Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ; आषाढ पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदना उत्साहात

Image
बीड | प्रतिनिधी आषाढ पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेनिमित्त धानोरा रोड येथील नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ अत्यंत धम्ममय वातावरणात करण्यात आला. यानिमित्त आयोजित बुद्धवंदना कार्यक्रमाला पंचशील नगर परिसरासह शहरातील विविध भागांतील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मश्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी (ए)चैत्यभूमी मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी त्यांच्या हस्ते भगवान तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. व्ही. एन. निसर्गंध (भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले. तर प्रा. व्ही. आर. गाडे यांनी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले. धम्मदेशनेत पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील आषाढ पौर्णिमेचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इ.स.पूर्व ५२८ मध्ये सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाल्य...

ग्रामीण भागातील मुलींसाठी केंद्रस्तरावर शासकीय निवासी शाळा सुरू करा : - बाजीराव ढाकणे

Image
ग्रामीण भागातील मुलींसाठी केंद्रस्तरावर शासकीय निवासी शाळा सुरू करा : - बाजीराव ढाकणे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदन; बीड जिल्ह्यासाठी विशेष शिक्षण आराखड्याची मागणी बीड प्रतिनिधी : - बीड जिल्ह्यातील ग्रामीण, डोंगराळ व दुर्गम भागातील मुलींना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक केंद्र (क्लस्टर) स्तरावर मुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महा एनजिओ फेडरेशनचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण हा प्रत्येक मुलीचा घटनात्मक अधिकार असून ग्रामीण भागातील मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आजही अपुऱ्या आहेत. अनेक गावांमध्ये इयत्ता ५ वी किंवा ८ वीनंतर पुढील शिक्षणासाठी मुलींना ५ ते १० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करावा...

जीवाची वाडी जिल्हा परीषद शाळेत ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढ दिवसा निमित शैक्षणिक साहित्य वाटप-विजयकांत मुडे.

Image
जीवाची वाडी जिल्हा परीषद शाळेत ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढ दिवसा निमित शैक्षणिक साहित्य वाटप-विजयकांत मुडे. येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.३० रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता १-ली ते-७वी वर्गातील मुली-१०५,मुले-७०एकुण-१७५ विधार्थ्यांना ना. पंकाजाताई गोपीनाथराव मुंडे,पशुसंवर्ध व पर्यावरण आणि वातावरण बदल,मंत्री यांच्या वाढ दिवसा निमीत कंपास पेटी,वही व पेनचे तसेच वृक्ष रोपांचे माजी विडा जिल्हा परीषद सदस्य,विजयकांत विक्रमराव मुंडे यांनी स्वतःस्वखर्चातुन वाटप करण्यात आले.कार्यक्रमास संबोधीत करताना विजयकांत(भेया)मुंडे म्हणालेकी पंकजाताईं मुंडे यांच्या वाढ दिवस साजरा करताना वीडा सर्कल मधील सर्व जिल्हा परीषद शाळांची निवड केली कारण या शाळेत फक्त शेतकऱ्यांची व गरीबांची मुल शिकतात म्हणुन या शाळांची निवड केली.वीडा परिसर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मानणार आहे त्यांचे काही प्रमाणात ऋणातुन मुक्ती मिळावी करिता या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीराम तोंडे, बंडूशेठ पाटील,मुख्याध्यापक रमेश चौरे,भीमराव चौ...

मुस्कान शेख मृत्यू प्रकरणाची धाराशिवच्या त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी; उद्या बीडमध्ये जबाब नोंदविणार

Image
मुस्कान शेख मृत्यू प्रकरणाची धाराशिवच्या त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी; उद्या बीडमध्ये जबाब नोंदविणार स्थानिक चौकशी समितीवर नातेवाईकांचा आक्षेप; वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र समितीची नियुक्ती : डॉ. गणेश ढवळे बीड:-(दि.३० ) : बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या मुस्कान शेख (वय २४, रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता धाराशिव येथील त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. स्थानिक चौकशी समितीवर नातेवाईकांनी निष्पक्षतेबाबत आक्षेप घेतल्यानंतर वरिष्ठ स्तरावर ही समिती नियुक्त करण्यात आली असून, उद्या शुक्रवार (दि. ३१ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हा रुग्णालयातील व्हीसी हॉलमध्ये संबंधितांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. मुस्कान शेख यांच्यावर १० जुलै रोजी नव्या माता व बाल रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके आणि अतिरिक्त...

