Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, गुन्हे मागे घेण्याची मागणी

Image
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, गुन्हे मागे घेण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे बीड:-( दि.३) : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान न्यायाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना परवानगी नाकारण्यात आली. तसेच पालकमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले असतानाही ऐनवेळी भेट न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी "न्याय द्या" अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'लोकशाही वाचवा', 'संविधान वाचवा', 'आंदोलन आमचा हक्क आहे', 'पोलिस प्रशासनाच्या दडपशाहीचा धिक्कार असो' अशा घोषणांनी निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री द...

अमित तिवारी यांच्या भूमिकेतून मनुवादी मानसिकतेचे दर्शन; दलितांना कमी लेखण्याचा प्रयत्न थांबवावा – डॉ. जितीन वंजारे

Image
प्रतिनिधी | बीड               अभिजित दिपके यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ. जितीन वंजारे यांनी अमित तिवारी यांच्या भूमिकेवर टीका करत निवेदन प्रसिद्ध केले आहे.डॉ. वंजारे म्हणाले, "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याला व शिक्षणाला मोलाचे सहकार्य केले. त्या संधीचा लाभ घेत बाबासाहेबांनी अमेरिकेसह परदेशात उच्च शिक्षण पूर्ण केले, बॅरिस्टर झाले आणि भारतात परतल्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून देशाला संविधान दिले. हा इतिहास सामाजिक न्याय, शिक्षण आणि समान संधीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे."                   ते पुढे म्हणाले, "आजही दलित समाजातील एखादी व्यक्ती शिक्षण, उद्योग, राजकारण किंवा इतर क्षेत्रात यशस्वी झाली की तिच्या प्रगतीवर संशय घेण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी दिसून येते....

बीडमध्ये खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा स्वपनील वरपे यांच्या कडून तीव्र निषेध

Image
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बीड येथे कार्यकर्त्यांनी बीड बस्थानक येथील मुतारी मध्ये पोस्टर लावून तीव्र निषेध आंदोलन केले. आंदोलनादरम्यान निषेधाचे फलक व पोस्टर प्रदर्शित करून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये वैचारिक विरोधाला स्थान असले तरी वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नाही. यावेळी, मा. जयकुमार गोरे साहेब वैद्यकीय मदत कक्ष, बीड विभाग, स्वप्नील वरपे पाटील म्हणाले, "राजकीय मतभेद असू शकतात; मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल सातत्याने अवमानकारक भाषा वापरणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे वारंवार पाहिले आहे. जनतेच्या प्रश्नांवर विधायक भूमिका मांडण्याऐवजी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. संबंधित वक्तव्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने अधिक व्यापक निषेध आंदोलन करण्यात येईल." यावेळी उपस्थित कार्यकर्त्या...

आष्टी तालुक्यातील धानोरा येथे मोफत आरोग्य शिबिराची पूर्व नाव नोंदणी संपन्न

Image
    आष्टी( प्रतिनिधी : गोरख मोरे )    मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन बीड यांच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आष्टी/ पाटोदा/ शिरूर मतदार संघातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचे दिनांक ६ ते ७ ऑगस्ट २०२६ रोजी अनिषा ग्लोबल स्कूल ग्राउंड, जामगाव रोड, आष्टी. जिल्हा बीड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत आयोजन केले आहे.    तत्पूर्वी रुग्णांची नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे आज शुक्रवार ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते ५ या वेळात धानोरा सह परिसरातील गरजू रुग्णांची धानोरा येथील मारुती मंदिरात नाव नोंदणी करण्यात आली असून या प्रसंगी डॉ. मयूर कदम , सिस्टर संजीवनी गोरे, पल्लवी सिस्टर, आशा सविता मोरे ,सर्व लॅब टीम या प्रसंगी उपस्थित होते.   धानोरा सह परिसरातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ मिळवून देण्याकरिता आष्टी पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका ) शेळके , आष्...

बीडच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डॉ. ज्योतीताई मेटे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन

Image
बीडच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डॉ. ज्योतीताई मेटे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन बीड ( प्रतिनिधी ) शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड शहर व तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पशुसंवर्धन तसेच पुनर्वसनाशी संबंधित सहा महत्त्वाच्या मागण्यांकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये बीड शहरातील बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक आदी प्रमुख ठिकाणी महिलांसाठी आधुनिक व सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी विक्रीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बीड पंचायत समितीच्या जुन्या आवारात अथवा 'उमेद' अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ किंवा मॉल उभारण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय मौजे क...

नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ; आषाढ पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदना उत्साहात

Image
बीड | प्रतिनिधी आषाढ पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेनिमित्त धानोरा रोड येथील नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ अत्यंत धम्ममय वातावरणात करण्यात आला. यानिमित्त आयोजित बुद्धवंदना कार्यक्रमाला पंचशील नगर परिसरासह शहरातील विविध भागांतील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मश्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी (ए)चैत्यभूमी मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी त्यांच्या हस्ते भगवान तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. व्ही. एन. निसर्गंध (भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले. तर प्रा. व्ही. आर. गाडे यांनी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले. धम्मदेशनेत पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील आषाढ पौर्णिमेचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इ.स.पूर्व ५२८ मध्ये सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाल्य...

ग्रामीण भागातील मुलींसाठी केंद्रस्तरावर शासकीय निवासी शाळा सुरू करा : - बाजीराव ढाकणे

Image
ग्रामीण भागातील मुलींसाठी केंद्रस्तरावर शासकीय निवासी शाळा सुरू करा : - बाजीराव ढाकणे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदन; बीड जिल्ह्यासाठी विशेष शिक्षण आराखड्याची मागणी बीड प्रतिनिधी : - बीड जिल्ह्यातील ग्रामीण, डोंगराळ व दुर्गम भागातील मुलींना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक केंद्र (क्लस्टर) स्तरावर मुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्यचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महा एनजिओ फेडरेशनचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण हा प्रत्येक मुलीचा घटनात्मक अधिकार असून ग्रामीण भागातील मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आजही अपुऱ्या आहेत. अनेक गावांमध्ये इयत्ता ५ वी किंवा ८ वीनंतर पुढील शिक्षणासाठी मुलींना ५ ते १० किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करावा...