Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

स्व. अमोल गलधर यांच्या जयंतीनिमित्त लिंबागणेश येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Image
लिंबागणेश :-(दि.०८) स्व. अमोल गलधर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार दि. ०८ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्व. अमोल गलधर युवा मंच, लिंबागणेश यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्व. अमोल गलधर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली. यावेळी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ, पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी स्व. अमोल गलधर यांच्या सामाजिक कार्याचा व जनतेसाठी दिलेल्या लढ्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. स्व. अमोल गलधर यांनी बीड रेल्वेसाठी उभारलेला संघर्ष, टॉवरवर चढून केलेले शोले स्टाईल आंदोलन, आकाशवाणी बंद पाडण्याचे आंदोलन, तसेच तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुतळ्याचे दहन करून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवण्याचे धाडसी आंदोलन यामुळे ते सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय होते. यासोबतच बीड जिल्हा रुग्णालयात गोरगरिबांच्या सेवेसाठी त्यांनी...

माता रमाईच्या त्यागामुळेच आपण सर्व भारतीय ऐशो अरामात जिवन जगत आहेत :- पप्पु गायकवाड

Image
माता रमाईच्या त्यागामुळेच आपण सर्व भारतीय ऐशो अरामात जिवन जगत आहेत :- पप्पु गायकवाड  निपाणी जवळका येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.  गेवराई (प्रतिनिधी ) दि. ७ तालुक्यातील मौजे निपाणी जवळका येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.   यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले माता रमाई यांनी कोणताच थाटमाट न करता मुंबई सारख्या शहरात शेणाच्या गौऱ्या थापून विकल्या आणि त्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह तर भागवलाच त्यातीलच काही पैशांची बचत करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांनाही पैसे देत त्यामुळे बाबासाहेब उच्च शिक्षण घेवु शकले आणि त्यांनी आपल्या समस्त भारतियांसाठी अजरामर असे संविधानरुपी राज्यघटणा दिली म्हणून आपण आज ऐशो अरामात राहत आहोत ते फक्त त्यागमुर्ती माता रमाई यांनी केलेल्या त्यागामुळेच असे मत जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजयकुमार(पप्पु)गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अनिल बोराडे, तालुका सरचिटणीस सुभाष बांगर, ...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती वैशाली बुद्धविहारात उत्साहात साजरी

Image
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती वैशाली बुद्धविहारात उत्साहात साजरी निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) : त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती वैशाली बुद्धविहार, पंचशील नगर, परळी येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रमाताई उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रानबा गायकवाड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार वेंकटेश मुंडे, भैय्यासाहेब आदोडे, सचिन रणखांबे, नवनाथ डाने, संपादक बालाजी जगतकर, प्रा. प्रवीण फुटके, दत्ता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आ...

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Image
लिंबागणेश : (दि. ०७) भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती आज शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले, तर सुरेश निर्मळ यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" हा ग्रंथ माता रमाईंना अर्पण केला होता. बाबासाहेबांनी रमाईंच्या त्यागाबद्दल लिहिताना म्हटले होते — "रमा, तू नसतीस तर मी भीमाचा भिमराव आणि भिमरावाचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो." डॉ. ढवळे यांनी माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत सांगितले की, लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेली रमाई, सासरीही अनेक आ...

अंबाजोगाई ग्रासलॅड सफारी” चा शुभारंभ

Image
         बीड, दि. 06   :बीड वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय परळी मध्ये जैवविविधता संवर्धन व रोजगार निर्मिती या उद्देशाच्या अनुषंगाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या वन विभागाच्या डोंगराळ, खुरट्या व गवताळ वनक्षेत्रात “अंबाजोगाई ग्रॅसलँड सफारी” या उपक्रमाची दिनांक 26. 1. 2026 रोजी विधानसभेच्या सदस्या नमिता मुंदडा अंबाजोगाई, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अंबाजोगाई नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, विभागीय वनाधिकारी अमोल गरकळ, विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीनिवास लखमावार, अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी दीपक वांजळे, अंबाजोगाई तहसीलदार विलास तरांगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी वनक्षेत्रात महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सोलापूर येथील 33 काळवीट जातीच्या हरणास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.        परळी वनपरिक्षेत्रा अंतर्गत अंबाजोगाई शहरालगत वन विभागाचे एकूण १३२८.०६ हे.आर सलग राखीव नक्षत्र आहे. सदरचे क्षेत्र हे डोंगराळ खुरट्या व गवताळ प्रकारचे आहे यामध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी जसे की हरिण, लांडगा, कोल्हा, बीबट, तडस इत्यादी प्रा...

माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादराजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय

Image
माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद राजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): माता रमाई जयंती उत्सव समिती, पंचशील नगर परळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणीव, विचारप्रवर्तक लेखन व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ही स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही निबंध स्पर्धा मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित घेण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गटसाधन केंद्र, परळी यांनीही मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजलक्ष्मी विकास जाधव (माऊंट लिटरा झी स्कूल, परळी) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक मानसी नवनाथ शेरकर (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मोहा) हिने मिळवला, तर तृतीय क्रमांक रिया रावसाहेब जगतकर (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला (कनिष्ठ) महाविद्यालय, पर...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर(१२८ वी जयंती विशेष)

Image
  भारतीय समाजक्रांतीच्या इतिहासात भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जसे तेजस्वीपणे झळकते, तसेच त्या क्रांतीच्या मूक शिल्पकार म्हणून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे.माता रमाई म्हणजे केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हे, तर त्यांनी उभारलेल्या सामाजिक क्रांतीच्या वाटेवर शांतपणे, निष्ठेने आणि त्यागाने साथ देणारी महान स्त्री होती. माता रमाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला. अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. शिक्षणाच्या फारशा संधी नसतानाही त्यांनी जीवनातून मिळणाऱ्या अनुभवांतून प्रगल्भता, संयम आणि सहनशीलता आत्मसात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला संघर्षांचे, उपेक्षेचे आणि कठोर वास्तवाचे अनेक पदर लाभले; मात्र माता रमाई यांनी कधीही तक्रार केली नाही, उलट त्या प्रत्येक संकटात बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांचे शिक्षण, संशोधन, चळवळी, परदेशातील वास्तव, आर्थिक अडचणी—या सर्व काळात रमाई यांनी संसाराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अनेकदा उपाशीपोटी राह...