Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा

Image
बीड शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च व्हावा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह शिष्टमंडळाची बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.२२ : बीड नगरपरिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सोमवारी (दि.२२) निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, नगर विकास विभागाच्या दि. २४ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार बीड नगरपरिषदेला १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या उभारणीसाठी प्राधान्याने करण्यात यावा. डॉ. क्षीरसागर यांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत वीजबिल भरून अतिरिक्त वीजभार मंजूर करून घेण्याची मागणी केली. यामुळे शहराला पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्या...

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे

Image
आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करा : बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या २३ जून 'आंतरराष्ट्रीय विधवा दिना' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी राज्यभर 'एकल महिला दिवस' साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी साऊ एकल महिला समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी केली आहे. शासन स्तरावर एकल महिलांच्या सन्मान, संरक्षण, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी विविध सकारात्मक पावले उचलली जात असून, राज्याचे महिला व बालविकास विभाग एकल महिला धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी आयोजित होणारा 'एकल महिला दिवस' हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, एकल महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यांच्या न्याय्य मागण्य...

धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन

Image
धोकादायक मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी ६९ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी; जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन :- डॉ. गणेश ढवळे  बीड :- (दि.२२ ) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था असून अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेल्या या शाळांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२२ सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात इमारत नसलेल्या ५८ शाळा, मोडकळीस आलेल्या १७४ शाळांमधील ३१३ वर्गखोल्या तसेच विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे ७० शाळांमध्ये ९८ अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून शाळा इमारतींसाठी ५७ कोटी रुपये तसेच २९० वर्गखोल्य...

अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड

Image
अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड बौद्धांसह 58 जाती समूहाने एकत्र येण्याची गरज बीड (प्रतिनिधी ) 22 जुन  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने शोषण केलेल्या जाती समूहांना, सामाजिक आर्थिक धार्मिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या आघाडीवर येण्यासाठीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आर्थिक मागास प्रवर्ग या तीन प्रवर्गांची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्मिती सभेत, अस्पृश्य-शूद्रातीशूद्र समाजास न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवाची परकाष्टा केली. बाबासाहेब आपल्या भाषणात वेळोवेळी सांगायचे की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठीही तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनुसूचित जाती हा प्रवर्ग निर्माण केला. हा प्रवर्ग मानवी संवेदना नसणाऱ्या जातींचा एक समूह आहे. हा समूह प्रगतीपथावर असून, या जातीतील तिसऱ्या पिढीने मोक्याच्य...

मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Image
मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास घर फोडून ३ तोळे सोने व खतासाठी ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास लिंबागणेश:- (दि.२२ ) बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली. संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले...

लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते

Image
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते  बीड, दि. 21 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिरात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष पूजा-अर्चना करून गणपती बाप्पाच्या चरणी साकडे घालण्यात आले. याच पवित्र प्रसंगी असंघटित मजूर, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मा. राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होऊन संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट व्हावेत, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, असंघटित मजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामा...

पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे

Image
पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२१) बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्य...