Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

गढी ग्रामपंचायतच्या वतीने अपंगाना ग्राम निधी अतर्गत 5% टक्के प्रमाणे निधी वाटप

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज दिनांक 28 / 4 /2026 रोजी सकाळी 11 = 00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी येथे गढी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी पठण आय व्ही .व गढी ग्रामपंचायतचे क्लार्क नारायण जाधव आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गढी येथील अपंगाना 5% टक्के प्रमाणे ग्राम निधीचे वाटप करण्यात आले . या निधी वाटप कार्यक्रमास गढी गावातील नोदणीकृत अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी गढी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पठाण आय व्ही यांनी सर्व आलेल्या अपंग बांधवाना गढी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतुन 5% टक्के निधी अपंग बांधवाना वाटप करत आहोत असे सांगितले यावेळी उपस्थित सर्व अपंगांना निधीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थितीत अपंग बांधव सखाराम पोहिकर . विक्रम कांबळे . राहुल कांबळे . अमर कांबळे . आशाबाई सोळुके .बबलू शेख . ताहेरा भाभी . आयशा शेख . इतर अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत हो...

अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा; कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

Image
अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठ्या भेगा;  कंत्राटदारांचा डांबराने ठिगळं लावण्याचा केविलवाणा प्रयत्न! कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  लिंबागणेश (दि.२९) : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असुन ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, तडे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या आणि ८७८ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गावर मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान विशेषतः रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. दुचाकी वाहनांचे चाक खड्ड्यांमध्ये अडकून अपघात होत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न करता संबंधित कंत्राटदार एचसीपीएल कडून केवळ डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा तात्पुरता केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. ही मलमपट्टी तात्पुरती स्वरूपाची दुरुस्ती असल्याने समस्या कायमच राहार आहे. दरम्यान, मांजरसुंभा ते अंबेजोगाई दरम्यान एचपीएम कंपनीकडील कामही रखडलेल्या अवस्थेत आहे. दुभाजक, पथदिवे, दिशादर्शक फलक आणि रस्त्याल...

पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून? केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र

Image
बीड प्रतिनिधी – केज पोलीस स्टेशन आधीच राज्यभर चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील तरुण आशिष धिवार यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या कथित मारहाणीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, हा मृत्यू नसून थेट खून असल्याचा आरोप होत आहे. रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी कठोर भूमिका घेत, “केज पोलिसांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी जोरदार मागणी केली आहे. “हा साधा मृत्यू नाही, तर पोलीस अत्याचाराचा परिणाम आहे. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मयत आशिष धिवार यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आधी गुन्हा दाखल करा, मगच अंत्यसंस्कार,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. याशिवाय, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी पोस्टमार्टम इन-कॅमेरा पद्धतीने, बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांकडून करण्याची मागणी हीही पुढे करण्यात आली आहे. या घटन...

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..

जीवाचीवाडी येथे मारहाणीत चार जखमी..   10 जणांविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद.   केज, दि. 27 : तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे....  जीवाचीवाडी येथील दैवशाला उमेश सारुक या घरी आसताना त्यांचे पती व जाऊ हे त्यांच्या घराच्या मागील शेतात पाईप लाईन जोडीत होते , यावेळी शहादेव सारुक, महादेव सारुक, व ज्ञानेश्वर सारुक यां तिघांनी घरी येऊन दैवशाला उमेश सारुक त्यांच्याशी गैरवर्तन करून वाईट हेतूने त्यांच्या हाताला धरून त्यांना घरात ओढून नेत असताना त्यांनी आरडा,ओरडा केल्यामुळे त्यांचा नवरा व जाऊ धावत आले असता तिघेही पळून गेले. दरम्यान थोड्याच वेळात आरोपीतानी संगनमत करून लाथा बुक्क्याने, व काठीने केलेल्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दैवशाला उमेश सारुक यांच्या फिर्यादीवरून शहादेव तुकाराम सारुक,महा...

शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Image
शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; “शिवरायांची बदनामी सरकार प्रायोजित आहे का?”जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:-  डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२७ ): छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तथ्यहीन व ऐतिहासिक आधार नसलेली विधाने करून अवमानना करणाऱ्या बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी शिवप्रेमी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात बहुजन महापुरुषांची अवमानना करणाऱ्या वाचाळवीरांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप करत, सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संबंधित वक्तव्य झाले असल्याने, “ही अवमानना सरकार प्रायोजित आहे का?” असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना पाठविण्यात आले. नागपूर येथे “भारतदुर्गा” मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रम...

शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार! 'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर

Image
शिरूर कासार तालुक्यामध्ये शिवसेनेचा एल्गार!    'माघन त्याला विहीर' द्या, अन्यथा पंचायत समितीवर धडकणार जनआक्रोश मोर्चा-सोपान मोरे/अजिनाथ खेडकर  ​ आष्टी(प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  शिरूर कासार तालुक्यातील (जिल्हा बीड ') महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने' (मग्रारोहयो) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील सावळागोंधळ आणि विहिरींच्या मर्यादित लक्षांकावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला. गरजू शेतकऱ्याला विहीर आणि गोठा मिळालाच पाहिजे, टार्गेटचे रडगाणे बंद करा, असा सज्जड दम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका ) मोरे आणि उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी प्रशासनाला निवेदनात दिला .  ​ मुख्य मागणी काय आहे-- ​शिरूर कासार पंचायत समितीने प्रत्येक ग्रामपंचायतला केवळ २० विहिरींचे तुटपुंजे टार्गेट देण्यात आल्याने यावर संताप व्यक्त करत शिवसेनेने गट विकास अधिकाऱ्यांना (BDO) निवेदन दिले .निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे--    ​थेट लाभ: शेततळे, गाय गोठा, शेळीपालन आणि जलसिंचन विहिरींचे अनुदा...

शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस

Image
शेतात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला पुरुषोत्तम वीर यांचा वाढदिवस बीड प्रतिनिधी : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी…” या संत तुकाराम महाराजांच्या ओळींचा विचार प्रत्यक्षात उतरवत रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मा. पुरुषोत्तम (गोटू) वीर यांचा वाढदिवस यंदा अत्यंत वेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. बीड-गेवराई महामार्गावरील त्यांच्या शेतात वृक्षारोपण करून अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यासह शहरातून विविध पक्षांचे नेते, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने डीजे, फटाके आणि दिखाऊ खर्च टाळत मित्रपरिवाराने साधेपणाला प्राधान्य देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजाला सकारात्मक संदेश दिला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम विशेष ठरला. “एक व्यक्ती, एक वृक्ष” या संकल्पनेतून अनेकांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांनी...