Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेले वृक्षारोपण चोरीला गेलेले आहे-लोक जनशक्ती पार्टी (रा)

Image
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी व प्रतिष्ठित समजली जाणारी नगरपरिषद असलेली आंबेजोगाई नगरपरिषद आहे अनेक नियमबाह्य गोष्टींमुळे अंबाजोगाई नगरपरिषद चर्चेत येत आहे अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच संत भगवान बाबा चौकाच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण नगरपरिषदेच्या वतीने एका प्रायव्हेट एजन्सीला देण्यात आले या प्रायव्हेट एजन्सीने संबंधित काम हे लाखो रुपयांचा निधी उचलला आहे याचाच पाठपुरावा म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून विविध निवेदन व आंदोलने केली परंतु झोपलेले प्रशासन जागी होताना दिसत नाही 14 वा व पंधरावा वित्त आयोगामधून कोठ्यावधींचे कामे अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये मागील चार वर्षात झाली त्यातील अनेक कामे कागदावरच आहेत याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अन्यथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन मुख्य अधिकारी अंबाजोगाई यांना लोक जनशक्ती पार्टीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले यावेळी लोकजनशक्ती पार्टी (रा) युवा मर...

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढ

(प्रतिनिधी – मुंबई ) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त ( २०२६ – २०२७ ), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.          राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत दि. २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा....

गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमती जास्त तुटवड्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय सुरळीत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन.

Image
गेवराई (प्रतिनिधी ) दि.६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशानुसार आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने धरणे अंदोलन कारण्यात आले. या अंदोलनात गेवराई तालुक्याच्या वतिने राज्य उपाध्यक्ष प्रा. विष्णु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु) गायकवाड आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरचा केला जात असलेला कृत्रिम तुटवडा करुन अनेक गॅस एजन्सी धारक गॅसचा काळाबाजार करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी व केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ गेवराई तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.  यावेळी गॅस सिलेंडर समोर ठेवून "नरेंद्र कब देंगा सिलेंडर" अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी घोषणांमुळे तहसिल परिसर दणाणून गेला होता.  या आंदोलनात जिल्हा सल्लागार सुदेश पोदार, तालुका महासचिव किशोर भोले, अनिल बोराडे, ज्ञानेश्वर हवाले, संजय शरणांगत, राजेंद्र साळवे, महेश काकडे, कृष्णा सामसे,प्र...

नगर परिषद कर्मचाऱ्यांना जयंतीपूर्वी वेतन व १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्याची मागणी

Image
परळी वै (प्रतिनिधी ) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ११ एप्रिल व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल जयंतीनिमित्त नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच प्रत्येकी १० हजार रुपये अग्रीम (फेस्टिव्हल लोन) दि. १० एप्रिल २०२६ पूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, शाखा नगर परिषद परळी वै यांच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल महिन्यात महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या पार्श्वभूमीवर नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि ते जयंती उत्सव आनंदमय वातावरणात साजरा करू शकावेत, यासाठी वेतन वेळेवर देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना महागाईच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये फेस्टिव्हल लोन देण्यात यावे व फरकाची रक्कमही अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या मासिक हप्त्यांची कपात एप्रिल महिन्यात न करता कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात यावे, अशीही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली...

महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
महापुरुषांच्या अनाधिकृत स्मारकांविरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन  बीड (दि. ०६): राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड) रामधन जमाले ...

जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!

Image
जय भीम महोत्सव: जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा उत्साहात संपन्न!  विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उच्च ठेवावे : उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महापुरुष जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन बीड शहरातील तुलशी संगणक महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते . दर सालाबादप्रमाणे या ही वर्षी समितीच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आले .या स्पर्धेच्या तालुकास्तरीय स्पर्धेतून निवडक प्रथम दहा विद्यार्थ्यांची निवड केली होती .बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला. बीड जिल्ह्यातून एकूण या परीक्षेसाठी सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी जिल्हास्तरीय साठी 110 विद्यार्थी पात्रता धारक होते . सदर परीक्षा सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग आयु. नानाभाऊ हजारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मध्ये विचार मंचावर प्रवी...

लिंबागणेश पाणीपुरवठा विहिरीच्या मोटारची वायर दीड महिन्यात २ वेळा चोरी; नेकनुर पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान ! पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल

Image
लिंबागणेश (दि.०४ ) : बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात तब्बल दोन वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज (दि.०४) नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, विक्रांत व...