Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात सहभागी होण्याचे भाई गौतम आगळे यांचे 59 जातीच्या समाजाला आवाहन

Image
    परळी दि. ८( प्रतिनिधी ) बौद्धांसोबत भांडायची ही वेळ नसून बौद्धांच्या खांद्याला खांदा लावून लढाईची ही वेळ आहे. आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव आपल्याला म्हणून पडायचा आहे त्यासाठी ५९ जातीच्या समूहाने आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा हा आपला मोर्चा आहे असे समजून सर्व समाजाने या महामोर्चात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कामगार नेते तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.        आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारचे आहे, आणि ही फूट ५९ जातीच्या समाजासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण यातून समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव तथा भारतीय दलित पॅंथर मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चास जाहीर पाठिंबा देऊन परळी वैजनाथ मध्ये निघणारा 10 ऑगस्ट चा उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा म्हणजे आपला मोर्चा आहे, असे समजून जो येईल त्याला सोबत घेऊन या ! मोर्चात हजारोच्या संख्येने स...

किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त कलाकार ग्रुप बीडच्या वतीने किशोर कुमार की यादे गीतांचा कार्यक्रम

Image
बीड । प्रतिनिधी सिनेमासृष्टीतील महान गायक, संगीतकार, कलाकार किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त दि.9 ऑगस्ट रविवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कलाकार ग्रुपच्या वतीने किशोर कुमार की यादे नव्या-जुन्या चित्रपट गितांचा कार्यक्रमाचे आयोजन आयोजक बबनराव वडमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचेउद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लोकदिशाचे संपादक किशोर कागदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमामध्ये मराठी-हिंदी गीतांचा समावेश असून ेहा कार्यक्रम मोफत आहे तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बबन वडमारे, अ‍ॅड.अविनाश गडगे, डॉ.सुधीर साळवे, राजु जोसेफ, विनोद सवाई, शाम माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा

Image
वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने शहरात विजय मंडल दिवस साजरा....  प्रतिनिधी (गेवराई ) गेवराई येथीलडॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बी. पी. मंडल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विजय मंडल दिवस वंचित व ओबीसीच्या वतीने साजरा करण्यात आला  मंडल_आयोग म्हणजे दुसरा मागासवर्ग आयोग 1 जानेवारी 1979 रोजी जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मंडल आयोगाची स्थापना केली.  बी. पी. मंडल बिहारचे माजी मुख्यमंत्री. म्हणूनच याला "मंडल आयोग" म्हणतात.   7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये लागू केल्या.     यानुसार केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शिक्षणात OBC साठी 27% आरक्षण सुरू झाले. देशातील इतर मागासवर्ग OBC साठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देणे बंधनकारक झाले.  मंडल आयोग लागू करुन घेण्यासाठी श्रध्येय अॆड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री पदा चा नकार दिला व संसदेत राज्यसभेचे खासदार असतांना पूर्ण ताकद लावली, मंडल आ...

संपादक समीर काझी यांना 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई'चा मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

Image
​ बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'मराठवाडा विभागीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार' ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक समीर काझी यांना जाहीर झाला आहे. ​पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन संघाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. समीर काझी यांच्या या यशामुळे पत्रकारिता क्षेत्रातून आणि सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दारावती तांडा महसुली गावाचा सातबारा स्वतंत्र करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन

Image
दारावती तांडा महसुली गावाचा सातबारा स्वतंत्र करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन दारावती तांड्याला महसुली दर्जा असणाऱ्या गावाला स्वतंत्र सातबारा मिळालाच पाहिजे; प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा–प्रवीण पवार परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) : मौजे दारावती तांडा या महसुली गावाचा स्वतंत्र सातबारा करून गावाचा परळी ग्रामीण सज्जामध्ये समावेश करावा, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत लमान दारावती तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी आज दि. ०७ ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, परळी वैजनाथ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दारावती तांड्याला महसुली गावाचा दर्जा मिळून अनेक वर्षे झाली, मात्र आजही स्वतंत्र सातबारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना व महसुली सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दारावती तांड्याचा स्वतंत्र सातबारा तयार करावा. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावाअशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार यांनी केली आहे. दरम्यान उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर व तहसीलदार विनोद रनवरे यांनी निवेदन स्वीकारले आहे....

महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीडमध्ये ‘तेजस्विनी’तर्फे भव्य प्रदर्शनाचे आयोजन; ८ व ९ ऑगस्ट रोजी रामकृष्ण लॉन्स येथे भरणार महिला उद्योजकांचा मेळा!

Image
महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीडमध्ये ‘तेजस्विनी’तर्फे भव्य प्रदर्शनाचे आयोजन; ८ व ९ ऑगस्ट रोजी रामकृष्ण लॉन्स येथे भरणार महिला उद्योजकांचा मेळा! बीड (प्रतिनिधी ): आगामी नागपंचमी आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला उद्योजकांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘तेजस्विनी ग्रुप’च्या वतीने दोन दिवसीय भव्य वस्तू प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या शनिवारी आणि रविवारी (दि. ८ व ९ ऑगस्ट २०२६) कॅनॉल रोडवरील रामकृष्ण लॉन्स येथे भरवले जाणार आहे. तेजस्विनी ग्रुपच्या संस्थापिका सोनल अरविंदसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात बीड जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक महिला उद्योजक सहभागी होणार आहेत. यामध्ये सण-उत्सवाच्या खरेदीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध असतील. प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे: प्रदर्शनात महिलांसाठी खास मनमोहक पैठणी, ब्रँडेड साड्या, डिझायनर कुर्तीज, लेडीज वेअर्स, फ्रॉक्स, स्टोल, ओढणी यासह मोत्यांचे दागिने, फॅन्सी बांगड्या आणि सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असणार ...

कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी संवाद मेळावा; आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

Image
कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी संवाद मेळावा; आधार प्रणालीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा उपक्रम; नवीन पीककर्जाबाबत मार्गदर्शन बीड प्रतिनिधी :-(दि.६ ) राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६-२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार आज दि. ६ गुरूवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी राहुल पवार, लिंबागणेश शाखेचे व्यवस्थापक सोन्याबापू रासकर, सहाय्यक व्यवस्थापक अविनाश सोनावणे तसेच विविध शाखांतील बँक मित्र व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सेवा सोसायटीचे चेअरमन रविबापू निर्मळ, बँकिंग पॉईंटचे सुरज ढास,जयदेव गिरे , समाधान ढास,बाळकृष्ण थोरात, संतोष भो...