Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ :- श्री बाजीराव ढाकणे

Image
बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील हजारो लाडक्या बहिणीची ई - केवायसी करणे बाकी होते या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. पण या योजने बाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना राज्य सरकारच्या वतीने यापूर्वी देण्यात आल्या होत्या. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करत या योजनेची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक तथा लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी केले होती.  कारण महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘ मुख्यमंत...

मायबाप सरकार स्मार्ट अंगणवाड्या करताना आमच्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी इमारत तरी द्या! – बेलगाववस्ती पालकांची मागणी

Image
लिंबागणेश (दि.18 ): राज्य शासनाकडून अंगणवाड्यांना १ लाख ६४ हजार ५६० रुपये किंमतीचे “स्मार्ट अंगणवाडी कीट” देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र बेलगाववस्ती सारख्या ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्या आजही पत्र्याच्या शेड, किरायाच्या रूम किंवा समाजमंदिरात भरतात. गेल्या ७–८ वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या बेलगाववस्ती अंगणवाडीतील १८ बालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न अद्याप कायम आहे. पालक सुमंत कोळपे म्हणाले, “पावसाळ्यात वादळ, वारा, गळती आणि विंचू-किड्यांची भीती वाटते. आमच्या वाट्याला तरी एक सुरक्षित इमारत मिळावी.” अंगणवाडी सेविका दीपाली फरतारे यांनी सांगितले की ग्रामस्थांनी वारंवार इमारतीची मागणी केली असून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, “स्मार्ट कीट चांगले आहे; पण इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्रथम इमारत निधी देणे आवश्यक आहे.” त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत पालकमंत्री अजितदादा पवार व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना डावलले,ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून तीव्र निषेध- सोनवणे

Image
बीड, दि. १७ नोव्हेंबर : बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी चळवळीतील समर्पित व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून व (sc) चे राखीव आरक्षण गिळण्यास जातदांडगे व प्रस्थापित राजकारण्यांकडून राजकीय अस्पृश्यता पाळली जात असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅंथर सेनेने केला आहे.ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शेकडो वर्ष सामाजिक अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या वर्गाला आजही जात दांडग्या व प्रस्थापित राजकारण्याकडून बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना राजकीय वेशीबाहेर ठेवून खऱ्या अर्थाने राजकीय अस्पृश्यता पाळली जात आहे. या गोष्टीचा आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो.”या निवेदनामुळे जिल्ह्यातील निवडणूक वातावरण ढवळून निघाले असून आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पॅंथर सेना येत्या काही दिवसांत स्वतंत्रपणे किंवा इतर आंबेडकरी संघटनांसोबत संयुक्त आघाडी उभी करून...

बीड वार्ड क्र. 12 : सौ. राजश्री अशोक येडे यांची उमेदवारी दाखल

Image
बीड वार्ड क्र. 12 : सौ. राजश्री अशोक येडे यांची उमेदवारी दाखल  आम आदमी पार्टीचा “झाडू” यंदा नगरपरिषदेत जोरदार फिरणार बीड नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक 12 मधून आम आदमी पार्टीच्या सौ. राजश्री अशोक येडे यांनी महिलांच्या नेतृत्वाची ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वच्छ प्रशासन, पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता आणि महिला विषयक प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला. सौ.राजेश्रीअशोक येडे या आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे यांच्या पत्नी असून, पक्षाच्या मजबूत नेतृत्वाखाली नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामध्ये— नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वृषाली जायभाये शहराध्यक्ष नितीन जायभाये  जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण शहर सचिव मिलिंद पाळणे सामाजिक कार्यकर्त्या किस्किदाताई पांचाळ लीगल सेल प्रमुख एड. नेहरकर —यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता. हजर कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात पक्षाच्या झाडू...

अहिल्यानगर नाव बदललं… पण पाटोदा–चुंबुळी मार्गावरचे बोर्ड अजूनही ‘अहमदनगर’; प्रवाशांची दिशाभूल, प्रशासनाचा गलथान कारभार उघड

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ असे अधिकृतपणे जाहीर करून अनेक वर्ष झाले असतानाही पाटोदा–चुंबुळी महामार्गावरील दिशादर्शक फलकांवर अजूनही ‘अहमदनगर’ हे जुने नावच दिसत असल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत आहे.या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना नेमकी दिशा कोणती, आणि कोणता मार्ग योग्य हे समजत नसल्याने सतत संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होत असून अनेकांना चुकीच्या मार्गावर जावे लागत असल्याची तक्रार समोर येत आहे.स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमध्ये “जिल्ह्याचे नाव बदलले, सरकारी आदेश आले… पण बोर्ड बदलण्याची प्रशासनाला फुरसत नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. जुने नाव असलेले फलक अद्याप बदलले न गेल्याने प्रशासनाचा गलथान व बेफिकीर कारभार उघड झाल्याची टीका होत आहे.या संदर्भात संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन दिशादर्शक फलकावरील नाव अद्ययावत करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

'नगराध्यक्षा' पदासाठी आज सौ.वृषालीताई नितीन जायभाये यांचा "आप"च्या झाडू या अधिकृत चिन्हावर अन्य 11 उमेदवारांसह अर्ज दाखल

Image
बीड प्रतिनिधी :-'मरहूम अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर बचाव मंच' च्या पुरस्कृत 'आप'च्या अधिकृत उमेदवार सौ. वृशालीताई नितीन जायभाये यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी व वार्ड क्रमांक 13 तील एस सी महिला राखीव या जागेसाठी 'आम आदमी पार्टीच्या' "झाडू" या अधिकृत चिन्हावर नगरसेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांसह नामनिर्देशन पत्र/अर्ज दाखल केला. यावेळी 'मरहुम अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर मंचाचे' निमंत्रकअध्यक्ष प्रवर्तक नितिन जायभाये हे प्रमुख उपस्थितीत होते. बीड नगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक प्रक्रिया चालू आहे. बीड शहर बचाव मंच व त्यांचे मित्र पक्ष यांनी मिळून नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा निश्चित निर्णय घेऊन डाव्या विचारांच्या सर्व पक्ष संघटनांना सोबत घेत "अतहर बाबर साहब शहर विकास आघाडी" तयार केली आहे. तरी पहिल्या 150 दिवसांमध्ये बीड नगरपालिका शहरातील नागरी समस्या  हमीने सोडवण्यासाठी विकासाच्या दृष्टीने कशी दिशा घेणार आहे व "मरहूम अथहर बाबर साहब यांच्या स्वप्नातील बीड...

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश

Image
बीड (प्रतिनिधी) दि.१६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री, भाजप नेत्या ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी (दि.१६) भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस फडणवीस, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी क्षीरसागर दाम्पत्याचे भाजपात स्वागत केले. यावेळी भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे बीडमध्ये भाजपची ताकद वाढणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळणार आहे.