Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का?

Image
महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.०९ ): बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल ५४ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिल रोजी नुकत्याच घडलेल्या कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झालेल्या ज्यात ७ मयत बालकांचा समावेश असलेल्या घटनेचा दाखला देत, “अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. --- दिंडोरी दुर्घटनेची पार्श्वभूमी नाश...

अंबाजोगाई कृषी विभागात महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजना कागदावरच- लोकजनशक्ती पार्टी (रा)

Image
       अंबाजोगाई : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात उदा. 1)नमो शेतकरी महासन्मान निधी योजना  2)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  3)प्रधानमंत्री पिक विमा योजना मागेल त्याला शेततळे योजना 4)ठिबक व तुषार सिंचन योजना जलयुक्त शिवार अभियान योजना 5)कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ट्रॅक्टर अवजारे खरेदी योजना  6)सोलर स्प्रे पंप अनुदान योजना  7)एकात्मिक उत्पादन विकास अभियान योजना  8)राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना  9)शरद पवार ग्राम समृद्धी योजना  10)प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना  11) बी बियाणे स्वस्त दरात किंवा मोफत वाटप योजना अशा अनेक योजना महाडीबीटी पोर्टल द्वारे चालवल्या जातात या योजना भरण्यासाठी किंवा पाहण्यासाठी अँड्रॉइड स्वरूपाचा मोबाईल लागतो प्रत्येक शेतकऱ्याकडे अशा प्रकारचा मोबाईल नसल्यामुळे अनेक योजना कागदावरच दिसत आहेत तालुका कृषी अधिकारी मोहीम अधिकारी कृषी सेवक कृषी सहाय्यक असे विविध अधिकारी आंबेजोगाई तालुक्याला लाभले असताना सुद्धा हे अधिकारी शेतकऱ्यांची ...

बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल

Image
बीड नगर पालिकेच्या ताफ्यात अद्यावत स्वच्छता वाहन   नव्या सत्ताधाऱ्याकडून लोकसेवेत दाखल . आमदार विजयसिंह पंडित, व मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार - प्रेमलताताई पारवे, विनोद मुळूक बीड : शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी देणारी अत्याधुनिक आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद गाडी (Emergency Response Sanitation Unit) आज नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली असून,स्व.अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार मा.ना.पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या आदेशानुसार मा.आमदार विजयसिंह पंडित व मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढाकारातून ही गाडी बीड नगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाबद्दल नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आ.विजयसिंह पंडित साहेब ,जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या गाडीचा अधिकृत शुभारंभ नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक,स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, प्रवक्ते भागवतजी तावरे, नगरसेवक,जैतुल्ला खान,शेख अशफाक इनामदार, मनोज गोडसे, नगरसेवक दत्ता जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, अ...

नेपाळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत शिक्षण द्यावा – नगरसेवक संतोष दादा जाधव यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) नेपाळमध्ये खासगी शाळा बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे.जाधव म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात समानता निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आज खासगी शाळांच्या वाढत्या फीमुळे अनेक पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व मुलांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवून त्या अधिक सक्षम केल्यास समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि सर्वांसाठी एकसमान शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेपाळप्रमाणे धाडसी निर्णय घ्यावा,अशी मागणी नगरसेवक संतोष दादा जाधव यांनी केली आहे

शिक्षकांचे वेतन १४ एप्रिलपूर्वी अदा करा : मुप्टा संघटनेची मागणी

Image
बीड | प्रतिनिधी शिक्षक संघटना (मुप्टा), बीड जिल्ह्याच्या वतीने माहे मार्च २०२६ चे प्रलंबित वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी, म्हणजेच १४ एप्रिलपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शिक्षकांच्या दैनंदिन गरजा व आर्थिक अडचणी लक्षात घेता वेतन वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन लवकर मिळाल्यास शिक्षकांना मोठा दिलासा मिळेल, असेही संघटनेने स्पष्ट केले. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हासचिव प्रा. शशिकांत जावळे, जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप तसेच प्रा. प्रविण तरकसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या या न्याय्य मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वेतन अदा करावे, अशी अपेक्षा मुप्टा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी "स्वच्छ कुंभ- सुरक्षित कुंभ- प्लास्टिक मुक्त कुंभ" हे ब्रीदवाक्य द्यावे –चंदन पवार

Image
2027 मध्ये नासिकमध्ये होत असलेल्या महाकुंभाचे लवकरच आगमन होत आहे, हा कुंभ म्हणजे नाशिककरांसाठी खूपच आनंदाचा क्षण आहे, ज्याप्रमाणे प्रयागराज मध्ये उत्तरप्रदेश सरकारने कुंभाचे नियोजन केले तेथील नियोजनाचा आराखडा बघता किंवा त्यापेक्षा दुपटीने चांगले नियोजन नाशिक मध्ये झाले पाहिजे, नाशिक मध्ये महाकुंभ होत असताना कुठलीही अप्रिय दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत असे पवार यांनी म्हटले आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लोकांच्या मनावर जर "स्वच्छ कुंभ-सुरक्षित कुंभ -प्लास्टिक मुक्त कुंभ" ही संकल्पना बिंबवली तर त्याचा नक्कीच कुंभमेळ्यासाठी फायदा होईल, त्यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या दर्शनी ठिकाणी, कुंभमेळ्याच्या ठिकाणी, संपूर्ण नाशिक शहरात आणि नाशिकच्या बाहेरील रस्त्यांवर ब्रीदवाक्याचे नाम फलक लावावेत, जेणेकरून नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक, नागरिक, प्रवाशी तो नाम फलक वाचून त्यावर विचार करून कार्य करतील परिणामी स्वच्छ, सुरक्षित आणि प्लास्टिक मुक्त कुंभमेळा होईल त्यामुळे प्रशासनावरीलही ताण कमी होईल, हे लक्षात घेतले पाहिजे, "स...

विश्व बंजारा दिनानिमित्त बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा उजाळा

Image
विश्व बंजारा दिनानिमित्त बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचा उजाळा  ८ एप्रिल हा दिवस देशभरात विश्व बंजारा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सन २००७ पासून बंजारा युवा संघटनांच्या पुढाकारातून या दिवसाचे औचित्य साधले जात असून, बंजारा समाजाच्या समृद्ध इतिहास, संस्कृती व परंपरांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो. राजस्थान ही मूळ भूमी असलेला बंजारा समाज आज महाराष्ट्रासह पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत मोठ्या प्रमाणावर विखुरलेला आहे. पारंपारिकदृष्ट्या पशुपालक आणि व्यापारी म्हणून ओळख असलेल्या या समाजाने देशाच्या विविध भागांत धान्य व मीठ वाहतुकीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. बंजारा समाजाची ओळख त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा, लोककला, भजन-कीर्तन आणि सामूहिक नृत्यांमधून प्रकर्षाने दिसून येते. विशेषतः महिलांची पारंपारिक वेशभूषा, चांदीचे दागिने, नक्षीदार घागरे आणि नाण्यांनी सजवलेले वस्त्र हे या समाजाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जाते. पूर्वी भटक्या जीवनशैलीत राहणारा हा समाज ‘तांडा’ पद्धतीने समूहात वास्तव्य करत असे. तांड्याचा प्रमुख ‘नाईक’ म...