Posts

Showing posts from April, 2025

मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश कदम यांची निवड

Image
 आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :   आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, शासकीय व‌ प्रसिद्धी पासून कोसो दूर असलेल्या वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करत असून , दैनिक लोकमत, मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहेत, आणि आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक जोपासना करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अविनाश कदम यांच्या कामाची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली असून पुन्हा बीड जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे यांनी बीड येथे ८ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत सत्कार करून व नियुक्तीपत्र देऊन निवड केली .   अविनाश कदम यांच्या निवडीबद्दल युवा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष निसार शेख,सचिव जावेद पठाण,कार्याध्यक्ष अक्षय विधाते, कार्यवाहक गहिनीनाथ पाचबैल,अतुल जवणे, संघटक समीर शेख, प्रेम पवळ, सहसचि...

लोकशाही पत्रकार संघाचा सतीशदादा दरेकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

Image
पुणे प्रतिनिधी पुणे येथील सतीशदादा दरेकर संस्थापक अध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था यांना लोकशाही पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश सतीशदादा यांनी कुंभार समाज सामाजिक संस्थेची स्थापना २७जानेवारी २०२०रोजी आपल्या सहकारी पदाधिकारी यांना घेऊन घटनेप्रमाणे नोंदणी केली, सुरुवातीला २४ आघाडी करून त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस संघटक पदे निर्माण करून प्रत्येक आघाडीला स्वतंत्र अधिकार देऊन समाज्याला उपयोग होईल अशी रचना केली.   महाराष्ट्रातील ३६जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष यांना नियुक्त केले,त्यानंतर कोरोना काळ चालू झाला आणि दादांनी घरून जेव्हडी मदत होईल तेव्हडी केली. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत असो, कोकणातील बांधवाना मदत असो सर्वकाही केले, महाराष्ट्रात दौरे करून समाज बांधवांचे प्रश्न सोडवणे,वधू वर मेळावा, कुंभार मंगलम वेबसाईटचे आणि जनगणना अँपचे उदघाटन वधू वर मेळाव्यात करण्यात आले त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले,तेर येथे जाऊन संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांचे चरणी नतमस्तक होऊन समाज्याला एकत्र करून का...

पाटोदा नगरपंचायतने महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा शहरातील महात्मा फुले चौकात बसविण्यात यावा सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे यांची मागणी

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा शहरातील महात्मा फुले चौकात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे यांनी केली.महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजातील गोरगरीब,शोषित आणि स्त्री वर्गासाठी क्रांतिकारी काम केले. त्यांनी शिक्षण, समानता आणि समाज सुधारणा यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या योगदानाची महती लक्षात घेता, पाटोदा शहरात त्यांचा पुतळा उभारण्याची आवश्यकता आहे,"महात्मा फुले यांच्या पुतळा बसवण्याची मागणी अनेक वर्षापासून असल्याने पाटोदा नगरपंचायतने त्वरित कार्यवाही करावी. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे अनेक गोरगरीब आणि महिलांना समतेची आणि शिक्षणाची दिशा मिळाली. त्यांचा पुतळा बसविल्यास आगामी पिढीला त्यांच्या योगदानाची आठवण होईल आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावर चालायला प्रेरणा मिळेल." ही मागणी अनेक वर्षापासून असल्याने आता पाटोदा नगरपंचायत आणि सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा व पाटोदा शहरात महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार...

महामानव अभिवादन ग्रुपच्या मोफत शिकवणी वर्गात "वाचाल तर वाचाल" तर्फे शालेय साहित्याचे वाटप

Image
 बीड प्रतिनिधी - महामानव अभिवादन ग्रुप 2020 पासून राजगृह बुद्धविहार भीम नगर जुना मोंढा रोड परिसर व प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरिता मोफत शिकवणी वर्ग चालविण्यात आहेत. वार्षिक परीक्षेच्या निमित्ताने दोन्हीही वर्गातील 53 विद्यार्थ्यांना परीक्षेकरता आवश्यक ते शालेय साहित्य ( कंपास, रायटिंग पॅड व पेन) चे वाटप वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनाला तर्फे महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी. एम.भोले डॉ.जगदीश, वाघमारे शिक्षक रवींद्र टेकाळे, शिक्षिका विशाखा वाघमारे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व परीक्षेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे म्हणाले की नियोजित अभ्यासाकरिता शिक्षक अतुलनीय मेहनत घेत असून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, गायन, व चित्रकला या कलागुणाकडेही उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करत आहेत व मेहनत घेत आहेत. त्याबद्दल गुरुजनांचे महामानव अभिवादन ग्रुप तर्फे व वाचनालयातर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिकवणी वर्गाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनी कु.अमृता चौगुले हिने "आज पौर्णिमे...

कायदे तज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Image
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजात अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारतीय लोकतंत्राच्या मूलभूत तत्त्वांना निरंतर आधार दिला आहे. त्यांच्या योगदानामुळे भारतीय संविधानाच्या निर्मितीत महत्वपूर्ण प्रगती झाली आहे, जी आजच्या काळातही महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या विचारप्रवृत्ती, दृष्टिकोन आणि त्यांनी केलेली कार्ये आजही या समाजाला प्रेरणा देणारी आणि मार्गदर्शक आहेत.  १. कायदे पंडित : डॉ. आंबेडकर हे एक अत्यंत प्रसिद्ध कायदे पंडित होते, ज्यांनी प्रत्येक गोष्टीच्या आढावा घेतला आणि कायद्यातील शिक्षण तर अमेरिकेतून घेतले. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून, त्यांनी भारतीय कायदेतंत्राच्या मजबूतीसाठी विविध महत्त्वाच्या कामांचे आयोजन केले. त्यांची कायद्याबाबतची गहरी समज आणि त्यांचे सजग विचार यामुळे नवीन कायदे आणि सुधारणा शक्य झाल्या.  २. भारतीय घटनेचे शिल्पकार : डॉ. आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते. संविधानाच्या मसुद्यात त्यांनी केलेले महत्त्वाचे बदल आणि सुधारणा देशाच्या संविधानिक व्यवस्थेच्या आधाराशी संबंधित आहेत. त्यांनी साम...

बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या नुतनीकरणासाठी लिंबागणेश येथे रास्तारोको आंदोलन ; पंचायत समितीच्या आडमुठेपणामळे नुतनीकरण रखडले

Image
  लिंबागणेश :-बीड पंचायत समितीच्या एका आदेशाने बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे नुतनीकरण गेल्या ९ महिन्यांपासून रखडले असुन बांधकाम कामगार (नुतनीकरण) पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असुन प्रत्येक वर्षी नोंदणी करणे गरजेचे आहे मात्र यासाठी ९० दिवस काम चहा यांची सही घ्यावी लागते. मात्र गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकारी सही देत नाहीत. त्यामुळे शासनाच्या बांधकाम कामगार विकास महामंडळ या योजनेंतर्गत विविध कल्याणकारी योजना जसे की कामगारांच्या मुलांना व कुटुंबियांना मिळणा-या मुला मुलींच्या शिक्षणासाठी  मदत,सामाजिक सुरक्षा, आर्थिक मदत, आरोग्य सुविधा यापासून वंचित असुन शासन स्तरावरून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आधिका-यांना ग्रामसेवकांना स्वाक्षरी देण्यास आदेशित करून कामगारांची अडचण दुर करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१० गुरूवार रोजी अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लि...

बेताल मंत्री माणिक कोकाटे यांना महाराष्ट्रा मधे फिरुन देणार नाही,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर/शिवसेना तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे

Image
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :              बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका येथे, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारले . शिरूर कासार तालुका येथे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांनवि‌षयी गरळ ओकुण केलेल्या बेताल व अपमानास्पद वक्तव्याबद्दल शिरूर कासार तालुका शहरातील जिजामाता चौकामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी , शेतकरी बांधवांसोबत शिवसैनिक यांच्या वतीने माणिक कोकाटे यांच्या प्रतिमेस शेण फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले .           या प्रसंगी बोलताना उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांनी सांगितले की , महायुती शासनातील माणिक कोकाटे हा मंत्रीमंडळात ठेवण्यासाठी लायक नसुन वारंवार शेतकऱ्यांन बदधल बेताल वक्तव्य करित आहे, यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनची अवहेलना होत अ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र चळवळही वास्तववादी, संवेदनशील व दिशादर्शक

Image
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र चळवळही वास्तववादी, संवेदनशील व दिशादर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारत संविधान निर्माता, एक प्रभावी विचारवंत, समाज सुधारक आणि राजकीय नेतेच नव्हते, तर ते एक उत्कृष्ट पत्रकार आणि संपादक देखील होते. त्यांच्या पत्रकारितेत त्यांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारधारा स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. त्यांनी चालवलेली वृत्तपत्रे भारतीय समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकत, असमानतेविरुद्ध आवाज उठवत, आणि जनजागृतीसाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजाच्या विविध वर्गांमध्ये जागरूकता निर्माण झाली, आणि हे वृत्तपत्रे केवळ माहिती पुरविण्यासाठीच नव्हे, तर लोकांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला प्रेरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. वृत्तपत्रांचे महत्त्व: बाबासाहेबांचे वृत्तपत्र चालवण्याचे उद्दिष्ट सामाजिक न्यायाचा संकल्पना लोकांच्या पर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणे हे होते. त्यांनी आपल्या पत्रकारिता द्वारे समाजाच्या दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांची ओळख करून दिली. ते मानतात की, एखाद्या पक्षाला त्याचे मुखपत्र नसल्यास तो पक...

रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत पाटोदा शहरात 210 घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल कार्यसम्राट विकासभू आमदार सुरेश आण्णा धस यांचे चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर आभार - प्रा.लक्ष्मण वाघमारे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत पाटोदा शहरात 210 घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने कार्यसम्राट विकासभू आमदार सुरेश आण्णा धस यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. पाटोदा शहरात मागील काही काळापासून घरकुलांची गंभीर आवश्यकता होती.ही बाब आमदार सुरेश आण्णा धस यांनी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या मदतीने पाटोदा नगरपंचायत अंतर्गत 210 घरकुलांची मंजुरी मिळवून दिली असल्याने पाटोदा शहरातील गरजू आणि गरिबांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागल्याने पाटोदा शहरातील चर्मकार समाजाच्या वतीने प्रा. लक्ष्मण वाघमारे यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांचे आभार व्यक्त करत म्हटले की, "आमदार सुरेश धस यांच्या अथक परिश्रमामुळे आज पाटोदा शहरातील चर्मकार समाजासह इतर समाजातील अनेक कुटुंबांना एक छत मिळवण्याची संधी मिळाली आहे. यामुळे समाजातील अनेक कुटुंबांची जीवनमान सुधारेल."प्रा. लक्ष्मण वाघमारे यांनी यावेळी बोलताना म्हणाले "आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव तसेच उपाध्यक्ष, सभापती सर्व नगरसेवक पाटोदा शहराच्या विकासासाठी ने...

मोहित पढीयार यांचा अभिनव उपक्रम वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता वृध्दाश्रमातील आजी-आजोबांना अन्नदान करत आपला वाढदिवस साजरा केला

Image
पाटोदा (प्रतिनिधी )पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक मोहित पढीयार यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसा निमित्त एक अभिनव व सामाजिक दृष्टिकोन घेत आपल्या वाढदिवसा निमित्त त्यांनी हार,तुरे,बॅनर आणि इतर व्यर्थ खर्च टाळून,आपल्या वाढदिवसा  मोहितजींनी आपल्या मित्र परिवार सोबत वृध्दाश्रमास भेट दिली आणि आश्रमातील आजी- आजोबांना अन्नदान केले. त्यांच्या या मदतीमुळे आश्रमातील वृद्धांना आनंद आणि समाधान मिळाले.मोहित पढीयार यांचा हा निर्णय एक आदर्श ठेवणारा ठरला, कारण त्यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने आणि समाजातील वंचित व्यक्तींना मदत करून साजरा केला. यामुळे इतरांना देखील सामाजिक कार्यांमध्ये योगदान देण्याची प्रेरणा मिळाली. वृद्धांचे आशीर्वाद मिळवलेल्या मोहितजींना त्यांच्या या उपक्रमामुळे खूप प्रशंसा मिळाली. तसेच, आश्रमातील सर्व वृद्धांनी त्यांना आशीर्वाद देत उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची शुभेच्छा दिली. मोहित पढीयार यांच्या या उपक्रमामुळे त्यांनी समाजात एक सकारात्मक बदल घडवला आणि त्यांचा वाढदिवस खूपच यादगार बनला.

अखेर लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम पुर्णत्वाकडे ; स्मशानभूमीत सरण रचुन केलेल्या ठिय्या आंदोलनाचे यश :- डॉ.गणेश ढवळे

Image
लिंबागणेश:-( दि.०८ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील १२ ते १४ वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचे ढासळलेल्या अवस्थेतील बांधकाम आणि उडुन गेलेले पत्रे यामुळे दुरावस्था झाली होती त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊन मृतदेहाची हेळसांड होत होती. नविन स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी विक्रांत वाणी,कृष्णा वायभट,आरूण ढवळे यांनी ढासळलेल्या बांधकामावरच सरण रचुन ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेत आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक (दहन/ दहनभुमी) जनसुविधा विशेष अनुदान योजनेंतर्गत मुलभूत सुविधांसाठी सन २०२२-२३ आर्थिक वर्षाकरीता ग्रामपंचायत लिंबागणेश येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरणासाठी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करत प्रशासकीय मान्यता दिली होती. आता काम पुर्णत्वाकडे गेले असुन नविन स्मशानभूमी पावसाळ्यात होणारी मृतदेहाची हेळसांड थांबणार असल्याने ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असुन उर्वरित पेलव्हिक ब्लॉक,पाण्याचा हौद, संरक्षक भिंत आदी कामांसाठी पाठपुरावा करणार आहोत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रभावशाली अर्थतज्ञ

