Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले

Image
परळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या मदतीने लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले दिनांक 10 एप्रिल 26 थकीत वेतन व अनुषंगिक लाभ मिळावेत याकरिता झुंजार कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सुरू केले होते* अखेर चौथ्या दिवशी परळी शहराच्या कर्तव्यदक्क्ष नगराध्यक्षा मा.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी लिखित पत्र देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. इथून पुढे तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आपण संवाद साधून तुमच्या सर्व मागण्या टप्प्याटप्प्याने मंजूर करू आणि तुमचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने मी कामगार नेते भाई गौतम आगळे सर हे आमच्या सतत संपर्कात असल्याने तुम्हाला या पूढे आंदोलनाचे हत्यार उपसन्याची गरज पडणार नाही असे मी नगरपरिषद अध्यक्षा म्हणून आपणास शब्द देते. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी चा, पि.एफ. कोड नंबर (यु.एन.ए. ) एक महिन्यात देण्यात येईल असेही लेखी पत्रात नमूद केले आहे.        त्या अनुषंगाने दिनांक १५ एप्रिल २०२६ चे संतप्त कामगार टोकाची भूमिका घेणार होते. जिल्हा सह ...

जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन; ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित

Image
बीड (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सायंकाळी तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याची माहिती दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाले होते. जिल्हा कामगार कार्यालयातील कथित एजंटशाही, भ्रष्टाचार आणि बोगस लाभार्थी प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी कामगार आक्रमक झाले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आंदोलनकर्त्यांना कळविण्यात आले की, संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने शासन दरबारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, आवश्यक ती चौकशी व कारवाई लवकरच करण्यात येईल. यासाठी प्रशासनाने काही कालावधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी स...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण विरोधात लिंबागणेश येथे निदर्शने; ११ मे बीड मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

Image
बीड (दि.२१ ) : केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रस्ताव पुढे आल्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवादी समाज आक्रमक झाला असून लिंबागणेश येथे निदर्शने करण्यात आली. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. सरकारकडून अनुसूचित जातीतील ५९ जातींचे अ, ब, क, ड अशा गटांमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत असून, या निर्णयामुळे समाजात फुट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल, विविध घटकांमध्ये संघर्ष व अविश्वास वाढेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फडणवीस सरकारने नेमलेल्या न्या. अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक न करता हरकती व सूचना मागवण्यात आल्यामुळे आंबेडकरी समाजात नाराजी असल्याचे निदर्शनास आले. समितीचा अहवाल तातडीने जाहीर करावा, तसेच उपवर्गीकरणाचा आधार व पद्धत स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड,...

धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी

Image
धानोरा जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या काळे मंथन स्पर्धा परीक्षेत बीड जिल्ह्यातून प्रथम तर, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत द्वितीय क्रमांकाची मानकरी  धानोरा जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेच्यात दुसऱ्यांदा मानाचा तुरा      कु.आर्या काळे सह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन-शुभेच्छांचा वर्षाव   आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            नुकत्याच मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या .या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . त्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील कु.आर्या प्रवीण काळे या विद्यार्थिनीने बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर, राज्यस्तरातून द्वितीय क्रमांक पटकावून मानकरी ठरली .   तर प्रांजल गोरक्षनाथ आडागळे तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, असलबा असलम सय्यद तालुकास्तरावर चौथा क्रमांक, रुद्र केशव उदावंत केंद्रात प्रथम क्रमांक, गीतांजली संदेश श...

पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

Image
पोखरी (घाट) गावातील रस्त्यालगत धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे बसविण्याची ग्रामस्थांची मागणी; प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश (दि.२०) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभो...

बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा

Image
बीडमध्ये 1.20 कोटींच्या खडीकरण घोटाळा मुख्याधिकाऱ्यावर गुत्तेदार-अभियंत्याला वाचवण्याचा प्रयत्न;नगरपरिषद समोर जागरण गोंधळ आंदोलन लवकरच करणार-वर्षाताई जगदाळे  बीड प्रतिनिधी   बीड नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक ११, बालेपीर भागात झालेल्या खडीकरण कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केला आहे. या प्रकरणात तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वार्ड क्रमांक ११ मधील पाच गल्ल्यांमध्ये खडीकरणाचे काम दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता एकही खडी टाकण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी शैलेश फळसे यांनी कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. तक्रार करूनही संबंधित गुत्तेदार आणि अभियंता यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणात दोषी अभियंत्याला तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाकडून योग्...

जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Image
बीड (प्रतिनिधी ) – जि.प.के. प्राथमिक शाळा वांगी येथील मुख्याध्यापक सुभाष वीर सर यांची कन्या कुमारी साक्षी सुभाष वीर हिने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे पालीसह संपूर्ण परिसरात अभिमानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणापासूनच अभ्यासू, जिद्दी आणि ध्येयवेडी असलेल्या साक्षीने शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवणे हेच एक मोठे आव्हान असताना, त्या पुढील कठोर आणि दीर्घकालीन अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे तिच्या चिकाटीचे द्योतक आहे. दिवस-रात्र परिश्रम, वेळेचे काटेकोर नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर तिने हे यश मिळवले. साक्षीच्या या यशामागे तिच्या कुटुंबियांचे, विशेषतः वडील श्री. सुभाष वीर सर यांचे मार्गदर्शन आणि आईचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. शिक्षक कुटुंबातील संस्कार आणि शिक्षणाविषयीची ओढ यामुळे तिला लहानपणापासूनच शिक्षणाची योग्य दिशा मिळाली. वैद्यकीय पदवी प्राप्त ...