Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

‘स्मार्ट’ सरकारचे धोरण, पण जनतेच्या अडचणी मात्र ‘डबल

Image
‘स्मार्ट’ सरकारचे धोरण, पण जनतेच्या अडचणी मात्र ‘डबल’! स्मार्ट कार्ड नसल्यामुळे बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत नाकारण योग्य नाही  एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त बोजा; बाजीराव ढाकणे यांचा सरकारला थेट सवाल बीड प्रतिनिधी :-  “सरकार जनतेची सेवा करण्यासाठी आहे की जनतेला कागदपत्रे, कार्ड, रांगा आणि शुल्काच्या जंजाळात अडकवण्यासाठी?” असा संतप्त सवाल महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी उपस्थित केला आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात आता नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. एसटी महामंडळाची बससेवा ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. गावखेड्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी एसटीचा प्रवास हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा नागरिकांना त्यांच्या हक्काच्...

पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक

Image
पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक पाटोदा (प्रतिनिधी )पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून शेतात उभी केलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजाची चिंता वाढली आहे.पावसासाठी आसुसलेल्या महासांगवी गावातील महिलांनी अनोख्या पद्धतीने देवाला साकडे घातले. महिलांनी एकत्र येऊन देवाची पूजा केली आणि देवाला पाणी घालून वरुणराजाने लवकर बरसावे, अशी आर्त प्रार्थना केली. पाऊस पडावा, शिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.एकीकडे आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि दुसरीकडे पावसाअभावी कोमेजत चाललेली पिके, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी, बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक उभे केले; मात्र आता पावसाने साथ सोडल्याने त्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.“देवा, वरुणराजाला बरसण्याची बुद्धी दे; आमच्या शेतकऱ्यांची पि...

लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Image
लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा  छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने  : डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि. ३ )मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दि. २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दुकानदार व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंबागणेशकरांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे” " मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणा देत निदर्शने करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी स...

मायक्रो फायनान्स कडून होणाऱ्या अत्याचार प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
गेवराई - दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी गेवराई तालुक्यातील एकल महिला, ऊसतोड कामगार व शेतमजूर महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध व उच्च व्याजदर व जबरदस्तीच्या वसुलीविरुद्ध जिल्हाधिकारी बीड, आणि प्रबंधक अग्रणी बँक बीड यांना निवेदन दाखल केले आहे.       "मायक्रो फायनान्स अत्याचार निवारण समिती, गेवराई" या संघटनेने विविध सामाजिक संस्था, कामगार युनियन व महिला बचत गटांच्या सहभागाने हा लढा सुरू केला आहे.      कर्जग्रस्त महिलांना सुरुवातीला 18%–24% व्याज सांगितले असले तरी प्रत्यक्षात 30%–40% पर्यंत व्याज आकारले जाते, जे RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार 26% पेक्षा जास्त आहे. अनेक महिलांवर एकाच वेळी 2–3 किंवा त्याहून अधिक मायक्रो फायनान्स कर्ज असल्यामुळे नव्याने कर्ज घेवून जुने कर्ज बंद करावे लागत आहे आणि कर्जविळखा तयार होतो. मायक्रो फायनान्स ने दिलेल्या कर्जाच्या वसुलीकरता धमक्या, शिवीगाळ, रात्री वेळच्या वसुलीचे प्रकार आणि काही प्रकरणांमध्ये शारीरिक व मानसिक छळ होत आहेत अशा अनेक तक्रारी समितीकडे आल्या आहेत. कर्जफेडीचा ताण कौटुंबिक कलह, व्यसनवृत्ती ...

हास्याची नवी मेजवानी! ‘हम नये जमाने के झोलर’ हिंदी कॉमेडी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Image
हास्याची नवी मेजवानी! ‘हम नये जमाने के झोलर’ हिंदी कॉमेडी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला दिलीप केदार दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि जेलरची भूमिका, राजेंद्र केदार पोलिसांच्या भूमिकेत के.के. गोसावी आणि एहसान कुरेशी यांचीही प्रमुख विनोदी भूमिका मुंबई / प्रतिनिधी : प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी मनोरंजनाची एक नवी आणि भन्नाट मेजवानी लवकरच डिजिटल विश्वात दाखल होणार आहे. ‘हम नये जमाने के झोलर’ या आगामी हिंदी कॉमेडी वेब सिरीजची चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रात रंगू लागली आहे. विनोद, मनोरंजन आणि भन्नाट प्रसंगांनी भरलेली ही वेब सिरीज प्रेक्षकांना निखळ हास्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज होत आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन दिलीप केदार करणार असून, राजेंद्र केदार पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते के.के. गोसावी आणि विनोदी कलाकार एहसान कुरेशी यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यामुळे या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मुंबईत होणार शूटिंग ‘हम नये जमाने के झोलर’ या हिंदी कॉमेडी वेब सिरीजचे शूटिंग मुंबई येथे होण...

पाटोदा हादरला! बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाळवंडी बंद

Image
पाटोदा हादरला! बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाळवंडी बंद दहा वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराने संतापाचा उद्रेक; आरोपींवर कठोर कारवाईसाठी गावकऱ्यांचा एल्गार पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. निष्पाप बालिकेवर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून, घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाळवंडी गाव बंद पुकारण्यात आले.अवघ्या दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार होणे ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून, संपूर्ण समाजाच्या काळजाला चटका लावणारी घटना आहे. ज्या वयात चिमुरडीने शाळेत जावे, खेळावे आणि आनंदाने बालपण जगावे, त्या वयात तिच्यावर अत्याचार झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत गावकऱ्यांनी दोषींवर कोणतीही मयामय न दाखवता कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून कोणत्याही परिस्थितीत सुटका मिळता कामा नये, अशी मागणी होत आहे...

पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी – नगरसेवक शरद बामदळे

Image
पावसाअभावी हाता-तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट  शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी – नगरसेवक शरद बामदळे पाटोदा (प्रतिनिधी) पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. डोळ्यांसमोर उभे केलेले पीक हातातून निघून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. वर्षभर कष्ट करूनही उत्पन्नाची आशा मावळल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.पेरणीपासून पिकांच्या संगोपनापर्यंत शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. खत-बियाणे, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी खर्च केला. मात्र ऐन पिकाच्या वाढीच्या काळात पावसाने साथ सोडल्याने शेतातील उभी पिके वाया गेली असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.शेतात जाऊन वाया गेलेल्या पिकांकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळेल, कुटुंबाचा संसार सुरळीत चालेल, अशी अपेक्षा असताना निसर्गाच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, असा गंभ...