Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धनदांडग्यांना , पुढा-यांना पायघड्या मात्र गोरगरिबांना कायद्याचा दंडुका! नगरपालिकेच्या दुटप्पीपणा निषेधार्ह:- डॉ.गणेश ढवळे

Image
  बीड (दि.१७ ) : बीड शहरातील बसस्थानक, जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टपऱ्या, फेरीवाले व लघुउद्योजकांच्या दुकानांवर अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कारवाई करत नगरपालिकेने कायद्याचा धाक दाखवला. मात्र दुसरीकडे शहरातील मोठमोठ्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. नगरपालिकेने गोरगरीबांच्या उपजीविकेवर हातोडा चालवत स्वतःची पाठ थोपटून घेतली असली, तरी बिंदुसरा व करपरा नदीपात्रातील अतिक्रमित बांधकामे, मोठमोठे मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि भू-माफियांनी केलेल्या नियमबाह्य बांधकामांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलने आणि निवेदने दिली आहेत. मात्र नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. आर्थिक साटेलोटे आणि राजकीय दबावामुळेच मोठ्या अतिक्रमणधा...

बीड शहरातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात साऊ एकल महिला समितीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बीड, प्रतिनिधी : - ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व इतर एकल महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने केले आहे. त्याच धर्तीवर बीड शहरातील एकल महिलांचेही सर्वेक्षण करून त्यांना रोजगार व स्वावलंबनासाठी मदत करावी, अशी मागणी साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य, बीड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसंदर्भात समितीचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे व डॉ. संजय तांदळे यांनी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शहरातील अनेक एकल महिला आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जात असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वेक्षणाच्या माध्यमातून संबंधित महिलांना रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गट, उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देता येऊ शकतो. महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरेल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाच्या २९ मार्च २०२२ च्या निर्णयानुसार महिला व बालकल्याणासाठी निधी खर्च करण्...

समाजसेवेचा गौरव : गौतम कांबळे यांना “पद्मपाणि” पुरस्कार जाहीर

Image
बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक गौतम कांबळे यांना प्रतिष्ठेचा “पद्मपाणि” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्यास मिळालेला हा सन्मान असल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गौतम कांबळे यांनी अनेक वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून दिले आहे. समाज कल्याण विभाग, कलेक्टर कार्यालय तसेच शासकीय रुग्णालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील गरजू लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव पुढाकार घेत असतात. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. विशेष म्हणजे, कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय ठरले. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागापासून शहरातील झोपडपट्ट्यांपर्यंत अन्नधान्य, किराणा साहित्य व अत्यावश्यक वस्तू पोहोचवून अनेक कुटुंबांना दिलासा दिला. संकटाच्या काळा...

सुतगीरणीवरील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण — अनिल तुरुकमारे

Image
सुतगीरणीवरील गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण — अनिल तुरुकमारे  वस्त्रोद्योग मंत्रालयाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणीवर प्रशासक नेमावा  बीड | प्रतिनिधी लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सुतगीरणी, केज येथील कथित गैरव्यवहार, बोगस कागदपत्रे, आर्थिक अनियमितता आणि शासनाची फसवणूक प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सुतगीरणीवर तात्काळ प्रशासक नियुक्त करावा, अन्यथा दि. २५ मे २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा पीपल्स रिपाईचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी शासनाला दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, समाजकल्याण मंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सुतगीरणीच्या मुख्य प्रवर्तक व व्यवस्थापनाने बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून वस्त्रोद्योग विभागाकडून तब्बल ३३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उचलला आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वस्त्रोद्योग विभागाने टेस्ट ऑडिट व विशेष लेखापरीक्षण सुरू केल...

मांजरसुंबा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न.

Image
मांजरसुंबा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न. उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांची उपस्थिती.  बीड प्रतिनिदी |  बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी तसेच अरुण रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील मोठ्या प्रमाणावर सरपंच, तसेच शेतकरी, शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अर्ज भरणे, लाडकी बहीण योजना अर्ज, ६० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत एसटी पास, एमएसईबी संदर्भातील कामे, जिवंत सातबारा योजना, डिजिटल सातबारा, वारस फेरफा...

बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक

Image
बीड (प्रतिनिधी ) दि.१५ : शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर परिसरातील मस्जिदजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रखडलेल्या रस्ता व नाली कामांबाबत तसेच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना शुक्रवारी (दि.१५) निवेदन दिले आहे. रखडलेली कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर, ॲड.सर्जेराव तांदळे, यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर भागातील नाली व रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे पवनसुत मंगल कार्यालयापासून ते कर्परा नदीपर्यंत रस्त्याच्या दक्षिणेकडील वस्त्यांमधील नाल्यांचे सांडपाणी अहिल्यानगर रोडलगतच्या नालीमध्ये येते. मात्र, तेथून पुढे कर्परा नदीकडे जाणाऱ्या नालीचे काम पूर्ण झाले नसल्याने अनेक नाल्यांचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्...

“पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” ; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने

Image
“पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” ; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे  बीड (दि.१५ ) : बीड शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बालकांवर होत असलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरुन सुरू असलेल्या कलगीतुरा आणि मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “पाणी, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा दिल्या नाहीत तरी चालेल, पण आधी बालकांवर होणारे मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांबवा,” अशी संतप्त घोषणाबाजी आंदोलकांनी केली. यावेळी नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदोपत्री नसबंदी मोहीम न राबवता प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी व शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी प्रमुख मागणी करण्...