Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांचा दिपकभाऊ बोऱ्हाडे यांना जोरदार पाठिंबा; मुंबईकडे रवाना

Image
   लिंबागणेश (दि.२२): धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बोऱ्हाडे यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लिंबागणेश येथील धनगर समाज बांधवांनी आज रात्री मोठ्या उत्साहात मुंबईकडे कुच केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत ताशांच्या गजरात प्रदक्षिणा काढण्यात आली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो”, “दिपकभाऊ तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समाज बांधवांनी सरकारकडे मागणी करताना सांगितले की, कोर्ट-कचेरी व समित्यांच्या प्रक्रियेत न अडकता धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा शासन निर्णय तातडीने घ्यावा. तसेच राज्यपालांच्या स्वाक्षरीसह शिफारस पत्र राष्ट्रपतींकडे पाठवून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा. दिपकभाऊ बोऱ्हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवून त्यांचा जीव वाचवावा, अशी आग्रही मागणी य...

लिंबागणेश येथे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत NCMC ( बस पास) कार्ड नोंदणी शिबिर

Image
लिंबागणेश (दि.२२): राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासातील सवलतींसाठी डिजिटल स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून, “एनसीएमसी” (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज, रविवार (दि.२२) रोजी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या महामंडळाकडून महिलांना अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तसेच स्वातंत्र्यसैनिक, राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी व दिव्यांग नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. कार्ड अनिवार्य झाल्याच्या चर्चेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्ती बसस्थानकांवर रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. ही धावपळ टाळण्यासाठी लिंबागणेश येथील मारोती मंदिरात सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड (मूळ प्रत + १ झेरॉक्स) आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पु...

दुःखद निधन: अंबादास हरीभाऊ वाघमारे यांचे अल्पशा आजाराने निधन

Image
​बीड प्रतिनिधी : पंचशील नगर येथील रहिवासी आणि राहुल वाघमारे यांचे वडील अंबादास हरीभाऊ वाघमारे (वय ७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वाघमारे परिवारावर शोककळा पसरली आहे. ​त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात मुली,मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ​भावपूर्ण श्रद्धांजली!

शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार तालुक्यात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

Image
शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार तालुक्यात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा तालुकाप्रमुख/ उपजिल्हाप्रमुखांनी घेतली मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन गळाभेट-    शिरखुर्मा अन् गुलगुले पदार्थांचा घेतला आस्वाद ​ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :      पवित्र रमजान ईदनिमित्त शिरूर कासार तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असुन याच उत्साहात भर घालत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या असुन शिवसेना तालुकाप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारेगाव, जाटनांदूर, वारणी यांसह तालुक्यातील अनेक गावांत भेटी देऊन सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.   ​शिरखुर्मा अन् गुलगुले यांचा आस्वाद--   तालुकाप्रमुख या नात्याने तालुक्यातील मुस्लिम बांधव आणि मित्रपरिवाराच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांची गळाभेटी घेऊन पारंपरिक शिरखुर्मा आणि गुलगुले या पदार्थांचा आस्वाद घेत, मुस्लिम बांधवांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा स्वीकार करण्यात आला. ग्रामीण भागातील ही जुनी संस्कृती जोपासत यावेळी अत्यंत म...

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघपरळी नगरपरिषद कंत्राटी कामगार शाखा स्थापन

Image
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ परळी नगरपरिषद कंत्राटी कामगार शाखा स्थापन अध्यक्षपदी विक्रांत समिंदरसावळे, उपाध्यक्ष अमोल मस्के, सचिव सुमेर समिंदरसावळे यांची नियुक्ती  परळी वै प्रतिनिधी : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) या ट्रेड युनियनची नगरपरिषद कंत्राटी कामगारांची परळी वैजनाथ शाखा अधिकृतपणे स्थापन करण्यात आली असून, या शाखेला राज्य कार्यकारिणीकडून मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर संघटनेची नोंदणी भारतीय ट्रेड युनियन अधिनियम 1926 अंतर्गत (रजि. क्र. ALC/17/10744, दि. 30 मे 2013) झाली आहे. मा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेली ही संघटना देशभरातील सरकारी व खाजगी क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी लढा देत असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे नगरपरिषद कंत्राटी कामगारांची शाखा स्थापन करण्यात आली आहे. दि. 20 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत विक्रांत सूर्यकांत समींदरसवळे (अध्यक्ष), बालाजी मारोती गजबे (कार्यकारी अध्यक्ष), अविनाश वसंतर...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा – नगरसेवक संतोष जाधव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच डाळिंब, आंबा आदी फळबागांनाही मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेले उत्पन्न पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे शेतकरी आधीच विविध संकटांचा सामना करत असून आता अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः फळबाग धारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना त्वरित मदत मिळणे अत्यावश्यक आहे.दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकरी व फळबाग धारकांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी अशी नगरसेवक संतोष जाधव यां...

गारपिटीने कलिंगड पिकाचा चुराडा; आ . संदिप क्षीरसागर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची स्थळ पाहणी !शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी

Image
   लिंबागणेश:- ( दि.२०)बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बुधवारी व गुरुवारी २ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी (घाट) येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी आज, शुक्रवार (दि.२०) रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडीत नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोतदार, कृषी सहायक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभिषण मुळीक उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त कलिंगड पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की, दीड एकर क्षेत्रावर सुमारे दीड लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे. या प...