Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन

Image
पाटोदा येथील विठ्ठलनगरमध्ये 'भव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा' सोहळ्याचे आयोजन ​पाटोदा (प्रतिनिधी ) :पाटोदा तालुक्यातील विठ्ठलनगर (भाकरे वस्ती) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने अधिकमास तपपूर्ती सोहळ्यानिमित्त "भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सव व देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा" याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ मे २०२६ ते ३१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. ​ह.भ.प. सुखनिवासवासी गु.श्री. बँकठस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सौ. सुनंदाताई सतिश म. उरणकर यांच्या संयोजनाखाली हा धार्मिक महोत्सव होत आहे. या सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प. संगीताताई सोळसकर करत आहेत. ​ ​सप्ताहभरात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते १० तुलसी अर्चन, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन प्रसाद, दुपारी १ ते ४ या वेळेत सुप्रसिद्ध कथाप्रवक्त्या ह.भ.प. अंजलीताई दिघे (आळंदी) यांच्या सुश्राव्य वाणीतून 'देवी भागवत कथा' पार पडणार आहे. तसेच सायंकाळी ४.३० ते ६ हरिपाठ, ७ ते ९ भव्य कीर्तन, ९ ते १० भोजन प्रसाद आणि रात्री १० ते १२ संगीत भ...

जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित

Image
जिल्ह्यात १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश निश्चित बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव  बीड (प्रतिनिधी ) आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत व्यवस्था करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत १ हजार ८८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितकरण्यात आले असून .प्रवेश घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतरही ४५९ जागा रिक्त राहिल्या आहेत नव्या सुचनेनुसार २९ मे पर्यंत या रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे. नियमित प्रवेशात २५ टक्के जागा आरटीई कायद्यातंर्गत राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत २१४ शाळांमध्ये २ हजार ४२५ जागा आरक्षित आहेत. यात पहिल्या टप्प्यात २ हजार ३६० विद्यार्थ्यांची निवड झाली होती . त्यातील १ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून बीड जिल्ह्यात सद्यस्थितीत ४५९ जागांसाठी प्रतीक्षा यादीतील वि...

पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला?

“पाटोद्यातील न झालेल्या कामाचे श्रेय द्यायचे तरी कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही प्रतीक्षेत, मांजरा नदीवरील पुलाचे काम दहा वर्षांपासून रखडलेले, शहराला फिल्टरयुक्त शुद्ध पाणीपुरवठाही अद्याप नाही!” पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा रंगतात, मात्र प्रत्यक्षात शहरातील मूलभूत प्रश्न आजही जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. विविध स्तरावर बैठका, आश्वासने आणि राजकीय भाषणे झाली, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत पुतळा उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्याचप्रमाणे शहरातील मांजरा नदीवरील पुलाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तब्बल दहा वर्षांपासून पुलाच्या कामाबाबत चर्चा, आश्वासने आणि निधीच्या घोषणा होत आहेत, परंतु आजही पुलाचे काम रखडलेलेच ...

येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान

Image
येवता परीसरात वादळी पाऊसाने आंबा पिकांचे तुकसान येवता: आप्पाराव सारूक दि.२४ रोजी केज तालुक्यातील येवता परिसरात जीवाची वाडी वाद्यळ वारास पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दि. 23 शनिवारी सायंकाळी ५वा. दरम्यान पावसाने अचानक हजरी लावल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी शासनाकडे मदतीची प्रतीक्षा करत आहेत.

जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर

Image
जीवे मारण्याच्या आरोपातून तीन आरोपीची नियमित जामीन मंजूर  सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी    गेवराई दिनांक 11 / 5 / 2026 रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब बीड यांनी आरोपी 1 ) संदीप प्रधान 2 ) रोहित प्रधान 3 ) तेजस प्रधान राहणार धोंडराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांचे विरुद्ध भा . न्या . स . चे कलम 109 (1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3) 351(2). च्या आरोपातून नियमित जामीन मंजूर केली आहे   याबाबत सविस्तर हकीगत अशी की दि . 24 /3 / 2026 रोजी सायंकाळी 6 = 00 वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपीने सदर प्रकरणातील फिर्यादीस म्हणाले की तू आम्हाला इंस्टाग्राम च्या ग्रुप वर आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणून मारहाण केली सदर महाराणीच फिर्यादीचे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने फिर्यादी हा काकू नाना हॉस्पिटल बीड येथे ऍडमिट झाला व चार दिवसांनी फिर्याद दाखल केली सदर घटनेवरून गेवराई पोलीस स्टेशन मध्ये आरोपीने विरोधात भा . न्या . स . चे कलम 109(1) 118 (1) 189 (2) 190 191 (2) 191 (3)351 (2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला व आरोपी यांचे वतीने नियमित ज...

नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ

Image
नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघातात वाढ. नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रोल पंप पर्यंत सरर्वीस रोड तात्काळ करण्यात यावा अन्यथा अंदोलन करु :- पप्पु गायकवाड गेवराई प्रतिनिधी दि. २२ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गेवराई शहराच्या बाहेरून जाणारा झमझम पेट्रोल पंप ते नायरा पेट्रोल पंप चौक या ठिकाणी उड्डाण पुलाचे कामे चालू आहेत मात्र ती कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे एका साईडचा रस्ता बंद करून दुसऱ्या साईटचा रस्ता सुरू असून त्या रस्त्यावरून दोन्ही साईटचे वाहने येजा करत असल्या मुळे तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांतून सतत वाळू सांडत असल्यामुळे व सिग्नल कमकुवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढली असून मागील दोन महिन्यात १४ ते २० अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  एकाच साईडने दोन्ही साईटचे वाहने ये जा करत असल्यामुळे रुग्णवाहिकेला देखील खूप त्रास होत आहे तसेच रुग्णवाहिकेला रुग्ण नेताना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रुग्णांचे देखील प्राण गमावले आहेत.   नायरा पेट्रोल पंप ते जमजम पेट्रो...

मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप चौकशी करण्याची भाजपाचे माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडितांची मागणी

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी  गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाचे झालेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैर यावर व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सकल चौकशीची मागणी केली आहे याबाबत माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन दिले आहे निवेदनामध्ये म्हटले आहे की वंजारवाडी गावातील अनेक कामे हेमेट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच काही कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखविण्याचा दावा करण्यात आला आहे निवेदनानुसार चिरखा वस्तीतील सिमेंट रस्ता मारुती मंदिर ते येवले यांच्या घराकडे जाणारा रस्ता वंजारवाडी येथे यादव यांच्या शेताकडे जाणारा रस्ता तसेच वंजारवाडी ते रांजणी शिव रस्ता पवार यांच्या शेताकडे ही कामे बोगस दाखवून लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार करण्यात आला आहे असा आरोप करून तसेच खालील कामे पुस्तकी मोजमाप करून झा...