Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी

Image
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला. लिलाव रक्कम अडकली ; तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आत्महत्येची परवानगी  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी             तहसीलदार संदीप खोमणे , नरेंद्र कुलकर्णी सह सहा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप : अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन टोकाचा निर्णय एक एप्रिलची दिली चेतावणी    गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील गोदावरी नदी पात्रातील जप्त वाळू साठ्याच्या लिलाव प्रकरणाने गंभीर वळण घेतल्या असून , तब्बल अडीच वर्षे न्याय न मिळाल्याने एका तरुणाने जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांना थेट आत्महत्येची परवानगी मागितल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .  विशेष म्हणजे या अर्जात संबंधित अधिकाऱ्यांचे नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत .  गेवराई येथील जे जे बागवान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये 300 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव घेत तब्बल २ .१५ .o ४० रूपये तहसील कार्याला जमा केले , मात्र त्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे , उपविभागीय अधिकारी कविता जाधव , गौण खनिज अधिकारी नरेंद्र कुलकर्णी , उपविभागीय गौण...

मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार

Image
मौजे निमगाव चोभा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. शंतनु महाराज गिरी यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार   आष्टी तालुक्यातील भाविक-भक्त सर्व स्तरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-- निमगाव चोभा सप्ताह कमिटी/ भजनी मंडळ /ग्रामस्थ  आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील मौजे निमगाव चोभा येथे २० मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ या कालावधीमध्ये श्री भक्त दस्तवल भगवान पंढरीनाथाच्या कृपेने श्री रामचंद्र जन्मानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .           या कालावधीत ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे , ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे, ह.भ.प. रवींद्र महाराज पोटे, ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री, ह.भ.प. रामेश्वर महाराज भोजने यांचे या कालावधीत रात्री ९ ते ११ या वेळात कीर्तन झाले असून ह.भ. प. म्हातारदेव महाराज आठरे यांचे २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम जन्मस्तोव निमित्त सकाळी १०ते १२ या वेळा...

बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती

Image
बीडमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा; मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आरती ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी शहर दुमदुमले बीड (प्रतिनिधी) दि.२६ : शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कंकालेश्वर मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात गुरुवारी (दि.२६) साजरा करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर कंकालेश्वर मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. आरतीनंतर पंकजाताई मुंडे यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले व उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कंकालेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून हजारो रामभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला...

भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष

Image
भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश बीड (प्रतिनिधी) : चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रथातून प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. बौद्ध धम्माचा प्रसार देशाबरोबरच परदेशातही करणारे प्रियदर्शी सम्राट अशोक यांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 26 मार्च रोजी देशभर जयंती साजरी केली जात आहे. त्या निमित्ताने बीड शहरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा भव्य रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरविण्यात आला...

सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ धनगर समाज रस्त्यावर! लिंबागणेश येथे रास्ता रोको

Image
लिंबागणेश (दि.२६) : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि.१६ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांचे सासरे रामराव होळकर यांनी जालना येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर धनगर समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सरकारकडून केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मंत्रीमंडळातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असली तरी ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या संवेदनाहीन धोरणाच्या निषेधार्थ मराठा सेवक डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ गुरुवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  आंदोलनाची सुरुवात स्व. रामराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा बळी गेला असल्याची तीव्र भावना व्यक्त...

सम्राट अशोक व त्यांचे राज्य.

Image
सम्राट अशोक व त्यांचे राज्य.  भारतीय इतिहासातील स्वर्णिम अक्षराने कोरलेल्या दिव्यपुरुष सम्राट अशोकांचे राज्य व त्या काळातील समाज व्यवस्था आणि इतर गोष्टी कशा होत्या ह्या शोधून काढण्यासाठी देशी-विदेशी इतिहास संशोधक आपल्या जीवाची पराकाष्टा करताना आपल्याला दिसतात. तथापि सम्राट अशोकांचे राज्यव्यवस्था व समाजस्थिती कशी होती हे आजवर व्यवहारिक दृष्टीने किंबहुना मुद्दामून दाबून दडपून टाकलेले आहे. अशोकाचे लक्ष जरी प्रजेत धर्म शिक्षणाचा प्रसार करण्याकडे असले तरी त्यांनी कधीही राजाच्या इतर कर्तव्याकडे केव्हाही दुर्लक्ष केले नाही! चंद्रगुप्ताच्या वेळी मगधसाम्राज्याचा विस्तार जितका होता व अशोकाने त्यात किती भर घातली याविषयी अनेक संशोधकांनी आपल्या पुस्तकात पुष्कळपणे लिहिले आहे. या प्रकरणात त्याचे विवेचन करणे गरजेचे नसले तरी अशोकाच्या राज्यविस्ताराचा मी यात सूक्ष्मपणे विवेचन करणार आहे. सम्राट अशोकाने कलिंग सारखे मोठे राज्य जिंकून ते मगध साम्राज्याला जोडले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दक्षिणेतील चोल, पांड्य, सातियपुत्र म्हणजे सत्यपुत्र व केरळपुत्र ही किरकोळ राज्ये सोडली तर बाकीचा सारा हि...

पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न

पाटोदा महावितरणचा बेजबाबदार कारभार; रात्री लाईट गायब,अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन बंद गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा मोठा प्रश्न पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.शहरातील बस स्टँड परिसरात काल रात्री वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. वारंवार प्रयत्न करूनही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याशी संपर्क साधता आला नाही, कारण त्यांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमके कोणाकडे धाव घ्यावी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महावितरणकडून कोणतीही तातडीची मदत मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच रात्रीच्या वेळीही अधिकारी व कर्मचारी संपर्कात राहावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे