Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन

Image
वाराणसीतील मणिकर्णिका घाटाची तोडफोड करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ  लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन लिंबागणेश :- (दि.२७ ) उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील जगप्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामाच्या नावाखाली ऐतिहासिक मूर्ती व शिवलिंगांची तोडफोड करण्यात आल्याचे प्रकार सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून समोर आले आहेत. संपूर्ण भारतात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक संरचनांचे झालेले नुकसान हा केवळ बांधकामाचा प्रश्न नसून तो धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशावर झालेला घाला असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (दि. २७) रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविंद्र निर्मळ, कृष्णा पितळे यांची समयोचित भाषणे झाली.निवेदन मंडळ अधिकारी ...

गढी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांला दिला ध्वजारोहण करण्याचा दिला मान

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज सकाळी ७ =३० वाजता ७७ वा प्राजकसत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी आजपर्यत कोणत्याही सरपंचांनी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला नव्हता तो आज गढी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच घोंगडे विष्णूपंत यांनी गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांना प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने गढी ग्रामपंचायत मध्ये आज प्रजाकसताक दिनानिमित्त ध्वज फडकवण्याचा मान देउन एक नवा इतिहास घडवला यावेळी हा प्रजाकसत्ताक दिन सरपंच घोंडगे विष्णूपंत . यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच विष्णूपंत घोगडे म्हणाले की हा ध्वजारोहणाचा मान सन्मान हा त्यांचा असतो आणि आजपर्यत हा मान सरपंचानी कुणालाही दिला नाही परंतू मी गेल्या दोन वर्षापासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक वेळी ध्वज फडकवण्याचा मान सर्वसामान्य व्यक्तीला देत आलो आहे तेव्हा आजचा प्रजाकसत्ताक दिन निमित ध्वज फडकविण्याचा मान मा...

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ

Image
जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ शिक्षणप्रेमी अमोल जाधवांवर येणे हि शासन–प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ; खाजगी संस्थानिकांशी संधान बांधून सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र :- डॉ. गणेश ढवळे बीड :- (दि. २६ ) नांदुरघाट ता. केज जि. बीड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी वर्गखोल्या मंजूर न झाल्याने तसेच शाळा बांधकामातील कथित गैरव्यवहारावर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांना प्रजासत्ताकदिनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, ही घटना शासन व प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असून अत्यंत लाजिरवाणी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली आहे. नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळा बांधकामातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी अमोल जाधव गेल्या दोन वर्षा...

प्रजासत्ताक दिन विशेष :अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा

Image
लेख : प्रजासत्ताक दिन विशेष :अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा प्रजासत्ताक दिन विशेष : अधिकारांच्या उत्सवात 'कर्तव्याचे' भानच ठरेल राष्ट्रनिर्मितीचा पाया ! प्रस्तावना : २६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि भारत एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या दिमाखात साजरा करतो. संविधानाने आपल्याला प्रगत लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ 'अधिकार' दिले आहेत; मात्र आज ७ दशकांनंतर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे की, आपण अधिकारांचा उपभोग घेताना आपल्या 'कर्तव्यांना' न्याय दिला आहे का? राष्ट्र केवळ कागदी कायद्यांनी नाही, तर नागरिकांच्या कर्तव्यभावनेने समृद्ध होते. अधिकारांचा आग्रह धरणारा नागरिक स्वतःपुरता विचार करतो, पण कर्तव्याचे पालन करणारा नागरिक हा 'राष्ट्रकेंद्रित' असतो. म्हणूनच आजच्या जागतिक परिस्थितीत अधिकारांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे, ही काळाची गरज बनली आहे. जागतिक संघर्ष आणि भारतापुढील आव्हाने : आज संपूर्ण विश्व तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया-युक्रेन अस...

अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांच्या हस्ते सत्कार

Image
       बीड (प्रतिनिधी ) : - मौजे जोला (ता. केज) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे व सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला. त्यांनी धिरज भवर (रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी) या तरुणास १०८ रुग्णवाहिकेतून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी सौ आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे दाम्पत्याचा सत्कार करून विशेष कौतुक केले. केज–बीड रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. अशा स्थितीत सौ. आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. जखमी तरुणास त्वरित रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू होऊ शकले. वेळेत मदत मिळाल्याने पुढील उपचाराची प्रक्रिया सुलभ झाली, असेही सांगण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी ढाकणे दाम्पत्याच्या कार्य...

बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य !परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी

Image
बिदुसरा धरणाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य ! परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी  जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष; तात्काळ स्वच्छता न राबविलास जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन ! मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांचा इशारा  बीड( प्रतिनिधी ) बीड शहराला मागील अनेक दशकापासून पाणीपुरवठा करणारे पाली गावाजवळी बिंदुसरा धरण हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणाहून प्रवास करणारे अनेक प्रवासी व बीड शहरातील पर्यटन प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकनिक करण्यासाठी व धरण पाहणसाठी येतात. या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाली धरणाची देखभाल दुरुस्ती व स्वच्छतेची जबाबदारी असणारे जलसंपदा विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असून येणाऱ्या पर्यटकांना मात्र धरणातील शुद्ध पाणी पाहण्याऐवजी घाणीचे दर्शन होत आहे. या गंभीर बाबीकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे. पाली गावाजवळ सोलापूर बीड राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराला ...

लिंबागणेश येथे गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांची किर्तनाने सांगताकिर्तन, महापुराण, यज्ञ व संत महंतांचा सत्कार सोहळा संपन्न

Image
लिंबागणेश प्रतिनिधी ):बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्री भालचंद्र गणपती देवस्थानच्या वतीने श्री गणेश जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत श्रीमत् गणेश महापुराण कथा व पंचकुंडी गणेश यज्ञास शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी विधिवत प्रारंभ झाला होता. या धार्मिक सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची विस्तृत रूपरेषा आखण्यात आली होती. बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी श्री भालचंद्र गणेशाचा महाभिषेक, श्रीमत् गणेश महापुराण कथेचे वाचन, श्री मन्मथ स्वामी पालखी आगमन सोहळा तसेच हरिपाठ कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. यानंतर पुढील दिवशी सर्व ब्रह्मवृदांच्या हस्ते सहस्त्र आवर्तन महाभिषेक करण्यात आला. यावेळी गणेश जन्मकथेचे वाचन तसेच डॉ. वीरूपक्ष शिवाचार्य स्वामी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. प्रवचनातून त्यांनी भक्ती, संस्कार व धार्मिक परंपरेचे महत्त्व भाविकांना पटवून दिले. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाची सांगता शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प. धर्मराज दादा सामनगावकर यांच्या सुश्राव्य व प्रेरणादायी किर्तनान...