Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार

Image
जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे . त्या निमिताने गढी ग्रामपंचायतचे जलसुरक्षक सखाराम पोहिकर यांचा सत्कार गेवराई तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासनाने जल महोत्सव पंधरवाडा चालू आहे त्या निमित्ताने गढी ग्रामपंचायतच्यावतीने गढी ग्रामपंचायत चे जल सुरक्षक व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉमेड सखाराम पोहिकर यांचा आज सकाळी १० = ०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय गढी समोर आदर सत्कार करण्यात आला . यावेळी स्वच्छ आणि सुरक्षिक पाणी प्रत्येक घरापर्यत पोहोचवण्याचे काम गढी ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांचा आज गढी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विष्णूपंत घोगडे व गढी गावचे जेष्ठ नागरिक श्री . भागवत ( भाऊ ) नाकाडे . शेख नुर टेलर . श्री मिठू ( काका) नाकाडे . मा रविंद्र ( बप्पा ) सिरसट . या सर्वानी आज गढी ग्रामपंचायत कार्यालयासमोर . शाल . पुष्पहार देउन आदर सत्कार करण्यात आला . यावेळी गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोगंडे . आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की गढी गावाला गेल्या अनेक वर्षापासून अहोरात्र मेहनत घेउन स्वच्छ पाणी देण्यासाठी सतत ...

दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभुमी असे नामकरण करण्यात यावे-लोक जनशक्ती पार्टी (रा)

Image
बीड : महाराष्ट्रामध्ये बऱ्याच रेल्वे स्थानकाचे नाव बदलून थोर महापुरुषांचे नावे देण्यात आलेली आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असून जसे अन्य रेल्वे स्टेशनला थोर महापुरुषांचे नावे देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्टेशनला नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना करण्यात आली तसेच या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 17 मार्च 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याचे निवेदन देण्यात आले जर याची नोंद घेतली नाही तर दोन एप्रिल 2026 पासून सबंध महाराष्ट्रात व अंबाजोगाई येथे बेमुदत बंद पुकारण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी यावेळी निवेदन देताना लोक जनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे ,बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे ,विशाल शेवाळे, दयानंद कांबळे ,सय्यद अजहर ,फिरोज शेख ,कैलास मस्के व इतर

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जागीच ठार; वनरक्षक महेश मेटे यांना कळविले – डॉ. गणेश ढवळे

Image
लिंबागणेश (दि.११ ): बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर बुधवारी (दि.११) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाले. मुळुकवाडी येथील सुखदेव वाणी व ग्रामस्थांनी जखमी काळवीटाला पाणी पाजून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर दुखापत झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काळवीट मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे वनरक्षक महेश मेटे यांना दिली तसेच वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वर हरिण व काळवीट अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्यातही याच मुळुकवाडी शिवारात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले होते. मात्र यावेळी काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सावधानतेचे फलक लावावेत व वाहनचालकांना व...

बंद पडलेले बोर तात्काळ सुरू; प्रभागातील नागरिकांकडून मागणी होताच नगरसेविका मीरा नागरगोजे घेतली तात्काळ दाखल

Image
परळी (प्रतिनिधी ) – परळी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काही नविन व दीर्घकाळापासून बंद पडलेले बोरवेल तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने प्रभाग चार मधील स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मीरा केशव नागरगोजे यांनी नागरिकांच्या मागणीकडे तत्परतेने लक्ष देत आवश्यक कामे हाती घेतली. पाणीपुरवठा सभापती सौ.जयश्रीताई पापा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील मूलभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम, रस्त्यावरील दिवाबत्ती, नाल्यांची साफसफाई यासह नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवरही तत्काळ उपाययोजना करण्यात आली.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, धनगर गल्ली, उखळवेस गल्ली, गवंडी गल्ली तसेच भीमनगर परिसरातील बंद पडलेले बोरवेल दुरुस्त करून त्यावर पाईपलाईन व नळ वाल बसवण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुन्हा नियमित पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. नगरसेविका सौ. मीरा केशवराव नागरगोजे यांच्या पुढाकारामुळे प्रभागातील पाण्याची समस्या मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून भविष्यातही प्...

मानेवाडी येथे महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन उत्साहात साजरा

Image
(चौसाळा प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील मानेवाडी येथे महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रम हा राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने मानेवाडी येथे भव्य भाषण स्पर्धा व बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी  मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वीतरणाचे वाटप ही झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सरलाताई कामराज मुळे पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली व आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.सदरील कार्यक्रमाचे  प्रस्तावित/सूत्रसंचालन दिगंबर तात्या आवारे यांनी केले.या भाषण स्पर्धेत  दिव्या बा.आवारे, कोमल म.मोरे, दूर्वा दी.गाडगे, काव्य वि.मोरे,यांनी प्रथम,द्वितीय,तृतीय,चौथा क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरलाताई मुळे पाटील , मुक्ताताई शिंदे, राणी ता.गाडवे, duche मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले या स्पर्धेत माँ साहेब जिजाऊ,सावित्रीबाई फुले,छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर  आपले विचार व्यक्त केले व अनेक...

आय एम विनर राज्यस्तरीय २०२६ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

Image
आय एम विनर राज्यस्तरीय २०२६ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर  धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा    आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत कु.आर्या काळे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर-कु.अनन्या लोहार तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक--   सर्व स्तरातून या विद्यार्थिनींचे कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव--    आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ):     आय एम विनर राज्यस्तरीय २०२६ स्पर्धा परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती . राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते . या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून या मध्ये आष्टी (जिल्हा बीड) तालुक्यातील मौजे धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु.आर्या प्रवीण काळे हिने यश संपादन करीत बीड जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला तर , कु.अनन्या महेश लोहार या विद्यार्थिनीने आष्टी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.     या यशस्वी विद्यार्थिनींनी यश संपादन करुन धानोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच नाव उंचावून शाळेच्या ...

६ महिने उलटूनही चार्जशीट नाही; न्यायासाठी आईचा आक्रोश, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

Image
बीड (प्रतिनिधी ) – परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्रीनाथ गोविंद गित्ते या तरुणाने संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून २२ ऑगस्ट २०२५ रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही तब्बल सहा महिने उलटून गेले तरी संबंधित आरोपींविरुद्ध अद्याप चार्जशीट दाखल करण्यात आलेली नसल्याने मृत तरुणाची आई सुनिता गोविंद गित्ते यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणी आरोपी म्हणून उध्दव माणिक कराड व संजय परसुराम राठोड या संस्थाचालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच या संदर्भात २४ ऑगस्ट व २९ ऑगस्ट २०२५ रोजी विविध संघटनांकडून तसेच स्वतःकडूनही तक्रार अर्ज देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतरही तपासाची प्रक्रिया पूर्ण होऊन चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. सुनिता गित्ते यांनी सांगितले की, त्या सध्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्या कुटुंबात कर्ता पुरुष कोणीच उरलेला नाही. संबंधित संस्थाचालकांनी शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा भ्...