Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम: स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन

Image
महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम:  स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन ​बीड प्रतिनिधी :- समाजात ज्यांना कोणी सहारा नाही, ज्यांचे या जगात कोणी नातेवाईक उरले नाहीत अशा निराधारांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत महुवाले परिवाराच्या वतीने एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. स्वर्गीय भारत जानकीराम महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शहरातील 'जिव्हाळा बेघर निवारा केंद्र' येथे राहणाऱ्या बेघर व निराधार व्यक्तींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ​या शिबिरात कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या वृद्धांची आणि रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली. यामध्ये खालील मोफत सेवा व उपचार देण्यात आले ​ रुग्णांसाठी मोफत मसाज आणि स्टीम थेरपी. जुनाट आजार व सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीचे 'अग्निकर्म' आणि 'विद्धकर्म' द्वारे मोफत उपचार करण्यात आले. ​"आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजातील दुर्क्षित आणि निराधार घटकांना मदतीचा हात देणे हीच स्व. भारत महुवाले यांना खरी श्रद्...

विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप.

Image
विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप. बीड (प्रतिनिधी ) : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी बीड जिल्हा कार्यआध्यक्ष मनीष सुहासराव पाटील यांच्या वतीने व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वही व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बीड येथील जिव्हाळा निराधार केंद्रात शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत निराधारांना चटायांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देतानाच निराधारांना मदतीचा हात देत स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि समाजातील गरजू, निराधार व्यक्तींना आवश्यक वस्तूंची मदत करणे, या उद्देशाने दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेटे साहेबांनी जपलेल...

रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग उपोषण सुरू

Image
रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग उपोषण सुरू बीड दि.१५ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड , अनिता बचुटे तर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे यांनी कामगारांना कामावर रुजु करणे , किमान वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत याकरिता 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. तर काही कंत्राटी कामगार प्रतिनिधीनी काम करुन आळीपाळीने धरणे धरून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.    स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले तरी देखील बीड जिल्ह्यातील कंत्राटी कामगार पारतंत्र्यात आहेत का ? असा संतप्त सवाल कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी समाज माध्यमातून व प्रसिद्धी पत्रका द्वारे शासनास व जिल्हा प्रशासनास केला आहे.       याबाबत सविस्तर वृत्त असे की सन 2017 ते आजतागायत कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्...

स्वातंत्र्य दिनी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अधिकाऱ्यांनी बूट न काढल्याचा आरोप; परळीत चौकशी व कारवाईची मागणी

Image
परळी वैजनाथ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मात्र, यावेळी प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायातील बूट न काढताच महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केल्याचा आरोप आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांच्या नागरिकांनी केला आहे. महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिष्टाचाराचे पालन न केल्याचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना योग्य तो आदर राखला जाणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय कार्यालयात मोठे महत्त्व असताना प्रतिमांना अभिवादन करण्याच्या प्रसंगी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायातील बूट काढले नसल्याच्या आरोपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकाराची उच्चस...

वहालीत लाखोंची योजना, नळाला पाण्याचा थेंब नाही! जलजीवन मिशनच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी शरद पवारांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून नळयोजना राबविण्यात आली असतानाही गावातील नळाला पाण्याचा थेंब मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी शरद पवार यांनी ग्रामपंचायत वहालीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, बोगस व निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लाखो रुपये खर्च करूनही नळाला पाणी मिळत नसेल, तर या योजनेचा नेमका फायदा कोणाला झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. मंजूर निधी, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष झालेली कामे, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची गुणवत्ता यांची तपासणी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भर पावसाळ्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा ल...

आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Image
बीड प्रतिनिधी : आम आदमी पार्टी, बीड जिल्हा कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड हे होते. यावेळी बोलताना अशोक येडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, “क्रांतिकारकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचे खरे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका नव्या सामाजिक क्रांतीची गरज आहे.” कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. किस्किंदा पांचाळ, जिल्हाध्यक्ष, बीड जिल्हा सुतार समाज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी शासनाच्या सर्व सुख-सुविधा व मूलभूत हक्कांचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. यासाठी समाजाने जागरूक होऊन आपल्या हक्कांसाठी पुढे येणे गरजेचे आहे.” कार्यक्रमाचे नियोजन श्री. सय्यद सादेक, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पैशाचं झाड' लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

Image
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पैशाचं झाड' लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी  हरित अभियानातील ४२ कोटींच्या वृक्षलागवड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड:-( दि.१५) : बीड जिल्ह्यातील वनविभागातील वनीकरणासह इतर कामांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, अनियमितता आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'वनविभागातील झाडांना पैसे' हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. गणेश ढवळे यांच्यासह शेख युनुस चऱ्हाटकर आणि मुजीब इनामदार यांनी सहभाग घेतला. हरित अभियानांतर्गत ४२ कोटी रुपये खर्च करून कागदोपत्री वृक्षलागवड करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी प्रादेशिक विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्यात य...