Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

नागसेन बुद्धविहार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती जाहीर

Image
परळी (प्रतिनिधी ) – महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त नागसेन बुद्धविहार परिसरातील उपासक-उपासिका यांची सभा दिनांक ११ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. ही सभा गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांनी मागील वर्षातील जमा-खर्चाचा ताळेबंद सभागृहात सादर केला. उपस्थितांनी त्यास एकमताने मान्यता दिली. यानंतर सर्व उपस्थितांच्या चर्चेनंतर व एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती महोत्सव समिती पुढीलप्रमाणे निवडण्यात आली –अध्यक्ष ए. एस. उजगरे(बापू),उपाध्यक्ष : ईश्वर धन्वे,सचिव : ॲड. के. आर. गाडे,सहसचिव : श्रीमंत उजगरे, कोषाध्यक्ष : उमाजी वाघमारे (बापू) या सभेला परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये बौद्धाचार्य डी. एन. पोटभरे, शारदाताई औसरमल, ॲड. डी. एम. विद्यागर, प्रा. टी. जी. कांबळे, ए. एस. उजगरे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. डी. ज...

हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही

Image
हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही मा. तहसीलदार बीड यांनी रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी. रस्ताच नसल्याने 50 ते 60 कुटुंब जगत आहेत बंदिवासात (बीड प्रतिनिधी ) :- बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील मौजे हिंगणी (खुर्द) या गावाचे 50 ते 60 कुटुंब सध्या हवालदिल झाले आहे आहेत. कारण या कुटुंबाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीला जाण्यासाठी जो रहदारीचा मुख्य रस्ता होता तो रस्ताच गट क्रमांक 404 मधील शेतकऱ्याने अडवला आहे. आणी रस्ता अडवल्यामुळे हे 50 ते 60 कुटूंब सध्या एकाद्या बंधीस्त जागेत कैद केल्यागत कैद आहेत. कारण यांचा येण्याजाण्यासाठीचा रस्ताच गट क्रमांक 404 मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यानी बंद केल्यामुळे या 50 ते 60कुटुंबाना बंदिस्त जागेत आणी बंदिस्त अवस्थेत राहावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती संबंधित बांध रस्ते, वस्त्यावर जाणारे रस्ते, पांदन रस्ते,सार्वजनिक वाद निर्माण असलेले रस्ते खुले करण्याची योजना आणली आहे. मात्र मौजे हिंगणी खुर्दच्या या गट क्रमांक 404 मधील रस्त्या बाबतीत ही योजना हवेतच विरून गेली की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आ...

पोलिस भरतीत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना बीड येथून आर्थिक मदत

Image
बीड (प्रतिनिधी ): बीड येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या दीपक भास्कर वाव्हळे (रा. मांडेखेल, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) यांच्या कुटुंबीयांना बीड येथील महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. या घटनेनंतर दीपक वाव्हळे यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी महामानव अभिवादन ग्रुप, बीड यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील नागरिकांनी प्रतिसाद देत एकूण २६,६०० रुपये इतकी रक्कम जमा झाली. ही रक्कम ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडेखेल येथे जाऊन वाव्हळे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वनपर भेटीद्वारे दीपक यांच्या आई-वडील व भावाकडे सुपूर्द केली. यावेळी कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत सर्वांनी त्यांना धीर दिला. समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन दाखवलेली ही मदतीची भावना ही सामाजिक एकतेचे व माणुसकीचे उदाहरण असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.

मतदारांनी २००२ च्या यादीशी लिंक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी

Image
मतदारांनी २००२ च्या यादीशी लिंक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती निजाम शेख यांची नागरिकांना सूचना बीड : मतदार यादी अचूक आणि अद्ययावत राहावी तसेच आगामी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांची माहिती २००२ मधील मतदार यादीशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदारांनी आपल्या प्रभागातील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेचे सभापती निजाम शेख यांनी केले आहे. मतदार यादीतील माहिती योग्य व अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा मतदार यादीत पत्ता बदल, नावातील चुका किंवा प्रभागातील बदल यामुळे मतदानाच्या वेळी मतदारांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा अडचणी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी आणि आवश्यक असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सध्या ...

महाजनवाडी येथील गायरान पेटलं की पेटवलं?; ग्रामस्थांची चौकशी करून कारवाईची मागणी

Image
लिंबागणेश : (दि.१२ ) बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे अहमदपूर ते अहिल्यानगर महामार्गालगत जनावरांच्या चाऱ्यासाठी संरक्षित असलेली सुमारे १२२ एकर गायरान जमीन गुरुवारी (दि.१२) सकाळी साडेअकराच्या सुमारास आगीत भस्मसात होण्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गायरानाला लागलेली आग नेमकी कशी लागली याबाबत ग्रामस्थांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. जवळील शेतात काम करत असलेले सुजित घरत यांच्या निदर्शनास आगीचे लोट येताच त्यांनी तात्काळ सहकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. वाढते तापमान, उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, सुकलेले गवत तसेच काही वेळा दारू पिणाऱ्या व्यक्तींनी पेटवलेल्या बिडी-सिगारेटमुळे गायरान जमिनीत आग लागण्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे सरपंच विश्वंभर गिरी यांनी सांगितले. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुजित घरत यांच्यासह महेश गिरी, शुभम घरत, सुधीर घरत, अक्षय आबदार, गणेश हिंदोळे, दादाराव घरत, रोहन घरत, दादा पठाण आदी ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने आणि मेहनतीने आग आटोक्यात आणली. आग इतरत्र पसरू...

वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे : वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाववन्यजीव धोक्यात; वन्यजीवांची तहान भागवा ! नियमितपणे पाणीपुरवठा करा – डॉ. गणेश ढवळे

Image
वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे : वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव वन्यजीव धोक्यात; वन्यजीवांची तहान भागवा ! नियमितपणे पाणीपुरवठा करा – डॉ. गणेश ढवळे बीड (दि.१२ ) – सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नैसर्गिक पाणीस्रोत असलेल्या तलाव, साठवण तलाव आणि धरणांतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी, सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत. यामुळे हरीण, मोर, लांडोर, वानर आदी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे तसेच गाव तलावांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वनविभागाने तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात नाही. काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचा तसेच अज्ञात...

आंबा-काजू शेती 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करा- शेतकरी राजा सामाजिक समीतीची मागणी

Image
 बीड प्रतिनिधी : सद्यस्थितीत बदलत्या हवामानामुळे सध्या राज्यातील आंबा-काजू हवामान बदलामुळे सुमारे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकरी वर्गावर हे ओढलेले पून्हा: एक नवं संकट आहे. या गंभीर समस्येला पाहता सरकारणे याला 'नैसर्गिक आपत्ती' जाहीर करून हेक्टरी ५ लाखांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी शेतकरी राजा सामाजिक समीतीचे अध्यक्ष रोहित धुरंधरे यांनी केली आहे.  यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस, दाट धुके आणि दव यामुळे आंबा व काजू बागांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणीतर काजू, आंब्याचा मोहर जळून गेला असून, काही भागांत फळांवर काळे डाग पडल्याने ती निकामी झाली आहेत. काजू बागायतदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर ईतर ठीकाणी सुद्धा आंबा पिक देखील अडचणीच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी आता पुर्णपणे कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येवुन ठेपला आहे. यामुळे शेतकरी राजा उपाशी आणि ईतरत्र तुपाशी हे कधीही आम्हाला मान्य होणार नाही. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगलाच पाहिजे यासाठी आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो...