Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिपकभाऊ बो-हाडे यांना पाठिंबा देण्यासाठीलिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधव मुंबईकडे रवाना होणार

Image
लिंबागणेश : (दि. १७) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे हे दि. २१ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या न्याय्य मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि. १७ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य प्रवेशद्वारावर धनगर समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “येळकोट येळकोट जय मल्हार”, “जय मल्हार बोलो, मुंबई चलो”, “दिपकभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. दिपकभाऊ बो-हाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या न्याय मागणीला मराठा समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधवांचा जाहीर पाठिंबा असून, सर्व समाजबांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मरा...

अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

Image
अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट  वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला  बीड प्रतिनिधी : (दि.१६)बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील अंजनवती गावात काल मध्यरात्री बिबट्याने राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या बोकडावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुपारी वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तर चौसाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी बहिरवाळ यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे लिंबागणेश पंचक्रोशीमध्ये काही दिवसांपूर्वी मागे पडलेला बिबट्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रेवण येडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री अंजनवती गावातील अर्जुन येडे यांनी शेतात बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्याच सुमारास, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या गोठ्यातील बोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांच्या मते बिबट्याने बोकड उचलून नेला असावा. दुसऱ्या दिवशी दुपारी शोध घेत...

ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Image
गेवराई (प्रतिनिधी ): मकरसंक्रांतीसारख्या सणासुदीच्या काळात नवीन गेवराई परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत लाईट जात असल्यामुळे हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन गेवराई येथील माऊली फिडर व नवीन गेवराई फिडर हे जवळपास दररोज सकाळच्या वेळेत बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे घरगुती कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे ही वीजखंडिती नियमितपणे होत असताना त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. सबस्टेशनला फोनद्वारे संपर्क साधल्यास “लोड वाढल्याने लाईट बंद केली जाते” असे कारण दिले जाते. मात्र, दररोज सकाळच्या ठराविक वेळेत लाईट कशी आणि का जाते, याबाबत अजूनही रहस्य कायम आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून ठोस उत्तर अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. सणासुदीच्या काळात महिलांची संध्याकाळची वर्दळ वाढलेली असते. अशा वेळी अंधारामुळे गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत न...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त बीडमध्ये भव्य मोटरसायकल रॅली

Image
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा निमित्त बीडमध्ये भव्य मोटरसायकल रॅली आज होणाऱ्या रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे स्वप्निल वरपे यांचे आव्हान बीड प्रतिनिधी अंकुश गवळी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त बीड शहरातील महालक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रम अभिवादन व भगवा ध्वजारोहण कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे, व तसेच या ठिकाणी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आलेले आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक चौक महालक्ष्मी चौक असा रॅलीचा रूट आहे, तरी सर्व बीड करानी या रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे यांनी केले आहे,

प्रलंबित मागण्यांसाठी गेवराईत १९ जानेवारीपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग अमरण उपोषण

Image
​गेवराई प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने १९ जानेवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर 'अन्नत्याग अमरण उपोषण' करण्यात येणार आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड सखाराम पोहिकर यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन इशारा दिला आहे. ​ ​गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाइन झाल्यामुळे ते वेळेवर मिळत नाही. अनेकदा दोन ते तीन महिने वेतन प्रलंबित राहते. शासन स्तरावर मागण्या मान्य असूनही जिल्हा आणि तालुका पातळीवर केवळ अंमलबजावणीअभावी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी पाच वेळा आंदोलने करण्यात आली, मात्र ठोस तोडगा न निघाल्याने आता अमरण उपोषणाचे पाऊल उचलण्यात आले आहे. ​ प्रमुख मागण्या: ​१. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि राहणीमान भत्ता त्वरित द्यावा. २. भविष्य निर्वाह निधीच्या (PF) कपातीचा हिशोब व पावत्या देऊन पासबुक अद्यावत करावे. ३. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात यावे. ४. आ...

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थेवर भर

Image
‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थेवर भर पणजी, 15 जानेवारी 2026 : एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG), पणजी येथे ‘ट्रान्सेंड गोवा 2026’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गोव्याच्या सर्जनशील आणि डिजिटल परिसंस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विद्यार्थी, क्रिएटर्स, व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील भागधारक सहभागी होत असून, उदयोन्मुख सर्जनशील व डिजिटल क्षेत्रांतील संधी, कौशल्य विकास आणि नवोन्मेषाधारित करिअरवर चर्चा होत आहे. संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये, करिअर मार्ग आणि नव्या युगातील सर्जनशील उद्योगांवरील संवादाला चालना देत आहे. राष्ट्रीय आणि जागतिक सर्जनशील व डिजिटल अर्थव्यवस्थेत गोवा स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करू शकतो, तसेच स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि उद्योग सहकार्य वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी बोलताना माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “ट्रान्सेंड गोवा 2026 संस...

आर पी आय आठवले गटाचे राज्य संघटक खंडूजी मोरे राष्ट्रीय पातळीवरील साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :               रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य संघटक खंडूजी तुकाराम मोरे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यांना साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार 2026चा  पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले  . खंडुजी तुकाराम मोरे यांनी महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची  पोहच पावती म्हणून यांना राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओम साई विकास प्रतिष्ठान व बी सी फिल्म प्रोडक्शन सुदाम संसारे यांच्या हस्ते तसेच चित्रपट देता व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते रिलस्टार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .      आर पी आय आठवले गटाचे राज्य संघटक खंडूजी तुकाराम  मोरे साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने राजकीय /सामाजिक/ शैक्षणिक /आप्तेष्ट/ मित्र परिवारआदी क्षेत्रातील मान्यवर माता -भगिनी कडून अभिनंदन करून पुढील कार...