Posts

Showing posts from April, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे बीडमध्ये उत्साहात स्वागत

Image
बीड (प्रतिनिधी ) दि.३० : संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ अंतर्गत निघालेल्या गडकिल्ले, माती आणि नद्यांचे जल-कुंभ रथयात्रेचे बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता बीडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या गौरव रथयात्रेच्या माध्यमातून राज्याच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या थोर महापुरुषांचा परिचय नव्या पिढीसमोर मांडला जात असून, महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे. ही रथयात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही यात्रा पोहोचल्यावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत झाले. स्वागत समारंभावेळी प्रमुख समन्वयक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी सेवादलाचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, तसेच बळीराम ग...

भारतीय लोकशाही ही बाबासाहेबांची देशाला दिलेली अमूल्य देणगी आहे - प्रा.डॉ. विनोद जगतकर

Image
 परळी प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात आणि श्रद्धेने मौजे संगम येथे साजरी करण्यात आली. प्रारंभी या विशेष कार्यकमाची सुरुवात त्रिशरण व पंचशील घेऊन व महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. हा क्षण एक प्रकारे सामाजिक एकतेचा आणि समानतेचा संदेश देणारा ठरला.मुख्य पाहुणे प्रा.डॉ.विनोद जगतकर यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी , मिलिंद घाडगे, रामेश्वर महाराज कोकाटे, दीपक कांबळे, परळी सह संगम येथील मान्यवर उपस्थित होते.  भारतीय लोकशाहीच्या बाबासाहेब यांच्या अमूल्य देणगीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.प्रमुख मुद्दे भारतीय लोकशाही प्रा. जगतकर यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले की भारतीय लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण देणगी आहे, जी समाजातील सामाजिक न्यायाची आणि समानतेची गोडी वाढवते. त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आहेत, जिथे जात, धर्म, लिंग या सर्व गोष्टींतील भेदभावाला दूर करण्याची आवश्यकता आहे.समाजातील उपस्थिती कार्यक्रमात मोठ्या संख्...

प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित

प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागरांची मध्यस्थी; ना.अजितदादांसमोर प्रश्न मांडण्याची ग्वाही बीड (प्रतिनिधी ) दि.३० : जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर, भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या ७४ शिक्षकांनी गणित व विज्ञान विषयांत रूपांतर करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू होते. उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२९) भेट देत शिक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले की, शिक्षकांच्या मागण्या न्याय्य असून त्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत शासनदरबारी पाठपुरावा करून या मागण्यांची योग्य ती दखल घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर ल...