Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे

Image
जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२८) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र, या घटनेला सहा महिने उलटूनही अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार? आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे. लिंबागणेश–बोरखेड रस्ता अद्यापही खचलेलाच बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड हा महत्त्वाचा रस्ता व पुल सप्टेंबरमधील पावसात वाहून गे...

बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन

Image
बीड (प्रतिनिधी ) : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा किंवा मूर्ती अनिवार्यपणे ठेवावी, असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या संस्कार विभागामार्फत करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनामध्ये सम्राट अशोक यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध धम्म भारतात व्यापक प्रमाणात प्रसारित झाला. त्याच परंपरेला पुढे नेत, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून या देशाला पुन्हा बुद्धधर्माची दिशा दिली. या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक बौद्ध संस्कार विधीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे स्थान अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे वि...

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणी टिप्परची समोरा -समोर धडक,आई आणी मुलाचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू

Image
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :        आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन आई आणि मुलाचा कार मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला .    हा अपघात इतका भीषण होता काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली .   आष्टी पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर काळाने घाला घातला .   मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात असताना कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली असून या भीषण धडकेत कारने लगेच पेट घेतला, आणि या कारमधून आई आणि मुलाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले . अपघाताची एवढी भीषणता होती की, कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.   या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळत...

धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न

Image
धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न  माया दिवाण व बौद्धाचार्य भास्कर सोनवणे यांचा सत्कार  बीड (प्रतिनिधी ) युद्धात निपुण असलेल्या प्रियदर्शी सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर जवळपास चक्रवर्ती सम्राट पद मिळवले होते. परंतु कलिंगा युद्धातील नरसंहार बघून त्यांनी तलवारीचा त्याग करून तथागतांच्या प्रज्ञा, शिल,करुणा मैत्री,समता, शांती व मानवाच्या कल्याणाचा पंचशील व अत:दीप भव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला शरण जाऊन व तसे आचरण करून जगात लोककल्याणकारी सम्राट म्हणून कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगाला युद्ध नको, तर बुद्ध विचारांची गरज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप व धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर पालवण रोड बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाच्याप्रसंगी अध्यक्षपदी प्रा. डॉ. नामदेव शिनगारे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. शिक्षण अधिकारी सखाराम उजगरे,प्राध्यापक डॉ .शिवाजीराव दिवाण, से.नी उपनिबंधक सहकार ॲड हनुमंत कांबळे मुख...

मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे

Image
मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२७ ): देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ते योजना’ प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, शेतरस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्याचा शासकीय योजनांवरील लाभ बंद केला जाणार आहे. तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह पुढील पाच वर्षे सर्व शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. शेतरस्त्यांच्या वादातून भांडणे, तणाव आणि पोलिसांत गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शासनाचा हा कठोर आदेश प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्रीच राहणार, असा सवा...

एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले.महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

Image
एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले. महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद सातारा प्रतिनिधी  : एकता फाउंडेशन, म.सा.प.शिरूर कासार आणि पाडळीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील पाडळी ता.शिरूर कासार येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दि.२४ मार्च रोजी नेत्रदीपक ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. तद्नंतर माजी आमदार ॲड.मा.उषाताई दराडे यांच्या अध्यक्षतेखालील संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांनी केले. द्वितीय सत्रात 'लेखक आपल्या भेटीला' आणि राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन (भाग एक) पार पडले. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.          दि.२५ रोजी सकाळी १० वाजता कथाकथन सत्राने संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात झाली. कथाकार रंजना सानप (मायणी जि.सातारा) यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात कडा ता.आष्टी जि.बीड चे जेष्ठ कथाकार वि.भा.साळुंके यांनी 'अशी गस्त झाली मस्त' ही विनोदी कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले. यानंतर ...

१७ वर्षांनंतर जुळला आठवणींचा गोफ; निगमानंद विद्यालयाच्या २००९ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

Image
​बीड प्रतिनिधी  : निमगाव (मा.) येथील निगमानंद विद्यालयाच्या सन २००९ च्या १० वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन बीडमधील हॉटेल सनराईज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल १७ वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रीण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाला उधाण आले. या सोहळ्याला अर्जुन थिटे सर, बेंद्रे सर, डोंगरदिवे सर आणि अशोक खोपडे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ​महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. स्वाती थिटे, आजिनाथ आंधळे, जगदीश लोणके (फौजी), विशाल खेडकर, डॉ. मच्छिंद्र भोसले, डॉ. संदीप सटले यांच्यासह अनेक मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील किस्से शेअर केले. ​ मान्यवर गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपापल्या करिअर आणि कौटुंबिक प्रवासाविषयी माहिती दिली. स्नेहभोजनाच्या आस्वाद घेत गप्पांचा कार्यक्रम रंगला. ​"शाळा सुटली तरी मैत्री सुटली नाही," अशी भावना व्यक्त करत, पुन्हा लवकरच भे...