Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

प्रताप समिंदरसवळे उभारता युवा नेता - राज जगतकर

Image
  एक काळ असा होता भीम नगर या परिसरामध्ये कबड्डीच्या खेळनेअनेक लोकांना वेड लावलेले होते या वेडापाई आपली गरिबीची परिस्थिती असली तरी कबड्डीच्या खेळामध्ये नैपुण्य मिळवणारे अनेक खेळाडू या परिसरामध्ये निर्माण झाली तो काळ हा दलित समाजाच्या परिवर्तनाचा व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचा व संघर्ष करण्याचाकाळ होता त्याच कालखंडामध्ये दलित पॅंथर नावाचं वादळ भारत देशामध्ये घोंगावत होते दलित समाजामध्ये आलेली मरगळझटकून या चळवळीने दलित माणसाला जागृत करण्याचं काम केलं या चळवळीने दलित समाजामधील स्वाभिमान जागृत करून अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याचं बळ या चळवळीने दिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने पीडित समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये अनेक युवक तन-मन धनाने या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते येथील समाज व्यवस्थेने धर्माच्या नावावर जातीच्या नावावर अनादी काळापासून दलित समाजावर केलेले अन्याय अत्याचारवृ त्त लढण्यासाठी तिचं बळ देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार झालेला लोकांनी उराशी कवटाळून येथील जातीयवाद धर्मवाद मातीत काढण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यामध्ये अनेक युवक सहभागी झाले ...

युवासेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे जल्लोषात संपन्न

Image
 राज्यमंत्री योगेशजी कदम यांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी मराठवाड्यातील युवा सेनेचे उल्हेखनीय काम पाहून त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. व इतर कार्यकर्त्यांनी मराठावाड्यातील युवासेनेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी. असे कौतुकातून बोलून दाखवले आहे. बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, युवासेना मार्गदर्शक व लोकसभा सदस्य मा. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली युवा सेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या भव्य दौऱ्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल-ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग ) मा. योगेशजी कदम साहेब,माजी मंत्री व जालना विधानसभा सदस्य मा.अर्जुन खोतकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेशजी सरनाईक,युवासेना सचिव किरणजी साळी, यवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा होता. राज्यमंत्री मा.योगेशजी...

लिंबागणेश येथे जगाला एकात्मतेची शिकवण देणारे संत कैकाडी महाराज यांची जयंती व रामनवमी उत्साहात साजरी

Image
लिंबागणेश :- ( दि.०६) मानवानो माणुसकीला जागा हा महामंत्र देणारे राष्ट्रसंत,महान तपस्वी संत राजाराम महाराज म्हणजेच कैकाडी महाराज यांची जयंती आणि रामनवमी आज दि.०६ रविवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रभु रामचंद्र आणि कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित रमेश गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन हरिओम क्षीरसागर  यांनी केले. डॉ.गणेश ढवळे यांनी आभार मानले.           संत कैकाडी महाराज यांच्या जीवनकार्याची महती वर्णन करताना प्रा .लेनाजी गायकवाड यांनी " संत कैकाडी कैकाडी ! "दरारा आसमंती!! कुळ -विठुचे लावुन! खनिल्या विषमतेच्या भिंती!!  कीर्तने ,प्रवचने, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन याद्वारे समाज प्रबोधन करून सर्व जगाला एकात्मतेची शिकवण देणारे महान तपस्वी कैकाडी महाराज यांचा जन्म राम नवमीला इ.स.१९०७ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म...

शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मानसोपचारासाठी येरवड्याला पाठवा ; वैद्यकीय उपचारासाठी मदतनिधी अजितदादांना पाठवणार :- डॉ.गणेश ढवळे

Image
लिंबागणेश:- ( दि.०६ ) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करत असुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन शेतक-यांना दिली जाणारी कर्जमाफी स्वतःच्या खिशातून देणार आहेत का?? त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन त्यांना मानसोपचारासाठी पुणे येथील येरवडा याठिकाणी भरती करण्यात यावे अशी मागणी करत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शेतकऱ्यांनी उपचारासाठी लागणारा वैद्यकीय मदतनिधी गोळा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठीमागे हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही.आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रूपयात पिक विमा योजना लागू केली आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते याविषयी शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे फळबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे आणि ५ ते १० वर्षं कर्जमाफी व्हायची वाट पहायची.तोपर्यंत कर्ज भरायचे नाही . तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात.त्या पैशाचं तुम्ही ...

राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सोहेल शेख याने द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्द खालापूरी येथे सत्कार संपन्न

Image
कुस्ती क्षेत्रात खालापूरी गाव अग्रगन्य अनेक पैलवान ह्या गावाने दिले- डॉ जितीन वंजारे बीड प्रतिनिधी :- खालापूरी हे गाव पैलवानाच गाव म्हणून ओळखलं जाते ह्या गावात अनेक पैलवान झाले आहेत आणि अजून घडतात. अनेक पैलवान कसरत करून सरकारी सेवेत पोलीस किंवा फौजी म्हणून रुजू झाले आहेत. गावामध्ये अनेक वस्ताद होऊन गेले आणि आता आहेतही त्यामध्ये कल्याण घोलप,दिगंबर गवळी,कैलास उगले,बाबासाहेब नाना डोके,इसाक भाई शेख,राजेंद्र परजने, सुहास खत्री,अशी अनेक वस्ताद आणि त्याने शेकडो पैलवान घडवली.त्यामध्ये लाल मातीतील तालीम तयार करून सपाट्या जोर अन बैठका काढून त्यांना योग्य मार्गदर्शन करून अनेक मल्ल या वस्तादानी घडवले. मी ही दिगंबर गवळी यांच्या तालमीत खेळलो पण शिक्षणा मुळे कुस्तीचा नाद सोडून दिला असे डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले.          खालापूरी गावाची आज पैलवान,पोलिस अन फौजीच गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. खालापुरी येथील सध्या टॉप टेन मध्ये सोहेल शेख, अमर गवळी, सोहम परजने, रवींद्र परजने अशी पैलवान आहेत जी चांगली खेळत आहेत. यांच्यात राज्यस्थरीय स्पर्धेत खालापूरी ...

लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने लोक रत्न सह विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारास प्रस्ताव पाठवावे :सखाराम पोहिकर

Image
बीड (प्रतिनिधी )लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी लोक रत्न पुरस्कारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्जांना राज्यस्तरीय समाज रत्न कृषिरत्न शिक्षक रत्न उद्योग रत्न सहकार रत्न साहित्यरत्न कलारत्न क्रीडा रत्न आरोग्यरत्न आदर्श पत्रकार आदर्श पोलीस आदर्श व्यक्ती आदर्श ग्रामपंचायत आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श शासकीय अधिकारी आदर्श कॉन्टॅक्टदार आदर्श वकील आदर्श शाळा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल महामाहीम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते लोक रत्न सह विविध रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत हा सोहळा संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे हा पुरस्कार सोहळा 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय महामाहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाठ कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री तथा खासदार संदिपान जी भुमरे पाटील माजी खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संदीप क्षीरसागर आमदा...

जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग यांच्या लेखी पत्रामुळे अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे सर

Image
परळी ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत च्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्य अभियंता,औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभाग प्रमुख यांच्या अधिनस्त कंत्राटदार कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन आणि इतर सोयी सुविधा मागील अनेक वर्षापासून देत नसल्याने आणि नगरपरिषद बीड आस्थापनेतील फक्त सफाई कंत्राटी कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे मागील 22 महिन्यापासून कामावरून कमी केले त्यांना नोकरीच्या व पगाराच्या सलग ते सह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे याकरिता 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोर "रोजंदारी मजदूर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी उपोषण सुरू केले होते; ते दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17 : 55 वा सलग अकराव्या दिवशी जिल्हा सह आयुक्त, ( प्र ) नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड त्र्यंबक कांबळे यांच्या सहीचे लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघटनेचे केंद्रीय महासचिव तथा कामगार नेते भा...