Image
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक अत्यंत महत्त्वाचे अर्थतज्ञ होते आणि त्यांच्या विचारांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर खोल प्रभाव केला आहे. त्यांच्या कामामध्ये "प्रॉब्लेम ऑफ रुपी" या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय चलन व्यवस्थेच्या विविध पैलूंवर सखोल विचार केले, जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरला.  "प्रॉब्लेम ऑफ रुपी" ग्रंथातील महत्त्वाचे मुद्दे: 1 चलनाचे महत्व : आंबेडकर यांनी रुपयाविषयी चर्चा केली आहे, ज्या अंतर्गत त्यांनी भारतीय रुपयाच्या स्थिरतेचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या विचारानुसार, चलनाची स्थिरता अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. 2 बँकिंग प्रणाली : आंबेडकर यांनी बँकिंग प्रणालीच्या गरजेसाठी जोरदार वकिली करून, केंद्रीय बँक (या संदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडिया) स्थापन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी म्हणजे बँकांच्या निगडित आर्थिक नियंत्रणामुळे चलन व्यवस्थापनात स्थिरता येते, हे स्पष्ट केले. 3. आर्थिक धोरणे : त्यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक धोरणांच...

प्रताप समिंदरसवळे उभारता युवा नेता - राज जगतकर

Image
  एक काळ असा होता भीम नगर या परिसरामध्ये कबड्डीच्या खेळनेअनेक लोकांना वेड लावलेले होते या वेडापाई आपली गरिबीची परिस्थिती असली तरी कबड्डीच्या खेळामध्ये नैपुण्य मिळवणारे अनेक खेळाडू या परिसरामध्ये निर्माण झाली तो काळ हा दलित समाजाच्या परिवर्तनाचा व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचा व संघर्ष करण्याचाकाळ होता त्याच कालखंडामध्ये दलित पॅंथर नावाचं वादळ भारत देशामध्ये घोंगावत होते दलित समाजामध्ये आलेली मरगळझटकून या चळवळीने दलित माणसाला जागृत करण्याचं काम केलं या चळवळीने दलित समाजामधील स्वाभिमान जागृत करून अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याचं बळ या चळवळीने दिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने पीडित समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये अनेक युवक तन-मन धनाने या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते येथील समाज व्यवस्थेने धर्माच्या नावावर जातीच्या नावावर अनादी काळापासून दलित समाजावर केलेले अन्याय अत्याचारवृ त्त लढण्यासाठी तिचं बळ देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार झालेला लोकांनी उराशी कवटाळून येथील जातीयवाद धर्मवाद मातीत काढण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यामध्ये अनेक युवक सहभागी झाले ...

युवासेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे जल्लोषात संपन्न

Image
 राज्यमंत्री योगेशजी कदम यांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी मराठवाड्यातील युवा सेनेचे उल्हेखनीय काम पाहून त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. व इतर कार्यकर्त्यांनी मराठावाड्यातील युवासेनेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी. असे कौतुकातून बोलून दाखवले आहे. बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, युवासेना मार्गदर्शक व लोकसभा सदस्य मा. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली युवा सेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या भव्य दौऱ्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल-ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग ) मा. योगेशजी कदम साहेब,माजी मंत्री व जालना विधानसभा सदस्य मा.अर्जुन खोतकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेशजी सरनाईक,युवासेना सचिव किरणजी साळी, यवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा होता. राज्यमंत्री मा.योगेशजी...

लिंबागणेश येथे जगाला एकात्मतेची शिकवण देणारे संत कैकाडी महाराज यांची जयंती व रामनवमी उत्साहात साजरी

Image
लिंबागणेश :- ( दि.०६) मानवानो माणुसकीला जागा हा महामंत्र देणारे राष्ट्रसंत,महान तपस्वी संत राजाराम महाराज म्हणजेच कैकाडी महाराज यांची जयंती आणि रामनवमी आज दि.०६ रविवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रभु रामचंद्र आणि कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित रमेश गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन हरिओम क्षीरसागर  यांनी केले. डॉ.गणेश ढवळे यांनी आभार मानले.           संत कैकाडी महाराज यांच्या जीवनकार्याची महती वर्णन करताना प्रा .लेनाजी गायकवाड यांनी " संत कैकाडी कैकाडी ! "दरारा आसमंती!! कुळ -विठुचे लावुन! खनिल्या विषमतेच्या भिंती!!  कीर्तने ,प्रवचने, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन याद्वारे समाज प्रबोधन करून सर्व जगाला एकात्मतेची शिकवण देणारे महान तपस्वी कैकाडी महाराज यांचा जन्म राम नवमीला इ.स.१९०७ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म...

शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मानसोपचारासाठी येरवड्याला पाठवा ; वैद्यकीय उपचारासाठी मदतनिधी अजितदादांना पाठवणार :- डॉ.गणेश ढवळे

Image
लिंबागणेश:- ( दि.०६ ) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करत असुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन शेतक-यांना दिली जाणारी कर्जमाफी स्वतःच्या खिशातून देणार आहेत का?? त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन त्यांना मानसोपचारासाठी पुणे येथील येरवडा याठिकाणी भरती करण्यात यावे अशी मागणी करत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शेतकऱ्यांनी उपचारासाठी लागणारा वैद्यकीय मदतनिधी गोळा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठीमागे हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही.आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रूपयात पिक विमा योजना लागू केली आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते याविषयी शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे फळबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे आणि ५ ते १० वर्षं कर्जमाफी व्हायची वाट पहायची.तोपर्यंत कर्ज भरायचे नाही . तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात.त्या पैशाचं तुम्ही ...

राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सोहेल शेख याने द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्द खालापूरी येथे सत्कार संपन्न

Image
कुस्ती क्षेत्रात खालापूरी गाव अग्रगन्य अनेक पैलवान ह्या गावाने दिले- डॉ जितीन वंजारे बीड प्रतिनिधी :- खालापूरी हे गाव पैलवानाच गाव म्हणून ओळखलं जाते ह्या गावात अनेक पैलवान झाले आहेत आणि अजून घडतात. अनेक पैलवान कसरत करून सरकारी सेवेत पोलीस किंवा फौजी म्हणून रुजू झाले आहेत. गावामध्ये अनेक वस्ताद होऊन गेले आणि आता आहेतही त्यामध्ये कल्याण घोलप,दिगंबर गवळी,कैलास उगले,बाबासाहेब नाना डोके,इसाक भाई शेख,राजेंद्र परजने, सुहास खत्री,अशी अनेक वस्ताद आणि त्याने शेकडो पैलवान घडवली.त्यामध्ये लाल मातीतील तालीम तयार करून सपाट्या जोर अन बैठका काढून त्यांना योग्य मार्गदर्शन करून अनेक मल्ल या वस्तादानी घडवले. मी ही दिगंबर गवळी यांच्या तालमीत खेळलो पण शिक्षणा मुळे कुस्तीचा नाद सोडून दिला असे डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले.          खालापूरी गावाची आज पैलवान,पोलिस अन फौजीच गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. खालापुरी येथील सध्या टॉप टेन मध्ये सोहेल शेख, अमर गवळी, सोहम परजने, रवींद्र परजने अशी पैलवान आहेत जी चांगली खेळत आहेत. यांच्यात राज्यस्थरीय स्पर्धेत खालापूरी ...

लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने लोक रत्न सह विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारास प्रस्ताव पाठवावे :सखाराम पोहिकर

Image
बीड (प्रतिनिधी )लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी लोक रत्न पुरस्कारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्जांना राज्यस्तरीय समाज रत्न कृषिरत्न शिक्षक रत्न उद्योग रत्न सहकार रत्न साहित्यरत्न कलारत्न क्रीडा रत्न आरोग्यरत्न आदर्श पत्रकार आदर्श पोलीस आदर्श व्यक्ती आदर्श ग्रामपंचायत आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श शासकीय अधिकारी आदर्श कॉन्टॅक्टदार आदर्श वकील आदर्श शाळा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल महामाहीम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते लोक रत्न सह विविध रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत हा सोहळा संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे हा पुरस्कार सोहळा 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय महामाहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाठ कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री तथा खासदार संदिपान जी भुमरे पाटील माजी खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संदीप क्षीरसागर आमदा...

जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग यांच्या लेखी पत्रामुळे अन्नत्याग उपोषण स्थगित- भाई गौतम आगळे सर

Image
परळी ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत च्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्य अभियंता,औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व विभाग प्रमुख यांच्या अधिनस्त कंत्राटदार कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केलेले किमान वेतन आणि इतर सोयी सुविधा मागील अनेक वर्षापासून देत नसल्याने आणि नगरपरिषद बीड आस्थापनेतील फक्त सफाई कंत्राटी कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे मागील 22 महिन्यापासून कामावरून कमी केले त्यांना नोकरीच्या व पगाराच्या सलग ते सह पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे याकरिता 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोर "रोजंदारी मजदूर सेना मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी उपोषण सुरू केले होते; ते दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 17 : 55 वा सलग अकराव्या दिवशी जिल्हा सह आयुक्त, ( प्र ) नगर परिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड त्र्यंबक कांबळे यांच्या सहीचे लेखी पत्र दिल्यामुळे तुर्तास अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघटनेचे केंद्रीय महासचिव तथा कामगार नेते भा...

अर्धमसला गावकऱ्यांचे "बीड बचाव मंच" ने केले हार्दीक अभिनंदन

Image
अर्धमसला गावकऱ्यांचे "बीड बचाव मंच" ने केले हार्दीक अभिनंदन बीड प्रतिनिधी - अर्धमसला येथील गावकऱ्यांनी लक्षणीय सहकार्य आणि जागरूकता दर्शविल्यामुळे महाराष्ट्रात सणासुदीच्या काळात मोठा घातपात व अनर्थ टळला. या संदर्भात "बीड बचाव मंच" द्वारे गावकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. बीड बचाव मंचच्या कार्यात सक्रिय असलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, वकील संघाचे प्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे नेतृत्व, सामाजिक प्रतिष्ठानांचे कार्यकर्ते, आणि पत्रकार बंधू एकत्र आले होते. त्यांनी अर्धमसला येथील त्या मशिदीत झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सजगतेचे उदाहरण मूल्यांकन करीत एकत्र येऊन घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. गावकऱ्यांचे एकत्र येणे आणि सर्व जात-धर्मातील लोकांचे सहकार्य यामुळे महाराष्ट्रात मोठा अनर्थ व घातपात घडवून आणण्याचा कट हाणून पाडण्यात यश मिळवले. या कार्याची दखल घेऊन बीड बचाव मंचाचे प्रमुख मार्गदर्शक डी.जी.तांदळे, नितीन जायभाय, भाऊराव प्रभाळे,ॲड.अनिल बारगजे,ॲड.नितीन वाघमारे, अशोकराव येडे, डॉ. संजय तांदळे, मौलाना मोईनुद्दीन शेख, बाजीराव ढाकणे,...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालय येथे विनम्र अभिवादन.

Image
बीड प्रतिनिधी - कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी महामानव अभिवादन ग्रुप तर्फे महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.  आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे अध्यक्ष म्हणून तर राणोजी उजगरे महासचिव वंचित बहुजन आघाडी धारूर चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पदीप धुपाने पूजन करून पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महामानवा अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले, महामानव वाचनालयाचे उपाध्यक्ष डी.जी वानखेडे व प्रा. अशोक गायकवाड,ॲड.तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम राऊत यांनी तर प्रस्ताविक अर्जुन जवंजाळ यांनी केले.अनिल डोंगरे यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातून सुराज्य कसे निर्माण केले व त्यांच्या राज्यकारभाराची नीती तसेच राज्यकारभाराची, शेतकरी,स्त्री व जमीन सुधारण्या...

कु.साक्षी सुभाष वीर ही M.B.B.S.अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

Image
कु.साक्षी सुभाष वीर ही M.B.B.S.अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.   बीड प्रतिनिधी - साक्षी सुभाष वीर हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे M.B.B.S. पूर्ण केले. ती सुभाष किशनराव वीर यांची मुलगी असून पाली तालुका बीड येथील रहिवासी आहे.या यशाबद्दल तिचे पाली ग्रामस्थ, शिक्षक नेते केशव आठवले,दिनकर जोगदंड,विकास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अजित डोंगरे,लेखा व वित्त अधिकारी आबासाहेब घायाळ, अशोक शेजुळ, गणेश चव्हाण, शिलवंत सर,अर्जुन घुमरे यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टाकळी मानूर येथील शाहशरीफ बाबांची यात्रा अनुभवयांस मिळणं माझं भाग्य-डॉ.जितीन वंजारे

