Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

महाजनवाडी येथील गायरान पेटलं की पेटवलं?; ग्रामस्थांची चौकशी करून कारवाईची मागणी

Image
लिंबागणेश : (दि.१२ ) बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे अहमदपूर ते अहिल्यानगर महामार्गालगत जनावरांच्या चाऱ्यासाठी संरक्षित असलेली सुमारे १२२ एकर गायरान जमीन गुरुवारी (दि.१२) सकाळी साडेअकराच्या सुमारास आगीत भस्मसात होण्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गायरानाला लागलेली आग नेमकी कशी लागली याबाबत ग्रामस्थांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. जवळील शेतात काम करत असलेले सुजित घरत यांच्या निदर्शनास आगीचे लोट येताच त्यांनी तात्काळ सहकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. वाढते तापमान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, सुकलेले गवत तसेच काही वेळा दारू पिणाऱ्या व्यक्तींनी पेटवलेल्या बिडी-सिगारेटमुळे गायरान जमिनीत आग लागण्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुजित घरत यांच्यासह महेश गिरी, शुभम घरत, सुधीर घरत, अक्षय आबदार, गणेश हिंदोळे, दादाराव घरत, रोहन घरत, दादा पठाण आदी ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने आणि मेहनतीने आग आटोक्यात आणली. आग इतरत्र पसरू...

वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे : वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाववन्यजीव धोक्यात; वन्यजीवांची तहान भागवा ! नियमितपणे पाणीपुरवठा करा – डॉ. गणेश ढवळे

Image
वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे : वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव वन्यजीव धोक्यात; वन्यजीवांची तहान भागवा ! नियमितपणे पाणीपुरवठा करा – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.१२ ) – सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नैसर्गिक पाणीस्रोत असलेल्या तलाव, साठवण तलाव आणि धरणांतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी, सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत. यामुळे हरीण, मोर, लांडोर, वानर आदी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे तसेच गाव तलावांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वनविभागाने तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात नाही. काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचा तसेच अज्ञात...

आंबा-काजू शेती 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करा- शेतकरी राजा सामाजिक समीतीची मागणी

Image
 बीड प्रतिनिधी : सद्यस्थितीत बदलत्या हवामानामुळे सध्या राज्यातील आंबा-काजू हवामान बदलामुळे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गावर हे ओढलेले पून्हा: एक नवं संकट आहे. या गंभीर समस्येला पाहता सरकारणे याला 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करून हेक्टरी ५ लाखांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समीतीचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी केली आहे.  यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस, दाट धुके आणि दव यामुळे आंबा व काजू बागांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणीतर काजू, आंब्याचा मोहर जळून गेला असून, काही भागांत फळांवर काळे डाग पडल्याने ती निकामी झाली आहेत. काजू बागायतदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर ईतर ठीकाणी सुद्धा आंबा पिक देखील अडचणीच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आता पुर्णपणे कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येवुन ठेपला आहे. यामुळे शेतकरी राजा उपाशी आणि ईतरत्र तुपाशी हे कधीही आम्हाला मान्य होणार नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे यासाठी आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो...

क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Image
क्रांतीज्योती सावित्रीमाई स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ( निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्याचा सत्कार, महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल वाचनालयाचा उपक्रम )  बीड (प्रतिनिधी ) - अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड यांच्या जोखंडात आडकऊन सर्व स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे स्त्रियांची शुद्र, अति -शुद्राची जी अधोगती विद्ये अभावी झाली होती ती दूर करण्याकरिता वंचित, शूद्र अतिशूद्र व मुलींकरता शिक्षणाचे दारे उघडून भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ह्या आपल्या समस्ता स्त्रियांच्या, वंचितांच्या ज्ञानज्योती आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून तसे आचरण आपल्या जीवनात ठेऊन, फुले, शाहू,आंबेडकरांच्या विचारघारेनुसार संविधानिक मार्गाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय स्थापन होण्यास वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनमोल सहकार्य लाभेल असे प्रतिपादन प्रा. बबीता गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या 129 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रसंगी केले.  महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न

Image
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर लिंबागणेश येथे उत्साहात संपन्न नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप लिंबागणेश (दि.११ मार्च ): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा–१) अंतर्गत लिंबागणेश येथे आज दि.११ बुधवार रोजी आयोजित करण्यात आलेले महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. लिंबागणेश येथील भालचंद्र गणपती देवस्थान सभामंडपात आयोजित या शिबिरात शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. या अभियानाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास राजेंद्र मस्के, बळीराम गवते, डॉ. गणेश ढवळे, गोरखनाथ सिंगर यांच्यासह महसूल विभागातील वि...

जीवाची वाडी येथील आरोग्य उपकेंद्र आठ दिवसा पासुन बंद, बायोमॅट्रीक उपस्थितीचा बोलबाला

Image
येवता:प्रतिनिधी:सा.वा.दि.११/०३/२०२५ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील आरोग्य उप केंद्र दि.०६ मार्च-२०२६पासुन कायम बंद असलेने ग्रामस्तानी मा. अधिक्षक प्रा.आ.उप केंद्रविडा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.आरोग्य विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे अभय !दुर्लक्ष असलेचे दिसुन येत असलेने आजारी रुग्नांचे हाल होत असलेचे दिसुन येत आहेत.रूग्नांना नाहाक आर्थिक खिशाल कात्री लागत आहे.   सविस्तर असे की जीवाची वाडी येथे युनानी दवाखाना आहे.तेथील कर्मचारी जागा भरल्या नाहीत एक सेवक होते ते बदली करून गेले,त्या जागी दुसरा कर्मचारी आलेच नाहीत.आरोग्य उप केंद्रात चार कर्मचारी आहेत.एमपीडब्लव नियमित आलेले दिसत नाहीत.तिन महिला कर्मचारी आहेत त्यापैकी एकीची गेल्या तिन वर्षा पासुन दुसऱ्या गावात प्रतिनियुक्ती केली आहे,समुदाय आरोग्य अधिकारी,ए एन एम दोन्ही सहा दिवसा पासुन अनु उपस्थित असलेने तालुका वैधकीय अधिकारी यांची पाठराखन!अभय कोणाचे?जीवाची वाडी आरोग्य उप केंद्र कायम बंद असलेने वरीष्ठ काय कारवाही करनारका याकडे ग्रामस्त लक्ष वेधुन आहेत.         आमच्या प्रतिनिधीने भ्रम्हध्वनी विच...

युवकांना आधी रोजगार व व्यवसायासाठी कर्ज द्या, तरच होतील लग्न; प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी सुरू करा युवकांची मागणी

पाटोदा (प्रतिनिधी ) सध्याच्या काळात ग्रामीण भागातील युवकांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. शिक्षण पूर्ण करूनही अनेक युवकांना नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळत नसल्यामुळे त्यांचे भविष्य अंधारात जात आहे. त्यामुळे युवकांना तातडीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच युवा शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी युवकांकडून करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतीसोबतच लघुउद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहेत. मात्र भांडवलाच्या अभावामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. त्यामुळे शासनाने बँकांमार्फत कमी व्याजदरात कर्ज योजना राबवून युवकांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यासोबतच प्रत्येक तालुक्यात औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी उभारण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे. जर तालुकास्तरावर उद्योगधंदे सुरू झाले तर स्थानिक युवकांना त्यांच्या गावाजवळच रोजगार मिळू शकतो. त्यामुळे स्थलांतर थांबेल आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकासही वेगाने होईल.युवकांना रोजगार मिळाला,उद्योगधंदे वाढले आणि ...