Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरअडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत

Image
बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत बीड न.प.च्या भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.१ : आगामी गणेशोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात नगरपरिषदेने तातडीने २५०० नवीन पथदिवे खरेदी करावेत आणि गणेशोत्सव मंडळे असलेल्या प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये हे पथदिवे तातडीने बसवून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे मंगळवारी (दि.१) केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून सध्या अनेक प्रमुख रस्ते व कॉलनी भागातील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांना व विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरात ज्या खांबांवर दिवे बंद आहेत ते त्वरित सुरू करणे आणि ज्या ठिकाणी अद्याप दिवेच नाहीत, अशा ठिकाणी सुमारे ५ हजार नवीन पथदिव्यांची गरज आहे. लवकरच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ...

परळी विधानसभा मतदारसंघात प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ४०,२६० मतदारांची नावे वगळली

परळी विधानसभा मतदारसंघात प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ४०,२६० मतदारांची नावे वगळली ​ परळी: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २३३ परळी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे (SIR) मतदारसंघातील मतदार संख्येत आणि मतदान केंद्रांमध्ये मोठा बदल झाला आहे. ​ एकूण ४०,२६० मतदार कमी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी परळी मतदारसंघात ३,२७,३४४ मतदार होते. पुनरीक्षणादरम्यान खालील कारणांमुळे एकूण ४०,२६० मतदार कमी झाले असून सध्या प्रारूप यादीनुसार मतदार संख्या २,८७,१०१ इतकी झाली आहे: ​ मयत व्यक्ती: ८,०८३ ​ कायमस्वरूपी स्थलांतरित: २१,१७२ ​ दुबार मतदार: ५,१३३ ​ अनुपस्थित मतदार: ५,७८९ ​ इतर: ८३ ​ मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्वी मतदारसंघात एकूण ३६३ मतदान केंद्रे होती. सुसूत्रीकरणाअंतर्गत क्रमांक २९, १२९, १३१, १३७, १३८, १४८, १५५, १७५, १८८, ३५१ आणि ३५९ ही ११ केंद्रे कमी करण्यात आली आहेत. तसेच २३३ मतदान केंद्रामध्ये १ नवीन केंद्र तयार करण्यात आले असून, आता मतदारसंघात एकूण ३५३ मतदान केंद्रे झाली आहेत. ​ दावे, हरकती ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा

Image
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करा भांडवलदारधार्जिण्या सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीडमध्ये सात महिन्यांत १२३ शेतकरी आत्महत्या — डॉ. गणेश ढवळे बीड : (दि.१ ) बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, १ जानेवारी ते ३१ जुलै २०२६ या सात महिन्यांत १२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. सततची नापिकी, ओला व कोरडा दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना विविध जाचक नियम व अटी लावल्या जातात; मात्र मोठ्या उद्योगपतींच्या कर्जप्रकरणांमध्ये सवलती दिल्या जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांसाठीही कर्जमाफीचे स्वतंत्र धोरण लागू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली. उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या कर्जप्रकरणातील कथित सेटलमेंटचा दाखला देत, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी ‘सुभाष चंद्रा कर्जमाफी मॉडेल’ लागू करावे, अशी म...

लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ

Image
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ  पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; पंचक्रोशीतील महानुभाव भाविकांची उपस्थिती लिंबागणेश : (दि.२९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या (दशम स्कंध) सोहळ्यास आज शनिवार, दि. २९ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. धार्मिक विधीनुसार श्रीदत्तात्रेय व लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यात आली. यावेळी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. धूप, दीप, फुले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती व प्रवचन, तर रात्री संगीतमय भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड येथील भागवताचार्य प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्र...

कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला

Image
कोमलवाडीच्या सुनेने कर्तृत्वाचा झेंडा गोंदिया जिल्ह्यात फडकवला! भाग्यश्री धनवडे यांची जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील कोमलवाडी गावचे सुपुत्र श्री. शंकर सूर्यकांत धनवडे यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री शंकर धनवडे यांची गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे धनवडे कुटुंबीयांसह संपूर्ण कोमलवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातून आलेल्या सौ. भाग्यश्री धनवडे यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षण क्षेत्रात शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले असून, आता गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्या पार पाडणार आहेत. शिक्षक म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर भावी पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी. ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी सौ. भाग्यश्री धनवडे यांना मिळाल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीमुळे कु...

बीड जिल्हामध्ये पावसाने ओढ दिली; शेतकरी संकटात

Image
बीड जिल्हामध्ये पावसाने ओढ दिली; शेतकरी संकटात! नद्या-नाले, तलाव, बंधारे कोरडे; खरीप पिके करपली, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर “सरकारने पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता हेक्टरी एक लाखांची मदत द्यावी” — बाजीराव ढाकणे बीड प्रतिनिधी :-  पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले, तरी बीड जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने ग्रामीण भागावर गंभीर संकट ओढवले आहे. नदी, नाले, ओढे, तलाव आणि बंधारे कोरडे पडले असून अनेक गावांतील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही चिंताजनक झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे असे महा एनजिओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. एकीकडे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा मात्र अद्याप अपेक्षित गांभीर्याने मैदानात उतरलेली दिसत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पेरणी केली; मात्र पाऊस नाही खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी के...

महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला!अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद

Image
महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला! अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद! कुरियरमधून नंबर मिळवून छळ केल्याची घटना; नंबर कुठून मिळाला? पोलिसांसमोर मोठा सवाल! संबंधितांचा तातडीने शोध घेण्याची मागणी पाटोदा | प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारी गंभीर घटना पाटोद्यात घडली असून, एका महिलेला रात्री अश्लील भाषेत मेसेज करून तिचा छळ करण्यात आला. या संतापजनक घटनेने पाटोदा शहर हादरले असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. घटनेच्या निषेधार्थ पाटोदा शहर बंद ठेवण्यात आले. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी एका महिलेला रात्री अश्लील स्वरूपाचे मेसेज करण्यात आले. संबंधित महिलेचा मोबाईल नंबर पार्सल अथवा कुरियर सेवेतून मिळवून त्याचा गैरवापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महिलेचा नंबर नेमका कुठून मिळाला? तो कोणाकडून मिळाला? आणि तिच्यापर्यंत पोहोचलेल्या या वैयक्तिक माहितीचा गैरवापर कोणी केला? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. महिलांचा मोबाईल नंबर खासगी की कुणाच्याही वापरासाठी? ग्राहकांचा मोबाईल नंबर हा वैयक्तिक माहि...