Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाडळी येथील अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबाला आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांची भेट

Image
बीड, दि. ४ जून — शिरूर कासार तालुक्यातील पाडळी येथील गायरान परिसरात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील बरडे कुटुंबावर काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात शंकर बरडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अन्यायग्रस्त कुटुंबाची आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बरडे यांच्या समन्वयातून ही भेट आयोजित करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला तसेच आवश्यक मदत साहित्यही प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना अशोक येडे यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पाडळी येथील अनेक आदिवासी कुटुंबे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही, शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावर अन्याय व अत्याचार होत असतील तर हा अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश...

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल; बोगस पाणंद रस्ता प्रकरणी चौकशी समिती स्थापन

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील कथित बोगस पाणंद रस्ता कामांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पंचायत समिती पाटोदाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर व तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिनांक 29 मे 2026 रोजी पंचायत समितीकडे निवेदन देऊन तालुक्यातील पाणंद रस्ता कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.या मागणीची दखल घेत पंचायत समिती पाटोदाने दिनांक 3 जून 2026 रोजी पत्राद्वारे चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली आहे.गट विकास अधिकारी यू. एम. सानप यांनी दिलेल्या पत्रानुसार, चौकशी समितीमार्फत संबंधित प्रकरणाची तपासणी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 4 जून 2026 रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पाटोदा यांच्या आंदोलनाची प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याने तालुक्यातील पाणंद रस्ता कामांबाबतचे वास्त...

प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव

Image
प्रथा की दिखाव्याचा बाजार, घेत आहेत कित्येक जीव - मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाज म्हणून सर्वांचा बदलायला हवा जन्म दिल्यानंतर अनेक प्रसंगांना या स्त्री जातीला तोंड द्यावं लागतं जन्म दिल्यापासून मरेपर्यंत तिची सुरक्षिततेची चिंता आहेच शिक्षण हुंडा समाजातील देवाण-घेवाण प्रथा या वाढल्या आहेत याला जबाबदार आपणच आहोत त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाच्या डोळे झाक भूमीमुळे स्त्रीभ्रूणहत्येचे कत्तलखाने वाढले आहे आज कित्येक मुलांना बायका मिळत नाही समाजाने याकडे डोळे झाक करून चालणार नाही आणि यामुळेही पुन्हा महिला अत्याचाराच प्रमाण वाढल आहे.            लग्न समारंभ धोंडे जेवण दिवाळी अनेक उत्सव सण समारंभ अशा आहेत जिथे नाही त्या प्रथा घुसडल्या जातात या उत्सवांचे प्रथमच महत्व कमी होऊन फक्त दिखावा पनाचा बाजार मांडला आहे सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल करतात आणि आपणच आपल्या मुलींचे या मुलींच्या आई बापाचे गुन्हेगार होत चाल...

लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ

Image
लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (प्रतिनिधी ): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक परिसरात उभा असलेला जवळपास अडीचशे वर्षांचा महाकाय वटवृक्ष दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अखेर कोसळला. चार-पाच पिढ्यांच्या सुखदुःखाचा मुक साक्षीदार असलेला हा वृक्ष उन्मळून पडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी २९ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या आगीत वटवृक्षाच्या खोडाचा मोठा भाग जळून गेला होता. तरीही हा वृक्ष तग धरून उभा होता. मात्र अलीकडील वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे त्याची मुळे कमकुवत होऊन अखेर हा ऐतिहासिक वृक्ष जमीनदोस्त झाला. लिंबागणेशच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडी घडल्या. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींशी हा वृक्ष घट्ट जोडलेला होता. अनेक पिढ्यांनी त्याच्या छायेत विसावा घेतला, गप्पांचे फड रंगले आणि विविध कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याचा मान या वृक्षाला लाभला होता. निस...

रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती मा.आनंदराज आंबेडकर यांचा सत्कार

Image
रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती मा.आनंदराज आंबेडकर यांचा सत्कार  मुंबई/बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती मा.आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मा. आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष सुशिल सूर्यवंशी, भूषण लोळगे तसेच लक्ष्मण गव्हाणे यांच्या हस्ते पुरुषोत्तम वीर यांना पुष्पहार, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास राज्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला.

आचारसंहिता कालावधीतही बॅनरबाजीचा सुळसुळाट; मुख्याधिकारी शैलेश फणसे यांचे दुर्लक्ष?

Image
आचारसंहिता कालावधीतही बॅनरबाजीचा सुळसुळाट; मुख्याधिकारी शैलेश फणसे यांचे दुर्लक्ष?   नगरपरिषद प्रशासन मुंबईतील घाटकोपरसारख्या दुर्घटनेची वाट पाहतंय काय? : डॉ. गणेश ढवळे बीड( दि. ३) विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू झाली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. १८ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत नियमभंग करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स हटविणे, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय फलक काढणे, तसेच शासकीय इमारती, सार्वजनिक भिंती, रस्ते, पदपथ, बसस्थानके, उद्याने व क्रीडांगणे आदी ठिकाणी विशेष पथकाद्वारे नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सादर करणेही बंधनकारक आहे. मात्र बीड शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्या...

जागतिक सायकल दिवस आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा संदेश

Image
जागतिक सायकल दिवस   आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा संदेश -- लेखक आणि संकलन --  श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे पर्यावरणप्रेमी तथा बीड जिल्हा समन्वयक, महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य         दरवर्षी ३ जून हा दिवस संपूर्ण जगभर ‘जागतिक सायकल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सायकल हे केवळ एक वाहतुकीचे साधन नसून ते आरोग्य, पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकासाचे प्रतीक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१८ मध्ये या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. त्यामागचा उद्देश सायकलच्या बहुआयामी उपयोगांविषयी जनजागृती करणे आणि नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे हा आहे. सायकलचा इतिहास सायकलचा शोध हा मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. १९ व्या शतकात युरोपमध्ये सायकलचा प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळातील सायकली आजच्या सायकलींपेक्षा खूप वेगळ्या होत्या. काळानुरूप त्यात सुधारणा होत गेल्या आणि आज सायकल ही जगभरातील सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिक खेळाडूंपर्यंत सर्वांचीच पसंतीची वाहतूक व्यवस्था बनली आहे. आरोग्यासाठी सायकलचे महत्त्...