Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

Image
आम्हाला धमक्या देवू नका टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा दादा भुसेंच्या घरासमोर आंदोलन करू - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा मुंबई११(प्रतिनिधी )सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून 1 जुलै रोजी टीईटी पेपरफुटीच्या विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील घरासमोर आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दादा भुसे यांच्या निवासस्थानी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टीईटी पेपरफुटी संबंधित 12 मागण्याच्या चर्चा करून निवेदन दिले त्यापैकी टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून करण्यात आली. आठ दिवसांत मागण्या मान्य करा, अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. पण दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांकडून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना पुन्हा दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलनाने आले तर मारण्याची धमकी दिली आहे. याच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठासमोर दाद...

नेत्यावर जनतेने टाकलेला विश्वास टिकवणे... हीच कार्यकर्त्याची जबाबदारी

Image
नेत्यावर जनतेने टाकलेला विश्वास टिकवणे... हीच कार्यकर्त्याची जबाबदारी हेच ध्येय उराशी बाळगून, कोणतेही पद नसतानाही आपले नेते आमदार सुरेश धस यांच्यावरील जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अंगद सांगळे २४×७ जनतेच्या सेवेत कार्यरत. पाटोदा (प्रतिनिधी ) समाजकारणात पदापेक्षा जनतेशी असलेली नाळ आणि सेवाभावी वृत्तीला अधिक महत्त्व असते. हेच ध्येय उराशी बाळगून अंगद सांगळे कोणतेही अधिकृत पद नसतानाही सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत.आपले नेते आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याच्या भावनेतून अंगद सांगळे नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेणे, संबंधित शासकीय कार्यालयांशी समन्वय साधणे, आवश्यक ठिकाणी पाठपुरावा करणे आणि शक्य ते सहकार्य करणे, याला ते प्राधान्य देत आहेत. गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत लोकांमध्ये राहून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. "पदापेक्षा जनसेवा मोठ...

मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा,तहसील प्रशासनाचे आभार - भागवत गीते

Image
मलकापूर येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हाटवले, 2 वर्षानंतर रस्ता मोकळा, तहसील प्रशासनाचे आभार - भागवत गीते  परळी वैजनाथ | प्रतिनिधी मलकापूर (ता. परळी वैजनाथ) येथील शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून वहिवाटीचा रस्ता खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर,तहसीलदार विनोद रणवरे, यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे आठ जुलै रोजी शेत रस्त्यावरील अतिक्रपणे काढण्यात आली. याप्रकरणी नायब तहसीलदार परवीन पठाण, नायब तहसीलदार सुरवसे , मंडळ अधिकारी उमेश कुडदे, ग्राम महसूल अधिकारी सज्जा मलकापूर अर्चना गोरे याबाबत ३० जून २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र जारी करण्यात आले होते . मौजे मलकापूर येथील सर्व्हे क्रमांक ३३२/१, ३३२/३, ३३३, ३३५, ३३६ व ३३७ या शेतजमिनींना जाणारा वहिवाटीचा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याची तक्रार अर्जदार भागवत रामकिशन गिते यांनी केली होती. त्यामुळे शेतात ये-जा करणे व शेतीची कामे करणे अडचणीचे झाल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे. यापूर्वी शासन निर्णय तसेच संबंधित कार्यालयाच्या पत्रानुसार रस्ता मोकळा करण्याबाबत सूचना देण्यात आ...

SIR गणना फॉर्म भरण्यासाठी वार्ड क्र. १९, २०, २१ व २२ मध्ये विशेष कॅम्प; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सभापती शेख निजाम यांचे आवाहन

Image
बीड शहरातील वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ मधील नागरिकांना SIR (Special Intensive Revision) गणना फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान व्हावी, तसेच एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, या उद्देशाने जयहिंद कॅम्पस, मिलतनगर, बीड येथे शनिवार दि. ११ जुलै ते रविवार दि. १२ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांना BLO च्या माध्यमातून SIR गणना फॉर्म भरून घेण्याची, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची तसेच मतदार यादीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनहिताच्या उपक्रमासाठी आमदार विजयसिंहराजे पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, मुख्याधिकारी श्री. मांडुरके साहेब तसेच वार्ड क्रमांक १९, २०, २१ व २२ चे सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक मार्गदर्शन व सहकार्य करीत असून, नागरिकांना कोणताही त्रास...

बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा महामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न   (बीड प्रतिनिधी ) - " शिका संघटित व्हा संघर्ष करा" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमोल उपदेश शिक्षणा पासून वंचित असलेल्या दीनदलित बहुजन करता केला होता. त्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीने सखोल विचार करून उच्च शिक्षणाकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आठ जुलै 1945 रोजी मुंबई येथे स्थापना केली होती. उच्च शिक्षण म्हणजे निर्भीड बनणे, प्रज्ञा शील करणे चा मार्ग स्वीकारून ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग समाजातील उपेक्षित समाजाची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक प्रगती कशी होईल, लवकरच तात्कालीन ब्रिटिश सरकारकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपला देश एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कसा घडेल हा तेव्हा अतिउच्च कोटीच्या देशाच्या हिताचा विचार करून उच्च शिक्षणाची सोय प्रथम 1946 रोजी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन करून केली असे प्रतिपादन कार्यक...

सरकार च्या निकृष्ट कामावर बोलणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे गुत्तेदार तुमचे जावई आहेत का?-डॉ.जितीन वंजारे

Image
    आज-काल राजकारण एकदम खालच्या पातळीला जाऊन केलं जात आहे. महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पवित्र संविधान भारत देशाला दिलं यामध्ये जितकी पावर सरकारला असेल तितकीच एव्हाना त्याहूनही अधिक पावर विरोधी पक्षाला दिली गेलेली आहे. लोकशाही ही विरुद्ध पक्षावर अवलंबून असते परंतु आजकाल मिल बाटके खायेंगे अशा पद्धतीची विवरचना भारतीय राजकारणामध्ये दिसून येत आहे. जेव्हा सभागृहात बसलेले टट्टू जनहिताचे काम करत नाहीत आणि भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, बाजारीकरण वाढलं जातं तेव्हा ही लढाई सर्वसामान्यांना हातात घ्यावी लागते अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जो सध्याच्या चालू सरकारचा फुसका विकास चालू आहे विकासाच्या नावाखाली नंगानाच चालू आहे, उद्घाटनापूर्वीच फुले पडत आहेत, उद्घाटन झाल्यानंतर दोन-चार दिवसात ते उध्वस्त होत आहेत, निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत, कॉन्ट्रॅक्ट जवळच्या माणसाला देऊन आदानी अंबानीसारख्यांच्या उद्योगपतींच्या घशामध्ये संपूर्ण देश घातला जातोय मग मी एक सामान्य माणूस म्हणून असा प्रश्न पडतो की तुमच्या निकृष्ट दर्जा...

बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

Image
बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी बीड प्रतिनिधी : बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर वाहतुकीची व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा कायम असते. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सारडा नगरी मार्केट परिसर, जिल्हा शासकीय रुग्णालय ते पालवन चौक या मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भटकी कुत्री रस्त्यावर वावरत असतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहन दिसताच कुत्र्यांचे थवे वाहनांच्या मागे धावत भुंकत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन कुत्र्यांचे निर्बी...