Image
बीड प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे टाकळी मानूर येथे शाह शरीफ बाबा यांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक भक्त येथे जमा होतात ही यात्रा तीन दिवस चालते.नवस बोलला की तो पूर्णतवास जातो पूर्ण होतो अशी अख्याईका इथे आहे त्यामुळे आपल्या मनातील मन्नत इछया मागण्यासाठी हजारो भाविक यात्रेनिमित्त इथे येतात.तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात पहिल्या दिवशी बुधवार 02/04/2025 रोजी संदल, गुरुवार दिनांक 03/04/2025 रोजी सकाळी कावडी आगमन आणि स्वागत मिरवणूक आणि सायंकाळी छबीना व 04/04/2025 वार शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा हंगामा व रात्री गंगाजल अभिषेक असतो.या वेळेत पारंपारिक मिरवणून आताशबाजी, लाईट रोशनाई, तिखट-गोड जेवण, संदल, कुस्त्या आणि पाळणे व तमाशा या पण गोष्टी असतात. यात्रा मनोरंजन असून सत तम आणि रज गुणांची उधळण येथे पाहवयास मिळते. त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम भाईचारा या यात्रेच मुख्य सूत्र असत गावातील सर्व जाती धर्माचे लोक यात्रेत सहभागी होतात. शाह शरीफ बाबा हे पावन पीर असून पूर्वीपासून बोललेले नवस इथे सत्यात ऊतरतात अशी अख्याईका आहे. याच पिराचा शाह शरीफ बाबा दर्गाचा प्रत्यक्ष संबंध छत्रपती घराण्या...

शेख निजामच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे ताकतीशी पाठीशी राहील- -उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

Image
बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील व शहरातील प्रगल्भ आणि अचूक राजकीय निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या शेख निजाम यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला व त्यानिमित्ताने शेख निजाम यांचा पक्षप्रवेश व रमजान ईद निमित्त ईद-ए-मिलाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश व ईद-ए-मिलाप च्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजित दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रस्ताविक पर भाषणामध्ये शेख निजाम यांनी बीड शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या नवीन ईदगाह बालेपिर येथे सिमेंट काँक्रेट रस्ता व काँक्रिटीकरण, अल्पसंख्याक समाजातील मुलींकरिता मंजूर असलेले वस्तीग्रह च काम सुरू करणे, बीड जिल्ह्यात उर्दू घराची स्थापना करणे, इतर जिल्ह्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील यूपीएसस एमपीएससीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक मुला मुलीं करिता स्टडी सेंटर व लायब्ररी स्थापित करणे, इस्लामपुरा ईदगाह येथे जागा अपुरी पडत असल्यामुळे बिंदुसरा नदी पात्रातील जागा उपलब्ध करून देणे, अल्पसंख्यांक बहुल भा...

उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांना राज्यस्तरीय लोकाशा भुषण अवार्डने सन्मान

Image
पालकमंत्री ना.अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वितरण उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडून भरत गित्ते यांचे भाषनातून केले कौतुक परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :-          ॲल्युमिनियम मॅन भरत गीते हे भारताला ॲल्युमिनियम उद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची दूरदृष्टी निव्वळ व्यवसायापलीकडेही जाते. विकास, शिक्षण आणि देशाच्या विकासाप्रति त्यांची सखोल बांधिलकी आहे. उद्योग क्षेत्रात वेगळी भूमिका ओळख निर्माण करणारे परळीचे भूमिपुत्र ॲल्युमिनियम मॅन भरत केशवराव गिते यांना बीड येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय लोकाशा भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार, मंत्री ना.पंकजाताई मुंडेंच्या प्रमुख उपस्थिती भरत गित्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान ॲल्युमिनियम मॅन भरत गिते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर यांनी म्हटल्याप्रमाणे "इवलेसे रोप लावलेल्या द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी ||" या उक्तीप्रमाणे माझे कार्य सुरू आहे. या पुरस्काराने...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शेख शफीभाऊ यांचा लिंबागणेश ग्रामपंचायत मार्फत सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ

Image
  लिंबागणेश:- ( दि.०३ ) बीड तालुक्यातील लिंबागणेशचे भुमिपुत्र शेख शफीभाऊ शेख अब्दुल हे नियत वयोमानानुसार पाटोदा सार्वजनिक बांधकाम विभाग येथुन निवृत्त झाले असुन आज दि.०३ गुरुवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीच्या वतीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते.कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचलन भिम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांनी केले. शेख शफीभाऊ यांचे वर्गमित्र निवृत्त अभियंता गणपत तागड यांनी तसेच पत्रकार हरीओम क्षीरसागर,माजी सरपंच बाळासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य शेख समीर, रमेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.गणेश ढवळे यांनी शेख शफीभाऊ यांनी केलेल्या सेवेचा व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करीत असताना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ सुखी, समृद्धी, आनंदाने जावो व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी शुभेच्छा दिल्या.सत्कारमूर्ती शेख शफीभाऊ यांनी सत्काराला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील भोकरदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग या...

