Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाली बिंदुसरा धरणात पाच तास जलसमाधी आंदोलन

Image
📰 प्रेस नोट    ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी पांडुरंग आंधळे यांचे उपोषण १४ व्या दिवशी; प्रशासन अद्याप उदासीन   बीड (प्रतिनिधी ) – ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार श्री. पांडुरंग वामनराव आंधळे हे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून व ऊसतोड कामगार श्री पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री.बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना) यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.   प्रमुख मागण्या: ऊस तोडणी व भरणी दर ₹500 प्रति टन करण्यात यावा व वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी ऊसतोड भरणी व वाहतुकीचा करार दरवर्षी करण्यात यावा ऊस तोडणीदरम्यान प्रसूती झाल्यास माता भगिनींना ₹25,000 प्रसूती भत्ता देण्यात यावा ऊसतोड ...

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

Image
जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग बीड, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत तालुकास्तरीय परीक्षा सोमवार, दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उत्साहात पार पडली. तालुका बीडसाठी तुलसी संगणक महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. यावेळी आयु. मनोज वाघमारे, आयु. सुमेध जोगदंड, अशोक ठोकळ, तानाजी शिनगारे, अभिजीत जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. प्रकाश ढोकणे यांनी केले. या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे तसेच चिकित्सक अभ्यासाची वृत्ती विकसित करणे हा या स्पर्धेचा ...

के के वाघ विद्याभवनात हनुमान जन्मोत्सव उत्साहात.

Image
 निफाड.ता-२यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक :-.के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथील 'क्रीडा विभागातर्फे' प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी समन्वयक यशवंत ढगे उपमुख्यध्यापिका सुनीता वडघुले,पर्यवेक्षक डि.के मोरे,ज्युनि.कॉलेज प्रमुख बस्तीराम रानडे,जेष्ठ शिक्षक आर.डी. गांगुर्डे,प्रवीण रणदिवे,बाजीराव वाघ,राजेंद्र उगले,मनोज तुसे,संदीप खिस्ते,संजय धनगर,निलेश पाटील,राकेश तोरवणे,अनिल शिंगणकर,अमोल वाघमारे,क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर, शीतल साळी,कांचन सोनार,गायत्री आंबेकर,शारदा पेलमहाले,अश्विनी जावळे, किरण कदम,उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य दिवाकर शेजवळ यांनी रामभक्त हनुमान हे शक्ती आणि बुद्धीची देवता मानले जातात त्यामुळे मारुतीरायाची आराधना करून बळ आणि विद्या मिळवण्यासाठी विद्यार्थी खेळाडू व्यायामाद्वारे व शैक्षणिक पुस्तके वाचून विद्यार्जन करतात.तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेदरम्यान,व्यायाम शाळांमध्ये हनुमानाची सर्वत्र पूजा केली जाते असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी समन्वयक श्री यशवंत ढ...

पाटोदा बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर तोडा;- नगरसेवक संतोष जाधव यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे मोठ्या वाहनांना अडचणी निर्माण होत असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित डिव्हायडर तात्काळ तोडण्याची मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे तसेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीकडे येणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू गाड्यांना वळण घेताना किंवा थांबताना पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, ही वाहने मुख्य रस्त्यावरच उभी राहतात आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. विशेषतः सकाळी व दुपारच्या वेळेत ट्रॅफिकची समस्या अधिक तीव्र होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे

पाटोदा शहरात दहावीपर्यंत एकही जिल्हा परिषद शाळा नाही हे पाटोद्याचे भाग्य की दुर्भाग्य?

पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकही जिल्हा परिषद शाळा उपलब्ध नसल्याची बाब समोर येत असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा ही सर्वसामान्य कुटुंबांसाठी शिक्षणाचा आधारस्तंभ मानली जाते. मात्र पाटोदा शहरातच अशी सुविधा नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. शहरातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त भार पडत आहे. अनेक पालकांनी शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पाटोदा शहरात दहावीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, शहरातच शासकीय शिक्षणाची सोय नसणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा भाग असल्याची भावना व्यक्त होत आहे. काही जणांच्या मते, खासगी शिक्षण संस्थांना चालना मिळत असल्यामुळे शासन जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष करत आहे,असा सवालही उपस्थित केला जात आहे.पाटोदा शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर शिक्षण क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता ...

परमपूज्य गुरुवीरूपाक्ष शिवाचार्य महाराजांच्या शुभहस्ते मानूर येथे डॉ. जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लीनिक चे उदघाटन संपन्न

Image
बीड प्रतिनिधी :- दिनांक 31 मार्च 2026 रोजी मौजे मानूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी श्री. ष.ब्र. 108 गुरुविरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या शुभहस्ते डॉक्टर जितीन वंजारे यांच्या संजीवनी क्लिनिक चे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले.मानूर या ऐतिहासिक नगरीत आणि पुरातन बाजारपेठ असूनही येथे रुग्णाचे हाल होतात येथे दर्जेदार एमेरजन्शी वैद्यकीय सेवा मिळत नसल्या कारणाने गावाकऱ्यांच्या सहकार्याने डॉ जितीन वंजारे यांनी येथे सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 31 मार्च रोजी सर्वांच्या उपस्थिती त संजीवनी क्लिनिक चा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मानूर नगरीचे जेष्ठ नेते दशरथरावजी वणवे दादा माजी जी प सदस्य यांनी लागेल ते सहकार्य करू, वैद्यकीय सेवा चांगली पुरवा, जास्तीत जास्त वेळ देता येईल हे प्रयत्न करा आणि गावाकऱ्यांची सेवा करा असे आपल्या भाषणात बोलले यानंतर जी प सदस्य रामदास नाना बडे यांनी आपल्या भाषणात डॉ जितीन वंजारे यांना शुभेच्छा दिल्या आणि मानूर नगरीत डॉक्टर ची नितांत गरज आहे, वाटेल ते सहकार्य करू, किफायतशीर दरात योग्य सेवा द्या असे बोलून शु...

हायटेक सिग्नल की हायटेक भ्रष्टाचार ? सुरू होण्यापूर्वीच कोसळले ! बीडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड (दि.०२) : शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या गाजावाज्यात बसविण्यात आलेले ६४ लाख रुपये खर्चाचे हायटेक सिग्नल सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका परिसर आणि शिवराज पान सेंटर चौक या चार ठिकाणी प्रत्येकी १६ लाख रुपये खर्चून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र नगर नाका परिसरातील सिग्नल अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले सिग्नल देखभाल अभावी निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल तरी टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. डॉ. ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आ...