Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा निर्भीड आवाज- पत्रकार अण्णासाहेब साबळे जिजाऊ माँसाहेब आदर्श दिव्यांग पत्रकार पुरस्कार २०२६ साठी घोषित

Image
 आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) :  दिव्यांग बांधवांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी गेली अनेक वर्षे अविरत लढा देणारे, माळी गल्ली, आष्टी (जि. बीड) येथील प्रखर सामाजिक बांधिलकी असलेले पत्रकार अण्णासाहेब दिनकर साबळे यांची प्रतिष्ठेच्या ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श दिव्यांग पत्रकार पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आल्याची घोषणा मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, आष्टी तर्फे करण्यात आली. या निवडीची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम पोकळे यांनी दिली .   तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेतर्फे यावर्षी प्रथमच राज्यस्तरावर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व लोकहितवादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना जिजाऊ माँसाहेब आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिव्यांग कल्याण व सामाजिक पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल अण्णासाहेब साबळे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे .   दिव्यांग सुविधा केंद्रातील त्रुटी, मेडिकल प्रमाणपत्रासाठी होणारी हालअपेष्टा, बसस्थानकांवरील गैरवर्तन, प्रवासातील अडथळे, शिक्षणातील समस्या, तसेच शासन योजनांमधील कमतरत...

लिंबागणेश येथे शेतकरी पुत्रांचा एल्गार; भाववाढीसाठी ‘शेतकरी हक्क मोर्चा’त सहभागी होण्याचे आवाहन

Image
लिंबागणेश येथे शेतकरी पुत्रांचा एल्गार; भाववाढीसाठी ‘शेतकरी हक्क मोर्चा’त सहभागी होण्याचे आवाहन – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.१८) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज( दि.१८ ) गुरूवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या “शेतकरी हक्क मोर्चा”च्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्रांची बैठक संपन्न झाली. कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाला वाढीव दर मिळावा, सीसीआय व जिनिंग केंद्रांवरील शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच कापूस व सोयाबीनची परदेशातून होणारी आयात तत्काळ बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. दि.२५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य “शेतकरी हक्क मोर्चा”मध्ये शेतकरी, शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र तसेच शेतकऱ्यांप्रति संवेदनशील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील,कुलदीप करपे, सुहास जायभाये, रविंद्र निर्मळ यांनी शेतकऱ्...

पोथरा येथील काशेश्वरी भजनी मंडळाचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

Image
(चौसाळा प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील असलेल्या पोथरा येथील काशेश्वरी भजनी मंडळ हे गावातील महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन भजनी मंडळाची स्थापना केली असून याची अधिकृत नोंदणी देखील केलेली असून याचा र. जि. क्र.16 875 हा आहे. या भजनी मंडळातील पेटी मास्तर व भजनी मंडळाचे अध्यक्ष अश्रुबा हावळे,मृदंगाचार्य मधुकर लंबाटे, गायनाचार्य विष्णू खनाळ,केशरबाई खनाळ,केशर बाई हावळे, चंद्रकला कांबळे, साखरबाई काळे, कालींदाबाई तातूडे इत्यादी सदस्य हे चांगल्या प्रकारे गायन करतात व ते आपल्या कलेतून संगीत भजन हरिपाठ हरी किर्तन समाजात समाज प्रबोधन व्यसनमुक्ती स्त्रीभ्रूणहत्या सामाजिक बांधिलकी अंधश्रद्धा निर्मूलन या माध्यमातून गेली 35 वर्ष समाजसेवा करत आहे त्यांना परिसरातील अनेक गावातून हरिनाम सप्ताह जागर विविध ग्रंथ समाप्तीसाठी या भजनी मंडळास आमंत्रित केले जाते हे सर्व कलावंत उत्तम प्रकारे अभंग गवळणी भारुड या प्रकारे गायनाद्वारे सादर करून कार्यक्रम पार पाडतात पेटी मास्तर श्री अश्रुबा हावळे यांच्या मार्गदर्शनाने हे भजनी मंडळ कला सादर करत आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ मि...

गहाळ मोबाईल शोधणारे बीड पोलिस; मात्र ५ वर्षांपासून जप्त मोबाईल परत देण्यास असमर्थ!— डॉ. गणेश ढवळे यांचा पोलिस प्रशासनाला जाहीर सवाल

Image
गहाळ मोबाईल शोधणारे बीड पोलिस; मात्र ५ वर्षांपासून जप्त मोबाईल परत देण्यास असमर्थ! — डॉ. गणेश ढवळे यांचा पोलिस प्रशासनाला जाहीर सवाल बीड :- (दि.१७ )“पोलिसांची सतर्कता, नागरीकांचा विश्वास” असा ब्रीदवाक्य वापरत गहाळ मोबाईल शोधून पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत देतानाचे फोटो ‘बीड पोलिस’च्या अधिकृत फेसबुक पेजवर व विविध दैनिकांत झळकत असताना, याच बीड पोलिस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचा तपासासाठी जप्त केलेला मोबाईल तब्बल पाच वर्षे उलटूनही परत दिलेला नाही, असा गंभीर आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे. कोरोना कालावधीत बीड जिल्हा रुग्णालयातील अनियमितता व कथित गैरव्यवहार उघडकीस आणल्याने सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने हा गुन्हा दि. २७ जुलै २०२३ रोजी रद्द केला. मात्र, त्या गुन्ह्याच्या तपासासाठी दि. ०९.०९.२०२० रोजी बीड शहर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी जप्त केलेला मोबाईल आजतागायत परत करण्यात आलेला नाही. डॉ. ढवळे यांच्यावर तत्कालीन जिल्हा शल्...

शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडते - गणेश शेवाळे

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहराचा विकास रखडलेला; मूलभूत सुविधांअभावी नागरिकांमध्ये असंतोष पाटोदा तालुका व शहराचा विकास आजही अपेक्षेप्रमाणे झालेला दिसत नाही. शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.पाटोदा शहरातील चौक-चौकात महामानवांचे पुतळे, चौकांचे सुशोभीकरण अद्याप झालेले नाही. इतर शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली चौक सुशोभीकरण, सांस्कृतिक ओळख जपली जात असताना पाटोदा शहर या बाबतीत मागे असल्याचे स्पष्ट होते.पाटोदा बाजारपेठेजवळील मांजरा नदीकाठी सुसज्ज व सुरक्षित नदीघाटाची सुविधा आजही उपलब्ध नाही. त्यामुळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे.शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खराब असून खड्डे व धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ शौचालयांचा अभाव असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.पाटोदा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, तसेच स्पर्धा...

चौसाळा येथील स्टेट बँकेच्या कारभाराला ग्राहक वैतागले

Image
चौसाळा येथील स्टेट बँकेच्या कारभाराला ग्राहक वैतागले शाखाधिकारी फनिकेश्वर कुंडाचा मनमानी कारभार थांबवा - विवेक कुचेकर (चौसाळा प्रतिनिधी )  बीड तालुक्यातील चौसाळा ही तालुक्यातील प्रमुख व्यापारी पेठ असून चौसाळा शहराला जवळपास परिसरातील ४० ते ५० गावच्या लोकांचा दैनंदिन व्यवहारासाठी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेशी संपर्क असतो. सदरील शाखेचा शाखा अधिकारी पदाचा पदभार फनिकेश्वर कुंडा यांनी घेतल्यापासून या शाखेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे.  सदरील शाखेत कायम चलन तुटवडा असतो. (दि. १६) डिसेंबर मंगळवार रोजी चौसाळापासून जवळच असलेल्या रुईगव्हाण येथील आजारी असलेल्या शेतकरी महिला सोजर श्रीमंत जाधव आपल्या पती समवेत बँकेत आल्या होत्या. दवाखान्यात जाण्यासाठी फक्त चार हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी त्या तब्बल दोन तास कॅशियर च्या समोर आजारी असतानाही बसलेल्या होत्या. बँकेत कॅश उपलब्ध नसली तरी अनेक खातेदार ग्राहक बँकेत पैसे टाकण्यासाठी बसले होते. परंतु त्यांनी बँकेत भरण्यासाठी आणलेली रक्कम ही स्वीकारण्यात येत नव्हती. याबाबत का...

लिंबागणेश परिसरात कृषी पंपांचा दिवसा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी ठरत आहे डोकेदुखी; पूर्ववत करण्याची मागणी. - हरिओम क्षीरसागर

Image
बीड | प्रतिनिधी लिंबागणेश परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू केला. या निर्णयाबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, सध्या सुरू असलेला हा दिवसा वीजपुरवठा शेतकरी व ग्रामस्थांसाठी नव्या अडचणी निर्माण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. घरगुती वीज वापर, पाणीपुरवठा योजना, शेतीची कामे तसेच दैनंदिन वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिणामी, अनेक ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पाणीपुरवठ्याचे नियोजन, घरगुती वापरासाठी आवश्यक असलेली वीज तसेच शेतकामांची वेळ यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला कृषी पंपांचा दिवसा वीजपुरवठा पुर्ववत म्हणजेच पूर्वीप्रमाणे रात्री सुरू करण्यात यावा, अशी ...