Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन

Image
धानोरा येथे २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन   भागवताचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांच्या कीर्तनाचे आयोजन   धानोरा परिसरातील सर्व स्तरातील नागरिक/ माता- भगिनी /युवक वर्गाने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-- धानोरा ग्रामस्थ आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे दिनांक २ एप्रिल २०२६ गुरुवार रोजी हनुमान जन्मोस्तवाचे आयोजन करण्यात आले .     या मध्ये पहाटे ४ ते ६ काकड मिरवणूक , सकाळी ६:२० वाजता श्री हनुमान जलाअभिषेक व महापूजा, सकाळी ७:३० ते १० या वेळात संत नामदेव महाराज गुरुकुल पारगाव जो संस्थान यांच्या बाल वारकऱ्यासहित भव्यरथ मिरवणूक होऊन त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळात भागवतचार्य ह. भ. प. अशोक महाराज भोसले यांचे जाहीर कीर्तन होणार आहे . व त्यानंतर महाप्रसादाची पंगत ठेवण्यात आली आहे . या महाप्रसाद पंगतीचे अन्नदाते ओमकार शिंगटे , सौरभ शेंदुरकर , सोपनील तरटे आणि ऋषिकेश मोरे यांच्या मार्फत असून धानोरासह परिसरातील सर्व स्तरातील नागरिक /माता- भगिनी /युवक वर्गाने धानोरा येथी...

आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट

Image
आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट’ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन : डॉ. गणेश ढवळे बीड (दि. ३० ) : बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्रामविकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे ...

निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे

Image
फोटोसेशन आणि पुरस्कारापुरता वृक्षलागवडीचा दिखावा; “इव्हेंट जिल्हाधिकारी” यांनी विवेक जागा ठेवून वृक्षसंगोपणाची जबाबदारी निश्चित करावी ! निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२९ ): हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जागतिक विक्रमाच्या उद्देशाने एकाच दिवशी ३० लाख झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र बीड प्रशासनाने प्रत्यक्षात ७० लाख झाडे लावल्याचा दावा करत विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांची दिशाभूल केली. यासोबतच ९० टक्के झाडे जिवंत असल्याचा दावा देखील प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावलेले खंडेश्वरी दिपमाळ परीसरात झाड देखील जिवंत ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. पाली येथील नविन रेल्वे स्थानक परिसरात उद्घाटनावेळी लावण्यात आलेली १२ ते १५ फूट उंचीची झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांच्या नावाचे फलक लावण्यात आलेल्या झाडांचेही संगोपन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याच...

चवदारतळे महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता आमंत्रित

चवदारतळे महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता आमंत्रित  चवदारतळे महाड क्रांतीच्या शताब्दी वर्ष (२०२६–२०२७) निमित्त सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने “क्रांती सूर्याचं देणं” या विशेष ऐतिहासिक काव्यसंग्रहासाठी राज्यभरातील कवींना कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “क्रांती सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर आधारित हा काव्यसंग्रह समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या महान लढ्याला शब्दरूप अभिवादन करण्यासाठी प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून महाड क्रांतीच्या ऐतिहासिक वारशाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावीपणे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या काव्यसंग्रहासाठी नामवंत तसेच नवोदित कवींना सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, मौलिक विचार, सत्याग्रह आणि महाड क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न व दर्जेदार मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त होणाऱ्या कवितांपैकी निवडक कवि...

जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे

Image
जिल्हाधिकारी साहेब, अवकाळी पावसाने वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय झालं? लिंबागणेश ते बोरखेड पुलाच्या दुरुस्तीची मागणी :- डॉ. गणेश ढवळे बीड (दि.२८) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते, नळकांडी पुल, तलाव व बंधारे वाहून गेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र, या घटनेला सहा महिने उलटूनही अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार? आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे. लिंबागणेश–बोरखेड रस्ता अद्यापही खचलेलाच बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड हा महत्त्वाचा रस्ता व पुल सप्टेंबरमधील पावसात वाहून गे...

बौद्ध संस्कार विधींमध्ये सम्राट अशोकांची प्रतिमा लावण्याचे आवाहन

Image
बीड (प्रतिनिधी ) : बौद्ध धर्मीयांच्या संस्कार विधींमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा किंवा मूर्ती अनिवार्यपणे ठेवावी, असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या संस्कार विभागामार्फत करण्यात आले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की, बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनामध्ये सम्राट अशोक यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध धम्म भारतात व्यापक प्रमाणात प्रसारित झाला. त्याच परंपरेला पुढे नेत, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करून या देशाला पुन्हा बुद्धधर्माची दिशा दिली. या ऐतिहासिक योगदानाच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक बौद्ध संस्कार विधीत तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे स्थान अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे वि...

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणी टिप्परची समोरा -समोर धडक,आई आणी मुलाचा कारमध्ये होरपळून जागीच मृत्यू

Image
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :        आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन आई आणि मुलाचा कार मध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला .    हा अपघात इतका भीषण होता काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली .   आष्टी पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर काळाने घाला घातला .   मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात असताना कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली असून या भीषण धडकेत कारने लगेच पेट घेतला, आणि या कारमधून आई आणि मुलाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले . अपघाताची एवढी भीषणता होती की, कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.   या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळत...