Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा -सय्यद सादेक

Image
बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा - सय्यद सादेक शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड , प्रतिनिधी  – बीड शहरातील 114 कोटी रुपयांच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सय्यद सादेक यांनी दाखल केलेल्या याचिकेची छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचिका स्वीकारून संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याचिकेनुसार, सुमारे 114 कोटी रुपयांची योजना असूनही जवळपास 100 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही बीड शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत माहिती मागवूनही प्रशासनाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने सय्यद सादेक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नोटिसा बजावत 28 जुलै 2026 पर्यंत न्यायालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आह...

७० वर्षांची जीर्ण शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार? गणगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत उभारण्याची मागणी

Image
७० वर्षांची जीर्ण शाळा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणार? गणगेवाडी जिल्हा परिषद शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारत उभारण्याची मागणी १९५६ मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या भिंतींना तडे, पावसाळ्यात वर्गखोल्या गळक्या; डॉ. गणेश ढवळे यांचे शासनाकडे निवेदन बीड:-( दि.३ ) :आष्टी तालुक्यातील केंद्र बेलगाव अंतर्गत गणगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून विद्यार्थी आणि शिक्षक अक्षरशः जीव मुठीत धरून शिक्षण व अध्यापन करत आहेत. सुमारे ७० वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून पावसाळ्यात वर्गखोल्या गळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य)चे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्या...

माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६'

Image
माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६' बीड | प्रतिनिधी माजी सैनिक तथा ज्येष्ठ सामाजिक आंदोलक प्रकाश वाघमारे यांना युवा लोकमित्र (महाराष्ट्र शासन जाहिरात सूची समाविष्ट साप्ताहिक) यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा-२०२६ मध्ये 'मा. उपनगराध्यक्ष शेख मुजीब उस्मान पुरस्कार-२०२६' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. दि. २० जून रोजी ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शी नाका, बीड येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय सैन्यात उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर समाजातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक आंदोलक म्हणून प्रकाश वाघमारे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. देशसेवेबरोबरच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवा लोकमित्र परिवार, बीड यांच्या वतीने त्यांचा या प्रतिष्ठेच्या प...

अंबाजोगाई बस स्थानकातील आगार प्रमुखांच्या ढीसाळ नियोजनामुळे अपघातांना निमंत्रण- भीमशक्ती, लोकजनशक्ती पार्टी

Image
बीड प्रतिनिधी  : अंबाजोगाई बस स्थानकात होणाऱ्या वारंवार अपघातांमुळे बस स्थानकातील नियोजना संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यातील प्रमुख कारण बस स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या गेट जवळ वाहनांची गर्दी रिक्षाची अवैध पार्किंग बस स्थानकातील नवीन काढलेल्या अवैध गाळ्यांमुळे होणारी गर्दी त्यामध्ये प्रामुख्याने रसवंती, मेडिकल जनरल स्टोअर अशा विविध दुकानांमुळे बस स्थानकात प्रवाशांना उभा राहण्यासाठी अपुरी जागा पडत आहे यामुळे आंबेजोगाई बस स्थानकात वारंवार अपघात होत आहेत.मागील आठ दिवसात बस ने चिरडल्यामुळे दोन व्यक्ती गंभीर जखमी झालेले आहेत गेल्या वर्षी बस अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. बस स्थानकाला महाराष्ट्र शासनाकडून मोठी जागा दिलेली असताना सुद्धा आगार प्रमुखांच्या नियोजन शून्यमुळे जवळपास एक एकर जागा झाडे लावण्यासाठी सोडली असून ती जागा सध्या पडीक स्वरूपात दिसत आहे. जर या पुढील जागेचे योग्य नियोजन केले तर अंबाजोगाई शहराचे बस स्थानक हे सुसज्ज स्वरूपाचे होईल याची आगार प्रमुखाने नोंद घ्यावी जर निवेदन देऊन सुद्धा यापुढे अपघात झाले तर भीमशक्ती तथा लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने ...

जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले

Image
जिल्हा परिषद ते नगरपालिका रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले  बीड शहर बचाव मंचाच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश   शैलेश फडसे यांनी प्राधान्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला बीड प्रतिनिधी : अनेक वर्षापासून जिल्हा परिषद ते नगरपरिषद रस्त्यालगतच्या नाल्या व रस्ता हेतूपुरस्सर पणे दुर्लक्षित ठेवण्यात आलेला होता. हा रस्ता मुद्दामच का दुर्लक्षित ठेवण्यात आला त्यालाही अनेक कारणे आहेत. गेल्या दोन वर्षापासून सतत बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेमध्ये आजवर घेतलेल्या सर्वच बैठकांमधून निवेदने देऊन सातत्याने या रस्त्या साठी पाठपुरावा केलेला आहे. वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची व रस्ता करण्याची मागणी लावून धरलेली आहे. नुकतेच बदलून गेलेले मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी मी हा रस्ता प्राध्यान्यक्रमाने मार्गी लावेल असे वारंवार आश्वासित केले होते. तरी या रस्त्याची व्यथा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजित दादा पवार यांच्यासमोरही मांडण्यात आली होती. बीड शहर बचाव मंचाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर व मुख्याधिकारी शैलेश खडसे यांनी के...

खालापूरी परिसरात हरणांचा धुमाकूळ, वनविभागाने तात्काळ लक्ष द्यावे-डॉ जितीन वंजारे

Image
  बीड प्रतिनिधी :-औंदाच्या वर्षी पावसाळा पुढे ढकलल्या कारणाने पीक पेरणी उशिरा झालेली आहे त्यातच काही शेतकऱ्यांच्या कडे थोडेफार पाण्याची उपलब्धता असल्याकारणाने वेळेवर कापसाचे उत्पन्न घेतले गेले आहे परंतु हरणाच्या कळपांनी राणच्या रान खाऊन टाकले आहेत. ठिबक सिंचनावर तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे अतोनात नुकसान हरणाचे कळप करत आहेत खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या परिसरामध्ये राहुल मुंडे यांनी सांगितले की माझ्या शेतातील सर्व पीक हरणांनी खाल्ले आहे. वनविभाग गाढ झोपेत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात मा तहसीलदार साहेब आणि वनविभाग कार्यालयाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचे आव्हाहन या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.

हक्काने हमालाकडून काम करुनघेणारे शासन मजूरी देण्यासाठी उदासीनराजकुमार घायाळ यांचे उपोषण सुरु

Image
बीड ( प्रतिनिधी   ) बीड जिल्ह्यातील 23 शासकिय धान्य गोदामा काम करणार्‍या हमालांना सहा महिन्यापासून मजूरी मिळाली नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. यासाठी 11 जुन ते 23 जून कामबंद आंदोलन केले तथापी मंत्रालयीन स्तरावर उदासीनता लक्षात घेवून कामबंद आंदोलन स्थगित करुन शासकिय धान्य गोदाम हमाल पंचायतने संघटनचे अध्यक्ष राजकुमार घायाळ यांच्या बेमूदत उपोषणाचा निर्णय घेतला तसे पत्र राज्याच्या पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव व जिल्हाधिकारी, बीड यांना देवून बीड सह राज्यात हमालीसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही तो तात्काळ द्यावा यासाठी आज दिनांक 1 जूलै 2026 पासून राजकुमार घायाळ यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरु केले राज्यात जेथे जेथे कंत्राटदारा शिवाय काम करुन घेतले जाते तेथे निधी उपलब्ध करुन दिलेला नाही त्यामूळे गेले 3 ते 6 महिन्यापासून हमालांना काम करुन मजूरी न मिळाल्याने हमालांची अवस्था दयनिय झालेली आहे. या बाबतच्या निवेदनातील पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.केलेल्या कामाची मजूरी तात्काळ मिळावी,औरंगाबाद हायकोर्टाने  तीन वर्षापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमा...