Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा “विवेक” जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा “विवेक” जागा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन दत्तनगर वस्तीशाळेवरील शालेय विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय द्यावा :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. ०५) माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्तनगर वस्तीशाळेवरील शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.०५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. दत्तनगर वस्तीशाळेसाठी २००७-०८ मध्ये सुसज्ज इमारत बांधण्यात आली असतानाही रस्त्यावर अतिक्रमण करून जाण्याचा मार्ग बंद केल्यामुळे गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली उघड्यावर शाळा भरवावी लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे वारंवार लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (रा. लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात माहिती आध...

मुस्लिम सेवा संघातर्फे बालेपीर व शहेनशाह वली परिसरात गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप

Image
बीड - प्रतिनिधी :सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम सेवा संघाच्या वतीने आज बालेपीर आणि शहेनशाह वली परिसरात गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून, संघटनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम संघटनेचे प्रदेश महासचिव फिरदोस सर आणि शिक्षण व इतर कर्मचारी विभाग राज्य अध्यक्ष मुमताज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडला. समाजातील वंचितांना मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने पत्रकार शेख फहीम, मान्यवर म्हणून माजी नगरसेवक फारूक मणियार, डॉक्टर वकास खान प्रमुख पदाधिकारी म्हणून रफिक आतार, माजेद खान, नवीद खान, शेख युसूफ, शेख मोहसीन, बब्बर पठाण, रियाज सिद्दिकी तसेच महिला पदाधिकारी म्हणून सुलताना बेगम, शाजिया शेख, शिरीन शेख, नुजत सिद्धिकी आणि सहकार्य म्हणून मोहम्मद सिद्दिकी, सय्यद खाजा, सय्य...

मदतीचा हात आणि कृतज्ञतेचे मोल एक स्वानुभव

Image
मदतीचा हात आणि कृतज्ञतेचे मोल एक स्वानुभव ​माणूस समाजप्रिय प्राणी आहे, असे आपण म्हणतो. समाजात वावरताना आपण एकमेकांना मदत करतो, कोणाचे तरी अडलेले काम एका शब्दावर मार्गी लावतो. कधी कोणाला न सांगता, तर कधी समोरच्याला ओशाळवाणे वाटू नये म्हणून अगदी सहजपणे आपण सहकार्य करतो. पण आजच्या जगात एक विचित्र अनुभव वारंवार येतो. 'सहज' मिळालेल्या मदतीची आणि 'विनामूल्य' दिलेल्या सल्ल्याची किंमत शून्य समजली जाते. ​ ​अनेकदा आपण समोरच्याची अडचण ओळखून स्वतःहून पुढे होतो. "तुला मदत हवी आहे का?" असे विचारण्यापेक्षा "मी हे तुझे काम करून देतो" असे म्हणून आपण पाठीशी उभे राहतो. पण मानवी स्वभाव असा आहे की, ज्या गोष्टीसाठी कष्ट पडत नाहीत किंवा पैसा मोजावा लागत नाही, त्या गोष्टीचे महत्त्व माणसाला वाटत नाही. तोच सल्ला जर एखाद्या वकिलाने फी घेऊन दिला किंवा एखाद्या व्यावसायिकाने पैसे घेऊन काम केले, तर लोक त्याचे आभार मानतात. मात्र, परिचयातील व्यक्तीने जिव्हाळ्यापोटी केलेले काम अनेकदा 'गृहीत' धरले जाते. ​ ​माझा अनुभव सांगतो की, लोकांनी आपल्या मदतीची वाच्यता दहा ठिकाणी करावी ही...

डांबर न वापरता रस्ताकाम; ग्रामस्थांनी काम पाडले बंद

Image
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी! भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधीसाधूपणा उघड डांबर न वापरता रस्ताकाम; ग्रामस्थांनी काम पाडले बंद :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. ०४) ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होत असताना, नागरिकांचे जीव जात असताना आणि पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत असताना ग्रामस्थांनी दिलेली निवेदने, लेखी तक्रारी व आंदोलने संबंधित भावी जिल्हा परिषद सदस्यांनी सातत्याने दुर्लक्षित केली होती. मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक जवळ येताच अचानक रस्त्यांची तात्पुरती डागडुजी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांवर माती टाकणे, खडी पसरवणे, नाममात्र डांबरीकरण करणे तर काही ठिकाणी “स्वखर्चाने रस्ता केला” असे गाजावाजा करत फोटो-व्हिडीओ सोशल मीडिया व स्थानिक वृत्तपत्रांत झळकू लागले आहेत. मात्र हा खरा विकास नसून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ मलमपट्टी असल्याचा घणाघाती आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. “निवडणूक नसती तर हे रस्ते तसेच खड्डेमय राहिले असते. अपघातात मा...

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे पार पडला

Image
“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे पार पडला   “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत  गौरवशाली इतिहास पोहचणार नांदेड, दि . ३  :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा  विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली होती.  “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहि...

महासांगवीच्या केळीची आता 'इराण'ला भुरळ; ७० गुंठ्यातून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. महासांगवी येथील तरुण शेतकरी प्रमोद नवनाथ गर्जे यांच्या शेतातील केळीने आता थेट सातसमुद्रापार 'इराण'च्या बाजारपेठेत धडक मारली आहे. या यशामुळे स्थानिक केळी उत्पादकांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडली गेली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. असे केले नियोजनाचे 'मॉडेल' प्रमोद गर्जे यांनी आपल्या ७० गुंठे क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर करून केळीची लागवड केली. ७ बाय ५ फूट या अंतरावर त्यांनी एकूण २००० रोपे लावली होती. एका रोपासाठी साधारण १५० रुपयांपर्यंत खर्च आला असून, पिकाच्या वाढीसाठी खतांचे व सूक्ष्मद्रव्यांचे अचूक नियोजन त्यांनी सुरुवातीपासूनच केले होते. दर्जेदार उत्पादन आणि हमखास दर विशेष मशागत आणि नियोजनामुळे केळीच्या एका गडाचे वजन सरासरी २५ किलोपर्यंत भरले आहे. या दर्जेदार मालाची गुणवत्ता पाहून आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी या केळीला १७ रुपये प्रति किलो इतका भाव दिला आहे. खतांमध्ये प्रामुख्याने १२:६१:००, १३:००:४५ यां...

लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मृत खातेदाराच्या नामनिर्देशितास २ लाख रुपयांचा विमा मंजूर

Image
लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मृत खातेदाराच्या नामनिर्देशितास २ लाख रुपयांचा विमा मंजूर संबंधिताकडून समाधान व्यक्त.  लिंबागणेश प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खातेदार असलेल्या वाघिरा येथील रहिवासी कै. रुतुजा बप्पाजी बांगार यांचे दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शेतातील उपकरणांशी संबंधित अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. कै. रुतुजा बांगार या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत विमाधारक सदस्य होत्या. त्यांच्या निधनानंतर योजनेच्या नियमानुसार त्यांच्या नामनिर्देशित पती श्री. बप्पाजी पांडुरंग बांगार (वय ३३) यांना विमा लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामीण बँक, लिंबागणेश शाखेमार्फत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार त्यांना २ लाख रुपयांचा विमा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दावा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड आदी कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर विमा दावा यशस्वीरीत्या पूर्ण झाला, अशी माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत शाखा व्यवस्थापक श्री. अमो...