Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

बहिरवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याची विजय गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी कडे मागणी

Image
बीड ( प्रतिनिधी ) बहिरवाडी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष तथा निरीक्षक मनोज पाटील तसेच नगरसेवक राहुल गुरखुदे मागणी केली. जनप्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच स्थानी 1996 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्राथमिक सदस्यता तसेच विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना शासनाच्या योजना असतील शासकीय रुग्णालयातील गोरगरिबांच्या अडचणी असतील तसेच सामान्य नागरिकांची प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम केले असल्याने आपण या बहिरवाडी सर्कल मध्ये अनेक उत्तम काम सामान्य नागरिकांसाठी करण्याच्या उदात्त हेतूने आपण ही निवडणूक लढत असल्याचे यावेळी विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवली आहे.अशी मागणी सामान्य जनतेतून मागणी होत असून आपणही ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

चौसाळा शाळेच्या अंगणात पुन्हा अवतरले बालपण १९९१-९२ बॅचचा ऐतिहासिक स्नेहमेळावा

Image
बीड /​चौसाळा प्रतिनिधी :-वेळ कधीच थांबत नाही, पण काही क्षण मात्र आयुष्याच्या पाटीवर कायमचे कोरले जातात. असाच एक अविस्मरणीय सोहळा २८ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा, चौसाळा येथे संपन्न झाला. १९९१-९२ च्या १० वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तब्बल ३४ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय स्मृतींना उजाळा दिला. ​ ​शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या संसाराच्या आणि करिअरच्या व्यापात गुंतला होता. मात्र, आपल्या जुन्या सवंगड्यांना पुन्हा भेटावे, ही ओढ सर्वांना स्वस्थ बसू देत नव्हती. या बॅचच्या काही पुढाकारी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून प्रत्येकाचा शोध घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक साखळी तयार केली आणि बघता बघता सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एका छताखाली जमले. चौसाळा शाळेचे तेच मैदान आणि तोच परिसर पुन्हा एकदा जुन्या मित्रांच्या हास्याने दुमदुमून गेला. ​ ​या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या गुरुजनांची उपस्थिती. आयुष्याच्या कठीण वळणावर आपल्याला दिशा दाखवणाऱ्या आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी मोठ्या आदराने निमंत्रित केले होते. आपल्या जुन्या विद्य...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोर काळे यांची बोरफडी आदर्श ग्रामपंचायतला भेट

Image
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक २६/१२/२०२५ रोजी सायं.०७:०० वा बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या आदर्श ग्रामपंचायत बोरफडी येथे भेट देऊन गावात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात आली यामध्ये प्लास्टिक बंदी ,बचत गट ,घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, अनिमिया मुक्त गाव ,ग्रामपंचायत अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे यांसह इतर खासकरून उपक्रम राबवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यात ३७३९७ ग्रामपंचायत तिने सहभाग नोंदवला आहे .जि ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करील त्या घटकात त्या इंडिकेटर वरती काम करील त्यांना राज्यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.  यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय बक्षीसास पात्र ग्रामपंचायत होणार आहे त्याच धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत बोरफडीने देखील सहभाग नोंदवून सर्व इंडिकेटर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत बोरफडी च...

संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय

Image
संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येण्याएवजी गाडीने या व रस्त्याची वाट लागलेली पहा  पाटोदा (प्रतिनिधी ) चिचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांचा ५० वा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र एवढ्या मोठ्या व प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेला डांबराचा थर यामुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. हजारो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष हो...

केज प्रशासनाने रोहन गलांडे यांच्या उपोषणाचा निर्णय लावला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता?,उपोषणा ११/१२ वा दिवस, जबाबदार कोण- रोहन गलांडे पाटील

Image
  केज / प्रतिनिधी चिंचोली माळी ता.केज येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत.काही मागण्या मान्य झाल्या आहेत परंतु एक दोन मागणीसाठी रोहन गलांडे पाटील यांना जिवे मारायच ठरवले आहे असे चिन्ह दिसत आहेत कारण अमरण उपोषणाचा ११ वा दिवस आहे रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे व रोहन गलांडे यांनी जनतेला शेवटचा रामराम घ्यावा असे म्हटले आहे.कारण त्यांना बोलताना छातीवर दाब येत आहे,डोके दुखी उम्मघाम होत आहे,छातीत दुखायला सुरुवात झाली आहे,अंग थरथरत आहे एवढ्या वेदना होतात परंतु प्रशासनाला काही घेणे देणे नाही परंतु रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्या शिवाय अमरण उपोषण मागे घेणार नाही.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) ते संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरित सु...

अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली ! सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड :- ( दि.२७ )बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची ‘भागवत कथा’ आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरीत्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही ‘तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नेमकी परवानगी कोणी दिली? भंगार कुठे नेण्यात आले? त्याची नोंद कुठे आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. रात्रीच्या अंधारात भंगार उचललं; तीन दिवसांचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले. विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला. यासाठी दवाखान्य...

शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना

Image
शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना. बीडच्या त्या अतिप्रसंग झालेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबाने घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांची भेट..! मागील महिन्यात 5 तारखेच्या सायंकाळी 6 वाजता  नामक 11 वर्षाच्या मुलीला तिची आई ज्या घरी घर काम करण्यास गेली त्या घराच्या पार्किंग मधे खेळत असलेल्या जागेवरुन अपहरण सूरजकुमार खांडे या नाराधमाने केले.पुढे तिल सुनसान ठिकाणी नेऊन रात्री तीन वेळा तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला.मुलगी केवळ 11 वर्षाची चिमुकली व नराधम 23 वर्षाचा.मुलीच्या आई वडिलांनी रात्री मुलगी बेपत्ता असल्याने सगळीकडे शोधाशोध करून शेवटी शिवजी नगर पोलिस स्टेशन गाठले आणि मध्यरात्री 1:30 च्या सुमारास मिसिंगची तक्रार दाखल केली.नाराधामने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 च्या सुमारास मुलगी घरा बाहेर अनुन सोडली.घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला मात्र समाजात इज्जत जाईल या भीतीने कुटुंब शांत बसले. मात्र तो नराधम इथेच थाबला नाही तर त्या...