Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लिंबागणेश पाणीपुरवठा विहिरीच्या मोटारची वायर दीड महिन्यात २ वेळा चोरी; नेकनुर पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान ! पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल

Image
लिंबागणेश (दि.०४ ) : बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात तब्बल दोन वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आज (दि.०४) नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, विक्रांत व...

लेखक भटू हरचंद जगदेव यांच्या माप कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

Image
( प्रतिनिधी /भिवंडी )    अनित्य प्रकाशन व वारकरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगदेव भटू यांच्या "माप'' या कथासंग्रहाचे प्रकाशन अध्यक्ष साहित्यिक विजयकुमार भोईर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते, साहित्यिक नवनाथ रणखांबे, प्रमुख पाहुणे संपादिका सुप्रिया जाधव, वारकरी प्रकाशनाचे राहुल मुंडे आदी.मान्यवरांच्या हस्ते स्काऊट ग्राउंड सदाशिव पेठ पुणे येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी नवनाथ आनंदा रणखांबे , राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , विजयकुमार भोईर राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य भूषण पुरस्कार , श्रीकृष्ण टोबरे जागल्या पुरस्कार, सुरेखा गायकवाड हिरकणी पुरस्कार इत्यादी. पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.     यावेळी बोलताना विजय कुमार भोईर म्हणले की, माफ या कविता संग्रहातील कथा छान आहेत . नवनाथ रणखांबे यावेळी बोलतांना म्हणाले की, जगदेव भटू यांचा “माप” हा कथा संग्रह केवळ वाचण्याचा अनुभव देत नाही; तर तो वाचकाला विचार करायला, स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरित करतो. तर भरत सातपुते यांनी माप कथासंग्रहाचे ल...

३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक

Image
३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी; अंबेवेस पुलाच्या शुभारंभावरून नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथम पर्यायी पूल उभारावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): अंबेवेस परिसरातील जुन्या पुलाच्या पुनर्निर्माणासाठी आज शुभारंभ करण्यात आला असला, तरी या कामाच्या पद्धतीवर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन बागवाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता घाईघाईत शुभारंभ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अंबेवेस येथील पूल हा प्रभाग क्रमांक १६ मधील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक दुवा असून, या भागातील नागरिकांना दररोज ये-जा करण्यासाठी याच पुलाचा आधार आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यापूर्वी नागरिकांसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे बागवाले यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेच्या मंजूर इस्टीमेटमध्येच सुमारे ९ लाख रुपयांची तरतूद पर्यायी पुलासाठी करण्यात आलेली असताना, सत्ताधाऱ्यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष करून थेट मुख्य पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ करणे हे निष्काळजीपणाचे व नागरिकांच्या अडच...

पाली बिंदुसरा धरणात पाच तास जलसमाधी आंदोलन

Image
📰 प्रेस नोट    ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी पांडुरंग आंधळे यांचे उपोषण १४ व्या दिवशी; प्रशासन अद्याप उदासीन   बीड (प्रतिनिधी ) – ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार श्री. पांडुरंग वामनराव आंधळे हे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून व ऊसतोड कामगार श्री पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री.बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना) यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.   प्रमुख मागण्या: ऊस तोडणी व भरणी दर ₹500 प्रति टन करण्यात यावा व वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी ऊसतोड भरणी व वाहतुकीचा करार दरवर्षी करण्यात यावा ऊस तोडणीदरम्यान प्रसूती झाल्यास माता भगिनींना ₹25,000 प्रसूती भत्ता देण्यात यावा ऊसतोड ...

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

Image
जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेची तालुकास्तरीय परीक्षा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग बीड, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेअंतर्गत तालुकास्तरीय परीक्षा सोमवार, दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये उत्साहात पार पडली. तालुका बीडसाठी तुलसी संगणक महाविद्यालय येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. यावेळी आयु. मनोज वाघमारे, आयु. सुमेध जोगदंड, अशोक ठोकळ, तानाजी शिनगारे, अभिजीत जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. प्रकाश ढोकणे यांनी केले. या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे तसेच चिकित्सक अभ्यासाची वृत्ती विकसित करणे हा या स्पर्धेचा ...

के के वाघ विद्याभवनात हनुमान जन्मोत्सव उत्साहात.

Image
 निफाड.ता-२यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक :-.के के वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगर येथील 'क्रीडा विभागातर्फे' प्राचार्य दिवाकर शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी समन्वयक यशवंत ढगे उपमुख्यध्यापिका सुनीता वडघुले,पर्यवेक्षक डि.के मोरे,ज्युनि.कॉलेज प्रमुख बस्तीराम रानडे,जेष्ठ शिक्षक आर.डी. गांगुर्डे,प्रवीण रणदिवे,बाजीराव वाघ,राजेंद्र उगले,मनोज तुसे,संदीप खिस्ते,संजय धनगर,निलेश पाटील,राकेश तोरवणे,अनिल शिंगणकर,अमोल वाघमारे,क्रीडा विभाग प्रमुख गोविंद कांदळकर, शीतल साळी,कांचन सोनार,गायत्री आंबेकर,शारदा पेलमहाले,अश्विनी जावळे, किरण कदम,उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य दिवाकर शेजवळ यांनी रामभक्त हनुमान हे शक्ती आणि बुद्धीची देवता मानले जातात त्यामुळे मारुतीरायाची आराधना करून बळ आणि विद्या मिळवण्यासाठी विद्यार्थी खेळाडू व्यायामाद्वारे व शैक्षणिक पुस्तके वाचून विद्यार्जन करतात.तसेच क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेदरम्यान,व्यायाम शाळांमध्ये हनुमानाची सर्वत्र पूजा केली जाते असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी समन्वयक श्री यशवंत ढ...

पाटोदा बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर तोडा;- नगरसेवक संतोष जाधव यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील बाजार समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे मोठ्या वाहनांना अडचणी निर्माण होत असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित डिव्हायडर तात्काळ तोडण्याची मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे तसेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीकडे येणाऱ्या मोठमोठ्या मालवाहू गाड्यांना वळण घेताना किंवा थांबताना पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी, ही वाहने मुख्य रस्त्यावरच उभी राहतात आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. विशेषतः सकाळी व दुपारच्या वेळेत ट्रॅफिकची समस्या अधिक तीव्र होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आपत्कालीन सेवा, शालेय वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे