Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा – नगरसेवक संतोष जाधव

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच डाळिंब, आंबा आदी फळबागांनाही मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेले उत्पन्न पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे शेतकरी आधीच विविध संकटांचा सामना करत असून आता अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः फळबाग धारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना त्वरित मदत मिळणे अत्यावश्यक आहे.दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकरी व फळबाग धारकांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी अशी नगरसेवक संतोष जाधव यां...

गारपिटीने कलिंगड पिकाचा चुराडा; आ . संदिप क्षीरसागर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची स्थळ पाहणी !शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी

Image
   लिंबागणेश:- ( दि.२०)बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बुधवारी व गुरुवारी २ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी (घाट) येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी आज, शुक्रवार (दि.२०) रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडीत नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोतदार, कृषी सहायक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभिषण मुळीक उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त कलिंगड पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की, दीड एकर क्षेत्रावर सुमारे दीड लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे. या प...

नववर्षानिमित्त स्वराज्य संघटनेची नवचैतन्यपूर्ण वाटचाल; कार्यकर्त्यांमध्ये उसळली नवी ऊर्जा

Image
मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वराज्य संघटनेने नव्या जोमाने आणि कालीका मातेच्या आशीर्वादाने आपल्या पुढील वाटचालीची सुरुवात केली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज नाशिक दौर्‍यावर आले असता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.  महाराजांच्या स्वागतासाठी युवकांचा मोठा गराडा जमला होता, तसेच त्यांच्या ताफ्यामुळे काही ठिकाणी वाहतूकही प्रभावित झाल्याचे चित्र दिसून आले. यादरम्यान कालीका माता मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. पुढे झालेल्या बैठकीत स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.  या बैठकीत संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि कार्यात अधिक जोमाने पुढे जाण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. विशेषतः, जे कार्यकर्ते इतर पक्षांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्याने ऊर्जा मिळाल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या भाषणात सध्याच्या गोंधळलेल्या ...

लिंबागणेशमध्ये “शेतकरी सहवेदना दिवस” पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली

Image
लिंबागणेश (दि.१९) – शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात “शेतकरी सहवेदना दिवस” पाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती आदर व सहवेदना व्यक्त करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेला यावर्षी ४० वर्षे पूर्ण झाली असून ती शेतकरी आत्महत्येची पहिली नोंद म्हणून ओळखली जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार देशात दररोज सुमारे ४५ तर महाराष्ट्रात सुमारे १५ शेतकरी आत्महत्या करतात. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात २५६ आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या दीड महिन्यातच ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तु कायदा, जमिन अधिग्रहण कायदा हे नरभक्षी शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, तसेच प्रशासनाच्या निष्क्...

महसूल विभागाची ढिलाई; पाटोद्यातील ६६ शेतकरी ‘पीएम किसान’पासून वंचित शेतकऱ्यांचा संताप

पाटोदा (प्रतिनिधी ) लँड सीडिंग प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा व जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या महसूल विभागाच्या कारभारामुळे पाटोदा तालुक्यातील तब्बल ६६ शेतकरी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ७/१२ उताऱ्यांतील नोंदी अद्ययावत करण्यास टाळाटाळ, तांत्रिक कारणांची आड घेऊन कामे प्रलंबित ठेवणे, तसेच जबाबदारी झटकण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.दरम्यान, महसूल व कृषी विभागांच्या ढकलाढकलीत शेतकरी भरडले जात आहेत. शेतकऱ्यांननी तहसिल व कृषी “कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा हप्ता जमा होत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे राम आदोडे यांचा सचिव पदाचा राजीनामा

Image
परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) – भीमनगर येथील रहिवासी राम बाबासाहेब अदोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. दिनांक 9 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत अदोडे यांची सर्वानुमते सचिवपदी निवड करण्यात आली होती. मात्र, निवड झाल्यानंतर समितीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला. समितीचे अध्यक्ष व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून, तसेच राजकीय पाठबळ असलेल्या काही नेत्यांच्या प्रभावामुळे, जयंती उत्सवाच्या नियोजनात आपल्याला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप अदोडे यांनी केला आहे. “समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती भव्य आणि उत्कृष्ट पद्धतीने साजरी व्हावी, या उद्देशाने मी कोणत्याही स्वार्थाशिवाय सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मला विश्वासात घेतले जात नसल्याने आणि वेगळेच वातावरण निर्माण झाल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,” असे अदोडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे जय...

गेवराई तालुक्यात पुरवठा विभागाची धडक कार्यवाही एकूण १२ सिलेडर केले जप्त

Image
सखाराम पोहिकर गेवराई तालुका प्रतिनिधी जागतिक युद्ध परिस्थिती विचारात घेता घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय तसेय तालुकास्तरीय पथक गठीत करण्यात आलेले होते . त्यानुसार गेवराई तालुक्यात बीड बायपास ते जालना बायपास परिसर व शहरातील इतर भागात अचानक तपासणी केली असता . एकूण १२ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत . वरीते कार्यवाही माननीय श्री . शिवकुमार स्वामी जिल्हा पुरवठा अधिकारी बीड . श्री संदीप खोमणे तहसीलदार गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे असे श्री नायब तहसिलदार गजानन मोरे यांनी सांगितले . सदर कार्यवाहीत श्रीकृष्णा मिसाळ . सचिन जाधव . मनोज पवार . सुधीर जोशी . गजानन वादे हे उपस्थितीत होते . तसेच यापुढे देखील सदर मोहीम सुरूच राहील त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना घरगुती गॅसचा वापर न करता पर्यायी व्यवस्था करण्याबाबत पुरवठा विभागाने आवाहन केले आहे असेही श्री गजानन मोरे नायब तहसिलदार यांनी आमच्या प्रतिनिधी शी चर्चा करताना आसे सांगितले आहे