Posts

Showing posts from September, 2025

शेवगांव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. रामदास रंगनाथ आगळे तर उपाध्यक्षपदी ऍड.मुनाफ अल्ताफ शेख यांची निवड

Image
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 / 9270442511 दिनांक 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुका बार असोसिएशन तथा तालुका वकील संघाची नवीन कार्यकारणी जाहीर काल जाहीर झाली त्यात अध्यक्ष सचिव खजिनदार बिनविरोध तर ईतर जागांसाठी काल दिनांक 11 सप्टेंबर रोजी झाली निवडणुक यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी ऍड. रामदास रंगनाथ आगळे तर उपाध्यक्षपदी ऍड. मुनाफ अल्ताफ शेख तर सचिवपदी सुहास झुंबरराव चव्हाण तर खजिनदार पदी ऍड अजय अशोक मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत एकूण 86 दाभासदांपैकी 80 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ऍड.शेख मुनाफ अल्ताफ ऍड. बोरुडे लक्ष्मण रमेश यांच्यात चुरशीची लढत होऊन ऍड. शेख यांना 53 तर ऍड. बोरुडे यांना 26 मते मिळाली ऍड शेख यांनी तब्बल 27 मतांनी विजय मिळविला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडीत नवनिर्वाचित कार्यकारणीचे वकील संघाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल तालुक्यातील सहकारी वकील सदस्य पक्षकार आणि नागरिकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

सुजाता शिनगारे यांना समाजशास्त्र विषयात पीएचडी

Image
धारुर : तालुक्यातील आरणवाडी येथील सुजाता राम शिनगारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजशास्त्र विषयात पीएचडी जाहीर केली आहे. ज्येष्ठ सामाजिक अभ्यासक डॉ. स्मिता अवचार यांच्या मार्गदर्शनात 'वृद्ध महिलांच्या आरोग्याच्या समस्या : विशेष संदर्भ औरंगाबाद शहर' या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. डॉ. सुजाता शिनगारे यांनी एम.ए. समाजशास्त्रातही विद्यापीठातून प्रथम क्रमांक मि‌ळवला होता. त्याशिवाय एम.फिल.चे संशोधनही पूर्ण केलेले आहे. या यशाबद्दल धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, संचालक शिवाजी मायकर, न्यूरोलॉजिस्ट डॉ. विलास शिनगारे, डॉ.रामहारी मायकर, ॲड. सार्थक माने, आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, सदाशिव शिनगारे, सतीश शिनगारे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

दिलेल्या आश्वासना प्रमाणे एक महिन्यात संपूर्ण प्रश्न मार्गी न लावल्यास पुन्हा आंदोलन करू :-प्रा.किसनं चव्हाण

Image
गेवराई (प्रतिनिधी ) दि.१२ तालुक्यातील शोषित पीडित वंचितांच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्याच्या हेतूने गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतीने तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलवर जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.   यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचीव प्रा.किसन चव्हाण म्हणाले की पंडीत,पवार केवळ दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी यांचे मते घेण्यासाठी वाडी-वस्ती तांड्यावर, पाड्यावर येतात परंतु या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन, मोर्चा काढू मार्गी लावतात त्यामुळे जणतेने देखील पुढील काळात जो आपले प्रश्न मार्गी लावतो,जो आपल्या आडचनीवेळी खंबीरपणे सोबत राहतो त्याच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मते दिली पाहिजेत. जन सुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे, गायरान जमीन सातबारा लावून देणे, गावठाण जमिनीवरील अतिक्रमण कायमचे करून पीटर देणे, घरकुलधारकाकडून सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून होत असलेली पैशाची मागणी तात्काळ बंद करण्य...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) दिव्यांग आघाडीच्या माजलगाव तालुक्यातील पदाधिकारी निवडी जाहीर

Image
बीड प्रतिनिधी - खा.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) यांच्या आदेशानुसार व युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पप्पू कागदे तसेच सुरेश माने दिव्यांग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली दिव्यांगआघाडी माजलगाव च्या पदाधिकारी यांच्या निवडी शाहु डोळस जिल्हा अध्यक्ष दिव्यांगआघाडी जिल्हा बीड यांनी नेते पप्पू कागदे यांच्या हस्ते पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र देऊन सत्कार ka करण्यात आले.या प्रसंगी  माजलगाव तालुका उपाध्यक्ष पदी दिगांबर लोखंडे, तसेच सचिवपदी सिद्धेश्वर खंडागळे, सह सचिव रामेश्वर वाव्हलकर, कोषाध्यक्ष रामेश्वर तांबे,व सह कोषाध्यक्ष महादेव ढगे यांना निवडीचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या मध्यवर्ती कार्यालय बशीर गंज बीड येथे देण्यात आले.निवड झालेल्या पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

माहिती अधिकार महासंघाचे १४ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अधिवेशन ; सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन ; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- डॉ.गणेश ढवळे

Image
बीड:- ( दि.१२ ) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) ही महाराष्ट्रातील ही जागरूक नागरीकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असुन महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासुन ते सायंकाळी ४ पर्यंत शिव छत्रपती रंगभवन ,शांतीसागर महाराज चौक ,सोलापुर येथे आयोजित केले आहे.या अधिवेशनासाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यातुन सुमारे पाचशेच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ चे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार असुन कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या स...

बीड साठी कचरा/ घंटा गाड्या.. बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश

Image
बीड साठी कचरा/ घंटा गाड्या.. बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश  बीड शहराला रस्ते व नाल्या कधी मिळणार..  चार घंटा गाड्या देऊन बीडचा विकास होणार आहे का..??  अमृत अटल जल योजनेचे काय ..चौकशी होणार का..? बीड प्रतिनिधी :-  बीड शहर बचाव मंचाच्या प्रदीर्घ लढाईनंतर येणाऱ्या निवडणुकीत होणारी हार दिसू लागल्यामुळे नाईलाजाने का होईना बीड नगर परिषदेला कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या देण्यात येणार आहेत. जसे मोगलांच्या सैन्याला कुठेही, नदीच्या पाण्यातही धनाजी- संताजी दिसायचे तसेच सत्ताधारी पक्षांना व नेत्यांना होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये होणारी हार स्पष्ट दिसू लागलेली आहे. नाईलाज म्हणून आज बीडला घंटा गाड्या देण्यात येत आहेत. बीडची जनता व बीडच्या जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच घंटा गाड्या नियमित चालू राहू द्या व घंटागाड्यांची आपल्याला गरज आहे अशी मागणी सातत्याने गेल्या दोन वर्षापासून करत आहे. बीड शहरामध्ये जागोजागी गल्लोगल्ली कचऱ्याचे मोठ-मोठे ढिगारे लागले आहेत. नाल्या तुंबलेल्या आहेत सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. बीड शहर हे उकांड्यांचे शहर बनलेले आहे. बीडच्या ...

बीड साठी घंटा गाड्या..बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश

Image
बीड साठी घंटा गाड्या.. बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश बीड शहराला रस्ते व नाल्या कधी मिळणार... चार घंटा गाड्या देऊन बीडचा विकास होणार आहे का ? अमृत अटल जल योजनेचे काय चौकशी होणार का ? बीड प्रतिनिधी - बीड शहर बचाव मंचाच्या प्रदीर्घ लढाईनंतर येणाऱ्या निवडणुकीत होणारी हार दिसू लागल्यामुळे नाईलाजाने का होईना बीड नगर परिषदेला कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या देण्यात येणार आहेत. जसे मोगलांच्या सैन्याला कुठेही, नदीच्या पाण्यातही धनाजी - संताजी दिसायचे तसेच सत्ताधारी पक्षांना व नेत्यांना होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये होणारी हार स्पष्ट दिसू लागलेली आहे. नाईलाज म्हणून आज बीडला घंटा गाड्या देण्यात येत आहेत. बीडची जनता व बीडच्या जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच घंटा गाड्या नियमित चालू राहू द्या व घंटागाड्यांची आपल्याला गरज आहे अशी मागणी सातत्याने गेल्या दोन वर्षापासून करत आहे. बीड शहरामध्ये जागोजागी गल्लोगल्ली कचऱ्याचे मोठ-मोठे ढिगारे लागले आहेत. नाल्या तुंबलेल्या आहेत सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. बीड शहर हे उकांड्यांचे शहर बनलेले आहे. बीडच्या 70 टक्के भागांमध्ये गेल्या 20 व...

भारतीय बौद्ध महासभेचे 17 सप्टेंबर रोजीजन आक्रोश आंदोलन -भीमराव आंबेडकर

Image
एकाच दिवशी महाराष्ट्रभर आंदोलन बीड प्रतिनिधी - महाबोधी महाविहार मुक्ती, महू जन्मभूमी आणि नागपूर दिक्षाभूमीसाठी देशभरातील सर्व मंत्रालयावर व बीड जिल्हाधिकारी कार्यालयांवर जन आक्रोश मोर्चा 17 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान व जेथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, त्या बुद्धगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे (1891) आद्य प्रणेते अनागरीक धम्मपाल यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती, महू जन्म भर्मी आणि नागपुर दिक्षाभूमीसाठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा), बौद्ध महासभा भिक्खू संघ, समता सैनिक दल व आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था, संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरालील सर्व मंत्रालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर 17 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता जनआक्रोश मोर्चा आंदोलन करण्याचा निर...

श्रीनाथ गीते प्रशासकीय व्यवस्थेचा बळी,पोलिसांनी संस्थाचालक व समाज कल्याण विभागातील दोषीवर कारवाई करावी -सुनिता गीते

Image
बीड प्रतिनिधी - एका महिन्यापूर्वी आश्रम शाळेवर नोकरीसाठी रुजू झालेला श्रीनाथ गीते हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरला आहे. यामध्ये दोषी संस्था चालक विरोधात एफ आय आर दाखल झाला आहे मात्र परळी ग्रामीण पोलिसांकडून कारवाई शून्य, तसेच समाज कल्याण कार्यालय बीड मध्ये देखील नोकरीवर घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती व त्रास दिला होता. श्रीनाथ गीतेला ज्या दिवशी नोकरीवर जाण्यासाठी ऑर्डर दिली होती त्या दिवशी. संस्थाचालक व समाज कल्याण खात्याने संगणमत करून दुसऱ्या चार जागा संस्थेवर भरल्या त्याचे सर्व पुरावे गीते कुटुंबाकडे आहेत. सदरील संस्था चालकावर या अगोदरचे तीन गंभीर गुन्हे असून त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये अशी ही मागणी गीते कुटुंबीयांनी केली आहे. श्रीनाथ गीते याला आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या व गुन्हे दाखल झालेल्या संस्थाचालक व समाज कल्याण मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मयत श्रीनाथ गीतेच्या आईने सुनिता गीते लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वीस लाख रुपयांची मागणी त्...

डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष

Image
नगरपरिषदेसह सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बीड शहराचे सौंदर्यीकरण डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष बीड (प्रतिनिधी ) दि.११ : शहराचे सौंदर्यीकरणासाठी बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संस्थांची गुरुवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यांचे डेव्हलपमेंट, वृक्षलागवड, स्वच्छता, सुशोभीकरण, सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रस्तावित नवीन रोड व डीपी रोडमध्ये वृक्षारोपणासाठी जागा सोडून अंडरग्राउंड ड्रिपद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करणे, बंद असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या ठिकाणी भाजी मंडई व महिला बचत गटासाठी मॉल उभारणे, शहरातील ओपन स्पेसला तारकंपाउंड करून वृक्षलागवड करणे, नवीन फुलांचे गार्डन प्रस्तावित करणे, चौक सुशोभीकरणांतर्गत शहरातील प्रमुख चौकात फाउंटेन उभारणे, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स...

शुभावती भोबे यांचे अद्वितीय दातृत्व : लाखमोलाची जागा समाजासाठी समर्पित

Image
 विवेकानंद भवनाचे नामकरण व नुतनीकरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंतांची कृतज्ञता व्यक्त  पणजी, ११ सप्टेंबर २०२५ :स्वामी विवेकानंद यांची 'मनुष्य निर्माणातून देश निर्माण' ही संकल्पना आज देश पुढे देण्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. श्रीमती शुभावती भोबे यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला समर्पित केलेल्या वास्तूचा नामकरण व नुतनीकरण सोहळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत विवेकानंद भवन, पर्वरी येथे पार पडला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.   या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पेन्ह द. फान्सच्या जिल्हा पंचायत सदस्या कविता गुपेश नाईक, पेन्ह द. फान्स पंचायतचे सरपंच सपनील चोडणकर, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांतप्रमुख अभय बापट आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आसाममधल्या महिलांनी खास पद्धतीने विणलेली शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  याप्रसंगी बोलताना विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र ...

नरेगा मध्ये होत असलेल्या गैरव्यवहारांची चौकशी लावण्यात यावी-अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड

Image
बीड - बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या निरीक्षणात आले आहे की, बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये (उदा. विहीर, वृक्षारोपण, फळबाग, तलाव, गाय गोठा, कांदा चाळ, रस्ते, नाले, ब्लॉक इत्यादी) मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी संबंधित नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः बीड तालुक्यातील वरवटी, चराटा, अंजनवती, लिंबागणेश तसेच वडवणी तालुक्यातील काही गावांमध्ये संबंधित कामांमध्ये लाभार्थ्यांना लाच न देता कोणतेही काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शिवाय, अनेक लाभार्थ्यांना काम झाले असतानाही त्यांच्या पेमेंटमध्ये अनावश्यक विलंब केला जातो किंवा ते दिलेच जात नाही, असेही निदर्शनास आले आहे. सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, यामुळे शासनाच्या विश्वासार्हतेवर व जनतेच्या अपेक्षांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आपण कृपया याप्रकरणी तातडीने चौकशी लावून दोषींवर कडक कारवाई करावी. जर या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील पीडित नागरिकांना घेऊन आपल्या कार्यालयासमो...

शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी यांना लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मदतीचे आवाहन

Image
 अत्यवस्थ पेशंट ला मदतीचे आवाहन     शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी यांना लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मदतीचे आवाहन दिनांक ~ 10/09/2025 वार बुधवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की मदतीचे आवाहन आपल्या शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी वय 45 यांची तब्येत अत्यवस्थ असुन त्यांना खुप मोठा आर्थिक खर्च आहे. कुटुंबाची अवस्था बिकट असुन कुटुंबाचे कर्ते पुरुष असल्याने सध्या त्यांच्यावर "लिव्हर ट्रान्सप्लांट" च्या शश्त्रक्रियेसाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार असून शहरातील आणि जिल्ह्यातील दानशुर लोक सामाजिक संस्था (N.G.O.) मोठं मोठी देवस्थान सामाजीक व राजकीय संघटना यांनी एका तरुण होतकरू . मनोज बबन परदेशी यांना खालील Scanar वर मदत करावी हि नम्र विनंती संपूर्ण परदेशी परिवार वेलनेस क्लब आणि मी शेवगांवकर संघटना. संपर्क मोबाईल नंबर ~ +919975312487 मदत गुगल-पे फोन- पे वर सुद्धा करू शकता 

पाटोदा तालुक्यात प्रश्न अनेक, सामाजिक कार्यकर्त्यांचे इरादेही नेक; मात्र सर्वसामान्य जनताच फेक असल्याने लढायचं कुणासाठी?

पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यात असंख्य प्रश्न आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दयनीय अवस्था, शेतकऱ्यांचे हाल, बेरोजगारी, आरोग्याची बिकट परिस्थिती पण सर्वसामान्य जनता मात्र गप्प बसलेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या जनतेला या प्रश्नांचा रोज सामना करावा लागतो, तीच जनता बोलायला किंवा उभे राहायला तयार नाही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाचे नेते प्रश्नांसाठी सतत आवाज उठवत शासन- प्रशासनाला धडक देत आहे. पण जनतेचा पाठिंबा कुठे आहे? गावोगावी लोक फक्त चर्चा करतात, पण कृतीत मात्र शून्य! भीतीपोटी किंवा स्वार्थापोटी जनता मौन बाळगते आणि निवडणुकांच्या वेळी पुन्हा त्याच लोकांना निवडून देते, ज्यांच्या काळात हे प्रश्न निर्माण झाले.मग प्रश्न उपस्थित होतो “लढायचं कुणासाठी? जे स्वतःच्या हक्कासाठीही उभं राहात नाहीत, त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी किती लढायचं?”पाटोद्यात प्रश्नांचे डोंगर आहेत, कार्यकर्त्यांचे इरादे प्रामाणिक आहेत, पण जनता जर अशीच निष्क्रिय राहिली, तर पाटोदा तालुक्याच्या विकासाला आणखी किती वर्षे अन्याय सहन करत गप्प बसावे लागेल, हा असा मोठा प्रश्न आहे!

कोटीतीर्थ कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता- मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत

Image
कोटीतीर्थ कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता- मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत लॉजिस्टिक्स व वेअरहाउसिंग उद्योगांसाठी नवी योजना; अनुदान, करसवलतींची तरतूद  पणजी, १० सप्टेंबर २०२५ :पोर्तुगीज राजवटीत उद्ध्वस्त झालेल्या दिवाडी येथील मूळ जागेवर नव्याने सप्तकोटेश्वर मंदिर उभारण्यात येणार आहे. 'कोटीतीर्थ कॉरिडॉर' प्रकल्पाअंतर्गत हे भव्य मंदिर साकारले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासह अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.  मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या 'कोटीतीर्थ कॉरिडॉर' प्रकल्पाचे काम गोवा साधनसुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. मूळ मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नार्वे येथे सप्तकोटेश्वर मंदिराची उभारणी केली होती. आता भाविकांना आपल्या कुलदेवतेचे दर्शन मूळ ठिकाणी घेता यावे, यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. या प्रकल्पासाठी पुराभिलेख खात्याने तयार केलेल्या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे. राज्यातील ...

गेवराई तहसीलवर वंचित बहुजन आघाडी कडून जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन- पप्पू गायकवाड

Image
गेवराई (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शासनाने जन सुरक्षा कायदा लागू न करणे व तसेच गेवराई तालुक्यातील गरीब वंचित शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय यांच्या विविध मागण्याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्यांची हेडसांड होत आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दि.१२ रोजी गेवराई तहसील कार्यालयावर "जन आक्रोश महामोर्चा" काढण्यात येनार आसुन याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी म्हटले आहे.     उपोषण आंदोलन रास्ता रोको करूनही सरकारला जाग येत नाही त्यासाठी जनतेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे भव्य आणि आयोजन करण्यात आले आहे.  जुनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असताना प्रशासनाला निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्य शासनाने जो जन सुरक्षा कायदा अमलात आणण्याचे ठरवले आहे तो लोकशाहीचा गळा घोटल्यासारखा होईल सर्व सामान्या...

जिल्हा प्रशासनाचा वृक्षलागवडीचा आणखी एक "इव्हेंट" – जिल्हाधिका-यांचे प्रवचन कौतुकास्पद, परंतु "तुती" वृक्षलागवडीबाबत भाष्य न केल्याने पर्यावरणप्रेमी निराश– डॉ. गणेश ढवळे

Image
बीड (दि. १०) : बीड जिल्हा प्रशासनाकडून वृक्षलागवडीचे "इव्हेंट" करण्याची परंपरा कायम ठेवली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी बिंदुसरा नदीकिनारी १६ किलोमीटर परिसरात ५ हजार बांबू रोपांची लागवड केल्याचा इव्हेंट करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र काही महिन्यांतच तेथे खड्डे उरले, झाडे जगवली गेली नाहीत. आता विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या परंपरेला चालना देत एकाच दिवसात तब्बल ३० लाख वृक्षलागवडीचा इव्हेंट करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव नोंदवून घेतले. यानिमित्ताने पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. जिल्हाधिका-यांचे प्रवचन, पण "तुती"वर मौन... दि. ९ रोजी वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. झाडांमुळे प्रदूषण कमी होणे, उष्णता नियंत्रित राहणे, नागरिकांना शुद्ध हवा मिळणे, जैवविविधतेला चालना मिळणे अशा विविध फायद्यांवर त्यांनी भाष्य केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण...

ढाळेवाडीची कन्या प्रितम हुले हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने पाटोदा तालुक्याचा अभिमान उंचावला

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) शैक्षणिक वर्ष 2025-26 या अंतर्गत तालुका क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी जय हनुमान तालीम, चुंबळी फाटा (ता. पाटोदा, जि. बीड) येथे करण्यात आले. विविध खेळांच्या अनुषंगाने पार पडलेल्या फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत पाटोदा तालुक्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.यामध्ये ढाळेवाडी (ता. पाटोदा) येथील कुमारी प्रितम शामराव हुले हिने उत्तुंग कामगिरी करून आपले कुस्तीतील कौशल्य सिद्ध केले. 14 वर्षे वयोगट व 36 किलो वजनी गटात प्रितम हिने झुंजार लढती देत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिच्या या यशामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.प्रितम ही ढाळेवाडी येथील युवानेते शामराव हुले यांची कन्या असून तिचे वडील शामराव हुले यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य प्रशिक्षण यांच्या जोरावर प्रितमने हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.गावातील ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार तसेच तालुक्यातील क्रीडा प्र...

सेवा पखवाडा : गोव्यात साजरा होणार १५ दिवसांचा समाजजागरणाचा उत्सव

Image
 पणजी, ९ सप्टेंबर २०२५ : गोव्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पखवाडा’ या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध विभागांच्या सहभागातून नागरिकांना थेट लाभ होईल असे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. उपक्रमाचे कृती आराखडे अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विभाग प्रमुखांची बैठक बोलावली.  “सेवा पखवाडा हे प्रत्येक घटकाला जोडणारे जनआंदोलन” – मुख्यमंत्री सावंत बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “सेवा पखवाडा हा केवळ शासकीय कार्यक्रम नाही, तर तो समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारा एक जनआंदोलन आहे. स्वच्छता आणि आरोग्यसेवांपासून ते शेतकरी कल्याण व महिला सक्षमीकरणापर्यंत, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचेल.” त्यांनी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.   ठळक उपक्रमांची यादी स्वच्छता मोहीम – गावोगावी स्वच्छतेचा संदेश आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे – जनतेच्या आरोग्याचे संवर्धन ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण – पर्यावरण स...

बीड शहर बचाव मंच व एसडीपीआय पार्टी चे जिल्हाधिकारी, एस पी साहेब, न.प मुख्याधिकारी यांना तातडीचे निवेदन

Image
 17 सप्टेंबर पर्यंत शहरातील तातडीची कामे, तात्काळ करण्यात यावीत.. बीड प्रतिनिधी : बीड शहर बचाव मंच व एस डी पी आय पार्टी, कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने येत्या 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील तातडीची कामे तात्काळ उरकवून घ्यावीत यासाठी जिल्हाधिकारी साहेब, एस पी साहेब व मुख्याधिकारी नगरपरिषद या तिघांनाही निवेदने देण्यात आली. 17 सप्टेंबर पर्यंत शहरातील तातडीची कामे तात्काळ करण्यात यावीत अशी आग्रही विनंती करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे प्राधान्याने चालू आहेत व लवकरच पूर्ण करण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने आश्वस्त करण्यात आलेले आहे. बीड शहरातील रस्ते, नाल्या पथदिवे, कचरा व नालेसफाई, बंद घंटागाड्या, वाहतूक व्यवस्था या सर्व समस्यांमुळे बीड शहराची परिस्थिती अतिशय दयनीय व हलाखीची झालेली आहे. शहरातील सर्व भागातील सर्व स्तरातील नागरीक अतिशय त्रस्त झालेले आहेत. नागरिकांच्या समस्यांना व सहनशक्तीला काही सीमा-मर्यादाच राहिलेली नाही. प्रचंड हाल अपेष्टा नागरिक सहन करत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब, एस. पी. साहेब व मुख्याधिकारी नगरपर...

शेतात अजगर निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण ; घाबरून न जाता वनविभाग अथवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा

Image
लिंबागणेश (दि. ०९) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक सरपटणारे जीव आपले पारंपारिक आश्रयस्थान सोडून सुरक्षित ठिकाणांच्या शोधात बाहेर पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील बालाघाटावरील ससेवाडी गावच्या शिवारात रसाळ यांच्या सोयाबीनच्या शेतात रविवारी (दि. ०७) दुपारी शेतमजूर काम करत असताना भला मोठा अजगर दिसून आला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी भीतीपोटी केलेल्या हल्ल्यात त्या अजगराचा मृत्यू झाला. शेतात अजगर दिसणे हे सामान्य नसले तरी पावसाळ्यात ते सुरक्षित जागा शोधण्यासाठी बाहेर पडतात, त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. अजगर दिसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, तर त्वरित वन विभाग अथवा स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधावा, जेणेकरून अजगराला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडता येईल. अजगर सहसा मानवांवर हल्ला करत नाहीत, जोपर्यंत त्यांना धोका जाणवत नाही. त्यामुळे अशा वेळी शांत राहून सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अजगराला त्रास देऊ नये किंवा पकडण्याचा प्रयत्...

भारदे साक्षरता प्रसारक मंडळ बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगांव आयोजित महाराष्ट्रातील नामवंत गंगा- मृणालिनी स्मृती' व्याख्यानमालेचे आयोजन

[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511 दिनांक 09/092025 वर मंगळवार शेवगाव (प्रतिनिधी) या बाबत सविस्तर वृत्त असे की शैक्षणिक , साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने दि 8 सप्टेंबर सोमवार ते 13 सप्टेंबर 2025 शनिवार या कालावधीत 'गंगा- मृणालिनी स्मृती' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे व निमंत्रक हरीश भारदे यांनी दिली. रोज सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील रावसाहेब पटवर्धन सभागृहात सदर व्याख्याने होणार आहेत. काल सोमवार दि 8 सप्टेंबर रोजी यजुवेंद्र महाजन ( स्पर्धा परिक्षेवर बोलू काही) या वर व्याख्यान पार पडले आज मंगळवार दि 9 सप्टेंबर रोजी प्रवीण दवणे ( दीपस्तंभ, मनातले...जनातले) यावर व्याख्यान उद्या 10 सप्टेंबर रोजी गणेश शिंदे ( मोगरा फुलला) 11 सप्टेंबर रोजी डॉ.अंजली धानोरकर( झपाटले पण ते जाणतेपण) 12 सप्टेंबर रोजी मुक्ता चैतन्य( मोबाईलचे व्यसन आणि आव्हाने) तर 13 सप्टेंबर रोजी प्रख्यात माध्यमतज्ज्ञ व एबीपी माझाचे संपादक राजीव खांडे...

सकल ओबीसी समाजाच्या विविध मागणीसाठी पाटोदा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) सकल ओबीसी समाज, पाटोदा यांच्या वतीने आज विविध मागण्यांचे निवेदन पाटोदा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन राज्यपाल तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले असून शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण तालुक्यातून तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत ओबीसी विरोधी हैद्राबाद गॅझेट जी.आर. तात्काळ रद्द करावा.ओबीसी विरोधी न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शोधलेल्या बोगस ५८ लाख कुणबी नोंदी रद्द करून वितरित जात प्रमाणपत्रांची चौकशी करावी.महाराष्ट्र राज्याची जातिनिहाय जनगणना करून ओबीसींची खरी लोकसंख्या जाहीर करावी. तामिळनाडुच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा ७५% पर्यंत वाढवून ओबीसी, एस.सी., एस.टी. प्रवर्गांना लोकसंख्येप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसींना संपूर्ण भारतात लोकसभा व विधानसभेत मतदारसंघ आरक्षित करावेत. मंडल आयोगाची कायदेशीर अंमलबजावणी करून ओबीसींना सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक न्याय द्यावा. ओबीसी लोकसं...

वंचितच्या जन आक्रोश महामोर्चास सर्व सामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - किशोर भोले

Image
    गेवराई प्रतिनिधी - बीड सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना कुठलेही देणेघेणे राहिलेले नाही खोटे आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेचे मते घ्यायचे आणि खुर्ची मिळाली कि सामान्य जनतेला वार्यावर सोडायचे परंतु नेहमी सातत्याने कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर ,उपेक्षित, निराधार ,बेघर, भुमिहीन, वंचित यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम सोबत असते संविधानिक हक्क आणि अधिकारा पासून कोसो दूर असलेल्यांना कायद्यानुसार पध्दतीने प्रश्न सोडविण्यासाठी एकमेव अँड.बाळासाहेब आंबेडकर हे कायम सोबत असतात त्यामुळे सर्व सामान्य जनतेने लक्षात घेतले पाहिजे की अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय सामाजिक लढ्यात सर्व सामान्य जनतेने एकजुटीने सोबत राहुन येणार्या काळात वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढवली पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने दिनांक 12/09/2025 वार शुक्रवार रोजी ठिक 11 00 वाजता तहसील कार्यालयावर "जन आक्रोश महामोर्चा" धडकणार आहे या मार्चमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे राज्य महासचिव तथा जिल्हा प्रभारी किसन चव्हाण ...

कुशल कर्माचे फळ आनंद देऊन जाते - पूज्य भिक्खु धम्मशील थेरो

Image
( महाविहार धम्मभूमी शिवनी येथे भाद्रपद पौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न )  बीड प्रतिनिधी - प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था धम्मभूमी डॉ.भदंत आनंद कौशल्यायन मौजे शिवनी ता. जि. बीड येथे 2021 साली स्थापन झाल्यापासून दर पौर्णिमेला नामवंत भिक्खु संघाची धम्मदेशना पूज्य भिक्खु धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशनेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच विविध थरातील दानशूर, गुणवंत, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, त्यांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवावा म्हणून सत्कार केल्या जातो व बीड परिसरात व संपूर्ण जिल्ह्यात धम्ममय वातावरण निर्माण करून धम्माचा प्रसार व प्रचार केला जातो. भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून भिक्खु धम्मशील थेरो आपल्या मधुर वाणीने अनेक उदाहरणे देऊन उपस्थित यांना समजावून सांगितले की कुशलकर्माचे फळ आनंद देऊन जाते. याप्रसंगी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला दीप प्रज्वलन करून प्रमुख अतिथींच्या हस्ते अभिवादन करून त्रिवार वंदन करण्यात येऊन सर्व उपस्थित...

येवलवाडी गावचे लोकप्रिय सरपंच तथा जनतेच्या मनातील भावी पंचायत समिती सदस्य किशोर नागरगोजे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) येवलवाडी गावाचे लोकप्रिय सरपंच तथा भावी पंचायत समिती सदस्य किशोर नागरगोजे यांचे गावकऱ्यांच्या मनात त्यांचे नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी असलेली समर्पित वृत्ती अनमोल ठरते. किशोर नागरगोजे हे केवळ प्रशासनाचे नेतृत्व करणारे नाहीत, तर समाजसेवक म्हणूनही प्रेरणादायी ठरले आहेत.समाजसेवा आणि गाव विकास किशोर नागरगोजे यांनी आपल्या कामातून दाखवून दिला येवलवाडी गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य सुविधा या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनेक सुधारणा राबवल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम, महिलांसाठी स्वावलंबन कार्यशाळा,वृद्ध नागरिकांसाठी मदत व आरोग्य तपासण्या यांसारख्या उपक्रमांनी त्यांचे नेतृत्व विशेष ठरले आहे. या प्रयत्नांमुळे गावकऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण झाली असून, येवलवाडी गावाचा नैसर्गिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाला आहे.गावकऱ्यांसाठी तत्पर नेतृत्व किशोर नागरगोजे यांनी प्रत्येक समस्येवर त्वरित उपाययोजना करतात. स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण शिबिरे, जलसंधारण प्रकल्प आणि इतर ग्रामीण विकास उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखा...

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांचे ‘ओएसडी’पदी प्रा.डॉ.हमराज उईकेंची नियुक्ती

Image
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार; नवगण शिक्षण संस्थेमध्ये आहेत कार्यरत बीड (प्रतिनिधी ) दि.८ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी प्रा.डॉ.हमराज उदयभान उईके यांची ‘ओएसडी’पदी (विशेष कार्य अधिकारी) राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. ते नवगण शिक्षण संस्था संचलित परळी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख असून त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. प्रा.डॉ.हमराज उईके यांनी नियुक्तीनंतर मंत्री कार्यालयात रुजू होऊन कार्यभार स्वीकारला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे. ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती (आदिवासी) समाजाचे योगदान व भूमिका’ या विषयावर नुकतेच बीडमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राचे निमंत्रक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यतत्परता लक्षात घेता आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी प्रा.डॉ.हमराज उईके यांच्यावर ‘ओएसडी’ पदाची जब...

पंजाब आणि छत्तीसगडमधील पूरग्रस्तांसाठी गोवा सरकारने दिला मदतीचा हात

Image
पणजी, ८ सप्टेंबर २०२५ : पंजाब आणि छत्तीसगडमध्ये अलीकडे घडलेल्या भयंकर पूरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत एकजुटीचा संदेश देत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सचिवालयातून दोन ट्रकभरून आवश्यक मदतीचे साहित्य दोन्ही पूरग्रस्त राज्यांना पाठवले आहे.  कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना सर्वाधिक आधाराची गरज असते. गोवा सरकार आणि गोव्याच्या जनतेकडून आम्ही पंजाब व छत्तीसगडमधील नागरिकांसोबत उभे आहोत. तातडीच्या मदतीसाठी आधीच ५ कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली असून आम्ही तेथील स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक वस्तूंची तपशीलवार यादी मिळाली आहे. ट्रकमध्ये कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू आज पाठवण्यात आल्या असून ते तातडीने प्रभावितांना पोहोचेल याची आम्ही काळजी घेणार आहोत". या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, म्हापसा आमदार जोशुआ पीटर डीसूझा आणि सचिवालयातील इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

रेल्वे स्टेशनपर्यंत शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

Image
बीड. (प्रतिनिधी ) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी यांना बीड बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत शहर बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येत्या 17 सप्टेंबर 2025 पासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा रेग्युलर सुरू होणार आहे बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून रेल्वे स्थानकाचे अंतर चार ते पाच किलोमीटर एवढे आहे बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च हा न परवडणार आहे तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची फार मोठी गैरसोय त्यामुळे होणार आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 17 सप्टेंबर पूर्वी बीड बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत तातडीने शहर बस वाहतूक सुरू करावी याकरिता निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव खंडू जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, ज्ञानेश्वर कवठेकर, अर्जुन जवंजाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष...

सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्माननीत

Image
बीड प्रतिनिधी :- सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे वंचित उपेक्षित घटकातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या कार्ये , ऊसतोड कामगार, स्थलांतरीत कामगार ,विटभटी कामगार,भटके विमुक्त समाजातील लोक व एकल महिला व बालकांच्या हक्कांच्या संदर्भात करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांना राष्ट्रीय भटके विमुक्त दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित राष्ट्रीय भटके विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जीतीन रहेमान साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदरणीय मेश्राम मॅडम,उपशिक्षणाधिकारी आदरणीय जमीर शेख सर , इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर,संध्याताई राजपूत,भटक्या विमुक्त विकास परिषदेचे देवगिरी प्रांत संयोजक उमेश जोगी, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गिरी, अॅड जाधव, बालाजी पवार, दादासाहेब नन्नवरे यांच्यासह मान्यवर मंडळ...

हरित बीड अभियानाला हरताळ फासणा-या जिल्हा कारागृह अधिक्षकावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाईसाठी जिल्हा कारागृहासमोर वृक्षप्रेमींची निदर्शने

Image
बीड (दि. ०८ ):गेल्या महिन्यात हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर "हरित बीड अभियान" पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आले. एका दिवसात तब्बल ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आली आणि त्याची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. परंतु, याच हरित अभियानाला तडा देत गणेश विसर्जनाच्या दिवशी बीड जिल्हा कारागृह आवारातील लिंब, चिंच, कवठ, शेवरी, वड यांसारखी ४०–५० वर्षे जुनी असलेली ५० हून अधिक झाडे बुंध्यापासून कापून टाकण्यात आली. त्याहून गंभीर बाब म्हणजे शासकीय मालमत्ता विक्रीची रीतसर प्रक्रिया न करता झाडे खाजगी वाहनाने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासकीय कार्यालयाच्या आवारातच झालेली ही वृक्षतोड हा अत्यंत निंदनीय आणि गंभीर प्रकार असल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्यावर प्रशासकीय तसेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली." झाडे लावा झाडे जगवा" हरित बीड अभियानाला हरताळ फासणा-या जिल्हा कारागृह अधीक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणाबाजी करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्...

लोकांच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या कष्टकरी हातांचे स्वप्न अजित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार- शेख निजाम

Image
लोकांच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या कष्टकरी हातांचे स्वप्न अजित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार- शेख निजाम  कामगारांच्या व लाडक्या बहिणीच्या मागे अजित दादा खंबीरपणे उभा - लोकपत्रकार तथा प्रदेश प्रवक्ता भागवत तावरे  बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून जय हिंद कॅम्पस मिलत नगर बीड येथे पंधरा दिवसीय कामगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख निजाम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश प्रवक्ता भागवत तावरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते यावेळी त्यांना प्रत्यक्ष साइटवर तसे काम करावे सुरक्षा उपकरणे ही हाताळावी व इतर महत्व पूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले यावेळी बोलताना शेख निजाम यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की बांधकाम कामगार हा जनतेच्या स्वप्नातील घरे आपल्या घामाच्या माध्यमातून व कष्टाच्या माध्यमातून घडवतो व लोकांचे जीवनामध्ये आनंद पसरवतो परंतु बांधकाम कामगार व इतर कामगार यांना व त्यांच्य...

सुजात आंबेडकर यांची परळीत 29 सप्टेंबर रोजी "एल्गार सभा"

Image
 परळी प्रतिनिधी - परळी शहरात 29 सप्टेंबर रोजी सुजाता आंबेडकर यांची एल्गार जाहीर सभा आयोजित करण्यात आली. जिल्हा याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.5 सप्टेंबर 2025 रोजी परळी शहर संपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसंनजीत रोडे सहसचिव अँड. संजय रोडे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व वचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव युवकांचे हृदय सम्राट सुजाता आंबेडकर यांचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका यांच्या होऊ घातलेल्या निवडणुक पूर्वीचा झंजावात सुरू झाला असून याचाच एक भाग म्हणून परळी शहरात वंचितची एल्गार सभाच नव्हे तर वंचितांच्या हक्काचा आणि स्वाभिमानाचा रणघोष असून सुजात आंबेडकर यांची सभा ठरवेल उद्याचा बदल त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळाले खमके नेतृत्व!

Image
भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मिळाले खमके नेतृत्व!  मरहूम अतहर बाबर साहेबांची धमक दिसावी  बीड प्रतिनिधी - बीड शहर बचाव मंचचे संस्थापक श्री. नितिनजी जायभाये यांनी राजकारणात प्रवेश केला असून त्यांच्या रूपात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खमके नेतृत्व मिळाले आहे. बीड शहराची दयनीय अवस्था ही तशी काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकी असो, की खासदारकी किंवा नगराध्यक्ष ही सर्व पदे वर्षानुवर्षांपासून ठराविक राजकीय व्यक्तींच्या हातात किंवा त्यांच्या कुटुंबाच्या हातात आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पदांवर असलेल्या व्यक्तींना बीड शहर आणि जिल्ह्यात मिळायला हवे तसे विरोधक मिळालेच नाही. यामुळे बीड शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्यात विकासाची पार रया गेली आहे. ही बाब लक्षात घेता काही काळापूर्वी सर्वसामान्यातून नितीन जायभाय नामक एक तरुण पुढे आला आणि त्याने ज्येष्ठांसह तरुणांना सोबत घेत बीड शहर बचाव मंचची स्थापना केली. या मंचाच्या माध्यमातून या तरुणाने उचललेल्या अनेक प्रश्नांद्वारे राजकीय पदाधिकाऱ्यांसोबतच राजकारण्यांच्या हातचे बाहुले झालेल्या अध...

प्रसिद्ध समाजसेविका रुख्मिणी नागापुरे यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Image
बीड - रुक्मिणी नागापुरे या बीड जिल्ह्यातील असून सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये एक समाजसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. महिला आर्थिक, राजकीय, सक्षम झाल्या पाहिजे हा त्यांचा विचार. जातीभेद नष्ट व्हावा आणि समता प्रस्थापित व्हावी या साठी लढा सुरु असतो. महिलांना मार्गदर्शन, गोरगरीब लोकांच्या न्यायासाठी आंदोलन, मोर्चे निवेदन वर्षभर असं त्यांचं काम सुरु असतं. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संकल्प बहुद्देशीय संस्था अकोला व बी.एस.एफ बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील लोकांना कृती गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे हा पुरस्कार सोहळा नोव्हेंबर महिन्यात होईल. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 50 लोकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, प्रमाणपत्र व शाल या स्वरूपात असून या पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आय...

चौसाळा येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी केला भाजपा नेते पवन कुचेकर यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार

Image
(चौसाळा प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी धावता दौरा केला या दौरया दरम्यान विविध जाती धर्मातील विचारवंत मोठया सख्येने उपस्थित होते यावेळी विविध विषयावर याठिकाणी चर्चा करण्यात आली तसेच चौसाळा येथिल रहीवाशी व भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष पवन कुचेकर यांच्या कार्याची दखल घेऊन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी पवन कुचेकर यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देवुन कायम पाठीशी उभा राहण्याचा शब्द दिला.

शेवगांव चा सार्वजनिक गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला

[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 शेवगाव, दि, 07 सप्टेंबर 2025 वर रविवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरात  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात श्री गणरायाला शेवगाव शहर व तालुक्यातून ठिकठिकाणी शांततेत भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशा, सनई चौघड्याच्या पारपारिक वाद्याच्या तालात तसेच नाशिक ढोल लेझीम, झांज, टाळ – मृदुंगाच्या पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या अनुक्रमे लाटे सार्वजनिक गणेश उत्सव भोईराज पंचमंडळ शिवशक्ती मित्र मंडळ शहीद भगतसिंग गणेश मंडळ व बालाजी गणेश मित्र मंडळ या सहा सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. शेवटच्या गणेश मंडळाचे विसर्जनाला रात्रीचे साडेबारा वाजले. प्रशासनाच्या आदेशानुसार नगरपरिषदेने यंदा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनाचे ठीक ठिकाणी कृत्रिम तलावांचे आयोजन केले. त्यासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारून गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती . तर जोहरापूरच्या ढोरा नदीवर नगर परिषदेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली . मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्तांच्या उपस्थितीतच मूर्...