Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांना निवेदन सादर

Image
बीड दि.१५ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड, तर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे यांनी कंत्राटी कामगारांना किमान वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत याकरिता 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. चौथ्या दिवशी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर लक्ष वेधून तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.     त्या वर त्यांनी घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना लवकरच किमान वेतन व सोई सुविधाचा लाभ मिळेल तर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचा विषय पहिल्यांदा माझ्या समोर आला आहे. याची माहिती घेऊन तेथील वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.         जर दिनांक:- 20/08/2026 पर्यंत न्याय मिळवून दिला नाही तर ...

४ हजार पावले माती पाण्यासाठी,२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’

Image
४ हजार पावले माती पाण्यासाठी,२१ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘महा वॉकेथॉन’ मुंबई, दि. १९ : “एक पाऊल तुमचे, एक थेंब भविष्यासाठी!” या संदेशासह महाराष्ट्र आता पाण्यासाठी चालणार आहे. २१ ऑगस्टला ३ किलोमीटर म्हणजेच सुमारे ४ हजार पावले जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी टाकली जाणार असून, महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून राज्यभर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही केवळ तीन किलोमीटरची चाल नसून, महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी उचललेली चार हजार पावले ठरणार आहेत. मुंबईतील या मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. राज्यभरातही जिल्हानिहाय वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी नागरिकांना ३ किलोमीटरचे अंतर चालायचे आहे. साधारणपणे ३ किलोमीट...

बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात

Image
बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात  पीडित महिलेच्या जीविताशी खेळणाऱ्या डॉक्टर व ऑपरेशन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या सर्वाना सेवेतून कायम स्वरूपी बडतर्फ करण्याची किशन तांगडे यांची मागणी. बीड : बीड येथील जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या अत्यंत बेजबाबदार आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका तरुण महिलेच्या पोटात वैद्यकीय हँडग्लोव्हज (Hand gloves) विसरल्याची धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे पीडित महिला सौ. संध्या सूरज गायकवाड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून, याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रिपाई बीड अध्यक्ष किशन तांगडे यांनी केली आहे. पीडित महिला संध्या गायकवाड यांना दि. ०१/०८/२०२६ रोजी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ड्युटीवर असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अत्...

15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे

Image
15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे  शासकीय शिष्टाचारात स्वतंत्र जीआर जारी करण्याची ऑल इंडिया पँथर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीड : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये अधिकृत शासकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, संविधानाने देशाला लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये दिली आहेत. त्यामुळे संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था तसेच काही शासकीय कार्यालयांमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवा...

परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते

Image
परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा तात्काळ बदल करण्यात यावा, अशी मागणी मलकापूर येथील भागवत रामकिशन गित्ते यांनी उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ यांच्याकडे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी अर्जाद्वारे केली आहे. अर्जात नमूद केल्यानुसार, परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा कार्यभार तलाठी प्रतीक्षा बसापुरे या मागील सुमारे दोन वर्षांपासून सांभाळत आहेत. मात्र, या कालावधीत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची कामे अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. तलाठी सज्जाचा कारभार त्यांच्या हाताखालील व्यक्तींच्या माध्यमातून चालविला जात असल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे. तसेच, परळी ग्रामीण परिसरातील रस्त्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये इतर व्यक्तींकडून पंचनामे तयार करून घेण्यात आले असून, काही नोंदी चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, तलाठी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी त्यांच्या हाताखालील व्यक्तींकडून मनमानी पद्धतीने पैशांची मागणी केली जात ...

आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

Image
भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष! आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक पाटोदा (प्रतिनिधी ) : आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात आल्याचा दावा असतानाही नळाला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. “भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल, तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली. या पाणीप्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे. पावसाळ्यातही हंडे डोक्यावर; वहालीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल!

महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे

Image
महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे  बीड येथे ग्रामसाधन व्यक्तींच्या मागण्यांसाठी रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांना निवेदन बीड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित सेवेत सामावून घेत शासकीय स्तरावर योग्य स्वरूप देण्यात यावे, अशी मागणी बीड येथे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात १३ ऑगस्ट २०२६ रोजी रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांना बीड येथे निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाजीराव नवनाथ ढाकणे,गणेश शंकर काळे, रज्जाक शेख व संजय बांगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या २०२३ च्या पदभरती जाहिरातीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक ...