Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

घरकुल गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राजेभाऊ गायकवाड यांचे आमरण उपोषण सुरू

Image
धारूर : प्रतिनिधी — धारूर पंचायत समिती अंतर्गत तेलगाव सर्कलमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत झालेल्या घरकुल बांधकामांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे धारूर तालुका सचिव राजेभाऊ नारायण गायकवाड यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल बांधकामातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ८ जून रोजी तक्रार निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड यांनी ३ जुलै रोजी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र, निर्देशानंतरही चौकशी व पंचनाम्याची ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी १० ऑगस्ट रोजी स्मरणपत्र दिले. त्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने अखेर आज, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समिती धारूर कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून संबंधित कागदपत्रे मिळविण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक मा...

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी

Image
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शिवसंग्रामची मागणी बीड (प्रतिनिधी ) बीड तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, उडीद आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने अपुऱ्या पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रेय भरणे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अपुऱ्या पावसामुळे फुलोऱ्यात येणाऱ्या सोयाबीन पिकाचे तसेच बोंड अवस्थेतील कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. अपुरे सिंचन व कमी पर्जन्यवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून, या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाअभावी नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची महसूल यंत्रणेमार्फत तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात ...

प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा

Image
प्रसूतीदरम्यानच्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करा!  छाया पांचाळ, शेख मुस्कान व संध्या गायकवाड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या निलंबनाची मागणी; जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन बीड : (दि. २४) बीड जिल्हा रुग्णालयातील माता व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या उपचारादरम्यान कथित हलगर्जीपणाच्या घटना समोर येत असल्याचा आरोप करत, संबंधित प्रकरणातील दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली. या मागणीसाठी सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करण्यात आली. छाया गणेश पांचाळ व शेख मुस्कान यांच्या प्रसूतीदरम्यान मृत्यूच्या घटनांसह वडवणी येथील १९ वर्षीय संध्या सुरज गायकवाड यांच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या कथित गुंतागुंतीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संध्या गायकवाड यांच्या पोटात शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय साहित्य राह...

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे

Image
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : नितीन सोनवणे अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे. या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे. या दुर्घटनेबाबत बोलताना सोनवणे म्हणाले की, रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहणे गंभीर बाब आहे. आगीत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला असून, या घटनेमागे निष्काळजीपणा किंवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या सचिवांनी तातडीने अमरावती येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, तसेच संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी...

शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन!

Image
शाळांमधील व्हिडिओ-फोटो बंदीविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन! नाकर्तेपणा लपविण्यासाठी काढलेला आदेश तातडीने रद्द करा : डॉ. गणेश ढवळे बीड : (दि. २४ ) जिल्हा परिषद शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींनी शाळेच्या वेळेत व्हिडिओ व फोटो काढण्यास बंदी घालण्याच्या आदेशाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे यांनी सोमवारी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जाऊन 'सविनय कायदेभंग' आंदोलन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन डॉ. ढवळे यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील परिस्थितीचे व्हिडिओ व फोटो काढले. हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री बीड तथा शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे केली. नेमका आदेश काय? बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रणिता गंगाखेडकर यांनी केंद्रप्रमुखांना द...

लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक

Image
लऊळ येथील स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक , ग्रामसभेमध्ये गावच्या विविध विकास कामासंदर्भात जनतेने विचारले सरपंचांना प्रश्न,  ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू , सरपंच लक्ष्मण सरवदे वडवणी बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी वडवणी तालुक्यातील लवुळ गावामध्ये या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, लवुळ नं, एक, व लवुळ नं दोन असे दोन गावची या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी ग्रामपंचायत स्वतंत्र विभाजन ग्रामपंचायत करण्यात यावी यासाठी, ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश केला, व ठराव देण्यात यावा यासाठी ग्रामसभा तहखुब करण्यात आली होती,या वेळी ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू असा विश्वास सरपंच लक्ष्मण सरवदे यांनी केला आहे, ग्रामपंचायत विभाजन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सहकार्य करू गावच्या विविध विकास संदर्भात ग्रामस्थांनी सरपंचाकडे ग्रामसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रस्ताव टाकले , गावामध्ये विविध विकास कामे झाले आहेत त्याची विभागीय चौकशी लावण्यात यावी, यासाठी ग्...

मोक्ष हवा असेल तर काम, क्रोध,लोभ,मत्सर,माया,अहंकार सोडा,आत्महत्या हा मोक्षाचा मार्ग नाही-डॉ. जितीन वंजारे

Image
मोक्ष हवा असेल तर काम, क्रोध,लोभ,मत्सर,माया,अहंकार सोडा,आत्महत्या हा मोक्षाचा मार्ग नाही-डॉ. जितीन वंजारे             काल परवा संभाजी नगर येथील तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर एक घटना घडली,आय फोन मोबाईल चा ई एम आय भरण्यासाठी पैसे द्या असा अट्टाहास 19 वर्षीय मुलगा कुणाल चांदगुडे याने पिता मुरलीधर आई संगीता चांदगुडे यांच्याकडे केला त्याला समजावत असताना कुणालच्या मनात आत्महत्या सारखा वाईट विचार आला आणि जीवन संपवण्यासाठी तो डोंगरावर गेला. त्याला वाचवण्यासाठी तीन तास प्रयत्न झाले पण अखेर आख्ख कुटुंब दरीत पडून संपलं. या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हळहळला.           मित्रानो जगात अशी कोणतीही समस्या नाही कि ज्याचं समाधान नाही, प्रश्न तिथे उत्तर आहे,माणसाच्या आयुष्यात सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान, लाभ-हानी, जन्म-मृत्यू हे चक्र सतत सुरू असते. कधी परिस्थिती इतकी कठीण होते की माणसाला वाटते आता काहीच उरले नाही,माझे दुःख कधीच संपणार नाही,माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो,मरण आले तर सगळे प्रश्न संपतील,पण इथेच सर्वात मोठा गैरसमज होतो. मरण म्हणजे समस्...