Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड

Image
अनुसूचित जातीत फूट पाडणाऱ्या उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडा-ॲड विकास जोगदंड बौद्धांसह 58 जाती समूहाने एकत्र येण्याची गरज बीड (प्रतिनिधी ) 22 जुन  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेने शोषण केलेल्या जाती समूहांना, सामाजिक आर्थिक धार्मिक अशा महत्त्वपूर्ण क्षेत्राच्या आघाडीवर येण्यासाठीच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व आर्थिक मागास प्रवर्ग या तीन प्रवर्गांची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्मिती सभेत, अस्पृश्य-शूद्रातीशूद्र समाजास न्याय मिळवून देण्यासाठी देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह तत्कालीन मंत्रिमंडळाच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी आपल्या जीवाची परकाष्टा केली. बाबासाहेब आपल्या भाषणात वेळोवेळी सांगायचे की ज्या पायरीवर तुम्ही उभे आहात तिथे उभे राहण्यासाठीही तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. म्हणून पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी अनुसूचित जाती हा प्रवर्ग निर्माण केला. हा प्रवर्ग मानवी संवेदना नसणाऱ्या जातींचा एक समूह आहे. हा समूह प्रगतीपथावर असून, या जातीतील तिसऱ्या पिढीने मोक्याच्य...

मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Image
मुळुकवाडीत मध्यरात्री धाडसी चोरी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास घर फोडून ३ तोळे सोने व खतासाठी ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरट्यांनी केली लंपास लिंबागणेश:- (दि.२२ ) बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. मुळुकवाडी येथील संदिप अंबादास ढास हे गाय आजारी असल्याने रात्री शेतात मुक्कामी होते. दरम्यान मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास द्वारकाबाई ढास यांना शेजारील खोलीत आवाज आल्याने जाग आली. त्यांनी घराच्या गच्चीवर झोपलेल्या प्रतिक्षा ढास यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फोनवरून शेतात असलेल्या संदिप ढास यांना चोरीची माहिती दिली. संदिप ढास यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता घरातील दोन्ही कपाटे फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तसेच सोन्याचे दागिने ठेवण्याच्या डब्या उघड्यावर पडलेल्या दिसून आल्या. घरातील ३ तोळे सोने आणि खत खरेदीसाठी ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले...

लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते

Image
लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नामलगाव येथून इंटकच्या जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ-ह भ प रामेश्वर महाराज जाधव यांच्या हस्ते  बीड, दि. 21 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिरात राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), बीड जिल्ह्याच्या वतीने विशेष पूजा-अर्चना करून गणपती बाप्पाच्या चरणी साकडे घालण्यात आले. याच पवित्र प्रसंगी असंघटित मजूर, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मा. राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच येणाऱ्या काळात भारताचे पंतप्रधान होऊन संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट व्हावेत, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी, असंघटित मजूर, कामगार, विद्यार्थी व सर्वसामा...

पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे

Image
पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२१) बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्य...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश; राज्य सरकारची सकारात्मक भूमिका : - सौ आशाताई बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी : - संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी दिले आहेत. तसेच प्रत्येक गाव व शहरातील एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमात निमंत्रित करावे आणि त्यांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव व्ही. आर. ठाकूर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांवर सव...

प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान– आ. सुरेश धस

Image
प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान – आ. सुरेश धस आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद – महापौर ज्योती गाडे आष्टी | प्रतिनिधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सत्कारमूर्तींच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. ते आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने अहिल्यानगर येथे मेघनंद हॉटेल मध्ये दि २० जून रोजी आयोजित ‘महाराष्ट्र आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी भाषणात बोलत होते. पुढे बोलताना आ धस यांनी सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात. त्यांच्या कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात वेळेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, प्रत्येकाने आपल्या कार्यात वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. “आज कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही,” असेही त्यांनी नमूद केले.तर आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने ...

झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे

Image
मायबाप सरकार प्रकाशदादा, विजयसिंह पंडित राजे चिमुकल्यांवर दया करा..... झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे बीड:- (दि.१९ ) माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील काळेगाव थडी केंद्र टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने सध्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग झाडाखाली भरवले जात आहेत. त्यामुळे मायबाप सरकार माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तातडीने निधी उपलब्ध करून या विद्यार्थ्यांवर उपकार करावेत, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सन १९६३ मध्ये विटा व चुन्यापासून उभारण्यात आलेली शाळेची इमारत आज मरणासन्न अवस्थेत आहे. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून छतावरील पत्रे गंजून गळती होत आहे. सिमेंटचे खपले सतत कोसळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वर्गखोल्यांम...