Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला

Image
श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला  लिंबागणेश येथील विविध मंदिरांची स्वच्छता; भाविक, वारकरी आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग बीड :( दि.१३) : श्रावण महिना हा अध्यात्म, मनःशुद्धी, पावित्र्य आणि व्रतवैकल्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ऊन-पावसाचा लपंडाव, हिरवाईचा सडा आणि धार्मिक परंपरांनी नटलेला श्रावण महिना गुरुवार, दि. १३ ऑगस्टपासून सुरू झाला असून, १५ सप्टेंबरपर्यंत त्याची पर्वणी अनुभवता येणार आहे. सण-उत्सव आणि धार्मिक विधींची रेलचेल सुरू झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमात भाविक, वारकरी आणि तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात ह .भ.प. अनंतकाका मुळे, दशमे महाराज,चिंतामण जोशी, कल्याण वाणी, राजेभाऊ गिरे, श्रीकांत जोशी, शिवाजी वाणी, बाळकृष्ण मुळे, बाळकृष्ण थोरात, दगडु कांबळे,भगवान मोरे, गणपत ...

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम

Image
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम   बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये 'समग्र शिक्षा अभियान 'अंतर्गत कामांना वेग; विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार :- डॉ.गणेश ढवळे  बीड:-( दि.१३ ) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट करण्यासाठी जितिन रहेमान सीईओ जिल्हा परिषद बीड यांनी ' समग्र शिक्षा अभियान' योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना दर्जेदार आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी सुरू असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता सुरेश बाहेगव्हाणकर यांनी दिली. ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालयांचा अभाव असून काही ठिकाणी असलेली स्...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व कॉम्रेड सखाराम पोहिकर

Image
 वाढदिवसानिमित्त विशेष लेख  ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे नेतृत्व   कॉम्रेड सखाराम पोहिकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! गेवराई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा ‘संदेश जनतेचा न्यूज’चे संपादक कॉम्रेड सखाराम पोहिकर यांचा जन्म १२ ऑगस्ट १९६९ रोजी झाला. सामाजिक, पत्रकारिता आणि कर्मचारी चळवळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे एक लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या गेवराई तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या पाच वर्षांपासून ते समर्थपणे सांभाळत आहेत. या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. केवळ निवेदन आणि मागण्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. कर्मचाऱ्या...

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त नागापूर (बु.) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Image
बीड : जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठान, बीडच्या वतीने नागापूर बु. येथील भिल्ल वस्तीत दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली तसेच प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठानने भिल्ल वस्तीत आरोग्य शिबिर आयोजित केले. या शिबिरात डॉ. अजितराजे तुकाराम जाधव, डॉ. सुहासिनी अजितराजे जाधव आणि डॉ. शीतल अक्षय भोपळे यांनी महिला, पुरुष व बालकांची विनामूल्य आरोग्य तपासणी केली. ग्रामस्थांच्या विविध आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. तसेच पावसाळ्यात स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव कसा करावा, याबाबत डॉक्टरांनी सखोल मार्गदर्शन केले. या शिबिराचा भिल्ल वस्तीतील अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी श्री. अशोक बजरंग येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड) यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. ...

संबोधी प्रतिष्ठानतर्फे नवनियुक्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी व पदोन्नतीप्राप्तांचा सत्कार संपन्न

Image
बीड प्रतिनिधी :बीड, पुणे व मराठवाड्यात देवगिरी प्रतिष्ठान च्या वतीने तुलशी शैक्षणिक संकुल मार्फत विविध शाखेची विद्यालय, महाविद्यालय व सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता विविध कौशल्यपूर्ण उपयोगी कोर्सेस सुरू करणारे प्रा. प्रदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव अभिवादन ग्रुप बीड व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय बीड तसेच संबोधि प्रतिष्ठान बीड विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने संबोधी प्रतिष्ठान, बीडच्या वतीने नवनियुक्त अधिकारी-कर्मचारी, पदोन्नतीप्राप्त अधिकारी-कर्मचारी तसेच विविध स्पर्धात्मक व व्यावसायिक परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. संबोधी प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सखाराम उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्र...

महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित

Image
महापुरुषांचे विचार समाजमनात रुजविणाऱ्या स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ने सन्मानित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर, गोरक्षण आणि सामाजिक कार्याची दखल बीड : मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मराठा साम्राज्य विजय उत्सवा’निमित्त राक्षसभुवन येथे आयोजित करण्यात आलेल्या राक्षसभुवन लढाई स्मरण सोहळ्यात समाजसेवक स्वपनील वरपे पाटील यांना त्यांच्या सामाजिक व वैचारिक कार्याची दखल घेत ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दि. १० ऑगस्ट १७६३ रोजी राक्षसभुवन येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता. मराठा साम्राज्याच्या या ऐतिहासिक विजयाची स्मृती आणि मराठ्यांच्या शौर्याची गौरवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी राक्षसभुवन येथे मराठा साम्राज्य विजय उत्सव व लढाई स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याच ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यात स्वपनील वरपे पाटील यांना ‘आदर्श शंभू भक्त पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. बीड ...

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'भिम शक्ती' संघटनेचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'भिम शक्ती' संघटनेचे बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ​बीड प्रतिनिधी :अल्पसंख्याक व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणि‍क भविष्याशी निगडित विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, यासाठी 'भिम शक्ती' सामाजिक संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत शिफारस करण्याची मागणी करण्यात आली आहे. ​ ​मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ योजना पुनरुज्जीवन: महामंडळांतर्गत बंद असलेली 'एज्युकेशन लोन' (शैक्षणिक कर्ज) योजना आणि अल्पसंख्याक समाजासाठीची 'स्कॉलरशिप' (शिष्यवृत्ती) त्वरित सुरू करावी. तसेच महामंडळाचा बंद केलेला रु. २ कोटींचा निधी पुन्हा सुरू करून वाढीव तरतुदीसह तो प्रत्येक जिल्ह्याला वितरीत करावा. ​ प्रत्येक जिल्ह्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला कामकाजासाठी स्थानिक 'सामाजिक न्याय भवन' मध्ये हक्काची जागा मिळावी. ​ महात्मा ज्योतिबा फुले इतर मागासवर्ग विकास महामंडळाला शासनाकडून पुरेसा व भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता...