Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

SIR गणना फॉर्म भरण्यासाठी वार्ड क्र. १९, २०, २१ व २२ मध्ये विशेष कॅम्प; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सभापती शेख निजाम यांचे आवाहन

Image
बीड शहरातील वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ मधील नागरिकांना SIR (Special Intensive Revision) गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान व्हावी, तसेच एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, या उद्देशाने जयहिंद कॅम्पस, मिलतनगर, बीड येथे शनिवार दि. ११ जुलै ते रविवार दि. १२ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांना BLO च्या माध्यमातून SIR गणना फॉर्म भरून घेण्याची, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची तसेच मतदार यादीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनहिताच्या उपक्रमासाठी आमदार विजयसिंहराजे पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, मुख्याधिकारी श्री. मांडुरके साहेब तसेच वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ चे सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक मार्गदर्शन व सहकार्य करीत असून, नागरिकांना कोणताही त्रास...

बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा महामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न   (बीड प्रतिनिधी ) - " शिका संघटित व्हा संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमोल उपदेश शिक्षणा पासून वंचित असलेल्या दीनदलित बहुजन करता केला होता. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीने सखोल विचार करून उच्च शिक्षणाकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आठ जुलै 1945 रोजी मुंबई येथे स्थापना केली होती. उच्च शिक्षण म्हणजे निर्भीड बनणे, प्रज्ञा शील करणे चा मार्ग स्वीकारून ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग समाजातील उपेक्षित समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगती कशी होईल, लवकरच तात्कालीन ब्रिटिश सरकारकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपला देश एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कसा घडेल हा तेव्हा अतिउच्च कोटीच्या देशाच्या हिताचा विचार करून उच्च शिक्षणाची सोय प्रथम 1946 रोजी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन करून केली असे प्रतिपादन कार्यक...

सरकार च्या निकृष्ट कामावर बोलणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे गुत्तेदार तुमचे जावई आहेत का?-डॉ.जितीन वंजारे

Image
    आज-काल राजकारण एकदम खालच्या पातळीला जाऊन केलं जात आहे. महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पवित्र संविधान भारत देशाला दिलं यामध्ये जितकी पावर सरकारला असेल तितकीच एव्हाना त्याहूनही अधिक पावर विरोधी पक्षाला दिली गेलेली आहे. लोकशाही ही विरुद्ध पक्षावर अवलंबून असते परंतु आजकाल मिल बाटके खायेंगे अशा पद्धतीची विवरचना भारतीय राजकारणामध्ये दिसून येत आहे. जेव्हा सभागृहात बसलेले टट्टू जनहिताचे काम करत नाहीत आणि भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, बाजारीकरण वाढलं जातं तेव्हा ही लढाई सर्वसामान्यांना हातात घ्यावी लागते अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जो सध्याच्या चालू सरकारचा फुसका विकास चालू आहे विकासाच्या नावाखाली नंगानाच चालू आहे, उद्घाटनापूर्वीच फुले पडत आहेत, उद्घाटन झाल्यानंतर दोन-चार दिवसात ते उध्वस्त होत आहेत, निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत, कॉन्ट्रॅक्ट जवळच्या माणसाला देऊन आदानी अंबानीसारख्यांच्या उद्योगपतींच्या घशामध्ये संपूर्ण देश घातला जातोय मग मी एक सामान्य माणूस म्हणून असा प्रश्न पडतो की तुमच्या निकृष्ट दर्जा...

बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

Image
बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी बीड प्रतिनिधी : बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वाहतुकीची व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा कायम असते. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सारडा नगरी मार्केट परिसर, जिल्हा शासकीय रुग्णालय ते पालवन चौक या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भटकी कुत्री रस्त्यावर वावरत असतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहन दिसताच कुत्र्यांचे थवे वाहनांच्या मागे धावत भुंकत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कुत्र्यांचे निर्बी...

परळी पत्रकार गृहनिर्माण संस्थेला ₹५ कोटींचा निधी द्यावा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बालाजी जगतकर यांचे निवेदन

Image
परळी पत्रकार गृहनिर्माण संस्थेला ₹५ कोटींचा निधी द्यावा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे बालाजी जगतकर यांचे निवेदन बीड | प्रतिनिधी : परळी वैजनाथ येथील पत्रकारांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थांसाठी राज्य शासनाने ₹५ कोटींचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी लघु व मध्यम वृत्तपत्र संघटनेचे जिल्हा सचिव बालाजी श्रावण जगतकर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. श्रीमती सुमित्राताई अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, संपादक तथा भारतीय लघु व मध्यम पत्रकार संघटणा जिल्हा सचिव बालाजी जगतकर , कामगार नेते गौतम आगळे आदीचे शिष्टमंडळ भेटले. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाज, शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत. दिवस-रात्र जनहितासाठी कार्य करणाऱ्या अनेक पत्रकारांना आजही स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे परळी वैजनाथ आणि बीड येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्था सक्षमपणे उभारण्यासाठ...

कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा

Image
कै . अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित ₹५०० वसुलीची चौकशी करा खाजगी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितल्याचा दावा; आर्थिक फसवणुकीचा संशय, दोषींवर कारवाईची माजी सैनिक अशोक येडे ,आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष यांची मागणी बीड, दि . ८ :कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडून "संमतीपत्र (कन्सेंट लेटर) सुरू करण्याच्या" नावाखाली प्रत्येकी ₹५०० रक्कम एका खाजगी बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रक्कम शांतीकुमार आगलावे यांच्या नावावरील खाजगी बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जात असल्याचा दावा आहे. लाभार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या संदेशात, "आज पैसे जमा केले नाहीत तर तुमचे संमतीपत्र सुरू होणार नाही. त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील. ज्यांनी पैसे जमा केले आहेत त्यांच्याच कामाची प्रक्रिया करण्यात येईल," असा मजकूर असल्याच...

आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे दत्तात्रय कदम यांचा समाजोपयोगी उपक्रम; सौंदाना येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदाना येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवराज कदम, नारायण कदम, शिवदास आगुंडे, महादेव कदम, दत्ता कदम, बालाजी कदम, ईश्वर कदम आणि सचिन कदम उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे पाटोदा तालुकाध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक...