Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती 26 मार्च दिनी बीडमध्ये होणार साजरी - कॅप्टन राजाभाऊ आठवले

Image
बीड (प्रतिनिधी ): चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. २६ मार्च रोजी हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ठीक ९.०० वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात सम्राट अशोकांच्या आदर्शांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भिक्खुसंघाच्या उपस्थितीत भव्य धम्मरथातून सम्राट अशोकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक राजुरी वेस, कारांजा, बलभीम चौक, टिळक रोड, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाणार असून, त्या ठिकाणी सम्राट अशोकांना मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच सम्राट अशोका शाक्य संघ (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी) यांचे सदस्य गणवेशात सहभागी होणार आहेत. तसेच भारतीय धम्म महासंघ व मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका पांढऱ्या ...

मावलाई श्री राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार डॉ. गणेश ढवळेंना जाहीर

Image
बीड (दि. २५ ): गेवराई तालुक्यातील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा ब-हाणपुर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून मावलाई देवी यात्रेनिमित्त पत्रकारिता, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “मावलाई श्री समाजसेवा पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, वृक्षारोपण व संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर सातत्याने अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ब-हाणपुर येथे दि. ०३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शशिकांत शिंगारे यांच्या हस्ते रोख रक्कम, ...

लेख : श्रीरामनवमीच्या निमित्ताने.....श्रीरामनवमीचे महत्त्व

Image
लेख : श्रीरामनवमीच्या निमित्ताने..... श्रीरामनवमीचे महत्त्व          श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण श्रीरामनवमीचा इतिहास आणि महत्त्व, हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रामनामाचे महत्व यांविषयी जाणून घेणार आहोत. रामनवमीला श्रीरामाची उपासना आणि नामजप करून रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !   1. तिथी : रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. 2. इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम या...

पुणे येथे राज्यस्तरीय कर्तृत्व गौरव पुरस्काराने माया दिवाण यांचा सन्मान

Image
पुणे/ बीड (प्रतिनिधी ) – नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये माया दिवाण यांना ‘कर्तृत्ववान महिला गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा सोहळा २१ मार्च २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयात नोंदणीकृत असलेल्या नालंदा फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा माया दिवाण यांच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माया दिवाण यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत समाजासाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. लेखिका, कवयित्री, म्हणून त्यांची कार्य अधोरेखित आहे. समाजनिर्मितीसाठी त्यांनी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेत प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून व कवितेतून सामाजिक बांधिलकी, सृजनशीलता आणि समर्पण यांचे उत्कृष्ट दर्शन घडते. या सन्मानामुळे त्यांच्या ...

नाशिकच्या भोंदू बाबावर कारवाई करा; बीड जिल्हाधिकाऱ्यांना 'अंनिस'चे निवेदन

Image
भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा-बुवाबाजी-सत्ता-संपत्तीच्या संगनमताने चालू असलेले 'महिलांचे शोषणा'विरोधी राज्यस्तरावर कठोर कारवाई व्हावी          राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना 'मअंनिस' बीड शाखेचे निवेदन बीड (दि 24 ):नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकर णाकडे केवळ त्या एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रुपात पाहणे,ही मोठी चूक ठरेल.अंधश्रद्धा,सत्ता,संपत्ती,बुवाबाजी,ज्योतिष्य, व 'तथाकथीत अध्यात्म व दैवी शक्तीच्या' अतिशय धोकादायक संगनमताचे हे राज्याला हादरवून सोडणारे गंभीर उदा. आहे.करिता,या व अशा प्रकरणांची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता,त्या मागील संपुर्ण जाळ्याचा शोध घेण्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,बीड शाखेच्या वतीने विवेक वाहिनीच्या राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सविता शेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मा.मुख्यमंत्री महोदयांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठविले असल्याची माहिती जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्राचार्य कॉ डी जी तांदळे यांनी दिली आहे. यासंबंधाने अधिक माहिती अशी की,समाजातील असुरक्...

भगव्या रंगात रंगणार पाटोदा; विराट हिंदू संमेलनाची पाटोद्यात जोरदार तयारी

पाटोदा (प्रतिनिधी )सकल हिंदू समाज,पाटोदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाटोदा शहर भगव्या रंगात न्हाऊन निघत असून वातावरणात धार्मिक उत्साहाची लाट उसळली आहे. येत्या गुरुवारी, दि. २६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य संमेलनासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून सर्वत्र भगवे ध्वज आणि आकर्षक सजावट करण्यात येत आहे.श्रीराम मंदिर व काळा हनुमान मंदिर परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या या संमेलनात नामांकित शिवचरित्रकार अशोक बांगर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या विचारांतून हिंदू संस्कृती, इतिहास आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे.तसेच ह.भ.प. राधाताई महाराज आईसाहेब या मातृशक्ती प्रबोधन करणार असून समाजातील महिलांच्या सशक्त भूमिकेवर भाष्य करतील. ह.भ.प. लक्ष्मण महाराज सस्ते आणि ह.भ.प. केदारेश्वर महाराज जाधव हे प्रबोधनातून अध्यात्मिक व सामाजिक संदेश देणार आहेत.कार्यक्रमानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ही संमेलनाची मुख्य आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे आयोजन

Image
बीड प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बीड शहरात ‘महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात आयोजित केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही जिल्ह्यातील इयत्ता 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. तालुकास्तरीय पहिली फेरी दिनांक 30 मार्च 2026, सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या फेरीतून प्रत्येक तालुक्यातील अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या अकरा तालुक्यांतील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुलसी महाविद्यालय, बीड येथे पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी 7,000 रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी 5...