Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

आयुर्मंगलम् निवासी मूकबधिर विद्यालयात 81 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,

Image
आयुर्मंगलम् निवासी मूकबधिर विद्यालयात 81 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,  43 व्या " वाचाल तर वाचाल "वाचनालयाचा प्रारंभ..... ( महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचालचा उपक्रम )  बीड प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या वही पेन दानातून महामानव अभिवादन ग्रुपने आयुर्मगलम् निवासी मूकबधिर विद्यालय बीड येथे 81 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ( वही पेन) वाटप केले. तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचन संस्कृती वाढवण्याकरिता  प्रयत्न करत असलेल्या वाचाल तर वाचाल ह्या फिरते मोफत वाचनालयाच्या 43 व्या केंद्राचा 100 पुस्तकांचा संच देऊन प्रारंभ करण्यात आला. वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाला सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार  " गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस  प्राप्त सुहास पालीमकर यांनी सुहास्य नगरीचे रेषा संदेश या पुस्तकांच्या 6 प्रती भेट दिल्या त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक अलोक कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचाल तर वाचाल वाचनालया...

हडफडे दुर्घटना: थायलंडमध्ये लुथरा बंधू ताब्यात; "आरोपींना लवकरच गोव्यात आणले जाईल” — मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Image
हडफडे दुर्घटना: थायलंडमध्ये लुथरा बंधू ताब्यात; "आरोपींना लवकरच गोव्यात आणले जाईल” — मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्लब मालकासह सहा आरोपी अटकेत, तीन अधिकारीही निलंबित; तपासाला वेग पणजी प्रतिनिधी : थायलंडमध्ये लुथरा बंधूंना ताब्यात घेऊन गोवा सरकारने हडफडे नाईटक्लब आगी प्रकरणात एक मोठे यश मिळवले. कायदेशीर कारवाईचा कोणताही प्रयत्न टाळण्यासाठी त्यांचे पासपोर्ट देखील रद्द करण्यात आले आहेत. क्लबच्या एका मालकासह सहा आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे, तर तीन पोलिस अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.  आरोपींना लवकरच गोव्यात आणले जाईल: मुख्यमंत्री वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "गोवा पोलिसांचे एक पथक लवकरच थायलंडला जाईल आणि आरोपींना गोव्यात खटल्याला सामोरे जाण्यासाठी परत आणेल. गृह मंत्रालय, गोवा पोलिस आणि केंद्रीय एजन्सींच्या मदतीने, लुथरा बंधूंना लवकरच परत आणले जाईल. न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत...

भीमपुत्र म्हणा! सूर्यपुत्र नव्हे...! ही विनंती...!

Image
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी होते, त्यांनी अंधश्रद्धा मोडीत काढल्या, वाईट परपरांना नाकारले, पुराण कथा ठोकरीने उडवल्या, ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांना डायनामाइट लावले, रामायण आणि महाभारताची चिरफाड केली. ग्रहताऱ्यांना न मानता त्यांनी करोडो लोकांचा उद्धार केला. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर लेखक, कवी,शाहीर यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळ्या उपमा दिल्या जाऊ लागल्या. उदाहरणार्थ...प्रज्ञासूर्य, ज्ञानसूर्य, ज्ञानाचा अथांगसागर इत्यादी... 2) नंतरच्या पिढीतील लेखक, कवी, शाहीर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आंबेडकर, ज्यांना प्रेमाने सर्वजण भैय्यासाहेब म्हणत असत, त्यांना सूर्यपुत्र म्हणायला लागले. सूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले गेले, त्या अर्थाने सूर्यपुत्र. 3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना फक्त सूर्य म्हणत नाहीत, तर 'प्रज्ञासूर्य' म्हणतात, त्या अर्थाने भैय्यासाहेबांना प्रज्ञासूर्यपुत्र म्हणायला पाहिजे होते, परंतु फक्त सूर्यपुत्रच म्हटले गेले. ज्यांनी ही परंपरा सुरू केली त्यांना भैय्यासाहेबांबद्दल आदरच होता यात काही शंका नाही, परंतु प्र...

उमेद अभियानाच्या आंदोलनाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांचे सोबत आमदार श्री.अमोल दादा जावळे यांनी केली सकारात्मक चर्चा

Image
उमेद अभियानाच्या आंदोलनाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांचे सोबत आमदार श्री.अमोल दादा जावळे यांनी केली सकारात्मक चर्चा  माननीय आमदार श्री अमोल दादा जावळे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून रावेर यावल मतदारसंघातील महिलांसोबत केली प्रत्यक्ष चर्चा. बीड प्रतिनिधी ) दि. 11 डिसें. 2025  नागपूर अधिवेशन मध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत महिला व कल्याणकारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.  उमेद अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम शासन सेवेत सामावून घेणे.  सीआरपी सर्व केडर यांना ग्रामसखी पदावर मान्यता मिळून मानधन वाढ झाली पाहिजे.iJP, जिल्हा बाह्य बदली,  बचत गटांना भरभरून निधी शासनाने दिला पाहिजे. अशा विविध मागण्यांसह सर्व महिलांनी दादांकडे आग्रहाची मागणी केली  माननीय आमदार श्री अमोल दादा जावळे यांची उमेद मॉल ची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. तसेच उमेद च्या मागण्यांचे विविध प्रश्न दादांनी विधानसभेत आणि विधान भवनामध्ये वारंवार मांडलेले आहेत, तसेच नागपूर...

नाळवंडी ग्रामपंचायत: माहिती अधिकारातील कागदपत्रे लपवल्याने खळबळ; कारवाई न झाल्यास २५ जानेवारीपासून 'लोकशाही' मार्गाने आंदोलन- अशोक पठाडे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ): बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नाळवंडी ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. सार्वजनिक विकासकामांशी संबंधित माहितीच्या अधिकाराखाली (RTI) अर्जदारास कुशल बिलाची संचिका आणि मोजमाप पुस्तिका उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या गंभीर प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते अशोक पठाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी थेट पाटोदा पंचायत समितीच्या नरेगा कक्ष प्रमुखांच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पठाडे यांनी, "माहिती दडपून ठेवण्यात येत असल्याचा" गंभीर आरोप करत, ग्रामरोजगार सेवकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाईचा आदेश, पण अंमलबजावणी नाही! माहिती अधिकारातील कागदपत्रे लपवल्याच्या तक्रारीनंतर, संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राम रोजगार सेवकावर कारवाई करण्याचे पत्र काढले होते. मात्र, या पत्राला आता एक महिना उलटून गेला असूनही, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.कारवाईचा आदेश देऊनही अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि उदासिनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले...

उमेद अभियानातील महिला व कर्मचारी यांचे नागपूर अधिवेशनात पहिल्याच दिवशी लाखोंचा सहभाग

Image
नागपूर (प्रतिनिधी)(11 डिसेंबर 2025 ) उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कल्याणकारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 84 लक्ष ग्रामीण कुटुंबातील स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सहभागी आहेत. जवळपास 3 लक्ष 64 हजार 565 महिला उपस्थित यशवंत स्टेडियम मैदान नागपूर येथे स्वतःच्या मागण्याकरिता सहभागी झाले असून असंख्य महिलांनी पहिल्याच दिवशी अन्य त्याग केलेला आहे. तर भर उन्हात बसण्याची वेळ आलेली आहे.दुसऱ्या दिवशी याच महिला व कर्मचारी पाणी त्याग करण्याचा संकल्प घेतला असून तीव्र आंदोलन सुरूच राहणार आहेत. आज भर उन्हामध्ये शासन आपल्या मागण्या पूर्ण करनार का? अशा उमेदीने बसलेले आहे.जो पर्यंत शासन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यशवंत मैदान नागपूर येथे राहण्याचा असा निर्धार आपल्या महिलांनी केलेला आहे. प्रमुख मागण्या:-  उमेद अभियानाचा स्वतंत्र्य विभाग करून, सर्व कंत्राटी कर्मचारी कायम करावेत.. शासन सेवेत कंत्राटी कर्मचारी यांना समाविष्ट करून घ्यावे.  समुदाय संसाधन व्यक्ती सर्व केडर यांना ग्रामसखी पदावर मान्यता देऊन मानधन वाढ देण्यात ...

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पोखरी (घाट)चा सोहम मुळीक चमकला

Image
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पोखरी (घाट)चा सोहम मुळीक चमकला अमरावती–मुंबईच्या मल्लांना पराभूत करीत ‘कांस्य’ पदकाची कमाई; घोड्यावरून भव्य मिरवणुकीने स्वागत लिंबागणेश :– (दि.११ ) सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ यंदा ओरस येथे भव्य प्रमाणावर पार पडल्या. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील छोट्याशा पोखरी (घाट) गावातील कुस्तीपटू सोहम जीवन मुळीक याने शानदार खेळ करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अमरावती–मुंबईच्या अनुभवी मल्लांवर विजय १४ वर्षांखालील गटातील ४४ किलो वजनी गटात स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. राज्यातील पारंपरिक ताकदीची केंद्रे मानल्या जाणाऱ्या अमरावती व मुंबई येथील अनुभवी मल्लांना रोखत सोहमने तांत्रिक, आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचांवर अचूक उत्तर देत अखेर कांस्यपदकावर नाव कोरले. गावात जल्लोष—घोड्यावरून मिरवणुकीने स्वागत पदक जिंकल्यानंतर सोहम आपल्या जन्मगावात परतताच पोखरी (घाट) गाव उत...