Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा’ ! सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा’ ! सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन  बीड (दि. १६): केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गॅस टंचाई निर्माण झाली असून गॅस दरवाढ आणि व्यावसायिक गॅसवरील निर्बंधांमुळे खाणावळी बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत. तसेच घरगुती गॅस सिलेंडरसाठी ऑनलाईन बुकिंग बंद असल्याने ग्राहकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर प्रमाणेच "मोदी टेक्नॉलॉजीचा प्रचार, प्रसार करून गॅस टंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात “मोदी टेक्नॉलॉजी वापरा आणि गॅस टंचाई दूर करा” या घोषणेसह नाल्यातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. “नाल्याच्या गॅसवरील चाय पे चर्चा” या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे केंद्र सरकार व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सरकार...

शिक्षण अधिकाऱ्यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडली; सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड

Image
बीड (प्रतिनिधी ) – शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दर महिन्याच्या एक तारखेलाच वितरित करणे बंधनकारक असताना, बीड जिल्ह्यात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि आडमुठ्या कारभारामुळे अनेक शिक्षकांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात सापडले असून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शनचे बजेट १८ फेब्रुवारी रोजी उपलब्ध झाले होते, मात्र प्रभारी शिक्षणाधिकारी श्रीमती कुवर यांच्या टेबलवर पेन्शनची फाईल तब्बल आठ दिवस पडून राहिली. या काळात संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली नसल्याने शिक्षकांची पेन्शन प्रक्रिया ठप्प झाली. याबाबत शिक्षकांनी विचारणा केली असता त्यांच्याशी अरेरावी केल्याचाही आरोप पुढे येत आहे. या प्रकरणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे तक्रार करण्यात आली असली, तरी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही किंवा त्यांचा पदभार काढण्यात आलेला नाही, अशी नाराजी शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, १६ मार्च उलटून ...

प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते - महंत राधाताई महाराज सानप आईसाहेब

Image
प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते - महंत राधाताई महाराज सानप आईसाहेब  आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद - प्राजक्ताताई धस युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय ४३ नारी सन्मान पुरस्कारांचे वितरण आष्टी। प्रतिनिधी   "प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते. जन्मापासून प्रत्येक यशोगाथेमागे आईचे योगदान महत्त्वाचे असते. आईनेच मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. सध्याच्या काळात शिक्षणामुळे अनेक महिला विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, तरीही तळागाळातील महिला अजूनही प्रगतीपासून दूर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन महंत राधाताई महाराज सानप (आईसाहेब) यांनी केले. आष्टी येथील पंचायत समिती सभागृहात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महानंद मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई धस यांनी सांगितले की, "आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्य...

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी?

Image
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम  (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी? मुंबई (प्रतिनिधी ) – राजगृहाशी एकनिष्ठ राहून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले पुरुषोत्तम (गोटू )वीर यांनी आज मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात येये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षाचे नेते विजय साळवे यांच्या उपस्थितीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, पक्षाचा विस्तार वाढवणे तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक संवाद झाला. तसेच पुरुषोत्तम वीर यांना लवकरच रिपब्लिकन सेनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाली. या प्रसंगी लक्ष्मण गव्हाणे, अशोक वाघमारे, बी. एस. जगतकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आष्टीचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांना मातृशोक

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :         आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी व सध्या आष्टी शहरातील विनायक नगर येथे स्थायिक असलेले आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्री कौशल्याबाई चंद्रभान धारक (वय वर्षे ९०) यांचे आज शुक्रवार पहाटे वर्धापकाळाने निधन झाले . त्यांचा अंत्यविधी धानोरा येथील अमरधामा येथे करण्यात आला .   कौशल्याबाई धारक यांच्या पाश्चात बापूराव   धारक,नायब तहसीलदार भगीरथ धारक, संतोष धारक, गुलाब धारक ४ मुले असुन सुनंदा रामदास दळवी १ मुलगी आहे .    अंत्यविधी प्रसंगी माजी आ. साहेबराव दरेकर , उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील, ॲड.हनुमंतराव थोरवे,माजी सभापती संजय ढोबळे,माजी सरपंच सतीशशेठ धस, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, माजी सभापती विजयकुमार बांदल, पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका) शेळके, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अनिलतात्या ढोबळे,संजय मेहेर, सुभाष राऊत, जालिंदर वांढरे, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, मच्छिंद्र शेळके, भगवान गायकवाड, मा...

हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कलमजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत

Image
हार्वेस्टरने गहू काढण्याकडे लिंबागणेश येथील शेतकऱ्यांचा वाढता कल मजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडत; वेळ, श्रम व पैशांची बचत  लिंबागणेश (दि.१४ ) – गव्हाच्या पिकाची कापणी व मळणी करण्यासाठी मजुरांऐवजी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र लिंबागणेश परिसरात दिसून येत आहे. यंत्राद्वारे काढणी केल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होत असल्याने शेतकरी यांत्रिकीकरणाला पसंती देत असल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी गणपत तागड यांनी व्यक्त केली. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात सध्या रब्बी पिकांच्या कापणी-मळणीची लगबग सुरू आहे. गत काही वर्षांपासून गव्हाची काढणी हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने करण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीकामासाठी मजुरांची टंचाई तसेच वाढलेले मजुरीदर यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने कापणी करणे कठीण होत आहे. मजुरांच्या मदतीने गव्हाची कापणी, बांधणी आणि मळणी करण्यासाठी साधारणतः ४ ते ५ दिवस लागतात व त्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने हेच काम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होत असून प्रति एकर सुमारे ३००० रुपयांत का...

सरकार करत असलेली व्यक्तिस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी म्हणजे सपसेल हुकूमशाहीच की- डॉ जितीन वंजारे

Image
सरकार करत असलेली व्यक्तिस्वातंत्र्यावरील मुस्कटदाबी म्हणजे सपसेल हुकूमशाहीच की- डॉ जितीन वंजारे रविराज साबळे आणि त्रिशूल पाटील यांच्या सोबत अक्खा महाराष्ट्र  काल परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक वल्गना केली आणि सोशल मीडियाचा वापर करून जेही लोक सरकार विरोधात बोलतील त्यांच्यावरती कार्यवाही करण्याचा कायदा पारित करणार असल्याचे सांगितले आजपर्यंत चालू बीजेपी सरकारने आपले सर्वच्या सर्व विरोधक ब्लॅकमेल करून संपविले आहेत कोणाला सीआयडी, ईडी किंवा इतर चौकशी यंत्रणा पाठीमागे लावून आपल्या विरोधात विरोधकच तयार न होऊ देण्याचा तंतोतंत कार्यक्रम अखला आहे.विरोधक कायमचा संपवण्यात आलेला आहे विरोधकांच्या बुडाखालचा अंधार उघडा करून त्यांच्यावर शासकीय कार्यवाही करून बळजबरीने त्यांचा पक्षप्रवेश स्वतःचा पक्षामध्ये करून घेतला परंतु स्वतःच्या प्रानाची आहूती देण्यासाठी तयार असलेले सामाजिक कार्यकर्ते यांचीही मुस्कटदाबी करण्यासाठीच ह्या कायद्या चे प्रयोजन आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे की उघडपणे सरकार कुठलेही असो काम चुकीचे केलं क...