Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

खालापूरी परिसरात हरणांचा धुमाकूळ, वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावे-डॉ जितीन वंजारे

Image
  बीड प्रतिनिधी :-औंदाच्या वर्षी पावसाळा पुढे ढकलल्या कारणाने पीक पेरणी उशिरा झालेली आहे त्यातच काही शेतकऱ्यांच्या कडे थोडेफार पाण्याची उपलब्धता असल्याकारणाने वेळेवर कापसाचे उत्पन्न घेतले गेले आहे परंतु हरणाच्या कळपांनी राणच्या रान खाऊन टाकले आहेत. ठिबक सिंचनावर तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे अतोनात नुकसान हरणाचे कळप करत आहेत खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या परिसरामध्ये राहुल मुंडे यांनी सांगितले की माझ्या शेतातील सर्व पीक हरणांनी खाल्ले आहे. वनविभाग गाढ झोपेत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात मा तहसीलदार साहेब आणि वनविभाग कार्यालयाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचे आव्हाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.

हक्काने हमालाकडून काम करुनघेणारे शासन मजूरी देण्यासाठी उदासीनराजकुमार घायाळ यांचे उपोषण सुरु

Image
बीड ( प्रतिनिधी   ) बीड जिल्ह्यातील 23 शासकिय धान्य गोदामा काम करणार्‍या हमालांना सहा महिन्यापासून मजूरी मिळाली नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. यासाठी 11 जुन ते 23 जून कामबंद आंदोलन केले तथापी मंत्रालयीन स्तरावर उदासीनता लक्षात घेवून कामबंद आंदोलन स्थगित करुन शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायतने संघटनचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या बेमूदत उपोषणाचा निर्णय घेतला तसे पत्र राज्याच्या पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव व जिल्हाधिकारी, बीड यांना देवून बीड सह राज्यात हमालीसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही तो तात्काळ द्यावा यासाठी आज दिनांक 1 जूलै 2026 पासून राजकुमार घायाळ यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरु केले राज्यात जेथे जेथे कंत्राटदारा शिवाय काम करुन घेतले जाते तेथे निधी उपलब्ध करुन दिलेला नाही त्यामूळे गेले 3 ते 6 महिन्यापासून हमालांना काम करुन मजूरी न मिळाल्याने हमालांची अवस्था दयनिय झालेली आहे. या बाबतच्या निवेदनातील पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.केलेल्या कामाची मजूरी तात्काळ मिळावी,औरंगाबाद हायकोर्टाने  तीन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमा...

किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष पुरस्कार २०२६’; ११ वर्षांच्या सामाजिक कार्याची पावती

Image
बीड प्रतिनिधी : (दि.०१) शिर्डी येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांना ‘समाजरत्न नारीशक्ती विशेष सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. शुभारंभ लॉन्स, निघोज-कोपरगाव हायवे, शिर्डी येथे झालेल्या या कार्यक्रमात सौ. रेखा राऊत व सौ. अश्विनी गडकर यांच्या हस्ते किस्किंदा पांचाळ यांना फेटा, ट्रॉफी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या ११ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या किस्किंदा पांचाळ यांनी समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना त्यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून गोरगरिबांसाठी एक महिना मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी ७५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत, कोणताही सामाजिक किंवा राजकीय वारसा नसताना स्वतःच्या जिद्द, मेहनत आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर त्य...

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन

Image
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ कोटी १४ लाख निधीची मागणी आ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन पाटोदा :- (दि.३० ) आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या, इमारतविरहित तसेच नव्याने वर्गखोल्यांची आवश्यकता असलेल्या शाळांसाठी १४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात आष्टी तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ८७ लाख, पाटोदा तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ३७ लाख आणि शिरूर तालुक्यातील शाळांसाठी ४ कोटी ९० लाख अशा एकूण १४ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७६ शाळा असून, मोडकळीस आलेल्या ११ शाळांमधील ३१ वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच विद्यार्थी संख्या वाढलेल्या ३ शाळांमध्ये अतिरिक्त ३ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. यासाठी ४ कोटी ८ लाख रुपये तसेच १८ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपय...

परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणासह किमान वेतनाप्रमाणे पगार थेट बँक खात्यामध्ये कधी मिळणार - भाई गौतम आगळे सर

Image
परळी वैजनाथ नगर परिषदेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणासह किमान वेतनाप्रमाणे पगार थेट बँक खात्यामध्ये कधी मिळणार - भाई गौतम आगळे सर परळी२९( प्रतिनिधी ) परळी वैजनाथ नगर परिषदे मधील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार थेट बँक खात्यात देण्यात यावा तसेच त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार २९ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता नगरपरिषद परळी वैजनाथ कार्यालयासमोर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषणास सुरुवात केली आहे अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.       या बाबत सविस्तर वृत्त असे की घनकचरा व्यवस्थापनातील सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी तसेच विविध विभागांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत असून त्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे असल्याची  बाब शासन व प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली. कंत्राटी कामगारांना सध्याचे किमान वेतन ०१/०१/२०२६ ते ३०/०६/२०२६ या कालावधी करिता जाहीर कर...

अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा; शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी — निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
अधिकाऱ्यांच्या निवासस्थान-कार्यालय दुरुस्तीचे ऑडिट करा; शाळांना निधी नाही मात्र अधिकाऱ्यांसाठी लाखोंची उधळपट्टी — निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने  बीड : (दि. २९) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना हात आखडता घेणारे जिल्हा प्रशासन मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदी वरिष्...

पंतांनी महाराष्ट्र नासवला जाती जातीत भांडणे लावून माणसात माणूस ठेवला नाही-डॉ जितीन वंजारे

Image
पंतांनी महाराष्ट्र नासवला जाती जातीत भांडणे लावून माणसात माणूस ठेवला नाही-डॉ जितीन वंजारे        महाराष्ट्र मध्ये गेल्या पंधरा-वीस वर्षापासून जेव्हापासून पंत एका विशिष्ट पदावर बसलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. सुरुवातीला हिंदू मुस्लिम त्यानंतर मराठा दलित, वंजारी-मराठा आणि आता महार-मांग म्हणजे तस्तम सर्वच जातीमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक एकात्मता भंग करण्याचे काम या ठिकाणी होत आहे.काही जातीवादी धर्मवादी संघटना यामध्ये तेल टाकत आहेत.नवतरुणांची माथे भडकवत आहेत.शेतकऱ्याची कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवून येथील तरुणांनी शासनाला जबाब विचारायला हवा, तात्कालीन सरकार आल्यापासून 90 वेळेस पेपर फुटी झालेली आहे आपल्या पाल्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न मिटत नाहीयेत, आपल्या पालकांचे शेतकऱ्यांचे शेतीच्या समस्या सुटत नाहीत, नदीजोड प्रकल्प, पाणी आडवा पाणी जिरवा, तळे तलाव मोठे प्रकल्प,शेतकऱ्याला कर्जमाफी, पीक कर्ज, विमा,अनुदान, दुष्काळ उपाय योजना,महागाई, विकास, भ्रष्टाचार,राम मंदिर 200 करोड चोरी, अत्याचार अन्...