Posts

News23marathi

वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन

Image
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन .   पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर उतरली. या महिन्यापासून आता घरगुती वीज ग्राहकाला साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे.१०० ते ३०० युनिट पर्यंत एका युनिट मागे १रुपये ४५ पैसे अशी समायोजन आकारात वाढ होणार आहे.त्यामुळे ज्यांना १००० रु बिल येत होते त्यांना १२०० रु बिल येईल. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले , पेट्रोल , गॅस सिलिंडर दरवाढ या मुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठ्ठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घ्या अश्या मागणीची निवेदने मुख्य्मान्त्रांच्या नावे स्थानिक जिल्हाधिकारी / तहसीलदार यांना आप तर्फे देण्यात आली.   'महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २०% पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आह...

डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गोवा सरकार आणि स्टारलिंक यांच्यात सामंजस्य करार

Image
पणजी प्रतिनिधी : गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आज राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार (MoU) केला.  हा सामंजस्य करार आल्तिन्हो येथील मुख्यमंत्री निवासस्थानी करण्यात आला. गेल्या महिन्यात स्टारलिंकच्या अधिकाऱ्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यासाठी हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. चर्चेपासून करारापर्यंतची ही जलद प्रगती, विशेषतः दुर्गम भागांमधील कनेक्टिव्हिटीची दरी कमी करण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे दर्शवते.  दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होणार:- मुख्यमंत्री या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या सामंजस्य करारामुळे दुर्गम भागात विश्वसनीय हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट उपलब्ध करून गोव्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. यामुळे शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक संस्थांमध्ये चांगल्या सेवांना पाठिंबा मिळेल आणि आपत्कालीन प्रतिसादाला बळकटी मिळेल.”  यावेळी माहित...

धानोरा येथील जनता जुनियर कॉलेज मध्ये कै.धोंडीराम (दादा) बांदल यांची पुण्यतिथी साजरी

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :              आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. धोंडीराम गणपत बांदल (दादा) यांची ( २५ ) वी पुण्यतिथी सालाबाद प्रमाणे याही वर्षी धानोरा ,तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील जनता जुनिअर कॉलेज मध्ये साजरी करण्यात आली .  या प्रसंगी,संस्थेचे सचिव/ आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती विजयकुमार बांदल (आण्णा) उपस्थित होते .  तसेच मुख्याध्यापक-प्राचार्य ढोबळे सर, उपमुख्याध्यापक सय्यद ए डी सर , उपप्राचार्य तिपुळे सर, तसेच माध्यमिक विद्यालयाचे व जुनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी या प़सगी उपस्थित होते .

३५ हजार फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा अनोखा वाढदिवस; एअर इंडियाने दिला अविस्मरणीय अनुभव

Image
नाशिक : आकाशात ढगांच्या वर, तब्बल ३५,००० फूट उंचीवर जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि रोमांचक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्राहकांना नेहमीच खास आणि अविस्मरणीय क्षण देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाने यावेळीही आपल्या वेगळेपणाची प्रचिती दिली. आपण अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे केले असतील, मात्र आकाशात, ढगांच्या वर, थंडगार वातावरणात हवाई सुंदरींसोबत वाढदिवस साजरा होणे हे खरोखरच स्वप्नवत अनुभव असतो. असे स्वप्नातील क्षण प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी नाशिकमधील युवा नेतृत्व डॉ. रुपेश नाठे यांना मिळाली.  या विशेष प्रसंगी हवाई सुंदरींनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले एअर इंडियाचे अभिनंदन पत्र डॉ. नाठे यांना सादर केले. “तुमचा वाढदिवस अविस्मरणीय ठरो आणि येणारे वर्ष सुख-समृद्धीचे जावो,” अशा मनःपूर्वक शुभेच्छा या पत्रातून देण्यात आल्या. याशिवाय, डॉ. नाठे यांच्यासाठी विशेष शुगर-फ्री केक आणि फ्रूट ज्यूसचे आयोजन करण्यात आले. ३५,००० फूट उंचीवरच एक आगळीवेगळी ‘आकाशातील पार्टी’ रचण्यात आली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  या संपूर्ण आयोजनाचे श्रेय हवाई सुंद...

