Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

क्रांतिकारी भीमसैनिक भाई राजेशकुमार जोगदंड यांचा भारतीय दलित पॅंथर च्या वतीने परळी येथे भव्य सत्कार संपन्न

Image
परळी८(प्रतिनिधी ) भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य. बीड जिल्हा. परळी तालुका व शहर शाखेच्या वतीने शासकीय विश्रामगृह परळी वै.जिल्हा. बीड येथे 5 सप्टेंबर 2026 शिक्षक दिनानिमित्त व भारतीय दलित पॅंथर च्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कामगारांचे न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी कामगार नेते भाई राजेशकुमार जोगदंड यांनी मागील ७ वर्षांपासुन सातत्याने कायदेशीर सनदशीर मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने तसेच जिल्हा सह आयुक्त नगर परीषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर सलग १८ दिवस अन्नत्याग उपोषण करुन न्याय मिळवुन देण्यासाठी संघर्ष केला . भाई राजेशकुमार जोगदंड यांच्या आई विमल यांच्या सह खुशालराव जोगदंड यांचाही संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यांनी सर्वांचे मन:पुर्वक आभार व्यक्त केले . सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रा.माधव रोडे सर, हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय ...

शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांच्या "निसर्गाचे संविधान "या कवितेला प्रथम काव्यलेखन पुरस्कार

Image
शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद केंद्रशाळेचे शिक्षक कवी डॉ गवाजी बळीद यांना एसआर दळवी फाऊंडेशन नवी मुंबई व अहिल्यानगर टिचर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सृष्टीसंवर्धन या ध्येयाने प्रेरित शिक्षकांसाठी आयोजित हरित भारताचे स्वप्न व वसुंधरेसाठी स्वातंत्र्य या विषयांवर स्वरचित काव्यलेखन स्पर्धेत " निसर्गाचे संविधान " या कवितेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .      अहिल्यानगर येथील हॉटेल सुवर्णम प्राईड येथील वातानुकुलीत प्रशस्त हॉलमध्ये आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात एसआर दळवी फाऊडेंशनचे सर्वेसर्वा मा रामचंद्र दळवी व सीताताई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआर दळवी फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष मा .सतीश मुन्तोडे राजकुमार बनसोडे, रूपचंदजी शिदोरे, शिक्षक गुणवंत बुधवंत संदीप रासकर आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्ध गझलकार अभिनेते रज्जाकभाई शेख यांच्या हस्ते कवी डॉ गवाजी बळीद यांना सन्मानपत्र , सन्मानचिन्ह , मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले . या यशाबद्दल गटविकासाधिकारी मा महेश दहिफळे ,गटशिक्षणाधिकारी मा श...

कोरडा दुष्काळ जाहीर करा! सरकारची मानसिकता गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसारखी; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन

Image
कोरडा दुष्काळ जाहीर करा!    सरकारची मानसिकता गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसारखी; बीडमध्ये लक्ष्यवेधी आंदोलन   पिक विम्याचे निकष व ट्रिगर पूर्ववत करा :- डॉ. गणेश ढवळे  बीड : (दि. ७ सप्टेंबर) पावसाअभावी बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याची शक्यता असून, पिकांच्या उत्पादकतेत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती आहे. त्यातच केंद्र व राज्य शासनाने पिक विमा योजनेतील निकष व ‘ट्रिगर’मध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात तातडीने 'कोरडा दुष्काळ 'जाहीर करावा आणि पिक विम्याचे निकष व ट्रिगर पूर्ववत करावेत, या मागणीसाठी सोमवारी (दि. ७) बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स येथे गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीसमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या न...

बी दि चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ आत्मलिंग शेटे यांना प्रदान

Image
बी दि चेंज फाउंडेशनचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’ आत्मलिंग शेटे यांना प्रदान परळी समाचार व दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक म्हणून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल शिर्डी, प्रतिनिधी : पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे परळी समाचार व दैनिक जनरेखा वृत्तपत्राचे संपादक आत्मलिंग शेटे यांना बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. बी दि चेंज फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, शिर्डी येथील साई पालखी निवारा, साईबाबा मंदिर परिसर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सौंदर...

३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार द्या; सामाजिक सुरक्षेसह ठोस धोरणाची मागणी

Image
३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार द्या; सामाजिक सुरक्षेसह ठोस धोरणाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना ग्रामसाधन व्यक्तींचे निवेदन मुंबई प्रतिनिधी : - महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सामाजिक अंकेक्षणासाठी कार्यरत असलेल्या सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि भविष्यातील रोजगाराची हमी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गणेश काळे, शेख रज्जाक, बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती आहे.       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तातडीने सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र दिले आणि याविषयी मी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले आहे असे गणेश काळे यांनी सांगितले आहे.        ग्रामपातळीवर शासनाच्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग सुनिश्चित करण्यासाठी ग्रामसाधन व्यक्त...

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने

Image
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने सरकारच्या दबावाखाली कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. ४) पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मानवी आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत. डीजेच्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालून त्यावर कठोर निर्बंध आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान विद्यानंद बापट यांना संतोष चव्हाण नामक व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचा दावा आंदोलनकर्त्य...

जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद

Image
जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा; मराठा आरक्षणाच्या मागणीला शहरातून जोरदार समर्थन पाटोदा (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज पाटोदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक तसेच विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. सकाळपासूनच पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विविध भागांमध्ये बंदचा परिणाम जाणवला. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्वधर्मीय व विविध समाजघटक एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.बंददरम्यान आंदोलनकर्त्यांकडून शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.पाटोद्यातील या बंदला व्यापारी वर्गासह नागरिकांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. एकजुटीने दिलेला हा बंदचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा प...