Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

Image
लिंबागणेश : (दि. ०७) भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी, त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती आज शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी प्रास्ताविक केले, तर सुरेश निर्मळ यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान" हा ग्रंथ माता रमाईंना अर्पण केला होता. बाबासाहेबांनी रमाईंच्या त्यागाबद्दल लिहिताना म्हटले होते — "रमा, तू नसतीस तर मी भीमाचा भिमराव आणि भिमरावाचा बाबासाहेब होऊ शकलो नसतो." डॉ. ढवळे यांनी माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत सांगितले की, लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेली रमाई, सासरीही अनेक आ...

अंबाजोगाई ग्रासलॅड सफारी” चा शुभारंभ

Image
         बीड, दि. 06   :बीड वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय परळी मध्ये जैवविविधता संवर्धन व रोजगार निर्मिती या उद्देशाच्या अनुषंगाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या वन विभागाच्या डोंगराळ, खुरट्या व गवताळ वनक्षेत्रात “अंबाजोगाई ग्रॅसलँड सफारी” या उपक्रमाची दिनांक 26. 1. 2026 रोजी विधानसभेच्या सदस्या नमिता मुंदडा अंबाजोगाई, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अंबाजोगाई नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, विभागीय वनाधिकारी अमोल गरकळ, विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीनिवास लखमावार, अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी दीपक वांजळे, अंबाजोगाई तहसीलदार विलास तरांगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी वनक्षेत्रात महात्मा गांधी प्राणी संग्रहालय सोलापूर येथील 33 काळवीट जातीच्या हरणास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.        परळी वनपरिक्षेत्रा अंतर्गत अंबाजोगाई शहरालगत वन विभागाचे एकूण १३२८.०६ हे.आर सलग राखीव नक्षत्र आहे. सदरचे क्षेत्र हे डोंगराळ खुरट्या व गवताळ प्रकारचे आहे यामध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी जसे की हरिण, लांडगा, कोल्हा, बीबट, तडस इत्यादी प्रा...

माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादराजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय

Image
माता रमाई जयंतीनिमित्त तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद राजलक्ष्मी जाधव प्रथम, मानसी शेरकर द्वितीय, रिया जगतकर तृतीय परळी वैजनाथ (प्रतिनिधी ): माता रमाई जयंती उत्सव समिती, पंचशील नगर परळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरी शालेय व महाविद्यालयीन निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक जाणीव, विचारप्रवर्तक लेखन व अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ही स्पर्धा विशेष लक्षवेधी ठरली. या स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही निबंध स्पर्धा मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित घेण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गटसाधन केंद्र, परळी यांनीही मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजलक्ष्मी विकास जाधव (माऊंट लिटरा झी स्कूल, परळी) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक मानसी नवनाथ शेरकर (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मोहा) हिने मिळवला, तर तृतीय क्रमांक रिया रावसाहेब जगतकर (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला (कनिष्ठ) महाविद्यालय, पर...

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर(१२८ वी जयंती विशेष)

Image
  भारतीय समाजक्रांतीच्या इतिहासात भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जसे तेजस्वीपणे झळकते, तसेच त्या क्रांतीच्या मूक शिल्पकार म्हणून त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे.माता रमाई म्हणजे केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हे, तर त्यांनी उभारलेल्या सामाजिक क्रांतीच्या वाटेवर शांतपणे, निष्ठेने आणि त्यागाने साथ देणारी महान स्त्री होती. माता रमाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला. अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. शिक्षणाच्या फारशा संधी नसतानाही त्यांनी जीवनातून मिळणाऱ्या अनुभवांतून प्रगल्भता, संयम आणि सहनशीलता आत्मसात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला संघर्षांचे, उपेक्षेचे आणि कठोर वास्तवाचे अनेक पदर लाभले; मात्र माता रमाई यांनी कधीही तक्रार केली नाही, उलट त्या प्रत्येक संकटात बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबासाहेबांचे शिक्षण, संशोधन, चळवळी, परदेशातील वास्तव, आर्थिक अडचणी—या सर्व काळात रमाई यांनी संसाराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अनेकदा उपाशीपोटी राह...

अनेक वर्षांपासून दसऱ्याला मिळणारा आशीर्वाद आज हरपला-माजी मंत्री धनंजय मुंडे

Image
अनेक वर्षांपासून दसऱ्याला मिळणारा आशीर्वाद आज हरपला-माजी मंत्री धनंजय मुंडे जगतकर परिवाराचे मुंडे यांच्याकडून सांत्वन परळी वैजनाथ | प्रतिनिधी जगतकर कुटुंबीयांना सांत्वन भेट देण्यासाठी आलेले माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी भावूक होताना वरील उद्गार काढले. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा आमदार मुंडे यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. वैद्यनाथ बँकेचे संचालक तसेच महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद जगतकर यांच्या मातोश्रींचे मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले होते. आपल्या अत्यंत निकटवर्तीय सहकारी मित्राच्या दुःखात धीर देण्यासाठी आमदार मुंडे यांनी आज जगतकर कुटुंबीयांची भेट घेतली. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जगतकर कुटुंबीयांच्या घरी भेट दिल्यानंतर ते मातोश्रींचे आवर्जून दर्शन घेत असत. आज त्या आठवणीने ते विशेष भावूक झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह सर्व नातेवाईक व आप्तेष्टांचीही आवर्जून भेट घेत सांत्वन केले.

शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

Image
शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे परळीतील महापशुधन एक्स्पोच्या तयारीचा आढावा (यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव) मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टिने प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...

शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत

Image
शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत बोअर बंद – पाण्याविना अंत्यसंस्कार | रस्ता अरुंद – काटेरी झुडपांचा विळखा | न. प. प्रशासन ढिम्म परळी प्रतिनिधी :परळी शहरातील परिसरातील सर्वात मोठी असलेली शांतीवन सार्वजनिक स्मशानभूमी सध्या नगरपालिकेच्या बेजबाबदार व निष्क्रिय कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. तब्बल सात एकर क्षेत्रफळात उभारलेली ही स्मशानभूमी आज दुर्लक्ष, असुविधा आणि अव्यवस्थेचा अड्डा बनली असून मृतांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणीला परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी उभारलेल्या ओट्यांवर आजतागायत लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. परिणामी, अंत्यविधी करताना नागरिकांना जीव मुठीत धरून विधी करावे लागत असून प्रशासनाची ही गंभीर बेपर्वाई कधी जीवघेणी ठरणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत काटेरी झाडे, झुडपे व गवत प्रचंड प्रमाणात वाढले असून प्रवेशद्वारापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत ...