Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न

Image
धम्मदीप बुद्ध विहार येथे प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात संपन्न  माया दिवाण व बौद्धाचार्य भास्कर सोनवणे यांचा सत्कार  बीड (प्रतिनिधी ) युद्धात निपुण असलेल्या प्रियदर्शी सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर जवळपास चक्रवर्ती सम्राट पद मिळवले होते. परंतु कलिंगा युद्धातील नरसंहार बघून त्यांनी तलवारीचा त्याग करून तथागतांच्या प्रज्ञा, शिल,करुणा मैत्री,समता, शांती व मानवाच्या कल्याणाचा पंचशील व अत:दीप भव आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला शरण जाऊन व तसे आचरण करून जगात लोककल्याणकारी सम्राट म्हणून कार्य केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगाला युद्ध नको, तर बुद्ध विचारांची गरज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ.नामदेव शिनगारे यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप व धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर पालवण रोड बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाच्याप्रसंगी अध्यक्षपदी प्रा. डॉ. नामदेव शिनगारे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. शिक्षण अधिकारी सखाराम उजगरे,प्राध्यापक डॉ .शिवाजीराव दिवाण, से.नी उपनिबंधक सहकार ॲड हनुमंत कांबळे मुख...

मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे

Image
मुख्यमंत्री साहेब, शेतरस्ता अडवल्यानंतर फार्मर आयडी, आधार कार्ड ब्लॉक… खरंच कारवाई होणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२७ ): देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ते योजना’ प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, शेतरस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून त्याचा शासकीय योजनांवरील लाभ बंद केला जाणार आहे. तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासह पुढील पाच वर्षे सर्व शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. शेतरस्त्यांच्या वादातून भांडणे, तणाव आणि पोलिसांत गुन्हे दाखल होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही त्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शासनाचा हा कठोर आदेश प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्रीच राहणार, असा सवा...

एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले.महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

Image
एकता मराठी संमेलनात कथाकथन रंगले. महिला रसिकांनी लुटला मनमुराद आनंद सातारा प्रतिनिधी  : एकता फाउंडेशन, म.सा.प.शिरूर कासार आणि पाडळीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील पाडळी ता.शिरूर कासार येथे दोन दिवशीय राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दि.२४ मार्च रोजी नेत्रदीपक ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. तद्नंतर माजी आमदार ॲड.मा.उषाताई दराडे यांच्या अध्यक्षतेखालील संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांनी केले. द्वितीय सत्रात 'लेखक आपल्या भेटीला' आणि राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन (भाग एक) पार पडले. रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.          दि.२५ रोजी सकाळी १० वाजता कथाकथन सत्राने संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात झाली. कथाकार रंजना सानप (मायणी जि.सातारा) यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात कडा ता.आष्टी जि.बीड चे जेष्ठ कथाकार वि.भा.साळुंके यांनी 'अशी गस्त झाली मस्त' ही विनोदी कथा सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले. यानंतर ...

१७ वर्षांनंतर जुळला आठवणींचा गोफ; निगमानंद विद्यालयाच्या २००९ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात

Image
​बीड प्रतिनिधी  : निमगाव (मा.) येथील निगमानंद विद्यालयाच्या सन २००९ च्या १० वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन बीडमधील हॉटेल सनराईज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल १७ वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रीण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाला उधाण आले. या सोहळ्याला अर्जुन थिटे सर, बेंद्रे सर, डोंगरदिवे सर आणि अशोक खोपडे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ​महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. स्वाती थिटे, आजिनाथ आंधळे, जगदीश लोणके (फौजी), विशाल खेडकर, डॉ. मच्छिंद्र भोसले, डॉ. संदीप सटले यांच्यासह अनेक मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील किस्से शेअर केले. ​ मान्यवर गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपापल्या करिअर आणि कौटुंबिक प्रवासाविषयी माहिती दिली. स्नेहभोजनाच्या आस्वाद घेत गप्पांचा कार्यक्रम रंगला. ​"शाळा सुटली तरी मैत्री सुटली नाही," अशी भावना व्यक्त करत, पुन्हा लवकरच भे...

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी

Image
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी             तहसीलदार संदीप खोमणे , नरेंद्र कुलकर्णी सह सहा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप : अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन टोकाचा निर्णय एक एप्रिलची दिली चेतावणी    गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील गोदावरी नदी पात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतल्या असून , तब्बल अडीच वर्षे न्याय न मिळाल्याने एका तरुणाने जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांना थेट आत्महत्येची परवानगी मागितल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .  विशेष म्हणजे या अर्जात संबंधित अधिकाऱ्यांचे नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत .  गेवराई येथील जे जे बागवान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 300 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव घेत तब्बल २ .१५ .o ४० रूपये तहसील कार्याला जमा केले , मात्र त्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे , उपविभागीय अधिकारी कविता जाधव , गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी , उपविभागीय गौण...

मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार

Image
मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार   आष्टी तालुक्यातील भाविक-भक्त सर्व स्तरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-- निमगाव चोभा सप्ताह कमिटी/ भजनी मंडळ /ग्रामस्थ  आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील मौजे निमगाव चोभा येथे २० मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीमध्ये श्री भक्त दस्तवल भगवान पंढरीनाथाच्या कृपेने श्री रामचंद्र जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .           या कालावधीत ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे , ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे, ह.भ.प. रवींद्र महाराज पोटे, ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री, ह.भ.प. रामेश्वर महाराज भोजने यांचे या कालावधीत रात्री ९ ते ११ या वेळात कीर्तन झाले असून ह.भ. प. म्हातारदेव महाराज आठरे यांचे २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मस्तोव निमित्त सकाळी १०ते १२ या वेळा...

बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती

Image
बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमले बीड (प्रतिनिधी) दि.२६ : शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कंकालेश्वर मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात गुरुवारी (दि.२६) साजरा करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर कंकालेश्वर मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. आरतीनंतर पंकजाताई मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कंकालेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून हजारो रामभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला...