Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

"नाते विकासाचे आणि विश्वासाचे"

Image
"नाते विकासाचे आणि विश्वासाचे" स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे कोकलेगावच्या राजकारणात खूप मोठं प्रस्थ होतं.त्याचबरोबर कोकलेगावच्या राजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलं असून, त्यांनी अनेक नव्या दमाच्या तरुणांना कोकलेगावच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी करून घेत अनेक मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्वर्गीय मारोतराव पा.नारे हे अतिशय संयत, शालिन,बहुआयामी प्रतिभेचे धनी असलेले,वाचक, समीक्षक, सहकार, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात ठाम वैचारिक अधिष्ठान निर्माण करणारे तसेच शिस्तीच्या बळावर राजकारणात समतोल व आदरयुक्य दरारा निर्माण करणारे,आपल्या कर्तृत्वाची अमीठ छाप उमटवणारे, ज्ञानी आणि गुणी तसेच समाजाभीमुख विकासाची दृष्ठी असलेले, सामाजिक जाणीवेच्या वैचारिक अधिष्ठानातून निर्माण झालेलं समाजमान्य व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजात ओळख होती. कोकलेगावातील अनेक रुग्णांना ते स्वतः नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायचे. उपचार घेत असताना तो रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहायचे तसेच उपचारावर अतिशय बारकाईने लक्ष ठेऊन असायचे. रुग्ण पूर्ण बरा हो...

नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Image
नीट पेपरफुटी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी :- डॉ .गणेश ढवळे बीड (दि.२५ ) : देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबा गणेश कर यांच्या नेतृत्वाखाली बीडमधील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक व सुजाण बीडकरांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे" एनपीए प्रशासन मुर्दाबाद, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था मुर्दाबाद, पेपरफुटी करणा-यांची संपत्ती जप्त करा " आदी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात एनटीए संस्था बरखास्त करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी तसेच पेपरफुटीमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या...

पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन

Image
पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन ​पाटोदा (प्रतिनिधी ) :पाटोदा तालुक्यातील विठ्ठलनगर (भाकरे वस्ती) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने अधिकमास तपपूर्ती सोहळ्यानिमित्त "भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा" याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. ​ह.भ.प. सुखनिवासवासी गु.श्री. बँकठस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सौ. सुनंदाताई सतिश म. उरणकर यांच्या संयोजनाखाली हा धार्मिक महोत्सव होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. संगीताताई सोळसकर करत आहेत. ​ ​सप्ताहभरात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० तुलसी अर्चन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन प्रसाद, दुपारी १ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध कथाप्रवक्त्या ह.भ.प. अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या सुश्राव्य वाणीतून 'देवी भागवत कथा' पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ७ ते ९ भव्य कीर्तन, ९ ते १० भोजन प्रसाद आणि रात्री १० ते १२ संगीत भ...

जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित

Image
जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितकरण्यात आले असून .प्रवेश घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतरही ४५९ जागा रिक्त राहिल्या आहेत नव्या सुचनेनुसार २९ मे पर्यंत या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे. नियमित प्रवेशात २५ टक्के जागा आरटीई कायद्यातंर्गत राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत २१४ शाळांमध्ये २ हजार ४२५ जागा आरक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात २ हजार ३६० विद्यार्थ्यांची निवड झाली होती . त्यातील १ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील वि...

पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला?

“पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही प्रतीक्षेत, मांजरा नदीवरील पुलाचे काम दहा वर्षांपासून रखडलेले, शहराला फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठाही अद्याप नाही!” पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा रंगतात, मात्र प्रत्यक्षात शहरातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. विविध स्तरावर बैठका, आश्वासने आणि राजकीय भाषणे झाली, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत पुतळा उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तब्बल दहा वर्षांपासून पुलाच्या कामाबाबत चर्चा, आश्वासने आणि निधीच्या घोषणा होत आहेत, परंतु आजही पुलाचे काम रखडलेलेच ...

येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान

Image
येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान येवता: आप्पाराव सारूक दि.२४ रोजी केज तालुक्यातील येवता परिसरात जीवाची वाडी वाद्यळ वारास पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दि. 23 शनिवारी सायंकाळी ५वा. दरम्यान पावसाने अचानक हजरी लावल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी शासनाकडे मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर

Image
जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी    गेवराई दिनांक 11 / 5 / 2026 रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी आरोपी 1 ) संदीप प्रधान 2 ) रोहित प्रधान 3 ) तेजस प्रधान राहणार धोंडराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे विरुद्ध भा . न्या . स . चे कलम 109 (1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3) 351(2). च्या आरोपातून नियमित जामीन मंजूर केली आहे   याबाबत सविस्तर हकीगत अशी की दि . 24 /3 / 2026 रोजी सायंकाळी 6 = 00 वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपीने सदर प्रकरणातील फिर्यादीस म्हणाले की तू आम्हाला इंस्टाग्राम च्या ग्रुप वर आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणून मारहाण केली सदर महाराणीच फिर्यादीचे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी हा काकू नाना हॉस्पिटल बीड येथे ऍडमिट झाला व चार दिवसांनी फिर्याद दाखल केली सदर घटनेवरून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये आरोपीने विरोधात भा . न्या . स . चे कलम 109(1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3)351 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला व आरोपी यांचे वतीने नियमित ज...