Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज : - एक युगप्रवर्तक

Image
सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज : - एक युगप्रवर्तक   भारतीय समाजव्यवस्थेत सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महान विभूतींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी, लोकाभिमुख धोरणे आणि क्रांतिकारी निर्णयांच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. म्हणूनच त्यांना "सामाजिक न्यायाचे प्रणेते" आणि "लोककल्याणकारी राजा" म्हणून गौरविले जाते. जन्म आणि बालपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते. कोल्हापूर संस्थानच्या महाराणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव शाहू छत्रपती ठेवण्यात आले. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, संवेदनशीलता आणि समाजाविषयी आस्था दिसून येत होती. त्यांनी राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयात शिक्षण घेतले. शिक्षणादरम्यान त्यांना भारतीय समाजातील विषमता, जातीय ...

पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवा - बिरसा फायटर्सची मागणी

Image
नंदुरबार प्रतिनिधी :- महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत.                     निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असून इतर सरळसेवा परीक्षांप्रमाणे ही वयोमर्यादा ३३ वर्षे किंवा ३८ वर्षे करण्यात यावी, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत.त्या आंदोलनाला आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. कोरोना काळातील नुकसान आणि भरती प्रक्रियेतील विलंबाचा हवाला देत ही मागणी जोर धरत आहे.सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीवयोमर्यादा किमान वयोमर्यादाः १८ वर्षे व कमाल वयोमर...

लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती

Image
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती ! दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता २० लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.२६ ) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गेल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. याचा मोठा फटका वाणी वस्ती, घोलप वस्ती, गावडे वस्ती, ढवळे वस्ती, घरत वस्ती, मुळे वस्ती यासह परिसरातील ग्रामस्थ, दुग्ध उत्पादक शेतकरी, भाजीपाला उत्पादक, बाजारहाट करणारे नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना बसत होता. रस्ता व पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना प्रशासनाकडून केवळ पाहणी व आश्वासनांवर वेळ जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० सप्टेंबर रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत "आता तरी अजितदादा प...

सहा महिन्यांपासून पगार थकीत; नरेगा कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

Image
बीड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. नियमितपणे गावागावात योजना राबविणारे, कामांची पाहणी करणारे व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मचारी आज स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत. वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरभाडे, वीजबिल आणि दैनंदिन गरजा भागविताना कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कर्ज काढून संसार चालवावा लागत असून काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मनरेगा ही ग्रामीण भागातील रोजगाराची महत्त्वाची योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेतात. मात्र त्यांनाच वेळेवर वेतन मिळत नसल्याने शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनरेगा योजनेअंतर्गत कामगारांच्या मजुरीबाबत तरतुदी असल्या तरी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न कायम असल्याची खंत व्यक्त होत आहे. नरेगा कर्मचारी संघटनांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्या...

बीड जिल्ह्यातील खासगी शाळा व ट्युशन क्लासेसच्या मनमानी फी आकारणीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:- रामधन जमाले इंटक जिल्हाध्यक्ष

Image
बीड, दि. २५ जून २०२६ :बीड जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच खासगी ट्युशन क्लासेसकडून विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी प्रवेश शुल्क व फी आकारणीवर नियंत्रण आणून शासनमान्य नियमावली लागू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सविस्तर निवेदन देण्यात आले. इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनात जिल्ह्यातील अनेक शाळा व ट्युशन क्लासेसकडून पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व कष्टकरी कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनामध्ये खासगी शाळा व कोचिंग संस्थांची अनिवार्य नोंदणी, शासनमान्य फी संरचना लागू करणे, फीची कमाल मर्यादा निश्चित करणे, सर्व शुल्कांची पारदर्शक माहिती पालकांना देणे, जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करणे तसेच म...

शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणामुळे विद्यार्थी अनेक शालेय सुविधान पासुन वंचित-लोकजनशक्ती पार्टी

Image
बीड :अंबाजोगाई . महाराष्ट्र शासनाने शाळा मान्यता देताना विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक असताना अंबाजोगाई तालुक्यात अनेक शाळांमध्ये विविध नियमांची नियमावली दिलेली असताना त्या नियमांचे उल्लंघन करून अनेक मातब्बर व्यक्ती शाळा चालवत आहेत अनेक शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून त्यांच्या या सर्व असुविधांचा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक शाळेच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे मच्छर उत्पन्न होऊन विद्यार्थी तथा विद्यार्थिनींना डेंगू मलेरिया यासारखे गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता न करता येत नाही तसेच आंबेजोगाई तालुक्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात यावी तसेच प्रामुख्याने गोदावरी बाई कुंकूलोळ कन्या शाळा परळी रोड अंबाजोगाई या शाळेची सखोल तपासणी करून सदर शाळेकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे संबंधित शाळेमध्ये वर्गखोल्या ह्या अत्यंत अस्वच्छ असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसणे मुश्किल झाले आहे सदर शाळेतील वर्गखोल्या मध्ये पंखे नाहीत त्यामुळे विद्यार्थिनींना गर्मीमध्ये तासन तास बसावे लागत आहे सदर श...

एकजुटीची ताकद दाखवा; ३० जूनच्या महामोर्चात सहभागी व्हा – पुरुषोत्तम (गोटू) वीर

Image
बीड | प्रतिनिधी अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बीड लोकसभा क्षेत्र प्रमुख व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (गोटू) वीर यांनी केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वीर यांनी म्हटले आहे की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा निर्णय हा समाजात फूट पाडणारा असून, घटनात्मक आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे. बीड जिल्ह्यातील बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, गेवराई, धारूर, पाटोदा, आष्टी तसेच इतर तालुक्यांतील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि आंबेडकर विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अनुसूचित जातींचे घटनात्मक अधिकार अबाधित राखण्यासाठी...