Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

वहालीत लाखोंची योजना, नळाला पाण्याचा थेंब नाही! जलजीवन मिशनच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी शरद पवारांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) : आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून नळयोजना राबविण्यात आली असतानाही गावातील नळाला पाण्याचा थेंब मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी शरद पवार यांनी ग्रामपंचायत वहालीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, बोगस व निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लाखो रुपये खर्च करूनही नळाला पाणी मिळत नसेल, तर या योजनेचा नेमका फायदा कोणाला झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. मंजूर निधी, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष झालेली कामे, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाची गुणवत्ता यांची तपासणी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भर पावसाळ्यातही गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा ल...

आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Image
बीड प्रतिनिधी : आम आदमी पार्टी, बीड जिल्हा कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड हे होते. यावेळी बोलताना अशोक येडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, “क्रांतिकारकांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आता हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तसेच स्वातंत्र्याचे खरे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका नव्या सामाजिक क्रांतीची गरज आहे.” कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. किस्किंदा पांचाळ, जिल्हाध्यक्ष, बीड जिल्हा सुतार समाज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी शासनाच्या सर्व सुख-सुविधा व मूलभूत हक्कांचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पूर्णपणे पोहोचलेला नाही. यासाठी समाजाने जागरूक होऊन आपल्या हक्कांसाठी पुढे येणे गरजेचे आहे.” कार्यक्रमाचे नियोजन श्री. सय्यद सादेक, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पैशाचं झाड' लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

Image
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पैशाचं झाड' लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी  हरित अभियानातील ४२ कोटींच्या वृक्षलागवड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड:-( दि.१५) : बीड जिल्ह्यातील वनविभागातील वनीकरणासह इतर कामांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, अनियमितता आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'वनविभागातील झाडांना पैसे' हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. गणेश ढवळे यांच्यासह शेख युनुस चऱ्हाटकर आणि मुजीब इनामदार यांनी सहभाग घेतला. हरित अभियानांतर्गत ४२ कोटी रुपये खर्च करून कागदोपत्री वृक्षलागवड करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी प्रादेशिक विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्यात य...

लिंबागणेश येथे गुलालमुक्त, डीजेमुक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पारंपरिक लेझीम-ढोलताशांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूक

Image
लिंबागणेश येथे गुलालमुक्त, डीजेमुक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पारंपरिक लेझीम-ढोलताशांच्या गजरात लक्षवेधी मिरवणूक! डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या मिरवणुकीने ग्रामस्थांचे वेधले लक्ष लिंबागणेश ;-(दि.१४ ) : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज (दि.१४) शुक्रवार रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुलालमुक्त आणि डीजेमुक्त पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. रासायनिक आणि बनावट गुलालामुळे त्वचेला होणारे दुष्परिणाम तसेच डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या गोंगाटाला पूर्णविराम देत पारंपरिक लेझीम, ढोल-ताशांच्या निनादात ही मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे, अभिजित देवकुळे, मुकेश शिंदे, अभिजीत देडे, आप्पा लोंढे, शंकर कांबळे, बाळू कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष दादा थोरात आणि बाळू थोरात, ड...

लोकनेते स्व. विनायकराव मेटे : संघर्षातून उभा राहिलेला बीडचा बुलंद आवाज- श्री बाजीराव नवनाथ ढाकणे

Image
लोकनेते स्व. विनायकराव मेटे : संघर्षातून उभा राहिलेला बीडचा बुलंद आवाज - श्री बाजीराव नवनाथ ढाकणे बीड जिल्हा समन्वयक, महा एनजिओ फेडरेशन, महाराष्ट्र १४ ऑगस्ट : स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन “काही माणसं आयुष्यातून निघून जातात; पण त्यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि माणुसकीचा ठसा कायम आपल्या सोबत राहतो.” बीड जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे लोकनेते स्व. विनायकराव मेटे साहेब हे आज आपल्यात प्रत्यक्ष नसले, तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही जिवंत आहेत. १४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक आक्रमक, अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता गमावला. आज १४ ऑगस्ट पुन्हा एकदा आला आहे. साहेबांच्या स्मृतींना उजाळा देताना मनात असंख्य आठवणी दाटून येतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संघर्षशीलता, माणसांशी असलेली आपुलकी, स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या ध्येयासाठी शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती आजही प्रेरणा देत राहते. बीडच्या मातीतून महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. विनायकराव मेटे यांचा जन्...

शोकाकुल वातावरणात लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण

Image
शोकाकुल वातावरणात लोकनेते विनायकराव मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण  बीड (प्रतिनिधी ) लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरातील त्यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन कार्यक्रम अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी मेटे साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच मेटे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे, अशुतोष विनायकराव मेटे, रामहरी मेटे, वैशाली मेटे यांच्यासह संपूर्ण मेटे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे, नारायणराव काशीद, अनिल घुमरे, सी.ए. बी. बी. जाधव , सुहास पाटील, तुळशीराम पवार, ज्ञानेश्वर कोकाटे, ज्ञानेश्वर चौधरी, पंडितराव माने ,उत्तमराव पवार, पत्रकार दिलीप सपाटे, शिवसंग्राम चे ठाणे शहराध्यक्ष प्रकाश खैरे, छत्रपती संभाजी नगरचे शहराध्यक्ष कुलदीप देशमुख, नारायण थोरात, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून मेट...

मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले

Image
मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या पात्र ऊसतोड कामगारांच्या वारसांना शासन निर्णयानुसार देय असलेले ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हा साखर उद्योगाचा महत्त्वाचा आधार असून, ऊसतोडणी व वाहतूक करताना अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का, रस्ते अपघात तसेच अन्य दुर्घटनांमध्ये अनेक कामगारांचा मृत्यू होतो. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी, मुले, आई-वडील व इतर वारसांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र...