Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

समाजसेविका सौ अंजली जाधव यांना महाराष्ट्र नायक पुरस्कार जाहीर

Image
सखाराम पोहीकर   गेवराई तालुका प्रतिनिधी  घाटकोपर येथील सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन अंजली प्रवीण जाधव यांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .  समाज प्रतिबिंब बहुउद्देशीय संस्था व बी एस एफ बहुउद्देशीय संस्था आणि उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे यावेळी सामाजिक कृषी क्रीडा उद्योग शैक्षणिक संस्था प्रशासकीय कला व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 70 लोकांना हा महाराष्ट्र नायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा मे महिन्यात नाशिक येथे पार पडणार आहे अशी माहिती या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक भूषण सरदार यांनी प्रसिद्धी पत्रिका द्वारे जाहीर केले आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी बोलताना अंजली जाधव यांनी दिली आहे

प्रशासकीय अनास्था! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

Image
प्रशासकीय अनास्था! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दुरवस्था; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट महादेव गंगणे पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि करोडोंचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, स्मारकाची तातडीने डागडुजी आणि स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्य महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसर सध्या देखभालीअभावी अतिशय दयनीय अवस्थेत आहे. स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुतळ्याच्या चौथऱ्याची पडझड झाली असून, रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी दिवाबत्ती नसल्याने परिसरात अंधार असतो. एकीकडे महापुरुषांच्या नावाने राजकारण केले जात असताना, दुसरीकडे त्यांच्या स्मारकांकडे होणारे हे दुर्लक्ष प्रशास...

नसरापुर प्रकरणी आरोपीला फाशीची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Image
बीड (दि.०४ ):पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर येथे साडे तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबाणेशकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. “अनेक प्रकरणांमध्ये केवळ घोषणा होतात, पण खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. या प्रकरणात तरी ठोस व तातडीची कारवाई व्हावी,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. याचवेळी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणा-या पोलिस यंत्रणेचाही निषेध करण्यात आला.आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बी...

भालचंद्र विद्यालयाची निकालाची परंपरा कायम; बारावी परीक्षेत ९४.१५ टक्के यश

Image
लिंबागणेश   : भालचंद्र विद्यालयाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) फेब्रुवारी/मार्च २०२६ परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत एकूण ९४.१५ टक्के निकाल नोंदविला आहे. विज्ञान शाखेत ९७.७० टक्के तर कला शाखेत ९०.४७ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेसाठी एकूण ८७ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. विद्यालयातून विज्ञान शाखेत गुणानुक्रमे संकेत प्रताप जोगदंड (७५.५० टक्के), चैतन्य अंकुश घोलप (७५.०० टक्के), सिद्धी नितीन संचेती (६८.३३ टक्के), राधिका संतराम ढास (६७.१७ टक्के), चैतन्य अप्पाराव मुळे (६५.३३ टक्के) व सार्थक कुमार पवार (६५.३३ टक्के) यांनी यश संपादन केले. विज्ञान शाखेत २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून २५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. कला शाखेत ८४ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे हरिओम शहाजी घोडके (७५.१७ टक्के), रोहन सुखदेव भोसले (७३.५० टक्के), रत्नाकर सतीश मोरे (७३.०० ...

लिंबागणेश येथील त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची शांतीब्रम्ह तुकाराम महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता

Image
लिंबागणेश (दि.०२ ) : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिरात श्रीगुरू ईश्वरभारती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम व भावार्थ रामायण कथा सप्ताहाची सांगता आज दि.०२ शनिवार रोजी श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात करण्यात आली. दि.३० एप्रिल ते ०२ मे दरम्यान पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव भारती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशी शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओव्यांद्वारे प्रभावी व सुश्राव्य किर्तन सादर करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. “तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मळे, भोग सुखाचे सोहळे” या अभंग ओव्यांचा दाखला देत भगवंताच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संत साहित्याच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्यात आला. सप्ताह काळात ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर व ह.भ.प. प्रेममुर्ती धर्मराज दादा सामनगावकर यांनीही सुश्राव्य किर्तन ...

नागसेन बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

Image
बीड | दि. 01 मे 2026 (प्रतिनिधी) नागसेन बुद्धविहार येथे आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धमूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदना घेण्यात आली. पुढे महात्मा गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. या प्रसंगी उमाजी वाघमारे, काशीनाथ वाघमारे, केशरताई कांबळे, प्रा. व्ही. आर. गाडे, सुनिल कांबळे, एस. ए. सोनवणे आणि सर्वदे ताई यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व विशद केले. दरम्यान, आज वाढदिवस असलेले एस. ए. सोनवणे व आरुष सिरसठ यांचा नागसेन बुद्धविहाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शरणागत प्रार्थनेने सांगता करण्यात आली. उपस्थितांसाठी भोजनदान एस. ए. सोनवणे यांनी, खीरदान ए. एस. उजगरे (बापू) यांनी, तसेच अल्पोपहार (केळी) आरुष सिरसठ यांनी दिला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर शाळेत एकल भगिनीच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

Image
केज, प्रतिनिधी : - मौजे जोला (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकल भगिनी सुनिता रत्नाकर ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास, महाराष्ट्र दिनाचे महत्त्व तसेच सामाजिक एकात्मता आणि शैक्षणिक प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुरलीधर ढाकणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगरचे मुख्याध्यापक बाबुराव ढाकणे, सहशिक्षक संदीप आणेराव, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे, अंगणवाडी कार्यकर्ती सविता सारुक यांच्यासह गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राज्याविषयी अभिमानाची भा...