Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने

Image
डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; प्रशासनाची पोलखोल करणाऱ्या संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शने सरकारच्या दबावाखाली कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. ४) पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मानवी आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत. डीजेच्या वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालून त्यावर कठोर निर्बंध आणावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान विद्यानंद बापट यांना संतोष चव्हाण नामक व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचा दावा आंदोलनकर्त्य...

जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद

Image
जरांगे पाटलांच्या समर्थनात पाटोदा कडकडीत बंद सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा; मराठा आरक्षणाच्या मागणीला शहरातून जोरदार समर्थन पाटोदा (प्रतिनिधी ) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज पाटोदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक तसेच विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. सकाळपासूनच पाटोदा शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विविध भागांमध्ये बंदचा परिणाम जाणवला. नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवर तुलनेने शांतता दिसून आली. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सर्वधर्मीय व विविध समाजघटक एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.बंददरम्यान आंदोलनकर्त्यांकडून शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.पाटोद्यातील या बंदला व्यापारी वर्गासह नागरिकांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. एकजुटीने दिलेला हा बंदचा संदेश शासनापर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा प...

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात मिळणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने असते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं - बाजीराव ढाकणे

Image
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात मिळणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने असते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं - बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी . :-   महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात आज बीड येथे जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ संजय तांदळे,प्राचार्य डी जी तांदळे, महा एनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांची उपस्थिती होती. स्मार्ट कार्ड च्या सक्तीमुळे आता नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात देण्यात येणारी सवलत ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने दिली जाते. त्यामुळे “कार्ड नाही, तर सवलत नाही” हे बरं नव्हं  “स्मार्ट कार्ड हा प्रवाशांसाठी पर्याय असावा; पात्र नागरिकांच्या सवलतीवर लादलेली सक्तीची अट नसावी.” कार्ड हरवले, खराब झाले, रिचार्ज झ...

‘स्मार्ट’ सरकारचे धोरण, पण जनतेच्या अडचणी मात्र ‘डबल

Image
‘स्मार्ट’ सरकारचे धोरण, पण जनतेच्या अडचणी मात्र ‘डबल’! स्मार्ट कार्ड नसल्यामुळे बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत नाकारण योग्य नाही  एसटी सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त बोजा; बाजीराव ढाकणे यांचा सरकारला थेट सवाल बीड प्रतिनिधी :-  “सरकार जनतेची सेवा करण्यासाठी आहे की जनतेला कागदपत्रे, कार्ड, रांगा आणि शुल्काच्या जंजाळात अडकवण्यासाठी?” असा संतप्त सवाल महा एनजीओ फेडरेशनचे बीड जिल्हा समन्वयक श्री. बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी उपस्थित केला आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात आता नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, शासनाने तातडीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. एसटी महामंडळाची बससेवा ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. गावखेड्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी एसटीचा प्रवास हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अशा नागरिकांना त्यांच्या हक्काच्...

पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक

Image
पावसासाठी महासांगवीतील महिलांचे देवाला साकडे; देवाला पाणी घालून वरुणराजाला बरसण्याची आर्त हाक पाटोदा (प्रतिनिधी )पावसाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून शेतात उभी केलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून बळीराजाची चिंता वाढली आहे.पावसासाठी आसुसलेल्या महासांगवी गावातील महिलांनी अनोख्या पद्धतीने देवाला साकडे घातले. महिलांनी एकत्र येऊन देवाची पूजा केली आणि देवाला पाणी घालून वरुणराजाने लवकर बरसावे, अशी आर्त प्रार्थना केली. पाऊस पडावा, शिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.एकीकडे आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आणि दुसरीकडे पावसाअभावी कोमेजत चाललेली पिके, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी, बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक उभे केले; मात्र आता पावसाने साथ सोडल्याने त्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.“देवा, वरुणराजाला बरसण्याची बुद्धी दे; आमच्या शेतकऱ्यांची पि...

लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Image
लिंबागणेश येथे आठवडी बाजारासह कडकडीत बंद; मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा  छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने  : डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि. ३ )मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दि. २९ ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे दुकानदार व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंबागणेशकरांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे” " मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणा देत निदर्शने करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी स...

मायक्रो फायनान्स कडून होणाऱ्या अत्याचार प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Image
गेवराई - दि. 01 सप्टेंबर 2026 रोजी गेवराई तालुक्यातील एकल महिला, ऊसतोड कामगार व शेतमजूर महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध व उच्च व्याजदर व जबरदस्तीच्या वसुलीविरुद्ध जिल्हाधिकारी बीड, आणि प्रबंधक अग्रणी बँक बीड यांना निवेदन दाखल केले आहे.       "मायक्रो फायनान्स अत्याचार निवारण समिती, गेवराई" या संघटनेने विविध सामाजिक संस्था, कामगार युनियन व महिला बचत गटांच्या सहभागाने हा लढा सुरू केला आहे.      कर्जग्रस्त महिलांना सुरुवातीला 18%–24% व्याज सांगितले असले तरी प्रत्यक्षात 30%–40% पर्यंत व्याज आकारले जाते, जे RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार 26% पेक्षा जास्त आहे. अनेक महिलांवर एकाच वेळी 2–3 किंवा त्याहून अधिक मायक्रो फायनान्स कर्ज असल्यामुळे नव्याने कर्ज घेवून जुने कर्ज बंद करावे लागत आहे आणि कर्जविळखा तयार होतो. मायक्रो फायनान्स ने दिलेल्या कर्जाच्या वसुलीकरता धमक्या, शिवीगाळ, रात्री वेळच्या वसुलीचे प्रकार आणि काही प्रकरणांमध्ये शारीरिक व मानसिक छळ होत आहेत अशा अनेक तक्रारी समितीकडे आल्या आहेत. कर्जफेडीचा ताण कौटुंबिक कलह, व्यसनवृत्ती ...