणेश ढवळे

Image
अखेर अजितदादांनी यशवंतराव नाट्यगृहात केलेला वादा निभावला..तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी दिला.अजितदादांचे आभार- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर   बीड शहराचे वैभव असणा-या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची कित्येक वर्षांपासून दुर्दशा झाली होती. अभिनेते शरद पोंक्षे सारख्या नाट्यकलावंताने "माफ करा पण पुन्हा या नाट्यगृहात कधीच येणार नाही" म्हणत अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली होती.... बीड शहरातील नाट्य कलावंत , सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अजितदादा यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच बीडमधील कलावंत आणि रसिकांना सुखद धक्का दिला आहे... दादांचे मनस्वी आभार.... पालकमंत्री अजितदादा पवार यांचे बीडमधील यासाठी पाठपुरावा करणारे सध्याचे बळीआप्पा गवतेंसह सर्वच स्थानिक नेते आणि पुर्वाश्रमीचे योगेश क्षीरसागर यांच्या समवेत असणारे कार्यकर्ते त्याच बरोबर शिवसेनेचे सचिन मुळुक, आनिलदादा जगताप, प्रतिक कांबळे ज्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांचे आभार... नाट्यगृह बचाव समितीचे आंदोलन.... दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी ना...

धानोरा रोडची निर्मिती 50 फूट रुंदीकरणासह करण्यात यावी:बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय मागणी

Image
बीड प्रतिनिधी : धानोरा रोडच्या सुरू झालेल्या कामाच्या संदर्भात आज बीड शहर बचाव मंच व सर्वपक्षीय प्रतिनिधींनी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्वांच्या वतीने निवेदन करण्यात आले की धानोरा रोडचे नवनिर्माण वाढत चाललेल्या विस्तारानुसार व रहदारीच्या गरजेनुसार पुरेशा रुंदीकरणासह करण्यात यावे. नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मा. निलेश फडसे साहेब यांनी बीड नगर परिषदेचा कार्यभार हातात घेतल्यानंतर तात्काळच बऱ्याच वर्षांपासून व खूपच काळ प्रलंबित राहिलेल्या धानोरा रोड साठी प्राधान्यक्रम देऊन नव निर्मिती साठी व त्यासंदर्भातील मंजुरींसाठी सहकार्य केलेले आहे. तरी वस्तुस्थिती अन्वये धानोरा रोड हा बीड शहराला नूतन मुख्य रेल्वे स्थानकाला तसेच अनेकानेक गाव खेड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर नऊ ते दहा शाळा-विद्यालये आहेत. तसेच शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच वाढत्या लोकसंख्येप्रमाणे धानोरा रोड वरून मोठे दळणवळण दररोज होत असते. धानोरा रोड वरून होणाऱ्या दैनंदिन रहदारीच्या गरजेनुसार या रस्त्याचे नवनिर्माण भक्कम पद्धतीचे, दर्जेदार व पुरेश...

पंचशील नगर येथे भीमगीतांचा कडकडाट; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम संपन्न

Image
पंचशील नगर येथे भीमगीतांचा कडकडाट; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम संपन्न नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम; भीमप्रेमींची अलोट गर्दी ​बीड (प्रतिनिधी) :भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या शौर्य गाथेला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्य दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील पंचशील नगर येथे भव्य 'भीमगीत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या सुमधुर आवाजाने पंचशील नगर परिसर भीममय झाला होता. नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद अण्णा शिंदे आणि रंजीत बनसोडे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ​ ​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी उपस्थिती लावून अभिवादन केले. त्यांच्यासोबतच नगरसेवक विनोद मुळूक, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे आणि आरतीताई बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला उजाळा देत उपस्थितांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ​ ​गायक संतोष जोंधळे यांनी सादर केलेल्या क्रां...

निर्भीडपणे सत्यशोधन करणाऱ्या पत्रकारामुळेच देशातील लोकशाही जिवंत- मिलिंद घाडगे

Image
परळी प्रतिनिधी . भारतीय राज्यघटनेने बहाल केलेली धर्मनिरपेक्ष लोकशाही निर्भीडपणे सत्याचा शोध घेणाऱ्या काही मोजक्याच पत्रकारांमुळे टिकून आहे. स्वाभिमानी पत्रकारांनी निसार्थपणे वंचित समूहांच्या समस्यांना प्राधान्य देऊन जगासमोर सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा उघड करून चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केले आहे.               नुकतीच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या निवासस्थानी करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण दौंड, कार्याध्यक्ष आत्मलिंग शेट्टे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, कोषाध्यक्ष संदीप मस्के, उपाध्यक्ष अभिमान मस्के, सचिव माणिक कोकाटे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख विजय रोडे, सहकोषाध्यक्ष गणेश अदोडे इत्यादी पत्रकारांचा पुष्पहार, समतेचा स्कार्फ, व डॉक्टर बाबासाहेब आ...

गोव्यातील प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी ‘कुशावती’ तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती

Image
पणजी, ३१ डिसेंबर : गोव्यातील प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी गोवा सरकारने ‘कुशावती’ हा राज्याचा तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा परिषदांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शासन व नागरिकांमधील अंतर कमी होऊन प्रशासन अधिक सुलभ होणार आहे. नवीन कुशावती जिल्ह्यात सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा हे तालुके समाविष्ट असतील. भौगोलिक सलगता, समान संस्कृती आणि जीवनशैलीमुळे हे तालुके एकमेकांशी जोडलेले आहेत. या जिल्ह्याला कुशावती नदीचे नाव देण्यात आले असून ही नदी चारही तालुक्यांतून वाहत असल्याने ती या भागाची ओळख ठरते. या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “गोव्यातील तिसरा जिल्हा म्हणून कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुशावती नदीला चालुक्य काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक बळकट होईल.” नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे नागरिकांना शासकीय कार्याल...

गोव्यातील जिल्हा पंचायत निकालांवर ‘म्हाजे घर’ योजनेचा ठसा

Image
गोव्यातील नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की स्थानिक पातळीवरील निवडणुका या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेल्या असतात. या निवडणुका केवळ राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी नसून, नागरिकांच्या अनुभवांवर आधारित शासनाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनसुद्धा ठरतात.   राज्य किंवा राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठमोठे मुद्दे आणि घोषणांनी मतदाराचे लक्ष वेधले जाते, पण स्थानिक निवडणुकांत मतदार अधिक प्रायोगिक दृष्टीने विचार करतात. त्यांच्या घरासमोरील रस्ते, दिवे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आणि सरकारी सेवा वेळेत मिळतात का, हे त्यांचे खरे मोजमाप असते. यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसले. मतदारांनी उत्साहाने मतदान केले आणि प्रशासनाच्या कामगिरीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ५,५२,८०७ मतदारांनी मतदानात भाग घेतला, तर मतदानाची टक्केवारी ७०.८१ इतकी राहिली, ही आकडेवारी नागरिकांची सहभागाची इच्छा आणि स्थानिक शासनाबद्दलची जागरूकता दर्शवते. ‘म्हाजे घर’ योजनेचा सुरुवात आणि हेतू ‘म्हाजे घर’ योजना गोवा सरकारने २०२५ मध्ये सुरू केली. दशकानुदशके प्रलंब...