Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

गोव्यातील प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी ‘कुशावती’ तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती

Image
पणजी, ३१ डिसेंबर : गोव्यातील प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी गोवा सरकारने ‘कुशावती’ हा राज्याचा तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा परिषदांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शासन व नागरिकांमधील अंतर कमी होऊन प्रशासन अधिक सुलभ होणार आहे. नवीन कुशावती जिल्ह्यात सांगे, केपे, काणकोण आणि धारबांदोडा हे तालुके समाविष्ट असतील. भौगोलिक सलगता, समान संस्कृती आणि जीवनशैलीमुळे हे तालुके एकमेकांशी जोडलेले आहेत. या जिल्ह्याला कुशावती नदीचे नाव देण्यात आले असून ही नदी चारही तालुक्यांतून वाहत असल्याने ती या भागाची ओळख ठरते. या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, “गोव्यातील तिसरा जिल्हा म्हणून कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुशावती नदीला चालुक्य काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक बळकट होईल.” नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे नागरिकांना शासकीय कार्याल...

गोव्यातील जिल्हा पंचायत निकालांवर ‘म्हाजे घर’ योजनेचा ठसा

Image
गोव्यातील नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की स्थानिक पातळीवरील निवडणुका या लोकांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेल्या असतात. या निवडणुका केवळ राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी नसून, नागरिकांच्या अनुभवांवर आधारित शासनाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापनसुद्धा ठरतात.   राज्य किंवा राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठमोठे मुद्दे आणि घोषणांनी मतदाराचे लक्ष वेधले जाते, पण स्थानिक निवडणुकांत मतदार अधिक प्रायोगिक दृष्टीने विचार करतात. त्यांच्या घरासमोरील रस्ते, दिवे, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आणि सरकारी सेवा वेळेत मिळतात का, हे त्यांचे खरे मोजमाप असते. यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसले. मतदारांनी उत्साहाने मतदान केले आणि प्रशासनाच्या कामगिरीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ५,५२,८०७ मतदारांनी मतदानात भाग घेतला, तर मतदानाची टक्केवारी ७०.८१ इतकी राहिली, ही आकडेवारी नागरिकांची सहभागाची इच्छा आणि स्थानिक शासनाबद्दलची जागरूकता दर्शवते. ‘म्हाजे घर’ योजनेचा सुरुवात आणि हेतू ‘म्हाजे घर’ योजना गोवा सरकारने २०२५ मध्ये सुरू केली. दशकानुदशके प्रलंब...

बीड जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत रस्ते कामांमध्ये मोठा गैरव्यवहार, तांदळवाडी घाटमध्ये ओव्हरलॅपिंग व बोगस काम- नितीन सोनवणे

Image
 बीड, दि. ३१ डिसेंबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) 'मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट गावात मंजूर झालेल्या खडीकरण व सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रारदार नितीन सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज सादर केला आहे.तक्रारीनुसार, गावातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांमध्ये स्पष्ट ओव्हरलॅपिंग (एकाच जागी वारंवार काम दाखवणे) आढळून आले आहे. प्रत्यक्षात मैदानी पातळीवर काम नसतानाही पोर्टलवर काम पूर्ण दाखवण्यात आले आहे. बोगस ठराव करून सरपंचांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या असून, अपलोड केलेले फोटो दुसऱ्या ठिकाणचे असल्याचेही समोर आले आहे. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित कामांचा ठेकेदार उपसरपंच महादेव हरी खोसे असल्याने पदाचा गैरवापर करून कामे चुकीच्या पद्धतीने पूर्ण दाखवल्य...

पाटोदा–आष्टी तालुक्यातील २४६ पोलीस पाटील पदांसाठी १ जानेवारीला आरक्षण सोडत

पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा उपविभागातील पाटोदा व आष्टी या दोन तालुक्यांतील एकूण २४६ पोलीस पाटील पदे सध्या रिक्त असून ही पदे भरण्यासाठी महिला ३० टक्के आरक्षणानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय पाटोदा येथे होणार आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रियेकरिता इच्छुक नागरिकांनी दिलेल्या ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रोहन गलांडे पाटील यांच्या अमरण उपोषणाला यश !प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य !

Image
केज/प्रतिनिधी   केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पत्रकार, संपादक समाजसेवक रोहन गलांडे पाटील यांनी १३ दिवस अमरण उपोषण केले व त्यांच्या मागण्या केज प्रशासनाने,प्रशासनाचा भाग तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कृषी अधिकारी, ग्रामसडक योजना अधिकारी यांनी मान्य केल्या आहेत तसेच गावात दुःखत घटना घडली त्यामुळे उपोषण मागे घेतले या विषयी सविस्तर वृत्त असे की त्यांच्या मागणीनुसार चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे असे पत्र त्यांना देण्यात आले आहे तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुल योजनेचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे पत्र देण्यात आले आहे तसेच चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होती त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे त्यांची पुढील कार्यवाही उच्च शिक्षण संस्था अधिकारी यांच्या कडून करणार आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.तसेच केज तालुक्यातील महाडीबीटी योजनेची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे त्यांचे पत्र तालुक्याचा अहवालासह १० जानेवारी रोजी मिळणार आ...

लिंबागणेश येथे हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू,बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन

Image
लिंबागणेश | (दि. ३१) नाफेड कृषी पणन मंडळाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेंतर्गत लिंबागणेश (ता. बीड) येथे नागनाथ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, खंडाळा यांच्या वतीने शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. ३०) रोजी श्री गुरू ईश्वर भारती बाबा बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या शुभहस्ते झाला. या खरेदी केंद्रामुळे लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि हमीभावाची विश्वासार्ह सुविधा उपलब्ध होणार आहे. यावर्षी सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ₹५,३२८ इतका हमीभाव जाहीर करण्यात आला असून, सध्याच्या बाजारभावापेक्षा अधिक दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हमीभाव योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, बाळकृष्ण थोरात, सुरेश निर्मळ, सुधीर वाणी, प्रदीप चौरे, श्रीनिवास चौरे, चव्हाण सर तस...

निवडून येताच ॲक्शन मोड! प्रभाग १४ चे नवनिर्वाचित नगरसेवक कामाला लागले; स्वतः उभे राहून करून घेतली साफसफाई

Image
​बीड (प्रतिनिधी ):बीड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून अवघा आठवडा उलटत नाही तोच, प्रभाग क्रमांक १४ मधील नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत, या दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रभागातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले असून, स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून साफसफाई करून घेतल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे. ​ ​बीड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून प्रमोद शिंदे आणि रणजीत बनसोडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. निकाल लागल्यानंतर सत्कार समारंभाच्या गर्दीत न अडकता, त्यांनी थेट जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ​ही बाब लक्षात घेता, आज शिंदे आणि बनसोडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रभागातील विविध गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांची साफसफाई करून घेतली. केवळ आदेश न देता, हे दोन्ही नगरसेवक सकाळपासून स्वतः रस्त्यावर उभे राहून कामाचे नियोजन करत होते. ​निवडणू...