Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे

Image
पुस्तक न वाचता धमकी; संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करा - नितीन सोनवणे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकांना जीवे मारण्याची धमकी बीड प्रतिनिधी - दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची, घरात घुसून मारण्याची आणि “पानसरेंना भेटायला वर जा” अशी थेट धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असून, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की, गायकवाड यांनी रात्री उशिरा फोन करून पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला. “शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अनादरकारक आहे,” असे म्हणत त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिव्या दिल्या आणि “तुझी जीभ कापेन, घरात घुसून मारेन, तूही पानसरेंना भेटशील” अशा धमक्या दिल्या. संभाषण सुमारे ९ मिनिटे चालले. गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप आपलीच असल...

" वाचाल तर वाचाल" तर्फे जागतिक पुस्तक दिन उत्साहात संपन्न

Image
129 पुस्तकाचे दोन संच वाचनाकरिता वितरित.  बीड (प्रतिनिधी ) सोशल मीडिया व इंटरनेटच्या मायावी जाळ्यात अडकून विद्यार्थी वाचनापासून; खेळाच्या मैदानापासून दूर राहत आहेत. लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाने 2016 पासून बीड शहरात व परिसरात 44 मोफत वाचनालये सुरू करून 3200 पुस्तकांची उपलब्धता करून दिली आहे.आज दिनांक 23/ 4/ 2026 रोजी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून मौजे वरवटी तालुका जिल्हा बीड येथील 44 व्या केंद्रात 2 ऱ्या फेरीतील 41 पुस्तकांचा संच वाचण्याकरिता ॲड राजेश शिंदे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.एम. भोले सर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. संचातील पुस्तके वितरणाची जबाबदारी ॲड राजेश शिंदे यांनी तर प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या मोफत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांकरिता 88 पुस्तकांचा संच वर्गशिक्षिका विशाखा वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. सदरील पुस्तकांचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुउद्देशीय विकास प्रकल्प

. गेल्या एक शतकापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात कोणत्या आणि किती समस्यांना तोंड द्यावे लागेल याची माहिती आणि पूर्ण ज्ञान होते. त्यामुळेच त्यांना भारताचा द्रष्टा नेता, अंतर्यामी व्यक्तिमत्त्व, किंवा भविष्याचे वेध घेणारे शिल्पकार म्हणले तर वावगं ठरणार नाही. आज संपूर्ण देशात पाण्याचा प्रश्न टोकाचा आणि दुर्भिक्षेतेचा झाला आहे. काही विचारवंतांनी भाकीत केल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध जर झाले तर ते पाण्यासाठीच होईल. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याकाळी केलेले कार्य सुचविलेले धोरण जल,कर, विद्युत, शेती उत्पादन व उद्योगासंबंधीचे विचार आजही भारताच्या यशस्वीतेसाठी उद्बोधक ठरत आहेत. भारताची सामाजिक आर्थिक बैठक निर्धारित करण्यामध्ये 1920 ते 1950 हा कालखंड महत्त्वाचा मानला जातो या काळात सामाजिक आणि आर्थिक साधन म्हणून नियोजन तंत्राचा स्वीकार झाला. या नियोजन विकासाची सुरुवात जल व ऊर्जा या विकास युद्धोत्तर पुनर्रचनेच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात झाली. हा काळ साधारण 1942-46 चा होता त्यावेळी गव्हर्नरच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांच्याकडे ऊर्जा, जलसिंचन आणि ...

आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Image
आमदार संजय गायकवाड यांना अटक करुन आमदारकी रद्द करा,भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी कोल्हापूर स्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यास परिवारासह जीवे मारण्याची धमकी दिली. बीड (दि 23 ): बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूरस्थित पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरुन आई,बहिण,आणि पत्नीचा उल्लेख करुन,अतिशय अश्लील- अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन,घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांची चौकशी करुन अटक करावी आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी; अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना बीड जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनामध्ये तीव्र निषेध नोंदवून म्हटले आहे की, " शिवाजी कोण होता" हे पुस्तक 38 वर्षांपुर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहीले आहे.मराठी सहीत अन्य भाषांमधील लाखों प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत.मात्र,या पुस्तकाचे शिर्षक शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करीत असल्याचे म्हणत पुस्तकाचे वितरण,विक्री करीत असले...

विहामांडवा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार उघडकीस सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गंभीर आरोप

विहामांडवा ग्रामपंचायतीचा विचित्र कारभार उघडकीस सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गंभीर आरोप विहामांडवा मुतारीच्या गेटसाठी 1.5 लाख खर्च; विविध कामांत अनियमिततेचे आरोप विहामांडवा (प्रतिनिधी ): पैठण तालुक्यातील विहामांडवा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करणारे अनेक प्रकार समोर येत आहेत. सार्वजनिक मुतारीच्या गेटसाठी तब्बल 1 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. साध्या गेटसाठी इतका मोठा खर्च करण्यात आल्यामुळे निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत आहे. याचबरोबर, गावात मागील काही वर्षांपासून नळाद्वारे येणारे पाणी निकृष्ट दर्जाचे असून त्याला दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही गावाची परिस्थिती चिंताजनक आहे. कचरा संकलनासाठी नियमित घंटा गाडी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना कचरा विविध ठिकाणी टाकावा लागत आहे. त्यामुळे गावात अस्वच्छता वाढत असून पर्यावरण आणि सार्वजनि...

चौसाळा येथे भीम जंयती निमित्त नेञ तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Image
(बीड प्रतिनिधी ) विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती निमित्त बीड तालुक्यातील चौसाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैधकिय अधिकारी डॉ. अंकुश मंचुके साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रुग्णसेवक डॉ. मंगेश मंचुके साहेब,रुग्ण सेवक शैलाताई नाईकवाडे,सामाजिक कार्यकर्ते भारत सुरवसे, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य आमोल कांबळे, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, विठ्ठल झोडगे पाटील,सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक(बाबा)कुचेकर,उपाध्यक्ष विकी ढोकणे, सचिव मिलिंद सोनवणे यांच्यासह अनेक गरजु रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले

Image
परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले दिनांक 10 एप्रिल 26 थकीत वेतन व अनुषंगिक लाभ मिळावेत याकरिता झुंजार कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सुरू केले होते* अखेर चौथ्या दिवशी परळी शहराच्या कर्तव्यदक्क्ष नगराध्यक्षा मा.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी लिखित पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आपण संवाद साधून तुमच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने मंजूर करू आणि तुमचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने मी कामगार नेते भाई गौतम आगळे सर हे आमच्या सतत संपर्कात असल्याने तुम्हाला या पूढे आंदोलनाचे हत्यार उपसन्याची गरज पडणार नाही असे मी नगरपरिषद अध्यक्षा म्हणून आपणास शब्द देते. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चा, पि.एफ. कोड नंबर (यु.एन.ए. ) एक महिन्यात देण्यात येईल असेही लेखी पत्रात नमूद केले आहे.        त्या अनुषंगाने दिनांक १५ एप्रिल २०२६ चे संतप्त कामगार टोकाची भूमिका घेणार होते. जिल्हा सह ...