Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न

Image
बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न बीड | प्रतिनिधी सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय, बीड येथे स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब मुंडे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पांडुरंग सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृत्वाचे महत्त्व, संस्कारांची परंपरा आणि शिक्षणाची गरज यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली. या सोहळ्यात सौ. सविता मोहनराव रणदिवे (अकलूज) व सौ. कांता संतोष सोनवणे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सौ. मीनाक्षी भास्कर वडमारे, श्रीमती सविता मनोहर पंडित आणि सौ. शकुंतला किसन शीलवंत यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांच्या टाळ्यां...

बीडमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचा उत्साह; भव्य रॅलीने शहरात स्वागत

Image
​बीड प्रतिनिधी : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे आज बीड शहरात आगमन झाले. या निमित्ताने आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ​ शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये हजारो निष्ठावान भक्त आणि भाविक सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग जालना रोड श्री संत सेवालाल महाराज चौक' मार्गे 'कॅनॉल रोड' असा निश्चित करण्यात आला.   बीड शहर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग नोंदवला.  'जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज की जय' च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ​पादुका दर्शनासाठी प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून, दिवसभर दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

लिंबागणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Image
लिंबागणेश (दि. २१ ): महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी घटना चिखला गाव येथे घडली असून शिवस्मारक उभारणीच्या वादातून मराठा समाजातील बांधव व महिलांवर दगडफेक व अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेत संजीवनी वाघ यांच्यासह अन्य महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. स्त्रीसन्मान व न्यायाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या विचारांना ही घटना काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी केली. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून प्रशासनाने निष्पक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थितांना संयम राखत लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच बालासाहेब जाध...

जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदबहुजन समाजाच्या एकतेचा, प्रबोधनाचा आणि धम्मदीक्षेचा भव्य सोहळा

Image
परळी (प्रतिनिधी ): ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर, ता. धारूर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क परिसर, जवळा फकीर येथे होणाऱ्या या धम्ममय सोहळ्यास बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रा. खेमधम्मो (मुळावा) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पूर्णा) राहणार आहेत. ध्वजारोहणाचा मान डॉ. प्रा. भदन्त एम. सत्यपाल महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) यांना मिळणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पु. भदन्त डॉ. इंदवंश महाथेरो (कुशीनगर, उत्तर प्रदेश), भदन्त मुदितानंद महाथेरो (परभणी), भदन्त पय्याबोधी थेरो (नांदेड), भदन्त पय्यानंद थेरो (लातूर) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच भदन्त धम्मसार थेरो (किल्लारी), भदन्त सुभूती थेरो (नांदेड), भदन्त धम्मशील थेरो (बीड), भदन्त नागसेन बोधी (उदगीर) आदी भन्ते या परिषदेत मार्गदर्शन...

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा २१ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये

Image
बीड (प्रतिनिधी ) : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे भव्य दर्शन सोहळा शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीड–जालना रोड, श्री संत सेवालाल महाराज चौक, कॅनॉल रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. रामानंद संप्रदायाच्या वतीने देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, या कार्याची व्याप्ती व्यापक आहे. संस्थानमार्फत राष्ट्रीय महामार्गांवर ५४ विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. व्यसनमुक्ती अभियानातून लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे. याचबरोबर दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या १५ दिवसांच्या कालावधीत संप्रदायाच्या माध्यमातून १ लाख ७१ हजार १५० रक्तकुप्यांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आले, जो एक विश्वविक्रम मानला जात आहे. तसेच १३३ अवयवदान आणि १७९ देहदान विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. “पाणी अडवा, पाणी जिरवा” उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ४५९८ कच्चे बंधा...

बोरफडी येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार

Image
बोरफडी येथे आज सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत कार्यक्रमास उपस्थित रहा -सरपंच कैलास घुगे बीड (प्रतिनिधी ) दि.१९ : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार व प्रसिद्धीसाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आज (दि.२०) सकाळी १० वाजता बीड तालुक्यातील बोरफडी येथे भेट देणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन बोरफडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच कैलास घुगे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे तसेच गटविकास अधिकारी अनिकेत सानप उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विविध विकासकामांची प...

आम आदमी पार्टी बीड कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
बीड (प्रतिनिधी ) – आम आदमी पार्टी बीड कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई जाधव उपस्थित होत्या. तसेच बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, बीड शहर सचिव मिलिंद पाळणे, आजिनाथ जी रसाळ, राजश्री येडे, संजय गायकवाड, अभिषेक टाळके, स्वप्निल गायकवाड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते.