Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार! 'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर

Image
शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार!    'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर  ​ आष्टी(प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  शिरूर कासार तालुक्यातील (जिल्हा बीड ') महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मग्रारोहयो) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील सावळागोंधळ आणि विहिरींच्या मर्यादित लक्षांकावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला. गरजू शेतकऱ्याला विहीर आणि गोठा मिळालाच पाहिजे, टार्गेटचे रडगाणे बंद करा, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे आणि उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रशासनाला निवेदनात दिला .  ​ मुख्य मागणी काय आहे-- ​शिरूर कासार पंचायत समितीने प्रत्येक ग्रामपंचायतला केवळ २० विहिरींचे तुटपुंजे टार्गेट देण्यात आल्याने यावर संताप व्यक्त करत शिवसेनेने गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निवेदन दिले .निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे--    ​थेट लाभ: शेततळे, गाय गोठा, शेळीपालन आणि जलसिंचन विहिरींचे अनुदा...

शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस

Image
शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस बीड प्रतिनिधी : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…” या संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा विचार प्रत्यक्षात उतरवत रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मा. पुरुषोत्तम (गोटू) वीर यांचा वाढदिवस यंदा अत्यंत वेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. बीड-गेवराई महामार्गावरील त्यांच्या शेतात वृक्षारोपण करून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यासह शहरातून विविध पक्षांचे नेते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने डीजे, फटाके आणि दिखाऊ खर्च टाळत मित्रपरिवाराने साधेपणाला प्राधान्य देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश दिला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम विशेष ठरला. “एक व्यक्ती, एक वृक्ष” या संकल्पनेतून अनेकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांनी...

रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती

Image
रामपुरी येथे आंबेडकर जयंती उत्सवात जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची उपस्थिती २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित गेवराई प्रतिनिधी – मौजे रामपुरी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. दिनांक २८ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी आयोजित या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन हे सकाळी १० वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जयंती उत्सवाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे, किशोर कांडेकर, सचिन उजगरे आदी मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. मौजे रामपुरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विकास शरणांगत, उपाध्यक्ष प्रविण शरणांगत तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक कचरू शरणांगत, विक्रम शरणांगत, धम्मपाल शरणांगत यांनी ही माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक संपन्न.

Image
बीड (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची महिला आघाडीच्या परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याची बैठक दिनांक २५ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, अंबेजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीला शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख अँड. संगिता चव्हाण यांनी संबोधित केले.              येणाऱ्या काळात कोणत्याही निवडणूक होणार नसल्याने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती मा.ना.डॉ. निलम ताई गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव श्री संजय जी मोरे साहेब, आणि शिवसेना नेत्या सौ. मीनाताई कांबळी यांच्या सुचनेने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख मा.ना.श्री प्रकाशजी अबीटकर साहेब, बीड जिल्हा संपर्क मंत्री मा.ना.भरातसेठ गोगावले साहेब, शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव श्री. अशोकजी पटवर्धन साहेब, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज जी शिंदे साहेब, उपनेत्या संगिता ठोंबरे, जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, स्वप्नी...

पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाणी संकट; बोअर आटले, रुग्ण त्रस्त प्रशासनाने तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णालयातील बोअरवेल पूर्णपणे आटल्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि दैनंदिन कामकाज यावर गंभीर परिणाम झाला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर धावपळ करावी लागत आहे. अनेकांना बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असून आर्थिक भारही वाढत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.भर उन्हाळ्यात अशा प्रकारे रुग्णालयात पाणीटंचाई निर्माण होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ पाण्याची टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बीड शहर स्वच्छतेत आधुनिकतेची मोठी झेप : घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित, स्वच्छता सभापती शेख निजाम

Image
बीड | प्रतिनिधी बीड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, स्वच्छता विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरातील सर्व घंटागाड्या व स्वच्छता संबंधित वाहनांवर अत्याधुनिक GPS प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हा उपक्रम मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार, आमदार विजयसिंहराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपाध्यक्ष विनोद मुळूक,शेख मुजीबभाई, सभापती बाळासाहेब गुंजाळ,संजय उडाण,जकी सौदागर,गटनेता फारूक पटेल यांच्या सहकार्याने तसेच स्वच्छता सभापती शेख निजाम व मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, पारंपरिक पद्धतींमध्ये अनेक मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर GPS प्रणालीचा अवलंब करून स्वच्छता व्यवस्थापनात सुसूत्रता, शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक घंटागाडी व स्वच्छता वाहनाची हालचाल, त्यांचे वेळापत...

शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

Image
शहीद काँम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक प्रकरणी आ. संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन; बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचाही निषेध : डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.२५) : शहीद काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तसेच पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. याचवेळी बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित तथ्यहीन वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तक न वाचताच आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल...