Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

मुधापुरी येथील मंदिरासाठी डॉ. शिवाजी दिवान यांच्याकडून इनव्हर्टर भेट

Image
​गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील मुधापुरी येथील मंदिरामध्ये विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉ. शिवाजी गोविंदराव दिवान यांच्यातर्फे इनव्हर्टर भेट देण्यात आला आहे. डॉ. दिवान यांच्या या दातृत्वामुळे मंदिरातील दैनंदिन पूजा आणि भजनाच्या कार्यक्रमांमधील विजेचा खोळंबा दूर होणार आहे. ​मंदिर परिसरात आयोजित एका छोट्या कार्यक्रमादरम्यान हा इनव्हर्टर सुपूर्द करण्यात आला. गावातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नेहमीच मदत करण्याची डॉ. दिवान यांची भावना कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ​याप्रसंगी मुधापुरी येथील भजनी मंडळ, स्थानिक ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिवाजी दिवान यांच्या या सामाजिक आणि धार्मिक कार्याबद्दल मुधापुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या:-डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Image
बीड मतदारसंघातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी द्या डॉ.योगेश क्षीरसागर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी; क्रीडांगणास जमीन देण्याची मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.२५ : तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालयांना स्वतंत्र व हक्काची इमारत नसल्यामुळे नागरिकांना महसुली कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बीड परिसरातील मंडळ अधिकारी कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकाम आणि दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी, आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणास आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे मंगळवारी (दि.२५) राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली. यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्यासह भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, शुभम कातांगळे उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले की, बीड तालुक्यातील अनेक महसूल मंडळ कार्यालयांचे कामकाज सध्या इतर तात्पुरत्या जागांमध्ये सुरू आहे. स्वतंत्र व सुसज्ज इमारतींअभावी शेतकरी, नागरिक आ...

अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा

Image
अजित पवार संशयास्पद मृत्यू प्रकरणात एफआयआर का नाही? अभिजीत दिपके यांच्यावर मात्र तत्काळ गुन्हा; डॉ. जितीन वंजारे यांचा सरकारवर निशाणा बीड | प्रतिनिधी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीन वंजारे यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार टीका केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात काम करणारे अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. “महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का?” असा सवाल उपस्थित करत डॉ. वंजारे यांनी राज्यातील खून, लूटमार, चोरी, अवैध धंदे, वाळू तस्करी, भ्रष्टाचार, निकृष्ट रस्ते, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील मृत्यूबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात संशय व्यक्त केला जात असताना एफआयआरबाबत तत्परता दिसत नाही; मात्र शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिजीत दिपके यांच...

बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली काय? ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याचा प्रकार

Image
बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारण्याची सुपारी घेतली काय? ऑक्सिजन ह्युमिडिफायरमधील गढूळ पाण्याचा प्रकार रुग्णाला ऑक्सिजन देताना ह्युमिडिफायरमधील पाणी गढूळ आढळले; पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तक्रार : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २५) बीड जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार संपण्याचे नाव घेत नसून, रुग्णांच्या उपचारातील हलगर्जीपणाच्या तक्रारींमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी वडवणी येथील संध्या सूरज पवार प्रसूतीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य शरीरात राहिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संसर्ग झाल्याने आतडे तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, बीड जिल्हा रुग्णालयातील सेमी आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी खाली आणण्यात येत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजन मास्क लावून नेण्यात आले. मात्र, रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा ...

आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी: प्राचार्य साईनाथ माळे

Image
आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कासाठी तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी : प्राचार्य साईनाथ माळे बीड | प्रतिनिधी : आदिवासी तरुणांनी आपल्या हक्कांसाठी आद्य क्रांतिवीर तंट्या नाईक यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य साईनाथ माळे यांनी केले. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वीर एकलव्य अधिकारी/कर्मचारी संघटना, बीड आणि बालाघाटचा एकलव्य प्रतिष्ठान, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे आदिवासी समाजबांधव, पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात अमरावती येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर महामानवांना मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार आदिवासी नृत्याने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी PS...

घरकुल गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राजेभाऊ गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू

Image
धारूर : प्रतिनिधी — धारूर पंचायत समिती अंतर्गत तेलगाव सर्कलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकामांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुका सचिव राजेभाऊ नारायण गायकवाड यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल बांधकामातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ८ जून रोजी तक्रार निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड यांनी ३ जुलै रोजी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र, निर्देशानंतरही चौकशी व पंचनाम्याची ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी १० ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने अखेर आज, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती धारूर कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक मा...

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

Image
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी बीड (प्रतिनिधी ) बीड तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, उडीद आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने अपुऱ्या पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रेय भरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अपुऱ्या पावसामुळे फुलोऱ्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाचे तसेच बोंड अवस्थेतील कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. अपुरे सिंचन व कमी पर्जन्यवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाअभावी नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची महसूल यंत्रणेमार्फत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात ...