Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने

Image
आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे बीड:-( दि.२७ ): बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ सोमवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले.  जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक व त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्...

बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नादवेध संगीत महोत्सव उत्साहात संपन्न

Image
बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नादवेध संगीत महोत्सव उत्साहात संपन्न  वरुणराजाच्या हजेरीने सुरांमध्ये भरला अधिकच रंग ​बीड प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड येथील सौ. के.एस.के. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला ‘नादवेध संगीत महोत्सव’ २६ तारखेला मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. ​सौ. के.एस.के. महाविद्यालय आणि ताल साधना म्युझिक सर्कल, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या सुरेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान काही काळ पावसानेही हजेरी लावली. या रिमझिम पावसामुळे संगीताच्या सुरांमध्ये अधिकच आल्हाददायक रंग भरला गेला आणि रसिकांचा उत्साह द्विगुणित झाला. ​या कार्यक्रमात नामवंत आणि स्थानिक कलाकारांनी आपल्या गायन व वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ​पावसाच्या शिडकाव्यातही बीडमधील संगीतप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोज...

सोमवार च्या नियोजित ' जनक्रांती विद्यार्थी -विद्यार्थिनीं-पालकांच्या रॅली ' ऐवजी मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 'शिक्षणा' संबंधी निवेदन देणार

Image
बीड प्रतिनिधी. : - बीड शहरातील शिक्षणप्रेमी सामाजिक-राजकिय कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला समर्थन व तिथे आंदोलक मुलां-मुलींना झालेली अमानुषपणे मारहाण अन् भयंकर अत्याचारांचा निषेध करण्यासाठी दि २७ जुलै,सोमवार रोजी किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय,बीड अशी नियोजित ' रॅली ' स्थगित करुन ; त्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर' निर्धार सभा घेवून, दर्जेदार शिक्षण, पारदर्शक परीक्षा, वेळेत रास्त निकाल,शिक्षण -धोरण २०२० रद्द करणे ,'एन.टी.ए.' बरखास्त करणे,एन.टी.ए.चे चेअरमन डॉ. प्रदीपकुमार जोशी यांचे कडून वर्तमान पेपर फुटी व निकालातील घोटाळ्यांचा 'तपास' काढून घेणे व सर्वौच्च न्यायालयाचे जेष्ठतम सेवानिवृत्त न्यायमुर्तीं च्या अध्यक्षतेखाली वर्तमान व अगोदरच्या पेपरफुटी,निकालातील घोटाळे इत्यादीचा तपास करवून घेणे, आंदोलक विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला यांना ज्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलिसांच्या वेषात असलेले गुंड, मवाली यांचेवर गुन्हे दाखल करणे; शेकडो गुंडांना पोलीसांच्या लाठया देवून ज्या अधिका-यांने बेकायदेशीर काम केले,त्यांना निलं...

अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके

Image
अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके   जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन, दिल्ली पोलिसांवर भरोसा नाही-डॉ जितीन वंजारे     बीड प्रतिनिधी :- दिनांक 24 रोजी अभिजित दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे/दिपके आणि भाऊजी डॉ जितीन वंजारे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अभिजित दिपके यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस संरक्षण देण्याबाबत राष्ट्रपतीना निवेदन दिले. दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्याविषयी संवेदना बाळगून अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून स्टॅन्ड घेतला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली याला भारतातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत विद्यार्थ्यांसाठी एक नवी चळवळ निर्माण केली, लाखो विद्यार्थी जंतर-मंतरवर तसेच देशभरामध्ये विविध शहरांमध्ये एकवटले आहेत पोलीस प्रशासन त्यांना अमानुष हनुमान करत आहे, लाठी चार्ज करत आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, सरकार दडपशाही करत आहे आणि म्हणून अभिजीत दिपके यांनाही हानमार, लाठीचार्ज, जीवा...

थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली, मोठा अनर्थ टळला

Image
थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली; मोठा अनर्थ टळला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निधीची मागणी : डॉ. गणेश ढवळे पाटोदा : (दि. २५ )पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी केंद्रांतर्गत थेरला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोलीची भिंत व छत गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यावेळी शाळेला सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान आणि शिक्षणाधिका...

जंतर-मंतर युवा आंदोलकावरील भ्याड हल्ल्याचा निषेध - प्रा. सुशीलाताई मोराळे

Image
. बीड प्रतिनिधी दिनांक 24 जुलै :- नीट पेपर फुट प्रकरणात केंद्रातील सरकारचा गलथान कारभार जिम्मेदार असून गेली 24 दिवसापासून काक्रोच पार्टीचे अभिजीत दिपके व पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूंग यांनी प्राणांतिक उपोषण केले आहे. या आंदोलनाला हजारो तरुणांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलकाची दररोज वाढत असलेली संख्या ही सरकारच्या अपयशामुळेच वाढत आहे. त्यामुळे बिथरलेली पोलीस यंत्रणेने अश्रूधूर, पाण्याचे फवारे आणि लाठी चार्ज करून हिडीस प्रदर्शन केले त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यासाठी किसान संघर्ष समिती, जनहित अभियान, ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय समाज पक्ष, युवक क्रांती दल, हमाल मापाडी संघटनेसह कामगार संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकावरील गुन्हे परत घ्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. सुशीलाताई मोराळे, अमर शेख, पंडित तुपे, संगमेश्वर आंधळकर, शेरजमा पठाण, प्रा. अण्णासाहेब मतकर, अंकुश खाडे, बबन आंधळे,काॅ. इक...

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सच्या 'उद्योगरत्न' पुरस्कारासाठी वैजनाथअप्पा (बबन) कोल्हे यांची निवड

Image
मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सच्या 'उद्योगरत्न' पुरस्कारासाठी वैजनाथअप्पा (बबन) कोल्हे यांची निवड संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा गौरव संघर्ष हा यशाचा पाया असतो आणि सेवा ही यशाची खरी उंची असते, या उक्तीचा प्रत्यय श्री वैजनाथअप्पा उर्फ बबन लक्ष्मणअप्पा कोल्हे यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने येतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, कोणताही आर्थिक वारसा किंवा मोठे भांडवल नसताना केवळ अथक परिश्रम, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि ग्राहकांप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर त्यांनी उभे केलेले 'शिवम् सुपर मार्केट' हे आज परळी वैजनाथ शहरातील यशस्वी उद्योजकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्यांचा जन्म अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. आई-वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच लहान भावाच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगात अवघ्या १२ व्या वर्षी, शिक्षण घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी एका किराणा दुकानात नोकरी स्वीकारली. बालवयातच जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेत त्...