Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाचा दणका- ॲड.सदानंद वाघमारे

Image
माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाचा दणका- ॲड.सदानंद वाघमारे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा पारदर्शकतेला नकार. आयोगाचे 30 दिवसांत माहिती द्या अन्यथा कारवाई! बीड प्रतिनिधी : राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र यांनी माहिती अधिकार प्रकरणात महत्त्वाचा आदेश देत संबंधित अधिकाऱ्यांना 30 दिवसांच्या आत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच माहिती देण्यात टाळाटाळ झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मिळालेल्या आदेशानुसार, दुसरे अपील क्र. 2992/2025 संदर्भात सुनावणी पार पडली. अपीलार्थी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 19(3) अंतर्गत अपील दाखल ॲड.सदानंद वाघमारे यांनी दाखल केले होते. या प्रकरणात संबंधित जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी नियमानुसार माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. सदर प्रकरणात अपीलार्थी यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नावानिशी उपस्थिती व रजा नोंदीची माहिती मागितली होती. मात्र निर्धारित कालावधीत माहिती न दिल्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचा भंग झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आ...

प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे

Image
प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनीत रस्ता, नाली व सार्वजनिक शौचालय उभारणीला हिरवा कंदील – शैलेश फडसे डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या पुढाकारासह अशोक वीर यांच्या पाठपुराव्याला यश बीड (प्रतिनिधी ) – बीड शहरातील इमामपूर रस्त्यावरील प्रकाश आंबेडकर नगर व रमाई कॉलनी परिसरातील प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांच्याकडे कैफियत मांडली होती. या मागण्यांना त्यांनी तात्काळ प्राधान्य देत मुख्याधिकारी (सीओ) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विषयावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार वॉर्ड क्र. २६ मधील बार्शी रोड ते इमामपूर रोड जोडणाऱ्या सुमारे ६०० मीटर रस्त्याचे डांबरी/सिमेंट काँक्रीट बांधकाम, नाली व सार्वजनिक सुलभ शौचालय उभारणीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.  बहिरवाडी चे माजी सरपंच तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारणीचे प्रणेते अशोक वीर यांनी या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराला यश आल्याने परिसरा...

बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न

Image
बीडमध्ये ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार सोहळा उत्साहात; जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिमाखात संपन्न बीड | प्रतिनिधी सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय, बीड येथे स्वर्गीय वामनदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा तसेच ‘माझी आई नानीबाई आदर्श माता’ पुरस्कार वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब मुंडे होते. प्रमुख व्याख्याते म्हणून पांडुरंग सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृत्वाचे महत्त्व, संस्कारांची परंपरा आणि शिक्षणाची गरज यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा मिळाली. या सोहळ्यात सौ. सविता मोहनराव रणदिवे (अकलूज) व सौ. कांता संतोष सोनवणे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सौ. मीनाक्षी भास्कर वडमारे, श्रीमती सविता मनोहर पंडित आणि सौ. शकुंतला किसन शीलवंत यांना ‘आदर्श माता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांच्या टाळ्यां...

बीडमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचा उत्साह; भव्य रॅलीने शहरात स्वागत

Image
​बीड प्रतिनिधी : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे आज बीड शहरात आगमन झाले. या निमित्ताने आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ​ शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये हजारो निष्ठावान भक्त आणि भाविक सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग जालना रोड श्री संत सेवालाल महाराज चौक' मार्गे 'कॅनॉल रोड' असा निश्चित करण्यात आला.   बीड शहर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग नोंदवला.  'जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज की जय' च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ​पादुका दर्शनासाठी प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून, दिवसभर दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

लिंबागणेश येथे बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील शिवस्मारक वादातील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Image
लिंबागणेश (दि. २१ ): महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का देणारी घटना चिखला गाव येथे घडली असून शिवस्मारक उभारणीच्या वादातून मराठा समाजातील बांधव व महिलांवर दगडफेक व अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेत संजीवनी वाघ यांच्यासह अन्य महिलांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. स्त्रीसन्मान व न्यायाची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या विचारांना ही घटना काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी केली. मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन पाठवून प्रशासनाने निष्पक्ष व तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थितांना संयम राखत लोकशाही मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच बालासाहेब जाध...

जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदबहुजन समाजाच्या एकतेचा, प्रबोधनाचा आणि धम्मदीक्षेचा भव्य सोहळा

Image
परळी (प्रतिनिधी ): ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर, ता. धारूर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मृगदायवन महाविहार, सारनाथ पार्क परिसर, जवळा फकीर येथे होणाऱ्या या धम्ममय सोहळ्यास बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रा. खेमधम्मो (मुळावा) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. भदन्त उपगुप्त महाथेरो (पूर्णा) राहणार आहेत. ध्वजारोहणाचा मान डॉ. प्रा. भदन्त एम. सत्यपाल महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) यांना मिळणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पु. भदन्त डॉ. इंदवंश महाथेरो (कुशीनगर, उत्तर प्रदेश), भदन्त मुदितानंद महाथेरो (परभणी), भदन्त पय्याबोधी थेरो (नांदेड), भदन्त पय्यानंद थेरो (लातूर) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच भदन्त धम्मसार थेरो (किल्लारी), भदन्त सुभूती थेरो (नांदेड), भदन्त धम्मशील थेरो (बीड), भदन्त नागसेन बोधी (उदगीर) आदी भन्ते या परिषदेत मार्गदर्शन...

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा २१ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये

Image
बीड (प्रतिनिधी ) : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे भव्य दर्शन सोहळा शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीड–जालना रोड, श्री संत सेवालाल महाराज चौक, कॅनॉल रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. रामानंद संप्रदायाच्या वतीने देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, या कार्याची व्याप्ती व्यापक आहे. संस्थानमार्फत राष्ट्रीय महामार्गांवर ५४ विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. व्यसनमुक्ती अभियानातून लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे. याचबरोबर दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या १५ दिवसांच्या कालावधीत संप्रदायाच्या माध्यमातून १ लाख ७१ हजार १५० रक्तकुप्यांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आले, जो एक विश्वविक्रम मानला जात आहे. तसेच १३३ अवयवदान आणि १७९ देहदान विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. “पाणी अडवा, पाणी जिरवा” उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ४५९८ कच्चे बंधा...