माजी सैनिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयावर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे गंभीर आरोप

Image
बीड (प्रतिनिधी ) : माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी केला आहे. कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना बगल देत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पिडीत माजी सैनिकांवर अन्याय केल्याचा दावा त्यांनी केला. वाघमारे यांनी सांगितले की, माजी सैनिकांच्या तक्रारी सोडवण्याऐवजी त्यांचीच पडताळणी व अडवणूक केली जाते. अमृत जवान सन्मान योजना वेळेत राबवण्यातही दुर्लक्ष करण्यात आले असून, याबाबत तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. तसेच, असंवैधानिक समित्या स्थापन करून काही माजी सैनिकांना मोहरा बनवत अन्यायकारक कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडूनही आपल्यावर अन्याय होत असून, यासंदर्भात न्यायालय, मानवाधिकार आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी सैनिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी दिला आहे.

वडगाव ढोक येथे श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या पत्नी यांचा गावकऱ्यावतीने सत्कार व होलार समाज दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न

Image
गेवराई (१९ ) वडगाव ढोक तालुका गेवराई येथील प्रसिद्ध विद्रोही शाहीर श्री मोहन आविळे व त्यांच्या पत्नी या दांपत्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व होल्हार समाज दिनदर्शिका प्रकाशन गावकरी मंडळांच्या वतीने करण्यात आले.        सविस्तर वृत्त असे की प्रथम थोर स्वातंत्र्य सैनिक विदा आविळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वडगाव ढोक येथील विद्रोही शाहीर यांनी ठाणे येथे पार पडलेल्या होलार समाज मेळाव्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले श्री शाहीर मोहन आविळे व त्यांच्या विविध पत्नी यांनी ठाणे येथे संपन्न झालेल्या होलार समाज मेळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून आपल्या जिल्ह्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवला अशा या शाहिरांचा सत्कार वडगाव ढोक गावकरी मंडळींच्या वतीने आज करण्यात आला व होलार समाज दिनदर्शकेचे प्रकाशन ही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी चळवळीमध्ये काम करणारे गावातील युवक गावकरी मंडळी महिला समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे.

Image
प्रामार्थ केल्याने सुख,समाधान प्राप्त होते.मा.आ.केशवराव आंधळे. येवता :प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१९ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे प्रथमच जीवाची वाडी -पंढरपुर पायी दिंडी सोहळा प्रारंभ सुरू करण्यात आला,प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार श्री. केशवराव(दादा)आंधळे म्हणाले की यावर्षी प्रथमच जीवाची वाडी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा सुरू होत आहे.मनुष्याने प्रामार्थ केला तर खरोखरच सुख आणि समाधान मिळते.स्वातंत्र्य सैनिक कै.भगवान काळे यांच्या आत्म्यास खरोखरच शांती लाभेल असे धार्मिक उलखनीय कार्य त्यांचे तिन्ही चिरंजीव पद्माकर,आण्णासाहेब व नामदेव यांनी केले आहे.लागलीच ह.भ.प.श्री.जालींदर महाराज नेहरकर यांचे किर्तनाचे आयोजन केलेले असुन या सुवर्ण संधीचा भावीकांनी लाभ घेण्याचे आव्हान केले,काळे कुटूंब व ग्रामस्थांनी आमदार आंधळे साहेबांचा हृदय सत्कार करून त्यांचे आभार मानले.

कुठंनही घुसा पण मुंबईत दिसा.धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांच्या आवाहनाला लिंबागणेश पंचक्रोशीतील बांधवांचा प्रतिसाद

Image
लिंबागणेश:- ( दि.२० ) धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एसटी) प्रवरगाबरोबर नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावे या न्याय मागणी गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज बांधव करत आहेत.ईतर राज्यात धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात येतो मात्र महाराष्ट्र राज्यात धनगड आणि धनगर एकच असताना सरकारने आश्वासन देऊनही पाळले नाही.आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असुन धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे यांनी आज दि.२० मंगळवार रोजी मुंबई येथे ऊद्या दि.२१ रोजी पासुन आझाद मैदान मुंबई येथे सुरू होणा-या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल व्हावे असे आवाहन केले असुन या आवाहनाला प्रतिसाद देत बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधवांनी कोणत्याही वाहनाने आणि कोणत्याही मार्गाने मुंबईत दाखल होण्याचा ठाम निर्धार केला आहे. यावेळी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो" मल्हारराव होळकरांचा विजय असो ""दिपकभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है " मल्हार बोलो मुंबई चलो " कुठुनही घुसा पण मुंबईत दिसा" अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी क...