जागतिक मानव तस्करी विरोधी दिन : मानवी प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सामूहिक लढा

Image
जागतिक मानव तस्करी विरोधी दिन : मानवी प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सामूहिक लढा -- लेखन आणि संकलन --  सौ. आशाताई बाजीराव ढाकणे सामाजिक कार्यकर्त्या तथा सचिव, श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जोला, पो. देवगाव, ता. केज, जि. बीड दरवर्षी ३० जुलै रोजी जगभरात "जागतिक मानव तस्करी विरोधी दिन" (World Day Against Trafficking in Persons) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) २०१३ मध्ये या दिवसाची घोषणा केली. या दिवसाचा उद्देश मानव तस्करीसारख्या अमानुष गुन्ह्याविषयी जनजागृती करणे, पीडित व्यक्तींचे संरक्षण करणे आणि मानव तस्करी रोखण्यासाठी समाज, शासन व कायदा अंमलबजावणी यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करणे हा आहे. मानव तस्करी हा जगातील सर्वात गंभीर आणि संघटित गुन्ह्यांपैकी एक मानला जातो. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी महिलांना, मुलींना, बालकांना तसेच पुरुषांनाही फसवून किंवा जबरदस्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांचे लैंगिक शोषण, सक्तीची मजुरी, बालमजुरी, भीक मागण्यास भाग पाडणे, बेकायदेशीर अवयव व्यापार किंवा इतर अमानवी कृत्यांसाठी वापर केला जातो. हा...

रोजंदारी मजदुर सेनेच्या दणक्याने औष्णिक विद्युत केंद्र परळीतील कंत्राटदाराविरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत खटले दाखल

Image
   परळी दि.२९ ( प्रतिनिधी ) रोजंदारी मजदुर सेनेच्या दणक्याने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभागप्रमुखांच्या अधीनस्थ कंत्राटदारावर विविध कामगार कायद्यांतर्गत मा. प्रथम न्यायदंडाधिकारी परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या न्यायालयात खटले दाखल करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली.      याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांचे बेकायदेशीर पिळवणूक करणाऱ्या मुख्य अभियंता यांच्या आस्थापनेतील सर्व विभाग प्रमुखांच्या अधीनस्थ कंत्राटदार व संबंधित विभाग प्रमुख मागील 35 वर्षापासून किमान वेतन व अनुषंगित लाभ न देता कंत्राटी कामगारांचे शोषण करत आहेत याकरिता सरकारी कामगार अधिकारी बीड यांच्यामार्फत निरीक्षण करावे याकरिता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर तब्बल 11 दिवस उपोषण केले होते त्या अनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी बीड सुधाकर कोनाळे यांनी दिनांक २०/ ०८/ २०२५ रोजी औष्णिक विद्युत केंद्रातील आस्थापनेत युनिट नं. ६/७/ ८ येथे निरीक्षण केले होते. परंतु ...

बीडमधील बालेपीर दर्गाजवळील रखडलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला; डॉ. योगेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

Image
​बीड  प्रतिनिधी :- बीड शहरातील अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर परिसरातील दर्गाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला रस्ता अखेर वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. ​भाजपा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले. बुधवारी (दि. २९) डॉ. क्षीरसागर यांनी स्वतः रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवून हा मार्ग नागरिकांच्या सेवेत खुला केला. ​या महामार्गावरील रस्ता बंद असल्याने वाहनधारकांना व स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्ता सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला असून, परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.