Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

केज प्रशासनाने रोहन गलांडे यांच्या उपोषणाचा निर्णय लावला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता?,उपोषणा ११/१२ वा दिवस, जबाबदार कोण- रोहन गलांडे पाटील

Image
  केज / प्रतिनिधी चिंचोली माळी ता.केज येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत.काही मागण्या मान्य झाल्या आहेत परंतु एक दोन मागणीसाठी रोहन गलांडे पाटील यांना जिवे मारायच ठरवले आहे असे चिन्ह दिसत आहेत कारण अमरण उपोषणाचा ११ वा दिवस आहे रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे व रोहन गलांडे यांनी जनतेला शेवटचा रामराम घ्यावा असे म्हटले आहे.कारण त्यांना बोलताना छातीवर दाब येत आहे,डोके दुखी उम्मघाम होत आहे,छातीत दुखायला सुरुवात झाली आहे,अंग थरथरत आहे एवढ्या वेदना होतात परंतु प्रशासनाला काही घेणे देणे नाही परंतु रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्या शिवाय अमरण उपोषण मागे घेणार नाही.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) ते संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरित सु...

अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली ! सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड :- ( दि.२७ )बीड नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची ‘भागवत कथा’ आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरीत्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही ‘तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नेमकी परवानगी कोणी दिली? भंगार कुठे नेण्यात आले? त्याची नोंद कुठे आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. रात्रीच्या अंधारात भंगार उचललं; तीन दिवसांचा प्रकार मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले. विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला. यासाठी दवाखान्य...

शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना

Image
शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना. बीडच्या त्या अतिप्रसंग झालेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबाने घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांची भेट..! मागील महिन्यात 5 तारखेच्या सायंकाळी 6 वाजता  नामक 11 वर्षाच्या मुलीला तिची आई ज्या घरी घर काम करण्यास गेली त्या घराच्या पार्किंग मधे खेळत असलेल्या जागेवरुन अपहरण सूरजकुमार खांडे या नाराधमाने केले.पुढे तिल सुनसान ठिकाणी नेऊन रात्री तीन वेळा तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला.मुलगी केवळ 11 वर्षाची चिमुकली व नराधम 23 वर्षाचा.मुलीच्या आई वडिलांनी रात्री मुलगी बेपत्ता असल्याने सगळीकडे शोधाशोध करून शेवटी शिवजी नगर पोलिस स्टेशन गाठले आणि मध्यरात्री 1:30 च्या सुमारास मिसिंगची तक्रार दाखल केली.नाराधामने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 च्या सुमारास मुलगी घरा बाहेर अनुन सोडली.घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला मात्र समाजात इज्जत जाईल या भीतीने कुटुंब शांत बसले. मात्र तो नराधम इथेच थाबला नाही तर त्या...

महावितरणच्या बीड विभागात ‘अंधेर नगरी चौपट राजा’; सामान्यांची कामे रखडली, गुत्तेदारांसाठी मात्र पायघड्या

Image
बीड :  महावितरणच्या संचलन व सुव्यवस्था (सं.व.सु.) विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे रामभरोसे चालला आहे. सामान्यांच्या फाईल्सवर धुळ साचत असताना, टक्केवारीचे गणित जुळणाऱ्या गुत्तेदारांची कामे मात्र अर्ध्या रात्रीपर्यंत सुरू असल्याचे विदारक चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. "अंधेर नगरी चौपट राजा" अशीच काहीशी स्थिती या कार्यालयाची झाली असून, अधिकारी नियम धाब्यावर बसवून बेफाम वागत आहेत. ओळखपत्राचा पत्ता नाही; अधिकारी की दलाल ओळखणे कठीण! राज्य शासनाचे कडक आदेश असतानाही, या कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिस्तीचे वावडे असल्याचे दिसते. कार्यालयात ओळखपत्र (ID Card) लावणे बंधनकारक असताना, वरिष्ठ अधिकारीच नियमांना केराची टोपली दाखवत आहेत. जेव्हा 'राजा'च नियमांचे पालन करत नाही, तेव्हा कर्मचाऱ्यांवर वचक राहणार कसा? यामुळे कार्यालयात आलेला सामान्य नागरिक, समोर बसलेली व्यक्ती अधिकारी आहे की दलाल, याच संभ्रमात पडत आहे. टक्केवारीसाठी रेड कार्पेट; सामान्यांना मात्र 'तारीख पे तारीख' मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयात भ्रष्टाचाराचा...

‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू

Image
‘अंमली पदार्थांमुक्त गोवा’कडे निर्णायक पाऊल; राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली ३० दिवसांची मोहीम सुरू सरन्यायाधीश सूर्यकांत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ पणजी, २७ डिसेंबर, २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या नेतृत्वाखाली गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने 'अंमली पदार्थांचा गैरवापर - अंमली पदार्थ: समाजासाठी एक धोका' या विषयावर ३० दिवसांची विशेष जनजागृती मोहीम सुरू केली. ही मोहीम मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात, भारताचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत, तसेच वरिष्ठ न्यायाधीश आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.  हा उपक्रम न्यायपालिका आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांचे प्रतीक आहे, ज्याद्वारे जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसन याद्वारे अंमली पदार्थांच्या गैरवापराचा सामना केला जाईल. गोव्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या चिंतेवर आणि त्याचा तरुण, कुटुंबे व समाजावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्य...

बीड नगरपरिषदेतील भाजपच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई क्षीरसागर

Image
बीड (प्रतिनिधी ) दि.२६ : बीड नगरपरिषदेतील भाजपच्या नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांची निवड शुक्रवारी (दि.२६) करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निवडीच्या ठरावाची पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे देण्यात आली.  नगरपरिषदेत भाजपचे १५ नगरसेवक विजयी झाले असून भाजपने प्रभावी कामगिरी करत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आता गटनेते पदाची जबाबदारी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह नेते, पदाधिकारी, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बीडची सह्याद्री–देवराई सुरक्षित आगीच्या बातम्या अफवा ठरल्या लागल ; अफवांवर विश्वास ठेवू नका – डॉ. गणेश ढवळे

Image
बीड | प्रतिनिधी (दि. २६) गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही दैनिके व युट्यूब चॅनेलवर “सह्याद्री–देवराई येथे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णतः चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात सह्याद्री–देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे २० गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे, झाडांचे नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती आहे. देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व वृक्षप्रेमी श्रीकृष्ण उबाळे यांनी सह्याद्री–देवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आग आटोक्यात आणणाऱ्या वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शेख अकबर, जयराम काळे, वनरक्षक अशोक केदार, विजय केदार, पद्माकर मस्के, अर्जुन साळुंखे, मधुकर नैराळे व विलास नवले यांचा समावेश होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये तसेच प्रसारमाध्यमांनी खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्...