योगेश्वरी शिक्षण संस्थेने शिक्षणाचे क्षेत्र सोडून व्यवसायाकडे वळणे बंद करावे-लोक जनशक्ती पार्टी (र)

Image
अंबाजोगाई :   अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्था ही नामांकित शिक्षण संस्था आहे सदर शिक्षण संस्थेमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवत आहेत परंतु अशा नामांकित संस्थेने मुख्य रस्त्यावर त्यांच्या जागेत अनधिकरितपणे व्यावसायिक गाळे बांधकाम केले आहेत सदर गाडी बांधकाम झाल्यामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू होतील महाविद्यालय शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्या व्यवसायापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे या ठिकाणी हॉटेल टपऱ्या विविध अवैध धंदे सुरू होऊन विद्यार्थ्यांना व्यसनाधीनता निर्माण होईल तसेच या ठिकाणी येणारे पुकार मुले हे विद्यार्थिनींची छेडछाड करतील यामुळे विद्यार्थिनींना बऱ्याच अडचणी निर्माण होतील तसेच या ठिकाणी मुलींची गोदावरी बाई कुंकू योगेश्वरी शाळा आहे यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींना खूप अडचणी येतील योगेश्वरी शिक्षण संस्थेसाठी शासनाने जागा दिलेली असून ती फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी संस्थेत कसल्याही प्रकारे व्यावसायिक गाळे बांधून त्यातून उत्पन्न घेता येणार नाही संस्था ही विद्यार्थ्यांच्या हित...

आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार ‘संघर्ष दिन’ साजरा,राज्यात लॉंग मार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे सरांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

Image
लॉगमार्च प्रणेते, भीमसैनिकांचे सरसेनापती, आंबेडकरी आंदोलनातील क्रांतियोद्धा, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवारी 1 एप्रिल 2025 रोजी रिपब्लिकन ब्रदरहूड (भाईचारा) अभियानाअंतर्गत पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युवक आघाडी, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेना तसेच पीपल्स फाऊंडेशनतर्फे संपूर्ण राज्यात ‘संघर्ष दिन’ साजरा केला जाणार आहे. नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला, बुलढाणासह राज्यातील विविध शहरातील निःशुल्क अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान, अनाथालय-रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नागपुरातील आनंद नगरात मुख्य सोहळा देशातील आंबेडकरी, बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्य...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर, निवडून येण्यापूरत कर्जमाफी देणार म्हणणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा-डॉ.जितीन वंजारे

Image
      बीड प्रतिनिधी :- निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी व्हलगणा करणारे व भरघोष मते घेऊन सरकार स्थापन करणारे सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि राज्यातील सर्व मंत्री यांच्यावर तात्काळ फसवणुकीचा गुन्हा नोंद करा कारण फक्त निवडणुकी पुरती उदघोषणा करून सरळ सरळ शेतकरी कष्टकरी यांची फसवणूक करून मते लुबाडणाऱ्या येथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्र्यावर फसवणूकीचा 420 चा गुन्हा नोंद करा नसता बोलल्या प्रमाणे कर्जमाफी चा निर्णय घ्या. स्वतः बोलल्याप्रमाणे वागता येत नसेल तर नैतिकतेने खुर्च्या सोडा खाली करा नसता निवडणूक आयोग आणि महामहीम कोर्ट यांनी सध्याच्या सत्तेतील मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्याशी सर्व मंत्र्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा अशी घोषणा शेतकरी नेते मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केली आहे.           शेतकऱ्यांना हमी भाव नाही दरवर्षी दहा पटीने खताचे बियांनांचे व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, यंत्र सामग्री चे भाव वाढत आहेत, महागाई वाढत आहे पण शेताकऱ्यांच्या शेतीमालला जो 20...

शासनाने निर्धारित केलेले किमान वेतनचा अपहार करणार्यवर मोकाका लावा,कंत्राटी कामगारांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी-भाई गौतम आगळे यांची मागणी

Image
बीड प्रतिनिधी (१) बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत व परळी औष्णिक विद्युत केंद्र व्यवस्थापन यांच्या अधिनस्त कंत्राटदारामार्फत हजारो कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांना किमान वेतन न देता कंत्राटदार अल्प वेतन देऊन करोडो रुपये कमवत आहेत. त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करुन कंत्राटी कामगारांना त्यांच्या गुलामीतून मुक्त करण्याची मागणी रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.      जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आगळे सर यांनी नमूद केले आहे की सदरिल प्रकरणी  न्याय हक्कासाठी दिनांक 24 मार्च 2025 पासून छ. महाराज, म. फुले, डॉ.आंबेडकर मिशन प्रणित, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना मराठवाडा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्था सांभाळून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा ०९ वा दिवस संपला आहे. तरी सुद्धा आजतागायत प्रकरणाचा निपटारा क...