Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

Image
भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष! आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक पाटोदा (प्रतिनिधी ) : आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात आल्याचा दावा असतानाही नळाला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. “भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल, तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली. या पाणीप्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे. पावसाळ्यातही हंडे डोक्यावर; वहालीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल!

महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे

Image
महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे  बीड येथे ग्रामसाधन व्यक्तींच्या मागण्यांसाठी रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांना निवेदन बीड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित सेवेत सामावून घेत शासकीय स्तरावर योग्य स्वरूप देण्यात यावे, अशी मागणी बीड येथे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात १३ ऑगस्ट २०२६ रोजी रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांना बीड येथे निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाजीराव नवनाथ ढाकणे,गणेश शंकर काळे, रज्जाक शेख व संजय बांगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या २०२३ च्या पदभरती जाहिरातीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक ...

सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Image
सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान   कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध; अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थी संख्येनुसार पदमान्यता देण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड : (दि.१७) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होऊनही गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ८५० सरकारी शाळा बंद पडल्याचा मुद्दा उपस्थित करत कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी 'सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण'आणि 'शिक्षण हा आमचा हक्क आहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्...

महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम: स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन

Image
महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम:  स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन ​बीड प्रतिनिधी :- समाजात ज्यांना कोणी सहारा नाही, ज्यांचे या जगात कोणी नातेवाईक उरले नाहीत अशा निराधारांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत महुवाले परिवाराच्या वतीने एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. स्वर्गीय भारत जानकीराम महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शहरातील 'जिव्हाळा बेघर निवारा केंद्र' येथे राहणाऱ्या बेघर व निराधार व्यक्तींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ​या शिबिरात कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या वृद्धांची आणि रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली. यामध्ये खालील मोफत सेवा व उपचार देण्यात आले ​ रुग्णांसाठी मोफत मसाज आणि स्टीम थेरपी. जुनाट आजार व सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीचे 'अग्निकर्म' आणि 'विद्धकर्म' द्वारे मोफत उपचार करण्यात आले. ​"आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजातील दुर्क्षित आणि निराधार घटकांना मदतीचा हात देणे हीच स्व. भारत महुवाले यांना खरी श्रद्...

विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप.

Image
विनायकराव मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व निराधारांना चटायांचे वाटप. बीड (प्रतिनिधी ) : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी बीड जिल्हा कार्यआध्यक्ष मनीष सुहासराव पाटील यांच्या वतीने व्यंकटेश पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वही व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बीड येथील जिव्हाळा निराधार केंद्रात शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत निराधारांना चटायांचे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देतानाच निराधारांना मदतीचा हात देत स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि समाजातील गरजू, निराधार व्यक्तींना आवश्यक वस्तूंची मदत करणे, या उद्देशाने दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मेटे साहेबांनी जपलेल...

रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग उपोषण सुरू

Image
रोजंदारी मजदुर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अन्नत्याग उपोषण सुरू बीड दि.१५ ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड , अनिता बचुटे तर औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगार प्रतिनिधी वैजनाथ पिराजी पतंगे यांनी कामगारांना कामावर रुजु करणे , किमान वेतन व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत याकरिता 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. तर काही कंत्राटी कामगार प्रतिनिधीनी काम करुन आळीपाळीने धरणे धरून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.    स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले तरी देखील बीड जिल्ह्यातील कंत्राटी कामगार पारतंत्र्यात आहेत का ? असा संतप्त सवाल कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी समाज माध्यमातून व प्रसिद्धी पत्रका द्वारे शासनास व जिल्हा प्रशासनास केला आहे.       याबाबत सविस्तर वृत्त असे की सन 2017 ते आजतागायत कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्...

स्वातंत्र्य दिनी महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अधिकाऱ्यांनी बूट न काढल्याचा आरोप; परळीत चौकशी व कारवाईची मागणी

Image
परळी वैजनाथ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त परळी वैजनाथ येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मात्र, यावेळी प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पायातील बूट न काढताच महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केल्याचा आरोप आंबेडकरवादी व गांधीवादी विचारांच्या नागरिकांनी केला आहे. महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना शिष्टाचाराचे पालन न केल्याचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना योग्य तो आदर राखला जाणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय कार्यालयात मोठे महत्त्व असताना प्रतिमांना अभिवादन करण्याच्या प्रसंगी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायातील बूट काढले नसल्याच्या आरोपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकाराची उच्चस...