Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लिंबागणेश येथे गोरक्षकांनी पकडला गायींनी भरलेला पिकअप; निर्दयी वाहतुकीचा प्रकार उघड, पोलीस डिपार्टमेंट आमचेच म्हणत गोरक्षकांना धमकी.

Image
लिंबागणेश प्रतिनिधी | लिंबागणेश येथे गोवंशाची निर्दयी पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी अंदाजे पाऊणे सातच्या सुमारास भालचंद्र विद्यालयासमोर गोरक्षकांनी गायींनी भरलेला पिकअप टेंपो अडवला. मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांसह लिंबागणेश येथील काही युवकांनी संशयित वाहन अडवून तपासणी केली. यावेळी पिकअपमध्ये ७ ते ८ गायी अत्यंत निर्दयी पद्धतीने एकमेकांना घट्ट बांधून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. काही गायींच्या पायाखाली इतर गायी दाबल्या गेल्याचे दिसून आले असून एका गायीचा फास लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, वाहनातील व्यक्तींनी स्थानिक नेत्याचे नाव घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच “पोलीस विभाग आमचाच आहे” अशी धमकी देत गोरक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन धायगुडे व...

समाज क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले

Image
   महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारताच्या सामाजिक समाजक्रांतीचे प्रणेते म्हणून इतिहासात नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता दूर करण्यासाठी अखंड संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजाला नवचैतन्य मिळाले आणि समानतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी येथे झाला. ते माळी समाजातील कुटुंबात जन्मले. त्यांच्या बालपणातच त्यांना समाजातील जातीय भेदभावाचा अनुभव आला. शिक्षण घेत असताना झालेल्या अपमानाने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. महात्मा फुले यांच्या जीवनातील सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे त्यांची पत्नी होय. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. दोघांनी मिळून स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा मोठा अपराध मानला जात होता, तरीही त्यांनी विरोधाला न जुमानता आपले कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले य...

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

Image
लिंबागणेश (दि.११) : बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, अॅड. गणेश वाणी, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ आदी उपस्थित होते. --- “ महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी” – डॉ. गणेश ढवळे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याच...

आम आदमी पार्टी बीडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

Image
  बीड (प्रतिनिधी) – आम आदमी पार्टी, बीड यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास घोषणा देऊन पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचेही आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण आणि शहराध्यक्ष सय्यद सादेक यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त केली. भारतीय समाजसुधारक, समाजप्रबोधक, विचारवंत, लेखक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. “सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत महात्मा फुले यांचे कार्य स्मरणात राहील,” असा भावनिक विचार यावेळी मांडण्यात आला. या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष सय्यद सादेक, सामाजिक कार्यकर्त्या किसकींदाताई पांचाळ (संस्थापक अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था), शहर सचिव मिलिंद पाळणे, बीड उपतालुकाध्यक्ष अजम खान, सीता ताई भोसले, छायाताई गोरे, रुक्मिणी...

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त पाटोद्यात अभिवादन

Image
पाटोदा (प्रतिनिधी )  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त पाटोदा शहरातील महात्मा फुले चौक येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. समाजप्रबोधन, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या महान समाज सुधारकाच्या कार्याची आठवण यावेळी भावपूर्ण वातावरणात करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिकांनी त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. “शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे” हा संदेश देत त्यांनी समाजातील वंचित, शोषित व स्त्रियांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची बीजे रोवली गेली आणि सामाजिक न्यायाची दिशा निर्माण झाली, असे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, जातीयता व अन्यायकारक प्रथांविरोधात आवाज उठवला. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने शिक्षणक्रांती घडवून आणली. शेतकरी, कामगार व बहुजन ...

चऱ्हाटा गावची शेख रुक्सार पुणे शहर पोलिस दलात; महात्मा फुले विद्यालयात भव्य सत्कार, गावात उत्साहाची लहर

Image
बीड, दि. १० एप्रिल २०२६ महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेच्या निकालात बीड जिल्ह्यातील चराटा गावची शेख रुक्सार युनूस हिने पुणे शहर पोलिस दलात यशस्वी निवड मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या अभिमानास्पद यशाबद्दल महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, चराटा येथे तिचा भव्य सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, रुक्सारने पहिली ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण याच विद्यालयात घेतले असून, तिचे यश हे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे जिवंत उदाहरण ठरले आहे. चराटा हे बीड शहराजवळील एक छोटे ग्रामीण गाव असून, येथील साध्या कुटुंबातील रुक्सार ही समाजसेवक शेख इनुस यांची धाकटी मुलगी आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेले शेख इनुस हे गावात आदराचे स्थान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रेरणेने आणि स्वतःच्या जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर रुक्सारने हे यश संपादन केले. लहानपणापासूनच पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रुक्सारने शारीरिक तंदुरुस्ती, अभ्यास आणि मानसिक तयारी यावर सातत्याने मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात करत तिने हे स्वप्न साकार केले. शाळेचे मार्गदर्...

निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आष्टी शहराध्यक्षपदी गणेश रोकडे यांची निवड

Image
आष्टी : निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या आष्टी शहराध्यक्षपदी गणेश दिलीप रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. या निवडीमुळे आष्टी शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, सामाजिक व राजकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी रोकडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्ष विस्तार आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी ते सक्रिय भूमिका निभावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पक्षाच्या नियमानुसार या नियुक्तीचे दर १०० दिवसांनी नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.